Home Blog Page 219

निर्मला सीतारमण यांनी मांडलं देशाचं बजेट, डाळींमध्ये स्वावलंबी होण्यास 6 वर्षांचा कार्यक्रम; काय स्वस्त-काय महाग? जाणून घेऊया.

0

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडून बजेट वाचन सुरु आहे. त्या मोदी 3.0 सरकारच दुसरं बजेट मांडत आहेत. निर्मला सीतारमण यांच्या बजेटकडे सगळ्यांचच लक्ष लागलं आहे. सर्वसामान्य, नोकरदार, व्यापारी आणि उद्योजक सगळ्यांचेच या बजेटकडे डोळे लागले आहेत. निर्मला सीतरमन यांच्या बजेटकडून काय मिळणार? हीच प्रत्येक घटकाची अपेक्षा आहे. सर्वांच्या अपेक्षा पूर्ण करताना अर्थव्यवस्थेचा वेग वाढवणं आणि नव्या नोकऱ्यांची निर्मिती हा बजेट मांडताना निर्मला सीतारमण यांचा उद्देश असेल. निर्मला सीतारमण यांनी बजेटमध्ये विविध घोषणा केल्या आहेत. त्यामुळे काही गोष्टी स्वस्त झाल्या आहेत, तर काही महागल्या आहेत. त्या बद्दल जाणून घेऊया…..

कुठली औषध स्वस्त?

36 जीवनावश्यक औषधांना करामध्ये सूट जाहीर झाली आहे. कॅन्सरची औषधं स्वस्त होणार आगहे. कॅन्सरच्या 36 औषधांवरची कस्टम ड्युटी हटवली आहे.

काय स्वस्त होणार?

LED स्वस्त

भारतात बनवलेले कपडे

मोबाइल फोन बॅटरी

82 सामानांवरुन सेस हटवला

लेदर जॅकेट

बूट

बेल्ट

पर्स

ईवी वाहन

LCD

LED टीव्ही

हँडलूम कपड़े

वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी मोठी घोषणा

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. पुढील वर्षापासून मेडिकल कॉलेजमध्ये 75 हजार जागा वाढवण्यात येणार आहेत. त्यामुळे वाढती लोकसंख्या लक्षात घेता डॉक्टर्सची संख्या सुद्धा वाढेल.

आयआयटीच्या 6500 जागा वाढवण्यात येणार आहेत.

देशात 3 AI एक्सल्स सेंटर उभारणार.

डाळींमध्ये स्वावलंबी होण्याचा प्रयत्न

डाळींमध्ये स्वावलंबी होण्यासाठी सरकार 6 वर्षांचा कार्यक्रम सुरू करणार. तूर, उडीद आणि मसूर या पिकांवर विशेष लक्ष केंद्रित केले जाईल. भाजीपाला आणि फळांचे उत्पादन वाढवण्यासाठी आणि किफायतशीर दर देण्यासाठी व्यापक कार्यक्रम सुरू केला जाईल, असे अर्थमंत्र्यांनी सांगितले.

सर्वपक्षीय वारजे विकास कृती समितीच्या लढ्यास यश; वाहतुकीस अडथळा करणाऱ्यांवर कडक कारवाईचे धोरण

0

वारजे विकास कृती समितीच्या वतीने वारजे माळवाडी पोलीस स्टेशन येथे सहाय्यक पोलीस उपायुक्त मा. पटारे साहेब वारजे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा. विश्वजीत कायंगडे वारजे वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मा. विक्रम मिसाळ यांच्यासोबत वारजे परिसरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी उपाययोजना करणे बाबत सविस्तर बैठक घेण्यात आली.

या बैठकीत वाहतुकीस अडथळा ठरणारे दुकानदार, पथारीवाले, खाद्यपदार्थ विक्रेते, टायरवाले, टेम्पो, रिक्षा, सहाआसनी रिक्षा स्टॅन्ड , अतिक्रमणे बेवारस वाहने यावर सखोल चर्चा करण्यात आली. वारजे वाहतुकीत काही प्रायोगिक बदल करणे, बेशिस्त वाहनचालक, नियम मोडणारे आणि वाहतुकीस अडथळा करणारे घटक यांच्यावर कडक कारवाई करण्याचे धोरण स्वीकारणे आदी बाबींवर कृती समितीच्या वतीने सूचना करण्यात आल्या.
अशा अनेक व्यक्ती , व्यावसायिक यांना वाहतूक विभागाच्या वतीने नोटीसा काढण्यात आल्या आहेत. वारजे पोलीस स्टेशनचे वतीने सुद्धा वाहतुकीस अडथळा करणाऱ्यांना कायदेशीर कारवाईस सामोरे जावे लागणार आहे.

या बैठकीस मा. उपमहापौर दिलीपभाऊ बराटे ,मा.श्रीकृष्ण बराटे,मा.सतिशभाऊ बोडके मा.बाबा धुमाळ ,मा. किरण बारटक्के, मा कैलाश दांगट मा. सचिन दशरथ दांगट, मा. दत्तात्रय चौधरी, मा.सचिन बराटे,मा. निलेश घारे मा. यशवंत ठोकळ मा.दत्ता झंजे, मा. सचिन विष्णू दांगट ,मा. दत्ता पाखिरे, मा. विनायक लांबे मा. कैलास देवकर , मा.पराग ढेणे,मा. नाना सोनवणे, मा.सतीश पाटील, मा. निलेश आगळे,मा. रफिक शेख मा. निवृत्ती येनपुरे ,मा. राम बराटे मा. भावना पाटील, मा.वसंत कोळी यांचेसह अनेक सर्वपक्षीय सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

साहित्यिक बाणा अन् करेक्ट कार्यक्रमाचे कलावंत; ध्येयवादी दिलीपभाऊ एक आदर्शवत ‘चैतन्यपीठ’च

0

नेतृत्वाने बदलत्या काळानुसार आपल्यामध्ये बदल करत नवनवीन ज्ञानाला अवगत करण्याची कला अवगत केली तेच नेतृत्व कायमच चिरतरुण आपलेसे वाटतं… याचं मूर्तीमंद उदाहरण म्हणजे वारजे भागातील ग्रामपंचायत ते आजपर्यंत पुणे महापालिकेत नेतृत्व दिलीप भाऊ बराटे. बदलत्या वारज्याचे ध्येय साध्य करत विकासाची वाटचाली या नेतृत्वाने अविरत सुरू ठेवली असून आपल्या नेतृत्वाला साहित्यिक जोड दिल्यामुळे बदलत्या जीवनशैलीतही हे नेतृत्व सर्वांना आपलेसे वाटू लागते. राजकीय परिस्थिती कशीही असली तरीसुद्धा गेली 25 वर्ष वारजेच्या सर्वांगीण विकासासाठी वाहून घेत जनसामान्यांसाठी लढणारे स्वाभिमानी नेतृत्व आजही दिलीप भाऊंचं नाव घेतलं जातं. अशा या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील वटवृक्षरुपी नेतृत्वास वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा!

पुणे शहराच्या पश्चिमेला शेती प्राधान्य भाग असलेल्या वारजे भागातून आपल्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात केल्यानंतर शैक्षणिक प्रगती साधताना सामाजिक जाणिवेतून सुरू केलेला हा राजकीय प्रवास अविरत सुरू असून आजही नवनव्या बदलांमध्येही या नेतृत्वाने कायमच काळानुरूप बदल केले. त्याचीच प्रचिती म्हणून आजही विभिन्न प्रकारच्या प्रभाग रचना झाल्या तरी सुद्धा या नेतृत्वाला कायमच विजयश्री खेचण्यात यश मिळालं. पुण्यातील नामांकित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे प्रतिनिधी संधी मिळाल्यानंतर शैक्षणिक प्रगतीसाठी या नेतृत्वाने वारजेच्या ग्रामीण लेहेजा असलेल्या भागामध्ये शैक्षणिक क्षेत्रात काम सुरू केले. सुरुवातीचा खडतर प्रवास पार केल्यानंतर एका ठराविक टप्प्यावरती जमा झालेल्या सर्व सहकाऱ्यांच्या मदतीने साहित्यिक कलावंत प्रतिष्ठान, पुणे या नावाने सांस्कृतिक प्रवासाला सुरुवात केली. सांस्कृतिक क्षेत्रात प्रवास सुरू झाल्यानंतर वारजे ग्रामपंचायत ते नगरसेवक (२००२,२००१७, २०२२, २०१७) सलग 20 वर्ष या नेतृत्वाच्या कलागुणांना वाव मिळत गेला आणि मिळालेल्या संधीचा कायमच या परिसराचा विकास करण्यासाठी उपयोग करण्याचा ध्यास दिलीप भाऊ यांनी घेतला आहे. २००२ मध्ये मिळालेलं पुणे मनपा उपमहापौर पद असो की २०१७ साली स्थायी समिती सदस्य किंवा विरोधी पक्षनेता, पुणे मनपा या सर्व पदांचा कायमच वापर वारजेच्या सर्वांगीण विकासासाठी करण्यात आला आहे. त्यामुळेच सध्या बदलत्या वारजाचं चिरतरुण नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते

शैक्षणिक प्रगती बरोबरच क्रीडा क्षेत्रातही अमुल्य योगदान देण्यासाठी या नेतृत्वाची नामदेवराव मोहोळ विद्या व क्रीडा प्रतिष्ठान संस्था, पुणे येथे सचिव म्हणून नियुक्ती झाली आणि त्या क्षेत्रातही उल्लेखनीय कार्य करत वारजे परिसरामध्ये विविध क्रीडा प्रकारांमध्ये मुलांना चांगल्या संधी मिळण्यास सुरुवात झाली. विभिन्न क्षेत्रामध्ये काम करत असताना स्वतःची एखादी संस्था असावी या उदात्त हेतूने दिलीपभाऊ बराटे यांनी संस्कार मंदिर या संस्थेची निर्मिती करून वारजे भागातील दिन दुबळ्या आणि गरीब लोकांसाठी शिक्षणाची द्वारे खुली केल्यामुळे या परिसरातील शैक्षणिक प्रगती सहज साध्य करणे शक्य झाले. शैक्षणिक प्रगती पेक्षा सांस्कृतिक प्रगल्भता, विभिन्न क्षेत्रातील मान्यवर लोकांचे विचार समाजातील लोकांना दिशा देण्याचे काम करतात या उदात्तहेतुने सामान्य नागरिकांसाठी साहित्यिक-कलावंत प्रतिष्ठान, पुणे नावाची संस्था निर्माण करून रौप्य-महोत्सवी वर्षापर्यंत साहित्यिक कलावंत संमेलनाचे आयोजनही या नेतृत्वाची अभिमानास्पद पातळी मानावी लागेल.

दिलीप नावाचे गुणवैशिष्ट्य लक्षात घेतले तर दिलीप या शब्दाचा अर्थ राजा असा होते परंतु या नेतृत्वामध्ये राजापण असले तरी जनमानसात सहज आणि अत्यंत मनमिळावूपणे वागणारे नेतृत्व वारजे भागातील लोक त्यांना ओळखतात. दिलीप म्हणजे विकासाभिमुख, मजबूत, दूरदर्शी, साहसी, खर्चिक, स्वातंत्र्यप्रेमी, आणि आध्यात्मिक ही सर्व गुण लक्षणे वारजेतील दिलीप भाऊ यांच्यामध्ये तंतोतंत दिसतात. दिलीप हे नाव सामान्यतः स्वातंत्र्याच्या शोधात असतात मनाने आणि कृतीने खूप जलद असल्यामुळे आजूबाजूचे लोक उत्साही राहतात. दिलीपभाऊही नावाच्या प्रत्येक अक्षराच्या अर्थानुसार प्रत्यक्ष परिस्थिती आणि व्यावहारिक अन् काळजी घेणारे, संवेदनशील अन् दयाळू नेतृत्व म्हणून वारजे माळवाडी भागात उदयास आले आहे. आपल्या ज्ञानी आणि बौद्धिक कौशल्याच्या जोरावर साहित्यिक कलावंत प्रतिष्ठान अन् संस्कार मंदिर दोन्ही संस्थांची वाटचाल प्रत्येकाला उत्साहवर्धकच वाटावी अशी वाटचाल करत आहेत.

माननीय दिलीप भाऊ बराटे यांनी आजपर्यंत उपभोगलेली पदे-

• पुणे विद्यापीठ प्रतिनिधी, पुणे

• सदस्य वारजे ग्रामपंचायत

• सरपंच वारजे ग्रामपंचायत

• नगरसेवक – २००२,२०१७, २०२२, २०१७

• २००२ उपमहापौर, पुणे मनपा

• २०१४- खडकवासला विधानसभा उमेदवार

• २०१७- स्थायी समिती सदस्य, पुणे मनपा

• २०१९- विरोधी पक्षनेता, पुणे मनपा

• सचिव के. नामदेवराव मोहोळ विद्या व क्रीडा प्रतिष्ठान संस्था, पुणे

• संस्थापक अध्यक्ष-संस्कार मंदिर, पुणे

हडपसरला नवीन मेट्रो मार्गिका, मुख्य शहराशी कनेक्टिव्हिटी मिळणार असल्याने प्रवास होणार वेगवान…

0

हडपसर विधानसभा मतदारसंघात सिव्हील कोर्ट ते कोंढवा बुद्रुक व खुर्द, येवलेवाडी मेट्रो मार्गास मंजुरी मिळाली आहे. तसेच हडपसर सासवड रोड, हडपसर लोणी काळभोर देखील मार्गिका मंजूर झाल्या आहेत. या मार्गामुळे हडपसरमधून मुख्य शहरासाठी कनेक्टिव्हिटी मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. या नवीन मेट्रो मार्गिकांमुळे हडपसर मतदारसंघात मेट्रो जाळे पसरणार असल्याने नागरिकांना प्रवास सुखकर आणि वेगाने होणार असल्याचा दावा या मतदार संघाचे आमदार चेतन तुपे यांनी केला आहे.

विधानभवन येथील झुंबर हॉलमध्ये महाराष्ट्र मेट्रो रेल कार्पोरेशनची बैठक पार पडली. पुणे शहराचा एकत्रित वाहतूक आराखडा बनवण्याचे काम सध्या अंतिम टप्प्यात सुरू आहे. याच संदर्भात या आराखड्यामध्ये नवीन मेट्रो मार्ग व त्याची व्यवहार्यता यासंबंधी शक्यतांचा विचार करत शहरात येत्या काही वर्षात कशाप्रकारे वाहतूक वाढ होईल व ती कोणत्या भागांमध्ये असेल अशा एकूण माहितीचे संकलन करण्यात आले आहे. याबाबत आराखड्याचे सादरीकरण बैठकीत करण्यात आले. यावेळी झालेल्या चर्चेत तुपे सहभागी झालो. उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार हडपसरसाठी नवीन मेट्रो मार्गिका मंजूर झाल्या. त्यामुळे तुपे यांनी त्यांचे आभार मानले आहेत.

तुपे म्हणाले की, पुलगेट ते कात्रज आणि हडपसर ते सासवड अशा दोन मार्गिका वाहतूक आराखड्यासाठी सुचविण्यात आल्या होत्या. कात्रज ते कोंढवा बु, खडी मशीन चौक, कोंढवा खुर्द, लुला नगर मार्गे पुलगेट असे असा मार्ग असेल. तर हडपसर ते लोणी काळभोर, हडपसर ते सासवड रस्ता, फुरसुंगी स्टेशन पर्यंत मार्ग असणार आहे. शहरातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. मेट्रो मार्गिकांमुळे खडकवासला ते लोणीकाळभोर, कात्रज, हडपसर मार्गे खराडी तर दुसरीकडे सासवड रोड (फुरसुंगी) पर्यंत कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. मतदारांना निवडकीच्या वेळी मतदारसंघात मेट्रोचे जाळे निर्माण केले जाईल, असे वचन दिले होते. ते आता पूर्ण होताना दिसून येत आहे. बैठकीत केलेल्या सूचना मान्य करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता नवीन मार्गिकांसह मेट्रो जाळे निर्माण होऊन हडपसरकरांचा प्रवास सुखकर आणि वेगवान होणार आहे. असे तुपे यांनी सीविक मिररला सांगितले.

पुणे मेट्रो फेज २ प्रकल्प

पुणे मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलपमेंट ॲथॉरिटीने पुणे मेट्रो स्टेशन प्रकल्प – शिवाजीनगर ते लोणी काळभोर आणि खडकवासला ते खराडी पर्यंत विस्तारित करण्याची योजना आखली आहे. पुणे मेट्रो फेज २ प्रकल्पांतर्गत इतर विविध मार्गांनाही मंजुरी देण्यात आली आहे.

शिवाजीनगर ते लोणी काळभोर:

पीएमआरडीए हिंजवडी ते पुण्यातील शिवाजीनगर मेट्रो स्थानकापर्यंत विस्तारित करणार असून, या मार्गाचा लोणी काळभोरपर्यंत विस्तार करण्याची योजना आहे. प्रस्तावित विस्तारित मार्गामध्ये सासवड रोडवरील संभाव्य शाखा असलेल्या शिवाजीनगर, पुलगेट, हडपसर आणि लोणी काळभोर यासह अनेक महत्त्वाच्या ठिकाणांचा समावेश असणार आहे. पहिल्या टप्प्यात हिंजवडी ते शिवाजीनगर आणि त्यानंतर लोणी काळभोरपर्यंतचा विस्तार टप्प्याटप्प्याने पूर्ण केला जाणार आहे.

ठाकरे गटासाठी ‘ऑपरेशन टायगर’ अंतिम टप्प्यात असतानाच ‘ऑपरेशन लोटस’ची चक्रे जोरात फिरू लागली, शिवसेना शिंदेगटातही मोठी नाराजी

0

मागील काही दिवसांपासून राज्यात ऑपरेशन टायगरची चर्चा आहे. ठाकरे गटाचे काही खासदार फुटून भाजपात जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. भाजपकडून हे ऑपरेशन राबवलं जात असल्याचं बोललं जातंय.केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देखील ऑपरेशन टायगरला हिरवा कंदिल दिल्याचं सांगितलं जातंय. ऑपरेशन टायगरच्या माध्यमातून ठाकरे गटाचे नऊ पैकी सहा खासदार भाजपात सामील होणार असल्याची चर्चा आहे.

आता सहापैकी पाच खासदार शिंदे गटात जाण्यास पूर्णपणे तयार असून केवळ एका खासदारामुळे पक्षप्रवेशाचं घोडं आडल्याचं बोललं जातंय. शिवसेना ठाकरे गटातचे ९ पैकी ६ खासदार भाजपच्या नेटवर्कमध्ये सेट झाल्याची चर्चा आहे. पाच खासदारांकडून पडद्यामागं पूर्णपणे जुळणी झाल्याची माहिती आहे. पण एका खासदाराचं अद्याप तळ्यात मळ्यात सुरू आहे. पक्षांतर बंदी कायद्यातून वाचायचं असेल तर ठाकरेंचे नऊ पैकी सहा खासदार फुटणं आवश्यक आहे. अन्यथा फुटीर गटावर पक्षांतर बंदी कायद्यानुसार कारवाई केली जाऊ शकते. त्यामुळे पक्षांतरबंदी कायद्यातून वाचण्यासाठी ६ खासदारांचा आकडा महत्वाचा आहे.

खरं तर, सुरुवातीला ठाकरेंचे खासदार फुटून शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा सुरू होती. मात्र आता हे सर्व खासदार शिंदे गटाऐवजी भाजपात सामील होणार असल्याचं बोललं जातंय. ठाकरेसेनेच्या खासदारांचं भाजपमध्ये होणाऱ्या संभाव्य पक्ष प्रवेशामुळे शिवसेना शिंदे गटात मात्र मोठी नाराजी पसरली आहे. ठाकरेंचे सहा खासदार भाजपात सामील झाले तर केंद्रातील एकनाथ शिंदे गटाचं महत्त्व कमी होऊ शकतं. याच कारणामुळे शिंदे गटात नाराजी आहे.

दुसरीकडे पुण्यातले तीन माजी आमदार एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत दाखल होणार असल्याची माहिती आहे. यात काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर, महादेव बाबर आणि चंद्रकांत मोकाटे यांचा समावेश आहे. पुण्यात होणाऱ्या या ऑपरेशन टायगरची जबाबदारी उद्योगमंत्री उदय सामंत यांना दिल्याची चर्चा आहे.

पुण्यात इंग्लंडचं पानिपत! टीम इंडियाकडून मालिका खिशात गंभीरच्या डेब्यू मॅनने फिरवला सामना,

0

पुण्यातील एमसीए स्टेडियमवर भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यातील टी-ट्वेंटी मालिकेतील चौथा सामना खेळवला गेला. या सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडचा 15 धावांनी पराभव केला आहे. टीम इंडियाकडून अचानक डेब्यू करणाऱ्या हर्षित राणाने अन् फिरकीपटूंनी इंग्लंडला गुडघ्यावर आणलं. शिवम दुबेच्या जागी कनकशन सब्स्टीट्यूट म्हणून आलेल्या हर्षितने कहर केला. तर हादिक पांड्या आणि शिवम दुबेची हाफ सेंच्युरी टर्निंग पाईंट ठरली.

इंग्लंडचा डाव

टीम इंडियाने दिलेल्या 182 धावांचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरूवात चांगली झाली. दोन्ही सलामीवीरांनी पावर प्लेमध्ये अफलातून कामगिरी केली. मात्र, पावर प्लेच्या अखेरच्या बॉलवर विकेट मिळाली अन् टीम इंडियाने सापळे रचण्यास सुरूवात केली. हॅरी ब्रुकने इंग्लंडसाठी दमदार अर्धशतक ठोकलं. पण नेहमीप्रमाणे वरूण चक्रवर्तीने त्याला जाळ्यात अडकवलं. अखेरीस ओव्हरटोन आक्रमक रुप धारण करत असताना हर्षित राणाने त्याला माघारी पाठवलं. अखेरीस इंग्लंडचा संघ 166 धावांवर ऑलआऊट झाला. हर्षित राणाने 4 ओव्हरमध्ये 33 धावा देत 3 महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या.

पांड्या अन् दुबेने सावरलं

हार्दिक पांड्या आणि शिवम दुबे यांच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने चौथ्या टी-20 सामन्यात इंग्लंडविरुद्ध 20 ओव्हरमध्ये 9 विकेट गमावत 181 धावा केल्या आहेत. 12 धावांवर टीम इंडियाने तीन विकेट गमावल्या होत्या. साकिब महमूदने दुसऱ्याच ओव्हरमध्ये संजू सॅमसन, तिलक वर्मा आणि सूर्यकुमार यादव यांना पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. रिंकू सिंग आणि अभिषेक शर्मा यांनी चौथ्या विकेटसाठी दोघांमध्ये 32 चेंडूत 45 धावांची भागीदारी केली.

शिवम दुबे आणि हार्दिक पांड्या यांनी भारताचे लक्ष्य 160 धावांच्या पुढं नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. दोघांमध्ये सहाव्या विकेटसाठी 87 धावांची भागीदारी केली. या सामन्यात दोघांनी 53-53 धावांची अफलातून खेळी केली. त्यामुळे टीम इंडियाला 181 धावा उभारता आल्या.

दरम्यान, 79 वर 5 विकेट्स अशी परिस्थिती असताना हार्दिक आणि शिवम दुबे यांनी सुत्र हातात घेतली अन् दोघांनी आक्रमक फलंदाजी केली. दोघांनी मिळून 87 धावांची पार्टनरशीप केली. हार्दिक पांड्याने 30 बॉलमध्ये 4 सिक्स अन् 4 फोरच्या मदतीने 53 धावांची खेळी केली. तर शिवम दुबेने 34 बॉलमध्ये 7 फोर अन् 2 सिक्सच्या मदतीने 53 धावांची खेळी केली. दोघांनी मिळून इंग्लंडच्या गोलंदाजांना पाणी पाजलं होतं