Home Blog Page 152

एकनाथ शिंदेंनी ‘त्या’ नेत्याला दिलेला शब्द पाळला, विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकासाठी अखेर शिवसेनेकडून नाव जाहीर

0

विधानपरिषदेच्या रिक्त झालेल्या पाच जांगासाठी येत्या 27 मार्चला पोटनिवडणूक होत आहे. या जागांसाठी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजप तीन, शिवसेना शिंदे व राष्ट्रवादी अजित पवार गटाला प्रत्येकी एक जागा दिली जाणार आहे. यानुसार, काल भाजपकडून विधानपरिषदेच्या रिक्त जागांसाठी उमेदवार घोषित करण्यात आले. यात संजय केणेकर, दादाराव केचे आणि संदीप जोशी या तिघांचा समावेश आहे. यानंतर आता विधानपरिषदेच्या एका जागेसाठी शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडून एक नाव जाहीर करण्यात आले आहे. शिवसेनेचे संपर्क प्रमुख आणि माजी विधानपरिषद सदस्य चंद्रकांत रघुवंशी यांना पुन्हा विधानपरिषदेवर पाठवलं जाणार आहे.

शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या वाट्याला विधानपरिषदेची एक जागा आली आहे. यासाठी अनेकजण इच्छुक होते. मात्र यात धुळे–नंदुरबारचे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे संपर्क प्रमुख आणि माजी विधानपरिषद सदस्य चंद्रकांत रघुवंशी यांचं नाव आघाडीवर होते. त्यासोबतच शीतल म्हात्रे, संजय मोरे, किरण पांडव यांचीही नाव चर्चेत होती. अखेर आता चंद्रकांत रघुवंशी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेला शब्द पाळला, असे बोललं जात आहे.

विधानपरिषदेतील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे सदस्य आमश्या पाडावी हे अक्कलकुवा मतदार संघातून विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून आले आहेत. त्यामुळे पाडवी यांची विधानपरिषदेतील जागा रिक्त झाली होती. सव्वातीन वर्ष कार्यकाळ बाकी असलेल्या या जागेसाठी विधान परिषदेची निवडणूक होत आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांना संधी देण्यात आली आहे.

कोण आहेत चंद्रकांत रघुवंशी?
चंद्रकांत रघुवंशी हे 1992 पासून काँग्रेस पक्षात सक्रीय राजकारणात आहेत.
चंद्रकांत रघुवंशी 1992 मध्ये जिल्हा परिषदेचे सदस्य होऊन धुळे व नंदुरबार जिल्हा एकत्रित असताना सहा वर्षे धुळे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते.
त्यानंतर सलग तीनवेळा ते विधानपरिषदेचे सदस्य आहेत.
आमदारकीची मुदत एप्रिल 2020 मध्ये पूर्ण होणार होती. मात्र तत्पूर्वीच त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आणि ऑक्टोबर २०१९ मध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला.
त्यानंतर जुलै २०२२ रोजी त्यांनी एकनाथ यांच्या शिवसेनेत प्रवेश केला.
कोणत्या पक्षाकडून कोणाला संधी?

भाजपा

1) संजय किणीकर- संभाजीनगर

2) दादाराव केचे- वर्धा

3) संदीप जोशी – नागपूर

शिवसेना

1) चंद्रकांत रघुवंशी- नंदुरबार

राष्ट्रवादी कांग्रेस (अजून जाहीर नाही)

संभाव्य 1) उमेश पाटील 2) झिशान सिद्दीकी

एअरपोर्ट रोडवर अंदाधुंद गोळीबार, गोळ्या झाडून हायप्रोफाईल नेत्याची हत्या, शहरात खळबळ

0

गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानात सतत दहशतवादी हल्ले होत आहेत. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच आता पाकिस्तानच्या क्वेट्टा शहरात अज्ञात हल्लेखोरांनी जमियत उलेमा-ए-इस्लाम (JUI) चे वरिष्ठ नेते मुफ्ती अब्दुल बाकी नूरझाई यांची गोळ्या झाडून हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. ही घटना क्वेट्टा शहरातील एअरपोर्ट रोडवर घडली. या घटनेमुळे पाकिस्तानात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानच्या क्वेटा शहरातील एअरपोर्ट रोडवर जेयूआयचे नेते मुफ्ती अब्दुल बाकी नूरझाई यांच्यावर अंदाधुंद गोळीबार करण्यात आला. यामुळे ते गंभीररित्या जखमी झाले. यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. सध्या सुरक्षा दलाकडून या घटनेचा तपास सुरू आहे.

लष्कराच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला
पाकिस्तानमध्ये गेल्या काही दिवसांपासून दहशतवादी हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे. रविवारी क्वेट्टाहून ताफ्तानला जाणाऱ्या एका लष्कराच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला झाला. यात सात जवान शहीद झाले, तर २१ जण जखमी झाले. बलुच लिबरेशन आर्मी (BLA) ने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. या हल्ल्यात ९० पाकिस्तानी सैनिक मारले गेल्याचा दावा केला जात आहे. यापूर्वी ११ मार्च रोजी क्वेट्टाहून पेशावरला जाणाऱ्या जाफर एक्सप्रेसवर बलुच लिबरेशन आर्मीच्या बंडखोरांनी हल्ला केला होता.

जाफर एक्सप्रेस हायजॅक
जाफर एक्सप्रेस ही दुपारी १.३० दरम्यान पोहोचते. मात्र त्यापूर्वीच तिच्यावर हल्ला करण्यात आला. बोलान येथील मशफाक बोगद्यात ही ट्रेन हायजॅक करण्यात आली. या घटनांमुळे पाकिस्तानातील सुरक्षा व्यवस्था आणि दहशतवादी हल्ले यावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

“सहा महिने थांबा, आणखी एकाचा बळी जाणार…” सुप्रिया सुळे यांचा मोठा गौप्यस्फोट

0

शंभर दिवसांत एक बळी गेला आहे. सहा महिने थांबा आणखी एक बळी जाणार आहे. त्यांचे नाव आत्ताच जाहीर करणे योग्य नाही, असा मोठा गौप्यस्फोट खासदार सुप्रिया सुळे यांनी केला. जो बायकोच्या आड लपतो आणि सगळे उद्याोग करतो, त्याचा बळी जाईल, असे सूचक विधान सुप्रिया सुळे यांनी केले. सुप्रिया सुळेंच्या या विधानानंतर राजकीय वातावरणात खळबळ उडाली आहे.

अशा फालतू माणसाबरोबर काम करणे शक्य नाही
सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या जिल्हा आढावा बैठकीला हजेरी लावली. या बैठकीला माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार शशिकांत शिंदे, बापू पठारे, शहराध्यक्ष प्रशांत जगताप, अंकुश काकडे उपस्थित होते. यावेळी सुप्रिया सुळे यांनी अजित पवार गटासह धनंजय मुंडेंवर जोरदार टीका केली. ‘बरे झाले पक्ष फुटला. जो दोन मुले असलेल्या बायकोच्या वाहनामध्ये बंदूक ठेवू शकतो, अशा फालतू माणसाबरोबर काम करणे शक्य नाही,’ अशा शब्दात सुप्रिया सुळे यांनी धनंजय मुंडेंवर घणाघात केला.

पैसा आणि सत्तेच्या पुढे झुकणं बंद केले पाहिजे
“मला कधी कधी वाटतं बरं झालं पक्ष फुटला. जो पुरुष स्वतःच्या बायकोच्या गाडीमध्ये बंदूक ठेवतो आणि तिला अडकवतो. काही नैतिकता आहे की नाही? अशा व्यक्तीबरोबर मी पक्षात काम करू शकले नसते. एक वेळ विरोधी पक्षांमध्ये आयुष्य काढेन, परंतु नैतिकता सोडणार नाही. एक तर ते पक्षात राहिले असते नाहीतर मी बाहेर पडले असते. बीडमध्ये जा, संतोष देशमुख यांच्या आईला भेटा. महादेव मुंडे यांच्या बायकोला भेटा. त्यांच्या लेकरांची काय चूक होती? पैसा आणि सत्तेच्या पुढे झुकणं बंद केले पाहिजे. अशा प्रवृत्तीच्या विरोधात लढलं पाहिजे”, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

चार-सहा महिन्यांत आणखी एकाची विकेट पडेल
राज्यातील एक मंत्री खूपच बोलत आहेत. परंतु ते बायकोच्या आड लपतात आणि बायकोच्या आडून बोलतात. हे डरपोक मंत्री कोण आहेत लवकरच संपूर्ण महाराष्ट्राला कळेल. चार-सहा महिन्यांत त्यांची विकेट पडेल”, असा मोठा गौप्यस्फोट सुप्रिया सुळे यांनी पक्षाच्या बैठकीत केला.

“एवढी वर्षे आपण सत्तेत राहिलो. आता आपण विरोधी पक्षात आहोत. अरे बापरे.. आता विरोधी पक्षात राहून संघर्ष करायचा का? केवढा मोठा प्रॉब्लेम, ही मानसिकता मनातून काढून टाकून संघर्षासाठी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उभे राहिले पाहिजे” अशी अपेक्षा सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली.

सिंबायोसिस स्कील्स ॲन्ड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी तर्फे जर्मनीतील शिक्षणा करीता मार्गदर्शन

0

पुणे, १३ मार्च २५ – सिंबायोसिस स्कील्स ॲन्ड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी, पुणे (SSPU) ने ॲलेन युनिव्हर्सिटी, जर्मनी सोबत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक मार्गदर्शना करीता चर्चा सत्राचे आयोजन केले होते.  आज ॲलेन युनिव्हर्सिटीच्या अधिकाऱ्यांनी सिंबायोसिस स्कील्स ॲन्ड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीला भेट दिली.

ॲलेन युनिव्हर्सिटीतील, मिरियम कोल्मर-ट्रायनी (एमए), आंतरराष्ट्रीय संबंध आणि संशोधन विपणन तज्ञ, आणि प्रा. डॉ. अंजा डायकमन यांनी शिष्यवृत्तींबद्दल मौल्यवान माहिती दिली. या वेळी मेजर सोनाली कदम (निवृत्त) आणि राघवन संथानम, संचालक – स्कूल ऑफ पोर्ट्स, टर्मिनल मॅनेजमेंट, लॉजिस्टिक्स आणि सप्लाय चेन मॅनेजमेंट हे देखील उपस्थित होते. 

 या चर्चा सत्रामध्ये विद्यार्थ्यांनी अर्ज प्रक्रिया, पात्रता निकष आणि आंतरराष्ट्रीय शिक्षणाचे फायदे जाणून घेतले. सिंबायोसिस स्कील्स ॲन्ड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी आणि ॲलेन युनिव्हर्सिटी यांच्या सहयोगामुळे जागतिक संधी आणि शैक्षणिक प्राविण्य मिळवण्यासाठी एक नवा मार्ग खुला झाला आहे.

पुण्यातील ‘या’ भागात तयार होणार ग्रीन फील्ड एअरपोर्ट ! भूसंपादनासाठी एमआयडीसी 3500 कोटी उभारणार

0

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक राजधानीला आणखी एक नवीन विमानतळ मिळण्याचा मार्ग मोकळा होत आहे. पुरंदर येथे हे नवीन विमानतळ तयार होणार असून आता याच प्रकल्पाबाबत एक नवीन अपडेट हाती आले आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अर्थातच MIDC दीर्घकाळ विलंबित असलेल्या पुरंदर ग्रीनफिल्ड विमानतळ प्रकल्पासाठी भूसंपादन सुलभ करण्यासाठी खाजगी एजन्सीमार्फत अंदाजे 3,500 कोटी उभारण्याची योजना आखत असल्याची माहिती समोर आली आहे.

या प्रक्रियेत पुरंदर तहसीलमधील सात गावांमध्ये पसरलेल्या 2753 हेक्टर क्षेत्राचा समावेश असेल, ज्यांना MIDC कायद्यांतर्गत 10 मार्च रोजी अधिकृतपणे 2,823-हेक्टर औद्योगिक क्षेत्राचा भाग म्हणून अधिसूचित करण्यात आले होते.

राज्याच्या उद्योग विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने वन विभागाकडून अतिरिक्त 70 हेक्टर जमीन संपादित केली जाईल, ज्यामुळे विमानतळ प्रकल्पासाठी एकूण 2,823 हेक्टर जमिनीची आवश्यकता असेल, असे सांगितले आहे.

एका वरिष्ठ अधिकाऱ्याने या प्रकल्पासाठी आम्ही भूसंपादन प्रक्रियेला निधी देण्यास मदत करण्यासाठी वित्तीय संस्थांना गुंतवत आहोत, ज्याची किंमत 3,000 कोटी ते 3,500 कोटींच्या दरम्यान राहणार असल्याची माहिती दिली आहे.

या प्रकल्पासाठी आवश्यक असणाऱ्या जमिनीच्या भूसंपादनासाठी निधीची उपलब्धता झाल्यास या प्रकल्पाच्या कामाला नक्कीच वेग येणार आहे आणि यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेला हा प्रकल्प मार्गी लागेल असा विश्वास आहे.

पुरंदर येथील विमानतळ जमिनीवर तयार होणार आहे त्या वनपुरी, कुंभारवळण, उधाचीवाडी, एखतपूर, मुंजवडी, खानवडी आणि पारगाव या सातही गावांमधील सर्वेक्षण क्रमांकाचे तपशील सुद्धा जाहीर करण्यात आले आहेत. औद्योगिक क्षेत्र घोषणा 7 मार्चपासून अंमलात आली आहे.

जे दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरले आहे. या अधिसूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे या संबंधित क्षेत्रामध्ये आता जमिनीचे कोणतेही व्यवहार किंवा मालकीतील बदल करण्यास मनाई राहणार आहे.

प्रशासनातील एका सूत्राने सांगितले की, अनधिकृत जमिनीचे व्यवहार रोखण्यासाठी आम्ही हे निर्बंध लावण्याचा निर्णय घेतला असून याबाबत मालमत्ता नोंदणी विभागाला कळवले आहे.

पुरंदर विमानतळ जलद गतीने पूर्ण व्हावे यासाठी सरकार कटीबद्ध आहे. फडणवीस स्वतः जातीने या प्रकल्पात लक्ष घालत आहेत. एमआयडीसी स्वतःचा निधी वापरून भूसंपादनावर देखरेख करणार आणि एक वर्षाच्या आत ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

प्रकल्प वेळापत्रकानुसारच होत आहे, आणि तपशीलवार प्रकल्प अहवाल (डीपीआर) देखील तयार केला जात आहे. खरं तर हा प्रकल्प गेल्या सहा वर्षांपासून रखडला आहे मात्र आता या प्रकल्पाला गती मिळणार असे दिसते.

देहूत बीजोत्सवाला लाखोंची मांदियाळी; हेलिकॉप्टरमधून मुख्यमंदीर, वैकुंठगमन मंदिर, गाथा मंदिर, तुकोबारायांच्या 3 ध्यान ठिकाणी पुष्पवृष्टी

0

राज्यभरातून दाखल झालेल्या लाखो भाविकांच्या साक्षीने आज श्रीक्षेत्र देहूत सथ तुकाराम महाराज यांचा सदेह वैकुंठगमन सोहळा पार पडला. गोपाळपूरा येथील वैकुंठगमन मंदिराच्या आवारात दुपारी सव्वा बारा वाजता राज्याच्या कानाकोपर्‍यातून आलेले लाखो भाविक भक्त,भाविकांनी मनोभावे अभिवादन करीत नांदुरकीच्या वृक्षावर बुक्का,तुळशी -पानफुले उधळण करीत हा सोहळा पहायला मिळाल्याने जीवन धन्य झाल्याची भावना व्यक्त करीत माघारी फिरले.

जगद्गुरू श्री संत तुकोबारायांची जन्म,कर्म,योग भूमी असलेल्या देहूनगरीत गत आठवडाभर दिंड्या,भाविक वारकरी दाखल होत होते.परिसरामध्ये ठिकठिकाणी अखंड हरिनाम,भजन, कीर्तन ,गाथा पारायण, सप्ताह सुरू असल्याने भक्तिमय वातावरण झाले होते. दिंड्याच्या फडावर शनिवारी रात्रभर जागर, पहाटे काकड आरती, महापुजा, हरिपाठ आणि वीणा- टाळ – मृदंगाच्या गजरात भजन किर्तन व हरिनामाच्या जयघोष सुरू होता. राज्याच्या कानाकोपर्‍यातून बीज सोहळ्यासाठी आलेल्या भाविकांनी रविवारी (दि.16) पहाटे पासूनच पांडूरंगाच्या व श्री संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिरात आणि गोपाळपूरा येथील वैकुंठगमन मंदिरात दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. वैंकुठगमन मंदिराच्या परिसरात जागा मिळेल तेथून हा सोहळा दृष्टीस पडेल अशा ठिकाणी बसण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती.

श्री संत तुकाराम महाराज मुख्य मंदिरात व बीज सोहळ्याच्या धार्मिक कार्यक्रमाला पहाटे तीन वाजल्यापासून काकड आरतीने सुरुवात झाली. श्रीं ची आरती, श्री विठ्ठल रुखमाई, शिळा मंदिर,पालखी सोहळ्याचे जनक तपोनिधी नारायण महाराज यांच्या समाधीची महापूजा, वैकुंठगमन मंदिरातील श्री संत तुकाराम महाराजांची महापूजा संस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे, विश्वस्त संजय महाराज मोरे,संतोष महाराज मोरे,अजित महाराज मोरे, माणिक महाराज मोरे, भानुदास महाराज मोरे, विशाल महाराज मोरे ,वंशज यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली. संस्थानच्या वतीने मंदिराच्या गाभार्‍यात, भजनी मंडपात, मुख्य मंदिर परिसरात प्रवेशद्वारात आणि गोपाळपूरा येथील श्री संत तुकाराम महाराज मंदिर आणि नांदुरकीच्या झाडाखालील पारावर फुलांची आकर्षक सजावट तर रंगीत विद्युत रोषणाई करण्यात आली होती.

वारकरी भाविक भक्तांच्या दर्शनार्थ मंदिर 24 तास सुरू ठेवण्यात आल्यामुळे पहाटेच्या नैमित्तिक महापूजे नंतर भाविकांना मुख्य मंदिरात,शिळामंदिर व वैकुंठगमण मंदिरात दर्शनाला सोडण्यात आले. सकाळी मंदिरातील सर्व विधीवत पूजा उरकल्यानंतर सकाळी पावणे अकराच्या सुमारास पालखीचे मानकर्‍यांनी चोपदार नामदेव गिराम यांच्या सुचनेनंतर पालखी खांद्यावर घेत पुंडलिका वरदा हरि विठ्ठल नामाचा जयघोष करीत वारकर्‍यांसह शिंगाडे, सनई चौघडा व ताशाच्या गजरात पालखी मुख्य मंदिराच्या महाद्वारातून बाहेर पडताच पालखीवर पुष्पवृष्टी करण्यात आली. पालखी पुढे परंपरेप्रमाणे संबळ, गोंधळी, चौघडा, शिंगवाले, ताशा, अब्दागिरी, गरूड टक्के, पताका तर जरीपटका वाले सहभागी झाले होते. पालखी पुढे मानकरी दिंडीसह मोठ्या लवाजम्यासह पालखीचे मुख्यमंदिरातून वैकुठगमण मंदिराकडे प्रस्थान झाले.

पालखी बाराच्या सुमारास वैंकुठगमन मंदिराच्या आवारात प्रदक्षिणा घालुन येथील नांदुरकीच्या वृक्षाखाली आली. येथे देहूकर महाराज यांचे सकाळी दहाच्या सुमारास परंपरे प्रमाणे श्री संत तुकाराम महाराजांच्या वैंकुठगमण प्रसंगावरील घोटवीन लाळ, ब्रम्हज्ञानी हाती । मुक्त आत्मस्थिती सोडविन ॥ या अभंगावर किर्तन सुरू होते.

कीर्तनातून त्यांनी श्री संत तुकाराम महाराजांच्या महानिर्वाण प्रसंगाचे निरूपन करताना म्हणाले, संत आणि देव यांच्या अवतार घेण्याचे प्रयोजन, संत येतात कोठून, कशासाठी येतात, कोठे येतात व काय कार्य करतात याचे विवेचन केले. किर्तन व हरिनामाने शरीर सुद्दा ब्रम्हरूप होते. अशा अनेक विषयांवर किर्तनातून विचार प्रकट करीत श्री संत तुकाराम महारांजानी हरिनाम संकिर्तनाच्या माध्यमातून व योग साधनेच्या सहाय्याने त्यांनी आपली काया ब्रम्हरूप कशी केली हे सांगितले. कीर्तन संपल्यावर दुपारी सव्वाबारा वाजता बोला पुंडलिका वरदा हरि विठ्ठल, असा हरिनामाचा व श्री संत तुकाराम महाराजांच्या नामाचा गजर करीत भाविकांनी येथील नांदुरकीच्या झाडावर पुष्पवृष्टी केली. हरिनामाचा गजर झाल्या बरोबर उपस्थित भाविकांनी आपले दोन्ही हात जोडून दृष्टीसमोर महाराजांचे सदेह वैकुठगमण प्रंसगाची प्रत्यक्ष अनुभूती घेतली.

प्रयाणकाळी देवे विमान पाठविले ।कलीच्या काळामाजी अद्भूत वर्तवले ख मानव देह घेऊनी निज धामा गेले । निळा म्हणे सकळ संता तोषविले ॥या अभंगाचे गायन करीत उपस्थित लाखो भाविकांनी श्री संत तुकाराम महाराजांना मनोभावे अभिवादन केले. येथील मुख्य कार्यक्रम संपल्यानंतर पालखी पुन्हा मुख्य मंदिराकडे परतली आणि त्याच वेळी उपस्थित भाविकांनी पालखीचे दर्शन घेतले. बीजोत्सोव सोहळा पार पडल्यानंतर येथील मंदिरात भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. पालखी मुख्य मंदिरात प्रवेश करताना नगरखान्यातून पालखीवर पुष्पवृष्टी केली. हा सोहळा दुपारी दिडच्या सुमारास मंदिर प्रदक्षिणा घालुन संपन्न झाला. देवस्थानच्या वतीने मुख्य मंदिरात प्रथेप्रमाणे उपस्थित दिंडीकरी, फडकरी, मानकरी यांना मानाचे फेटे व नारळ प्रसाद देवून सन्मानित करण्यात आले. मुख्य मंदिरात दर्शनबारी मंडपातून भाविकांना दर्शनासाठी सोडण्यात येत होते.

दरम्यान, वैकुंठगमन मंदिरामध्ये खासदार श्रीरंग बारणे यांच्या पत्नी सरिता बारणे, सुनील शेळके यांच्या पत्नी सारिका शेळके, उपजिल्हाधिकारी यशवंत माने त्यांच्या पत्नी देवशाला माने, तहसीलदार जयराज देशमुख, नायब तहसीलदार मनीषा माने, देहू नगरपंचायतीचे मुख्याधिकारी निविदा घार्गे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शैला खंडागळे, पंचायत समितीचे माजी सभापती हेमलता काळोखे, नगराध्यक्ष पूजा दिवटे, उपनगराध्यक्ष मयूर शिवशरण, नगरसेवक योगेश काळोखे, कार्यालयीन अधीक्षक प्रियंका कदम, माजी सरपंच रत्नमाला करंडे, माजी उपसरपंच स्वप्निल काळोखे , मंडलाधिकारी दिनेश नरवडे, संजय सैद, वैभव गुतेकर, तलाठी सूर्यकांत काळे, अशोक अमोदे, महसूल सेवक संभाजी मुसुडगे, पोलीस पाटील सुभाष चव्हाण, चंद्रसेन टिळेकर, ग्रामस्थ, श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे आजी – माजी अध्यक्ष, विश्वस्त, महसूल विभागाचे पदाधिकारी आदी यावेळी उपस्थित होते.

पालखी वैंकुठगमन मंदिरामधुन पुन्हा देऊळवाड्यात आल्यानंतर देऊळवाड्यात पालखी विसावली. सायंकाळी मुख्यमंदिरात किर्तन झाले. वाहतूक विभागाच्या वतीने पहाटेपासूनच देहू हद्दीत सर्वच वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली होती.भाविकांची गर्दी माघारी फिरताना लघु उद्योजक आणि विविध व्यवसायिक, स्टॉल, खेळणी, अमृततुल्म, आईसक्रीम, पाणीपुरी, भेळ विक्रते, पथारीवाल्यांनी दुकाने थाटली होती.

हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टीश्रीक्षेत्र भंडारा डोंगर देवस्थानच्या वतीने तीर्थक्षेत्र देहूतील मुख्यमंदीर, वैकुंठगमन मंदिर, गाथा मंदिर, संत तुकोबारायांचे ध्यान ठिकाण असणारे भामचंद्र डोंगर, घोरावडेश्वर डोंगर आणि भंडारा डोंगर या ठिकाणी हेलिकॉप्टरने तीन फेर्‍या पूर्ण करीत पुष्पवृष्टी करण्यात आली.

भारताची अंतराळ मोहिमेतील सर्वात मोठी झेप; मिशन चांद्रयान-5 मोहीम, भारत आणि जपान अंतराळ सहकार्यातील एक मैलाचा दगड

0

भारताच्या अंतराळ संशोधन क्षेत्रात एक मोठी भरारी घेत केंद्र सरकारने ‘चांद्रयान-5 मिशन’ला मंजुरी दिली आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इसरो) अध्यक्ष वी. नारायणन यांनी ही माहिती दिली. या नव्या मोहिमेअंतर्गत चंद्राच्या पृष्ठभागाचा सखोल अभ्यास करण्यासाठी २५० किलोग्रॅम वजनाचा रोव्हर पाठवला जाणार आहे. यापूर्वीच्या चांद्रयान-3 मिशनमध्ये २५ किलोग्रॅम वजनाचा ‘प्रज्ञान’ रोव्हर पाठवण्यात आला होता.

चांद्रयान मोहिमांमधून भारताला जागतिक मान्यता

भारतातील अंतराळ संशोधनाला वेग देणाऱ्या चंद्रयान मोहिमांमुळे भारत आज जागतिक पातळीवर महत्त्वाचा खेळाडू बनला आहे. २०२३ मध्ये इसरोने चंद्रयान-3 मोहिमेअंतर्गत लँडर ‘विक्रम’ आणि रोव्हर ‘प्रज्ञान’ चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीरीत्या उतरवले. हा ऐतिहासिक क्षण २३ ऑगस्ट २०२३ रोजी घडला आणि भारताने अंतराळ संशोधनात नवा मैलाचा दगड गाठला.

चांद्रयान-5 मोहिमेमुळे भारतीय वैज्ञानिकांना चंद्राच्या भूगर्भशास्त्रासंबंधी आणखी माहिती मिळेल आणि भविष्यातील चंद्रावरील मानवी वसाहतीच्या शक्यतांना चालना मिळेल.

चांद्रयान-5 मिशन: मोठा रोव्हर, मोठे लक्ष्य

नव्या मोहिमेअंतर्गत पूर्वीच्या चंद्रयान मोहिमेपेक्षा मोठा आणि अधिक शक्तिशाली रोव्हर चंद्रावर पाठवण्यात येणार आहे. इसरोचे अध्यक्ष वी. नारायणन यांनी सांगितले की, या मोहिमेसाठी इसरो जपानच्या अंतराळ संशोधन संस्थेच्या मदतीने काम करणार आहे. हा प्रकल्प भारत आणि जपान यांच्या अंतराळ सहकार्यातील एक मोठा मैलाचा दगड ठरेल.

चांद्रयान-4: २०२७ मध्ये चंद्रावरील नमुने पृथ्वीवर आणण्याचा प्रयत्न

इसरो २०२७ मध्ये ‘चंद्रयान-4’ मिशन प्रक्षेपित करण्याच्या तयारीत आहे. या मोहिमेचा उद्देश चंद्राच्या पृष्ठभागावरील माती आणि खडकांचे नमुने पृथ्वीवर आणणे हा आहे. हे नमुने संशोधनासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार असून, चंद्राच्या भूगर्भशास्त्र आणि भविष्यातील संसाधनांच्या शक्यतांसाठी मार्गदर्शक ठरतील.

भारतातील अंतराळ संशोधनाचा सुवर्णकाळ सुरू

भारतीय अंतराळ संशोधन संस्था अगदी वेगाने प्रगत तंत्रज्ञान विकसित करत आहे. ‘चांद्रयान’ मोहिमा, ‘गगनयान’ मानव मिशन आणि ‘आदित्य-एल1’ सौर मिशन यांसारख्या उपक्रमांमुळे भारताचा अंतराळ संशोधनातील दबदबा वाढला आहे. चंद्रयान-5 मोहिमेमुळे भारताला चंद्राच्या संशोधनात मोठे योगदान देता येईल आणि भविष्यात मंगळ तसेच अन्य ग्रहांवरील संशोधनाची दारे खुली होतील.

पंतप्रधान मोदींचं लेक्स फ्रिडमनच्या पॉडकास्ट गुजरात दंगलीबाबत मोठं विधान, म्हणाले… 2002 नंतर 2025 पर्यंत कोणतीही मोठी घटना

0

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लेक्स फ्रिडमॅन यांच्यासोबत पॉडकास्टमध्ये अनेक मुद्य्यांसह 2002मध्ये झालेल्या गुजरात दंगलींबाबतही आपलं मत व्यक केलं. त्यांनी म्हटले की, 27 फेब्रुवारी 2002 रोजी त्यांचे सरकार(त्यावेळी मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते) अर्थसंकल्प सादर करणार होतं. तेव्हाच गोध्रा रेल्वेच्या घटनेची माहिती मिळाली. ही एक अतिश गंभीर घटना होती. लोकांना जिवंत जाळलं गेलं होतं. या घटनेबाबत खोटं पसरवलं गेलं आणि माझी प्रतीमा मलीन करण्याचा प्रयत्न केला गेला.

पंतप्रधान मोदींनी सांगितले की, 2002च्या आधी गुजरातमध्ये सलग दंगली घडत होत्या. मात्र 2002 नंतर 2025 पर्यंत कोणतीही मोठी घटना घडली नाही. तसेच त्यांनी म्हटले की, 2002च्या दंगलीबाबत तुम्ही बोलण्यापूर्वी, मी तुम्हाला परिस्थितीची योग्य कल्पना देण्यासाठी मागील काही वर्षांचे चित्र सादर करू इच्छितो. 24 डिसेंबर 1999 रोजी काठमांडूहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे अपहरण केले गेले आणि कंधारला नेण्यात आले. संपूर्ण देश हादरला होता, कारण अनेकांच्या जगण्यामरण्याचा प्रश्न होता.

यानंतर वर्ष 2000 मध्ये लाल किल्ल्यावर पुन्हा एकदा दहशतवादी हल्ला झाला. या घटनेनंतर आणखी एक वादळ उठलं. यानंतर 11 सप्टेंबर 2001च्या अमेरिकन ट्वीन टॉवर्सवर खूप मोठा दहशतवादी हल्ला झाला. ऑक्टोबर 2001मध्ये जम्मू-काश्मीर विधानसभेवर दहशतवादी हल्ला झाला. 13 डिसेंबर 2001 रोजी भारतीय संसदेवर दहशतवादी हल्ला झाला. हे जागतिकस्तरावरील दहशतवादी हल्ले होते. ज्यांनी जागतिक अस्थिरतेची ठिणगी पेटवली. या घटनांच्या दरम्यान 7 ऑक्टोबर 2001रोजी मला गुजरातचं मुख्यमंत्री बनवलं गेलं होतं.

मोदींनी पुढे सांगितलं की, त्यावेळी गुजरातमध्ये फार मोठा भूकंप आला होता. हजारो जणांचा मृत्यू झाला होता. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याच्या पहिल्याच दिवसापासून मी यासंदर्भातील कामास लागलो होतो. मी एक असा व्यक्ती आहे, ज्याचा सरकार नावाशी संबंध राहिला नव्हता, सरकार काय असतं, मला माहीत होतं.

24 फेब्रवारी 2002 रोजी पहिल्यांदा आमदार बनलो. माझे सरकार 27 फेब्रवारी 2002 रोजी अर्थसंकल्प सादर करणार होते आणि त्याच दिवशी आम्हाला गोध्रा ट्रेनमधील घटनेची माहिती मिळाली. ही फार गंभीर घटना होती. लोकांना जिवंत जाळलं गेलं होतं. तुम्ही कल्पनाही करू शकत नाही, की मागील सर्व घटनानंतर स्थिती कशी राहिली असेल. जे म्हणत होते की ही फार मोठी दंगल आहे, हा भ्रम पसरवण्यात आला आहे. वर्ष 2002च्या आधी गुजरातमध्ये 250 पेक्षा जास्त मोठ्या दंगली घडल्या होत्या.

राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा उमेश पाटलांच्या नावाला विरोध; ‘हे’ नाव पुढे येण्याची शक्यता! आगामी मुंबई महापालिका डोळ्यासमोर यांना ताकद?

0

विधान परिषदेच्या तीन उमेदवारी घोषणा भारतीय जनता पक्षाकडून करण्यात आली असून महायुतीमधील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येकी एका उमेदवाराची घोषणा होणे बाकी आहे. एका नावावर एकमत होत नसल्याने राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या उमेदवारांच्या घोषणेला विलंब होत असल्याची माहिती आहे. राष्ट्रवादीकडून उमेदवारीसाठी चर्चेत आलेले उमेश पाटील यांच्या नावाला पक्षातील एका बड्या नेत्याने विरोध केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे, त्यामुळे राष्ट्रवादीची आमदारकी कोणाला मिळणार, याची उत्सुकता वाढली आहे. दरम्यान, छगन भुजबळ यांची नाराजी दूर करण्यासाठी ऐनवेळी भुजबळ कुटुंबातही उमेदवारी दिली जाऊ शकते.

राष्ट्रवादीचे विधान परिषद सदस्य राजेश विटेकर हे विधानसभेवर निवडून गेले आहेत, त्यामुळे त्यांच्या जागी कोणाला उमेदवार द्यायची, यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात एकमत होत नसल्याने अद्यापही उमेदवार जाहीर झालेला नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून माजी आमदार झिशान सिद्दिकी, माजी आमदार संजय दौंड आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांच्या नावाची चर्चा आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेतेमंडळींनी माजी आमदार झिशान सिद्दिकी, माजी आमदार संजय दौंड आणि उमेश पाटील यांना उमेदवारी अर्ज भरण्यासाठी लागणारी कागदपत्रे गोळा करण्यास सांगितले हेाते. त्यानुसार हे तिघे कामाला लागले होते. मात्र यातील उमेश पाटील यांच्या नावाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील एक बड्या नेत्याने तीव्र विरोध केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

उमेश पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या मोहोळमधील उमेदवाराचे काम केले होते. मोहोळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार आणि तत्कालीन आमदार यशवंत माने यांचा पराभव झाला होता. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर उमेश पाटील हे पुन्हा अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता, त्यामुळे पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात काम केल्याचा ठपका त्यांच्यावर येऊ शकतो.

दरम्यान, झिशान सिद्दिकी यांच्या नावालाही राष्ट्रवादीतील काहींनी विरोध केला आहे. त्यामुळे शेवटच्या क्षणी कोणाचे नाव अंतिम होते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. सिद्दिकी आणि पाटील यांच्या नावावर पक्षात एकमत न झाल्यास या तीन नावाव्यतिरिक्त वेगळेच नाव उद्या सकाळी जाहीर होऊ शकते. त्यामुळे राष्ट्रवादीच्या नावाची उत्सुकता वाढली आहे.

भुजबळांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न होणार

मंत्रिमंडळात स्थान मिळाल्याने ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे पक्षात नाराज आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून त्यांचा आक्रमक स्वभाव काहींसा मवाळ झाला आहे. अर्थसंकल्पावर भाषण करताना त्यांनी जयंत पाटील यांना सुनावणात अर्थमंत्री अजित पवारांसाठी विधानसभेत जोरदार बॅटिंग केली होती. भुजबळांची नाराजी कमी करण्यासाठी त्यांचे पुतणे समीर भुजबळ यांनाही संधी दिली जाऊ शकते. आगामी मुंबई महापालिका डोळ्यासमोर ठेवून समीर भुजबळ यांना ताकद दिली जाऊ शकते. त्यामुळे ऐनवेळी समीर भुजबळ यांचेही नाव पुढे येऊ शकते

‘राष्ट्रवादी’च्या आमदाराचे नाव चिठ्ठीत लिहून महिलेने प्यायले विषारी औषध! नवऱ्याला त्रास दिल्याचा चिठ्ठीत उल्लेख

0

आमदाराने आणि त्याच्या आमदाराकडून धमकावण्यात येत असल्याने चिठ्ठीत लिहून महिलेने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नाशिक जिल्ह्याच्या कळवण तालुक्यात हा प्रकार घडला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नितीन पवार यांच्यावर आरोप करत महिलेने औषध प्राशन केले. मिळालेल्या माहितीनुसार औषध प्राशन करणारी महिला ही काँग्रेसची पदाधिकारी आहे.

महिलेच्या भावाने आमदार नितीन पवार यांच्याविरुद्ध पोलिसात तक्रार देखील दाखल केली आहे. औषध प्यायलेल्या महिला नवरा ग्रामसेवक असून त्याच्या विरोधात आमदार पवार यांनी विधीमंडळात लक्षवेधी उपस्थित केली होती. त्या लक्षवेधीचा उल्लेखही संबंधित तक्रारदाराकडून करण्यात आल्याचे मराठी वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आमदार नितीन पवार व त्यांच्या पत्नी जयश्री पवार या कोणत्या ना कोणत्या कारणाने खोट्या तक्रारी करून ग्रामसेवक असलेल्या पतीस त्रास देतात. म्हणून काँग्रेसच्या पदाधिकारी असलेल्या शीतल महाजन यांनी विषारी औषध सेवन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. आत्महत्येपूर्वी शीतल महाजन यांनी चिठ्ठी देखील लिहून ठेवली आहे,

निवडणुकीत आमदार पवार आणि त्यांच्या पत्नीविरोधात काम केल्यामुळे आपल्या पतीला अडकविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे शीतल महाजन यांनी म्हटले होते. तसेच पतीची चौकशी करूनही तो दोषी आढळले नाही तरी देखील त्यांना त्रास देत असल्याचे महाजन यांनी चिठ्ठीत लिहिले आहे.

शीतल महाजन यांचे बंधू योगेश गायकवाड यांनी अभोणा पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून आमदारांकडून जाणीवपूर्वक होत असलेल्या त्रासाला कंटाळून शीतल महाजन यांनी विषारी औषध घेऊन स्वतःला संपविण्याचा प्रयत्न केल्याचा म्हटले आहे.