सुनेत्रा पवारांची ‘अजितनिती’ विधान परिषद फक्तं १ जागा त्यातही ही रणनीती; मतदारसंघ अन् परिवार हित अबाधित

0
3

स्वर्गीय माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निधनानंतर विधान परिषदेची पहिलीच निवडणूक होत आहे. राज्यात 9 जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला अवघी १ जागा येत आहे. उमेदवारी मिळवण्यासाठी पक्षात मोठी चुरस आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या कोणाला संधी देणार, याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. असंख्य इच्छुकांची संख्या आणि निर्माण झालेली पोकळी यातून उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार यांनी ‘अजितनीती’चा वापर करून पुण्यातील हक्काचा मतदार संघ अबाधित ठेवण्याची खेळी केली आहे. परिवाराच्या पक्षाशी फारकत घेत मित्र पक्ष(भाजप) शी जवळीक साधणाऱ्या विद्यमान आमदाराचा करेक्ट कार्यक्रम करण्याच्या हेतूने पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरामध्ये पक्षाची ताकद आबादीत ठेवण्यासाठी ‘या’ नव्या चेहऱ्याला संधी देण्याचा निर्णय घेतला अशी चर्चा सुरू झाली आहे.

अधिक वाचा  मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला नवं राजकीय वळण मनोज जरांगेंना शह देण्यासाठी SEBCचा मुद्दा? जरांगेंचा एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोप

पक्षात अनेक नावे चर्चेत आहेत. मात्र, कधीकाळी पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचा दबदबा होता. मात्र, महापालिका निवडणुकीत पक्षाला मोठे यश मिळाले नाही. पक्षाची ताकद या शहरांमध्ये कमी होत असताना येथील नेत्याला विधान परिषदेत संधी देत पक्षाची ताकद वाढवण्याची रणनीती आखली जाण्याची चर्चा आहे.

माजी आमदार सुनील टिंगरे यांचे नाव पुण्यातून विधान परिषदेच्या आमदारकीसाठी चर्चेत आहेत. त्यांना विधानसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागला होता. वडगाव शेरीचे आमदार बापूसाहेब पठारे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार असले तरी त्यांच्या परिवाराची जवळीक ही भाजपसोबत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे त्याच मतदारसंघात सुनील टिंगरे यांना ताकद देण्याची चर्चा आहे.

अधिक वाचा  नागपूर पोलीस आयुक्त विश्वास नांगरेपाटील यांनी कुणबी दाखला वापरला: अंतरवालीत ओबीसी आंदोलनात खळबळजनक दावा

पिंपरी-चिंचवडमधून कोण?

पिंपरी-चिंचवड या शहराने राष्ट्रवादी काँग्रेसला नेहमीच साथ दिली होती. मात्र, बदलत्या राजकीय समीकरणांमुळे राष्ट्रवादीचा हा बालेकिल्ला ढासळला आहे. महापालिका निवडणुकीत अजित पवारांनी पिंपरी-चिंचवडमध्ये स्वतः लक्ष घातले होते. भाजपची येथे वाढणारी ताकद पाहता विधान परिषदेसाठी येथील नेत्यांच्या नावाची देखील विचार होऊ शकतो. त्यामध्ये योगेश बहल, नाना काटे, अजित गव्हाणे यांच्या नावाची चर्चा आहे.

तटकरे गट सक्रीय?

पक्षात प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा गट निर्माण होत असल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे. त्या गटातील नेत्यांची नावे देखील उमेदवारीसाठी चर्चेत आहेत. अशा स्थितीत अजित पवारांचा एकनिष्ठ शिलेदार म्हणून अमोल मिटकरी यांचे नाव देखील पुन्हा उमेदवारीसाठी चर्चेत येत आहे. त्यांनी त्यांच्या आमदारकीच्या कार्यकाळात पक्षाची बाजू नेटाने मांडली होती.

अधिक वाचा  दुष्काळाचा मुद्दा मनोज जरांगेंच्या भूमिकेपेक्षा महत्त्वाचा, मुंबईला गणेशोत्सवात आंदोलन करु नये: चंद्रशेखर बावनकुळे