Home Blog Page 21

सर्वोच्च न्यायालयात पहिल्यांदाच कर्मचारी आरक्षण, सरन्यायाधीशांनी काय दिला तर्क?

0

सर्वोच्च न्यायालयाने एक मोठा आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. या निर्णयाअंतर्गत आता सर्वोच्च न्यायालयातील अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील कर्मचाऱ्यांची नियुक्ती आणि पदोन्नतीसाठी आरक्षण लागू करण्यात आले आहे. या निर्णयासंबंधीचे परिपत्रक 24 जून रोजी जारी करण्यात आले आहे. या परिपत्रकाच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयातील सर्वच कर्मचाऱ्यांना या नव्या निर्णयाची माहिती देण्यात आली आहे.

परिपत्रकात नेमकं काय आहे?

सर्वोच्च न्यायालयातील हे मॉडेल अरक्षण रोस्टर तसेच अंतर्गत इमेल नेटवर्कवर अपलोड करण्यात आले आहे. हे आरक्षण येत्या 23 जून 2025 लागू करण्यात येईल, असे परिपत्रकात सांगण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाने जारी केलेल्या मॉडेल रोस्टरनुसार आता सर्वोच्च न्यायालयात नोकरीवर असणाऱ्या अनुसूचित जातीच्या कर्मचाऱ्यांना 15 टक्के आरक्षण मिळेल.

नेमका कोणत्या कर्मचाऱ्यांना मिळणार फायदा?

तर एसटी प्रवर्गातील कर्मचाऱ्यांना 7.5 टक्के आरक्षण मिळेल. हे आरक्षण नियुक्ती तसेच पदोन्नती अशा दोन्हींसाठी लागू असेल. या नव्या धोरणाचा लाभ रजिस्ट्रार, सिनियर पर्सनल असिस्टन्ट, असिस्टन्ट लायब्रेरियन, ज्यूनियर कोर्ट असिस्टंट, चेम्बर अटेंडट या पदावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना होणार आहे.

सोबतच कोणत्याही कर्मचाऱ्याला रोस्टर किंवा रजिस्टरमध्ये काही चूक आढळली तर त्याबाबत रजिस्ट्रारकडे सचूना करता येतील, असेही जारी करण्यात आलेल्या परिपत्रकात सांगण्यात आले आहे.

सरन्यायाधीश काय म्हणाले?

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी पहिल्यांदाच संविधानाने घालून दिलेल्या आरक्षण नीतीला औपचारिक पद्धतीने लागू केले आहे. हा निर्णय घेतल्यानंतर सरन्यायाधीश भूषण गवई यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. सर्वच शासकीय संस्था, अनेक उच्च न्यायालयांत अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गांसाठी हे आरक्षण अगोदपासूनच लागू आहे. सर्वोच्च न्यायालया यासाठी अपवाद का ठरावे? आपल्या कामातून आपले सिद्धांत स्पष्टपणे दिसले पाहिजेत, असे भूषण गवई म्हणाले आहेत.

भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदी रविंद्र चव्हाण यांची बिनविरोध निवड

0

महाराष्ट्र भाजपाची धुरा गेल्या अनेक दिवसांपासून कोणाच्या हाती दिली जाणार, याची सर्वांनाच उत्सुकता लगली होती. आता मात्र ही उत्सुकता संपली आहे. भाजपाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी रविंद्र चव्हाण यांची आज बिनविरोध निवड करण्यात आली. मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या भव्य कार्यक्रमात त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.

अन्य कोणीही अर्ज न भरल्यामुळे बिनविरोध निवड

मुंबई महानगरपालिकेची निवडणूक तसेच राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाला राज्यात एक कायमस्वरुपी प्रदेशाध्यक्ष मिळावा, अशी भावना व्यक्त केली जाऊ लागली. त्यामुळेच प्रदेशाध्यक्षपदासाठी योग्य चेहऱ्याचा शोध घेतला जाऊ लागला.   रविंद्र चव्हाण यांच्याकडे अगोदरपासूनच महाराष्ट्र भाजपाचे कार्यकारी अध्यक्षपद होते. त्यामुळे तेच या पदासाठी योग्य व्यक्ती असल्याचे एकमत भाजपात झाले. ठरल्याप्रमाणे त्यांचे नाव प्रदेशाध्यक्षपदाच्या निवडीसाठी दिल्लीला पाठवण्यात आले होते. या निवड प्रक्रियेत अन्य कोणत्याही नेत्याने अर्ज न केल्यामुळे रविंद्र चव्हाण यांची आज भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली.

 राजकीय आणि सामाजिक वाटचाल

  • समाजकारण जाहीरपणे रस्त्यावर आणि राजकारण मुत्सद्दीपणे चार भिंतीत केले पाहिजे असा सर्वसाधारण नियम आहे. पण या नियमाला अपवाद म्हणजे मा. श्री. रविंद्र चव्हाण अर्थात रवि दादा। समाजकारणाची जाहीर वाच्यता करायची नाही. कारण ते दाखवण्यासाठी करण्यापेक्षा कर्तव्य म्हणून करायचं असतं… आणि राजकारणात देश व पक्षनिष्ठ राहून दिलेली जबाबदारी कार्यकर्ता म्हणून स्वतःच्या खांद्यावर उचलायची व “न्यूज सायकल” मध्ये न अडकता आपल्यावर सोपवलेली जबाबदारी कर्तव्यकठोरपणे पार पाडायची, हाच रवि दादांचा नेहमीचा खाक्या आहे.
  • राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भारतीय जनता पार्टी यांच्या विचारधारेचे संस्कार रविंद्र चव्हाण यांच्या मनावर बिंबले आणि त्यातूनच महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात हा रवि नावाचा दादा माणूस उदयाला आला.
  • गेल्या २५ वर्षांतील रविंद्र चव्हाण यांच्या प्रवासाचा हा मागोवा
  •  २००२ साली भाजपा युवा मोर्चा कल्याण जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड
  • २००५ साली कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या स्वातंत्र्यवीर सावरकर रोड प्रभागातून नगरसेवक म्हणून विजयी
  • २००७ साली कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत स्थायी समिती सभापती पदावर विराजमान
  • २००९ साली नवनिर्मित डोंबिवली विधानसभा मतदारसंघाचे पहिले आमदार म्हणून दणदणीत विजय
  • २००९ नंतर २०१४, २०१९ आणि २०२४ असा डोंबिवलीच्या आमदारकीचा विजयी चौकार
  •  २०१६ साली, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पहिल्या टर्ममध्ये राज्यमंत्री म्हणून मंत्रिमंडळात वर्णी; तसेच रायगड आणि पालघर या जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी
  • २०१६ ते २०१९ दरम्यान महाराष्ट्र सरकारमधील बंदरे, माहिती व तंत्रज्ञान, वैद्यकीय शिक्षण तसेच अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण या ४ खात्यांच्या राज्यमंत्री पदाची जबाबदारी
  • २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत कोकणातील सर्वाधिक मताधिक्य मिळवणारे आमदार
  • २०२० साली भाजपा महाराष्ट्र प्रदेश महामंत्री म्हणून नेमणूक

बौद्धजन पंचायत समितीच्या वतीने राजर्षी शाहू महाराज यांचा १५१ वा जयंतीमहोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न

0

मुंबई दि. २७ (रामदास धो. गमरे) भारतातील ऋषीतुल्य पहिला राजा आरक्षणाचे जनक ज्याने सन १९०२ साली सरकारी नोकऱ्यांत मागासवर्गीय वर्गाला ५०% आरक्षण दिले, शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही हे ओळखून दलित मुलांसाठी १९१३ साली खेड्यापाड्यात शाळा सुरू केला समाजातील अस्पृश्यता व जातिभेदाची भिंत पाडण्यासाठी सवर्ण व दलित, अस्पृश्य विद्यार्थ्यांना १९१९ साली एकत्र शिक्षण देण्यास सुरुवात करणाऱ्या, मोफत पण सक्तीचे शिक्षण सुरू करणाऱ्या व आपल्या पाल्यांना शिक्षण घेऊ न दिल्यास पालकांना १ रुपया दंड ठोठावणाऱ्या महान राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती महोत्सव बौद्धजन पंचायत समिती मध्यवर्ती कार्यालय यांच्या विद्यमाने कार्याध्यक्ष लक्ष्मण भगत यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह, परेल, मुंबई – १२ येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

सदर प्रसंगी कार्यक्रमाच्या प्रारंभी शाहू महाराजांच्या प्रतिमेला लक्ष्मण भगत यांनी पुष्पहार अर्पण करून ज्योत प्रज्वलित केली तर अतिरिक्त चिटणीस विठ्ठल जाधव गुरुजींनी आपल्या गोड व रसाळवाणीने धार्मिक पूजापठण केले तर सरचिटणीस राजेश घाडगे यांनी आपल्या पहाडी व प्रभावी आवाजात सूत्रसंचालन व प्रस्ताविक केले, प्रस्ताविक सादर करत असताना “सामाजिक न्याय आणि मानवी हक्कांसाठी अस्पृश्यांच्या चळवळीचे क्षितिज विस्तारण्याचा खऱ्या अर्थाने प्रयत्न करणाऱ्या मोजक्या समाजसुधारकांपैकी एक म्हणजे छत्रपती राजर्षी शाहू महाराज होत” असे गौरवोद्गार काढले.

अध्यक्षीय भाषणात शाहू महाराजांच्या जीवनप्रवासावर प्रकाश टाकत असता लक्ष्मण भगत यांनी “श्रीमंत छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या प्रजेमध्ये शिक्षणाचा प्रसार व्हावा यासाठी अनेक शैक्षणिक कार्यक्रम सुरू केले. पांचाळ, देवज्ञान, नाभिक, शिंपी, ढोर-चंभार समाज तसेच मुस्लिम, जैन आणि ख्रिश्चन अशा विविध जाती-धर्मांसाठी त्यांनी स्वतंत्र वस्तीगृहे स्थापन केली. विद्यार्थ्यांकरता मोफत वस्तीगृहे स्थापन केल्याने कोल्हापूर राज्य वस्तीगृहाची जननी म्हणून ओळखले जाऊ लागले, समाजातील सामाजिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या लोकांसाठी त्यांनी मिस क्लार्क बोर्डिंग स्कूलची स्थापना केली. मागासवर्गीय गरीब पण गुणवंत विद्यार्थ्यांसाठी त्यांनी अनेक शिष्यवृत्ती सुरू केल्या. रूढी परंपरांना छेद देत त्यांनी वैदिक शाळांची स्थापना केली ज्यामुळे सर्व जाती आणि वर्गातील विद्यार्थ्यांना धर्मग्रंथ शिकणे आणि सर्वांमध्ये संस्कृत शिक्षणाचा प्रसार करणे शक्य झाले. भविष्याचा दूरगामी विचार करून त्यांनी राधानगरी धरणाची उभारणी केली, शेतकऱ्यांसाठी धरणे, मोफत बी-बियाणे, बाजारपेठेची निर्मिती केली, शेतकरी कारखानदार बनावा म्हणून सहकार तत्वाची स्थापना केली. शाहू महाराज हे समाजातील सर्व स्तरांतील समानतेचे प्रखर पुरस्कर्ते होते आणि त्यांनी ब्राह्मणांना कोणताही विशेष दर्जा देण्यास नकार देण्याचे पाऊल उचलत त्यांनी ब्राह्मणांना राजधार्मिक सल्लागार पदावरून काढून टाकले. कुलकर्णी पद नष्ट करून पगारी तलाठी पदाची निर्मिती केली, पहिलवानांना, कलाकारांना राजाश्रय दिला, महात्मा फुलेंच्या कार्याचा शाहू महाराजांवर विशेष प्रभाव होता, स्त्रियांची परिस्थिती सुधारण्यासाठी ही त्यांनी अनेक कामे केली स्त्रियांच्या शिक्षणासाठी त्यांनी कन्या शाळा स्थापन केल्या, तसेच स्त्री शिक्षण या विषयावरही त्यांनी भरभरून भाष्य केले. देवदासी प्रथा, देवाला मुली अर्पण करण्याच्या प्रथेवर बंदी घालणारा कायदा त्यांनी आणला, ज्यामुळे मूलतः पुजारी, मौलवी, पाद्रींच्या हातून मुलींचे शोषण व्ह्याचे थांबले. १९१७ मध्ये त्यांनी विधवा पुनर्विवाहांना कायदेशीर मान्यता दिली आणि बालविवाह रोखण्यासाठी प्रयत्न केले, असा शाहूंचा धगधगधगता जीवनप्रवास तत्कालीन विषमतावादी व मनुवादी वृत्तीविरोधात बंड पुकारून खऱ्या अर्थाने नवीन समाजाची मुहूर्तमेढ करणारा ठरला” असे प्रतिपादन केले.

सदर प्रसंगी कार्याध्यक्ष लक्ष्मण भगत, सरचिटणीस राजेश घाडगे, चिटणीस विठ्ठल जाधव गुरुजी, चिटणीस अनिरुद्ध जाधव, उपकार्याध्यक्ष मनोहर सखाराम मोरे, शिक्षण समिती अध्यक्ष राजेश पवार, निवडणूक मंडळाचे अध्यक्ष मिलिंद जाधव, सचिव संजय मोहिते, कार्यालय सेवक प्रदीप तांबे, साहित्य क्रीडा समिती अध्यक्ष राजाभाऊ तथा रामदास धो. गमरे, निवडणूक मंडळाचे सदस्य अशोक कदम आदी मान्यवर उपस्थित होते.

सरतेशेवटी बौद्धजन पंचायत समितीच्या वतीने श्रीमंत छत्रपती राजश्री शाहू महाराज यांना मानवंदना देण्यात आली व शाहू महाराजांचे कार्य पाहता त्यांची जयंती छत्रपती शिवाजी महाराजांसारखीच थाटामाटात केली पाहिजे असे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटले होते म्हणून पुढील वेळेस मोठ्या सभागृहात हर्षोउल्हासात जयंती सादर करू असे नमूद करून सरचिटणीस राजेश घाडगे यांनी सदर जयंतीमहोत्सव यशस्वी होण्यासाठी अथक परिश्रम घेणाऱ्या सर्वांचे व उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.

समता प्रतिष्ठाणच्या वतीने छत्रपती राजर्षी शाहू महाराज जयंती व ९ व्या वर्धापन दिनानिमित्त शालेय साहित्याचे वाटप

0

समता प्रतिष्ठान मंगळवार पेठ पुणे अंतर्गत आंगण अभ्यासिका यांचा नववा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व बॅग भेट देण्यात येते. यासाठी सेवा सहयोग संस्थेचे यांचे मोलाचे सहकार्य लाभते. १०० मुलांकरीता शालेय साहित्‍य असलेलं किट त्‍यांनी उपलब्ध करून दिले. आज या कार्यक्रमाला श्री. नंदकिशोर जगताप, निवृत्त सल्लागार कामगार अधिकारी तसेच श्री. तेजस अर्लिकट्‌टी, सी.ए.आणि कॉ. मधुकर नरसिंगे कार्याध्यक्ष, व कॉ. वैजीनाथ गायकवाड, जॉईन्ट सेक्रेटरी, पुणे महानगरपालिका कामगार युनियनचे पदाधिकारी उपस्थित होते. तसेच समता प्रतिष्ठानचे संस्थापक श्री संदीप मोरे, अध्यक्ष सौ. अपर्णा चव्हाण, विश्वस्त मंडळातील पदाधिकारी सौ. अमृता मोरे, खजिनदार शुभम वेळेकर व अन्य सहकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
श्री. जगताप सर यांनी मुलांना मार्गदर्शन करताना सांगितले कि, “समता प्रतिष्ठानच्या वतीने सुरू असलेले हे शैक्षणिक उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. समाजातील दुर्लक्षित व वंचित घटकासाठी शिक्षण देण्याचे काम करून अत्‍यंत चांगला असा आदर्श निर्माण करत आहे.
तद्नंतर श्री तेजस सर यांनी यशस्वी होण्यासाठी शिक्षण किती महत्त्वाचे आहे हे मुलांना समजावून सांगितले. सी.ए., सी.एस. सारख्या अभ्यासक्रमासाठी मार्गदर्शन करताना अनेक प्रकारचे विद्यार्थी भेटतात, त्‍यांची परिस्थिती पाहून त्‍यांना जास्तीत जास्त प्रोत्‍साहन देण्याचे काम करत असल्याचे सांगितले. येरवडा परिसरात राहत असूनही अत्‍यंत कठीण परिस्थितीत शिक्षण घेऊन सि.ए. झाल्याचे त्‍यांनी मुलांना सांगितले. कॉन्स्टॅबल रूपाली गिते यांनीही मुलांना साहित्‍य वाटप करून शिक्षणासाठी प्रोत्‍साहित केले. समता प्रतिष्ठान करीत असलेल्या कामासाठी शक्य ते सहकार्य करण्याचे आवाहन त्‍यांनी केले.
कॉ. वैजीनाथ गायकवाड यांनी सुद्धा बोलताना समता प्रतिष्ठानच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले आणि विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहित केले. शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा या बाबासाहेबांनी सांगितलेल्या त्रिसूत्रीचा आपल्या जीवनामध्ये नक्की समावेश करा हे सांगितले. मार्गदर्शन केल्यानंतर सर्व उपस्थीत मुलांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
सदर कार्यक्रमांमध्ये मुलांनी आपापले कलागुण सादर केले. देशभक्तीपर गितांवर आधारित नृत्‍य, गाणी, समूह गान, छत्रपती शाहू महाराज यांची माहिती मुलांनी सांगितली. तसेच विविध नृत्य सादर करून मुलांनी पालकांची मने जिंकली. अध्यक्षा अपर्णा चव्हाण यांनी या कार्यक्रमाचे शेवटी आभार मानले. या सगळ्या कार्यक्रमासाठी मदत करणारे, संम्यक चव्हाण, तनिष्क उबाळे, राज कदम, सोहम सोनवणे, अवधूत, सानिका सरोज, श्रेया मोरे, आदिती साठे, श्रावणी धाराशिवकर, सानिका चव्हाण, श्रावणी शिरोळे, विठ्‌ठल शिंदे आणि सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समृद्धी पाटोळे या अभ्यास प्रमुख या कार्यकर्तीने केले. शेवटी छोटया मुलांनी प्रार्थना घेऊन कार्यक्रमाची सांगता केली. मुलांना खाऊ वाटप करण्यात आला.

आता दुचाकी वाहनांनाही भरावा लागणार टोल; 15 जुलैपासूनच नवीन नियम लागू?

0

भारतातील महामार्गांवरून आत्ता दुचाकीने टोल फ्री प्रवास आता करता येणार नाही कारण 15 जुलै 2025 पासून देशभर दुचाकीस्वारांकडूनही टोल वसूल केला जाऊ शकतो, अशी माहिती विविध रिपोर्ट्समध्ये समोर आली आहे. अद्याप यासंदर्भात केंद्र सरकारने अधिकृत अधिसूचना जारी केलेली नसली तरी दुचाकीस्वारांकडूनही टोल वसुलीची तयारी सुरु झाली आहे, असं सांगितलं जात आहे.

आता FASTag दुचाकीसाठीही बंधनकारक?

आत्तापर्यंत FASTag फक्त चारचाकी आणि व्यावसायिक वाहनांसाठीच सक्तीचं होतं. पण, आता सरकार सर्वच वाहनांसाठी FASTag टोल प्रणाली लागू करण्याचा विचार करत आहे.

जर FASTag सक्तीचं झालं, तर दुचाकी मालकांना FASTag खरेदी करावा लागेल. तो आपल्या बँक खात्याशी किंवा डिजिटल वॉलेटशी लिंक करावा लागेल. वाहनावर तो चिटकवावा लागेल. शहराच्या उपनगरात किंवा ग्रामीण भागात राहणारे लाखो लोक दुचाकीने प्रवास करतात. त्यांचा प्रवास आता महाग होणार आहे.

टोल दर किती?

दुचाकीसाठी टोल दर चारचाकींपेक्षा कमी असतील. मात्र, दर राष्ट्रीय किंवा राज्य महामार्ग, टोल ऑपरेटर आणि प्रवासाच्या अंतरावर अवलंबून असतील. तसेच सरकार वार्षिक पास देण्याची शक्यता आहे.

सध्या दुचाकी वाहनांवर टोल लागू नाही, म्हणजेच त्यांना “FASTag फ्री पास” आहे. पण आता ही सुविधा बंद होण्याची शक्यता आहे. सर्व वाहनांसाठी एकसमान टोल प्रणाली लागू करणे हाच यामागचा उद्देश आहे. त्यातून महामार्गांची देखभाल, विस्तार आणि दुरुस्ती यासाठी महसूल वाढवण्याची सरकारची योजना आहे.

टोलचा खर्च वाढल्यास काही दुचाकीस्वार इलेक्ट्रिक पर्यायाकडे वळू शकतात. अनेक राज्यांमध्ये इलेक्ट्रिक दुचाकींना टोलमधून सवलत आहे. त्यामुळे वाहन उत्पादक कंपन्याही FASTag सोबत काही आकर्षक ऑफर देण्याची शक्यता आहे. थोडक्यात काय तर 15 जुलै 2025 पासून दुचाकीस्वारांनाही टोल द्यावा लागणार का? अद्याप निश्चित नाही. पण याची तयारी मात्र सुरु आहे.

पुणे भाजप 2 पदाधिकाऱ्यांवर महिलांसंबंधित गुन्हे दाखल; पण एकालाही अटक नाही सत्तेचे अभय?

0

पुणे शहरातील भाजपच्या दोन पदाधिकाऱ्यांवर महिला संबंधित प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल झाल्याने अडचणी वाढल्या आहेत; परंतु याप्रकरणी कोणतीही पुढील कार्यवाही न झाल्याने सत्तेचे अभय संबंधितांना कारवाईपासून रोखत आहे की काय अशी चर्चा सध्या सुरू झाली आहे. गुन्हे दाखल झालेल्या दोन्ही पदाधिकाऱ्यांना अद्याप अटक झालेला नाही. मुळात महिलांच्या हक्कांच्या संदर्भात हिरारीने रस्त्यावरती उतरणाऱ्या भारतीय जनता पक्षातीलच पदाधिकारी अशा पद्धतीने वागत असल्याने पक्षाची प्रतिमा मधील होत आहे. विधानसभा मतदारसंघातील नेत्यांच्या जीवावर अटकेपासून संरक्षण मिळतंय का अशी चर्चा सुरु झाली आहे. यावरून भाजपावर विरोधक हल्लाबोल करत आहेत.

पुणे शहरात सध्या महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. मात्र या महत्त्वाच्या काळामध्ये भाजपच्या सक्रिय कार्यकर्त्यांवर सलग दोन महिला-संबंधित प्रकरणांमुळे अडचणी वाढवल्या आहेत. पुण्यातील दोन वेगवेगळ्या भाजप पदाधिकाऱ्यांवर महिलांविरुद्ध गैरवर्तनाचे आरोप झाले आहेत. त्यातील पुणे शहर भाजपचे सरचिटणीस(जुन्या कार्यकारणीतील) प्रमोद कोंढारे यांनी पक्षातील पदाचा राजीनामा दिला आहे. कोंढांरे यांच्यावर 14 जून रोजी एका महिला पोलीस अधिकाऱ्याचा विनयभंग केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला होता. त्यांनी पक्षाकडे आपली बाजू मांडत राजीनामा दिला आहे. यावर भाजप महिला प्रश्नांबाबत अतिशय संवेदनशील आहे. आम्ही महिलांचा आदर करतो. कोंढरे यांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर लगेच पदाचा राजीनामा दिला आहे, अशी भूमिका पक्षाने स्पष्ट केली.

तर दुसऱ्या प्रकरणात 17 जून रोजी पुणे महापालिकेचे कामगार आघाडीचे माजी अध्यक्ष ओमकार कदम यांच्याविरोधात दोन महिला अधिकाऱ्यानी विनयभंगाची तक्रार दाखल केली आहे. विरोधी पक्षांनी या दोनही प्रकरणांचा आधार घेत भाजपवर जोरदार टीका केली आहे. भाजपच्या दोन पदाधिकाऱ्यांवर सलग महिलांविरोधात गुन्हे दाखल होणे धक्कादायक आहे. हे भाजपमध्ये काय सुरू आहे याचे लक्षण आहे अशी विचारणा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून केली जात आहे.

अद्याप कुणालाही अटक नाही

पोलिसांनी दोन्ही प्रकरणांमध्ये तपास सुरू केला असून पीडित महिलांचे जबाब नोंदवले जात आहेत. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की घटना गंभीर असून, पुरावे तपासले जात आहेत. तपास पूर्ण झाल्यानंतरच नेमकी भूमिका स्पष्ट होईल. विशेष म्हणजे या दोन्ही प्रकरणात अद्याप कुणालाही अटक झालेली नाही.

6 जुलैला मराठी माणसांचा गिरगावहून भव्य मोर्चा, हिंदी सक्तीला विरोध, राजसाहेबांचे उद्धव ठाकरेंनाही निमंत्रण

0

राज्यात इयत्ता पहिलीपासून तिसऱ्या भाषेच्या नावाखाली अप्रत्यक्षपणे हिंदी भाषा लादली जात असल्याचा आरोप करत मनसेने राज्य सरकारच्या शिक्षण धोरणाला तीव्र विरोध दर्शवला आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने एक पाऊल मागे घेतले असून शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे त्यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी भेट घेतली.

या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना राज ठाकरे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “आम्हाला शासनाची भूमिका कुठल्याही प्रकारे मान्य नाही. सरकारने पटवून देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.” यासोबतच राज ठाकरे यांनी ‘6 जुलै रोजी मराठी माणसांचा भव्य मोर्चा गिरगावहून निघणार,’ अशी घोषणा देखील केली आहे. या मोर्चाचे निमंत्रण शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांना त्यांनी दिले आहे. या पार्श्वभूमीवर जाणून घेऊयात पत्रकार परिषदेत राज ठाकरे काय म्हणाले?

राज ठाकरेंच्या पत्रकार परिषदेतील मोठे मुद्दे!

  • महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री आता येऊन गेले, त्यांची भूमिका त्यांनी स्पष्ट केली. मी पूर्णपणे भूमिका फेटाळून लावली. आम्हाला हे मान्य नाही, असे त्यांना सांगितल्याची माहिती राज ठाकरेंनी दिली.
  • खरंतर ५ वी नंतरच पर्यायी भाषेचा मुद्दा आहे. त्यांना हे ही सांगितले की, NEP मध्ये असे काही नाही, हे राज्यांवर टाकले आहे. मग ते का करत नाही? सीबीएसई या शाळा आयएएस अधिकाऱ्यांसाठी काढण्यात आल्या. त्या शाळेचं वर्चस्व करायचे सुरू आहे. बाकी राज्य अशी भूमिका घेत नसताना महाराष्ट्रात हे का करत आहे? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.
  • आमचा या संपूर्ण प्रकरणाला विरोध आहे आणि राहणारच आहे. हिंदी असेल किंवा इतर कोणत्या ही भाषेची सक्ती राहणार नाही, असा इशारा राज ठाकरेंनी दिला.
  •  मी सर्व पक्षांना आवाहन करत आहे की, येत्या ६ जुलैला आम्ही गिरगाववरून मोर्चा काढायचे ठरवत आहे. यात कोणता ही झेंडा नसेल. हा मराठी माणसाचा मोर्चा असेल, आम्ही सर्वांना आमंत्रण देत आहोत. ६ जुलै रोजी सकाळी 10 वाजता हा मोर्चा असेल. मी बाकीच्या पक्षांसोबत बोलणार आहे, अशी घोषणा त्यांनी केली.
  • हा महाराष्ट्राचं मराठी पण घालवायचा कट आहे. मी कट बोलतोय, कारण हा कटच आहे. आज सर्वजण विरोध दर्शवित आहोत, असेही राज ठाकरे म्हणाले.
  • मला हे ही बघायच आहे की, कोण-कोण या मोर्चात सहभागी होत आहे आणि कोण येणार नाही मला हे ही बघायच आहे. मला असे वाटत आहे की, ही महाराष्ट्राची लढाई आहे. त्यात सर्वांनी सहभागी व्हावे. कोणत्याही वादाशिवाय महाराष्ट्रहितासाठी एकत्र आलं पाहिजे. या वाक्याचा अर्थ तुम्हाला मोर्चात कळेल.
  • महाराष्ट्रचे सर्व राजकीय पक्ष आहे. त्यांच्याशी मी बोलणार आहे. आमची माणसे त्यांच्यासोबत बोलणार आहेत, असे म्हणत राज ठाकरे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना मोर्चाचे निमंत्रण दिले आहे.
  • मी मोर्चासाठी रविवार निवडला आहे. कारण मोर्चाला सर्व जण येऊ शकतील. हा मोर्चा गिरगाव ते आझाद मैदान, असा असणार आहे.
  • मोर्चात कोणते कलाकार येतायेत ते बघायचंय. मी बोलल्यानंतर कलाकार येतील. महाराष्ट्रात इतके प्रश्न असतांना केवळ आपण भाषेवर का येतोय? कोणती मोठी गोष्ट लपवण्याकरता हे चाललंय? असा सवाल देखील राज ठाकरेंनी उपस्थित केला.
  •  जेएनपीटीला रिक्त पदे आहेत. पण मुलाखती अदानी पोर्टला का सुरु आहेत? 6 तारखेच्या मोर्चाकरिता मी इतर राजकीय पक्षांसोबत बोलणार असल्याची माहिती राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

महाराष्ट्र सरकारचे पावसाळी अधिवेशन ठरलं; हिंदी सक्ती शक्तीपीठ आणि कर्जमाफीवरुन वातावरण तापणार

0

यंदाच्या राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा कार्यक्रम आणि वेळापत्रक निश्चित झाले आहेत. त्यानुसार 30 जून ते 18 जुलै या काळात पावसाळी अधिवेशन होणार आहे. यंदाच्या पावसाळी अधिवेशनात शाळांमध्ये पहिलीपासूनची हिंदी भाषेची सक्ती, शक्तीपीठ महामार्ग आणि कर्जमाफीच्या मुद्द्यावरुन विरोधकांकडून महायुती सरकारला घेरले जाण्याची शक्यता आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला म्हणजे 29 जूनला प्रथेप्रमाणे चहापानाचा कार्यक्रम होईल. या कार्यक्रमाला विरोधक उपस्थिती लावणार की नाही, हे बघावे लागेल. या अधिवेशनाच्या निमित्ताने विरोधी पक्षातील आमदार विविध समस्या आणि मुद्द्यांवरुन सरकारला घेरण्याचा प्रयत्न करतील. या सगळ्याला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि महायुती सरकारचे मंत्री कशाप्रकारे सामोरे जाणार, हे बघावे लागेल.

विधिमंडळाचे अधिवेशन हे विविध समस्या आणि मुद्द्यांवरुन सरकारला घेरण्याची उत्तम संधी असते. मंत्र्यांना विरोधकांनी सभागृहात विचारलेल्या प्रश्न आणि समस्यांबाबत अधिकृतरित्या सर्वांसमोर भूमिका मांडावी लागते. त्यामुळे विरोधक सत्ताधाऱ्यांना अडचणीचे प्रश्न विचारु शकतात. सध्या राज्यात शाळांमधील पहिली भाषेपासूनच हिंदी विषयाची सक्ती आणि शक्तीपीठ महामार्गाचा मुद्दा गाजत आहे. त्यामुळे अधिवेशनात याचे पडसाद उमटू शकतात.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार राज्य सरकारने त्रिभाषा धोरणाची अंमलबजावणी करण्याचे ठरवले होते. त्यानुसार राज्यातील शाळांमध्ये पहिलीपासून तीन भाषा शिकवण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. तिसरी भाषा म्हणून हिंदीची सक्ती सुरुवातीला करण्यात आली होती. मात्र, प्रचंड टीका झाल्यानंतर राज्य सरकारने शुद्धीपत्र काढून हिंदी भाषेच्या अनिवार्यतेची अट मागे घेतली होती. मात्र, अपुरी शिक्षकसंख्या आणि विविध कारणं पुढे करत राज्य सरकारने तिसरा विषय म्हणून हिंदी भाषेला पुरक असे धोरण घेतले होते. या धोरणाला मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यासह अन्य विरोधकांनी कडाडून विरोध केला होता. त्याचे पडसाद यंदाच्या अधिवेशनात उमटतील.

राज्य सरकारने दोन दिवसांपूर्वीच शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनाच्या प्रक्रियेला मंजुरी दिली होती. मात्र, या प्रकल्पामुळे अनेक शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी जाणार असल्याने कोल्हापूर, धाराशिव, बीड आणि अन्य भागात शक्तीपीठ महामार्गाच्या सर्वेक्षणाला विरोध केला जात आहे. भूसंपादनाच्या प्रक्रियेसाठी जाणाऱ्या सराकारी अधिकाऱ्यांना स्थानिक शेतकऱ्यांकडून हुसकावले जात आहे. त्यामुळे यंदाच्या पावसाळी अधिवेशनात विरोधक या मुद्द्यावरुन सरकारला घेरु शकतात.

पुणे महापालिकेच्या कै. पृथक बराटे दवाखान्याचे उत्तुंग यश! ‘कायाकल्प’ पुरस्काराने सन्मान

0

पुणे शहरामध्ये पुणे महापालिकेच्या संचलनात असलेल्या सर्व शहरी आरोग्य केंद्रांपैकी राज्यस्तरीय गुणवत्ता मूल्यमापनात पुणे महानगरपालिकेच्या शहरी आरोग्य केंद्रांमध्ये कै. पृथक बराटे दवाखान्याने प्रथम क्रमांकाचे २ लाख रुपयांचे पारितोषिक पटकावले असून वारजे या नव्याने विस्तारित झालेल्या उपनगरामध्ये उत्तुंग कामगिरी करत ‘पृथक’ यश प्राप्त करण्यात आले आहे. माजी उपमहापौर दिलीप बराटे यांच्या मार्गदर्शनाखाली दैनंदिन काम करताना वस्ती विभागातील नागरिकांसाठी दवाखान्यातील संपूर्ण टीम अहो रात्र काम करत असल्याने सौहार्द वागणूक आणि अथक परिश्रम, समर्पण आणि रूग्णसेवेतील त्यांची गुणवत्ता यामुळेच ही अभिमानास्पद पुरस्कार प्राप्ती झाली आहे.

माजी उपमहापौर दिलीपभाऊ बराटे यांच्या संकल्पनेतून आणि अथक प्रयत्नातून  हे रुग्णालय उभे राहिले आहे. त्यांची दूरदृष्टी आणि समाजासाठी काहीतरी करण्याची तळमळ यातूनच आज हा दवाखाना हजारो नागरिकांसाठी आधारवड ठरत आहे. राज्य शासनाच्या वतीने देण्यात येणारा ‘कायाकल्प’ पुरस्काराचा हा सन्मान अथक परिश्रम, समर्पण आणि रूग्णसेवेतील गुणवत्तेसाठी राबलेल्यांच्या स्वप्नांना मिळालेले हे यश आहे. या ‘कायाकल्प’ पुरस्कारामुळे पुणे शहरातील आरोग्य सेवेची गुणवत्ता आणखी वाढेल अशी खात्रीही आहे.

पुणे महामेट्रो लाईन २च्या विस्तारास मंजुरी केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी; दोन्ही बाजुस १३किमी लांबी १३ स्थानके

0

मेट्रोचे जाळे विणले जात असताना पुणेकरांसाठी महत्वाची बातमी येत आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने आज पुण्यातील मेट्रो लाईन २ च्या विस्तारासाठी 3,626 कोटींच्या निधीची मंजुरी दिली आहे. येत्या चार वर्षांत हा विस्तारित मार्ग पूर्ण करण्यात येणार आहे.महापालिका निवडणुकीपूर्वी हा निर्णय घेण्यात आला आहे.

पुणे मेट्रो २ च्या दुसऱ्या टप्प्याचे विस्तारीकरणाला लवकरच सुरुवात होणार आहे. यामध्ये वनाझ ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली/विठ्ठलवाडी या मार्गावर मेट्रोचा विस्तार केला जाणार आहे. पुण्यातील हा मार्ग सर्वात पहिल्यांदा सुरु करण्यात आला होता. परंतू, तो रामवाडी ते वनाझपर्यंतच होता. तो आता कोथरुडच्या दिशेने चांदणी चौक आणि रामवाडीच्या दिशेने विठ्ठलवाडीपर्यंत वाढविला जाणार आहे.

या दोन्ही बाजुचा विस्तार हा एकूण १२.७५ किमी लांबीचा असणार आहे. या अंतरात १३ स्थानके असतील, जी चांदणी चौक, बावधन, कोथरूड, खराडी आणि वाघोली यासारख्या वेगाने विकसित होणाऱ्या उपनगरांना जोडतील.