Home Blog Page 153

औरंगजेबच्या कबरीवरून उपमुख्यमंत्री शिंदेंचं मोठं विधान, काँग्रेसवरही पलटवार; म्हणाले…

0

राज्यात औरंगजेबच्या कबरीवरून वाद सुरू असून त्याची कबर हटविण्याची मागणी शिवभक्तांकडून होत आहे. तर या मुद्द्यावर महायुती सरकारने योग्य निर्णय न घेतल्यास कबर उखडून टाकू असा इशाराही देण्यात आला आहे.तर राज्यात औरंगजेबची कबर काढून टाकावी की नको यावरून आता नवा वाद सुरू झाला आहे. याच मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिल्यांदाच आपली भूमिका मांडलीय. शिंदे यांनी आपली भूमिका मांडताना, ‘औरंग्याची निशाणी महाराष्ट्रात कशाला पाहिजे? जी शिवभक्तांची भावना आहे, तीच माझी भावना आहे’, असे म्हटलं आहे.

देहू येथील श्री संत तुकाराम महाराज पुरस्काराने शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सन्मानित करण्यात आले. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना हे विधान केलं आहे. यावेळी त्यांनी, छत्रपती संभाजीनगर येथील औरंगजेबची कबर हटविण्यासंदर्भात सुरू असलेल्या मागणी आणि वादावर आपली भूमिका मांडली.

एकनाथ शिंदे यांनी, औरंग्याची निशाणी महाराष्ट्रात कशाला पाहिजे? असा सवाल करताना जी भावना शिवभक्तांची आहे, तीच माझी भावना आहे, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. तसेच आपण शिवभक्तांच्या भावनांचा आदर करत असून औरंगजेबने संभाजी महाराजांचा अनन्वित छळ केला. संभाजी महाराजांचे शौर्य आणि औरंगजेबचे क्रौर्य आहे. त्याच्या क्रौर्याची परिसीमा गाठली होती. अशा औरंग्याची निशाणी महाराष्ट्रात कशाला पाहिजे? त्यामुळेच शिवभक्तांची भावना ही औरंगजेबची कबर काढून टाकावी, ती आपल्या महाराष्ट्रात नको अशी आहे. हीच माझीही भावना असल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले.

तसेच राज्यातील जनतेला उद्देशून जो खरा देशभक्त आहे, त्याने औरंगजेबचे उदात्तीकरण करू नये, असे आवाहान केले आहे. तर क्रूरकर्मा औरंग्याचे कोणीही समर्थन करता कामा नये. औरंग्या महाराष्ट्राचा दुश्मन होता, तो देशद्रोही, आणि राष्ट्रद्रोही होता, अशा या औरंग्याच्या खाणाखुणा महाराष्ट्रात नकोच. तर जे औरंग्याचे उदात्तीकरण करतात त्यांचा निषेध केला पाहिजे, असेही त्यांनी म्हटलं आहे.

जनाची नाही तर मनाची तरी

दरम्यान, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी महायुती आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना औरंगजेबाची उपमा दिल्यावरून देखील त्यांनी पलटवार केला आहे. काँग्रेस म्हणजे औरंगजेबी वृत्ती असून ते त्यांच्या कृत्यातून दिसते. काँग्रेसवाल्यांनी आधी संभाजी महाराज यांचा चित्रपट बघावा आणि मग उदात्तीकरणाचा विचार करावा, असा टोलाही शिंदेंनी लगावला आहे. तसेच औरंग्याची क्रूरता बघा, मी मुख्यमंत्री होतो तेव्हा देवेंद्रजी टीममध्ये होते आता ते मुख्यमंत्री आहेत आमची टीम आहे.

आम्ही जो काही कारभार केला तो छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊनच. आम्ही सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचे काम केले. आदर्श छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांचा जो आदर्श होता, त्याच आदर्शावर आम्हीही काम करत आहोत. त्यामुळे कोणाशी तुलना तुम्ही करता? जनाची नाही तर मनाची तरी लाज ठेवा, अशी टीका देखील सपकाळ यांच्यावर उपमुख्यमंत्री शिंदेंनी केली आहे.

भाजपकडून विधान परिषदेसाठी 3 उमेदवारांची नावे जाहीर; यांची लॉटरी लागली तर यांच्या वाटेला वाटण्याच्या अक्षदा?

0

महाराष्ट्रात विधान परिषदेच्या 5 जागांसाठी पोटनिवडणूक होणार आहे. यात भाजप सर्वाधिक 3 जागा लढवणार आहे. भाजपच्या केंद्रीय कार्यालयाकडून आज विधान परिषदेसाठी तीन उमेदवारांची नाव जाहीर करण्यात आली आहेत. महाराष्ट्रात विधानपरिषद राज्यसभा अशा जागा जाहीर होण्याची वेळ आल्यानंतर कायमच पहिल्या स्थानी चर्चेत असलेल्या ज्येष्ठ नेते माधव भंडारी यांच्या नावाला यावेळीही केंद्रीय नेतृत्वाकडून वाटण्याची अक्षदा लावण्यात आले असून धक्कादायकपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नागपूर मध्ये काम पाहणाऱ्या संदीप जोशी यांना संधी देण्यात आली आहे.

दिल्लीतील केंद्र नेतृत्वाने जाहीर केलेल्या या संदीप जोशी, संजय केनेकर आणि दादाराव केचे यां यांच्या नियुक्ती मागे विशेष कारणे असल्यानेच ही उमेदवारी जाहीर झाली आहे. सोमवार उद्या अर्ज दाखल करायचा आहे. नागपूर विभागामध्ये सक्रिय पक्षाचे काम करण्या साठी विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संदीप जोशी यांच्यावर जबाबदारी दिली तेव्हापासून भारतीय जनता पक्षाचे या विभागांमध्ये सक्रिय आणि संघटनात्मक काम करण्यामध्ये संदीप जोशी यांनी मोलाचे योगदान दिले आहे.सध्या देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे त्यांना संधी मिळेल अशी चर्चा सुरू झाल्या असतानाच थेट देवेंद्र फडणवीस यांनी दिल्ली वारी करत आपल्या निष्ठावंत कार्यकर्त्याला न्याय दिला आहे अशी ही चर्चा सुरू झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात.

पक्ष संघटनेमध्ये केलेल्या कामाचे मोल म्हणून संजय केनेकर हे छत्रपती संभाजीनगरमधून येतात. भारतीय जनता पक्षाच्या वतीने मराठवाडा हा सर्वात कठीण अशी समज झालेली असताना लोकसभेमध्ये ही दारुण पराभव या भागातील पक्षातील नेत्यांना भोगाव लागला त्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान (मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सर्वात तीव्र भावना असलेल्या) त्यांनी पक्षाचे महामंत्री म्हणून भारतीय जनता पक्षाचे विचार सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे उत्तम काम केलेलं आहे. मराठवाड्याच्या भागांमध्ये भारतीय जनता पक्षाची ताकद वाढवण्यासाठी संजय केनेकर यांनी घेतलेल्या श्रमामुळे मराठवाड्याच्या पट्ट्यामध्ये प्रतिकूल परिस्थितीतही पक्षाने समाधानकारक कामगिरी केली.

वर्धा जिल्ह्यातील महायुतीचे सत्ता कारण जुळवताना दादाराव केचे यांना विधानसभेच्यावेळी तिकीट नाकारण्यात आलं होतं. म्हणून त्यांची आता विधान परिषदेवर वर्णी लागली आहे. विधान परिषद पोटनिवडणुकीत भाजपच्या वाट्याला तीन जागा आल्या आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रत्येकी एक जागा लढवणार आहे.

एकनाथ शिंदे दिलेला शब्द पाळणार, विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी ‘या’ नेत्याला देणार संधी

0

विधानपरिषदेच्या पाच आमदारांची विधानसभेवर निवड झाल्याने या पाच जागा रिक्त झाल्या आहेत. या रिक्त झालेल्या पाच जागांसाठी येत्या 27 मार्चला पोटनिवडणूक होत आहे. या प्रत्येक जागेसाठी स्वतंत्र पोटनिवडणूक होत असल्याने पाचही जागा महायुतीला मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.त्यात भाजप तीन, शिवसेना शिंदे व राष्ट्रवादी अजित पवार गटाला प्रत्येकी एक जागा मिळू शकते, असे बोललं जात आहे. विधानपरिषदेच्या एका जागेसाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतून अनेक जण इच्छुक आहेत. मात्र यात शिवसेनेचे संपर्क प्रमुख आणि माजी विधानपरिषद सदस्य चंद्रकांत रघुवंशी यांचं नाव आघाडीवर असल्याचे बोललं जात आहे.

शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या वाट्याला विधानपरिषदेची एक जागा आली आहे. मात्र यासाठी अनेकजण इच्छुक आहेत. धुळे – नंदुरबारचे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे संपर्क प्रमुख आणि माजी विधानपरिषद सदस्य चंद्रकांत रघुवंशी यांचं नाव यात आघाडीवर आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिलेला शब्द पाळणार अशी पक्षात चर्चा रंगली आहे. तसेच माजी नगरसेविका शीतल म्हात्रे यांचे नाव चर्चेत असून सातत्याने उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षावर आक्रमकपणे टीका करणारं नेतृत्व म्हणून त्यांची सध्याची ठळक ओळख आहे.

कोण आहेत चंद्रकांत रघुवंशी?

  • चंद्रकांत रघुवंशी हे 1992 पासून काँग्रेस पक्षात सक्रीय राजकारणात आहेत.
  • चंद्रकांत रघुवंशी 1992 मध्ये जिल्हा परिषदेचे सदस्य होऊन धुळे व नंदुरबार जिल्हा एकत्रित असताना सहा वर्षे          धुळे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते.
  • त्यानंतर सलग तीनवेळा ते विधानपरिषदेचे सदस्य आहेत.
  • आमदारकीची मुदत एप्रिल 2020 मध्ये पूर्ण होणार होती. मात्र तत्पूर्वीच त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला            आणि ऑक्टोबर २०१९ मध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला.
  • त्यानंतर जुलै २०२२ रोजी त्यांनी एकनाथ यांच्या शिवसेनेत प्रवेश केला.

संजय मोरे, किरण पांडव यांच्या नावाचीही चर्चा

यासोबतच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे सचिव संजय मोरे यांचेही नाव चर्चेत आहे. संजय मोरे हे एकनाथ शिंदे यांचे विश्वासू सहकारी तसेच ठाण्याचे माजी महापौर आहेत. तर नागपूरच्या किरण पांडव यांच्याही नावाची चर्चा सुरू आहे. किरण पांडव हे विदर्भातील एकनाथ शिंदे यांचे मजबूत शिलेदार आहेत.

विधानपरिषदेतील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे सदस्य आमश्या पाडावी हे अक्कलकुवा मतदार संघातून विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून आले आहेत. त्यामुळे पाडवी यांची विधानपरिषदेतील जागा रिक्त झाली आहे. सव्वातीन वर्ष कार्यकाळ बाकी असलेल्या या जागेसाठी विधान परिषदेची निवडणूक होत आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी इच्छुक आहेत.

२५ वर्षांनंतर श्री संत तुकाराम महाराज पुरस्काराने सन्मानित “संतांच्या केसालाही धक्का लागू देणार नाही”- एकनाथ शिंदे

0

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना श्री संत तुकाराम महाराज पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या ३७५ व्या बीज सोहळ्यानिमित्त हा विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. यावेळी देहू संस्थान चे विश्वस्त उपस्थित होते. त्यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तुकाराम बीज निमित्त आज लाखो वारकरी देहूत दाखल झाले आहेत.

तुकोबांची पगडी, शाल, श्रीफळ, पुष्पहार, चिपळ्या, संत तुकाराम महाराज मूर्ती, संत गाथा आणि सन्मानपत्र प्रदान करण्यात आले. शिंदे यांनी पंढरपूर वारीदरम्यान वारकऱ्यांच्या सेवा- सुविधांसाठी घेतलेल्या विशेष प्रयत्नांची आणि ‘निर्मल वारी, हरित वारी’ संकल्पनेत दिलेल्या योगदानाची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे. त्यांनी पालखी सोहळ्यातील दिंड्यांना आर्थिक सहाय्य, स्वच्छता मोहिमा आणि इतर सेवा- सुविधांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. हा सन्मान २५ वर्षांपूर्वी माजी मुख्यमंत्री शरद पवार यांना देण्यात आला होता. आज जगद्गुरू तुकोबांचा ३७५ वा सदेह वैकुंठ गमन सोहळा आहे. दुपारी ठीक बारा वाजता कीर्तन झाल्यानंतर नांदूरकीच्या झाडावर वारकरी पुष्प अर्पण करताच हा सोहळा पार पडेल.

महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. शूर वीरांची भूमी आहे. महाराष्ट्रात संतांच्या केसालाही धक्का लागू देणार नाही. हा एकनाथ शिंदें चा शब्द आहे. धर्माचे रक्षण करणं जस आपलं कर्तव्य आहे. तसेच नद्या प्रदूषण मुक्त करण आपलं काम आहे. असं मत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केल आहे. ते देहू मध्ये बोलत होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देहू संस्थान कडून श्री संत तुकाराम महाराज पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. त्यानंतर ते वारकऱ्यांना संबोधित करत होते. यावेळी त्यांनी देहू संस्थान आणि वारकऱ्यांचे विशेष आभार मानले.

एकनाथ शिंदे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांना तुकोबांच मार्गदर्शन होत. आशीर्वाद होता. देहूच्या पवित्र भूमीत छत्रपती शिवाजी महाराज हे संत तुकोबांच्या भेटीला आले होते. पुढे ते म्हणाले, संत तुकोबांच्या रचना आपल्या जगण्यावर भाष्य करतात. ३७५ वर्षानंतर ही त्या काल बाह्य झालेल्या नाहीत. पुढील ३७५ वर्ष च नव्हे तर ३,३७५ वर्ष या रंचनांमधील मधील अर्थ लोप पावणार नाहीत. तुकोबांनी चारशे वर्षांपूर्वी क्लिष्ट अस तत्वज्ञान हे सोप्या मराठीत सांगितलं. हाच मराठीचा अभिजात दर्जा होता. अस मत त्यांनी व्यक्त केलं. तुकाराम महाराजांच्या शिकवणी प्रमाणे आम्ही शांततेने काम करत आहोत. मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात काय- काय केलं हे सर्वांना परिचित आहे. ते माझं कर्तव्य होत. वारकऱ्यांपेक्षा कुणी मोठं नाही.

वारकरी हा समाज प्रबोधनकार आहे. तुम्ही एकदा मनावर घेतल की काय होऊ शकतं, हे तीन महिन्यांपूर्वी पाहिलं आहे. पुढे ते म्हणाले, महाराष्ट्र ही संतांची, शूरवीरांची भूमी आहे. महाराष्ट्रात संतांच्या केसाला ही धक्का लागू देणार नाही. हा एकनाथ शिंदेंचा शब्द आहे. धर्माच रक्षण करण आपल्या सर्वांच कर्तव्य आहे. त्याच प्रमाणे इंद्रायणी, चंद्रभागा, गोदावरी या नद्यांची रक्षण करणं आपली जबाबदारी आहे. नद्यांची परिस्थिती बरी नाही. प्रदूषण मुक्तीची लोक चळवळ झाली पाहिजे. आदर्श नद्या बनल्या पाहिजेत. अस मत ही शिंदे यांनी व्यक्त केलं आहे..

राष्ट्रवादीचा ‘या’ तीन नेत्यांना आदेश भाजपकडून 20 जणांची यादी दिल्लीला; उद्या नावे जाहीर? सोमवारी अर्ज दाखलचा शेवटचा दिवस

0

राज्यातील विधान परिषदेच्या पाच रिक्त जागांसाठी 27 मार्च रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्यासाठीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यानुसार, उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाल्याने राजकीय पक्षांत वेगाने घडामोडी घडत आहेत. भाजपकडून विधान परिषदेच्या तीन जागासाठी 20 जणांची यादी दिल्लीला पाठवण्यात आली आहे.

दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वाट्याला आलेल्या एका जागेसाठी उद्या दुपारी अजित पवारांच्या उपस्थितीत देवगिरीवर बैठक होणार आहे. या बैठकीत एका नावावर शिक्कामोर्तब हॊणार आहे. दरम्यान, तीन नेत्यांना कागदपत्रे गोळा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यापैकी एकाचे नाव फायनल होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वाट्याला एकच जागा आली असल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार विधानपरिषदेवर कोणाला पाठवणार याची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधान परिषदेच्या उमेदवाराचे नाव रविवारी दुपारी जाहीर होण्याची शक्यता आहे.

राजेश विटेकर विधानसभेत गेल्याने राष्ट्रवादी काँग्रेसची एक जागा रिक्त आहे. या जागेसाठी कोअर कमिटीने निश्चित केलेल्या नावांपैकी काही नावांवर उद्या चर्चा होणार आहे. बैठकीनंतर उमेदवाराचं नाव जाहीर करण्यात येणार आहे. सध्या पक्षाकडून विधान परिषदेसाठी कागदपत्रे गोळा करण्याच्या सुचना झिशान सिद्धकी, संजय दौंड, उमेश पाटील यांना देण्यात आल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे या तिघांपैकी एकाला विधानपरिषदेवर संधी मिळणार आहे.

दरम्यान, प्रदेश भाजपकडून 20 जणांच्या नावाची यादी दोन दिवसापूर्वीच दिल्ली दरबारी पाठविण्यात आली आहे. त्यापैकी तीन नावाची घोषणा रविवारी होण्याची दाट शक्यता आहे. सोमवारी 17 मार्चला उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे रविवारी नावाची घोषणा दिल्लीतून केली जाणार आहे. त्यामुळे सर्व इच्छुकांचे या घोषणेकडे लक्ष लागले आहे.

महायुतीकडे इच्छुकांचा ओढा

सध्या विधानसभेतील पक्षीय बलाबल पाहता भाजपचे 132 आमदार निवडून आले. तर महायुतीचे एकत्रित 232आमदार निवडून आले आहेत. त्यामुळे महायुतीचेच उमेदवार सहज विजयी होतील, असा अंदाज आहे. त्यामुळेच महायुतीकडील भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्याकडे इच्छुकांचा ओढा अधिक आहे. त्यामुळे आता येत्या काळात या जागेवर कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

विधान परिषदेसाठी शहाजीबापूंचे एक पाऊल पुढे; फक्त यामुळं शहाजी बापूंना एकनाथ शिंदेंनी सकारात्मकता दाखविल्याचा शिष्टमंडळाचा दावा

0

विधान परिषदेच्या पाच रिक्त जागेवर संधी मिळावी, यासाठी सत्ताधारी भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील इच्छुकांकडून जोरदार लॉबिंग करण्यात येत आहे.पाच जागांपैकी तीन जागा ह्या भाजपच्या असून प्रत्येकी एक जागा ही शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आहे. या पाचही जागांसाठी इच्छुकांची मोठी संख्या सत्ताधाऱ्यांकडे आहे. शिवसेनेच्या एका जागेसाठी मोठी रस्सीखेच दिसून येत आहे. सोलापूरमधून माजी आमदार शहाजीबापू पाटील हेही इच्छूक आहेत, त्यांच्या समर्थकांनी उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन शहाजीबापू पाटील यांना संधी मिळावी, यासाठी साकडे घातले आहे.

भाजपचे गोपीचंद पडळकर, प्रवीण दटके आणि रमेश कराड, राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश विटेकर आणि शिवसेनेचे आमशा पाडवी हे विधान परिषदेचे आमदार विधानसभा निवडणुकीत जिंकले आहेत. त्यामुळे या पाच जणांच्या विधान परिषदेतील जागा रिक्त झाल्या आहेत. भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडून आता नेमकी कोणा कोणाला लॉटरी लागणार? याची उत्सुकता लागली आहे.

विधान परिषदेतील भाजपचे तीन, तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्येकी एकेक सदस्य विधानसभा निवडणुकीत जिंकले आहेत. त्यांच्या रिक्त जागांची निवडणूक आयोगाकडून नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. बिनविरोध निवडणूक न झाल्यास २७ मार्च रोजी मतदान होणार आहे. आमदारकी मिळावी, यासाठी इच्छुकांकडून जोरदार फिल्डिंग लावण्यात येत आहे, त्यामुळे रिक्त जागांवर कोणाची वर्णी लागणार, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून सोलापूर जिल्ह्यातून सांगोल्याचे माजी आमदार शहाजीबापू पाटील हेही विधान परिषदेसाठी इच्छूक आहेत. शिवसेनेकडून त्यांना तसा शब्दही दिल्याची चर्चा आहे. शहाजीबापू यांच्याकडून जोरदार फिल्डिंंग लावली आहे.

सोलापूर जिल्ह्यात शिवसेनेचा एकही आमदार नाही, त्यामुळे पक्षवाढीसाठी माजी आमदार पाटील यांना संधी दिली जावी, अशी मागणी त्यांच्या समर्थकांकडून होत आहे. मध्यंतरी त्यांनी स्वतः उपमुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली होती. त्यामुळे शहाजीबापूंनी विधान परिषदेसाठी जोरदार फिल्डिंग लावली आहे.

‘काय झाडी, काय डोंगार’फेम शहाजीबापू हे शिवसेनेचे स्टार प्रचारक होते. विधानसभेच्या निवडणुकीत शहाजीबापू पाटील यांना सांगोल्या व्यतिरिक्त इतरत्रही प्रचारासाठी पाठविले होते. त्यामुळे शहाजीबापू पाटील यांच्यासारखा वक्ता शिवसेनेसाठी उपयोगी ठरू शकतो, हे लक्षात घेऊन पाटील यांना विधान परिषदेवर संधी दिली जाईल, असे बोलले जात आहे.

माजी आमदार शहाजीबापू पाटील यांचे समर्थक असणाऱ्या शिष्टमंडळाने नुकतीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्या वेळी माजी आमदार पाटील यांना विधान परिषदेवर संधी मिळावी, असे साकडे शिंदे यांना समर्थकांनी घातले आहे, शिंदे यांनीही त्याबाबत सकारात्मकता दाखवली आहे, त्यामुळे एका जागेसाठी शिंदे नेमके कोणाला संधी देणार, याकडे सोलापूरसह इतर जिल्ह्यातील शिवसैनिकांचे लक्ष लागले आहे.

शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मोठी घोषणा; आता फोनवरुन ‘हॅलो’ नाही, तर जय शिवराय बोलायचं….

0

महाराष्ट्र विधानसभा निवडुणुकीतील निराशाजनक कामगिरीनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत. त्यांनी महायुती सरकार दंड थोपटतानाच निवडणुकीतील अपयशानंतर नैराश्याच्या गेलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना बूस्टर डोस दिला. याचदरम्यान,राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार,आमदार,पदाधिकारी, कार्यकर्त्यांसाठी मोठा आदेश दिला आहे.

सांगलीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा मेळावा शनिवारी (ता.15) पार पडला. यावेळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांमध्ये हुंकार भरला. याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पश्चिम महाराष्ट्र प्रभारी शशिकांत शिंदे यांनी यापुढे कोणालाही फोन लावला किंवा कोणाचा आला तर बोलण्याची सुरूवात ‘हॅलो’ऐवजी ‘जय शिवराय’नं करायची, अशी घोषणा केली. हा पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा आदेश असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.

शशिकांत शिंदे म्हणाले, महाराष्ट्रात एकीकडे सुजलाम सुफलाम करण्याबाबतच्या घोषणा केल्या जातात आणि दुसरीकडे मात्र धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. पुढील काळात पक्षाकडून तालुकास्तरावरही मेळावे घेतले जाणार आहे. जो कार्यकर्ता सक्षम आहे, त्याच्याकडे पक्षाची जबाबदारी देण्यात येईल. तसेच जो पक्षात येण्यास इच्छुक आहे, त्याला देखील जबाबदारी देण्याचा विचार करण्यात येणार असल्याचेही संकेत शिंदे यांनी यावेळी बोलून दाखवले.

सांगलीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा मेळावा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, हर्षवर्धन पाटील, शशिकांत शिंदे, रोहित पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला. या मेळाव्यात शशिकांत शिंदे यांनी आपली भूमिका मांडली. आपण निवडणुकीत सांगली जिल्ह्याचा बालेकिल्ला शाबूत ठेवला. परंतु,दुर्दैवाने सातारामधील बालेकिल्ला मात्र नेस्तनाबूत झाला असल्याची भावनाही व्यक्त केली.

तसेच गावा-गावांमध्ये ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज शेवटपर्यंत लढले,त्यांनी हार मानली नाही. त्यांच्यासोबत जे शेवटपर्यंत लढले ते इतिहासामध्ये अजरामर झाले. तसेच, तुम्ही देखील पक्षासोबत शेवटपर्यंत लढण्याचं आवाहनही शिंदेंनी कार्यकर्त्यांना केलं.

यावेळी बीडमधील सतीश भोसले उर्फ खोक्या,मंत्री माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेवरील कोर्टाच्या निरीक्षणावरही शशिकांत शिंदे बोलले. ते म्हणाले, बीडसारख्या घटना राजकीय पाठबळ असल्याशिवाय घडत नाहीत, खोके बोके कुणीही पुढे येत नाहीत.

कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंवर भाष्य करताना ते म्हणाले,मी न्यायालयाच्या विरोधात बोलत नाही. पण कोर्ट म्हणत असेल,खर्च वाढेल म्हणून निवडणुका परत नको आणि अशा पद्धतीने निकाल देत असतील तर राज्यात पुन्हा निवडणुका होतील की नाही,अशी शंकाही त्यांनी उपस्थित केली.

प्रदीप कुरूळकरनंतर आणखी एक अधिकारी पाकिस्तानी हनीट्रॅपमध्ये पुरवली गोपनीय माहिती…फेसबूकवर झाली ओळख

0

गेल्या वर्षी पुण्यातील संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे संचालक प्रदीप कुरुलकर यांनी हनीट्रॅपमध्ये अडकून पाकिस्तानी एजंटला गोपनीय माहिती पुरविल्याची घटना घडली होती. त्यानंतर आता आणखी एक अधिकारी हनीट्रॅपमध्ये अडकल्याचं पुढे आलं आहे.त्यामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, रविंद्र कुमार असं या अधिकाऱ्याचं नाव आहे. तो उत्तर प्रदेशच्या फिरोजाबादमधील ऑर्डिनन्स फॅक्ट्रीचा इंचार्ज असल्याची माहिती आहे. रविंद्र कुमारने ऑर्डिनन्स फॅट्रीशी संबंधित महत्त्वाची आणि गोपनीय कागदपत्रे पाकिस्तानी एजंटला पुरवली आहे. याप्रकरणी दहशतवाद विरोधी पथकाने त्याला गुरुवारी अटक केली असून त्याने गुन्ह्याची कबुलीही दिली आहे.

”गेल्या काही दिवसांपासून ऑर्डिनन्स फॅक्ट्रीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पैसे देऊन त्यांच्याकडून गोपनिय माहिती मिळवली जात असल्याची माहिती आम्हाला मिळाली होती. त्यानुसार आम्ही कारवाई केली असता रविंद्र कुमार यांनी पाकिस्तान एजंटला माहिती पुरवल्याचं आढळून आलं आहे. त्यामुळे त्याला आम्ही अटक केली आहे”, असं दहशतवाद विरोधी पथकाकडून सांगण्यात आलं आहे.

या अटकेनंतर रविंद्र कुमारला लखनऊ येथे आणण्यात आलं असून त्याची कसून चौकशी केली जाते आहे. या दरम्यान त्याच्या फोनमध्ये ऑर्डिनन्स फॅक्ट्रीशी संबंधित काही गोपनीय दस्तऐवज आढळून आली आहेत. याबाबत विचारलं असता त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरं दिली. मात्र, त्यानंतर त्याने गुन्हा कबूल केला आहे.

”मी २००९ पासून या ऑर्डिनन्स फॅक्ट्रीचा इंचार्ज म्हणून काम करतो आहे. जुलै २०२४ मध्ये फेसबूकवर माझी ओळख नेहा शर्मा या मुलीची झाली. आम्ही व्हॉट्सअॅपवर बोलायचो. यादरम्यान, मी ही कागदपत्रे तिला पाठवली”, असं त्याने त्याच्या कबुलीजबाबात म्हटलं आहे.

माणिकराव कोकाटेंच्या अडचणी वाढल्या, शिक्षा स्थगिती विरोधात हायकोर्टात याचिका १८ मार्च रोजी पहिली सुनावणी

0

कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. कोकाटे यांच्याविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी १८ मार्च रोजी उच्च न्यायालयामध्ये पहिली सुनावणी होणार आहे.माणिकराव कोकाटे यांच्याविरोधात सतीश वाणी या वकील तथा माजी न्यायाधीशांनी याचिका दाखल केली आहे.

सतीश वाणी यांनी माणिकराव कोकाटे यांच्याविरोधात याचिका दाखल केली. त्यांनी न्यायालयाने कोकाटेंच्या शिक्षेवर स्थगिती दिल्यावर आक्षेप घेत ही याचिका दाखल केली. त्यांनी सांगितले की, ‘वाईट लोकांची वाईट खेळी आहे. घाई गर्दीत कोकाटे यांचा निकाल दिला आहे. इतर लोकांना बाजू मांडू दिली नाही. सुनील केदार यांच्याबाबत फडके मॅडमने सांगितले होते. गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. एकीकडे खोटं सांगून सदनिका घेतात. दुसरीकडे ३० लाख वाटायला लागतात त्यासाठी बंदूक लायसन्स मागितले.’

सतीश वाणी यांनी पुढे सांगितले की, ‘कोकाटे यांना शिक्षा दिली आहे तर त्याला स्थगिती कशी दिली.’ असा सवाल सतीश वाणी यांनी उपस्थित केला आहे. ‘दंड तर भरलेला आहेच ना? कारवाई व्हायला पाहिजे होती. लिली थॉमसन यांच्याप्रमाणे राज्यपाल कारवाई करणार की नाही. मी स्वतः राज्यपाल यांच्याकडे पत्रव्यवहार करणार आहे. कोकाटे यांचे गोव्याला हॉटेल आहेत. ३० लाख महिन्याला वाटतात.’

तसचं, ‘आम्ही निकालाच्या विरोधात उच्च न्यायालयात गेलोय. चुकीचा निर्णय दिला आहे. न्यायालयाने दिलेल्या निकालाशी आम्ही सहमत नाही. सुनील केदार प्रकरणात २१ प्रकरणाचे निर्णय आहे. २ वर्षापेक्षा जास्त शिक्षा असेल त्यांना आमदारकीला उभं करू नये असे फाळके मॅडमने म्हटलं आहे. ज्यांनी निकाल दिला अशा न्यायाधीशाने समाजकार्य करावे. कशाला पगार घेऊन काम करतात. लोक स्टँडी नाही असे आम्हाला सांगितले होते.’, असं देखील त्यांनी सांगितले.

कसबा पेठेत एका म्यानात दोन तलवारी प्रवेश करताच धंगेकरांचा आमदार रासनेंवर प्रहार, थेट या मुद्यावरुन छेडले

0

गेल्या काही वर्षांपासून कसबा विधानसभा मतदार संघ चर्चेत आहेत. दोन वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीत ‘हु इज धंगेकर’ हा मुद्दा चर्चेत आला होता. भाजप नेते चंद्रकांत पाटील यांचे हे वाक्य काँग्रेसने निवडणूक प्रचाराचा मुद्दा बनवला होता. त्या पोटनिवडणुकीत भाजप उमदेवार हेमंत रासने यांचा पराभव करत रवींद्र धंगेकर निवडून आले होते. त्यानंतर पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. काँग्रेसमध्ये असलेले रवींद्र धंगेकर महायुतीमधील शिवसेनेत मागील आठवड्यात आले. भाजप आणि शिवसेना महायुतीत कसबा पेठेत एका म्यानात दोन तलवारी झाल्या. त्यामुळे रवींद्र धंगेकर यांनी थेट आमदार हेमंत रासने यांना लक्ष्य केले आहे.

महायुतीमधील वाद तीव्र

कसब्याचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी फ्लेक्सबाजी करत विद्यमान आमदार हेमंत रासने यांना अप्रत्यक्षपणे लक्ष्य केल्याचे पहायला मिळत आहे. कसबा विधानसभेतील नागरिकांना पाण्याचे मीटर बसल्यावरुन त्यांनी लक्ष्य केले आहे. रवींद्र धंगेकर यांनी फ्लेक्सबाजी करत आमदार हेमंत रासने यांना लक्ष्य केले आहे. यामुळे धंगेकर यांनी पक्षांतर केले असले तरी त्यांचे महायुतीच्या नेत्यांसोबत असलेले जुने वाद मिटण्याऐवजी तीव्र झाल्याचे चित्र समोर आले आहे.

काय आहे बॅनरवर

माझ्या कसबा विधानसभेतील नागरिकांना नियमित व उच्च दाबाने पाणीपुरवठा करणार, असे आश्वासन देऊन विधानसभा निवडणुकीत त्यांनी मते घेतली. आता प्रत्यक्षात मात्र घरोघरी पाण्याचे मीटर बसवून त्यांच्याकडून अन्यायकारक पाणीपट्टी वसूल करण्यात येत आहे. कसब्यातील सुज्ञ जनता त्यासोबत झालेली ही फसवणूक कधीही विसरणार नाही, असे रवींद्र धंगेकर यांनी बॅनरवर लिहिले आहे.

रवींद्र धंगेकर यांनी कसबा विधानसभा मतदार संघात या आशयाचे फ्लेक्स लावले आहे. ते आता महायुतीतील मित्र पक्षात आहे. मात्र विद्यमान आमदार हेमंत रासने यांना धंगेकर लक्ष करीत असल्याचे दिसून येते आहे. त्यामुळे पुण्यात महायुतीमधील तिन्ही पक्षात म्हणजे भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात वर्चस्वाची लढाई वाढणार आहे.

रवींद्र धंगेकर यांनी शिंदे यांच्या शिवसेनेचा भगवा हाती घेतला आहे. त्यानंतर त्यांचे महायुतीमधील घटकपक्ष भाजपसोबत मतभेद कायम असल्याचे संदेश जात आहे. आता हे वाद मिटतील का? याबाबत शंका उपस्थित होत आहे.