Home Blog Page 95

ऑपरेशन सिंदूरनंतर शिखर धवन असं काय बोलला?, थेट शाहिद आफ्रिदी झाला ट्रोल…

0

जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय लष्कराने दहशतवाद्यांविरुद्ध मोठी कारवाई केली आहे. एका संयुक्त मोहिमेअंतर्गत, भारताच्या तिन्ही सैन्याने पाकिस्तानमध्ये असलेल्या एकूण 9 दहशतवादी तळांवर हवाई हल्ले करून ते उद्ध्वस्त केले. ऑपरेशन सिंदूर असे या मोहिमेचे नाव होते. या हल्ल्यात 100 पेक्षा अधिक दहशतवादी मारले गेल्याचे वृत्त आहे.

भारताने या कारवाईला ‘ऑपरेशन सिंदूर’ असे नाव दिले होते. दरम्यान आता क्रिकेटपटू शिखर धवननेही यावर प्रतिक्रिया दिली आहे. “भारताने दहशतवादाविरुद्ध कठोर कारवाई केली आहे, भारत माता की जय.” असे शिखर धवनने सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहील होते. शिखर धवनची ही पोस्ट खूप व्हायरल होत आहे. मात्र, याच ट्विटनंतर अनेक युजर्सनी माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीला ट्रोल केले. काही लोकांनी एका वाटीसोबतचे त्यांचे फोटो शेअर केले. तर, आफ्रिदी कुठे आहे? असा सवाल अनेक युजर्स विचारताना दिसत आहेत.

पहलगाममधील नृशंस दहशतवादी हल्ल्यानंतर सोशल मीडियावर माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी आणि भारतीय क्रिकेटपटू शिखर धवन यांच्यात जोरदार वादविवाद झाला होता.” कारगिलमध्येही हरवलं होतं. तुम्ही आधीच इतके खाली पडला आहात, अजून किती खाली पडाल, अनावश्यक टिप्पण्या करण्यापेक्षा तुमच्या देशाच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करणे चांगले @SAfridiOfficial. आम्हाला आमच्या भारतीय सैन्याचा खूप अभिमान आहे. भारत माता की जय! जय हिंद.” अशी पोस्ट शिखर धवन याने केली होती. तर त्यावर शाहिद आफ्रिदीनेही एक पोस्ट लिहीली, त्यामुळे तो चांगलाच ट्रोल झाला होता. आता शिखर धवनच्या नव्या पोस्टमुळे अनेक युजर्सना त्यांचं भांडण आठवलं असून लोकांनी शाहिद आफ्रिदीला पुन्हा टार्गेट केलं आहे.

ऑपरेशन सिंदूरचं कौतुक

तथापि, ऑपरेशन सिंदूर या भारतीय सैन्याच्या या कारवाईनंतर, देशातील अनेक आजी माजी क्रिकेटपटूंनी सैन्याला सलाम केला आणि ‘जय हिंद’चा नारा दिला. माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, गौतम गंभीर, आकाश चोप्रा आणि प्रग्यान ओझा, सुरेश रैना, इरफान पठाण, वीरेंद्र सेहवाग यांनी लष्कराच्या कारवाईचे कौतुक केले. याशिवाय, टीम इंडिया आणि कोलकाता नाईट रायडर्सचा खेळाडू वरुण चक्रवर्तीनेही ‘ऑपरेशन सिंदूर’चा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला, जो आर्मीने प्रसिद्ध केला होता. “या कारवाईत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांना लक्ष्य करण्यात आले आहे, तिथून भारतावर दहशतवादी हल्ल्यांचे नियोजन केले जात होते” असे भारत सरकारने आपल्या निवेदनात म्हटले होते.

3000 बॉम्ब पडल्यावर वीटही हालली नाही, भारताच्या सीमेवरील ‘ते’ रहस्यमयी मंदिर

0

राजस्थानमधील जैसलमेर येथे भारत-पाकिस्तान सीमेवर वसलेले तनोट माता मंदिर एक रहस्यमयी आणि चमत्कारिक स्थळ आहे. 1965 आणि 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धांदरम्यान पाकिस्तानी सैन्याने या मंदिरावर हजारो बॉम्ब टाकले, परंतु एकही बॉम्बचा परिणाम मंदिरावर झाला नाही. विशेष म्हणजे, मंदिराच्या आवारात पडलेल्या काही बॉम्बचा स्फोटही झाला नाही. या चमत्कारामुळे तनोट माता मंदिराची ख्याती देशभरात पसरली. चला, या मंदिराच्या इतिहास आणि रहस्यांबद्दल सविस्तर जाणून घेऊया…

तनोट माता मंदिर: एक चमत्कारिक स्थळ

जैसलमेरमधील भारत-पाकिस्तान सीमेवर असलेले तनोट माता मंदिर हे श्रद्धेचे आणि चमत्कारांचे प्रतीक आहे. 1965 आणि 1971 च्या युद्धांदरम्यान पाकिस्तानी सैन्याने या मंदिरावर हल्ले केले, परंतु मंदिराला कोणतेही नुकसान झाले नाही. असे जाते की, या मंदिरावर 3,000 बॉम्ब टाकण्यात आले. परंतु एकाही बॉम्बचा स्फोट मंदिराला हानी पोहोचवू शकला नाही. यापैकी 450 बॉम्बचा तर स्फोटच झाला नाही. हे बॉम्ब आजही तनोट माता मंदिरातील संग्रहालयात जतन केलेले आहेत. हे या मंदिराच्या चमत्काराची साक्ष देतात.

1965 च्या युद्धातील चमत्कार

1965 च्या भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान पाकिस्तानी सैन्याने तनोट माता मंदिरावर तीन वेगवेगळ्या ठिकाणांहून हल्ला केला. या हल्ल्यांना तोंड देण्यासाठी 13 ग्रेनेडियरची एक कंपनी आणि सीमा सुरक्षा दलाच्या (BSF) दोन कंपन्या मेजर जय सिंह यांच्या नेतृत्वाखाली तैनात होत्या. त्यांनी पाकिस्तानच्या संपूर्ण ब्रिगेडचा सामना केला. या युद्धात पाकिस्तानी सैन्याने मंदिरावर 3,000 बॉम्ब टाकले. परंतु मंदिराला कोणतीही हानी पोहोचली नाही. हा चमत्कार पाहून सैनिक आणि स्थानिकांमध्ये मंदिराविषयी श्रद्धा अधिक दृढ झाली.

पाकिस्तानी सैन्याचा पराभव

1965 च्या युद्धात पाकिस्तानी सैन्याने या परिसरावर कब्जा करण्याच्या उद्देशाने हल्ला केला होता. त्यांचे सैन्य भारतीय सीमेत चार किलोमीटरपर्यंत घुसले होते. मात्र, भारतीय सैन्याने जोरदार प्रत्युत्तर देत पाकिस्तानी सैन्याला मोठे नुकसान पोहोचवले. ज्यामुळे त्यांना माघार घ्यावी लागली. या युद्धानंतर तनोट माता मंदिराच्या संरक्षणाची जबाबदारी सीमा सुरक्षा दलाने (BSF) स्वीकारली. आजही BSF चे जवान मंदिराची देखभाल, स्वच्छता आणि रोजच्या आरतीचे आयोजन करतात.

तनोट माता मंदिराची ख्याती

1965 आणि 1971 च्या युद्धांनंतर तनोट माता मंदिराची ख्याती देशभरात पसरली. स्थानिकांसह देशभरातील भाविक या मंदिराला भेट देण्यासाठी येतात. मंदिराच्या चमत्कारिक कथा आणि युद्धकाळातील घटनांनी या स्थळाला एक विशेष स्थान मिळवून दिले आहे. मंदिरातील संग्रहालयात ठेवलेले न स्फोटित बॉम्ब हे मंदिराच्या दैवी शक्तीचे प्रतीक मानले जातात.

एका पराभवामुळे मुंबईच्या अडचणीत वाढ, प्लेऑफचा मार्ग कठीण! असं आहे समीकरण

0

गुजरात टायटन्सने आयपीएल 2025 मधील 56 व्या सामन्यात मुंबईवर मात केली. गुजरातने या सामन्यात शेवटच्या बॉलवर 1 धाव करुन थरारक विजय मिळवला. गुजरातने अशाप्रकारे डीएलएसनुसार मुंबईवर 3 विकेट्सने मात केली. पावसामुळे हा सामना 14 आणि 18 व्या ओव्हरनंतर थांबवण्यात आला होता. त्यामुळे गुजरातला 19 ओव्हरमध्ये 147 धावांचं सुधारित आव्हान मिळालं. हा सामना शेवटच्या बॉलपर्यंत गेला. गुजरातला विजयासाठी शेवटच्या बॉलवर 1 रनची गरज होती. तेव्हा गुजरातने 1 धाव पूर्ण करत सनसनाटी विजय साकारला. गुजरात टायटन्स टीमने यासह सलग 6 सामने जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्सचा वानखेडे स्टेडियममध्ये विजय रथ रोखला. गुजरातचा हा या मोसमातील एकूण आठवा तर मुंबई विरुद्धचा दुसरा विजय ठरला. तर मुंबईचा हा 12 सामन्यांनंतर पाचवा पराभव ठरला.

गुजरातने मुंबईवर मात करत 16 गुणांसह पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी झेप घेतली. मुंबईला या पराभवामुळे मोठा झटका लागला. मुंबईची पॉइंट्स टेबलमध्ये चौथ्या स्थानी घसरण झाली. तसेच मुंबईचं या पराभवामुळे प्लेऑफचं समीकरण बिघडलं. त्यामुळे मुंबईला आता उर्वरित सर्व सामन्यांमध्ये विजय मिळवावा लागणार आहे.

मुंबईची सध्याची स्थिती काय?

मुंबईने आतापर्यंत एकूण 12 सामने खेळले आहेत. मुंबईने 12 पैकी 7 सामने जिंकले आहेत. तर 5 वेळा पराभूत व्हावं लागलं आहे. मुंबई 14 गुणांसह पॉइंट्स टेबलमध्ये चौथ्या स्थानी आहे. मात्र मुंबईच्या नेट रनरेटमुळे काही प्रमाणात दिलासा आहे. मुंबईचा नेट रनरेट हा इतर सर्व संघांच्या तुलनेत सर्वोत्तम आहे. मुंबईचा नेट रनरेट हा +1.156 असा आहे.

आयपीएल 18 व्या मोसमातून चेन्नई सुपर किंग्स, राजस्थान रॉयल्स आणि सनरायजर्स हैदराबाद या 3 संघांचं पॅकअप झालं आहे. त्यामुळे उर्वरित 7 संघांमध्ये प्लेऑफमधील 4 जागांसाठी चुरस आहे. मात्र अद्यापही प्लेऑफसाठी कट ऑफ निश्चित झालेलं नाही. मात्र सद्यस्थिती पाहता प्लेऑफसाठी किमान 18 गुण बंधनकारक आहेत. मुंबईच्या खात्यात 12 सामन्यानंतर 14 पॉइंट्स आहेत. आरसीबी आणि गुजरातच्या खात्यात 16 तर पंजाबच्या खात्यात 15 गुण आहेत.

मुंबईचं प्लेऑफचं समीकरण

मुंबईसमोर आता उर्वरित 2 सामन्यांमध्ये पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिट्ल्सचं आव्हान असणार आहे. विशेष म्हणजे हे 2 संघही प्लेऑफच्या शर्यतीत आहेत. त्यामुळे मुंबईसाठी हे दोन्ही सामने आव्हानात्मक असणार आहेत. मुंबई विरुद्ध पंजाब सामना 11 मे रोजी धर्मशाळा येथे खेळवण्यात येणार आहे. तर 15 मे रोजी मुंबई वानखेडे स्टेडियममध्ये दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध 2 हात करणार आहे. हे दोन्ही सामने पलटणसाठी करो या मरो असे असणार आहेत.

एअर स्ट्राईकनंतर ‘या’ स्टेडियममध्ये सामने होणार नाहीत? मुख्यमंत्री म्हणाले…

0

भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील 9 दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक केला. भारताने यासह पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला. ऑपेरशन सिंदूरंनतर आता भारत-पाकिस्तान यांच्यातील तणाव आणखी वाढला आहे. या तणावाचा परिणाम आयपीएल 2025 मधील काही सामन्यांवर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भारताच्या एअर स्ट्राईकमुळे हिमाचल प्रदेशमधील धर्मशाळा क्रिकेट स्टेडियममध्ये आयपीएल 2025 मधील उर्वरित सामने होणार नसल्याचं म्हटलं जात आहे. एचपीसीएच्या या स्टेडियममध्ये गुरुवारी 8 मे रोजी पंजाब किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स यांच्यातील सामना रद्द होणार, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

तसेच 8 मे नंतर 11 मे रोजी याच स्टेडियममध्ये पंजाब विरुद्ध मुंबई यांच्यात सामना होणार आहे. मात्र हे 2 सामने या स्टेडियममध्ये होणार की नाहीत? याबाबत कोणतीही अधिकृत माहिती बीसीसीआय किंवा आयपीएल गव्हर्निंग काउन्सिलकडून देण्यात आलेली नाही. याबाबत हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू यांनी केंद्र सरकारकडून कोणतेही आदेश नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

भारतीय हल्ल्यात संपूर्ण कुटुंब ठार झाल्यानंतर मसूद अजहरची प्रतिक्रिया

0

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर म्हणून भारताने मंगळवारी रात्री 1.05 वाजता ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवलं. ज्यामध्ये पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी तळांना लक्ष्य करण्यात आलं. पाकव्याप्त काश्मीरमधील मुझफ्फराबाद, कोटली आणि बाग तसंच पंजाब प्रांतातील बहावलपूरमधील मुरीदके आणि अहमदपुरा शार्किया इथं नऊ दहशतवादी स्थळांवर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात जैश-ए-मोहम्मद (JeM) या दहशतवादी संघटनेचा प्रमुख मसूद अजहरच्या कुटुंबातील 14 जण ठार झाल्याची माहिती समोर येत आहे. बहावलपूर हे मसूद अजहरचं मूळ गाव असून भारताने केलेल्या एअर स्ट्राइकमध्ये त्याची पत्नी, मुलगी, भाऊ-बहिणींसह संपूर्ण कुटुंब ठार झाल्याचं कळतंय. यानंतर अजहरची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

संपूर्ण कुटुंब संपल्यानंतर मसूद अजहर अक्षरश: रडला. या हल्ल्यात मीसुद्धा मेलो असतो तर बरं झालं असतं, अशी प्रतिक्रिया त्याने दिली आहे. मसूद अजहर हा संयुक्त राष्ट्रांनी घोषित केलेला जागतिक दहशतवादी असून बहावलपूरमध्ये तो मुक्तपणे फिरत असतो. 2002 मध्ये जैश-ए-मोहम्मदला अधिकृतपणे बेकायदेशीत घोषित करण्यात आलं असलं तरी ही बंदी केवळ कागदावरच असल्याचं दिसून येतं. कारण या दहशतवादी संघटनेद्वारे अनेक प्रशिक्षणाची शिबिरं चालवली जात आहेत. 1968 मध्ये बहावलपूर इथं जन्मलेला अजहर हा एकेकाळी अफगाणिस्तानातील हरकत-उल-मुजाहिद्दीनचा (HuM) सदस्य आणि धर्मगुरू होता. 1994 मध्ये दहशतवादाच्या आरोपाखाली भारतात त्याला अटक करण्यात आली होती. परंतु नंतर त्याला सोडण्यात आलं.

जानेवारी 2000 मध्ये त्याने कराचीमध्ये जैश-ए-मोहम्मदची स्थापना केली. तेव्हापासून ही दहशतवादी संघटना भारतातील अनेक मोठ्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये सहभागी आहे. ज्यात जम्मू-काश्मीर विधानसभा आणि भारतीय संसदेवरील हल्ल्याचाही समावेश आहे. मसूद अजहरला मूत्रपिंडाच्या समस्या असल्याचंही म्हटलं जातं. जून 2024 मध्ये तो शेवटचा एका लग्नात दिसला होता.

भारताने केलेल्या एअर स्ट्राइकमध्ये मसूद अजहरचा भाऊ रौफ अजहरसुद्धा मारल्या गेल्याचं कळतंय. भारतीय लष्कराने बहावलपूरमधील मसूद अजहरच्या मदरशाला लक्ष्य केलं. बहावलपूरच्या या मदरशावर चार क्षेपणास्त्रे डागण्यात आली. यामुळे हा संपूर्ण परिसर उद्ध्वस्त झाला आहे. या मदरशाचं नाव मरकज सुभानअल्लाह आहे. हा परिसर जैश-ए-मोहम्मदचं ऑपरेशनल मुख्यालय म्हणून ओळखलं जात होतं. बहावलपूरमधील हा मदरसा जैशचा प्रमुख मौलाना मसूद अजहरसह इतर अनेक दहशतवाद्यांचंही घर होतं. गेल्या तीन दशकांपासून या मदरशात दहशतवादी प्रशिक्षण शिबिरं सुरू आहेत.

ऑपरेशन सिंदूरनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पहिले संबोधन, म्हणाले, 2040 पर्यंत…

0

जम्मू-काश्मीरच्या पहलगाममधील नृशंस दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने काल मध्यरात्री पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानात एअर स्ट्राईक केला. 9 दहशतवादी तळांना मिसाइल्सद्वारे टार्गेट करण्यात आले आणि ते उद्ध्वस्त झाले, ज्यामध्ये 100 पेक्षा अधिक दहशतवाद्यांचा खात्मा झाला. या एअर स्ट्राईकची सध्या भारतापासून सर्वत जगभरात चर्चा सुरू असून आज सकाळी सेनेतर्फे एक पत्रकार परिषदही घेण्यात आली. पहलगाम हल्ला अत्यंत क्रूर आणि अमानवीय होता, असे भारतीय परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी म्हटले. दरम्यान या हल्ल्यानंतर विविध स्तरांतून प्रतिक्रिया उमटत असून देशातील राजकीय नेत्यांनी या भूमिकेचे कौतुक केले.

या कारवाईबद्दल खुद्द पंतप्रधान मोदी काय म्हणतात, याची सर्वांनाच उत्सुकता होती. कारण कालच्या ऑपरेशन सिंदूरनंतर दुपारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पहिले संबोधन होते. जागतिक अंतराळ संशोधन परिषदेत ते बोलत होते. भारताच्या अंतराळ कार्यक्रमाबद्दल त्यांनी उपस्थितांना संबोधित केलं. 2040 पर्यंत भारतीय पाऊल चंद्रावर असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. एअर स्ट्राईकनंतर संपूर्ण जगाचे त्यांच्याकडे लक्ष लागलेले असतानाच पंतप्रधान मोदी हे मात्र ऑपेरशन सिंदूरबद्दल काहीच बोलले नाहीत.

काय म्हणाले पंतप्रधान मोदी ?

भारताने इतिहास रचला आहे. भारताने चंद्रयान 1 पाठवलं. चंद्रावर पाण्याचा शोध लावला. चंद्रयान दोन आणि चंद्रायन तीनही पाठवलं. भारताने अंतराळ क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलं आहे. भारताचा स्पेस प्रवास हा कुणाशी स्पर्धा नाही तर एकत्र सोबत जाण्याचा आहे. मानवतेसाठी स्पेस एक्सप्लोअर करण्याचं आमचं मिशन होतं, असं मोदी म्हणाले. आम्ही मार्स मिशन सुरूच ठेवणार आहोत. या मोहिमेतून अनेक चांगल्या गोष्टी समोर आल्या. गगनयान आमच्यासाठी महत्त्वाचं आहे, असंही पंतप्रधान मोदींनी नमूद केलं.

2040 पर्यंत भारतीय पाऊल चंद्रावर असेल

इस्रोने एका मिशनमध्ये एकाच वेळी 100 सॅटेलाईट सोडण्याची कामगिरीही केली. आमच्या सॅटेलाईटद्वारे प्रत्येक भारतीयांच्या सुरक्षेची काळजी घेत आहे. भारताकडे 250 हून अधिक स्पेस स्टार्ट आहेत. आमच्याकडे आधुनिक सॅटेलाईट टेक्नॉलॉजी आहे. महिला शास्त्रज्ञांकडून आमच्या मिशनचं नेतृत्व केलं जात आहे, ही मोठी गोष्ट आहे असं मोदी म्हणाले.

लवकरच भारताचं स्पेस स्टेशन असेल . 2040 पर्यंत भारतीय पाऊल चंद्रावर असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. प्रत्येक भारतीयांसााठी सॅटेलाईट काम करणार, असंही मोदी म्हणाले.

चीनच्या ‘ऑपरेशन’ सिंदूर जिव्हारी! पाकिस्तानची बाजू घेत भारताला केलं मोठं आवाहन

0

भारतीय लष्कराने थेट पाकिस्तानात आणि पाकव्याप्त काश्मिरमध्ये घुसून केलेली कारवाई चीनच्या नाकाला झोंबल्याचं पाहायला मिळत आहे. तर आधी दहशतवादावर कठोर कारवाई करण्याची भूमिका घेणाऱ्या अमेरिकेने देखील भारतीने केलेल्या कारवाईवर ‘इट इज शेम’ अशी प्रतिक्रिया दिली आहे. अशातच आता भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सुरू तणावाबाबत बोलताना चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने भारताने केलेली लष्करी कारवाई दुर्दैवी असल्याचं म्हणत पाकिस्तानची बाजू घेतली आहे.

शिवाय ऑपरेशन सिंदूरमुळे सद्यस्थितीबाबत आम्ही चिंतेत आहोत. भारत आणि पाकिस्तान हे एकमेकांचे शेजारी देश असून ते चीनचेही शेजारी आहेत असं म्हणतच चीन सर्व प्रकारच्या दहशतवादाचा विरोध करतो, असंही चीनने म्हटलं आहे. दरम्यान, दोन्ही देशांनी शांततेच्या दृष्टीने विचार करावा, संयम बाळगावा परिस्थिती अधिक गुंतागुंतीची होईल असं कोणतंही पाऊल उचलू नये, असं आवाहान देखील त्यांनी यावेळी दोन्ही देशांना केलं आहे.

त्यामुळे सदैव दहशताद्यांना पाठीशी घालणाऱ्या पाकिस्तानवर कारवाई केल्यानंतर चीन नेहमीप्रमाणे पाकिस्तानला पाठीशी घालत असल्याचं पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे आज भारतीय लष्काराने पत्रकार परिषद घेत तपासात पहलगाम येथील हल्ला करणारे दहशतवादी आणि पाकिस्तान यांच्यात असणारे संबंध उघडकीस आल्याचं स्पष्ट केलं आहे.

अमित शहांची ‘ऑपरेशन सिंदूर’ नंतर पहिली प्रतिक्रिया; मोठे संकेत देत…

0

पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील 26 निष्पाप नागरिकांच्या हत्येचा बदला भारताने घेतला आहे. पाकिस्तानातील नऊ दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक करत भारताने पाकिस्तानला अद्दल घडवली आहे.या ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची पहिली प्रतिक्रिया आली असून त्यांनी मोठे संकेत दिले आहेत. जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिलला दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात 26 पर्यटकांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. त्याचा मध्यरात्री भारतीय लष्कराने बदला घेतला. पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मिरमधील दहशतवाद्यांची 9 ठिकाणे हवाई दलाच्या राफेल विमानांनी उध्वस्त केली.

‘ऑपरेशन सिंदूर’ यशस्वी झाल्यानंतर जगभरातील भारतीयांसह इतर काही देशांनीही भारतीय लष्करावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही सोशल मीडियात पोस्ट करत आपल्या सशस्त्र दलांचा अभिमान असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

शहांनी ट्विटवर पोस्ट करत म्हटले आहे की, आपल्या सशस्त्र दलांचा अभिमान आहे. ऑपरेशन सिंदूर हे पहलगाममध्ये आपल्या निष्पाप बांधवांच्या क्रूर हत्येला भारताने दिलेले प्रत्युत्तर आहे. भारत आणि येथील नागरिकांवर होणाऱ्या कोणत्याही हल्ल्याला सडेतोड उत्तर देण्याचा मोदी सरकारचा निर्धार आहे.

शहांनी ट्विटरमध्ये सूचक विधान करताना भारत आणखी मोठी कारवाई करू शकते असेही संकेत दिले आहेत. दहशतवादाला मुळापासून नष्ट करण्यासाठी भारताने दृढनिश्चय केल्याचे शहांनी म्हटले आहे. त्याचप्रमाणे माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांनीही ‘पिक्चर अभी बाकी है’ असे ट्विट करत भारताकडून पुन्हा हल्ला केला जाऊ शकतो, असे सूचक संकेत दिले आहेत.

दरम्यान, पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान अद्द्ल घडविणार असल्याचे स्पष्ट केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमधील कार्यक्रमात याबाबत जाहीरपणे भाष्य केले होते. त्यानंतर शहांसह केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही करारा जवाब दिला जाईल, असे स्पष्ट केले होते. त्यानुसार मध्यरात्री एअर स्ट्राईकच्या माध्यमातून भारताने पाकिस्तानला धडा शिकवला आहे.

‘ऑपरेशन सिंदूर’ची मोठी बातमी : मसूद अजहरचं आख्खं कुटुंब संपलं, भाऊ, बहिणीसह 14 जण यमसदनी!

0

भारताने पाकव्याप्त काश्मीरसह पाकिस्तानातल्या दहशतवाद्यांच्या नऊ तळांवर मध्यरात्री जोरदार आक्रमण करत ‘ऑपरेशन सिंदूर’ ही मोहीम फत्ते केली आहे.भारताने केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये अनेक दहशतवादी मारल्या गेल्याची माहिती समोर आली आहे. 22 एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम हल्ल्यानंतर भारत नक्कीच मोठी कारवाई करेल याची कल्पना असताना भारतीय सैन्यानं अचूक वेळ साधत दहशतवाद्यांसह पाकिस्तानलाही धडा शिकवला आहे. अशातच या एअर स्ट्राईकच्या आघाताचे पडसाद सोमोर येत असताना या संदर्भात अतिशय महत्वाची माहिती समोर आली आहे. भारताच्या या हल्ल्यात देशाचा सर्वात मोठा शत्रू असलेल्या मसूद अजहरचं आख्खं कुटुंब संपलं असल्याची माहिती समोर आली आहे.

मसूद अझहरच्या भाऊ, बहिणीसह 14 जणांना मृत्यू

पुढे आलेल्या माहितीनुसार, पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर भारतीय हवाई दलाने हल्ला करत दहशतवाद्यांच्या तळाला लक्ष्य केलं आहे. यातील एका तळावर वास्तव्यास असलेल्या मसूद अझहरच्या कुटुंबातील 14 सदस्यांचा मृत्यू झाला असल्यावची माहिती समोर आली आहे. सोबतच या हल्यात मसूद अझहरचा भाऊ रौफ असगर हा गंभीर जखमी झाला आहे. तर ठार झालेल्यांमध्ये मसूद अझहरचा भाऊ आणि भारताचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी रौफ असगरचा मुलगा हुजैफा यांचा देखील समावेश असल्याची माहिती पुढे आली आहे.

मसूद अझहरने आजवर भारताविरुद्ध अनेक वेळा मोठे कट रचले आहेत. मौलाना मसूद अझहर हा पाकिस्तानमध्ये वाढलेल्या जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा प्रमुख आहे. 2001 मध्ये संसदेवरील हल्ल्याचा कट त्यानेच रचला होता. यासह उरी हल्ल्यातही मसूद अझहर हाच सूत्रधार होता. गेल्या वर्षी जानेवारीमध्ये पठाणकोट येथील लष्कराच्या तळावरील हल्ल्यातही त्यांनी भूमिका बजावली होती.

भारताकडून कोणत्या 9 ठिकाणांवर एअर स्ट्राईक?

(India Air Strike On Pakistan)

1. बहावलपूर जैश-ए-मोहम्मदचे मुख्यालय (आंतरराष्ट्रीय सीमेपासून 100 किमी अंतरावर)

2. मुरीदके लष्कर-ए-तैयबाचे मुख्यालय (सीमेपासून 30 किमी अंतरावर)

3. सवाई लश्कर-ए-तोयबाचा अड्डा (सीमेपासून 30 कि.मी.दूर)

4. गुलपूर दशतवाद्यांचा अड्डा ताबारेषेपासून 35 कि.मी. दूर (हल्ल्यावेळी 80 दहशतवादी)

5. बिलाल जैश-ए-मोहम्मदचं हवाई तळ (सीमेपासून 35 कि.मी.दूर)

6. कोटली नियंत्रण रेषेपासून 15 किमी अंतरावर (50 दहशतवादी उपस्थित होते.)

7. बरनाला दहशतवाद्यांचा अड्डा (सीमारेषेपासून 10 कि.मी.दूर)

8. सरजाल जैश-ए-मोहम्मद चा अड्डा (सीमेपासून 8 कि.मी.दूर)

9. महमूना हिजबुल्लाचं प्रशिक्षण केंद्र (सीमेपासून 15 कि.मी.दूर)

सर्वाधिक दहशतवाद्यांची उपस्थिती असलेले तळ केले बेचिराख-

बहावलपूरमध्ये 250 हून अधिक दहशतवादी

मुरिदकेमध्ये 120 हून अधिक दहशतवादी

मुजफ्फराबादमध्ये 110 ते 130 दहशतवादी

कोटलीमध्ये 75 ते 80 दहशतवादी

सियालकोटमध्ये 90 ते 100 दहशतवादी

गुलपूरमध्ये 75 ते 80 दहशतवादी

भिंबरमध्ये 60 हून अधिक दहशतवादी

चाक अम्रूमध्ये 70 ते 80 दहशतवादी

भारताचा जबरदस्त एअर स्ट्राईक; दहशतवादी मौलाना मसूद अजहरचा मदरसा उद्ध्वस्त, ‘जैश’चे मुख्यालयही नष्ट

0

भारताने जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेत मंगळवारी रात्री दीडच्या सुमारास ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील 9 दहशतवादी तळांवर क्षेपणास्त्रांनी हल्ला केला. बहावलपूर, कोटली आणि मुजफ्फराबाद येथे भारतीय लष्कराने हल्ले केले. यामध्ये सर्वात मोठा हल्ला बहावलपूर येथे करण्यात आला. या हल्ल्यात दहशतवादी मौलाना मसूद अजहरचा मदरसा पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे.

पाकिस्तानच्या टीव्ही चॅनेलची कबुली

एका पाकिस्तानी टीव्ही चॅनेलनं म्हटलंय, की “बहावलपूरचे संपूर्ण आकाश लालसर दिसत आहे. पोलीस आणि बचावपथके घटनास्थळी पोहोचली आहेत. मोठ्या संख्येने सुरक्षा यंत्रणांचे अधिकारी दाखल झाले आहेत. मदरशावर चार क्षेपणास्त्रे डागण्यात आल्याची पुष्टी झाली आहे.”

बहावलपूरच्या विध्वंसाचे व्हिडिओ व्हायरल

सोशल मीडियावर बहावलपूरमधील विध्वंसाचे व्हिडिओ झपाट्याने व्हायरल होत आहेत. एका युवकाचा व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये तो म्हणतो, “भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध सुरू झाले आहे. माझ्या बहावलपूर शहरावर बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांनी हल्ला झाला आहे. मौलाना मसूद अजहरच्या मदरशावर चार क्षेपणास्त्रे डागण्यात आली आहेत.”

मदरसे रिकामे करण्याचे आदेश

हल्ल्यानंतर बहावलपूरमध्ये मदरसे रिकामे करण्यात आले असून मोठ्या संख्येने लोक रस्त्यांवर दिसून येत आहेत. एका व्हिडिओमध्ये एक युवक म्हणतो, की सर्व मदरसे रिकामे करण्यात आले असून, मध्यरात्रीच अफवांचे वातावरण निर्माण झाले.

जैश-ए-मोहम्मदचे मुख्यालय नष्ट

जैशचे मुख्यालय सुमारे 200 एकरमध्ये पसरलेले होते. ज्यात एक मशीद, शाळा, रुग्णालय, शेती फार्म आणि एक ट्रेनिंग कॅम्प होता. भारतीय लष्कराच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे हे मुख्यालय संपूर्णपणे नष्ट झाले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, बहावलपूरसह पीओकेमधील मुजफ्फराबाद, कोटली, बाघ, मुरीदके, गुलपूर, महमूना, जोया आणि बिबर येथे भारतीय फाइटर जेट्सनी हल्ले केले.

पहिला हल्ला रात्री १२:३० वाजता

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिला क्षेपणास्त्र हल्ला रात्री १२:३० वाजता करण्यात आला. या हल्ल्यात लष्कर-ए-तोयबाच्या अनेक वरिष्ठ नेत्यांचा खात्मा झाला असून, हाफिज सईदचा मुलगा ताल्हा सईद याच्या नेतृत्वातील टॉप कमांडर्स मारले गेले आहेत.