Home Blog Page 94

आत्ता भारत-पाक युद्ध अटळच?; रडार सिस्टिम पूर्णपणे उद्ध्वस्त अमेरिकेचा मोठा निर्णय लाहोर सोडा किंवा जीव वाचवा…

0

पहलगामध्ये झालेल्या दहशवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले आहेत.  पण मोठी बातमी समोर येत आहे, भारतानं केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये पीओकेमधील 5 तर पाकिस्तानमधील 4 दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले. भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचा चांगलाच जळफळाट झाला आहे. पाकिस्तानकडून बुधवारी भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. मात्र त्यानंतर आता पाकिस्तानला त्याची मोठी किंमत चुकवावी लागली आहे.

पाकिस्ताननं भारतावर हल्ल्याचा प्रयत्न केला, त्यानंतर भारतानं आज सकाळपासून पाकिस्तानवर ड्रोन हल्ल्याला सुरुवात केली आहे. भारतानं पाकिस्तानच्या 12 शहरांवर ड्रोन हल्ला केला आहे, आतापर्यंत पाकिस्तानवर पन्नास ड्रोन हल्ले करण्यात आले आहेत. भारतानं पाकिस्तानच्या लाहोरमधील रडार सिस्टिम पूर्णपणे उद्ध्वस्त केली आहे. पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, त्याला प्रत्युत्तर म्हणून त्यांची रडार सिस्टिम उद्ध्वस्त करण्यात आल्याची माहिती भारताच्या संरक्षण विभागाकडून देण्यात आली आहे.

दरम्यान आता एक मोठी बातमी समोर आली आहे, भारतानं पाकिस्तानवर केलेल्या ड्रोन हल्ल्यानंतर आता अमेरिकेनं मोठा निर्णय घेतला आहे. अमेरिकेनं पाकिस्तानमधील आपल्या नागरिकांना पाकिस्तान सोडण्याच्या सूचना दिल्या आहेत. लाहोर सोडा किंवा जीव वाचवा असं अमेरिकन सरकारनं आपल्या पाकिस्तानमधील नागरिकांना सांगितलं आहे. पाकिस्तान दुतावासातील अमेरिकन अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत, त्यामुळे काहीतरी मोठं घडणार असल्याचे  संकेत मिळत आहेत.

पाकिस्तानकडून हल्ल्याचा प्रयत्न

भारतानं ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तामधल्या दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. पीओके आणि पाकिस्तानमध्ये असलेले एकूण 9 दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले आहेत, या कारवाईनंतर पाकिस्तानचा चांगलाच जळफळाट झाला. पाकिस्तानने भारतावर हल्ल्याचा प्रयत्न केला. मात्र त्यानंतर आता भारतानं पुन्हा एकदा पाकिस्तानच्या घरात घुसून प्रत्युत्तर दिलं आहे. लाहोरमधील रडा सिस्टिम भारतानं उद्ध्वस्त केली आहे, पाकिस्तानच्या बारा शहरांवर भारताकडून 50 ड्रोन हल्ले करण्यात आले आहेत. त्यानंतर अमेरिकेनं पाकिस्तानमधील आपल्या नागरिकांना पाकिस्तान सोडण्याच्या सूचना दिल्या आहेत. लाहोर सोडा किंवा जीव वाचवा असं अमेरिकनं सरकारनं म्हटलं आहे.

“राष्ट्रवादी दोन्ही गटांनी एकत्र येण्याचा निर्णय आता…”, शरद पवार म्हणाले भवितव्याबद्दल दोन विचाराचे लोक

0

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वक्तव्यानं राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. शरद पवार आणि त्यांचे पुतणे अजित पवार पुन्हा एकत्र येणार का? असा प्रश्न आता यानंतर निर्माण झाला आहे. शरद पवार यांनी ऑफ द रेकॉर्ड बोलताना याबद्दलचं मत मांडल्याची माहिती आहे. जर एनसीपीचे दोन्ही गट एकत्र आले तर त्यात आश्चर्य वाटण्याचं काही कारण नाही. याबाबतचा अंतिम निर्णय पुढील पिढीच्या नेत्यांनीच घ्यायचा आहेृ असं पवार म्हणाले.

शरद पवार म्हणाले, “सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांनी एकत्र येण्याबाबतचा निर्णय घ्यावा. दोन्ही गटांची विचारधारा जवळपास एकसारखीच आहे. मी स्वतःला या प्रक्रियेतून बाहेर ठेवतोय.”

पक्षात दोन विचारधारा – शरद पवार

एनसीपी (SP) च्या भवितव्याबद्दल विचारलं असता, शरद पवार यांनी ‘इंडियन एक्सप्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होतं की, “पक्षात दोन विचार आहेत. एक म्हणजे, आपण पुन्हा एकत्र यावं. दुसरा म्हणजे, पक्षाचे काही लोक थेट भाजपसोबत जाऊ इच्छित नाही. इंडिया आघाडीला पुन्हा मजबूत करावं असं त्यांना वाटतं.”

शरद पवार पुढे म्हणाले की, इंडिया आघाडी सध्या सक्रिय नाही. त्यामुळे आपल्या पक्षाला पुन्हा संघटित करावं लागेल. पक्षाची पुनर्बांधणी करावी लागेल. तरुणांना सामील करून घ्यावं लागेल आणि कामाला लागावं लागेल. माजी मुख्यमंत्री शरद पवार यांनी स्पष्ट केलं की, आमचा विचार विरोधी पक्ष म्हणून काम करण्याचा आहे. भाजपला पर्याय म्हणून विश्वासार्ह शक्ती निर्माण करायची आहे.

अजित पवारांशी भेट राजकीय नव्हती – शरद पवार

अलीकडेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी झालेल्या भेटीवर शरद पवार बोलले. ती भेट राजकीय नव्हती. आम्ही शैक्षणिक संस्थांसह अनेक संस्थांमध्ये त्यांच्यासोबत, एनडीएसोबत, डाव्या पक्षांसोबत काम करतो आणि ते सुरू ठेवू,” असं पवारांनी सांगितलं होतं.

जुलै 2023 मध्ये राष्ट्रवादीत पडली होती फूट

जुलै 2023 मध्ये एनसीपीत फूट पडली होती. अजित पवार यांनी शरद पवार यांची साथ सोडली आणि अनेक आमदारांसह शिवसेना-भाजप आघाडीच्या सरकारमध्ये सामील झाले. तेव्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते आणि अजित पवार उपमुख्यमंत्री बनले. या बंडखोरीचा वाद निवडणूक आयोगापर्यंत गेला. आयोगानं अजित पवार यांच्या गटाला खरी एनसीपी मानलं, तर शरद पवार यांच्या पक्षाला ‘NCP-SP’ असं नाव देण्यात आलं. दोन्ही गट एकत्र येण्याच्या चर्चा अनेकदा होत असतात. त्यातच आता शरद पवार यांनी पुन्हा एकदा आपली भूमिका मांडली आहे.

भारतीय एस 400 ‘सुदर्शन चक्र’ चाललं; क्षेपणास्त्र विरोधी हवाई संरक्षणाने नापाक मनसुब्यावर पाणी फिरलं

0

नवी दिल्ली: भारताने दहशतवाद्यांच्या तळावर हल्ले केल्यानंतर बिथरलेल्या पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पण, भारताच्या सुदर्शन चक्राने पाकिस्तानचा हल्ला परतवून लावला. रशियन बनावटीच्या एस 400 या क्षेपणास्त्र विरोधी हवाई संरक्षण यंत्रणेने पाकिस्तानच्या नापाक मनसुब्यावर पाणी फेरलं.

भारतीय हवाई दलाने काल रात्री देशाच्या हवाई सुरक्षेच्या इतिहासात अत्यंत निर्णायक पाऊल उचलले. S-400 ‘सुदर्शन चक्र’ हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणालीच्या मदतीने भारताच्या दिशेने हालचाल करणाऱ्या लक्ष्यांवर अचूक हल्ला करत त्यांना यशस्वीरित्या निष्प्रभ करण्यात आले, अशी माहिती संरक्षण क्षेत्रातील अनेक तज्ज्ञांनी ANI या वृत्तसंस्थेला दिली आहे.

हल्ला झालेल्या लक्ष्यांचा तपशील अद्याप उघड करण्यात आलेला नसला, तरी ते संभाव्य घातक आणि भारताच्या सीमावर्ती सुरक्षेला धोका पोहोचवणारे होते, असे मानले जात आहे. ही कारवाई रात्री उशिरा करण्यात आली. एक किंवा अधिक क्षेपणास्त्रे, हवाई हल्ले वेगाने भारताच्या दिशेने सरकत होती.

दरम्यान, या मोठ्या संरक्षण कारवाईबाबत अधिकृत शासकीय पुष्टी अद्याप आलेली नाही, मात्र सुरक्षा यंत्रणा आणि गुप्तचर स्रोतांच्या माहितीनुसार, ही यशस्वी कारवाई भारताच्या हवामानात अचूकतेने कार्य करणाऱ्या S-400 प्रणालीमुळे शक्य झाली.

S-400 ‘सुदर्शन चक्र’ ही भारताने रशियाकडून खरेदी केलेली अत्याधुनिक हवाई संरक्षण प्रणाली आहे, जी 400 किमी अंतरावरूनही लक्ष्य भेदू शकते. सध्या भारताच्या हवाई संरक्षण व्यवस्थेत ही प्रणाली एक ‘गेम चेंजर’ ठरली आहे.

S-400 हवाई संरक्षण प्रणाली ही भारताच्या लष्करी सज्जतेचा एक महत्त्वाचा भाग बनली आहे. 2018 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियन अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यात झालेल्या करारानंतर भारताने तब्बल 5 अब्ज डॉलर्समध्ये ही प्रणाली विकत घेतली. यातील काही युनिट्स भारतात आधीच दाखल झाल्या आहेत आणि संवेदनशील सीमावर्ती भागांमध्ये तैनातही करण्यात आल्या आहेत.

ही प्रणाली 40 किलोमीटर ते थेट 400 किलोमीटरपर्यंत कुठल्याही हवाई हल्ल्याचा सामना करू शकते. एवढंच नव्हे तर, अमेरिकेचा ‘अदृश्य’ समजला जाणारा F-35 फायटर जेटही S-400 च्या टप्प्यातून सुटू शकत नाही, असं मानलं जातं.

दहावीचा निकाल कधी? संभाव्य तारखेबाबत बोर्डाकडून आली मोठी अपडेट

0

बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता दहावी (SSC) च्या विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल कधी लागेल, याची सर्व विद्यार्थ्यांसह पालक आणि शिक्षकांनाही उत्सुकता आहे. महाराष्ट्र बोर्ड लवकरच दहावीचा निकाल त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर mahahsscboard.in वर जाहीर करणार आहे. SSC निकाल2025 लिंकच्या मदतीने विद्यार्थी आपली मार्कशीट ऑनलाइन पाहू शकतात. जाणून घ्या, महाराष्ट्र बोर्डाचा 10 वीचा निकाल कधी जाहीर होईल.

दहावीचा निकाल 2025 कधी लागेल?

दहावीचा निकाल पुढच्या आठवड्यात, 15 मेपर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे. याबाबत बोर्डाने अद्याप अधिकृत घोषणा केलेली नाही. तथापि, बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर 10 दिवसांच्या आत दहावीचा निकाल जाहीर होईल, असं बोर्डाने पूर्वी सांगितलं होतं. यामुळे आता विद्यार्थ्यांमध्ये निकालाबाबत उत्सुकता वाढली आहे

दहावीचा निकाल कसा डाउनलोड करायचा?

महाराष्ट्र बोर्डाचा एसएससी निकाल विद्यार्थ्यांना ऑनलाईन चेक करण्यासाठी खालील सोप्या पद्धतींचा वापर करावा लागेल:

सर्वप्रथम, महाराष्ट्र बोर्डाची अधिकृत वेबसाइटवर जा:

www.mahahsscboard.in

mahresult.nic.in

hscresult.mkcl.org

वेबसाइट उघडल्यानंतर, “Maharashtra State Board, SSC Examination February 2025 Result” या विभागात View SSC Result या लिंकवर (लिंक सक्रिय झाल्यानंतर).

त्यानंतर, तुमच्यासमोर निकाल डॅशबोर्ड उघडेल.

येथे तुमचा सीट नंबर आणि आईचं नाव (Mothers First Name) भरून View Result या बटणावर .

तुमचं एसएससी निकाल स्क्रीनवर दिसेल.

त्याचा पीडीएफ डाउनलोड करा आणि तो सुरक्षित ठेवा, जोपर्यंत तुम्हाला तुमची खऱ्या मार्कशीट मिळत नाही.

अकरावी प्रवेशप्रक्रिया 2025 अपडेट

शालेय शिक्षण विभागाने 2025-26 शैक्षणिक वर्षासाठी अकरावी प्रवेशासाठी वेळापत्रक जाहीर केले आहे. राज्यभरातील सर्व उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये केंद्रीय ऑनलाइन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबवली जाईल.

विद्यालयांसाठी माहिती पोर्टलवर भरण्याची प्रक्रिया 8 मेपासून सुरू होईल. विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन अर्ज आणि प्रोफाइल तयार करण्याची सुविधा 19 मेपासून सुरू होईल. विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशासाठी आवश्यक माहिती भरून, 19 मेपासून ऑनलाइन अर्ज करण्याची संधी मिळणार आहे.

कारगिल गाजवणाऱ्या मोकाटे बंधूंची गर्जना, पाकड्यांना धडकी भरवणारा निर्धार ‘देश पुन्हा बोलावेल, तर सज्ज’

0

नगर तालुक्यातील सुभेदार मेजर, ऑर्डिनरी लेफ्टनंट बाळासाहेब मोकाटे व हवालदार सुंदर मोकाटे या दोघा सख्ख्या भावांनी कारगिल युद्धावेळी राखीव सैन्यदलात राहून प्रत्यक्ष सीमेवर लढणाऱ्या सैन्यासाठी दारुगोळा व शस्त्रसाठा पुरवण्याचे काम केले. त्यानंतर बाळासाहेब मोकाटे यांनी कारगिल द्रास भागात सुमारे दोन वर्षे निगराणी ठेवून शत्रूला एक इंचभरही हालचाल करण्यास संधी दिली नाही, तर सुंदर मोकाटे यांनी जव्हार टनेल भागातील अनंतनाग व बनियाल भागात अतिरेकी कारवायांना पायबंद घालत अनेक अतिरेक्यांना यमसदनी पाठवण्याची कामगिरी बजावली.

नगर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील इमामपूर या छोट्याशा गावातील खंडू आसाराम मोकाटे यांना गोविंद, बाळासाहेब व सुंदर मोकाटे ही तीन मुलं. गोविंद मोकाटे हे बांधकाम व्यवसायाकडे वळाले. त्यांनी नंतर पंचायत समिती सदस्य म्हणूनही काम केले. बाळासाहेब मोकाटे व सुंदर मोकाटे हे दोघे सैन्य दलात दाखल झाले. कारगिल युद्धा वेळी बाळासाहेब व सुंदर मोकाटे हे पश्चिम बंगालमधील बागडोगरा येथे पाच मराठा लाईट इन्फंट्री युनिटमध्ये तैनात होते.

युद्धावळी त्यांच्या युनिटला जम्मू, श्रीनगर भागातील युद्धभूमी जवळ पाचारण करण्यात आले. प्रत्यक्ष युद्धकाळात सीमेवरील सैनिकांना शस्त्रसाठा पुरविण्याची जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आली. युद्धानंतर मात्र 2003 ते 2005 या काळात बाळासाहेब मोकाटे हे ज्या ठिकाणी कारगिल युद्ध घडले, त्याच युनिटवरती तैनात होते. सुमारे 25 डिग्री सेल्सिअस तापमानात डोळ्यात तेल घालून रात्रं-दिवस शत्रूवर नजर ठेवण्याचे काम त्यांनी केले. या काळात आमच्या युनिटमधील एकही सैनिक साधा जखमीही होऊ दिला नाही. परंतु आमच्या युनिटने शत्रू राष्ट्राचे अनेक बंकर उद्ध्वस्त केल्याचे बाळासाहेब मोकाटे यांनी अभिमानाने सांगितले.

त्याच वेळी सुंदर मोकाटे यांनी राष्ट्रीय रायफलमध्ये काम करत जव्हार टनेल जवळील बनियाल, अखनूर भागात अतिरेक्यांना शोधून त्यांना यमसदनी धाडले.

बाळासाहेब मोकाटे हे 31 वर्षांच्या सेवेनंतर सैन्य दलातून सेवानिवृत्त झाले. सध्या ते पत्नी नंदा यांच्यासह शेती करत आहेत. त्याचप्रमाणे स्पर्धा परीक्षा देऊन शासकीय सेवेत जाण्यासाठी ते तयारी करत आहेत. सैन्य दलातील जम्मू काश्मीर, मणिपूर, नागालँड अशा दुर्गम भागात कठीण परिस्थितीत देश सेवा केली. सेवा काळात बाळासाहेब मोकाटे यांना दहा, तर सुंदर यांना सहा पदके मिळाली.

सुंदर मोकाटे यांनी भारतीय सैन्य दलाच्या वतीने दक्षिण आफ्रिकेमध्ये सहा महिने शांती सेनेत काम केले. सुंदर यांच्या पत्नीचे नाव सविता आहे. ते सध्या पुणे जिल्ह्यात खासगी नोकरी करत आहेत. दोघा माजी सैनिकांसह संपूर्ण मोकाटे कुटुंबियांना देशाबद्दल प्रचंड अभिमान आहे. देशाने परत युद्धभूमीवर लढाईसाठी बोलावले, तर जाण्याची तयारी असल्याचे मोकाटे बांधवांनी अभिमानाने सांगितले.

सापळाच उरत होता…

बाळासाहेब मोकाटे यांच्या कारगिल भागातील आठवणी बाबत सांगताना अंगावर शहारे येत होते. या भागात उणे 25 डिग्री तापमानात पाणी पिण्यासाठी बर्फ तोडून तो गॅसवर किंवा केरोसीनच्या शेगडीवर गरम करून वितळावा लागत होता. ऑक्सिजन कमी मिळत असल्याने धाप लागत होती. दहा पावलं जरी चाललं तरी दहा मिनिटं थांबावच लागत होतं. ऑक्सिजन कमी असल्यामुळे जेवणही जात नव्हते. नेहमीच्या तुलनेत अवघे 25% जेवण जात होते. एक वर्षाच्या सेवेनंतर खाली बेस कॅम्प वरती येताना अक्षरशः हाडाचा सापळा राहत होता, अशी माहिती बाळासाहेब मोकाटे यांनी दिली. अतिरेक्यांची शोध मोहीम सुरू असताना जीव मुठीत धरून हालचाली कराव्या लागत होत्या, असेही सुंदर मोकाटे यांनी सांगितले.

टीम इंडियाला धक्का कर्णधार हिटमॅनचा कसोटी क्रिकेटला अलविदा; रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती

0

या क्षणाची मोठी बातमी समोर आली आहे. टीम इंडियाचा कर्णधार आणि अनुभवी फलंदाज रोहित शर्मा याने टी 20Iनंतर कसोटी क्रिकेटमधूनही तडकाफडकी निवृत्ती जाहीर केली आहे. रोहित शर्मा याने सोशल मीडियावरुन इंस्टा स्टोरी पोस्ट करत याबाबतची माहिती दिली आहे. रोहितने एकाएकी घेतलेल्या या निर्णयामुळे क्रिकेट चाहत्यांना मोठा झटका लागला आहे. रोहितने निवृत्ती जाहीर करण्याआधी त्याला कसोटी संघाच्या कर्णधारपदावरुन हटवण्याची चर्चा सुरु होती. रोहितने या दरम्यानच निवृत्त होत असल्याचा बॉम्ब टाकला आणि विषय संपवला.

रोहितने इंस्टा स्टोरीत काय म्हटलं?

“रोहित शर्माने इंस्टा स्टोरीत त्याच्या 280 क्रमांकाच्या टोपीचा फोटो पोस्ट केला आहे. मी कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होत आहे. भारतीय संघाचं कसोटी क्रिकेटमध्ये प्रतिनिधित्व करणं ही माझ्यासाठी सन्मानाची बाब आहे. मी तुमच्या प्रेमासाठी आणि पाठींब्यासाठी आभारी आहे”, असं रोहितने या इंस्टा स्टोरीत नमूद केलंय.

रोहित शर्माची कसोटी कारकीर्द

रोहित शर्मा याने 6 नोव्हेंबर 2013 रोजी कोलकातामधील इडन गार्डन्समध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध कसोटी पदार्पण केलं होतं. रोहितने तेव्हापासून गेली 12 कसोटी संघांचं प्रतिनिधित्व केलं. तसेच रोहितने या दरम्यान काही वर्ष भारतीय संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळली. रोहितने 67 कसोटी सामन्यांमधील 116 डावांमध्ये 57.08 या स्ट्राईक रेटने आणि 40.58 च्या सरासरीने 4 हजार 302 धावा केल्या आहेत. रोहितने या दरम्यान 88 षटकार आणि 473 चौकार लगावले. रोहितने 12 वर्षांच्या कसोटी कारकीर्दीत 18 अर्धशतकं, 12 शतकं आणि 1 द्विशतक झळकावलं होतं. रोहितची 212 ही कसोटीतील सर्वोच्च धावसंख्या होती.

रोहितची कसोटी कर्णधार म्हणून कामगिरी

रोहितने 2022-2024 दरम्यान एकूण 24 सामन्यांमध्ये भारतीय कसोटी संघाचं नेतृत्व केलं. रोहितने टीम इंडियाला आपल्या नेतृत्वात 24 पैकी 12 सामन्यांमध्ये विजय मिळवून दिला. तर 9 वेळा पराभवाचा सामना करावा लागला. तर 3 सामने अनिर्णित राहिले. रोहितची कर्णधार म्हणून 57.14 अशी विजयी टक्केवारी राहिली.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचं उपविजेतेपद

रोहितने टीम इंडियाला त्याच्या नेतृत्वात 2021-2023 या वर्ल्ड टेस्ट चॅम्पनशीप स्पर्धेचं उपविजेतेपद मिळवून दिलं होतं. भारताला या डब्ल्यूटीसी फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने पराभूत केलं. त्यामुळे भारताला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं होतं.

भारतीय महिलांच्या प्रतिनिधी जगासमोर उदाहरण ठेवले; देश सर्वप्रथम म्हणत ठाम उभ्या राहणाऱ्या कर्नल सोफिया कुरैशी! 

0

पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेत भारताने पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राइक केला. त्या संपूर्ण ऑपरेशन सिंदूरची माहिती माध्यमांना देण्यासाठी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री, कर्नल सोफिया कुरैशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंह या दोन महिला अधिकाऱ्यांचा समावेश होता. उत्कृष्ट प्रेस ब्रिफिंग तर त्यांनी दिलेच पण भारतीय महिला किती उत्तुंग कामिगिरी करु शकतात याचे उदाहरणही जगासमोर ठेवले. त्याहून महत्वाचे म्हणजे संकटकाळात भारतीय व्यवस्था, भारतीय सैन्यदलं आणि शासन कुठलाही भेदभाव न करता आपल्या सर्वोत्तम ताकदीसह जगाला सामोरे जातात आणि आपण एक आहोत याचं उदाहरण देतात त्याचंचं एक रुप म्हणजे कर्नल सोफिया कुरैशी!

अत्यंत कणखर आणि तरीही संयत भाषेत बोलणाऱ्या कर्नल सोफिया कुरैशी त्यांच्याविषयी अधिक माहिती शोधली तर समजते की कर्नल सोफिया कुरैशी मूळच्या गुजरातच्या. त्यांचा जन्म १९८१ साली गुजरातमधील वडोदरा या ठिकाणी झाला. बायोकेमिस्ट्रीमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले. सोफियांचे आजोबा हे सैन्य दलात होते. तर वडील काही वर्ष सैन्यात धार्मिक शिक्षक म्हणून काम करत. मेकॅनाइज्ड इन्फंट्रीचे लष्करी अधिकारी मेजर ताजु्द्दीन कुरेशी यांच्याशी त्यांचा विवाह झाला आहे.

२०१६ मध्ये कर्नल सोफिया कुरैशी यांनी पुण्यात झालेल्या बहुराष्ट्रीय लष्करी सराव- एक्सरसाइज फोर्स १८ या भारतीय लष्करी सरावात त्यांच्याकडे पहिल्यांदाच तुकडीचे नेतृत्व करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. त्या नेतृत्व करणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी होत्या. या सरावात १८ देशांचा समावेश होता. यावेळी शांतता अभियान आणि मानवतावादी माइन ॲक्शनवर लक्ष केंद्रित करण्यात आले. १८ तुकड्यांपैकी ४० सदस्यांच्या भारतीय तुकडीचे नेतृत्व करणारी ती एकमेव महिला होती.

२००६ मध्ये त्यांनी काँगोमधील संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमेत लष्करी निरीक्षक म्हणून काम केले. पंजाब सीमेवर ऑपरेशन दरम्यान तिच्या कार्याबद्दल जनरल ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ (जीओसी-इन-सी) यांनी दिला प्रशांसापत्र देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

सोफिया यांचे सर्जिकल स्ट्राइिक नंतरचे बोलणे, वागणे, नेतृत्व कायमच भारतीय महिलांच्या धिरोदात्त शौर्य आणि कर्तृत्वाची साक्ष देतील.

पुणे महापालिका निवडणुक मविआ विरुद्ध पुणे पॅटर्न का? निवडणूक राजकीय समीकरणे बदल; पुणे पॅटर्न पुन्हा चर्चेत

0

पुणे महापालिकेत २००७ साली काँग्रेसचे नेते सुरेश कलमाडी यांनी सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भाजप आणि शिंदेसेनेला बरोबर घेऊन पुण्यात सत्ता आणली होती.हा पुणे पॅटर्न राज्यात गाजला होता. आता राज्यातील सरकारमध्ये भाजपबरोबर शिंदेसेना आणि राष्ट्रवादीचा अजित पवार गट सहभागी झाला आहे. त्यामुळे आगामी पुणे महापालिकेच्या निवडणुकीत राजकीय समीकरणे बदलणार आहेत. पुणे महापालिकेतही हा पुणे पॅटर्न पुन्हा होणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

पुणे महापालिकेची २००७ साली निवडणूक झाली. त्यावेळी काँग्रेसचे नेते सुरेश कलमाडी आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यातून विस्तवही जात नव्हता. त्यामुळे सुरेश कलमाडी यांना काँग्रेसमधील सत्तेपासून रोखण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मोठी खेळी खेळली. त्यावेळी भाजपचे नेते विनोद तावडे आणि शिवसेनेचे तत्कालीन पुणे जिल्हा संपर्कप्रमुख अरविंद सावंत यांना विश्वासात घेतले. पुणे महापालिकेत काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेना, भाजपला बरोबर घेऊन पुणे पॅटर्न तयार केला होता. राष्ट्रवादीच्या राजलक्ष्मी भोसले पुण्याचा महापौर झाल्या होत्या. शिवसेनेला उपमहापौरपद आणि स्थायी समितीचे अध्यक्षपद दिले होते.

भाजपला स्थायी समितीचे अध्यक्षपद दिले होते. त्यावेळी राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात हा पुणे पॅटर्न मोठा गाजला होता. त्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा पुणे पॅटर्न तोडण्यात आला होता. त्यानंतर पुणे महापालिकेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र आली. त्यानंतर २०१२च्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची सत्ता आली. आघाडीने पाच वर्षे काम केले. २०१७च्या निवडणुकीत पालिकेत भाजपची एकहाती सत्ता आली.

महाविकास आघाडी विरुद्ध पुणे पॅटर्न अशी निवडणूक होऊ शकते

शिवसेनेमध्ये फूट पडली आहे. त्यामुळे शिंदेसेना आणि उद्धवसेना असे दोन गट पडले आहेत. आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आहे. त्यामुळे एक गट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बरोबर तर दुसरा गट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बरोबर जाणार आहे. काँग्रेस पक्ष उद्धवसेना आणि राष्ट्रवादीच्या शरद पवार यांच्या बरोबर आहे. त्यामुळे पुणे महापालिकेची आगामी निवडणूक महाविकास आघाडी आणि भाजप, शिंदेसेना आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गट या पुणे पॅटर्न विरुद्ध होण्याची दाट शक्यता आहे.

विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे अजित पवार आणि भाजपचे देवेंद्र फडणवीस यांनी पहाटे शपथविधी केला पण हे बंड राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोडून काढले. त्यानंतर भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्र येऊन महाविकास आघाडीचे सरकार राज्यात सत्तेवर आले. अडीच वर्षांनंतर शिवसेनेचे ४० आमदार फुटले. त्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री बनले. या सरकारला एक वर्ष पूर्ण झाले असतानाच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे २९ आमदारांसह शिंदेसेना आणि भाजप सरकारमध्ये सहभागी झाले.

पुणे महापालिकेत सध्या प्रशासक राज आहे. आता राज्यातही पुणे पॅटर्न झाला आहे. त्यामुळे पालिका निवडणूक भाजप स्वतंत्र लढविणार का?, शिंदेसेना आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला बरोबर घेऊन पुणे पॅटर्न म्हणून सामोरे जाणार का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

पुणे महापालिका प्रभाग ४ सदस्यीय नव्याने प्रभाग रचना; जनगणना न झाल्याचा असा फटका; संख्या ७ने कमी होणार

0

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यात घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे पुणे महापालिकेची निवडणूक होण्याचा मार्ग मोकळा झाला असून, इच्छुकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. पुणे महापालिकेची आगामी निवडणूक चार सदस्यीय प्रभाग रचनेनुसार होणार आहे. मात्र पुणे महापालिकेतून उरुळी देवाची आणि फुरसुंगी ही दोन गावे वगळल्यामुळे प्रभाग रचना नव्याने करावी लागणार आहे. पुण्यात प्रभाग संख्या ४२ राहणार असून, नगरसेवकांची संख्या १६६ राहणार आहे.

राज्य सरकारने यापूर्वी पुण्यासह राज्यात इतर महापालिका निवडणुकीसाठी एक सदस्याचा प्रभाग करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार निवडणूक आयोगाने महापालिकेला आदेश देऊन प्रभाग रचना करण्यास सांगितले होते. हे काम सुरू असतानाच एकऐवजी दोनचा प्रभाग होण्याच्या चर्चेने जोर पकडला होता. मात्र, राज्यातील तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत तीन सदस्यांचा प्रभाग करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर निवडणूक आयोगाने याबाबतचे आदेश जारी केले आहेत. त्यानुसार प्रभाग रचना तयार करून त्यावर हरकती सूचना घेऊन ती अंतिम करण्यात आली होती. आरक्षण सोडतही काढण्यात आली होती. त्यानंतर राज्यात सत्ताबदल झाला.

दरम्यान, महाविकास आघाडी सरकारने तीनचा प्रभाग रचना करून आपल्या सोयीनुसार मतदारसंघ केल्याचा आक्षेप भाजपने घेतला होता. महाविकास आघाडी सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांतील नियमबाह्य पद्धतीने वाढविलेली सदस्यसंख्या त्वरित रद्द करावी, अशी मागणी केली. त्यानंतर अनेक महापालिकांत प्रभागांची संख्या महाविकास आघाडी सरकारने वाढवली होती. ही वाढवलेली संख्याही कमी करण्याचा निर्णय तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत महापालिका निवडणुका २०१७ प्रमाणे चारचा प्रभाग करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र राज्य सरकारने १७ जानेवारी २०२२ रोजी काढलेल्या राजपत्र (गॅझेट)मध्ये प्रत्येक प्रभाग दोन पेक्षा कमी आणि चार पेक्षा जास्त नसावा, असेे नमूद केले आहे. हे राजपत्र रद्द करण्यात आलेले नाही. त्यामुळे प्रभाग रचना चार सदस्यीय होणार आहे.

नगरसेवकांची संख्या ७ ने कमी होणार

पुणे महापालिकेतील २०१७ च्या निवडणुकीत चार सदस्यांचा प्रभाग होता. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना त्यांनी तीनचा प्रभाग केला होता. त्यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थांची सदस्यसंख्या वाढविली होती. त्यामुळे नगरसेवकांची संख्या १७३ झाली होती. मात्र आता नगरसेवकांची संख्या १६६ होणार आहे. त्यामुळे नगरसेवकांची संख्या ७ ने कमी होणार आहे.

इच्छुकांच्या आशा पल्लवित

पुणे महापालिकेची मुदत १४ फेब्रुवारी २०२२ रोजी संपली. त्या अगोदर पालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचना एक, दोन आणि तीनची होणार यावर सातत्याने चर्चा झाली. अखेर महाविकास आघाडी सरकारने या निवडणुकीसाठी तीन सदस्यीय प्रभाग करण्याचा निर्णय घेतला. त्यावर आरक्षण सोडत घेऊन प्रभाग रचनाही जाहीर केली. या रचनेवरून भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या होत्या. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यात घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे पुणे महापालिकेची निवडणूक होण्याचा मार्ग मोकळा झाला असून इच्छुकांच्या आशा पल्लवित झाल्या आहे.

जनगणना न झाल्याचा फटका :

कोरोना संसर्गाच्या महामारीमुळे देशाची जनगणना झाली नाही. त्यामुळे २०११ ची लोकसंख्या गृहित धरली जाणार आहे. त्याचा फटका नगरसेवकांच्या संख्यावाढीला बसणार आहे. पुण्याची २०११ च्या जनगणनेनुसार लोकसंख्या ३५ लाख आहे. पण, मतदारांची नोंदणी सुरू आहे. त्यामुळे लोकसंख्या ३५ लाख आणि मतदारसंख्या ३२ लाख आहे. कदाचित मतदारांची संख्या अधिक वाढू शकणार आहे.

पुण्याची एकूण लोकसंख्या

३५ लाख ५६ हजार ८२४

अनुसूचित जाती (एसी)

४ लाख ८० हजार ०१७

अनुसूचित जमाती (एसटी) 

४१ हजार ५६१

भारताचा सर्जिकल हवाई हल्ल्यानंतर आणखी एक दणका मोठा फटका बसणार; पाकिस्तानचे जलसाठे नष्ट भारतीय सैन्याने हे धरणच उडवले

0

पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या 9 ठिकाणांवर हवाई हल्ले केले. या कारवाईत सुमारे शंभर दहशतवादी ठार झाल्याची माहिती आहे. या सर्जिकल स्ट्राईकनंतर भारतीय लष्कराने पाकला आणखी एक धक्का दिला आहे. पाकिस्तानच्या दाव्यानुसार, सर्जिकल स्ट्राईकनंतर भारतीय हवाई दलाने पाकिस्तानचे जलसाठे नष्ट केले आहेत.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, पाकिस्तानमधील 9 ठिकाणी केलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर भारतीय लष्कराने नीलम नदीच्या नीलम-झेलम धरणावर बॉम्ब टाकले. बॉम्बस्फोटामुळे धरणाचे मोठे नुकसान झाले आहे. पाकिस्तान येथे वीज निर्मिती करतो. नीलम व्हॅली भारतीय सीमेपासून फक्त 3 किमी अंतरावर आहे. हा भाग पाकव्याप्त काश्मीरचा आहे. पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानातील नीलम व्हॅली परिसर सर्वाधिक प्रभावित झाला आहे.

पाकिस्तानने काय म्हटले?

पाकिस्तानी सैन्याचे म्हणणे आहे की, सर्जिकल स्ट्राईकनंतर रात्री 2 वाजता नौसेरी धरणावर बॉम्ब टाकण्यात आला, ज्यामुळे धरणाचे नुकसान झाले. पाकिस्तानने याला आंतरराष्ट्रीय कायद्यांचे उल्लंघन म्हटले आहे. मात्र, भारताने अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

हल्ल्यात 100 हून अधिक दहशतवाद्यांचा मृत्यू

भारताने फक्त दहशतवाद्यांच्या ठिकाणांवरच हल्ले केले. भारताने केलेल्या हल्ल्यात 100 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात भारताने जैश-ए-मोहम्मदचे 4, लष्कर-ए-तोयबाचे 3 आणि हिजबुल मुजाहिदीनचे 2 तळ उद्ध्वस्त केले.

दरम्यान, भारताने पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक करण्याची ही पहिलीच वेळ नाही. 2016 मध्ये उरी आणि 2019 मध्ये पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यानंतर भारताने सर्जिकल स्ट्राईकही केले होते. उरी सर्जिकल स्ट्राईकमध्ये 250 दहशतवादी मारले गेले होते आणि बालाकोट सर्जिकल स्ट्राईकमध्ये 300 दहशतवादी मारले गेले होते.