Home Blog Page 151

पवार कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर; सुप्रिया सुळेंची फेसबुक पोस्ट; भारती पवार यांचं निधन काकीच्या आठवणीने सुप्रिया सुळें गहिवरल्या

0

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या भाऊजाय भारती प्रतापराव पवार (वय 77 वर्षे) यांचे सोमवारी सायंकाळी दीर्घ आजाराने निधन झाले. ‘सकाळ’चे अध्यक्ष प्रतापराव पवार यांच्या त्या पत्नी होत. त्यांच्यामागे मुलगा ‘सकाळ’चे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार, सून मृणाल, नातवंडे जान्हवी आणि राहुल तसेच मुलगी अश्विनी, नातू झाकीर असा परिवार आहे. भारती पवार यांच्या पार्थिवावर मंगळवारी (ता. 18) दुपारी 12 वाजता पुण्यात अंत्यसंस्कार होणार आहेत. भारती पवार यांच्या निधनाने पवार कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी या निधनाची माहिती देत शोक व्यक्त केला आहे.

भारती पवार या गेल्या सहा महिन्यांपासून आजारी होत्या. त्या पूर्वाश्रमीच्या भारती श्रीपतराव पाटील होत. मूळच्या मुंबईतील असलेल्या भारती यांचे बालपण शिवाजी पार्क परिसरात गेले. त्यांचे शालेय शिक्षण तेथील बालमोहन विद्या मंदिरात झाले. रुईया महाविद्यालयातून त्यांनी कला शाखेची पदवी घेतली. चित्रकलेत त्यांचा हातखंडा असल्यामुळे पुढे त्यात त्यांनी पदव्युत्तर पदवी घेतली. त्यानंतर 22 ऑगस्ट 1970 रोजी त्यांचा प्रतापराव पवार यांच्याशी विवाह झाला. सामाजिक कार्याची आवड असल्यामुळे पुण्यात आल्यावर ‘सकाळ’च्या माध्यमातून त्या अनेक उपक्रमांत सहभागी होत. औंधजवळील बालकल्याण संस्थेमध्ये त्या सुमारे 35 वर्षे सक्रिय होत्या. तेथे त्या विश्वस्तही होत्या.

बालकल्याण संस्थेतील प्रत्येक उपक्रमात त्या सहभागी होत. अनेक मुला-मुलींना त्यांनी तेथे चित्रकलेचे धडे दिले. तेथील अधिकारी, कर्मचाऱ्यांशीही त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. तसेच ‘सकाळ’ संचलित कोरेगाव पार्क आणि कोथरूड येथील अंधशाळेतही त्या विश्वस्त होत्या. तेथील अनेक उपक्रमांत त्या सहभागी होत.

सुप्रिया सुळेंची फेसबुक पोस्ट

अतिशय दुःखी अंतःकरणाने कळविते की, माझ्या काकी सौ भारती प्रतापराव पवार यांचे थोड्या वेळापूर्वी निधन झाले. ही आम्हा सर्वांसाठी अतिशय दुःखद घटना आहे. याक्षणी काकींच्या असंख्य आठवणींनी मनात घर केले आहे. त्या माझ्यासाठी आई समान होत्या. त्यांनी आम्हा सर्व भावंडांवर सदैव खुप प्रेम केले. आम्हा सर्व भावंडांना त्यांनी दिलेली प्रेमळ साथ सदैव लक्षात राहील. काकी, भावपूर्ण श्रद्धांजली, अशी पोस्ट सुप्रिया सुळे यांनी लिहिली आहे. तर, खासदार सुनेत्रा पवार यांनीही शोक व्यक्त केला आहे. भारती काकी आमच्यात राहिल्या नाहीत यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. त्या आम्हा सर्वांना आई समान होत्या. त्यांच्या निधनाची बातमी ऐकून हृदय दुःखाने पिळवटून गेले आहे. त्यांनी सर्व पवार कुटुंबावर निस्वार्थ प्रेम केले. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, असे सुनेत्रा पवार यांनी म्हटलय.

अजित पवारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र; MPSC च्या तीन रिक्त पदांवरील सदस्यांची नियुक्ती तातडीने करा

0

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) माध्यमातून राज्यसेवेत अधिकारी होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या युवकांना न्याय देण्यासाठी ‘एमपीएससी’च्या तीन रिक्त सदस्यपदांवरील नियुक्ती तातडीने करण्यात यावी, अशी विनंती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून केली आहे. ही नियुक्ती तातडीने झाल्यास परीक्षा, मुलाखती, निकालाची प्रक्रिया गतिमान होऊन स्पर्धापरीक्षेची तयारी करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना दिलासा मिळेल, असेही त्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात स्पष्ट केले आहे. राज्यातील लाखो युवक, विद्यार्थी एमपीएससीमार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षांची तयारी करत असतात. मात्र, अनेकदा एमपीएससी बोर्डात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या रखडल्याने या स्पर्धा परीक्षा व नियुक्तीला उशीर होते.

‘एमपीएससी’द्वारे उपजिल्हाधिकारी, तहसिलदार, पोलिस निरिक्षक, प्राध्यापक अशा राज्यसेवेतील महत्वाच्या पदांवरील नियुक्त्या करण्यात येतात. त्यासाठी ‘एमपीएससी’मध्ये एक अध्यक्ष आणि पाच सदस्यांची पदे मंजूर आहेत. मंजूर पाच पदांपैकी अध्यक्ष आणि दोन सदस्यांची पदे भरलेली आहेत, तर सदस्यांची तीन पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांमुळे आयोगाच्या कामकाजावर विपरित परिणाम होत असून परीक्षांना विलंब होत आहे. मुलाखती, निकालाची प्रक्रिया रखडत आहे. त्यामुळे ही पदे तातडीने भरावीत अशी मागणी विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि विविध संघटनांकडून निवेदनांद्वारे केली जात आहे. या मागण्यांची दखल घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले असून ‘एमपीएससी’तील तीन सदस्यांची रिक्त पदे तातडीने भरावीत, अशी विनंती केली आहे.

जिओकडून मोठी घोषणा! 90 दिवसांसाठी मोफत जिओस्टार IPL मोफत पाहण्यासाठी ‘ही’ भन्नाट ऑफर; जाणून घ्या सविस्तर…

0

गेल्या अनेक दिवसांपासून लोक आयपीएलची वाट पाहात होते. येत्या 22 मार्च रोजी यंदाच्या आयपीएल हंगामाचा पहिला सामना होणार आहे. त्याआधीच यावेळी आपयपीएल नेमका कुठे पाहावा?

आयपीएलचे सामने पाहण्यासाठी पैसे भरावे लागणार का? असे प्रश्न विचारले जात आहेत. असे असतानाच आता जिओने क्रिकेटच्या चाहत्यांना खुशखबर दिली आहे. क्रिकेटच्या वेगवेगळ्या स्पर्धा आणि आयपीएल लक्षात घेऊन जिओने 90 दिवसांसाठी मोफत जिओस्टार सबस्क्रीप्शनची ऑफर आणली आहे. ही ऑफर नेमकी काय आहे? ते जाणून घेऊया…

नेमकी ऑफर काय आहे?

आगामी आयपीएलचा हंगाम लक्षात घेऊन जिओ या टेलकॉम कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी खास ऑफर आणली आहे. या ऑफरअंतर्गत जिओ सिमकार्ड वापरकर्त्यांना तब्बल 90 दिवस जिओहॉटस्टारचे सबस्क्रिप्शन मोफत मिळणार आहे. जिओ सिमकार्ड असणाऱ्यांनाच ही ऑफर लागू असेल. ही ऑफर मिळवण्यासाठी जिओ सिमकार्ड वापरकर्त्यांना कमीत कमी 299 रुपयांचे रिचार्ज करावे लागेल. कमीत कमी 299 रुपयांचे रिचार्ज करणाऱ्यालाच आगामी 90 दिवसांसाठी म्हणजेच तीन महिने जिओस्टारचे सबस्क्रिप्शन मोफत मिळणार आहे. ही ऑफर 31 मार्च 2025 पर्यंत लागू असणार आहे.

नव्याने जिओचे सिमकार्ड घेणाऱ्या व्यक्तीलाही ही ऑफर लागू होईल. मात्र त्यासाठी त्या व्यक्तीला कमीत कमी 299 रुपयांचे रिचार्ज करावे लागेल.

दरम्यान, जिओच्या या ऑफरचा अनेकांना फायदा होणार असल्याचे म्हटले जात आहे. क्रिकेटवर प्रेम असणाऱ्यांनी या ऑफरचा लाभ घेतला तर त्यांना आगामी दोन महिने जिओचे सामने मोफत पाहता येणार आहेत.

वर्ल्डवाईड बॉक्स ऑफिसवर ‘छावा’ची मुसंडी; थलायवा रजनीकांतलाही पछाडलं, ‘छावा’नं पार केला 750 कोटींचा आकडा

0

‘छावा’ सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. विक्की कौशल  स्टारर या चित्रपटानं भल्याभल्या दिग्गजांना मागे टाकलं आहे. रिलीजचे 30 दिवस उलटल्यानंतरही ‘छावा’ थांबण्याचं नाव काही घेत नाही. छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत झळकलेल्या विक्की कौशलची भूरळ केवळ देशांतर्गत बॉक्स ऑफिसवरच नाहीतर जगभरात सुरू आहे. प्रदर्शित होऊन महिना उलटला तरी, ‘छावा’ सातत्यानं अनेक हिट चित्रपटांचे रेकॉर्ड मोडीत काढत आहे.

‘छावा’नं आता जजभरातील बॉक्स ऑफिसवर 750 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. सॅकनिल्कच्या अहवालानुसार, विक्की कौशलच्या चित्रपटानं 30 दिवसांत एकूण 750.5 कोटी रुपये कमावले आहेत. 31व्या दिवशी चित्रपटानं भारतात 8 कोटी रुपये कमावले आहे. जर हे कलेक्शन जोडलं तर, ‘छावा’चं एकूण कलेक्शन 758.5 कोटी रुपये होतात.

‘छावा’नं पार केला 750 कोटींचा आकडा

विक्की कौशलच्या ‘छावा’नं महिन्याभराच्या शानदार कलेक्शनसह रजनीकांत यांचा रेकॉर्ड मोडीत काढला आहे. साऊथ सुपरस्टारच्या खात्यात वर्ल्डवाईड दहाव्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या फिल्मचा रेकॉर्ड होता. रजनीकांतची 2018 मध्ये रिलीज झालेली फिल्म 2.0 नं जगभरातील बॉक्स ऑफिसवर 744.78 कोटी रुपयांची कमाई केली होती. दरम्यान, आता 758.5 कोटींच्या कलेक्शनसह ‘छावा’नं हा आकडादेखील पार केला आहे. आता वर्ल्डवाईड दहावी सर्वाधिक कमाई करणारी फिल्म बनली आहे.

दरम्यान, ‘छावा’मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे पु्त्र छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा रुपेरी पडद्यावर मांडण्यात आली आहे. ‘छावा’मध्ये विक्की कौशलच्या अभिनयाचं खूप कौतुक करण्यात आलं आहे. तर, रश्मिका मंदाना महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत दिसली आहे. तसेच, मुघल बादशाह औरंगजेबाची भूमिका अक्षय खन्नानं साकारली आहे. याव्यतिरिक्त ‘छावा’मध्ये आशुतोष राणा, दिव्या दत्ता, संतोष जुवेकर झळकले आहेत.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जामखेड बाबत मोठा निर्णय ! रोहित पवार यांना धक्का, आता राम शिंदेंच्या अध्यक्षतेखाली ही महत्वाची बैठक

0

जामखेड शहराचा विकास आराखडा तयार करत असताना कोणावरही अन्याय होणार नाही, याची दक्षता घ्यावी. जामखेडच्या जुन्या प्रारुप विकास आराखड्यावर अनेक हरकती असल्यामुळे हा प्रारुप विकास आराखडा रद्द करून नव्याने पाहणी व सर्वेक्षण करून नवीन शहर प्रारुप विकास आराखडा सादर करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज (दि.१७) विधानभवनात झालेल्या बैठकी दरम्यान दिले. विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही महत्वाची बैठक झाली.

यावेळी उपमुख्यमंत्री तथा नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, आमदार सत्यजित तांबे, नगर विकास विभागाचे अपर मुख्य सचिव असिमकुमार गुप्ता, नगररचना संचालक डॉ. प्रतिभा भदाणे, प्रा. मधुकर राळेभात, अँड. प्रविण सानप, अमित चिंतामणी, मनोज कुलकर्णी, डॉ. ज्ञानेश्वर झेंडे, राहुल अंकुश उगले, शहाजी रामचंद्र राजेभोसले, विनायक राऊत, अविनाश साळुंके, यांच्यासह जामखेडमधील लोकप्रतिनिधी उपस्थित होते. जामखेड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अजय साळवे, सहाय्यक नगर रचना संचालक हेही दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले.

जामखेड शहराचा प्रारुप विकास आराखड्याची घोषणा 26 डिसेंबर 2018 रोजी झाली. त्यानंतर सर्वेक्षण करण्यात आले व प्रारुप विकास आराखड्यावर हरकती व सूचना मागविण्यात आल्या. या प्रारुप आराखड्यास जामखेडमधून 614 हरकती व सूचना प्राप्त झाल्या. नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन यासंदर्भात प्रा. राम शिंदे यांनी या बैठकीचे आयोजन केले होते.

सभापती प्रा. शिंदे म्हणाले की, जामखेड शहराचा प्रारुप विकास आराखडा तयार करून अनेक वर्षे झाली आहेत. या आराखड्यावर नागरिकांच्या मोठ्या प्रमाणात हरकती आहेत. जामखेड शहर आता वाढले असून यापूर्वीच्या विकास आराखड्यातील रिंगरोड व इतर रस्ते हे शहरामध्ये आले आहेत. त्यामुळे जुना प्रारुप आराखडा रद्द करून नव्याने सर्वेक्षण करून आराखडा तयार करण्याची आवश्यकता आहे. नव्या आराखड्यात रिंगरोड तसेच इतर रस्त्यांचे रुंदीकरणाचा समावेश करावा.

उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, जामखेड शहराचा प्रारुप विकास आराखड्यावर सहाशेहून अधिक सूचना आल्या आहेत. त्यामुळे या हरकती व सूचनांचा अभ्यास करून नव्याने पाहणी व सर्वेक्षण करावे. जुन्या प्रारुप आराखड्यातील चुका दुरुस्त करून नव्याने प्रारुप विकास आराखडा तयार करताना त्यामध्ये पारदर्शकता असावीच. तसेच विकास आराखडा तयार करताना कोणावरही अन्याय होणार नाही, याची दक्षता घ्यावी.

अजित पवारांचे विधानसभेत शक्तीपीठ महामार्गाबाबत मोठे विधान; चौफेर फटकेबाजी करत म्हणाले ‘तसंच शक्तीपीठ महामार्गाचेही होणार’

0

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना शक्तीपीठ महामार्गासंदर्भात मोठे विधान केले आहे. ते करताना त्यांनी विरोधी पक्षांना ‘विरोध करू नका’ असे आवाहन करत ‘आमचं चुकत असेल तर आम्हाला दाखवा आम्ही चूक दुरुस्त करू,’ असेही अर्थमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे.

अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना अर्थमंत्री अजित पवार यांनी आज चौफेर फटकेबाजी केली. शिवसेनेचे भास्कर जाधव यांच्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जयंतराव पाटील, ते काँग्रेसचे डॉ. विश्वजित कदम, अमित देशमुख यांच्यापर्यंत सर्वांवर हल्लाबोल केला. त्यातून विरोधी पक्षाचा एकही नेता सुटला नाही.

कर्ज काढून प्रकल्प पूर्ण करण्याशिवाय गत्यंतर नाही, हे सांगताना त्यांनी किंमती वाढत जातात आणि प्रकल्प पूर्ण करण्यासाठी अडचण येतात, हे सांगून राज्यावरील कर्जाच्या बोज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी समर्थन केले. पुढे जाण्यासाठी कर्ज काढावंच लागते. कमी व्याजाने कर्ज मिळत असेल तर ते घेऊन काम केलंच पाहिजे, असेही अजित पवारांनी स्पष्ट केले.

ते म्हणाले, समृद्धी महामार्ग आज बांधून पूर्ण झालेला आहे. काही लोकांनी त्यावेळी विरोध केला होता, आम्हीही त्यामध्ये होतो. आम्हाला शेतकरी म्हणायचे, ‘नाही नाही आम्हाला विरोध करायचा आहे.’ मी, जयंतराव पाटील व इतरही नेतेमंडळी त्या सभागृहात जमलो होतो. मोठ्या प्रमाणात सातबारा गोळा करून आणले होते.

जेव्हा या महाराजांनी…देवेंद्र फडणवीस यांनी संपादीत जमिनीचा मोबदला चारपटचा पाचपट जाहीर केला. आमच्यासोबत आंदोलन करणारे सगळे शेतकरी तिकडे गेले आणि पैसे घेऊन मोकळे झाले. तसंच शक्तीपीठ महामार्गाचे होणार आहे, त्यामुळे विरोध करू नका, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

विकास करायचं म्हटलं तर हवेत विमानतळ, रस्ते, शहरं होत नाही, आपल्याला हे सर्व जमिनीवरच करावं लागतं. त्यामुळे आपण जरी विरोधी पक्षात असला तरी विरोधाला विरोध करण्याची भूमिका सोडून द्या. विकास कामांच्या बाबत हातात हात घालून पुढे चाला. आमचं चुकत असेल तर आम्हाला दाखवा. आम्ही चूक दुरुस्त करु, असे सांगून अजित पवार यांनी शक्तीपीठ महामार्गाचा विरोध सोडण्याचे विरोधकांना आवाहन केले.

महायुतीच्या नव्या आमदारांचा कालावधी किती? कोणाला दीड, कोणाला 2 वर्षे, तर शिवसेनेला 4 तर यांना सर्वाधिक

0

विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या पाच जागांसाठी महायुतीकडून उमेदवार जाहीर झाले आहेत. रविवारी, भाजपने आपल्या तीन उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. त्यानंतर आज शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून आपल्या प्रत्येकी एका उमेदवाराच्या नावाची घोषणा करण्यात आली. विधान परिषदेतील 5 सदस्य विधानसभेवर निवडून गेल्याने त्यांच्या रिक्त जागेवर ही निवडणूक होणार आहे. महायुतीच्या या नवनिर्वाचित आमदारांना आमदारकीसाठी कमी कालावधी मिळणार आहे.

महायुतीकडे प्रचंड बहुमत असल्याने या पाचही जागांवर त्यांचे उमेदवार विजयी होण्याइतके संख्याबळ आहे. विरोधकांकडून या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यात येणार नसल्याची माहिती आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यासाठी आज शेवटचा अर्ज आहे. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे. विधानपरिषदेचे सदस्य असलेले आमश्या पाडवी, प्रवीण दटके, गोपीचंद पडळकर, रमेश कराड आणि राजेश विटेकर हे विधानसभेवर निवडून गेल्याने या जागा रिक्त झाल्या होत्या.

महायुतीचे उमेदवार कोण?

भाजपकडून रविवारी आपल्या तीन उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. संदीप जोशी, संजय केणेकर, दादाराव केचे यांना विधान परिषदेवर संधी देण्यात आली आहे. तर, शिवसेना शिंदे गटाकडून चंद्रकांत रघुवंशी आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून संजय खोडके यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

कोणाला किती कार्यकाळ?

संविधानातील तरतुदीनुसार, विधीमंडळातील वरिष्ठ सभागृह विधान परिषद ही विधानसभेसारखी विसर्जित होत नाही. विधान परिषदेत रिक्त होणाऱ्या जागांवर त्या-त्या जागांप्रमाणे निवडणुका घेतल्या जातात. विधान परिषदेतील आमदारांचा कार्यकाळ हा 6 वर्षांसाठी असतो. आता रिक्त झालेल्या पाच जागांवरील आमदारांचा उर्वरित कार्यकाळ या नवनिर्वाचित आमदारांना मिळणार आहे.

भाजपने संदीप जोशी, संजय केनेकर, दादाराव केचे यांना उमेदवारी दिली आहे.

नवनियुक्त पाच आमदारांचा कार्यकाळ- 

  • भाजपच्या या तीन उमेदवारांना 14 ते 16 महिन्यांचा                  कार्यकाळ मिळणार आहे.
  • शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार चंद्रकांत रघुवंशी यांना 4                वर्षांसाठीचा कार्यकाळ मिळणार आहे.
  • राष्ट्रवादीचे उमेदवार संजय खोडके यांना तब्बल (5.5) साडे         पाच वर्षांच्या आमदारकीचा कार्यकाळ मिळणार आहे.

दुकानांतून खरेदी करू नका, मुस्लिम चालकांच्या रिक्षात बसू नका, RSS शाखेवरील दगडफेकीनंतर कार्यकर्ते आक्रमक

0

डोंबिवलीत काही दिवसांपूर्वी 90 फीट रोडवरील एका मैदानावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) शिबीर सुरू होते. काही अज्ञात लोकांनी त्या प्रशिक्षण शिबीरावर गेल्या आठवड्यात दगडफेक केली आणि हे प्रकरण प्रचंड तापलं. याप्रकरणी कचोरे संघ शाखा चालकाच्या पुढाकारातून टिळकनगर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. आता या दगडफेकीप्रकरणी एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. डोंबिवलीमधील अप्पा दातार चौकात आरएसएसच्या कार्यकर्त्यांची सभा झाली. शाखेवरील दगडफेक प्रकरणानंतर हे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत.

या सभेत मुस्लिमांवर आर्थिक बहिष्कार टाकण्याचे आवाहन करण्यात आलं. दुकानांमधून काही खरेदी करुन नका, मुस्लिम रिक्षा चालकाच्या रिक्षात बसू नका असे आवाहन करण्यात आलं. दोन दिवसा पूर्वीचा सभेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

शहर म्हणून आपण मुसलमान दुकानदारांवर आर्थिक बहिष्कार टाकणार आहोत. कुठल्याही दुकानात गेल्यावर दुकानाच्या मालकाचं नाव विचारा, नाव सांगितल नाही तर त्या दुकानाचा फोटो आपण डोंबिवलीतील सर्व व्हॉट्सॲप ग्ररुपवर टाकणार आहोत. आणि त्या दुकानाशी व्यवहार पूर्णपणे बंद करणार आहोत. रिक्षाचा मालक हिंदू असला आणि चालक मुस्लिम असला तरीही त्या रिक्षात बसायचं नाही,भलेही चार-पाच किलोमीटर अंतर चालत जावं लागलं तरी चालेल. दुकानांमधून काही खरेदी करुन नका, मुस्लिम रिक्षा चालकाच्या रिक्षात बसू नका असे आवाहन करण्यात आलं आहे.

काय आहे प्रकरण ?

डोंबिवलीतील ठाकुर्ली ९० फुटी रस्त्यावरील कचोरे गाव येथील वीर सावरकर नगर येथील एका मैदानावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे 35 बालकांचे विविध खेळ स्पर्धांचे प्रशिक्षण शिबीर महिनाभरापासून घेतले जाते. या प्रशिक्षण शिबिरावर गेल्या आठवड्यात रविवारी रात्री आठ वाजता अज्ञात इसमांनी दगडफेक केली. मागील महिनाभरापासून कचोरेतील वीर सावरकर नगर भागात चौधरी वाडी मैदानात संघ स्वयंसेवकांना प्रशिक्षण देण्याचा उपक्रम सुरू आहे. यापूर्वी एक, दोन वेळा हा प्रशिक्षण कार्यक्रम सुरू असताना अज्ञाताने दगडफेक केली होती. चुकून दगड आले असावेत म्हणून त्याकडे चालकांनी दुर्लक्ष केले.

पण रविवारी रात्री पुन्हा अचानक चौधरी वाडी मैदान भागातील झाडाझुडपांमधून प्रशिक्षण घेत असलेल्या मुलांच्या दिशेने दगड भिरकावण्यात आले. सुरुवातीला चुकून ह दगड कोणी फेकला असल्याचा संशय चालकांना आला. त्यानंतर दगड फेकण्याचे प्रमाण वाढल्याने हा मुद्दाम त्रास देण्याच्या उद्देशाने हा प्रकार केला जात असल्याचं स्पष्ट झालं. शाखेजवळच्या जंगलातून अंधाराचा फायदा घेऊन दगडफेक करण्यात आली. परिसरातील काही इमारतींमध्ये लपलेल्या अज्ञातांनीही दगडफेक केली. शाखा सुरू असताना दगडफेक झाली. पण मुलांनी आवश्यक ती खबरदारी घेतल्यामुळे कोणी जखमी झाले नाही. शाखेवर झालेल्या दगडफेकीनंतर संघाच्या आणि भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी दगडफेक प्रकरणी गुन्हा नोंदवला. दगडफेक प्रकरणात पाच आरोपींना टिळकनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यातील चार आरोपी अल्पवयीन असल्याचं समजतं.

लाडकी बहीण योजनेत दुरुस्ती करणार…अजित पवार यांची सभागृहात मोठी घोषणा

0

महायुती सरकारची सर्वात लोकप्रिय ठरलेली लाडकी बहीण योजनेबाबत विरोधकांकडून टीका केली जात आहे. ही योजना बंद होणार असल्याचा आरोप केला जात आहे. या योजनेसंदर्भात उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत मोठी घोषणा केली. यावेळी विरोधकांच्या आरोपांनाही त्यांनी उत्तर दिले. अजित पवार म्हणाले, लाडकी बहीण यांच्या मनातून काही जात नाही. लाडकी बहीण आमची झाली आहे. त्यामुळे तुम्ही दोडके झाला आहात. लाडकी बहीण या योजनेत आम्ही दुरुस्ती करणार आहोत. मात्र ही योजना बंद करणार नाही, असे ठामपणे अजित पवार यांनी सोमवारी सांगितले.

लाडकी बहीण योजनेसाठी कर्ज योजना आणा…
लाडकी बहीण अर्थव्यवस्थेलाही चालना देणारी योजना आहे. या योजनेचा वेगळा अर्थ मला सभागृहाला सांगायचा आहे. अर्थमंत्री म्हणून मी जेव्हा या योजनेकडे पाहतो त्यावेळी यामधून राज्याच्या अर्थव्यवस्थेला भविष्यात काय मिळणार आहे, याचाही विचार करतो. १५०० रुपयांची थेट रोख रक्कम भगिनींना मिळते आहे. महिला सक्षमीकरणाचे एक मोठ पाऊल सरकारने उचलले. परवाच विधान परिषदेत गटनेते प्रविण दरेकर यांनी केलेली एक घोषणा माझ्या वाचनात आली. लाडकी बहिण योजनेच अकाऊंट उघडणाऱ्या भगिनींना त्यांची मुंबई बँकेत १० ते २५ हजारापर्यंतची कर्ज देणार आहे. राज्यात महिला आर्थिक विकास महामंडळासारखी संस्था आहे, जिल्हा सहकारी बँका आहेत, सहकारी बँका आहेत. मी या सर्वांना आवाहन करणार आहे. ज्या महिलांना छोटा, मोठा व्यवसाय सुरू करायचा आहे, त्यांच्यासाठी लाडकी बहीण योजना जोडून कर्ज योजना तुम्ही काढा.

लाडकी बहीण योजना केवळ मदतीची राहणार नाही तर त्यामधून महिलांचे सक्षमीकरण करण्याच्या बाबतीत आपण आणखी एक पाउल पुढे टाकू. कारण, हा थोडाथडका पैसा नाही. सुमारे 45 हजार कोटी वर्षाला महिलांच्या हातात जाणार आहेत. या माध्यमातून ती बहीण सक्षम होईल, तिच्या कुटुंबाला हातभार लागेल आणि हा पैसा राज्याच्या अर्थव्यवस्थेत येऊन अर्थव्यवस्थेला छोटे, मोठे योगदान मिळेल.

कृषीचा 2023-24 चा विकास दर 3.3 टक्के होता. सरकारने शेतकऱ्यांना आर्थिक ताकद दिली, त्यामुळे 2024-25 चा कृषीचा विकास दर 8.7 टक्क्यांवर गेला. अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रात एआय तंत्रज्ञान, जलयुक्त शिवार, एक तालुका एक बाजारपेठ, सिंचनासाठी नदीजोड प्रकल्प, महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रम, बांबू लागवड, मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी मराठवाडा वॉटर ग्रीड यासारख्या कार्यक्रमांसाठी तरतुदी केलेल्या आहेत.

राज्यातील शेतकरी मेहनती आहे. त्याला फक्त सरकारने पाठबळ दिले आहे. आपण नेहमी म्हणतो की, शेतकऱ्यांनी आधुनिकतेची कास धरली पाहिजे. पण ही सुविधा निर्माण करुन देण्याची जबाबदारी सरकारची आहे. म्हणूनच पीक नियोजनाचा सल्ला देण्यासाठी आणि त्यांची उत्पादकता वाढविण्यासाठी एआय तंत्रज्ञानाच्या वापराला प्रोत्साहन देणार आहोत. येत्या दोन वर्षात 500 कोटी निधी आपण यासाठी खर्च करणार आहोत.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ‘ कोथरूड शिवजयंती महोत्सव २०२५’ ला उत्साही प्रतिसाद; आज मोठ्या पडद्यावर ‘छावा’ चित्रपटा चे आयोजन

0

महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि सचिन फ्रेंड्स सर्कल कुंदन ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने कोथरूड शिवजयंती महोत्सव २०२५चे आयोजन करण्यात आले. दिनांक १६ मार्च रोजी मनसे शाखा वनाझ कॉर्नर येथे दुर्मिळ शिवकालीन शस्त्रांच्या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं. हे प्रदर्शन पाहण्यासाठी कोथरूड विधानसभा मतदारसंघामधील शेकडो पालक आपल्या लहान मुलांसोबत उपस्थित होते.

दिनांक १७ मार्च रोजी शिवजयंतीच्या निमित्ताने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित ‘छावा’ या चित्रपटाचे प्रक्षेपण केलं जाणार आहे. तरी कोथरूडवासियांनी तमाम शिवभक्तांनी छावा चित्रपट पाहण्यासाठी बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन मनसेचे सरचिटणीस आणि कोथरूड शिवजयंती महोत्सवाचे संस्थापक ॲड. किशोर शिंदे यांच्यासह रवी वाल्हेकर, नवनाथ दळवी, प्रतीक कंधारे, अमोल खराडे, विश्वास किरमिटे यांनी केले.