Home Blog Page 216

..तर त्यांच्यावरही आक्षेप घ्यायला हवा, शिवराजची निलंबनानंतर पहिली प्रतिक्रिया

0

अहिल्यानगरमध्ये रविवारी 2 फेब्रुवारीला मानाची आणि प्रतिष्ठेची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत मानाची गदा कुणी पटकावली यापेक्षा या स्पर्धेत झालेल्या गोंधळाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. स्पर्धेत 2 पैलवानांना पंचांसोबत वाद घालणं चांगलंच महागात पडलं. पंचांसोबत भिडल्यामुळे डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड या दोघांवर कुस्ती परिषदेकडून कारवाईचा बडगा उचलण्यात आला. दोघांना तब्बल 3 वर्षांसाठी निलंबित करण्यात आलं. याबाबतची माहिती महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष रामदास तडस यांनी दिली. दोन्ही पैलवानांवर करण्यात आलेल्या या कारवाईवरुन राज्यभर क्रीडा वर्तुळात अनेक चर्चा पाहायला मिळत आहे.

कोणत्याही क्रीडा प्रकारात पंचाचा निर्णय हा अंतिम असतो. मात्र कधी कधी पंचांकडूनही चूक होऊ शकते. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत पंचाचा एक निर्णय शिवराजला काही पटला नाही. शिवराजने त्यावरुन पंचांसोबत वाद घातला. शिवराज इतक्यावरच थांबला नाही. शिवराजने पंचाची कॉलर धरली आणि लाथही मारली. हा सर्व प्रकार उंपात्य फेरीतील सामन्यात घडला. त्यामुळे शिवराजवर ही निलंबनात्मक कारवाई करण्यात आली. शिवराजने या सर्व प्रकरणावर आपलं मत मांडलं.

शिवराज काय म्हणाला?

“हे सर्व चुकीचंच झालंय. हे सर्वांनी पाहिलंय. ज्यावेळेला कुस्ती झाली तेव्हा आम्ही पंचांकडे व्हीडिओ पाहून निर्णय घ्यावा, अशी मागणी केली. तुम्ही त्याआधी असा निर्णय घेऊ शकत नाही. तसा अधिकार नाही. आम्ही तिथे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि संयोजकांकडे व्हीडिओ दाखवा आणि त्यानुसार निर्णय घ्या, अशी मागणी केली. जर दोन्ही खांदे टेकले असतील, तर हार मानायला तयार आहे, कुस्तीत हार जीत होत असतेच, त्याबद्दल शंका नाही. पण पंचाच्या चुकीच्या निर्णयामुळे खेळाडूवर अन्याय होत असेल तर त्यांच्यावरही (पंच) आक्षेप घ्यायला हवा”, अशी प्रतिक्रिया शिवराजने निलंबनाच्या कारवाईवर आणि एकूण प्रकरणावर दिली

भारतीय वंशाच्या चंद्रिका टंडन यांनी पटकावला प्रतिष्ठित ग्रॅमी पुरस्कार

0

संगीत क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठित 67 वा ग्रॅमी पुरस्कार सोहळा सोमवारी (3 फेब्रुवारी) पार पडला. या पुरस्कार सोहळ्या भारतीय वंशाच्या ग्लोबल बिझनेस लीडर आणि संगीतकार चंद्रिका टंडन यांनी बाजी मारली. ‘त्रिवेणी’ या अल्बमसाठी त्यांना ग्रॅमी पुरस्कार मिळाला आहे. प्राचीन मंत्र आणि जागतिक संगीत यांचा सुंदर मिलाफ या अल्बममध्ये पहायला मिळतो. 71 वर्षीय चंद्रिका टंडन यांनी ‘बेस्ट न्यू एज’, ‘चांट अल्बम’ श्रेणीमध्ये हा पुरस्कार आपल्या नावे केला आहे. या अल्बममध्ये सात गाणी असून ध्यानसाधनेसाठी आणि मन:शांतीसाठी त्यांची रचना केल्याचं टंडन सांगतात.

या अल्बममध्ये चंद्रिका टंडन यांनी दक्षिण आफ्रिकेतील बासरीवाद वॉटर केलरमन आणि जपानी सेलिस्ट एरु मात्सुमोतो यांच्यासोबत मिळून वैदिक मंत्र सादर केले आहेत. तीन नद्यांच्या संगमावरून या अल्बमला ‘त्रिवेणी’ असं नाव दिलंय. त्याचप्रमाणे यामध्ये तीन वेगवेगळ्या शैलींचंही प्रतिनिधीत्व करण्यात आलं आहे. “संगीत म्हणजे प्रेम, संगीत आपल्या सर्वांमध्ये प्रकाश प्रज्वलित करते आणि आपल्या आयुष्याच्या अंधाऱ्या काळातही संगीत आनंद आणि हास्य पसरवते”, अशा शब्दांत चंद्रिका टंडन यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.

चेन्नईमधील एका पारंपरिक विचारांच्या मध्यमवर्गीय कुटुंबात चंद्रिका यांचा जन्म झाला. मद्रास ख्रिश्चन कॉलेजमध्ये त्यांनी शिक्षण पूर्ण केलं. चंद्रिका कृष्णमूर्ती टंडन आणि त्यांची धाकटी बहीण इंद्रा या लहानपणापासूनच संगीताशी जोडल्या गेल्या आहेत. चंद्रिका यांना कुटुंबातूनच सामवेदाच्या शिकवणी मिळाल्या आहेत. कर्नाटक संगीतासोबततच वैदिक मंत्रसुद्धा त्यांना लहानपणापासून शिकवले गेले.

एकीकडे इंद्रा नूयी यांनी पेप्सिकोचं सीईओ म्हणून 12 वर्षे नेतृत्व केलं आणि जगभरातील बिझनेस विश्वातील 50 सर्वांत शक्तीशाली महिलांपैकी एक बनल्या. तर दुसरीकडे चंद्रिका टंडन या मॅककिन्से इथं पहिल्या भारतीय-अमेरिकन महिला भागीदार होत्या. त्यांनी न्यूयॉर्कस्थित टंडन कॅपिटल असोसिएट्सची स्थापना केली. आयआयएम अहमदाबादमधून पदवीधर झालेल्या चंद्रिका या जागतिक स्तरावरील बिझनेस लीडर ठरल्या. 2015 मध्ये त्यांनी पती रंजन यांच्यासोबत मिळून न्यूयॉर्क स्कूल ऑफ इंजिनीअरिंगला 100 दशलक्ष डॉलर्सची देणगी दिली होती. आता संस्थेनं त्यांच्या नावात टंडन नाव जोडलं आहे.

चंद्रिका यांनी शास्त्रीय गायिका शुभ्रा गुहा आणि गायक गिरीश वाजलवार यांच्याकडून संगीताचं प्रशिक्षण घेतलं. याआधी 2010 मध्ये त्यांच्या ‘ओम नमो नारायण: सोल कॉल’ या अल्बमसाठी पहिल्यांदा ग्रॅमीचं नामांकन मिळालं होतं.

शिर्डीत मध्यरात्री खुनी थरार, साई संस्थांनाच्या दोन कर्मचाऱ्यांची निर्घृण हत्या

0

अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी याठिकाणी आज पहाटे तीन जणांवर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तीन वेगवेगळ्या ठिकाणी तीन लोकांवर हा हल्ला करण्यात आला आहे. तिघंही पहाटेच्या सुमारास कामावर जात होते, यावेळी दबा धरुन बसलेल्या मारेकऱ्यांनी हा हल्ला केला आहे. या हल्ल्यात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर तिसऱ्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एकाच रात्री तीन जणांवर अशाप्रकारे हल्ला झाल्याने परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे.

ज्या तीन जणांवर हल्ले झाले, त्यातील दोघेजण शिर्डी येथील साई संस्थानाचे कर्मचारी आहेत. तर तिसरा जखमी तरुण देखील पहाटे एका खासगी कंपनीत ड्युटीवर जाताना त्याला टार्गेट करण्यात आलंय. सुभाष साहेबराव घोडे आणि नितीन कुष्णा शेजुळ असं हत्या झालेल्या दोघांची नावं आहेत. दोघंही साई संस्थानचे कर्मचारी आहेत. सुभाष घोडे यांच्यावर कर्डोबा नगर चौकात हल्ला करण्यात आला. तर नितीन शेजुळ यांच्यावर साकुरी शिव परिसरात हल्ला झाला आहे. या दोघांवर झालेला हल्ला इतका भयंकर होता की, दोघांचाही मृत्यू झाला आहे.

हल्ला झालेल्या तिसऱ्या तरुणाचं नाव कृष्णआ देहरकर असून तो गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तीन वेगवेगळ्या लोकांवर वेगवेगळ्या ठिकाणी अशाप्रकारे हल्ला केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या हत्या नेमक्या कोणत्या कारणातून झाल्या, तिघांना अशाप्रकारे का टार्गेट करण्यात आलं? याबाबत काहीच माहिती अद्याप समोर आली नाही. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपासाची चक्र फिरवली आहेत. सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे आरोपीचा शोध घेतला जात आहे. लवकरच आरोपींना अटक केलं जाईल, असं आश्वासन पोलिसांकडून देण्यात आलंय.

ड्रग्ज किंवा इतर अमली पदार्थ्यांच्या आहारी गेलेल्या तरुणांकडून पैशांसाठी हल्ले केले असावेत, असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. मात्र हल्ल्याचं अधिकृत कारण अद्याप समोर आलं नाही. ज्यावेळी हे हल्ले झाले, त्यावेळी स्थानिकांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली होती. मात्र पोलिसांनी ही प्रकरणं गांभीर्याने घेतली नाहीत. संबंधितांचा अपघाती मृत्यू झाल्याचा अंदाज लावून या प्रकरणाकडे पोलिसांनी कानाडोळा केल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत. या सगळ्या घडामोडींवर काँग्रेसचे पदाधिकारी सचिन चौगुले यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. पोलिसांनी हे प्रकरण निष्काळजीपणाने हाताळल्याचा आरोप चौगुले यांनी केला आहे.

तुम्ही मजा बघत असाल तर…; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा

0

एका मराठा तरुणाने आत्महत्या केल्याने मनोज जरांगे पाटील सरकारवर चांगलेच संतप्त झाल आहेत. तुम्हाला अजून किती बळी हवे आहेत? माणसं मेलीत माणसं… सरकारने भावना शून्य होऊ नये. आरक्षणाबाबतचा लवकर निर्णय घ्या. तुम्ही जर मजा बघत असाल तर तुम्हाला फळं भोगावी लागतील, असा इशाराच मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. मनोज जरांगे हे मीडियाशी संवाद साधत होते. त्यावेळी त्यांनी हा इशारा दिला आहे.

मला सरकारला विचारायचंय की तुम्हाला किती बळी हवी आहेत? तुम्हाला काहीच वाटत नाही का? अरे माणसं मेलीत माणसं. किमान माणसं मेल्यावर, विद्यार्थी आत्महत्या करायला लागल्यावर माणसाचं काळीज हवं. तुम्हाला जशी मुलं आहेत, तशी मराठ्यांनाही मुलं आहेत. तुम्ही त्यांनाही तुमची लेकरं समजा. आमचा विनाकारण संयम ढळला तर नाईलाजाने वेगळ्या पद्धतीने भयंकर आंदोलन करावं लागेल, असा संतप्त इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.

संयम सुटला तर…

इतर कोणी भलत्याच कारणाने आत्महत्या केली तर त्यांच्यासाठी सर्व काही करता. इथे राजकारणासाठी आत्महत्या होत नाही. मुलं रात्र न् दिवस अभ्यास करतात. पदरी निराशा येते. त्यामुळे ते आत्महत्या करत आहेत. तुम्ही आरक्षणच देत नाही. ही कोणती मग्रुरी आहे. इतका वाईट विचार मराठ्यांबाबतचा सरकारकडे असू नये. सरकारने भावना शून्य होऊ नये. आमची पोरं मरत असतील तर या सरकारचं काय करायचं? असा संतप्त सवाल करतानाच मी मुख्यमंत्र्यांना जाहीरपणे सांगतो की, माझ्या विद्यार्थी आणि विद्यार्थीनींची आत्महत्या होता कामा नये. आमची माणसं मरत आहेत. तुम्ही मजा बघत असाल तर त्याची फळं भोगावी लागणार आहेत. जाहीरपणे सांगतो. उद्या परवा कॅबिनेट आहे. शिंदे समितीच्या मागण्या मार्गी लावा. तुम्हाला शेवटचं सांगतो. नाही तर आमचा संयम सुटणार, असा इशाराही मनोज जरांगे यांनी दिला आहे.

हात जोडून विनंती…

राज्यातील मराठा बांधवांना हातजोडून विनंती आहे. मी समाजासाठी प्रयत्न करत आहे. आरक्षण मिळवणारच आहे. जिव्हारी लागेल असं पाऊल उचलू नका. काल बीडमध्ये आत्महत्या झाली. सिल्लोडमध्ये आत्महत्या झाली. माझी हात जोडून विनंती आहे, आत्महत्या करू नका. नंबर गेला तर गेला, अजून शिकू. आरक्षण मिळाल्यावर पुन्हा शिका. पण कायमचं आयुष्य संपवू नका, असं आवाहन जरांगे यांनी केलं.

‘काहीतरी पावरफुल होणार..’, ट्रम्प यांचं मोठं वक्तव्य, शेजारच्या देशाने सांगितलं, तुम्हाला घाबरत नाही

0
Former US President and Republican presidential candidate Donald Trump waves at supporters at the end of a campaign rally at PPG Paints Arena in Pittsburgh, Pennsylvania on November 4, 2024. (Photo by CHARLY TRIBALLEAU / AFP)

अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प शपथ घेतल्यापासून Action मोडवर आहेत. एकापाठोपाठ एक त्यांनी अनेक मोठे निर्णय घेतलेत. चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांचे मंत्री आक्रमक भूमिकेत आहेत. ट्रम्प यांनी कॅनडा आणि मेक्सिको या शेजारी देशांच्या मालावर मोठ्या प्रमाणात टॅरिफ आकारुन खळबळ उडवून दिली. पनामा कालव्याच संचालन पुन्हा अमेरिकेकडे यावं, यासाठी ट्रम्प शेजारी देशांवर आणि सहकाऱ्यांवर दबाव टाकत आहेत. या बद्दल काहीतरी मोठं घडणार असं ट्रम्प म्हणाले आहेत. ट्रम्प मीडियाशी बोलताना म्हणाले की, “चीन पनामा कालवा चालवत आहे. हा कालवा चीनला दिलेला नाही. हे कराराच उल्लंघन असून आम्ही तो पुन्हा घेणार आहोत”

काहीतरी मोठ घडणार असं ट्रम्प म्हणाले आहेत. ट्रम्प यांच्या वक्तव्यामध्ये अनेक अर्थ दडले आहेत. चीन आणि पनामा सारख्या देशांसाठी हा इशारा मानला जात आहे. अमेरिका काहीही करुन पनामा कालवा पुन्हा आपल्या ताब्यात घेणार असं राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. यासाठी आम्ही मोठ पाऊल उचणार आहोत असं त्यांनी म्हटलय. “खरं तर पनामा कालव्याच संचालन चीन करत आहे. हा कालवा आम्ही चीनला सोपवला नव्हता. पनामा कालवा पनामाकडे देणं हा मूर्खपणा होता. त्यांनी कराराच उल्लंघन केलय. आम्ही हा कालवा परत घेणारच” असं डोनाल्ड ट्रम्प यांनी ठणकावून सांगितलं. “नैतिक आणि कायदेशीर दोन्ही सिद्धांताच पालन केलं, तर पनामा कालवा लवकरात लवकर अमेरिकेकडे सोपवा” अशी आमची मागणी आहे असं ट्रम्प म्हणाले.

थेट धमकीच

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रूबियो यांनी पनामा विरोधात कारवाई करण्याची धमकी दिली आहे. त्यांनी पनामाचे राष्ट्रपती जोस राउल मुलिनो यांना स्पष्ट शब्दात सांगितलय की, “पनामा जलमार्गावरील चीनच नियंत्रण संपलं पाहिजे. असं झालं नाही, तर वॉशिंग्टन आवश्यक पाऊल उचलेलं”

आक्रमणाला घाबरत नाही

अमेरिकी परराष्ट्र मंत्र्यांच्या या धमकीनंतर पनामाची प्रतिक्रिया आली आहे. आम्ही आक्रमणाला घाबरत नाही, असं पनामाच्या राष्ट्रपतीने म्हटलं आहे. त्यांनी अमेरिकेला चर्चेचा प्रस्ताव दिला आहे.

काय होता करार?

पनामा कालव्याची लांबी 82 किलोमीटर आहे. हा कालवा अटलांटिक आणि प्रशांत महासागराला मिळतो. अमेरिकेने 1900 दशकाच्या सुरुवातीला या कालव्याच निर्माण केलं होतं. 1914 मध्ये हा कालवा खुला झाला. त्यानंतर बरीच वर्ष हा कालवा अमेरिकेच्या नियंत्रणाखाली होता. 1977 साली अमेरिकेच नियंत्रण कमी झालं. 1977 साली एक करार झाला, त्यानुसार या कालव्यावर अमेरिका आणि पनामा या दोघांच संयुक्त नियंत्रण सुरु झालं. 1999 सालच्या करारानुसार या कालव्याच नियंत्रण पूर्णपणे पनामाकडे गेलं.

“जितकं होईल तितकं..”, कोच गंभीरचा वनडे सीरिजआधी टीम इंडियाला फ्री हॅन्ड, इंग्लंडला इशारा!

0

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पाचवा आणि अंतिम टी 20i सामना हा मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर पार पडला. टीम इंडियाने विजयासह मालिकेचा शेवट केला. टीम इंडियाने इंग्लंडविरुद्धची 5 सामन्यांची मालिका 4-1 अशा फरकाने जिंकली. त्यानंतर आता उभयसंघात एकूण 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवण्यात येणार आहे. आगामी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही संघांसाठी ही मालिका फार महत्त्वाची अशी आहे. टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर याने पाचव्या टी 20i सामन्यानंतर रोखठोक भूमिका मांडली. गंभीरने टीम इंडियाच्या आक्रमक क्रिकेट खेळण्याचं समर्थन केलं.

गौतम गंभीर याने काय म्हटलं?

“इंग्लंड चांगली टीम आहे. आम्ही सामना गमावू ही भीती बाळगू इच्छित नाही. आमची 250-260 धावा करण्याची इच्छा असते मात्र अनेकदा 120 धावावंर ऑलआऊट होतो, मात्र आम्ही योग्य मार्गावर आहोत. आम्ही पुढेही असंच करणार आहोत, आम्हाला निडरपणे क्रिकेट खेळावं लागेल”, असं गंभीरने पाचव्या टी 20i सामन्यातील विजयानंतर म्हटलं.

अभिषेक शर्माबाबत काय म्हटलं?

अभिषेक शर्मा याने पाचव्या टी 20i सामन्यात 54 बॉलमध्ये 13 सिक्स आणि 7 फोरसह 135 रन्स केल्या. गंभीरने अभिषेकच्या स्फोटक खेळीबाबतही प्रतिक्रिया दिली. “आम्ही अभिषेक सारख्या खेळाडूंचं समर्थन करु इच्छितो. आम्हाला या खेळाडूंवर विश्वास करावा लागेल, कारण टीममधील बहुतांश खेळाडूंचा आक्रमकपणे खेळण्यावर विश्वास आहे”, असंही गंभीरने म्हटलं.

सलामीचा सामना नागपुरात

दरम्यान बॉर्डर गावसकर ट्रॉफीनंतर रोहितसेना पुन्हा एकदा मैदानात उतरणार आहे. टीम इंडिया इंग्लंड विरुद्ध 3 एकदिवसीय सामने खेळणार आहे. या मालिकेतील सलामीचा सामना हा नागपुरात होणार आहे. हा सामना 6 फेब्रुवारीला खेळवण्यात येणार आहे. “आम्ही वनडेत शक्यत तितकं आक्रमक खेळू इच्छितो. क्रिकेट चाहत्यांचं मनोरंजन करु इच्छितो”, असं गंभीरने म्हटलं.

गंभीरची रोखठोक भूमिका

वनडे सीरिजसाठी इंग्लंड टीम : जोस बटलर (कॅप्टन), जोफ्रा आर्चर, गस ऍटकिन्सन, जेकब बेथेल, हॅरी ब्रूक, ब्रायडन कार्स, बेन डकेट, जेमी ओव्हरटन, लियाम लिव्हिंगस्टोन, आदिल रशीद, जो रूट, साकिब महमूद, फिल सॉल्ट आणि मार्क वुड.

वनडे सीरिजसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंह, यशस्वी जयस्वाल, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा आणि हर्षित राणा (बुमराहचा बॅकअप).

भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोला 100 व्या मिशनमध्ये मोठा धक्का

0

सातत्याने यशाची कमान चढणाऱ्या भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोला 100 व्या मोहिमेमध्ये धक्का बसला आहे. 29 जानेवारीला इस्रोने NVS-02 उपग्रह लॉन्च केला होता. GSLV-Mk 2 रॉकेटद्वारे या उपग्रहाच यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलं होतं. पण आता NVS-02 उपग्रहाला अपेक्षित कक्षेत स्थिर करण्यात अपयश आलं आहे. इस्रोकडून रविवारी ही माहिती देण्यात आली. भारत स्वत:ची नेव्हिगेशन प्रणाली विकसित करत आहे. त्यासाठी एनवीएस-02 उपग्रह खूप महत्त्वाचा होता. श्रीहरिकोटा येथील अवकाश तळावरुन या उपग्रहाच लॉन्चिंग झालं होतं. इस्रोची ही 100 वी मोहिम होती.

उपग्रहाच प्रक्षेपण यशस्वी झालं होतं. पण कक्षा वाढवण्याची जी प्रक्रिया असते, त्यात अपयश आलं. एनवीएस-02 उपग्रहातील थ्रस्टर्स प्रज्वलित होऊ शकले नाहीत, त्यासाठी उपग्रहाला अपेक्षित कक्षेत स्थापित करता आलं नाही, अशी इस्रोच्या वेबसाइवटर माहिती देण्यात आली आहे. थ्रस्टर्स प्रज्वलित होण्यासाठी आवश्यक असेलले ऑक्सीडायजरचे वाल्वच उघडले नाहीत, त्यामुळे उपग्रहाला अपेक्षित कक्षेत स्थापित करता आलं नाही.

पर्यायी मिशन रणनितीवर काम सुरु

सध्या एनवीएस-02 उपग्रह पृथ्वीभोवती GTO कक्षेत भ्रमण करत आहे. नेव्हिगेशन सिस्टिमसाठी ही कक्षा उपयोगाची नाही. उपग्रहाची बाकीची सिस्टिम व्यवस्थित काम करतेय. त्याचं भ्रमण सुरु आहे. नेव्हिगेशनसाठी उपग्रहाचा वापर करण्यासाठी पर्यायी मिशन रणनितीवर सुरु असल्याच इस्रोकडून सांगण्यात आलं आहे.

सामन्य ऊर्जा निर्मिती

GSLV रॉकेटने उपग्रहाला GTO कक्षेत स्थापित केल्यानंतर त्यावरील सौर पॅनलने आपलं काम व्यवस्थित सुरु केलं. सामन्य ऊर्जा निर्मिती झाली. ग्राऊंड स्टेशनसोबत कम्युनिकेशन सुरळीत आहे. जीएसएलव्ही द्वारे लॉन्चिंग यशस्वी ठरलं. अत्यंत अचूकतेने कक्षेत स्थापित करण्याबरोबर सर्व टप्प्यांवर योग्य पद्धतीने काम झालं होतं.

भारतीयांना अनेक अभिमानाचे क्षण दिले

इस्रोने आतापर्यंत भारतीयांना अनेक अभिमानाचे क्षण दिले आहेत. इस्रोने मंगळ, चंद्र आणि सूर्य मोहिम सुद्धा यशस्वी करुन दाखवली आहे. दोन वर्षांपूर्वी भारताची चांद्रयान-3 मोहिम यशस्वी ठरली होती. चंद्रावर यशस्वीरित्या यान उतरवणारा भारत जगातील चौथा देश ठरला होता.

स्वत: हात वर करायला आलो असतो…’, शिवराज राक्षेचे कोचही संतापले, महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या नियमावरच बोट ठेवलं!

0

महाराष्ट्र केसरी 2025 स्पर्धेला गालबोट लागले आहे. नांदेड डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे आणि पुण्याच्या पृथ्वीराज मोहोळ यांच्यात सामना रंगला होता. ज्यामध्ये शिवराज राक्षे याला पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर पंचांचा निर्णय न पटल्याने महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षेने पंचांची कॉलर पकडत लाथ मारलीय. शिवराज राक्षे आणि पृथ्विराज मोहोळ यांच्यातील लढतीत पंचांनी मोहोळला विजयी घोषित केल्याने वाद झाला आहे.

शिवराज राक्षेचा पराभव झाल्यानंतर त्यांनी पंचाच्या निकालाविरोधात नाराज व्यक्त करीत त्यांना लाथ मारल्याचा प्रकार घडल्याने गोंधळ उडाला आहे. या प्रकरणात आता शिवराज राक्षेने आपला रिव्हूय दाखविण्यात यावा आणि माझे खांदे आणि पाठ टेकलेली असेल तर आपण स्वत:च कूस्ती सोडून बाहेर पडतो, असे तो म्हणाला. तर आम्हाला अंतिम निर्णय मान्य नसल्याचा पवित्रा राक्षे समर्थकांनी घेतला.

शिवराज राक्षे यांचे प्रशिक्षक काय म्हणाले?

त्यानंतर शिवराज राक्षे यांचे प्रशिक्षक म्हणाले, हे काका पवारचे पठ्ठे आहे. हा ट्रिपल महाराष्ट्र केसरीचा दावेदार होता. त्याने दोन्ही खांदे टेकले असते तर समोरच्याच्या विजय घोषित करण्यासाठी शंभर टक्के स्वत: हात वर करण्यासाठी आलो असतो. त्याने दोन्ही खांदे टेकले असते तर हा पराभूत झाला असता असे आम्ही मान्य केले असते. मी जर अपील टाकलं तर अगोदर माझं अपील चेक करणे आणि नंतर निर्णय देणे, असा नियम आहे. पण पंचांनी न बघता निर्णय देऊन टाकला. समोरच्याचा विजय घोषित केला. शिवराज पूर्ण चीत झाला नव्हता.

प्रशिक्षक काका पवार म्हणाला?

खरंतर, पंचानी जर निकाल चुकीचा दिला असेल तर राग येऊ शकतो. कारण पोर मेहनत करतात, आणि आता त्याचे वर्षे वाया गेले. वर्षभर तयारी केलेली असते त्या रागातून असे घडू शकते असे ज्येष्ठ कुस्ती प्रशिक्षक काका पवार यांनी म्हटले.

महाराष्ट्र चीनचा रेकॉर्ड मोडणार! मुंबईत जगातील सर्वात मोठा कोस्टल रोड; नरीमन पॉईंट ते विरार प्रवास फक्त 40 मिनिटांत

0

जगातील सर्वात कोस्टल रोड आपल्या महाराष्ट्रात होणार आहे. या कोस्टलचे रोड काम प्रगतीपथावर असून महाराष्ट्राचा हा कोस्टल रोड चीनचा रेकॉर्ड मोडणार आहे. मुंबईच्या समुद्र किनाऱ्यालगत तयार करण्यात येत असलेल्या या कोस्टल रोडमुळे नरीमन पॉईंट ते विरार प्रवास फक्त 40 मिनिटांत पूर्ण होणार आहे. मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात यासाठी तरतूद केली जाणार आहे.

मुंबईच्या दक्षिण टोकापासून ते उत्तर मुंबईच्या टोकापर्यंत, म्हणजे नरिमन पॉइंटपासून दहिसरपर्यंत वेगाने पोहोचण्यासाठी मुंबई किनारी रस्ता प्रकल्प टप्प्या-टप्प्याने बांधण्यात येत आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यांतर्गत शामलदास गांधी मार्ग (प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल) ते वरळी-वांद्रे सागरी सेतूच्या वरळी टोकापर्यंतचा धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता प्रकल्प (दक्षिण) उभारण्यात आला आहे. कोस्टल रोड आणि सी लिंक जोणाऱ्या पुलाचे नुकतेच लोकार्पण झाले आहे. या पुलामुळे मरीन ड्राईव्ह ते वांद्रे हा प्रवास आता 15 मिनिटांत होत आहे. वरळी, प्रभादेवी, लोअर परळ, लोटस् जंक्शन येथून थेट एन्ट्री देण्यात आली आहे. याच मार्गाचा विस्तार विरारपर्यंत केला जाणार आहे.

मुंबईतील वांद्रे वरळी सी लिंक हा महाराष्ट्रातील पहिला सी लिंक आहे. आता महाराष्ट्रात वांद्रे ते वर्सोवादरम्यान दुसरा मोठा सी लिंक उभारला जात आहे. कोस्टल रोडचा दहिसरपर्यंत विस्तार केला जाणार आहे. भविष्यात कोस्टल रोडचा विस्तार भाईंदर, विरार आणि पालघरपर्यंत केला जाणार आहे.

वांद्रे वर्सोवा सी लिंक हा स्वातंत्र्य वीर सावरकर सेतू नावाने ओळखला जातोय. या प्रकल्पाचे 25 टक्के काम पूर्ण झाले आहे. मे 2028 पर्यंत हा प्रक्लप पूर्ण करण्याचे टार्गेट आहे. हा सी लिंक तयार झाल्यावर वांद्रे ते वर्सोवा हे अंतर अवघ्या 10 मिनिटांत पार करता येणार आहे. तर, भविष्यात हा सी लिंक वर्सोवा-दहिसर कोस्टल रोडशी जोडले जाणार आहे. यामुळे मरीन ड्राइव्ह ते दहिसर हा दीड तासांचा प्रवास फक्त 45 मिनिटांत पूर्ण करता येणार आहे. वांद्रे वर्सोवा सागरी सेतू हा मुंबईतील दुसरा सागरी सेतू आहे. तिथूनच पुढे वर्सोवावरुन विरारपर्यंत कोस्टल रोडचा विस्तार करण्याची योजना आहे.

वातावरण तापमान! येत्या 3 दिवसात उन्हाचा चटका वाढणार? जाणून घ्या सविस्तर

0

फेब्रुवारी महिन्याची सुरुवातच उष्णतेने झाली आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, येत्या काही दिवसात उन्हाचा तडाखा वाढणार आहे. राज्यातील अनेक शहरांमध्ये किमान आणि कमाल तापमान वाढण्याची दाट शक्यता आहे.

3 फेब्रुवारीपासून राज्यात वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय झाला आहे. यामुळे राज्यात 3 ते 4 फेब्रुवारीला हलका पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. विदर्भातील तापमानातही फारसा बदल नसून संपूर्ण महाराष्ट्रात कोरडे हावामान राहणार आहे. गेल्या दोन दिवसात थंडीत काहीशी वाढ झाली होती. पहाटे गारवा व दुपारी उन्हाचा चटका अशीच स्थिती कायम होती. मराठवाड्यात काही ठिकाणी ढगाळ वातावरण पहायला मिळाले.

मुंबईकरांची सकाळमात्र सुपरकूल

मुंबईचे सकाळचे तापमान मात्र 16 अंशांपर्यंत खाली आले. यात पुढील दोन दिवसांत मोठी घसरण सुरू राहणार आहे. मंगळवारी यंदाच्या हंगामातील सर्वात नीचांकी तापमानाची नोंद होईल, किमान तापमानात 13 अंशांपर्यंत विक्रमी घसरण होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. या दिवशी मुंबईकर ‘सुपरकूल’चा अनुभव घेऊ शकणार आहेत.

मुंबई शहर आणि उपनगरांत मागील काही दिवसांपासून सकाळी आल्हाददायी वातावरण आहे. किमान तापमान 20 अंशांच्या खालील पातळीवर नोंद होत आहे. शहराच्या दिशेने उत्तरेकडील वारे प्रवाहित राहिले आहेत. तसेच आकाश निरभ्र झाल्याने शहरातील थंडीची तीव्रता वाढली आहे. रविवारी किमान तापमानासह कमाल तापमानात घट नोंद झाली होती. सांताक्रुझमध्ये कमाल 31.4 आणि किमान 16.6 अंश तापमान होते. याचवेळी हवेतील आर्द्रतेचे प्रमाण 36 टक्के होती.

मंगळवारी कमाल तापमान 31 अंशांच्याच आसपास राहील, मात्र किमान तापमानात विक्रमी घट नोंद होणार आहे. त्यानंतर आणखी दोन दिवस थंडीची तीच तीव्रता कायम राहण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे.
शहर आणि उपनगरांत बहुतांश ठिकाणी हवेचा गुणवत्ता निर्देशांक चिंताजनक पातळीवरच होता. केवळ कुलाबा आणि बोरिवली येथे चांगल्या हवेची नोंद झाली. या दोन ठिकाणी अनुक्रमे 56 आणि 91 इतका ‘एक्यूआय’ नोंद झाला.
हवेची गुणवत्ता मध्यम श्रेणीतच!