मुंबई दि. २१ (रामदास धो. गमरे) महाबोधी महाविहार, बोधगया मुक्ती आंदोलनाला महाराष्ट्राची राजधानी मुंबईतून अधिक व्यापक आणि संघटित स्वरूपात बळ देण्याच्या उद्देशाने महाबोधी महाविहार बोधगया मुक्ती आंदोलन राष्ट्रीय समितीच्या वतीने आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ कार्यकर्ते वि. ल. मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली मुबंईत एक महत्वपूर्ण जाहिर बैठक झाली.
सदर बैठकीला जेष्ठ बौद्धचार्य प्रकाश कमलाकर जाधव, युवानेते रविभाऊ गरुड, महाबोधी आंदोलनातील सक्रिय कार्यकर्ते प्रेमानंद जगताप, संजय गायकवाड, राष्ट्रीय बौद्ध महासभेचे शेषराव घंगाले, दिलीप थोरावडे, अनिल सुटे, जितेंद्र पवार, रवींद्र रोकडे, सुभाष कांबळे, अशोक पाईकराव, आत्माराम आव्हाड, बाळासाहेब चंद्रमोरे, रवींद्र सोनावणे, गजानन मेठे, आर. आर. कोरडे, सुधाकर त्रिभुवन, हेमंत तायडे, रामजतन, उत्तम पसरटे आणि नंदेश शिर्के इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
सदर बैठकीत गेली ५२५ दिवसापासून बुद्धगया या ठिकाणी सुरु असलेल्या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी जिल्हास्तरीय कमिटी बनविण्यात यावी आणि कमिटीच्या वतीने मुंबईतील सर्व धार्मिक संघटनांना निमंत्रीत करून विश्वासात घेऊन राष्ट्रीय समितीच्या वतीने मुंबईत एक मोठी जनसभा आयोजित करण्याच्या अनुषंगाने लवकरच पुन्हा एकदा अशीच बैठक बोलवावी असे सर्वानुमते ठरविण्यात आले तसेच आंदोलनाच्या पुढील दिशा, संघटनात्मक बांधणी आणि जनजागृती अभियानाबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.
सदर बैठकीचे आयोजन महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन राष्ट्रीय समितीचे कार्यकारी सदस्य विजय तांबे यांनी प्रस्तावना सादर करताना आंदोलनाच्या ५२५ दिवसांचा आढावा घेत उपस्थितांच्या प्रश्नाना समाधानकारक उत्तरे दिले. सरतेशेवटी सदर कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी अथक परिश्रम घेणाऱ्या सर्वांचे उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.










