भाजप आमदारांचेही फडणवीसांना पुण्यासाठी साकडे; ३३३चे भक्कम संख्याबळ यासाठी ही जागा राष्ट्रवादीला न सोडता आपल्याकडे पाहिजे

0
3

पुणे विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेची पुण्यातील जागा मिळविण्यासाठी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रचंड रस्सीखेच सुरू असून, आज भाजपच्या पुणे शहर व जिल्ह्यातील आमदारांनी व नगरसेवकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. पुणे जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपचे ३०९ सदस्य आहेत. दौंडमधील नागरिक हित संरक्षण मंडळ विकास आघाडीचे १७ आणि इंदापूरमधील कृष्णा भीमा विकास आघाडीचे 7 सदस्य भाजपसोबत आहेत. त्यामुळे पक्षाकडे ३३३ पेक्षा अधिक मतांचे भक्कम संख्याबळ असून, काही अपक्ष सदस्यांचाही पाठिंबा मिळत असल्याचे मुख्यमंत्र्यांना सांगण्यात आले. पुणे शहर व जिल्ह्यात भाजपची ताकद वाढली आहे, ही जागा आपण जिंकू शकतो. ती राष्ट्रवादीला न सोडता आपल्याकडेच असली पाहिजे अशी मागणी केली आहे. त्यामुळे या जागेवर आता महायुतीतील नेते काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागले आहे.

अधिक वाचा  भाजप सत्ताधारी तरी प्रशासकीय अंकुश नाही वर्गीकरणाचा वादंग अधिकाऱ्यांची पाठराखण थांबवा मुख्य पदाधिकाऱ्यांवर नाराजी

विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास आजपासून (ता. २५) सुरुवात झाली आहे. पण महायुतीचे १७ मतदारसंघातील जागा वाटप असूनही निश्चित झालेले नाही. पुणे, रायगड, ठाणे, सातारा, परभणी यास जागांवर भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसने प्रतिष्ठा पणाला लावली आहे. भाजपने या जागेवर दावा सांगितला आहे. त्यानंतर पुण्यातील राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादीचे संख्याबळ भाजपपेक्षा कसे जास्त आहे याचे गणित मांडले होते.

त्यानंतर आता भाजपच्या पुणे जिल्ह्यातील आमदारांनी मुंबईत मुख्यमंत्री कार्यालयात फडणवीस यांची भेट घेतली. पुण्याची जागा भाजपकडे घेण्याची भूमिका मांडली. यावेळी आमदार राहुल कुल, हेमंत रासने, सुनील कांबळे, शंकर जगताप, भीमराव तापकीर, माजी आमदार संजय जगताप, बाळा भेगडे, सभागृह नेते गणेश बिडकर, जिल्हाध्यक्ष प्रदीप कंद यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

अधिक वाचा  दुष्काळाचा मुद्दा मनोज जरांगेंच्या भूमिकेपेक्षा महत्त्वाचा, मुंबईला गणेशोत्सवात आंदोलन करु नये: चंद्रशेखर बावनकुळे

पुणे जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपचे ३०९ सदस्य आहेत. दौंडमधील नागरिक हित संरक्षण मंडळ विकास आघाडीचे १७ आणि इंदापूरमधील कृष्णा भीमा विकास आघाडीचे सात सदस्य भाजपसोबत आहेत. त्यामुळे पक्षाकडे ३३३ पेक्षा अधिक मतांचे भक्कम संख्याबळ असून, काही अपक्ष सदस्यांचाही पाठिंबा मिळत असल्याचे मुख्यमंत्र्यांना सांगण्यात आले. त्यावर फडणवीस यांनी आपण योग्य निर्णय घेऊन असे सांगितले. त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस, सुनेत्रा पवार आणि एकनाथ शिंदे हे महायुतीचे नेते काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागले आहे.