Home Blog Page 122

‘ठाकरेंच्या शिवसेनेला सत्तेत यायचंय पण…’, संजय राऊत यांच्या मनात हा जातीवाद: नामदार चंद्रकांत पाटलांचा गौप्यस्फोट

0

शिवसेना उबाठा खासदार संजय राऊत हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर सातत्याने टीका करत असतात. त्याबाबत भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सत्तेसोबत यायचंय. पण त्यांना कोणी घेत नाही. त्यामुळे अमित शाह यांच्यावर संजय राऊत वारंवार टीका करतात. आता शिवसेना उबाठा देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या मागे लागून आली नाही तर मुंबई महानगर पालिका निवडणुकीत त्यांना उमदेवार मिळणार नाही, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला. हे आपले विश्लेषण असल्याचे त्यांनी सांगितले.

चंद्रकांत पाटील म्हणाले, अमित शाह यांच्या दौऱ्याच स्वागत करायचे सोडून संजय राऊत टीका करतात. त्यांना कुणी प्रतिसाद देत नाहीत. अमित शाह यांचे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल 500 पानांचे पुस्तक येत आहे. ते वाचल्यावर राऊत यांना अमित शाह यांचा शिवाजी महाराज यांचाबद्दलचा अभ्यास समजेल. त्या पुस्तकाचे लवकरच प्रकाशन होईल, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

राऊत यांनी फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेबद्दल चंद्रकांत पाटील यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, संजय राऊत जे म्हणतील ते खरे आहे, असे म्हणण्यापेक्षा खोट आहे, असेच म्हणता येईल. राज्यातील 235 आमदारांनी देवेंद्रजींना मुख्यमंत्री केले. सर्वमान्य व्यक्तीमत्व महाराष्ट्रात मुख्यमंत्री आहे. आरक्षण नसतानाही सुविधा देण्याच्या योजना फडणवीस यांनी सुरु केली. दलित, मराठी, ओबीसी देवेंद्रजी विरोधात जाऊ शकत नाहीत. परंतु संजय राऊत यांच्या मनातील हा जातीवाद आहे. तो व्यवहारात येऊ शकणार नाही. राज्यात मराठे मुख्यमंत्री होते. त्यांनी मराठा समाजास आरक्षण दिले नाही, पण फडणवीसांनी दिले. ते कधी जातीवाद करत नाही, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

देवेंद्रजींनी 2014 ते 20 19 आरक्षणाची सुविधा दिली. त्यापूर्वी मराठा समाजास आरक्षण नसतानाही सुविधा दिल्या. वसतीगृह केली. भत्ता दिला. त्यांच्याविरुद्ध दलित, मराठा, ओबीसी जाऊ शकत नाही. ओबीसी मंत्रालय देवेंद्रजींनी सुरू केले. देवेंद्र फडणवीस विरुद्ध फुले आंबेडकर अशा प्रकारचा वाद संजय राऊत यांच्या मनात आहे. हा त्यांच्या मनामध्ये असलेला जातीवाद आहे, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

शिवसेना उबाठामधील आऊट गोईंगसंदर्भात बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, महापालिकेतील तुमचे लोक सोडून जात आहे. मुंबईत तुमचे 57 सिटींग नगरसेवक शिंदेंकडे गेले. पुण्यात 5 नगरसेवक भाजपत आले, त्यामुळे पक्षाकडे लक्ष द्या, असा सल्ला चंद्रकांत पाटील यांनी राऊत यांना दिला. महायुतीत खूप अलबेल आहे, सगळी माणस एकत्र काम करत आहेत, असे त्यांनी सांगितले.

दीनानाथ मंगेशकर रुग्णालय गरोदर महिला मृत्यूप्रकरणी महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलच मोठ पाऊल; उद्या पुढची दिशा निश्चित

0

पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर गरोदर महिला तनिषा भिसे यांच्या मृत्यूप्रकरणानंतर गंभीर आरोप केले जात आहेत. यातच डॉ. सुश्रुत घैसास यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांचा आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे. कारण आता महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडून घैसास यांना नोटीस बजावण्यात आली आहे.

महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलनं तनिषा भिसे यांच्या मृत्यूप्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. त्याच पार्श्वभूमीवर डॉ. घैसास तसेच पीडित भिसे कुटुंबीय यांना मेडिकल कौन्सिलच्या मुंबई येथील कार्यालयात सुनावणीसाठी बोलावले जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच महत्वाची बाब म्हणजे महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलने पाठवलेल्या नोटीसला दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमधील तत्कालीन डॉ. सुश्रुत पैसास यांना सोमवारी (ता.14) संध्याकाळपर्यंत लेखी उत्तर देण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर या उत्तरानंतर महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल डॉ. घैसास तसेच पीडित कुटुंबीय यांना चौकशी होणार असल्याची माहिती आहे.

महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे प्रशासक डॉ. विंकी रुथवाणी यांनी या नोटिसबाबत माहिती दिली आहे. ते म्हणाले, राज्य महिला आयोगानं दिलेल्या आलेल्या सूचनांनंतर व पीडित भिसे कुटुंबीयांच्या तक्रारीनंतरच डॉ. पैसास यांना नोटीस बजावत त्यांना खुलासा मागितला आहे. यामुळे घैसास यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

पुण्यातील तनिषा भिसे यांच्या मृत्यू प्रकरणामध्ये आतापर्यंत सरकारला दोन अहवाल प्राप्त झाले आहेत. या अहवालानंतर देखील अद्याप सरकारकडून कोणतीही कारवाई दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनावर करण्यात आली नसल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. अशातच महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी याबाबत खुलासा केला आहे.

चाकणकर म्हणाल्या, जे दोषी असतील त्यांच्यावर निश्चित कारवाई केली जाणार आहे. पुण्यातील तनिषा भिसे हिच्या मृत्यू प्रकरणी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर आरोप केले जात आहे. या प्रकरणात दोन अहवाला प्राप्त झाल असून मंगळवारी (ता. 15) ससून रुग्णालयाच्या उच्चस्तरीय समितीचा अहवाल प्राप्त होणार आहे. उद्या सायंकाळी 5 वाजता हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढची दिशा निश्चित होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.

घरामध्ये एका रक्ताची चार माणसं तिथेही भांड्याला भांडं; ‘सरकारमध्ये तर वेगवेगळ्या पार्श्वभूमीचे..’; चंद्रकांत पाटील

0

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे महाराष्ट्र दौऱ्यावर असताना महायुतीतील धुसपुस समोर आल्याचे बोलले जात आहे. अमित शाह यांच्याकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अर्थ खात्याची जबाबदारी असलेल्या अजित पवारांची तक्रार केल्याचं सांगितलं जात आहे. याबाबत बोलताना भाजप नेते आणि कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांनी खळखळ आहे. आणि याचा अर्थ ते जिवंत आहेत असं म्हणत अप्रत्यक्षरित्या महायुतीमध्ये धुसफूस असल्याचं मान्य केल्याचं बोललं जात आहे.

माध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी विविध राजकीय घडामोडींवर भाष्य केलं. एकनाथ शिंदे यांनी अर्थ खात्याची तक्रार अमित शाह यांच्याकडे केली असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे. याबाबत बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, माध्यमांना स्टोरिज तयार करायचे असतात आणि त्यामुळेच अशा गोष्टी समोर येतात. मात्र यामध्ये कोणतेही तथ्य नाही. महायुतीमध्ये सारं काही अलबेल आहे. सर्व गोष्टी समन्वयाने सुरू आहेत.

एका रक्ताची चार माणसं घरामध्ये असतात तिथेही भांड्याला भांडं लागतं. सरकारमध्ये तर वेगवेगळ्या पार्श्वभूमीचे लोक आहेत. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा यांची पार्श्वभूमी वेगवेगळी आहे. आणि अशा वेगवेगळ्या पार्श्वभूमीचे लोक जेव्हा एकत्र येतात. अशा परिस्थितीत खळखळ नाही झाली तर माणसं हलवून पहावी लागतील की जिवंत आहेत की गेली आहेत. खळखळ आहे याचा अर्थ ते जिवंत आहेत. खळखळ आहे याचा अर्थ ते व्यक्त होत आहेत. त्यामुळे खळखळ व्यक्त करायची असते जर ती व्यक्त केली नाही तर माणसं आजारी पडतात असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

मुख्यमंत्री राज्यातील सामाजिक विषयांवर बोलत नाहीत अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. यावर चंद्रकांत पाटील म्हणाले, विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला 137 जागा मिळाल्या असून महायुती म्हणून 235 आमदारांनी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री म्हणून निवडला आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचं सर्वमान्य नेतृत्व सध्या महाराष्ट्रात आहे.

2014 ते 2019 दरम्यान ते मुख्यमंत्री असताना त्यांनी आरक्षण आणि सुविधा या एकमेकात अडकल्या होत्या त्या वेगळ्या केल्या. आरक्षण नसेल तरीदेखील सुविधा त्यांनी दिल्या तसेच नंतर, मराठा समाजाला आरक्षण ही दिलं आणि ते हायकोर्टात टिकून दाखवलं. त्यामुळे बहुजन समाज त्यांच्या विरोधात जाऊ शकत नाही. संजय राऊत यांच्या मनात फक्त देवेंद्र फडणवीस विरुद्ध फुले, आंबेडकर वाद आहे.

मराठा नेते हे राज्याचे मुख्यमंत्री होते. मात्र त्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही मात्र ते आरक्षण देवेंद्र फडणवीस यांनी मिळवून दिलं. त्यामुळे बहुजन समाज देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात रस्त्यावर उतरेल हे जे राऊत यांच्या मनात आहे. ते कधीच पूर्ण होणार नाही असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

अखेर भाजप- काँग्रेसची युती झालीच; पश्चिम महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्याने इतिहासच रचला

0

बाजार समितीच्या निवडणुकीसाठी भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली भाजप-काँग्रेस नेत्यांचे एकत्रित पॅनल करण्यात आलाय. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट आलाय. काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने, काँग्रेस कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे, काँग्रेस नेते बाळासाहेब शेळके यांचा भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वाखालील पॅनलला पाठिंबा असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे.

भाजपचे आमदार सुभाष देशमुख आणि आमदार विजयकुमार देशमुख यांना देखील सोबत येण्याचे आवाहन आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी केलं आहे. पण माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख हे पुन्हा एकदा स्वतंत्र लढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मागच्या निवडणुकीच्या वेळेस ही तत्कालीन पालकमंत्री भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पॅनलला काँग्रेस नेते दिलीप माने यांनी दिला पाठिंबा होता. तर आमदार सुभाष देशमुख हे विरोधी पॅनलमध्ये निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते.

सचिन कल्याण शेट्टी काय काय म्हणाले?

‘आम्ही मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वखाली ही निवडणूक लढवतोय, यामध्ये कोणत्याही पक्षीय राजकारणचा विषय नाही’ दोन्ही देशमुख हे आमचे नेते आहेत त्यांना देखील सोबत येण्याचे आवाहन आम्ही केले आहे. पण इतक्या लोकांनी अर्ज दाखल केले आहे त्यामुळे निवडणूक बिनविरोध होणे कठीण आहे पण आम्ही त्या दृष्टीने प्रयत्न करतोय”, असं भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी म्हणाले आहेत.

काँग्रेस नेते दिलीप माने यांची प्रतिक्रिया

मुख्यमंत्र्यांनी सचिनदादांना सूचना केल्या होत्या त्यांनी आम्हाला आवाहन केलं त्या आम्हाला मान्य आहे. त्यामुळे आम्ही एकत्रित येऊन लढण्याचा निर्णय केलाय. बाजार समितीचे हित हेच आमचे लक्ष्य आहे. सहकारच्या बाबतीत मी स्वतंत्र निर्णय घेत असतो, मी स्वयंभू आहे, असं काँग्रेस नेते दिलीप माने यांनी स्पष्ट केलंय..

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट

बाजार समितीच्या निवडणुकीसाठी भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली भाजप-काँग्रेस नेत्यांचे एकत्रित पॅनल

काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने, काँग्रेस कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे, काँग्रेस नेते बाळासाहेब शेळके यांचा सचिन कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वाखालील पॅनलला पाठिंबा

भाजपचे आमदार सुभाष देशमुख आणि आमदार विजयकुमार देशमुख यांना देखील सोबत येण्याचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे आवाहन

अनधिकृत बांधकाम पाडण्याची नोटीस पुण्यात सोसायटीत राडा; महिलांना केस ओढत मारहाण व्हिडिओ आता समोर

0

अनधिकृत बांधकाम काढायला सांगितल्याच्या रागातून पुण्यातील सोसायटीत जोरदार राडा झाल्याचे समोर आले आहे. दोन जणांनी सोसायटीतील सभासदांना मारहाण केली असून आरोपीकडून महिला सदस्यांचे केस ओढत मारहाण झाल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. आरोपीने महिलांना शिवीगाळ करत हाणामारी केल्याचे समोर आल्याने परिसरात मोठा गोंधळ झाला. धायरी भागातील सोसायटीमध्ये ही घटना घडली आहे. याप्रकरणी अनिल भीमरावजी दरोली यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून मल्लिका समीर पायगुडे गाजरे आणि समीर मनोहर पायगुडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा सगळा प्रकार 11 एप्रिल रोजी सकाळी साडेअकरा वाजता घडला.

नक्की घडले काय?

मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी पुण्यातील सिंहगड रोड भागात असलेल्या धायरी येथील रिद्धी सिद्धी पॅरडाइज या सोसायटीत गेल्या बारा वर्षांपासून राहत असून ते सोसायटीच्या सेक्रेटरीचेही काम बघतात. सोसायटीमधील एका फ्लॅटधारकाने सोसायटीतील पार्किंगमध्ये 15-20 दिवसांपूर्वी पत्रा लावून फॅब्रिकेशनचे काम सुरू केले होते. हा फ्लॅट आरोपींना राहण्यासाठी घरमालकाने दिला होता. मात्र हे बांधकाम अनधिकृत असल्याचे सांगत सोसायटीने त्या फ्लॅट धारकाला बांधकाम काढून टाकावे अशी नोटीस पाठवली. नोटीस बजावल्यानंतरही बांधकाम न काढल्यामुळे सोसायटीने 13 एप्रिल रोजी सोसायटी सभासदांची पार्किंग मध्ये मीटिंग आयोजित करून सर्वांच्या संमतीने अनधिकृत बांधकाम काढून टाकण्याचे ठरवले.

बांधकाम काढण्याबाबत सोसायटीने पोलिसांना कळविल्यानंतर त्यांनी सुद्धा या जागेची पाहणी केली. बांधकाम काढण्यापूर्वी यातील आरोपी मल्लिका पायगुडे गाजरे यांनी आरडाओरड करायला सुरुवात केली आणि सोसायटीतील इतर महिलांना शिवीगाळ केली. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. तुम्ही आमच्या ऐकत नाही काय थांबा तुम्हाला दाखवतो असे म्हणत समीर पायगुडे हातातील लोखंडी रोड घेऊन फिर्यादी अनिल दरोली यांच्यावर धावून गेले. इतकेच नाही तर त्याने जमलेल्या महिला सभासदांचे केस सोडले आणि इतरांना मारहाणही केली. आरोपी मल्लिका पायगुडे गाजरे या महिलेने सुद्धा महिलांना शिवीगाळ करत मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ आता समोर आला आहे. त्यानुसार सिंहगड रोड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 74, 118(1), 333, 352, 351(2), 351(3), 324(2) आणि 281नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तुझी ही जागा नाहीय…,मैदानात जसप्रीत बुमराह भिडला; सामना संपताच करुण नायर म्हणाला…

0

आयपीएल 2025 च्या हंगामात काल (13 एप्रिल) मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना खेळवण्यात आला. या सामन्यात मुंबईने रोमांचक विजय मिळवताना दिल्लीचा 12 धावांनी पराभव केला. या शानदार कामगिरीसह मुंबईने आपला दुसरा विजय नोंदवला. तसेच, दिल्लीचा हा यंदाच्या सत्रातील पहिला पराभवही ठरला. विशेष म्हणजे, पहिल्या डावात 200 हून अधिक धावा काढल्यानंतर अपराजित राहण्याची कामगिरी मुंबईने कायम राखली. मुंबईने 20 षटकांत 5 बाद 205 धावा उभारल्यानंतर दिल्लीला 19 षटकांत 193 धावांत गुंडाळले. तीन फलंदाजांना बाद करणारा कर्ण शर्मा सामनावीर ठरला. मुंबई आणि दिल्लीच्या सामन्यात जसप्रीत बुमराह आणि करुण नायर यांच्यात वाद पाहायला मिळाला. यादरम्यानचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

करुण नायरने 40 चेंडूत 89 धावांची शानदार खेळी केली. जसप्रीत बुमराहच्या षटाकात करुण नायरने 18 धावाही केल्या. तसेच बुमराहच्या षटकात करुण नायरने अर्धशतक पूर्ण केले. याचदरम्यान षटक संपल्यानंतर करुण नायर आणि बुमराहमध्ये वाद झाला. दुसरी धाव घेण्यासाठी धावत असताना करुण नायर गोलंदाजी करत असलेल्या जसप्रीत बुमराहला आदळला. यानंतर ड्रिंक्स ब्रेकदरम्यान तु ज्या ठिकाणाहून धावतोय, ती माझी जागा आहे (तो स्पेस गोलंदाचा आहे) असं जसप्रीत बुमराह करुण नायरला म्हणाला. यानंतर करुण नायरही बुमराहला काहीतरी बोलताना दिसला. त्यानंतर करुण नायर हार्दिक पांड्याकडे गेला आणि त्याला काहीतरी समजावू लागला. यानंतर हार्दिकने करुण नायरचं ऐकून घेतल्याचं पाहायला मिळालं.

सामना संपताच करुण नायर म्हणाला…

सामना संपल्यानंतर करुण नायर म्हणाला की, माझ्या खेळीबद्दल बोलण्यात काही अर्थ नाही, कारण मी चांगला खेळलो, पण संघासाठी शेवटपर्यंत फलंदाजी करु शकलो नाही, त्यामुळे मी खूप निराश आहे. आम्ही सामना जिंकण्यासाठी खेळतो. त्यामुळे पराभवानंतर निराश व्हायला होतं आणि आपण कितीही धावा केल्या तरी, जर संघ जिंकला नाही तर त्याला काही अर्थ नाही. माझ्यासाठी संघाचा विजय खूप महत्त्वाचा होता आणि तो होऊ शकला नाही. पण हा एक धडा आहे आणि आपण पुढे जाऊ आणि मला आशा आहे की मी अशीच कामगिरी करत राहीन आणि आम्ही जिंकू, असं करुण नायर म्हणाला. करुण नायरला जसप्रीत बुमराहबद्दल विचारताच जसप्रीत बुमराह सध्या जगातील सर्वोत्तम गोलंदाज आहे, असं म्हणत करुण नायरने कौतुक केलं.

सलमानचा बॉडीगार्ड शेराला आला राग; पापाराझींना पाहताच चिडला तर नेटकरी म्हणाले, ‘अप्रेझलची वेळ…’

0

बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या लोकप्रियतेविषयी काय सांगायचं. त्याच्यासोबत जर कोणाची चर्चा होते ती म्हणजे त्याचा बॉडीगार्ड शेराची. शेरा सलमानसोबत त्याच्या सावलीसारखा राहतो. आता सोशल मीडियावर सलमान खानच्या बॉडीगार्डचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये शेरा पापाराझींवर संतापल्याचे दिसत आहे. शेराचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यावर मजेशीर कमेंटस येत आहेत. तर एका नेटकऱ्यानं थेट कमेंट करत ‘अप्रेजलचा काळ आहेना.’

शेराचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सलमान खान कोणत्या बिल्डिंगमधून बाहेर पडताना दिसत आहे. सलमान खानच्या पुढे शेरा चालतोय. तो पापाराझींवर ओरडताना दिसत आहे. तो पॅप्सला फोटो आणि व्हिडीओ घेण्यापासून थांबवताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये तो ओरडताना दिसतोय. तो बोलतोय, ‘कोणी नको पाहिजे, सगळ्यांनी तिथे जा. सगळ्यांनी तिथे जा.’ व्हिडीओमध्ये एका ठिकाणी शेरा पॅप्सच्या दिशेनं पुढे जाताना दिसत आहे आणि बोलतोय की ‘ओए, बस कर आता.’ शेरा पापाराझींना ओरडत होता पण सलमान देखील यावेळी काही बोलला नाही. तो आला आणि गंभीर चेहरा करत गाडीत बसला.

शेराच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. एका नेटकऱ्यानं लिहिलं आहे की ‘हा अप्रेजलचा काळ आहे.’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘सलमान खानसमोर कोणी बोलू शकतं का? हा सलमान खान.’ तिसरा नेटकरी म्हणाला, ‘असं वाटतंय की सिकंदरमुळे शेराचा आता पासून पगार कमी झाला आहे.’

दरम्यान, सलमान खानचा सिकंदर हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाची चाहत्यांना बऱ्याच काळापासून प्रतीक्षा होती. खरंतर, सलमानचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही चांगली कमाई करू शकला नाही. चित्रपटानं सलमान खानसोबत रश्मिका मंदाना देखील दिसली होती. तर त्याच्या आगामी चित्रपटांविषयी बोलायचं झालं तर तो लवकरच सलमान खानच्या ‘टाइगर वर्सेस पठान’ आणि ‘किक 2’ या चित्रपटामध्ये दिसणार आहे. सलमान आणि शाहरुखच्या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेनं प्रतीक्षा करत असतात.

‘तारक मेहता..’मधील कलाकारांच्या आरोपांवर अखेर निर्मात्यांनी सोडलं मौन; म्हणाले “मी त्यांना माफ..”

0

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय मालिका आहे. गेल्या 17 वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करतेय. लोकप्रियतेसोबत ‘तारक मेहता..’ ही मालिका काही वादांमुळेही चर्चेत राहिली. यातील काही कलाकारांनी निर्माते असित कुमार मोदी यांच्यावर गंभीर आरोप केले होते. मिसेस सोढीची भूमिका साकारलेली अभिनेत्री जेनिफर मिस्त्रीने त्यांच्यावर गैरवर्तणुकीचे आरोप केले होते. तर तारक मेहताची भूमिका साकारलेले अभिनेते शैलेश लोढा यांनी पैसे थकवल्याचा आरोप केला होता. या सर्व आरोपांवर आता निर्मात्यांनी मौन सोडलं आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

‘इंडियन एक्स्प्रेस’च्या ‘स्क्रीन’ला दिलेल्या मुलाखतीत मोदी म्हणाले, “मी कलाकारांपासून कधी दुरावलो नव्हतो. जर एखादी समस्या असेल तर ते नेहमीच मला संपर्क करू शकत होते. मी नेहमीच प्रामाणिकपणे वागलो आणि मालिकेला प्राधान्य दिलं. त्यातून मी कधीच वैयक्तिक फायद्याचा विचार केला नाही. त्यामुळे अशा आरोपांमुळे मी नाराज झालो होतो. परंतु हा आयुष्याचा एक भागच आहे.”

“मालिका सोडून गेल्यानंतर काही कलाकार माझ्याविषयी बरंवाईट बोलत आहेत. ठीक आहे. मी त्यांना काहीच बोलणार नाही. त्यांनी माझ्या मालिकेत काम केलंय आणि ‘तारक मेहता..’च्या यशात त्यांची भूमिका आहे. जरी मी मालिकेचा कर्ताधर्ता असलो तरी प्रत्येकाच्या प्रयत्नांमुळे ती लोकप्रिय झाली. आज ही मालिका ज्या यशाच्या शिखरावर आहे, ते फक्त माझ्या वैयक्तिक प्रयत्नांमुळे नाही तर सर्वांमुळे आहे. आम्ही सर्वजण जणू एखाद्या ट्रेनसारखे आहोत. काही डब्बे रुळावरून घसरतात, परंतु तरीही ट्रेन चालत राहते. मलाही वाईट वाटतं पण मी त्यांना माफ करतो. कारण जर मी माझ्या मनात हेवेदावे घेऊन बसलो तर मी कधीच खुश राहू शकणार नाही आणि कधीच लोकांना हसवू शकणार नाही”, असं ते पुढे म्हणाले.

‘तारक मेहता..’च्या यशाबद्दल असित कुमार मोदी म्हणाले, “जेव्हा एखादी मालिका लोकप्रिय होते, तेव्हा ते संपूर्ण टीमच्या मेहनतीचं फळ असतं. त्या सर्वांनी खूप मेहनत घेतली आहे. त्यांना कोणतीही समस्या होणार नाही याची काळजी मी घेईन. मी त्यांना एकत्रित ठेवण्यावर लक्ष केंद्रीत करतो आणि जर ते त्यांच्या कामाशी प्रामाणिक राहिले तर इतक्या समस्या निर्माण होणारच नाहीत.”

देशातील राष्ट्रपुरुषांना हृदयात साठवून त्यांचा स्वाभिमान जपणारा बौद्ध समाजच – विनोद मोरे

0

मुंबई दि. १२ (रामदास धो. गमरे) “महात्मा ज्योतिबा फुले यांचे वडील गोविंदराव शेरीबा फुले तत्कालीन टाटा बिर्ला यांपेक्षाही श्रीमंत उद्योगपती होते परंतु पुण्याच्या ब्राम्हणांचे म्हणणे होत की जरी तुम्ही तालेवार श्रीमंत असला तरी तुम्ही शूद्र आहात त्यामुळे तुम्हाला शिक्षणाचा अधिकार नाही म्हणून तुमच्या मुलाला शाळेतून काढून त्याचे शिक्षण बंद करा असे कारण शूद्र शिकला तर धर्मशास्त्रानुसार मोठा अनर्थ घडेल असा कांगावा करत त्यांच्यावर पुणेरी ब्राम्हणांनी दबाव आणला व त्यामुळेच ज्योतिबा फुलेंच शालेय शिक्षण बंद झालं परंतु बेग मुन्शी मुस्लिम बांधवाने व लिजीटसाहेब या मिशनरी ने ज्योतिबांना मिशनरी शाळेत प्रवेश मिळवून दिला त्यामुळेच ज्योतिबांना शिक्षण पूर्ण करण्यास मदत झाली, शिक्षणामुळे त्यांच्यात आमूलाग्र बदल होऊन शिक्षणाचे महत्त्व त्यांना उमवले म्हणूनच एकेदिवशी ते त्यांच्या पत्नी माता सावित्रीबाईंना म्हणाले की समाजातील अनिष्ठ रूढीपरंपरा बदलायच्या असतील गुलाम, शेतकरी, कामगार, मागासवर्गीय आणि स्त्रियांना गुलामीच्या जोखडातून मुक्त करायचे असेल तर शिक्षणाची कास धरली पाहिजे परंतु देश सुधारायचा असेल तर आधी गाव सुधारल पाहिजे आणि गाव सुधारायच्या आधी घर सुधारायला पाहिजे आणि घर हे फक्त त्या घरातील स्त्री सुधारू शकते म्हणून तळागाळातील, शूद्र, मागासवर्गीय, गुलामांना शिकवायच असेल तर आधी घरातील स्त्री शिकली पाहिजे पण पहिली स्त्री शिकणार कोण असा प्रश्न सावित्रीमाईंनी उपस्थित करताच तूच असे उत्तर देत अशिक्षित असणाऱ्या सावित्रीबाईंना महात्मा फुलेंनी शिकवलं आणि १ जानेवारी १८४८ साली भिडेवाड्यात पहिली मुलींची शाळा सुरू केली त्या शाळेच्या प्रथम प्राध्यापिका म्हणून सावित्रीबाईंनी घोडदौड सांभाळली आणि खऱ्या अर्थाने महिला शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली त्याला कळस चढवायच काम डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलं, ज्योतिबा व सावित्रीबाईंच्या अथक परिश्रम व त्यागामुळे स्त्री बंधनमुक्त होऊन पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून पुढे गेली त्यामुळेच इंदिरा गांधी, सरोजिनी नायडू, पी. टी. उषा, सुनीता विल्यम्स आदी महिला देशोविदेशात आपल्या कर्तृत्वाचा झेंडा फडकवीत आहेत. महात्मा फुलेंनी आपल्या जीवनकाळात हिंदू धर्मातील अनेक अनिष्ट चालीरीतीनां अक्षरशः सुरुंग लावला सतीप्रथा, विधवांचे केशोवपन, जुलमी सावकारी कायदे बंद पडले, विधवांचे पुनर्विवाह लावून दिले, आत्महत्या करायला निघालेल्या एका विधवेच्या मुलाला महात्मा फुले व सावित्रीबाई फुलेंनी दत्तक घेऊन त्याला यशवंत फुले ही ओळख दिली त्याला शिकवून डॉक्टर बनवलं अशी अनेक सामाजिक कार्य पार पाडत त्यांनी सामाजिक परिवर्तनाची चळवळ त्यांनी उभी केली त्यांच्या पश्चात त्यांचा वारसा सवित्रीमाईंनी व यशवंत फुले यांनी समर्थपणे पुढे नेला, महात्मा फुलेंचे कार्य हे शब्दात सांगता येईल इतके नसून ते सागराएवढे अफाट आहे परंतु जातीवादी मनुवाद्यांनी महान समाजसुधारक, महापुरुषांना जाणूनबुजून कमीपणा देत लोकांची दिशाभूल केली आहे, महाराष्ट्राच्या भूमीत अनेक महापुरुष होऊन गेले, त्यांची गुरू शिष्य परंपरा ही आहे, अण्णाभाऊंनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना गुरू मानलं तर बाबासाहेब आंबेडकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांना गुरू मानलं, शिवाजी महाराजांनी संत तुकारामांना गुरू मानलं तर तुकारामांनी तथागत गौतम बुद्धांना गुरू मानलं ही गुरू शिष्यांची परंपरा जपण्याच आणि देशातील राष्ट्रपुरुषांना हृदयात साठवण्याच आणि त्यांचा स्वाभिमान जपण्याच कार्य कोणता समाज असेल तर तो बौद्ध समाज आहे” असे प्रतिपादन महात्मा फुलेंच्या १९८ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात अध्यक्षीय भाषणात बोलत असताना विनोद मोरे यांनी केले.

बौद्धजन पंचायत समिती आणि संस्कार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या १९८ जयंती महोत्सव डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह, परेल, मुंबई – १२ येथे उपसभापती विनोद मोरे यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाली.

सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्कार समितीचे अध्यक्ष मंगेश पवार (गुरुजी) यांनी अत्यंत लाघवी आणि प्रभावीपणे केले तर सरचिटणीस राजेश घाडगे यांनी प्रास्ताविक सादर करीत असताना महात्मा ज्योतिबा फुले यांचा जीवनपटावर प्रकाशझोत टाकत त्यांच्या कामाचा आढावा घेतला. कार्याध्यक्ष लक्ष्मण भगत, उपकार्याध्यक्ष एच. आर. पवार, मनोहर सखाराम मोरे आदी मान्यवरांनीही आपले विचार व्यक्त केले. सदर कार्यक्रमास कोषाध्यक्ष नागसेन गमरे, शिवडी विभागाचे गटप्रमुख राजाभाऊ तथा रामदास धो. गमरे, चिटणीस श्रीधर जाधव, विश्वस्त अनिरुद्ध जाधव, मध्यवर्ती कार्यकारिणी मंडळ, बौद्धाचार्य, महिला मंडळ, सभासद, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल संस्कार समितीचे अध्यक्ष मंगेश पवार यांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित लकी ड्रॉ कूपनचे अनावरण आनंदराज आंबेडकर यांच्या शुभहस्ते संपन्न

0

मुंबई दि. ११ (रामदास धो. गमरे) अक्षरा सामाजिक प्रतिष्ठान (रजि.) च्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १३४ व्या जयंती पर्वाचे औचित्य साधून विनामूल्य लकी ड्रॉ चे आयोजन करण्यात आले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त १३४ स्पर्धकांना अक्षरा सामाजिक प्रतिष्ठान (रजि.) च्या वतीने भरघोस बक्षिसे देण्यात येणार आहेत, सदर लकी ड्रॉ च्या लकी कुपनचे अनावरण महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू इंदू मिलचे प्रणेते, बौद्धजन पंचायत समितीचे सभापती, सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

सदर प्रसंगी बौद्धजन पंचायत समितीचे कार्याध्यक्ष लक्ष्मण भगत, विभागीय कार्यकारणी पदाधिकारी संतोष दामाजी जाधव, प्रवीण तांबे (गुरुजी), राजू धोत्रे, हरिष मोरे, अक्षरा सामाजिक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अमोल वंजारे, सरचिटणीस संदीप मोहिते, प्रज्वल सकपाळ, प्रणित वीर, सौरभ मोहिते आदी उपस्थित होते.

सदर लकी ड्रॉ मध्ये

प्रथम बक्षीस २ व्यक्तींसाठी वर्षातून ३ वेळा L D रिसोर्टची सहल, द्वितीय बक्षीस २ व्यक्तींसाठी वर्षातून २ वेळा L D रिसोर्टची सहल, तृतीय बक्षीस २ व्यक्तींसाठी वर्षातून १ वेळा L D रिसोर्टची सहल व इतर १३१ आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहे. सदर विनामूल्य लकी ड्रॉ चे लकी कूपन दि. ११ एप्रिल ते १९ एप्रिल २०२५ पर्यंत अक्षरा सामाजिक प्रतिष्ठान, मुंबई जिल्हा कार्यालय, सावित्रीबाई फुले वसाहत भोईवाडा, बेस्ट कर्मचारी वसाहत शेजारी येथे उपलब्ध होतील व या लकी ड्रॉ ची सोडत मंगळवार दि. २२ एप्रिल २०२५ रोजी रात्रौ ८:०० वाजता होईल, तरी जास्तीत जास्त लोकांनी या लकी ड्रॉ मध्ये सहभागी होऊन बक्षिसे जिंकण्याचा लाभ घ्यावा असे आवाहन अक्षरा सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.