Home Blog Page 215

आता ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ सोडावाच लागेल, मोठी अपडेट समोर… काय आहेत निकष?

0

मुख्यमंत्री ‘माझी लाडकी बहीण’ योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी मोठी अपडेट समोर आली आहे. जर तुमच्या कुटुंबाकडे चारचाकी वाहन असेल, तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही. शासनाने नव्या निकषांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला असून, ४ तारखेपासून अंगणवाडी सेविका आणि पर्यवेक्षिका घरोघरी जाऊन पडताळणी करणार आहेत.

चारचाकी वाहन असलेल्या महिलांना योजनेतून वगळण्याचा निर्णय पुणे जिल्ह्यात तब्बल २१ लाख ११ हजार ९९१ महिलांनी या योजनेसाठी अर्ज केले होते. मात्र, शासनाने चारचाकी वाहन असलेल्या अर्जदारांना अपात्र घोषित करण्याचे ठरवले आहे. महिला व बालकल्याण विभागाचे सचिव डॉ. अनुप कुमार यादव यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेतलेल्या बैठकीत राज्यभरातील अधिकाऱ्यांना यासंदर्भात सूचना दिल्या. परिवहन विभागाच्या मदतीने वाहनधारकांची यादी तयार करून जिल्हाधिकाऱ्यांना पाठवण्यात आली आहे.

कोणत्याही तपासणीशिवाय अर्ज केले होते मंजूर

विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने या योजनेसाठी कोणत्याही तपासणीशिवाय अर्ज मंजूर केले होते. मात्र, आता पात्रता निकष तपासले जात असून, चारचाकी वाहनधारक महिलांना योजना लाभ मिळणार नाही. पुणे जिल्ह्यात अजूनही ४,८०० अर्जांची छाननी बाकी आहे आणि त्यासाठी ४ फेब्रुवारी अखेरची मुदत आहे.

अंमलबजावणी कशी होणार?

शासनाच्या आदेशानुसार, अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका आणि बाल विकास प्रकल्प अधिकारी (सीडीपीओ) हे महिलांच्या घरी जाऊन पडताळणी करतील. चारचाकी वाहन असलेल्या अर्जदारांची नावे शासनाकडे पाठवली जातील. जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जामसिंग गिरासे यांनी सांगितले की, “शासनाने दिलेल्या निर्देशांची आम्ही तत्काळ अंमलबजावणी करत आहोत.”

योजनेसाठी आवश्यक निकष कोणते?

लाभार्थी महिलेचे वय १८ ते ६५ वर्षांच्या दरम्यान असावे.

कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांच्या आत असावे.

कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी नोकरीत नसावा तसेच प्राप्तिकर भरणारा नसावा.

संजय गांधी निराधार योजनेसारख्या अन्य योजनेचा लाभ घेतलेला नसावा.

कुटुंबाच्या नावावर चारचाकी वाहन असल्यास अर्जदार अपात्र ठरेल.

महिलांचे मत आणि संभाव्य परिणाम

महिला वर्गातून या निर्णयावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी शासनाच्या या निर्णयाचे समर्थन केले असले, तरी अनेक महिलांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे. त्यांचे म्हणणे आहे की, “घरात चारचाकी वाहन असणे म्हणजे श्रीमंत असणे नव्हे. अनेक वेळा वडिलांच्या नावावर किंवा भावाच्या नावावर गाडी असते, पण कुटुंबाची आर्थिक परिस्थिती तशी चांगली नसते.”

शासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे अनेक महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे अपात्र ठरणाऱ्या अर्जदारांनी योजनेच्या नव्या निकषांची माहिती घेऊन आवश्यक ती तयारी करावी. सरकारच्या या कठोर अंमलबजावणीमुळे गरजू महिलांपर्यंत मदत पोहोचेल, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. मात्र, योजनेच्या लाभार्थींच्या संख्येत मोठी कपात होणार हे निश्चित!

…तर पंचावरही कारवाई केली जाणार; कुस्तीगीर संघाच्या कार्याध्यक्षांनी ठणकावलं, राक्षेला न्याय मिळणार?

0

शिवराज राक्षेच्या कुटुंबियांनी जर आमच्याकडे पंचांच्या विरोधात तक्रार दिली तरी या संदर्भात समिती स्थापन करून पंचांवर देखील कारवाई केली जाणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष संदीप भोंडवे यांनी दिली आहे. पैलवानांचे नुकसान होऊ नये म्हणून गुन्हे दाखल करण्यात आले नाहीत. शिवराज आणि महेंद्र या दोघांवर तीन वर्षासाठी कुस्तीत निलंबित करण्यात आलं आहे. चंद्रहार पाटील आमचा मित्र आहे, त्याला काय बोलायचं ते बोलू द्या. तो थोडा गरम डोक्याचा आहे, असंही त्यांनी पुढे म्हटलं आहे.

काय म्हणाले कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष संदीप भोंडवे?

काल पंचाना लाथ मारल्यानंतर आमचे पंच तिथे मॅटवरती आंदोलनाला बसले होते. संपूर्ण पंचाची इच्छा होती. शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड यांच्यावरती कारवाई करून गुन्हे दाखल व्हावेत. पंच मॅटवरून उठत नव्हते. त्या ठिकाणी रामदास तडस आले, त्यांनी सर्व पंचांशी आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. शिवराज आता आठ दिवसांमध्ये कामाला लागणार आहे आणि महेंद्र गायकवाडची देखील रेल्वेची ट्राईल झालेली आहे. वाद विवाद होतचं असतात. पंरतु त्यांच्यावरती गुन्हे दाखल केले असते. त्यांच्या पुढच्या आयुष्यात त्यांना नोकरी मिळाली नसती. काही अडचणी ल्आया असत्या. निकाल लागायला वेळ गेला असता. त्यासाठी आम्ही त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला नाही. आम्ही सर्वजण कुस्ती संघाचे पदाधिकारी, कुस्ती संघाचे अध्यक्ष यांनी सर्वांनी चर्चा करून या दोन्ही पैलवानांवरती तीन-तीन वर्षांची बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.

पंचांचा निर्णय चुकीचा होता का?

यावर बोलताना ते म्हणाले, मी शिवराजची, त्याच्या आईची, कुटूंबातील सर्वांची प्रतिक्रिया मी ऐकली. त्यांनी असं म्हटलं की, पंचांवर देखील कारवाई केली पाहिजे. त्यांना जर पंचाविरोधात आक्षेप असेल तर त्यांनी कुस्तीगीर संघाकडे अर्ज करावा. कुस्तीगीर संघाकडे अर्ज केल्यानंतर त्या व्हिडिओमध्ये साईड पंच असेल किंवा मुख्य पंच असेल तर त्या सर्व गोष्टींची शहानिशा करावी लागेल. त्यानंतर एक कमिटी नेमली जाईल. त्यामध्ये जर पंच दोषी आढळले तर, तर शंभर टक्के पंचावर देखील कारवाई केली जाईल, असंही संदीप भोंडवे यांनी स्पष्ट केलं आहे.

राज्यातील कंत्राटदारांचा काम बंद आंदोलनाचा इशारा, सरकारने 89 हजार कोटी थकवल्याचा आरोप

0

राज्यातील शासकीय विकासकामं करणाऱ्या कंत्राटदारांनी पुन्हा एकदा काम बंद आंदोलनाचा इशारा दिला आहे. शासकीय कामांची जवळपास 89 हजार कोटी रुपयांची थकबाकी असल्याचं कंत्राटदार संघटनांनी म्हटलं आहे. त्यामुळे 5 फेब्रुवारी पासून काम बंद आंदोलन करत असल्याच्या इशारा या संघटनानी दिला. राज्य अभियंता संघटना आणि महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ या दोनही संघटनांची मंगळवारी या संदर्भात बैठक होणार आहे.

राज्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका पार पडल्या. त्यामुळे या निवडणूक काळात योजनांचा आणि विकास कामांचा पाऊस पाडला गेला. प्रत्येक आमदाराला खुश करण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी देण्यात आला. विकास कामंही सुरु झाली. मात्र आता निधी वितरीत होत नसल्याने कंत्राटदार हैराण झालेत. या विकास कामांचा जवळपास 89 हजार कोटी रुपयांची थकबाकी वाढलीय. त्यामुळे 5 फेब्रुवारी पासून काम बंद आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला आहे.

कोणत्या विभागांत किती थकबाकी आहे?

सार्वजनिक बांधकाम विभाग – 46 हजार कोटी
जलजिवन मिशन – 16 हजार कोटी
ग्रामविकास विभाग- 8600 कोटी
जलसंधारण विभाग- 19700 कोटी
नगरविकास विभाग अंतर्गत आमदार निधी, खासदार निधी आणि डिपीडीसी फंड – 1700 कोटी
सर्व विभागांची मिळून 89 हजार कोटी रुपयांची थकबाकी आहे.

राज्यात लाडकी बहीण योजनेमुळे तिजोरीत खडखडाट आहे. त्यामुळे हा निधी मिळत नसल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे विरोधकांनीही मोठ्या प्रमाणावर सरकारवर टीका केली आहे.

मतदारसंघात विकास काम आणण्यासाठी लोकप्रतिनिधी मोठ्या प्रमाणात ताकद लावतात. कामांच्या आधीच कंत्राटदारांकडून टक्केवारीही घेतली जात असल्याचा गंभीर आरोप खासदार संजय राऊत यांनी केला.

भविष्यातील विकासकामांनाही ब्रेक लागणार?

आतापर्यंत अंदाजे प्रत्येक लोकप्रतिनिधीच्या मतदारसंघांमध्ये 50 ते 70 कोटी रुपयांच्या निधीच वाटप करण्यात येत होतं. मात्र यावेळी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका असल्याने प्रत्येक उमेदवाराला खुश करण्यासाठी 400 ते 500 कोटी रुपयांची कामे मंजूर करण्यात आली. जेवढा नेता मोठा तेवढा निधी जास्त पाहायला मिळाला. आता मात्र या धकबाकीचा आकडा गगणाला भिडताना पाहायला मिळतोय. त्यामुळे ही थकबाकी द्यावी तर लागणार आहेत. मात्र पुढील विकासकामांना ही मोठ्या प्रमाणावर ब्रेक लावावा लागणार हे ही तेवढंच खंर आहे.

कुंभमेळ्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य व्हायरल, बजरंग दल आक्रमक; तरुणाविरुद्ध भिवंडी पोलिसात तक्रार

0

उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सध्या सुरू असलेल्या कुंभमेळ्याची देशभरात चर्चा असून देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक कुंभमेळ्यासाठी येत आहेत. त्यामध्ये, अगदी गृहमंत्री अमित शाहांपासून ते उद्योगपती अंबानी व अनेक सेलिब्रिटींनीही हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं. महाराष्ट्रातूनही अनेक भाविक कुंभमेळ्याला जाऊन पवित्र स्नान करत आहेत. गंगा नंदीत डुबकी मारुन आनंद घेत आहेत. भक्ती आणि शक्तीचा संगम सध्या प्रयागराज येथे पाहायला मिळत असून सोशल मीडियातूनही भाविक आपला अनुभव व फोटो शेअर करताना दिसून येतात. एकीकडे हिंदू धर्मियांची महामेळा म्हणून कुंभमेळ्याचं पावित्र व महत्त्व अधोरेखीत केलं जात असताना काही समाजकंटकांकडून कुंभ मेळ्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करण्यात आल्याचे समोर आले आहे. भिंवडीतील एका तरुणाने आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे बजरंग दलाने आक्षेप घेत थेट पोलिसांत धाव घेतली.

प्रयागराज येथे सुरू असलेल्या कुंभमेळ्याबाबत आक्षेपार्ह आणि अश्लील वक्तव्य करणाऱ्या माजीद मंसुरी या तरुणाविरोधात निजामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बजरंग दल भिवंडीच्यावतीने अशोक महाडिक यांनी या संदर्भात तक्रार दाखल केली असून, आरोपीला लवकरात लवकर अटक न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांच्याकडून देण्यात आला आहे. संबंधित तरुणाने सोशल मीडियावर ऑडिओ संदेशाद्वारे कुंभमेळ्याबाबत अश्लील भाषा वापरून धार्मिक भावना दुखावल्या आहेत. तसेच, हिंदू धर्मियांविषयी आक्षेपार्ह विधान केल्याने परिसरात संतापाचे वातावरण आहे. या प्रकरणी पोलिसांनी तत्काळ कारवाई करून आरोपीला अटक करावी, अशी मागणी संतप्त नागरिक आणि विविध हिंदू संघटनांनी केली आहे. या घटनेमुळे धार्मिक तणाव निर्माण होण्याची शक्यता असून, पोलिस प्रशासनाने योग्य ती दक्षता घेतली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

दरम्यान, सध्या प्रयागराजमधील सांधू, संत, महंतांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या साधू महाराजांची तपश्चर्या आणि त्यांनी अनेक वर्षांपासूनची सेवा चर्चेत विषय ठरत आहे. तर, काही दिवसांपूर्वीच प्रयागराज येथे चेंगराचेंगरीची घटना घडून अनेक भाविकांना आपला जीव गमवावा लागला होता.

अखेर त्यांच्या पोटातील ओठावर आलं; मनोज जरांगे पाटील पुन्हा नामदेव शास्त्रींवर बोलले

0

धनंजय देशमुख आणि वैभवी देशमुख यांनी काल महंत नामदेव शास्त्री यांची भगवान गडावर भेट घेतली. यावेळी त्यांनी नामदेव शास्त्री यांना सर्व पुरावे दाखवले. तसेच संतोष देशमुख यांची हत्या का झाली? या हत्यामागे कोण होते? याचा लेखाजोखाच त्यांच्यासमोर मांडला. यावेळी नामदेव शास्त्री यांनी भगवान गड हा देशमुख कुटुंबीयांच्या पाठिशी असल्याचं स्पष्ट केलं. या भेटीवर आता मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एका उच्चकोटीला पोहोचलेल्या व्यक्तीने विखारी शब्द बोलायला नको होते. अखेर त्यांच्या पोटातील ओठावर आलं, असं मनोज जरांगे म्हणाले.

मनोज जरांगे पाटील मीडियाशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. जे दिसायला हवं होतं राज्याला ते दिसलं आहे. आम्हाला जातीयवादी ठरवत होते. ज्या ठिकाणाहून अपेक्षा नव्हती तिथून जातीयवाद सुरू झाला. त्यांचे शब्द चुकीचे होते. विखारी होते. जातीय होते. आरोपींची बाजू घेऊन त्यांची मानसिकता तपासायची आणि संतोष भैय्याच्या मागे राहायचं नाही, हे विखारी शब्द लोकांनी पाहिले. राज्य हळहळलं. ज्या ठिकाणाहून अपेक्षा नव्हती तिथून हे शब्द आलेच कसे? एखादा नेता किंवा कार्यकर्त्याकडून एखादा शब्द जात असतो. पण उच्चकोटीच्या व्यक्तीने असं बोलणं महाराष्ट्राचं मोठं दुर्देव आहे. राजकारणासाठी हे बोललं जात आहे. या निमित्ताने पोटातील विचार ओठावर आले. राज्याने प्रत्यक्ष पाहिले, असं मनोज जरांगे म्हणाले.

बाबांना दोष नाही
मी बाबांना दोष दिला नाही. त्या दिवशीही दिला नाही, आजही देत नाही. त्यांच्याकडून हे सर्व करून घेणारी टोळी विचित्र आहे. स्वत:चं पाप झाकण्यासाठी देवधर्मही ते पाहत नाहीत. विचित्र टोळी आहे. ही टोळी संपली पाहिजे, असं जरांगे यांनी सांगितलं.

तुमच्या पाया पडतो…
यावेळी त्यांनी तरुणांना आत्महत्या न करण्याचं आवाहन केलं. न मिळणारं आरक्षण मिळालं. मी आडाणी असेल, कसाही असेल. पण तुमच्या पाया पडतो, तुम्ही आत्महत्या करू नका. धाडसी बना. एक दोन वर्ष रिपीट करा. पण तुम्हाला हात जोडून विनंती आहे. तुम्ही आत्महत्या करू नका. तुमचे आईवडील पैसे पुरवतात. तुम्ही स्वप्न पाहता. पण टक्के नसताना इतरांना प्रवेश मिळतो. तुम्हाला नाही. पण कळ सोसा, असं आवाहन त्यांनी केलं.

शहाणपट्टी करू नका
प्रत्येक विषयात मनोज जरांगे यांनी बोललंच पाहिजे असं नाही, असं काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले होते. यावेळी त्यांनी वडेट्टीवारांचा कडक शब्दात समाचार घेतला. मग तुम्हाला सर्व ठेवायचं का? आम्ही गोरगरीबांच्या बाजूने बोलायचं नाही का? तुमचे उद्योग बघा ना. तुम्ही कोण लागून गेला? तुम्हीच बोलायचा ठेका घेतला का? आम्ही का बोलायचं नाही? उगाच शहाणपट्टी मारू नका. आमचे चार पोरं मेली, परत आणून देता का? असा असतो का विरोधी पक्षनेता? दलित, आदिवासी, मुस्लिम आणि मराठ्यांबाबत आम्ही बोलायचं नाही का?, असा प्रश्नांचा भडिमारच जरांगे यांनी वडेट्टीवारांवर केला.

मुंबईत रिकाम्या ट्रेनमध्ये महिलेवर कुलीकडून अत्याचार, पोलिसांनी दीड तासात आवळल्या मुसक्या

0

मुंबईतील वांद्रे परिसरात एक खळबळजनक घटना घडली आहे. वांद्रे टर्मिन्समध्ये एका कुलीने ट्रेनच्या रिकाम्या डब्ब्यात महिलेवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी आरोपीला दीड तासात अटक करण्यात आली. राहुल अब्दुल शेख असे या आरोपीचे नाव आहे. तो विनापरवाना हमाल असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

नेमंक प्रकरण काय?

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी २ फेब्रुवारीला एक महिला तिच्या मुलासोबत प्रवास करत होती. शनिवारी रात्री त्या महिलेची ट्रेन वांद्रे टर्मिन्समध्ये पोहोचली. वांद्रे टर्मिन्समधून तिची दुसऱ्या ठिकाणी जाणारी ट्रेन होती. ही ट्रेन दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर उभी होती. ती महिला त्या ट्रेनमध्ये चढली. त्यावेळी इतर कोणताही प्रवासी या ट्रेनमध्ये नव्हता. त्याचवेळी एक कुली त्या ट्रेनमध्ये चढला. त्या कुलीने आजूबाजूला कोणीही नसल्याचा गैरफायदा घेत त्या महिलेवर बलात्कार केला. यानंतर तो पळून गेला.

यानंतर त्या महिलेने तात्काळ वांद्रे जीआरपीएफ पोलिसात तक्रार दाखल केली. या गुन्ह्याची माहिती मिळताच पहिल्यांदा महिलेला वैद्यकीय मदत देण्यात आली. यानंतर तात्काळ आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलीस पथक रवाना झाले. यादरम्यान रेल्वे पोलिसांनी आरोपीला शोधण्यासाठी अनेक सीसीटीव्हीचे फुटेज तपासले आणि आरोपीला अटक करण्यात आली.

वांद्रे टर्मिनसवर मेल गाडीत महिलेवर बलात्कार करणाऱ्या आरोपीच्या अवघ्या दीड तासात मुसक्या आवळण्यात आल्या. राहुल अब्दुल शेख असे त्याचे नाव आहे. तो विनापरवाना हमाल असल्याची प्राथमिक माहिती आहे. तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपीला दीड तासात अटक करण्यात आली. सध्या पोलिसांकडून आरोपीची कसून चौकशी सुरु आहे. आरोपीची गुन्हेगारी पार्शवभूमी आहे का याचीही पडताळणी केली जात आहे.

सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
दरम्यान या घटनेनंतर मुंबईतील रेल्वे स्थानकांवरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या घटनेनंतर रेल्वे पोलिस आणि प्रशासनावर टीका होत आहे. प्रत्येक प्लॅटफॉर्मवर सुरक्षारक्षक असतात. मात्र ज्यावेळी ही घटना घडली तेव्हा तिथे सुरक्षारक्षक नव्हते का असा प्रश्न उपस्थित होत आहे. यामुळे वांद्र्यातील रेल्वेच्या पोलीस सुरक्षा रक्षकांची चौकशी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडच्या भेटीबाबत जरांगेंचा मोठा गौप्यस्फोट

0

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री धनंजय मुंडे आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणातील संशयित आरोपी वाल्मिक कराड याच्याबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. आज (3 फेब्रुवारी) माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे यांनी धनंजय मुंडेंसोबतच्या भेटीवर भाष्य केलं. निवडणुकीआधी धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड भेटायला आले होते, असं मनोज जरांगे यांनी सांगितले.

मनोज जरांगे नेमकं काय म्हणाले?

धनंजय मुंडे निवडणूकपूर्वी मला भेटायला आले होते. 8 दिवसांपासून फोन येत होते. रात्री 2 वाजता आले, सोबत कराड होता. आणि मला सांभाळा असे म्हटलं. मी झोपलो होतो ते आत आले. त्यांनी कराडची ओळख करून दिली. त्यावेळी मी त्यांना हर्व्हेस्टरचे पैसे बुडवणार असं त्यांना म्हटलं होतं. त्यांनी लक्ष राहुद्या असं म्हटलं. जाताना पाया पडले, असा गौप्यस्फोट मनोज जरांगे यांनी केला. दरम्यान, आरोपींना यंत्रणा सोडणार नाही, टोळी धनंजय मुंडे यांची आहे, आरोपींना लपवत आहे. याच्या एका नेत्याने जिवंतपणी मरण-यातना भोगल्या या टोळीमुळे, असा दावाही मनोज जरांगे यांनी यावेळी केला.

महंत नामदेवशास्त्रींवर मनोज जरांगे काय म्हणाले?

महंत नामदेवशास्त्री यांचं सर्व उघड पडत आहे, जे बोलायचं आहे ते बोलून गेले, टोळीने दाखवलं किती जातीवाद असतो. असे जातीवादी शब्द महाराष्ट्राने पहिल्यांदाच ऐकले आहेत. आरोपींचे समर्थन करणारे शब्द महाराष्ट्रचं नुकसान करणारे आहे, पोटातील ओठावर आले. बाबाला दोष देत नाही, करून घेणारी टोळी आहे.स्वतः साठी देवधर्म कळेना…. काही लोकांनी ओबीसीच्या नावाखाली अन्यथा सहन केला. ओबीसी असून देखील त्यांच्यावर अन्याय झाला… आता लोक व्यक्त होत आहे, असं मनोज जरांगे म्हणाले.

बीड जिल्ह्यातील 24 सरपंच, 820 सदस्यांचे सदस्यत्व रद्द; गावगाडा चालवणाऱ्या लोकप्रतिनिधींना जिल्हाधिकाऱ्यांचा दणका

0

बीड जिल्ह्यात गाव गाड्याचा कारभार चालवणाऱ्या सरपंचाला आणि सदस्याला जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी चांगलाच दणका दिला आहे. आत्तापर्यंत जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी 24 सरपंच आणि 820 सदस्य यांचे सदस्यत्व रद्द केल्याची माहिती पुढे आली आहे.

जातवैधता प्रमाणपत्र वेळेत सादर न केल्याने जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी 20 जानेवारी रोजी जिल्ह्यातल्या सात तालुक्यातील 13 सरपंच, तर 418 सदस्यांचे सदस्यत्व रद्द केले होते. त्यानंतर आता पुन्हा कारवाई करत चार तालुक्यातील 11 सरपंच आणि 402 सदस्यांचे सदस्यत्व रद्द केले आहे. त्यामुळे आत्तापर्यंत 24 सरपंच आणि 820 सदस्यांचे सदस्यत्व रद्द झाले आहे.

जिल्ह्यातील 24 सरपंच, 820 सदस्यांचे सदस्यत्व रद्द, नेमकं कारण काय?

पुढे आलेल्यामाहितीनुसार, 2020 ते 25 या कालावधीत झालेल्या सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनी त्यांचे जात वैधता प्रमाणपत्र विहित मुदतीत सादर केले नाहीत. अनुसूचित जाती अनुसूचित जमाती प्रवर्गासाठीच्या राखीव असलेल्या जागांवर निवडणूक लढविणाऱ्या व्यक्तीस जातीचे प्रमाणपत्र आणि वैधता प्रमाणपत्र निवडून आलेल्या दिनांकापासून बारा महिन्यांच्या कालावधीत सादर करणे आवश्यक आहे. मात्र हे प्रमाणपत्र सादर न केल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. त्यामुळे गावगाडा चालवणाऱ्या लोकप्रतिनिधींना जिल्हाधिकाऱ्यांनी चांगलाच दणका दिल्याचे बोलले जात आहे.

जात वैधता प्रमाणपत्र विहित मुदतीत सादर न केल्याने कारवाईचा बडगा

गेल्या काही दिवसांपासून चर्चेच्या केंद्रस्थानी असलेल्या बीड जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांकडून सरपंच आणि ग्रामपंचायतींच्या सदस्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. 24 सरपंच आणि 820 सदस्य यांचे सदस्यत्व रद्द केलंय. यापूर्वी ही जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी आष्टी, अंबाजोगाई, वडवणी, पाटोदा, माजलगाव, केज आणि धारूर तालुक्यातील 413 ग्रामपंचायत सदस्य आणि 13 सरपंचाचे सदस्य रद्द केले होते. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती नागरिकांचा मागास प्रवर्गासाठीच्या राखीव असलेल्या जागांवर निवडणूक लढविणाऱ्या व्यक्तीस जातीचे प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र निवडून आलेल्या दिनांकापासून बारा महिन्यांच्या कालावधीत सादर करणे आवश्यक आहे. मात्र 2020 पासून पुढे झालेल्या ग्रामपंचायत सार्वत्रिक व पोटनिवडणुकीमध्ये राखीव प्रवर्गातून निवडून आलेल्या अनेक सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनी त्यांचे जात वैधता प्रमाणपत्र विहित मुदतीत सादर न केल्याने त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे.

माझ्यासोबतही गेल्यावेळी अन्याय, पण मी…, महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळची वादावर पहिली प्रतिक्रिया!

0

मुळशी येथील पृथ्वीराज मोहोळ हा यावर्षीच्या ‘महाराष्ट्र केसरी’चा मानकरी ठरला आहे. त्यामुळे ‘महाराष्ट्र केसरी’चा किताब मिळविण्याचे मोहोळ कुटुंबाने पाहिलेले स्वप्न अखेर सत्यात उतरले. पण यावेळी महाराष्ट्र केसरी स्पर्धेला गोंधळाचे गालबोट लागले. उपांत्य फेरीत पृथ्वीराज मोहोळकडून पराभव झाल्यानंतर डबल महाराष्ट्र केसरी असलेला पैलवान शिवराज राक्षे याने थेट पंचांना लाथ मारली. पुण्याचा पृथ्वीराज मोहोळने शिवराजला चितपट केले. त्यानंतर पंचांनी मोहोळला विजयी जाहीर केले.

दरम्यान, पृथ्वीराज मोहोळने 67 वा महाराष्ट्र केसरी किताब पटकावल्यानंतर थेट दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी पुण्यात आला. यादरम्यान तो म्हणाला की, गणपती बाप्पा मोरया! खूप भारी वाटतंय. मी कधी कोणता सामना जिंकलो तर सगळ्यात पहिल्यांदा इथेच येतो गणपतीच्या पाया पडायला. आणि आता महाराष्ट्र केसरीची गदा घेऊन पण मी इथेच आलोय. मी यासाठी खूप तयारी केली होती, माझ्या चुलते असतील, मित्र असतील, वडील असतील अखेर यांच्या मेहनतीचे फळ भेटले.

माझ्यासोबतही गेल्यावेळी अन्याय, पण मी हार न मानता जिंकून दाखवलं

वादावर आणि पंचाच्या निर्णयावर पृथ्वीराज मोहोळने स्पष्ट शब्दात प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला की, तो पंचांचा निर्णय आहे, त्यावर मी काही बोलू शकत नाही. मी पण एक खेळाडू आहे. मी माझं काम करून दाखवला आहे, तो त्यांचा प्रश्न आहे ते बघतील त्यांना काय करायचं. पण पंचांचा निर्णय अंतिम असतो. माझ्यासोबत ही मागच्या वेळी असंच घडलं होतं. पण मी हार मानली नाही. यंदा आलो आणि जिंकून दाखवलं.

महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकण्याचे माझ्या आजोबांचे स्वप्न होते. आमच्या तीन पिढ्या या किताबासाठी खेळल्या. त्यांचे स्वप्न आज पूर्ण केल्याचे मला मोठे समाधान मिळाले. हे माझं स्वप्न नसून, हे माझ्या वडिलांचे व कुटुंबीयांचे स्वप्न होते. असे पृथ्वीराज मोहोळ म्हणाला.

महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकण्याचे स्वप्न मी पाहिले होते. त्यासाठी मी उपांत्य फेरीपर्यंत पोचलो होतो. माझे स्वप्न आज माझ्या मुलाने पूर्ण केले. त्याचा मला खूप आनंद आहे, असे पृथ्वीराजचे वडील राजेंद्र मोहोळ म्हणाले.

U19 WC जिंकल्यानंतर टीम इंडिया मालामाल, बीसीसीआयची मोठी घोषणा

0

अंडर 19 वूमन्स टीम इंडियाने रविवारी 2 फेब्रुवारीला इतिहास घडवला. टीम इंडियाने निकी प्रसाद हीच्या नेतृत्वात दक्षिण आफ्रिकेचा 9 विकेट्सने धुव्वा उडवत सलग आणि एकूण दुसर्‍यांदा अंडर 19 वूमन्स टी 20i वर्ल्ड कप ट्रॉफीवर नाव कोरलं. उपकर्णधार सानिका चाळके हीने विजयी चौकार लगावत भारताला विश्व विजेता केलं. दक्षिण आफ्रिकेने विजयासाठी दिलेलं 83 धावांचं माफक आव्हान भारताने अवघी 1 विकेट गमावत 11.2 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. टीम इंडियाच्या या विजयानंतर बीसीसीसीआयने मोठी घोषणा केली आहे. टीम इंडियाच्या प्रत्येक खेळाडूला, सपोर्ट स्टाफ आणि कोचिंग स्टाफसाठी बक्षिस जाहीर केलं आहे.

अंडर 19 वूमन्स टीम इंडियाने टी 20 वर्ल्ड कप 2025 स्पर्धेत अप्रतिम कामगिरी केली. त्यामुळेच टीम इंडियाला सलग दुसऱ्यांदा अंडर 19 वूमन्स टी 20 वर्ल्ड कप जिंकता आला. या उल्लेखनीय कामगिरीसाठी आणि सन्मानासाठी हेड कोच नुशिन अल खादीर यांच्या मार्गदर्शनाखालील विजयी संघ आणि सपोर्ट स्टाफला रोख 5 कोटी रुपये देणार आहे”, अशी माहिती बीसीसीआयने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

टीम इंडिया अजिंक्य

दरम्यान टीम इंडियाने या वर्ल्ड कपमध्ये एकही सामना गमावला नाही. टीम इंडियाने खेळलेले सर्व सामने जिंकले. टीम इंडियाने साखळी फेरीतील 3, सुपर 6 मधील 2, त्यानंतर उपांत्य आणि अंतिम असे एकूण आणि सलग 7 सामने जिंकले.

दक्षिण आफ्रिका प्लेइंग इलेव्हन : कायला रेनेके (कर्णधार), जेम्मा बोथा, सिमोन लॉरेन्स, डायरा रामलाकन, फे काउलिंग, काराबो मेसो (विकेटकीपर), मिके व्हॅन वुर्स्ट, सेशनी नायडू, ॲश्लेग व्हॅन विक, मोनालिसा लेगोडी आणि नथाबिसेंग निनी.

टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन : निकी प्रसाद (कर्णधार), सानिका चाळके (उपकर्णधार), जी कमलिनी (विकेटकीपर), गोंगडी त्रिशा, ईश्वरी अवसरे, मिथिला विनोद, आयुषी शुक्ला, जोशिता व्ही जे, शबनम एम डी शकील, पारुनिका सिसोदिया आणि वैष्णवी शर्मा.