Home Blog Page 123

निधी वादावर ‘एकनाथ शिंदे एक दिवस अजितदादांना थेट कॅबिनेटमध्येच जाब…’ भाजप नेत्याचे खळबळजनक विधान

0

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आक्रमक नेते आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तक्रार करतील, असं वाटत नाही. मात्र, ज्या दिवशी त्यांना वाटेल, त्या दिवशी ते कॅबिनेटच्या बैठकीत थेट अजितदादांनाच जाब विचारतील, असे माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी एकनाथ शिंदेंनी अजितदादांची अमित शाह यांच्याकडे तक्रार केल्याच्या चर्चेवर स्पष्ट केले.विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी सुधीर मुनगंटीवार रविवारी (ता. 13 एप्रिल) हे पंढरपुरात आले होते. दर्शनानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिंदे-पवार यांच्यात निधी वाटपावरुन सुरु असलेल्या वादावर भाष्य केले. ते म्हणाले, देश आणि राष्ट्रहिताला प्राधान्य देणारा भाजप हा पक्ष आहे. देशात आणि राज्यात याच भाजपची सत्ता आहे. राष्ट्रवादीचे अजितदादा पवारही देशहितासाठीच भाजपसोबत सत्तेत सहभागी झाले आहेत.

एकनाथ शिंदे यांनी अजित पवार यांची अमित शाह यांच्याकडे तक्रार केल्याच्या चर्चेवरही सुधीर मुनगंटीवार यांनी भाष्य केले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे एकनाथ शिंदे यांनी कोणतीही तक्रार केली नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले. शिंदे हे आक्रमक नेते असून ते तक्रार करण्यासाठी अशा पद्धतीचा वापर करणार नाहीत. त्यांना वाटत असेल तर तेच एक दिवस कॅबिनेट बैठकीत अजित पवार यांनाच जाब विचारतील, असेही मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.

राज्यात तीन पक्षांचे महायुती सरकार आहे. या सरकारमध्ये काही आलबेल असू नये, असे प्रयत्न काही लोक करतात. पण, भाजप हा देश आणि राष्ट्रहिताला प्राधान्य देणारा पक्ष आहे. त्या राष्ट्रहिताच्या विचारातूनच अजित पवारही भाजपसोबत आलेले असावेत, असे मुनगंटीवार यांनी सांगितले.

माझ्याविरोधात काहींचे षडयंत्र

माझ्याविरोधात काहीजण षडयंत्र रचत आहेत, असे मी नाशिकमध्ये विनोदाने बोललो होतो. पण तसं काहीतरी करण्याचे काही लोक मुद्दाम ठरवत आहेत, असं आता वाटू लागलं आहे. त्या माध्यमातून काही तरी विपरीत घडवून आणायचं, असंही काही लोकांनी ठरवलं आहे, असं दिसतंय. शिवाय, मला मंत्रीपद मिळाले नाही म्हणून मी नाराज नाही. असेही मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.

नमामि चंद्रभागेचे काम लवकरच पूर्ण होईल

भीमाशंकर ते पंढरपूर दरम्यान नमामी चंद्रभागा प्रकल्पाला मी अर्थमंत्री असताना मान्यता दिली होती. पुणे, पिंपरी चिंवडसह इतर महापालिका क्षेत्रातून सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी सुमारे 995 कोटी रुपयांची एसटीपी योजना राबविण्यासाठी मंजुरी दिली होती. एसटीपी पंपाचे काम पंढरपुरातही सुरूही झाले आहे. चंद्रभागेचे प्रदूषण घाण पाण्यामुळे वाढत चालेले आहे. या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याचे काम सध्या सुरू आहे. पांडुरंगाच्या कृपेने नमामी चंद्रभागाचे काम लवकरच पूर्ण होईल, अशी अपेक्षाही मुनंगटीवरा यांनी व्यक्त केली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे असे 7 संदेश, ज्यानं आजही प्रत्येकाचं आयुष्य बदलून जाईल!

0

महामानव, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जगभरात मोठ्या उत्साहात साजरी होते. संपूर्ण भारत देशात ठिकठिकाणी त्यांच्या फोटोची मिरवणूक करून भीम जयंती उत्सव साजरा केला जातो. यंदाही महाराष्ट्रासह भारतातही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती धुमधडाक्यात साजरी केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर ज्या बाबासाहेबांनी कोट्यवधी भारतीयांच्या उत्कर्षासाठी प्रयत्न केले.

त्याच बाबासाहेबांचे उपदेश, संदेश जाणून घेऊ या…

  • डॉ. बाबासाहेबांनी देशात समानता प्रस्थापित करण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत प्रयत्न केले. मी असा धर्म मानतो जो स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेची शिकवण देतो, असे बाबासाहेब म्हणायचे
  • धर्म हा माणसाकरिता नसून माणूस हा धर्माकरिता आहे, असेही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटलेले आहे .
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जनतेला शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा असा संदेश दिला होता.
  • एखाद्या समाजातील प्रगती मोजायची असेल तर त्या समाजातील महिलांची प्रगती किती झाली आहे, हे पाहिले पाहिजे, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेले आहे.
  • शीलाशिवाय शिक्षणाची किंमत शून्य आहे, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेले आहे.
  • लोकशाही म्हणजे प्रजासत्ताक किंवा संसदीय सरकार नाही. लोकशाही म्हणजे सहजीवनाने राहण्याची एक पद्धत आहे, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेले आहे.
  • मी समाजकारण, राजकारणात असलो तरीही मी आजन्म विद्यार्थीच आहे, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते.

स्वत:च्या प्रॉपर्टीतून वाटताय का निधी? संतापलेल्या कोल्हेंनी अजितदादांना दिलं आव्हान…

0

पुणे जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून वाटप करण्यात येणारा निधी हा असमान प्रमाणात वितरित करण्यात येत असल्याचा आरोप सातत्याने विरोधकांकडून करण्यात येतो. ज्या पद्धतीने विरोधक हा आरोप करतात, त्याच पद्धतीने सत्ताधारी पक्षातील काही स्थानिक पदाधिकारी देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर अप्रत्यक्षपणे आरोप करत निधी वाटपामध्ये काही ठराविक तालुक्यांना जास्त निधी दिला जात असल्याचा आरोप करताना पाहायला मिळतात. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पुणे जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपावरून जाब विचारत तीन वर्षाच्या निधी वाटपाची श्वेतपत्रिका काढण्याचे आव्हान दिलंय. त्यामुळे आता अजितदादा त्यांना कसं प्रत्युत्तर देणार, याची उत्सुकता वाढली आहे.

अमोल कोल्हे म्हणाले, सर्वसामान्य जनतेच्या करातून जो निधी येतो तो निधी जर विरोधी पक्षातील नेत्यांनी विकासकामांसाठी मागितला तर त्या कामांना रेड सिग्नल दाखवायचा अथवा ब्रेक लावण्याचा प्रकार घडत नाही ना याबाबत शहानिशा करण्यासाठी सरकारने थेटपणे श्वेतपत्रिका काढावी, अशी आमची मागणी आहे. हा पैसा कुणाच्याही घरचा नाही! स्वत:च्या प्रॉपर्टीतून वाटताय का निधी?” असा थेट सवाल त्यांनी अजित पवार यांना केला.

या श्वेतपत्रिकेतून खासदार सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांच्या किती विकासकामांना ब्रेक लावण्यात आलाय हे समोर येईल. तसंच इतरही विरोधी पक्षातील खासदार, आमदारांच्या किती कामांना ग्रीन सिग्नल दाखवण्यात आला, हे देखील या श्वेतपत्रिकेतून समोर येईल, असेही कोल्हे म्हणाले आहेत.

अजित पवार हे मोठे नेते आहेत. राज्याचे अनेक वेळा ते उपमुख्यमंत्री राहिले आहेत. तसंच राज्याचे अर्थमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री देखील आहेत. त्यामुळे दादा दूध का दूध आणि पाणी का पाणी करणारे नेते आहेत. त्यामुळे त्यांनी श्वेतपत्रिका काढावी. आणि गेल्या तीन वर्षांमध्ये कोणत्या जिल्ह्याला, तालुक्याला जिल्हा नियोजन समितीमार्फत निधी देण्यात आला, हे समोर आणावं, असे आवाहनही कोल्हेंनी दिले आहे.

एकाच मतदारसंघातील लोक जास्त टॅक्स भरतात, असं नाही. इतर मतदारसंघातील लोक देखील टॅक्स भरतात. त्यामुळे सगळे जर समान टॅक्स भरत असतील, तर राज्याच्या तिजोरी मध्ये जाणाऱ्या टॅक्स मधून येणारा निधी सगळ्या तालुक्यांना आणि जिल्ह्यांना समप्रमाणात वाटला जातो का याबाबत जाणून घेण्यासाठी श्वेतपत्रिका काढणे आवश्यक असल्याचे अमोल कोल्हेंनी सांगितले.

भारताचा स्टार वॉरमध्ये प्रवेश, जगातला चौथा देश बनला लेझर बीमने विमान पाडले, DRDOचे अनोखे ब्रह्मास्र!

0

भारताच्या डीआरडीओने एक अमोघ असे अस्रं तयार केले आहे. या अस्राने शत्रूची विमाने क्षेपणास्रं,ड्रोन हवेतल्या हवेतच नष्ट करणे शक्य होणार आहे. यामुळे देशाची संरक्षण सिद्धता वाढणार आहे.या प्रकारचे तंत्रज्ञान मिळविणारा भारत अमेरिका, चीन आणि रशियानंतरचा तिसरा देश आहे. या नव्या शस्राची चाचणी डीआरडीओने अलिकडेच घेतली आहे. भारतीय डीआरडीओच्या या नव्या ३० किलोवॅट क्षमतेच्या लेसर-आधारित शस्त्र प्रणालीचा वापर करून स्थिर-विंग असलेली विमाने, क्षेपणास्त्रे आणि  ग्रुप  ड्रोन हवेतल्या हवेत नष्ट करता येणार आहेत, त्यामुळे देशाच्या संरक्षण तंत्रज्ञानातील एक महत्त्वाचा टप्पा गाठला जाणार आहे.

भारत चौथ्या क्रमांकांचा देश

संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने (DRDO) हे लेझर आधारित शस्त्र (DEW) विकसित केले आहे, जे आता लष्करातील वापरासाठी उत्पादित आणि तैनातीसाठी सज्ज होणार आहे. या डीआरडीओच्या या कामगिरीने भारत अमेरिका, चीन आणि रशियासह प्रगत लेसर शस्त्र क्षमता असलेल्या देशांच्या उच्चभ्रू गटात भारताचा समावेश झाला आहे.

 स्टार वॉर्स क्षमता मिळणार..

या प्रयोगशाळेने इतर डीआरडीओ प्रयोगशाळा, उद्योग आणि शैक्षणिक संस्थांशी साधलेला समन्वय साधून हे शस्र तयार केले आहे.ही तर प्रवासाची सुरुवात आहे. मला खात्री आहे की आपण लवकरच आपले ध्येय गाठू. आता आम्ही उच्च ऊर्जा मायक्रोवेव्ह, इलेक्ट्रोमॅग्नेटिक पल्स सारख्या इतर उच्च ऊर्जा प्रणालींवर देखील काम करीत आहोत. आम्ही अशा अनेक तंत्रज्ञानावर काम करीत आहोत ज्यामुळे आपल्याला स्टार वॉर्स क्षमता मिळेल. आज तुम्ही जे पाहिले ते स्टार वॉर्स तंत्रज्ञानाच्या घटकांपैकी एक होते असे डीआरडीओचे अध्यक्ष डॉ. समीर व्ही. कामत यांनी म्हटले आहे. “माझ्या माहितीनुसार, अमेरिका, रशिया आणि चीनने याआधी ही क्षमता दाखवली आहे. इस्रायल देखील अशाच क्षमतांवर काम करीत आहे, मी म्हणेन की ही प्रणाली दाखवणारा भारत जगातील चौथा किंवा पाचवा देश आहे,असेही कामत यांनी म्हटले आहे.

उपग्रह सिग्नल जॅम करण्याची ताकद

३० किलोवॅट क्षमतेची ही लेसर शस्र प्रणाली ५ किलोमीटरच्या परिसरात ड्रोन आणि हेलिकॉप्टरसारख्या हवाई हल्ल्यांच्या धोक्यांना तोंड देण्यासाठी डिझाईन केली आहे. या प्रणातील अत्यंत प्रगत इलेक्ट्रॉनिक युद्ध क्षमता आहेत, ज्यामध्ये संप्रेषण आणि उपग्रह सिग्नल जॅम करण्याची देखील ताकद आहे.अचूक लक्ष्य वेध करण्यासाठी ही प्रणाली ३६०-डिग्री इलेक्ट्रो-ऑप्टिकल/इन्फ्रारेड (EO/IR) सेन्सरने सुसज्ज आहे आणि ती हवाई, रेल्वे, रस्ते किंवा समुद्राद्वारे वेगाने कुठेही नेऊन तैनात केली जाऊ शकते.

अवकाळीनं राज्याला झोडपलं, कुठे-कुठे पाऊस? पुणे जिल्ह्याला देखील येथे बसला मोठा फटका वाचा सविस्तर

0

राज्यात अवकाळी पाऊस सुरू आहे, गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. हातातोंडाशी आलेल्या घास निसर्गानं हिरावून घेतला आहे. दरम्यान आज पुन्हा एकदा राज्यातील अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरली लावली.

जळगाव जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी गारपिटीसह अवकाळी पाऊस झाला आहे, जळगाव, यावल, चोपडा तालुक्यातील अनेक भागांमध्ये गारपिटीसह जोरदार पाऊस झाला. चोपडा तालुक्यातील अडावद, धानोरा,मितावली शिवारात जोरदार गारपीट झाली आहे. दुसरीकडे जळगाव तालुक्यातील भादली, खेडी भोकर , भोकर, तसेच यावल तालुक्यात मोहराळा सावखेडा यासह इतर गावांमध्ये देखील गारपिटीसह पाऊस झाला आहे. या गारपिटीमुळे शेतातील रब्बी हंगामातील गहू, कांदा, केळी, मका व इतर पिकांसह फळपिकांना मोठा फटका बसला आहे. चोपडा तालुक्यात अंदाजे साडेतीनशे हेक्टरवरील पिकांचं नुकसान झाले असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. सकाळी कडाक्याचं ऊन पडलं असताना, दुपारच्यावेळी अचानक ढग दाटून आले आणि पावसाला सुरुवात झाली.

दुसरीकडे पुणे जिल्ह्याला देखील पावसानं चांगलंच झोडपून कढलं आहे, पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यातील अनेक गावांमध्ये आज वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. अचानक पडलेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. फळबागांना मोठा फटका बसल्याचं दिसून येत आहे. मात्र दुसरीकडे पावसानं हवेत गारवा निर्माण झाल्यामुळे कडाक्याच्या उन्हापासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

गोंदियात ढगाळ वातावरण

गोंदिया जिल्ह्यात आज अचानक हवामानात मोठा बदल पाहायला मिळत आहे. सकाळपासूनच आकाशात काळसर ढगांनी वेढा घातला असून, वादळी वाऱ्याला सुरुवात झालेली आहे. वातावरणात गारवा जाणवत असून, नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. हवामान खात्यानं जिल्ह्याला जोरदार वाऱ्यांसह पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी सुरक्षित स्थळी अश्रय घ्यावा, महत्त्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडावं असं आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे. पावसामुळे मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मध्यम व गरीब ३०० युनीट वीज वापरणा-या अशी मोफत वीज: शेतकरी मोफत वीजेबाबत मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा

0

मुंबई : डिसेंबर २०२६ पर्यंत राज्यातील ८० टक्के शेतकऱ्यांना वर्षभर १२ तास मोफत वीज उपलब्ध करुन देण्यात येईल तसेच येत्या पाच वर्षात राज्यात सामान्य नागरिकांचे वीज बील दरवर्षी कमी होणार, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आर्वी येथील नवीन प्रशासकीय इमारतीच्या लोकार्पणासह ७२० कोटींच्या विकास कामांचे ई-लोकार्पण व भूमिपूजन झाले. त्यावेळी ते बोलत होते.

शेतीसाठी १२ तास विजेची शेतकऱ्यांची मागणी होती

राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या हिताचे विविध निर्णय घेऊन प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु केली आहे. शेतीसाठी १२ तास विजेची शेतकऱ्यांची मागणी होती. यादृष्टीने राज्य शासनाने प्रभावी अंमलबजावणी सुरु केली असून डिसेंबर २०२६ पर्यंत ८० टक्के शेतकऱ्यांना ३६५ दिवस दिवसाला १२ तास मोफत वीज उपलब्ध करुन दिली जाणार आहे. राज्य शासनाने २०२५ ते २०३० पर्यंत राज्यातील वीज वापरकर्त्यांचे वीज बील दरवर्षी कमी करण्याचे नियोजन व तशी कार्यवाही सुरू केली आहे. तसेच ३०० युनीट पर्यंत वीज वापरणा-या मध्यम वर्गीय व गरीब कुटुंबांना सौर ऊर्जेअंतर्गत आणून मोफत वीज देण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.

वर्धा जिल्ह्यातील आर्वी विधानसभा मतदार संघात विविध महत्वाच्या विकास कामांचे लोकार्पण झाले आहे. याद्वारे या भागातील विकासाला चालना मिळेल. तसेच येत्या काळात या भागातील लोअर वर्धा प्रकल्प आणि वाढोणा -पिंपळखुटा उपसा सिंचन प्रकल्प कार्यान्वीत होण्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी मदत करेल. या सिंचन प्रकल्पांद्वारे या भागातील शेतीला मुबलक पाण्यासोबत मोफत वीज उलब्ध होणार आहे. लोअर वर्धा प्रकल्पावर ५०० मेगावॅट वीज उपलब्ध होणार आहे. तसेच वाढोणा-पिंपळखुटा उपसा सिंचन योजनेला मान्यता देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

राज्य शासनाकडून लवकरच मान्यता देऊन एमआयडीसी उभारली जाणार

वर्धा जिल्ह्यात समृद्धी महामार्गामुळे विकासाला गती आली आहे. तसेच येत्या काळात वर्ध्यातून सुरु होणा-या महत्वाकांक्षी शक्तीपीठ महामार्ग आणि सिंदी येथील ड्रायपोर्टमुळे जिल्हा मध्यभारताचे लॉजिस्टीक केंद्र म्हणून उदयाला येत आहे. या जिल्ह्यातून जाणा-या समृद्धी महामार्गावरील विरुळ नोडला राज्य शासनाकडून लवकरच मान्यता देऊन येथे एमआयडीसी उभारली जाणार आहे. या माध्यमातून उद्योगासाठी इको सिस्टीम तयार होऊन स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार आहे.

महायुती सरकार १०० दिवसांत स्थिर; पण बंगल्याच्या शोध ९ मंत्री अद्याप ‘बेघर’ अन् पालकमंत्री तिढा कायमच

0

राज्यातील महायुती सरकारच्या स्थापनेला 100 दिवस पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा बंगल्यावर भेट घेतली. या बैठकीत मंत्रिमंडळ विस्तार, महामंडळ नियुक्त्या आणि आगामी निवडणुकांची रणनीती यावर चर्चा झाली असल्याचे समजते. राज्य मंत्रीमंडळातीचा विस्तार होऊन जवळपास तीन महिने झाले आहेत. तरी अद्याप मंत्रिमंडळातील नऊ मंत्र्यांना शासकीय बंगले मिळाले नाहीत. त्यामुळे त्यांना फ्लॅटवर राहावे लागत आहे. त्यातच नाशिक आणि रायगड या दोन जिल्ह्यांचा पालकमंत्री तिढा अजूनही कायमच आहे. राज्य सरकारच्या वतीने या भागामध्ये विकास थांबलेला नसून हाही विषय मार्गी लागेल असे सांगितले जात असले तरीसुद्धा दस्तर खुद्द अमित शहा यांच्या बैठकीनंतरही पालकमंत्री पदाचा तिढा सुटल्याचे दिसत नाही.

मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन जवळपास 100 दिवसाचा कालावधी उलटला आहे. त्यानंतरही राज्य मंत्रीमंडळातील नऊ मंत्र्यांना बंगल्याविना इतरत्र राहावे लागत आहे. त्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या चार मंत्र्यांचा समावेश आहे तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या तीन तर भाजपच्या दोन मंत्र्यांचा समावेश आहे.

एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री असलेले फलोत्पादन मंत्री भरत गोगावले, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, कृषीमंत्री माणिकराव कोकाटे, सास्कृतीक कार्यमंत्री आशिष शेलार, यांच्यासह राज्यमंत्री इंद्रनील नाईक, मकरंद पाटील व मेघना बोर्डीकर या नऊ मंत्र्यांना शासकीय बंगले मिळाले नाहीत.

त्यामुळे या राज्यमंत्रिमंडळातील नऊ मंत्र्यांना कधी बंगले मिळणार या कडे सर्वांचे लागले आहे. चार महिन्यापूर्वी विधानसभेची निवडणूक पार पडली. ही निवडणूक पार पडल्यानंतर ५ डिसेबरला राज्यात महायुतीचे सरकार अस्तित्वात आले. त्यानंतर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तारही पार पडला. त्यानंतर मंत्र्यांना बंगल्याचे वाटप करण्यात आले होते. त्यामध्ये नऊ मंत्र्यांच्या वाट्याला बंगले आले नव्हते. त्यामुळे हे नऊ जणांना अद्याप बंगल्याची प्रतीक्षा आहे. त्यामुळे येत्या काळात बंगले नसलेल्या मंत्र्यांना कधी नवीन बंगले मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मराठा उद्योजक विकास आणि मार्गदर्शन संस्थेचा प्रथम वर्धापन दिन उत्साहात साजरा

0

सततचा संघर्ष करून उद्योगात यशस्वी होता येते – शिवश्री डॉ. कैलाश काटकर

मराठा उद्योजक विकास आणि मार्गदर्शन संस्थेचा प्रथम वर्धापन दिन उत्साहात साजरा

पुणे प्रतिनिधी – कोणताही उद्योग हा एखाद्या कौशल्याचे ने होत नाही तर तो मनाच्या प्रचंड अशा इच्छाशक्तीने होतो. उद्योग उभारताना अनेक अडचणी येतात. त्या अडचणींना धैर्याने सामोरे जाऊन प्रश्न सोडवता येतात. याप्रसंगी नैराश्य येते, अपयशाची भीतीही वाटते पण याला सकारात्मक राहून सततचा संघर्ष करून उद्योगात यशस्वी होता येते, असा मोलाचा सल्ला क्यूकहिल टेक्नॉलॉजी चे व्यवस्थापकीय संचालक शिवश्री डॉ. कैलाश काटकर यांनी दिला.

मराठा सेवा संघ प्रणित मराठा उद्योजक विकास आणि मार्गदर्शन संस्थेचा पुणे जिल्हा कक्षाचा प्रथम वर्धापन दिन नामांकित उद्योजकांच्या मार्गदर्शन व उपस्थितीत बालगंधर्व रंगमंदिर येथे साजरा झाला, यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी व्यवसायात यशस्वी झालेल्या उद्योजकांचा विशेष सन्मान मानवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी शिवजल इन्फ्राचे व्यस्थापकीय संचालक शिवश्री सचिन भोसले, येवले अमृततुल्यचे व्यस्थापकीय संचालक नवनाथ येवले, शिवश्री सचिन भोसले, मराठा सेवा संघाचे प्रवीण गायकवाड व मराठा उद्योजक पुणे कक्ष अध्यक्ष अर्जुन ख़ामकर आदी उपस्थित होते.

डॉ. वायाळ म्हणाले, उद्योजक घडविणे ही काळाची गरज आहे, असे सांगून आपल्या उद्योगात महिलांना प्राधान्य दिल्याचे सांगितले तसेच येवले अमृततुल्येचे शिवश्री नवनाथ येवले म्हणाले की, उद्योग उभारताना स्वतःवर विश्वास हवा. प्रामाणिकपणा हवा, उद्योगाची सुरुवात छोट्या गोष्टीने करा. ब्रॅण्डिंग व नेटवर्किंग केले पाहिजे. व्यवसाय करताना गोल अतिशय महत्त्वाचा आहे. कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट प्रामाणिक असेल तर यशाला पर्याय नाही.

शिवश्री सचिन भोसले म्हणाले की, कोणताही उद्योग उभारताना अडचण ही ठरलेली असतेच तिला संकट न मानता संधी म्हणून पाहिले तर पुढे जाऊन प्रगती करता येते. कोणत्याही उद्योगात शिक्षण अडसर ठरत नाही. संघर्ष शिवाय प्रगती नाही, उद्योग वाढीस युनिटी अतीशय महत्वाची आहे.

प्रवीण गायकवाड म्हणाले, मराठा युवकांनी छत्रपती शिवरायांची प्रेरणा घेऊन उद्योगात पुढे यावे व जगावर अधिराज्य गाजवावे, आरक्षणाच्या पाठीमागे लागण्यापेक्षा उद्योगात यश मिळवावे. जे परदेशात राहून आपल्या उद्योगात पुढे जाऊन प्रगती करत असून महाराष्ट्राचा तसेच देशाचा नावलौकिक वाढवीत आहेत.

प्रस्तावित मराठा उद्योजक पुणे कक्ष अध्यक्ष अर्जुन ख़ामकर यानी अहवान केले, की मराठा उद्योजकांनी उद्योजक कक्षाशी जवळीक साधावे. जेणेकरून व्यवसायासाठी लागणारे सर्व मार्गदर्शन नव उद्योजकांना लाभेल.

याप्रसंगी अभिजीत घाटगे, दादा भापकर व इतर उद्योजकांनी सुरेख मार्गदर्शन केले. या प्रसंगी मोठ्या प्रमाणावर मराठा बंधू भगिनी उपस्थित होत्या.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बालासाहेब कोबल, रोहित जगताप, शंकर मांजरे, बालाजी चाव्हान, मुकेश पाटिल, महेश अंबाड, स्वप्निल इंदुलकर, गणेश औताडे, सुरेश वालंज, सचिन वटाने विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाची प्रस्तावना अर्जुन खामकर यांनी केली तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अक्षय मोरे यांनी केले. आभार जितेंद्र बाजी मानले.

Free Haircut for Differently abled & Orphaned Children by Symbiosis Beauty and Wellness Students

0

Pune, 10th April 2025 – In a heartwarming initiative that blends social responsibility, skill development, and community service, students from the B.Sc. Beauty and Wellness program at Symbiosis Skills and Professional University (SSPU) recently visited Mai Bal Bhavan, a non-profit organization for differently abled and orphaned children, located near Dehu.

During this visit, the students offered free haircut services to the children at the organization, creating a memorable and meaningful experience for both the children and the emerging professionals. The initiative allowed the students to apply their skills in a real-world setting and, at the same time, strengthened their sense of social responsibility and empathy.

On this occasion, Sayogita Gaikwad said, “Such initiatives help students understand the importance of community service and skill-based education. These experiences not only help students become better professionals but also compassionate citizens. Such activities are an excellent example of SSPU’s commitment to holistic education, where students are encouraged to contribute to society while developing their skills. It’s also a great reflection of the university’s philosophy of ‘Learning by Doing’, ensuring that students are not only industry-ready but also socially aware.”

#SocialResponsibility #BeautyWithPurpose #HandsOnExperience #FutureProfessionals #SymbiosisSkillsUniversity #sspu #symbiosiskiwale

हनुमानाचा जन्म पहाटेचा; देवदर्शनाला जाताना ‘या’ तीन गोष्टी आठवणीने घेऊन जा!

0

१२ एप्रिल रोजी हनुमान जयंती अर्थात हनुमंताचा वाढदिवस आहे. या दिवशी हनुमंताला तेल, रुई आणि शेंदूर वाहिले जाते, तसेच पंजिरीचा प्रसाद दिला जातो. सकाळी सूर्योदयाच्या वेळेस हनुमान जन्म साजरा केला जातो. अनेक ठिकाणी उत्सवाचे वातावरण असते. भजन, कीर्तन असते. जन्मवेळ झाल्यावर हनुमंताला पाळण्यात घालून पाळणा म्हटला जातो आणि आरती म्हणून उत्सवाची सांगता केली जाते. तुम्ही देखील हनुमंताच्या दर्शनाला जाल तेव्हा पुढील ३ गोष्टी आठवणीने घेऊन जा, त्याचे कारणही जाणून घ्या.

या दिवशी तसेच हनुमंताचा जन्मवार असलेल्या दिवशी म्हणजेच शनिवारी त्याला प्रिय असे तीन पदार्थ अर्पण केले जातात. रुई, तेल आणि शेंदूर! या तीन गोष्टी आवडण्यामागील कारण काय असेल, जाणून घेऊया.

तेल : दर शनिवारी हनुमानाच्या मस्तकावर तेल घालतात. त्या संबंधी अशी एक कथा आहे, की इंद्रजिताने सोडलेल्या संहारक शक्तिमुळे लक्ष्मण मूर्च्छित होऊन पडला होता. त्यावरच्या उपचारासाठी संजीवनी वनस्पती असलेला द्राणागिरी पर्वत समूळ उपटून घेऊन हनुमान लंकेकडे आकाशमार्गे जात असता गैरसमजुतीने भरताने त्याला बाण मारून खाली पाडले. परंतु हनुमानाचे कार्य आणि कर्तृत्त्व कळताच भरताने त्याच्या जखमेवर तेल आणि शेंदूर लावला. त्यामुळे जखम तत्काळ बरी होऊन हनुमान लंकेत नियोजित वेळेपूर्वीच जाऊ लागला. यातूनच पुढे हनुमानाला तेल घालण्याची रुढी पडली.

रुई : हनुमानाला रुईच्या पानांची माळ घालण्यामागेही एक आख्यायिका सांगितली जाते. ती थोडक्यात अशी-

हनुमानाची माता अंजनी ही निस्सीम गणेशभक्त होती. आपल्या पुत्रावर आपल्या उपास्य दैवताची कृपादृष्टी व्हावी, इतकेच नव्हे, तर त्याला बळ, बुद्धी, विघ्नहर्तत्व नित्य लाभावे यासाठी अंजनी हनुमानाच्या गळ्यात मंदाराच्या विंâवा रुईच्या पानांची माळ घालीत असे. आपल्या मातेची स्मृती म्हणून हनुमान पुढे रुईची माळ गळ्यात धारण करू लागला आणि म्हणूनच भाविक त्याला रुईच्या पानांची माळ घालतात. तसेच तो अकरावा रुद्र असल्याने अकरा पानांची माळ आणि अकरा प्रदक्षिणा घालण्याची प्रथा पडली.

शेंदूर : हनुमानाला शेंदूर लावण्यामागेही दोन कथा सांगितल्या जातात. भरताने तेल आणि शेंदूर माखून हनुमानाची जखम बरी केली याशिवाय दुसरी प्रचलित कथा म्हणजे-

सीतामाईला भाळी कुंकुम शेंदुर लावताना हनुमानाने एकदा पाहिले आणि `माई हा टिळा आपण कपाळावर का लावताय?’ असे हनुमंताने सीतामाईला विचारले.

‘असे केल्याने तुझ्या स्वामींचे आयुष्य वाढेल’ असे सीतामाईने हनुमानाला सांगितले, तेव्हापासून आपल्या स्वामींचे म्हणजे प्रभू रामचंद्रांचे आयुष्य वाढावे, या उद्देशाने हनुमान आपल्या सर्वांगाला शेंदूर माखून घेऊ लागला.

अहिरावण-महिरावण नामक दोन मायावी राक्षसांनी रामलक्ष्मणांना कपटाने पाताळनगरीत नेले. ते राक्षस त्या दोघांना आपल्या देवीला बळी देणार होते. ऐन वेळी हनुमंताने रक्तवर्ण देवीचे रूप घेऊन राम लक्ष्मणाची सुटा केली.

या प्रसंगाचे वर्णन समर्थ रामदास स्वामी मारुती स्तोत्रात करतात-

पाताळ देवता हंता, भव्य सिंदुर लेपना! याची स्मृती म्हणून हनुमानाला शेंदुर लावण्याची प्रथा पडली. बजरंग बली की जय!