Home Blog Page 6

मुंबई लोकल बॉम्बस्फोट ‘सुप्रीम’कडून उच्च न्यायालयाचा निकाल स्थगित; मात्र आरोपी पुन्हा तुरुंगात जाणार नाहीत

0

मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये २००६ साली झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी अलीकडेच मुंबई हायकोर्टानं मोठा निकाल दिला होता. सर्व आरोपी निर्दोष असल्याचं कोर्टानं म्हटलं होतं. उच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर सर्व आरोपींची सुटका झाली होती. पण हाय कोर्टाच्या या निकालावर आता सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिली आहे. त्यामुळे आता बाहेर आलेले सर्व आरोपी पुन्हा तुरुंगात जाणार की बाहेर राहणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.

पण तूर्तास सर्व आरोपी हे तुरुंगाच्या बाहेरच राहतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. सुप्रीम कोर्टात सरकारकडून नेमका काय युक्तीवाद करण्यात आला. याची माहिती देखील समोर आली आहे. भारत सरकारचे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी हाय कोर्टाच्या निर्णयावर स्थगिती आणण्याची मागणी केली. “आम्ही फक्त निकालावर स्थगिती मागत आहोत, आरोपींना पुन्हा तुरुंगात पाठवण्याची मागणी नाही”, असं तुषार मेहता यांनी कोर्टात सांगितलं.

यावर कोर्टाने म्हटलं की, “सर्व आरोपी आता जामिनावर सुटले आहेत, त्यांना पुन्हा तुरुंगात पाठवण्याचा प्रश्नच येत नाही. काही आरोपी पाकिस्तानी अधिकारी आहेत, त्यांचे काय? असा सवाल देखील कोर्टानं केलं. यावर मेहता म्हणाले, “ते अटक झालेले नाहीत, ते फरार आरोपी आहेत.” सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांची बाजू ऐकून घेतल्यानंतर सुप्रीम कोर्टाने हाय कोर्टाच्या निकालाला स्थगिती दिली आहे. मात्र आरोपींना पुन्हा तुरुंगात परत जाण्याची गरज नाही, असंही कोर्टाने म्हटलं आहे.

11 जुलै 2006 रोजी मुंबईच्या पश्चिम रेल्वे नेटवर्कवरील लोकल ट्रेनमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सात बॉम्ब स्फोट झाले होते, ज्यामुळे मुंबई शहर हादरले होते. या हल्ल्यात 180 हून अधिक निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला होता आणि अनेक जण जखमी झाले होते. या प्रकरणात दोषी ठरवण्यात आलेल्या 12 आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्त केले असून, अभियोजन पक्ष त्यांच्याविरोधात कोणताही गुन्हा सिद्ध करण्यात पूर्णपणे अपयशी ठरल्याचे न्यायालयाने नमूद केले. या हल्ल्याला 19 वर्षे पूर्ण झाल्यानंतर हा निकाल आला आहे, ज्यामध्ये 180 हून अधिक लोकांचा बळी गेला होता आणि अनेक जण जखमी झाले होते.

कर्वेनगरमध्ये आज रंगतोय आखाड स्पेशल ‘आनंद’ उत्सव; सन्मान सामाजिक भान ‘लाडक्या बहिणी’ही खुशच होणार

0

भारतरत्न डॉक्टर महर्षी कर्वे यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या हिंगणे बुद्रुक (कर्वेनगर) भूमीत सामाजिक जाणिवेचे भान ठेवून महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब व डॉ. आनंद (बंडूशेठ) तांबे यांच्या वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्ताने सामाजिक भान ठेवून ठेवून देशी फळझाडांचे वृक्षारोपण, रक्तदान व सर्वसामान्य रिक्षाचालकांसाठी लकी ड्रॉ अशा त्रिवेणी संगमाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.राज्यभर सर्वत्र आज आखाड समाप्तीची गटारी अमावस्या साजरी केली जात असताना पारंपरिक हिंदू सणाचे पावित्र्य कायम राखत घराघरांमध्ये हा हिंदू सण साजरा केला जावा यासाठी प्रत्येक रक्तदात्यासाठी १ किलो चिकन किंवा अर्धा किलो मलई पनीर किंवा टी-शर्ट अशी सप्रेम भेट योजना ठेवण्यात आल्यामुळे कर्वेनगर येथील हिंगणे होम कॉलनी परिसरामध्ये आखाड स्पेशल आनंद उत्सव साजरा केला जाणार हे मात्र नक्की!

महाराष्ट्राचे लोकप्रिय सहावे उपमुख्यमंत्री यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ‘आनंद’उत्सव साजरा करताना पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सलग सहाव्यांदा उपाध्यक्ष असलेले डॉक्टर आनंद उर्फ बंडूशेठ तांबे यांच्यावतीने हिंदू पारंपारिक सण गटारी अमावस्या घराघरात दीपोत्सव करताना आनंद उत्सवात साजरी केली जावी यामध्ये खारीचा वाटा म्हणून रक्तदान शिबिराच्या निमित्ताने पनीर वाटप असा उल्लेखनीय उपक्रम राबवला. रक्तदात्याला कोणत्याही (हेल्मेट ब्लूटूथ पावर बॅंक हेडफोन प्लास्टिक बाटल्या टी-शर्ट) वस्तू देण्यात आल्या तरी सुद्धा खरा रक्तदात्याचा सन्मान त्याच्या घरात होण्यासाठी गटारी अमावस्या या पवित्र सणाच्या निमित्ताने पनीर वाटप हा अभिनव उपक्रम राबवल्याने हिंगणे होम कॉलनी व कर्वेनगर परिसरातील ‘लाडक्या बहिणीं’कडूनही महाराष्ट्राची लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना दीर्घायुष्य मिळण्यासाठी नक्कीच शुभेच्छा मिळतील असे आयोजक डॉक्टर आनंद उर्फ बंडूशेठ तांबे यांनी सांगितले.

महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा वाढदिवस परिसरातील नागरिकांनी अत्यंत आनंद उत्सवामध्ये साजरा करावा यासाठी सुप्रसिद्ध गायक संजय मरळ प्रस्तुत मराठी हिंदी गाण्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम सायंकाळी 6 ते 8  आयोजित करण्यात आला असून संजय मरळ व डॉ. अनघा राजवाडे हे सुप्रसिद्ध कलाकार आपली कला सादर करणार आहेत. त्याबरोबरच महाराष्ट्राचे लाडके भाऊजी बाळकृष्ण नेहरकर यांच्या उपस्थितीत रिक्षा चालकांसाठीचा भव्य लकी ड्रॉ ही आयोजित करण्यात आला आहे. या लकी ड्रॉ मध्ये स्मार्ट वॉच, 3रिक्षा टायर, युनिफॉर्म(2शर्ट), रिक्षा संपूर्ण हुड, हेडफोन अशा रिक्षा चालकांसाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी दिल्या जाणार आहेत. याबरोबरच विशेष आनंदाची गोष्ट म्हणजे प्रत्येक सहभागी रिक्षा चालकांसाठी हमखास भेट म्हणून HSRP नंबर प्लेट ब्रॅकेट किंवा मीटर कव्हर कार्यक्रम स्थळीच देण्यात येणार आहे.

पुणे शहर ऑटो रिक्षा फेडरेशनचे अध्यक्ष, महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे वरिष्ठ उपाध्यक्ष, समर्थ सेवा रिक्षा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आणि ऑटो टॅक्सी ट्रान्सपोर्ट फेडरेशनचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री. आनंद तांबे यांना मानद डॉक्टरेट हा सन्मान प्रदान करण्यात आहे. गेल्या ४० वर्षांपासून वंचित, दुर्लक्षित, गोरगरीब आणि रिक्षा चालकांच्या हक्कांसाठी अथक कार्य करणाऱ्या डॉ. आनंद तांबे यांनी पुणे शहरातील रिक्षा व्यवसायाला नवे स्थान मिळवून दिले. रिक्षा स्टँडची निर्मिती, प्रवासी, रिक्षा चालक व प्रशासन यांच्यातील संबंध मजबूत करणे, तसेच दिव्यांग, अपंग, विधवा महिला, सामाजिक आणि  शैक्षणिक क्षेत्रातील प्रश्न सोडविण्यासाठी त्यांचे योगदान अमूल्य आहे. दिल्ली येथील भव्य समारंभात CEDARBROOK UNIVERCITY USA  या विद्यापीठाकडून HONORARY DOCTORATE  हा बहुमान डॉक्टर आनंद तांबे यांना प्रदान करून त्यांच्या चाळीस वर्षातील सामाजिक कार्याची व अथक परिश्रमाची दखल घेत, हा सन्मान त्यांच्या योगदानाचा व समर्पणाचा खऱ्या अर्थाने गौरव करण्यात आला. डॉक्टर आनंद तांबे यांचा पुण्यातील पहिला रिक्षा चालक मालकांतर्फे डॉ. आनंद तांबे यांचा ‘पुणेरी पगडी’ सन्मान पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या समवेत करण्यात येणार आहे.

डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेची कार्यकारिणी जाहीर; महेश टेळेपाटील यांची फेरनिवड, नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सन्मान

0

डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेची बहुप्रतीक्षित कार्यकारिणी बैठक बुधवार, २३ जुलै रोजी हॉटेल कुणाल, तापकीर चौक, काळेवाडी, पिंपरी चिंचवड येथे उत्साहात पार पडली. या बैठकीत पुणे जिल्हा, पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड शहर नवीन कार्यकारणी राज्य समन्वयक अमोल पाटील यांच्या पुढाकाराने जाहीर करण्यात आली. सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

या बैठकीला संस्थापक अध्यक्ष राजा माने, महाराष्ट्र सरचिटणीस महेश कुगावकर, प्रदेश उपाध्यक्ष सावंत साहेब, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष विकास भोसले, राज्य समन्वयक अमोल पाटील,पिंपरी चिंचवड भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न उर्फ बापू काटे, पुणे जिल्हाध्यक्ष गणेश हुंबे, पुणे शहर अध्यक्ष महेश टेळेपाटील, पिंपरी चिंचवड अध्यक्ष प्रशांत साळुंखे आदी पत्रकारिता क्षेत्रातील अनेक मान्यवर, संपादक, आणि प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे ‘न्यूजमेकर.लाईव्ह’चे संपादक महेश टेळेपाटील यांची पुणे शहराध्यक्ष पदावर फेरनिवड बिनविरोध करण्यात आली. त्यांच्या गतकाळातील सक्रिय सहभाग आणि नेतृत्वगुण यांची संघटनेने एकमुखाने दखल घेतली. त्यांच्यासह विविध जबाबदाऱ्या पार पाडणाऱ्या कार्यकर्त्यांचीही कार्यकारिणीत नियुक्ती करण्यात आली.

नवीन पुणे शहर कार्यकारिणी पुढीलप्रमाणे आहे:
शहराध्यक्ष : महेश टेळेपाटील (न्यूजमेकर. लाईव्ह)
कार्याध्यक्ष : विजय रणदिवे (सुदर्शन टीव्ही)
कार्याध्यक्ष : पराग डिंगणकर (पीपीसी न्यूज )
उपाध्यक्ष : नागेश होनमाने (झुमॲान न्यूज)
उपाध्यक्ष : संतोष गाजरे (दैनिक लोकमत)
संपर्क प्रमुख : लहु पारवे (जनसुराज्य), प्रशांत नाईक उर्फ स्वर प्रशांत (कलाकार वार्ता)
महिला संपर्क प्रमुख : मंजुषा अवलकंठे (विश्वभारती)
सरचिटणीस : दिनेश वढणे (आयएनएस)
संघटक : शिवाजी हुलावळे (छत्रपती न्यूज), रामचंद्र कुंभार (संध्या न्यूज)
सचिव : रोहित दळवी (द आधुनिक केसरी)
मिडिया प्रचार प्रमुख : धारा इंगोले
सल्लागार मंडळ : धनराज गरड (युवा संवाद)
प्रसिद्धी प्रमुख : अतुल येवले

शहर कार्यकारिणी सदस्यपदी खालील सदस्यांची निवड झाली: विनोद पडेलकर (न्यूजमेकर.लाईव्ह), हरिश दंडाले (पीपीसी न्यूज), हनुमंत टेळे (उनाड न्यूज), प्रशांत जंगम (डिजिटल न्यूज, पुणे).

कार्यक्रमाच्या सुरुवातीस संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी संघटनेच्या ध्येयधोरणांचा परिचय देताना सांगितले की, “डिजिटल पत्रकारितेचा सन्मान राखण्यासाठी आणि पत्रकारांच्या हक्कांसाठी ही संघटना कायमच सजग राहील.” अध्यक्ष गणेश हुंबे आणि प्रशांत साळुंखे यांनीही नवनिर्वाचित कार्यकारिणीला शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमात सर्व पदाधिकाऱ्यांना अधिकृत नियुक्तीपत्र देण्यात आले. या निमित्ताने उपस्थितांनी एकमेकांशी संवाद साधत आगामी काळात पत्रकारांच्या समस्यांवर एकत्रितपणे लढण्याचा निर्धार व्यक्त केला.

कार्यक्रमाच्या शेवटी महेश टेळेपाटील यांनी सर्व सहकाऱ्यांचे आभार मानले आणि सांगितले की, “पद हे केवळ भूषवण्यासाठी नसून, ते जबाबदारीने पार पाडण्यासाठी असते. आपण सर्वांनी एकजुटीने पत्रकारांच्या हितासाठी काम केले पाहिजे.”

हा कार्यक्रम केवळ संघटनेचा औपचारिक कार्यक्रम नव्हता, तर एकता, समन्वय आणि पत्रकारांच्या आत्मसन्मानाचा संदेश देणारी महत्वपूर्ण घडामोड ठरली.

एकनाथ शिंदेंना झटका? नगरविकासच्या ‘त्या’ फाईल्स फडणवीसांनी सही केल्याशिवाय पुढे सरकरणार नाहीत

0

राज्यातील महायुती सरकारमधील तिन्ही पक्षांमध्ये अंतर्गत वाद आणि कुरघोडीचे राजकारण चालते, अशा बातम्या सातत्याने ऐकायला मिळतात. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रि‍पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर मित्रपक्षांच्या मनमानी कारभारावर अंकुश लावला होता. स्वत:च्या मर्जीतील ओएसडी आणि पीए हवेत, हा मित्रपक्षांचा हट्ट देवेंद्र फडणवीसांनी पुरवला नव्हता. यावरुन काहीशी नाराजी असतानाच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास खात्याबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता नगरविकास खात्याच्या मोठ्या रक्कमेच्या निधीवाटपासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंजुरी बंधनकारक असेल. या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्या निवडक पद्धतीने आणि सढळ हस्ते पैसे खर्च करण्याच्या सवयीला अंकुश लावल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

राज्यात येत्या काळात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दृष्टीने नगरविकास आणि ग्रामविकास ही दोन खाती महत्त्वाची मानली जातात. यापैकी ग्रामविकास खाते हे भाजपकडे आहे. तर प्रचंड उलाढाल होणारे नगरविकास खाते हे एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. नगरविकास खात्याच्या माध्यमातून विविध योजनांमार्फत आमदार आणि पालिकेतील नगरसेवकांना निधी पुरवला जातो. मात्र, अलीकडच्या काळात नगरविकास खात्याकडून फक्त शिंदे गटाच्या आमदार, नगरसेवकांना रसद पुरवली जाते. मित्रपक्षाच्या आमदारांना तितकासा निधी मिळत नाही, अशी कुजबुज महायुतीच्या गोटात होती. नुकत्याच पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनात काही आमदारांनी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच तक्रार केली होती. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी आता नगरविकास खात्याच्या कारभारात लक्ष घालायचे ठरवले आहे.

मुख्यमंत्री कार्यालयाकडून आता नगरविकास खात्याचा निधी सर्व जिल्ह्यांमध्ये समप्रमाणात वाटला जातो की नाही, हे देखील तपासले जाणार आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवेळी शहर भागात नगरविकास खात्याकडून मोठ्याप्रमाणावर निधीवाटप होण्याची शक्यता आहे. हा निधी महायुतीमधील तिन्ही पक्षांमध्ये योग्यप्रकारे वितरीत होतो की नाही, यावर आता फडणवीसांची नजर असेल. तर नगरविकास खात्याकडून एखादा मोठा निधी वितरीत केला असेल तर त्या निधीवाटपाच्या फाईलला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंजुरी आवश्यक असेल. हा एकप्रकारे एकनाथ शिंदे यांच्यावर एकप्रकारे अंकुश लावण्याचा प्रकार असल्याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे हा निर्णय एकनाथ शिंदे यांना कितपत रुचणार, त्याच्या काय प्रतिक्रिया उमटणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या निर्णयामुळे काय होणार?

नगरविकास खात्याच्या ज्या योजना आहेत, त्यामार्फत नगरसेवक आणि आमदारांना मोठा निधी मंजूर करायचा असेल तर एकनाथ शिंदे यांच्या स्वाक्षरीनंतर ती फाईल मुख्यमंत्र्यांकडे जाईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची परवानगी मिळाल्यानंतरच हा निधी वितरीत केला जाईल. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी शिंदे गटात मोठ्या प्रमाणावर इनकमिंग होण्याची शक्यता आहे. त्यावेळी एकनाथ शिंदे यांच्याकडून बाहेरुन येणाऱ्या नगरसेवकांना सढळ हस्ते निधीवापट होऊ शकते. या गोष्टीवर महायुतीतील मित्रपक्षांनी आक्षेप घेतला आहे. नगरविकास खात्याकडून महापालिकांना निधी दिला जातो. मात्र, त्याचे समसमान वाटप होणे अपेक्षित आहे. परंतु, तसे होताना दिसत नाही. शिवसेनेची सत्ता असलेल्या महानगरपालिकांमध्ये नगरविकास खात्याचा निधी मोठ्याप्रमाणावर वितरीत होतो. या माध्यमातून शिंदे गटाच्या आमदार आणि नगरसेवकांना आर्थिक रसद पुरवली जाते. मात्र, आता देवेंद्र फडणवीस यांच्या हस्तक्षेपामुळे या सगळ्याला चाप बसण्याची शक्यता आहे.

६ महिन्यांच्या बालकाच्या कंठातील पोकळीमध्ये सोन्याचा दागिना पालक चिंतेत, डॉक्टरांच्या तत्परतेने जीव वाचला

0

देव तारी त्याला कोण मारी, या म्हणीचा प्रत्यय सोमवारी (दि. २१) बारामतीमध्ये आला. साडेसहा महिन्यांच्या बालकाच्या घशात दागिना अडकला. मात्र, बारामतीच्या डाॅक्टरांच्या तत्परतेने साडेसहा महिन्यांच्या बालकाचा जीव बचावला. एका साडेसहा महिन्यांच्या बाळाच्या घशात आणि श्वासनलिकेत सोन्याचा दागिना अडकल्याचा प्रकार सोमवारी (दि. २१) सकाळी घडला. या बालकाच्या घशात स्वरयंत्राच्या असलेल्या कंठातील पोकळीच्या भागामध्ये ३.५ सें. मी. लांबीचे आणि एका बाजूने धारदार असलेले सोने एका साडेसहा महिन्यांच्या बाळाच्या घशात आणि श्वासनलिकेत सोन्याचा दागिना अडकल्याचा प्रकार सोमवारी (दि. २१) सकाळी घडला. या बालकाच्या घशात स्वरयंत्राच्या असलेल्या कंठातील पोकळीच्या भागामध्ये ३.५ सें. मी. लांबीचे आणि एका बाजूने धारदार असलेले सोन्याचे कानातले अडकले. बाळाला त्रास होऊ लागल्याचे लक्षात येताच पालक खूप घाबरून गेले. त्यांनी ताबडतोब बारामतीमधील भिगवण रस्त्यावरील सुप्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. मुथा यांच्या श्रीपाल हॉस्पिटल येथे बालकाला आणले. यावेळी हॉस्पिटलमध्ये घेऊन येईपर्यंत बाळाचा जीव गुदमरण्यास सुरुवात झाली होती, तसेच बालकाच्या तोंडातून रक्तस्राव सुरू झाला होता.

बाळाला ताबडतोब हॉस्पिटलमधील बालरोगतज्ज्ञ डॉ. राजेंद्र मुथा , डॉ. सौरभ मुथा आणि डॉ. प्रियांका मुथा यांच्या साहाय्याने बारामतीमधील नाक, कान, घसातज्ज्ञ डॉ. वैभव मदने आणि भूलतज्ज्ञ डॉ. अमर पवार त्यांच्या मदतीने अतिशय कौशल्यपूर्वक आणि जोखमीची शस्त्रक्रिया व स्कोपी पार पाडण्यात आली. संबंधित बालकाच्या घशातून दुर्बिणीद्वारे हे सोन्याचे कानातले यशस्वीरीत्या काढण्यात यश आले.

अवघ्या काही मिनिटांत बारामतीच्या या सर्व डॉक्टरांनी सामूहिक प्रयत्न केल्याने या साडेसहा महिन्यांच्या बालकाला अक्षरशः मृत्यूच्या दाढेतून परत आणले. सर्व डॉक्टरांनी सुटकेचा निःश्वास सोडला. सर्व डॉक्टरांनी मिळून त्याच्यावरती उपचार करून त्याला जीवनदान दिले. पालकांनी श्रीपाल हॉस्पिटलमधील सर्व डॉक्टर, नर्स व इतर कर्मचारी यांचे मनःपूर्वक आभार मानताना पालकांचे डोळे पाणावले.e अडकले. बाळाला त्रास होऊ लागल्याचे लक्षात येताच पालक खूप घाबरून गेले. त्यांनी ताबडतोब बारामतीमधील भिगवण रस्त्यावरील सुप्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. मुथा यांच्या श्रीपाल हॉस्पिटल येथे बालकाला आणले. यावेळी हॉस्पिटलमध्ये घेऊन येईपर्यंत बाळाचा जीव गुदमरण्यास सुरुवात झाली होती, तसेच बालकाच्या तोंडातून रक्तस्राव सुरू झाला होता.

बाळाला ताबडतोब हॉस्पिटलमधील बालरोगतज्ज्ञ डॉ. राजेंद्र मुथा , डॉ. सौरभ मुथा आणि डॉ. प्रियांका मुथा यांच्या साहाय्याने बारामतीमधील नाक, कान, घसातज्ज्ञ डॉ. वैभव मदने आणि भूलतज्ज्ञ डॉ. अमर पवार त्यांच्या मदतीने अतिशय कौशल्यपूर्वक आणि जोखमीची शस्त्रक्रिया व स्कोपी पार पाडण्यात आली. संबंधित बालकाच्या घशातून दुर्बिणीद्वारे हे सोन्याचे कानातले यशस्वीरीत्या काढण्यात यश आले.

अवघ्या काही मिनिटांत बारामतीच्या या सर्व डॉक्टरांनी सामूहिक प्रयत्न केल्याने या साडेसहा महिन्यांच्या बालकाला अक्षरशः मृत्यूच्या दाढेतून परत आणले. सर्व डॉक्टरांनी सुटकेचा निःश्वास सोडला. सर्व डॉक्टरांनी मिळून त्याच्यावरती उपचार करून त्याला जीवनदान दिले. पालकांनी श्रीपाल हॉस्पिटलमधील सर्व डॉक्टर, नर्स व इतर कर्मचारी यांचे मनःपूर्वक आभार मानताना पालकांचे डोळे पाणावले.

महावितरणचा अदानीला राज्यात वीज वितरण समांतर परवाना विरोध; आयोगाकडे वीजपुरवठयाबाबत सुनावणी

0

खासगी कंपन्या केवळ नफा देणारे ग्राहक निवडतील. त्यामुळे महावितरणवर कमी उत्पन्न आणि सबसिडीवर अवलंबून असलेल्या ग्राहकांचा बोजा वाढेल. परिणामी अदानी या वीज कंपनीला राज्यात वीज वितरणाचा समांतर परवाना देण्यात येऊ नये, असे म्हणणे महावितरणने राज्य वीज नियामक आयोगासमोर मांडले. दरम्यान, मंगळवारी अदानीच्या परवान्यासंदर्भात सुनावणी झाली तर टोरेंटची सुनावणी पुढे ढकलण्यात आली.

महावितरणसोबतच अदानी, टाटा आणि टोरंट यांनी एकमेकांच्या कार्यक्षेत्रात वीज वितरणचा परवाना महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाकडे मागितला आहे. अदानीने ठाणे आणि नवी मुंबई, टोरेंटने ठाणे, नवी मुंबई, पुणे, नागपूर आणि टाटा पॉवरने ठाणे, पुणे, नाशिक व संभाजी नगरमध्ये तर महावितरणने मुंबईमध्ये वीज वितरणचा परवाना मागितला आहे. मात्र महावितरणच्या कार्यक्षेत्रात खासगी कंपन्यांना वीज वितरणचा परवाना देण्यात येऊ नये, यावर महावितरण ठाम असून, महावितरणशी संबंधित वीजग्राहक संघटनांनी यास विरोध केला.

महावितरणने आयोगासमोर म्हणणे मांडले. त्यानुसार, सध्याची मागणी व आगामी काळातील २०३५ पर्यंतची मागणी ध्यानात घेऊन वीज खरेदीचे करार केले आहेत. आमचे ग्राहक दुसऱ्याला दिल्यास फिक्स्ड कॉस्टचा वाढीव बोजा उरलेल्या ग्राहकांवर येईल. तसेच महावितरणचे आर्थिक स्थैर्य धोक्यात येईल. औद्योगिक व व्यावसायिक ग्राहक त्यांच्याकडे जातील आणि घरगुती ग्राहकांसाठीची क्रॉस सबसिडी धोक्यात येईल. ग्राहक कमी झाले तर गुंतवणूक अडचणीत येईल, असे महावितरणने म्हटले आहे.

काय आहेत आक्षेप?

महावितरणला आर्थिक दुर्बल घटकांसाठी क्रॉस सबसिडीची सुविधा करावी लागते. तसे बंधन खासगी कंपन्यांवर नाही. त्यामुळे समान पातळीवर स्पर्धा होणार नाही. महावितरणने पायाभूत सुविधा व मनुष्यबळात गुंतवणूक केली आहे. ती निरर्थक होईल. आयोगाने सार्वजनिक हिताचे रक्षण निश्चित करावे आणि केवळ व्यावसायिक फायद्यासाठी परवाने देऊ नयेत.

महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनचे सरचिटणीस कृष्णा भोयर यांच्या म्हणण्यानुसार, खासगी भांडवलदारांमुळे ग्राहकांना मिळणारी सबसिडी, इतर सुविधा बंद होतील. यामुळे सामाजिक समतोल बिघडेल. वीज क्षेत्राचे आर्थिक, प्रशासकीय स्वरूप ढासळेल.

मनसेचा नवा पॅटर्न! …. नुसतेच खळ फटाक नाही तर शिका अन् बोला; अभिनव उपक्रमाची सर्वत्र स्तुत्य चर्चा

0

महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हटलं की चर्चा होते ते कार्यकर्त्यांनी केलेल्या ‘खळपटा’ची अन कार्यकर्त्यांनी दिलेल्या ‘चोपा’ची सर्वत्र चर्चा होते परंतु  महाराष्ट्र नवनिर्माण सेना खडकवासला मतदारसंघ आणि जनसेवक कैलासभाऊ दांगट मित्र परिवार यांच्या वतीने ‘मराठी प्रशिक्षण वर्ग’ मनसेचा हा नवा पॅटर्न! सुरू करण्यात आला आहे. खरंच महाराष्ट्रात शिक्षण उद्योग व्यवसाय निमित्त आलेल्या पर राज्यातील नागरिकांसाठी या उपक्रमाचा फायदाच होणार आहे. रस्त्यावर आणि चौकाचौकात दरपकड आणि मारामारी करणाऱ्या मनसैनिकांसाठी हा एक अभिनव उपक्रम असून सर्वत्र याची चांगलीच चर्चा होणार आहे. महाराष्ट्रात रोजी रोटी साठी आलेल्या परप्रांतीयांची गरज लक्षात घेऊन ‘पहिला वर्ग’ वारजे-माळवाडी परिसरात उत्साहात पार पडला.

मराठी भाषा जपण्यासाठी आणि परिसरातील अमराठी नागरिकांना योग्य उच्चार, लेखन व संवाद कौशल्य आत्मसात करता यावं, या उद्देशाने ह्या प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. या पहिल्या वर्गाला वारजे माळवाडी परिसरातील नागरिकांनी हजेरी लावून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विशेष म्हणजे, उपस्थित सर्वांनी आपली स्वेच्छा व्यक्त करत हा अभ्यासक्रम नियमितरित्या पूर्ण करण्याचा निर्धार व्यक्त केला.

या वर्गात प्रसिद्ध साहित्यिक प्रा. वी. दा. पिंगळे सरांनी मार्गदर्शन केले. त्यांनी मराठी भाषेचे महत्व, तिची संस्कृतीशी नाळ आणि शुद्ध भाषेचे महत्त्व या विषयावर उपस्थितांना अभ्यासपूर्ण आणि प्रेरणादायी मार्गदर्शन केले.

या प्रसंगी मनसेच्या माजी नगरसेविका सौ. भाग्यश्रीताई दांगट, मनसे पुणे शहर उपाध्यक्ष कैलासभाऊ दांगट, तसेच मनसे पदाधिकारी नितीन वांजळे, अनिकेत गुंजाळ, विशाल पठारे आणि परिसरातील विविध मराठीप्रेमी नागरिक उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन खडकवासला उपविभाग अध्यक्ष गौरव दांगट, शाखा अध्यक्ष रियाज शेख, आणि शाखा अध्यक्ष अभिजीत देशमुख यांनी केले. स्थानिक पातळीवर नागरिकांमध्ये मराठीप्रती प्रेम जागवण्यासाठी व नव्या पिढीत भाषेची गोडी निर्माण व्हावी या हेतूने हा उपक्रम हाती घेण्यात आल्याची माहिती आयोजकांनी दिली. आगामी काळात अशा अनेक वर्गांचे आयोजन करून संपूर्ण पुणे शहरात मराठी प्रशिक्षणाचा विस्तार करण्यात येणार असल्याचेही यावेळी मनसे शहर उपाध्यक्ष कैलासभाऊ दांगट यांनी सांगितले.

वृक्षाच्या वाढलेल्या फांद्या छाटणी व पदपथावर दिवे त्वरित सुरू करा; कोथरूड विधानसभा मतदारसंघ काँग्रेस कमिटीच्या वतीने निवेदन

0

कोथरूड विधानसभा मतदारसंघ काँग्रेस कमिटीच्या वतीने आगामी गणेशोत्सवाच्या तयारी साठी कोथरूड मतदारसंघातील रस्त्यावरील वृक्षाच्या वाढलेल्या फांद्या छाटणी व पदपथावर लाईट बंद असल्या चालू करण्याबाबत कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालय व वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयात निवेदन देण्यात आले.

कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालय सहाय्यक उपायुक्त श्री विजय नायकल साहेब यांच्याकडे निवेदन देताना संदीप मोकाटे, महेश विचारे, अशोक लोणारे, किशोर मारणे, युवराज मदगे, संतोष वाघमारे, रामदास केदारी उपस्थित होते.

कोथरुडमध्ये सुधीर(बाबूजी) फडके यांचेही गदिमांप्रमाणेच स्मारक करा; नामदार चंद्रकांत पाटील यांच्या आयुक्तांना सूचना

0

गदिमांप्रमाणे कोथरूड मध्ये सुधीर फडके अर्थात बाबूजींचे स्मारक उभारण्यासाठीचा प्रस्ताव तयार करा, अशी सूचना राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री आणि कोथरुडचे आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी महापालिका आयुक्तांना केले आहे.

पुणे महानगरपालिकेच्या वतीने गीतरामायणाचे कवी ग. द. माडगूळकर यांचे स्मारक कोथरुड मध्ये उभारण्यात येत आहे. त्याचप्रमाणे गीतरामायणाचे संगीतकार असलेल्या सुधीरजी फडके यांच्या कार्यास साजेसे स्मारक कोथरुडमध्ये  झाल्यास ते अधिक संयुक्तिक होईल. या दोन महान शिल्पकारांची स्मृती जतन करण्याची संधी यानिमित्ताने पुणे महानगरपालिकेला मिळणार आहे. चांदणी चौक परिसर रस्ते विकासामुळे आणि बंगलोर-मुंबईकडे जाणारा राष्ट्रीय  महामार्ग कोथरुडजवळूनच जात असल्यामुळे हे स्मारक कोथरुड परिसरातच होणे आवश्यक वाटते.

यामुळे शहरातील वाहतुक या अडचणीशिवाय संपूर्ण राज्यातील आणि देशभरातील रिसकांना तसेच मान्यवर मंडळींना या दोन्ही स्मारकांमध्ये जाणे सोयीचे होईल. महाराष्ट्रातील आणि विदेशातील सुद्धा लक्षावधी रिसकांकडून पुणे महानगरपालिकेच्या या सांस्कृतिक कामाची नोंद घेतली जाईल. त्यामुळे पुणे महानगरपालिकेच्या वतीने सुधीरजी फडके यांचे उचित स्मारक कोथरुडमध्ये उभे करण्याबाबत आवश्यक तो प्रस्ताव तयार करण्यात यावा, अशी सूचना ना. पाटील यांनी मनपा आयुक्तांना केली आहे.

भाजपचा मनपा फॉर्म्युला ठरला रणशिंग फुंकलं?!; आमदारांची ही यादी मुख्यमंत्री कार्यालयात जमा होण्यास सुरुवात

0

महाराष्ट्रात होणाऱ्या महापालिका निवडणुकांसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने आता नवा फॉर्म्युला ठरला आहे. राज्यातील सध्या बदललेली परिस्थिती लक्षात घेऊन एन केल प्रकारे महापालिका आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी भारतीय जनता पक्षाने कंबर कसली असून स्थानिक पातळीवरती भारतीय जनता पक्षाची आता कायम राखण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष लक्ष घालण्यास सुरुवात केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांची जबाबदारी त्या भागातील आमदारांवर देण्यात आली असून त्यासाठी प्रत्येक आमदाराची पाच कामं केली जाणार आहेत. महानगर पालिका निवडणुकीसाठी भाजपने ही रणनीती आखली आहे. तर मुंबईत महायुतीचाच महापौर असेल असा निर्धार करायचा आहे.

महाराष्ट्रात सुरू होणाऱ्या मनपा निवडणुकीत फायदा होईल अशी कामं आमदारांनी सुचवावी असे आदेश देण्यात आल्यानंतर आता आमदारांकडून कामांची यादी मुख्यमंत्री कार्यालयात देण्यास सुरुवात झाली आहे. त्याचबरोबर निवडणुकीत काय रणनीती असावी याबाबत आमदारांची मतं देखील जाणून घेण्यात आलेली आहे. राज्यामध्ये भारतीय जनता पक्ष स्वतंत्र निवडणुकीला सामोरे जाणार अशी वल्गना करत असतानाच राज्यात सध्या सत्तेत असलेल्या महायुतीच्या सर्व मित्र पक्षांसह एकत्र निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय प्रदेश पातळीवर घेण्यात आला आहे. मुंबईसह राज्यात सर्वत्र महायुती म्हणून लढायचं आहे, असे आदेशच मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहेत. तसंच माध्यमांशी जास्त बोलू नका अशी ताकीद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे.