मुंबई-ठाण्यासह या जिल्ह्यांमध्ये IMD कडून अलर्ट; समुद्रातून येतंय भयंकर चक्रीवादळ, लो प्रेशर एरियामुळे वाढली चिंता

0
5

गेल्या काही दिवसांपासून दडी मारून बसलेल्या मान्सूनने रौद्र रुप धारण केलं. कुठे डोंगरांना दरडी कोसळण्याचा धोका निर्माण झालाय, तर कुठे नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. अचानक पावसाने जोर धरला आहे. मुंबई, ठाण्यातही मुसळधार पाऊस सुरू आहे. रायगड आणि पालघरसह कोकणात सलग पाऊस तीन दिवस सुरू आहे. पश्चिम बंगालच्या उपसागरातून एक मोठं संकट येत आहे. त्याचा परिणाम दिल्लीपासून ते महाराष्ट्रापर्यंत होताना दिसत आहे.

हवामान विभागाने (IMD) दिलेल्या अलर्टनुसार, पुढील काही दिवस देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस, सोसाट्याचा वारा आणि वीज कडाडण्याची शक्यता आहे. दिल्ली, यूपी, बिहारपासून ते अगदी आपल्या महाराष्ट्रापर्यंत मान्सूनने आपला मोर्चा वळवला आहे. त्यामुळे शेतकरी, प्रवासी आणि समुद्रात जाणाऱ्या मच्छीमारांना विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अधिक वाचा  गणेशोत्सवात मेट्रोचा मोठा धमाका! अनंत चतुर्दशीला ४१ तास सेवा अन् यंदा मध्यरात्री २ वाजेपर्यंत सेवा; वाहतूक कोंडीपासून सुटका

लो प्रेशर एरियानं वाढवली चिंता

हवामान खात्याच्या मते, बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र तयार झालं आहे. ते हळूहळू अधिक मजबूत होत आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर, समुद्रामध्ये जेव्हा हवेचा दाब आजूबाजूच्या परिसरापेक्षा कमी होतो, तेव्हा समुद्रातील प्रचंड आर्द्रता या भागाकडे खेचली जाते. हा सिस्टीम जेवढी मजबूत होते, तेवढा पाऊस जास्त कोसळतो. सध्या याच सिस्टीममुळे महाराष्ट्रासह देशाच्या अनेक भागात पावसाचा जोर वाढला आहे.

महाराष्ट्रावर होणार परिणाम! मुंबई, ठाण्यासह ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट

महाराष्ट्रात अरबी समुद्रातून येणारे बाष्पयुक्त वारे आणि बंगालच्या उपसागरातील सिस्टीम एकत्र आल्यामुळे किनारपट्टीच्या भागात पावसाचे थैमान सुरू होऊ शकते. हवामान विभागाने राज्यातील खालील जिल्ह्यांसाठी धोक्याचा इशारा दिला आहे. मुंबई, ठाणे, पालघर आणि रत्नागिरीमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबईत तर दिवसभर कोसळणाऱ्या पावसामुळे लोकल ट्रेन आणि रस्ते वाहतुकीवर परिणाम होण्याची भीती आहे. तटीय भागात ६० ते ७० किमी वेगाने वारे वाहू शकतात. अनेक जिल्ह्यांमध्ये आज शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भाचा विचार केला सातारा, कोल्हापूर या घाटमाथ्याच्या परिसरासह विदर्भातील नागपूर, यवतमाळ आणि गोंदियामध्येही पावसाचा जोर वाढणार आहे.

अधिक वाचा  शेतकऱ्यांची चिंता वाढली! राज्यात ८३ तालुक्यांत २० दिवसांहून दीर्घकालीन पर्जन्यखंड; पुण्यातही या भागात ३८ दिवस पर्जन्यखंड

या कमी दाबाच्या क्षेत्राचा थेट फटका पश्चिम बंगालला बसत आहे. कोलकाता, हावडासह अनेक जिल्ह्यांत ७० ते ८० किमी वेगाने वारे वाहणार असून मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. अति मुसळधार पावसामुळे दरड कोसळण्याचा धोका, पुराचा धोका अशी स्थिती निर्माण झाली आहे. हा पाऊस पुढचे चार ते पाच दिवस राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर हळूहळू पावसाचा जोर कमी होईल.

मच्छीमारांना महत्त्वाची सूचना!

समुद्रात उसळणाऱ्या उंच लाटा आणि वेगवान वाऱ्यांमुळे मच्छीमारांना पुढील काही दिवस समुद्रात न जाण्याचा कडक इशारा देण्यात आला आहे. तसेच, जर तुम्ही वीकेंडला डोंगराळ भागात किंवा घाटात फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल, तर हवामान अंदाज पाहूनच घरून बाहेर पडा, अन्यथा प्रवासात अडकून पडण्याची वेळ येऊ शकते.

अधिक वाचा  कोर्टाच्या आदेशानंतर मनोज जरांगे यांची ही तयारी अन् मुंबईतील आंदोलनाबाबत घेतला ”हा” मोठा निर्णय