धक्कादायक! सावळे रुप डोळ्यात साठवत परतीच्या प्रवासात वारकऱ्याने आयुष्य संपवले… तूच घडविसी तूच तोडीसी… 

0
55

आषाढी एकादशीच्या काही दिवस आधी, बुलढाणा जिल्ह्यात एक दुःखद घटना घडली. पंढरपूरला विठ्ठलाचे दर्शन घेऊन परतणाऱ्या एका वारकऱ्याने आपले जीवन संपवले. 62 वर्षीय सुखदेव लक्ष्मण रावे यांनी रुईछतीश गावाजवळ एका झाडाला गळफास लावून आत्महत्या केली.ते चिखली तालुक्यातील मिसाळवाडीचे रहिवासी होते.

सुखदेव रावे पंढरपूरच्या वारीत अनेक वर्षांपासून सहभागी होत होते. ते 25 वर्षांपासून मिसाळवाडीत राहत होते. त्यांचा शेळगाव आटोळ येथे सलूनचा व्यवसाय होता. “अनेक वर्षांपासून सुखदेव रावे पंढरपूरच्या वारीत सहभागी होत असल्याने त्यांनी वारकरी सांप्रदायात आपली वेगळी ओळख निर्माण केली होती,” असे गावकऱ्यांनी सांगितले.

अधिक वाचा  फडणवीस आणि बावनकुळे यांच्यात नागपूरमध्ये दिल्लीला रवाना होण्यापूर्वी बैठक जरांगे यांच्या मुंबई आंदोलनापूर्वी तोडगा निघेल?

पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे. अंधेरा पोलीस स्टेशनमध्ये या घटनेची नोंद झाली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. “ग्रामीण भागात आषाढी वारीला विशेष महत्त्व असते,” हे या घटनेने पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. 25 वर्षांपासून ते वारीत सहभागी होते. सुखदेव यांनी हे टोकाचे पाऊल का उचलले, हे अद्याप समजू शकलेले नाही.

राज्यात आत्महत्यांचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत आहे. दुसरीकडे, जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांची स्थितीही गंभीर आहे. चोपडा तालुक्यातील विनोद पाटील आणि पाचोरा तालुक्यातील जीवन गोसावी या दोन शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केली. राज्यात यावर्षी 767 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. जळगाव जिल्ह्यात सहा महिन्यात 90, तर वर्षभरात 250 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. त्यामुळे पावसाळी अधिवेशनात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवला जाईल का, याकडे लक्ष लागले आहे.

अधिक वाचा  ‘एसआयआर’साठी दोन लाख मतदारांना आजपासून नोटिसा; या कागदपत्रांची पडताळणी २ महिन्यांत २ लाख सुनावण्या आव्हान

जळगाव जिल्ह्यात चार मंत्री असूनही शेतकऱ्यांना आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलावे लागते, असा प्रश्न उपस्थित होत आहे. “या आकडेवारीवरून पावसाळी अधिवेशनात शेतकऱ्यांच्या संदर्भात कुणी आवाज उठवणार का? हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे.