दुष्काळाचा मुद्दा मनोज जरांगेंच्या भूमिकेपेक्षा महत्त्वाचा, मुंबईला गणेशोत्सवात आंदोलन करु नये: चंद्रशेखर बावनकुळे

0
7

राज्यात सध्याच्या घडीला मनोज जरांगे पाटील हे काय करतात किंवा त्यांच्या भूमिकेपेक्षा राज्यातील दुष्काळाच्या परिस्थितीचा मुद्दा महत्त्वाचा असल्याचे मत राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले. महाराष्ट्रातील 18 जिल्ह्यांमध्ये थोडा कमी पाऊस आहे. पीक करपत आहे. काल सर्व जिल्हाधिकाऱ्यांची मी बैठक घेतली. आज चार वाजता पुन्हा सर्व जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. ते शनिवारी नागपूर येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

मुंबईमधील आंदोलन म्हणजे मुंबईकरांसाठी कायदा सुव्यवस्था संदर्भात कठीण आहे. याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाने दिलेले निर्णय पाहता मुंबईत कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये याची सर्वांनी काळजी घेतली पाहिजे. राज्यातील सर्व आंदोलकांना विनंती राहील की, या काळात मुंबईत आंदोलन करणे राज्याच्या दृष्टीने योग्य नाही. ओबीसी किंवा मराठा समाज असेल कोणाचाही हक्क डावलता येणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे या दोघांनी मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. इतिहासात कधी न घेणारे निर्णय देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी घेतले तरीही या दोन्ही नेत्यावर करण्यात येणारी टिप्पणी महाराष्ट्राला आणि समाजाला पटत नाही. आजवर मराठा समाजाला दिलेला न्याय हा देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या काळात मिळाला आहे. आमचा सरकार मराठा समाजाला न्याय देण्याच्या भूमिकेत काम करत आहे. त्यामुळे सरकारला थोडं वेळ दिला गेला पाहिजे.

अधिक वाचा  काँग्रेसमध्ये भाकरी फिरणार! राज्य प्रभारींनंतर आणखी १०० नेत्यांची यादी तयार; नेत्यांच्या दिल्लीत मुलाखती घेतल्या जाणार

मुंबई किंवा महाराष्ट्रात गणेश उत्सव हा देशातील सर्वात मोठा सण आहे. या काळात कोणी आंदोलन करू नये, असे आवाहन चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.राज्यातील शेतकऱ्यांना दुष्काळ काळात कशी मदत आणि त्यांच्या पाठीशी उभे राहता येईल, आणि शेतकरी आत्महत्या करणार नाही हे महत्त्वाची बाब आपल्यासमोर आहे. राज्याच्या दुष्काळाकडे जाणीवपूर्वक लक्ष टाकण्याच्या मुख्यमंत्र्यांनी मला सूचना दिल्यात आजची बैठक त्यासाठीच होती. कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्र्यांनी मला आणि चीफ सेक्रेटरी ना सर्व राज्याचे तातडीने सर्वेक्षण सुरू करण्याचं सूचना केले आहे. जिल्ह्यात काय उपाययोजना करता येईल यासाठी मुख्यमंत्र्यांनी सूचना केल्या आहे. आणि जी नियमावली आहे त्यानुसार आम्ही शेतकऱ्यांना मदत करण्याच्या भूमिकेत आहोत.

अधिक वाचा  BRICS शिखर परिषद ‘पुणेरी’ मान व्हिएतनामच्या पंतप्रधानांचे भारत सरकारच्या वतीने केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळांनी केले स्वागत

राज्याची पूर्ण परिस्थिती समोर आल्यानंतर येणाऱ्या कॅबिनेटमध्ये आम्ही ती मांडू. या मंगळवारी राज्यातील परिस्थितीचा आढावा मुख्यमंत्र्यांना देणार. मी आज जिल्हाधिकाऱ्यासोबत चर्चा करणार. त्या त्या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि संपूर्ण यंत्रणा दौरा करणार आहे मी देखील काही ठिकाणी जाणार आणि येणाऱ्या कॅबिनेटमध्ये संपूर्ण आढावा मांडणार असल्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.