Home Blog Page 22

कोथरुडच्या मिसाबंदींकडून आणीबाणीच्या संघर्षमय आठवणींना उजाळा; भाजपा कोथरूड मध्य मंडल तर्फे आणीबाणी बंदींचा विशेष सन्मान

0

स्वतः ची खुर्ची वाचविण्यासाठी देशात आणीबाणी लागू करुन, निरपराध लोकांना तुरुंगात डांबणे ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भारतीय राज्यघटनेची हत्या होती, अशी भावना माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केली. तसेच, स्वातंत्र्य आणि राज्य घटनेची पुनर्स्थापना करण्यासाठी करावा लागलेला संघर्ष तरुण पिढी पर्यंत पोहोचवणं आवश्यक असल्याची भावना ही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

भारतीय जनता पक्ष कोथरूड मध्य मंडलच्या वतीने आणीबाणी काळा दिवस साजरा करण्यात आला. यावेळी आणीबाणी मध्ये तुरुंगवास भोगलेल्या ज्येष्ठ नागरिकांचा विशेष सत्कार करुन, त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. यावेळी माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, भाजपा प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, कार्यक्रमाचे आयोजक भाजपा मध्य मंडल अध्यक्ष निलेश कोंढाळकर, माजी अध्यक्ष डॉ संदीप बुटाला, जगन्नाथ कुलकर्णी यांच्या सह भाजपचे सर्व पदाधिकारी आणि माजी नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आणीबाणीच्या काळातील आठवणींना उजाळा देताना माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले की, आपल्या देशाला १५० वर्षाच्या प्रदीर्घ संघर्षानंतर स्वातंत्र्य मिळालं. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या रुपाने वैभव आपल्या देशाला बहाल केलं. पण स्वतःच्या खूर्चीसाठी कॉंग्रेसने हे वैभव उद्ध्वस्त करुन, देशात आणीबाणी लागू करुन; अनेकांना तुरुंगात डांबलं. या बंदी काळात अनेकांनी प्रचंड हालअपेष्टा सोसल्या. अनेक गरोदर महिलांना देखील तुरुंगात डांबण्याचं काम तत्कालीन सरकारने केलं होतं. त्यांची प्रसूती देखील तुरुंगातच व्हायची, पण कोणीही हार मानली नाही, अशा आठवणी त्यांनी सांगितल्या.

ते पुढे म्हणाले की, आणीबाणी आणि मिसाबंदी हे दोन्ही काळ अतिशय संघर्षाचे होते. मिसाबंदींना अनिश्चित काळासाठी तुरुंगवास भोगावा लागला. त्यामुळे हा संघर्ष काय होता. स्वातंत्र्यासाठी आणि संविधानाच्या पुनर्स्थापनेसाठीचा संघर्ष नव्या पिढीला माहिती असणं आवश्यक आहे.‌ आज कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी खिशात एक पुस्तक घेऊन फिरत आहेत. मात्र ते पुस्तक कोरं आहे, अशी टीका त्यांनी यावेळी केली. तसेच, संघ स्वयंसेवकांच्या जिद्द आणि चिकाटी मुळे देशात पुन्हा संविधानाची पुनर्स्थापना झाली, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

आणीबाणी मध्ये तुरुंगवास भोगलेले मधुसूदन पारखे म्हणाले की, आणीबाणी मध्ये कारागृहात असलेल्या कुणाच्याही मनात खंत नव्हती, उटल तुरुंगवासाच्या काळात सामाजिक कामासाठी नवी ऊर्जा मिळत होती. या कालखंडात असंख्य लोकांनी आपल्या आयुष्याची समिधाच अर्पण केली होती. आज जे लोक संविधान म्हणून ओरडत आहेत, त्यांनी देशात आणीबाणी लागू करण्यासाठी राज्य घटनेची मोड केली, त्यावरही आपली भूमिका मांडावी. सज्जन शक्तीच्या संघर्षाचा इतिहास साक्षीदार आहे, अशी भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली.

यावेळी आणीबाणी काळात तुरुंगवास भोगलेल्या हिरामण जगताप, श्रीराम तथा आप्पा कुलकर्णी, संभाजी ढवरे, अशोकराव नाफडे, श्रीनिवास तेलंग, अनिल रहाळकर, सुभाष काकडे, विजयराव हर्षे, अविनाश देव, कृष्णाजी भडाळे, आनंद करमरकर, विनायक खेडकर, चंद्रशेखर घाटपांडे, प्रा. रघुनाथ काकडे, सोपान चव्हाण, संजयराव रबडे, रवी रबडे, अरविंद शिराळकर, जीना कलगीकर, मोहन थिटे, राजेंद्र कानेटकर, प्रा. अनिल कुलकर्णी, रविंद्र घाटपांडे, शामसुंदर जोशी, विश्वास रथकंटीकर, दिलीपराव नगरकर, विश्वासराव हर्षे, सरमुकादम, अशोक प्रभूणे, मधुसूदन पारखी, जगदिश साठे, मोहनराव पंडित, कुमारजी आठवले, शैला सोमण-पाठक, रंजना शितोळे, मंगला वझे- क्षीरसागर, अमला फडके- वैद्य, प्रज्ञा धारप, श्रीमती मीना भेलके यांचा विशेष सन्मान माजी केंद्रीय मंत्री प्रकाशजी जावडेकर यांच्या हस्ते करण्यात आला.

समर्थ सेवा रिक्षा प्रतिष्ठान सलग्न कोथरूड येथे आठवण रिक्षा स्टँडचे उद्घाटन

0

समर्थ सेवा रिक्षा प्रतिष्ठान सलग्न आठवण रिक्षा स्टँड कोथरूड येथील स्टँड चे उद्घाटन समर्थ सेवा रिक्षा प्रतिष्ठान पुणे शहराचे अध्यक्ष आनंद शेठ तांबे यांच्या हस्ते संपन्न झाले, याप्रसंगी अध्यक्ष श्री रमेश सातपुते व त्यांचे सभासद या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.

समर्थ सेवा रिक्षा प्रतिष्ठानच्या माध्यमातून आरटीओ ट्रॅफिक पोलीस खात्याशी संबंधित असलेल्या सर्व सूचना नियम अटी वेळोवेळी होणारे बदल त्याचप्रमाणे कल्याणकारी महामंडळाचे मिळणारे सर्व लाभ सभासदांना मिळवून देण्यासाठी समर्थ सेवा रिक्षा प्रतिष्ठान कटिबद्ध राहील असे आश्वासन सर्व सभासदांना आनंद तांबे यांनी दिले.

राज्य मंत्रिमंडळ बैठक शक्तिपीठ महामार्ग भूसंपादनाला मान्यता; भूसंपादनास 20 हजार कोटी रुपयांची तरतुदी

0

महाराष्ट्र मधील लोकसभा निवडणुकीत बसल्यानंतर स्थगित झालेल्या शक्तीपीठ महामार्गाचे बिगुल पुन्हा वाजले असून राज्य शासनाच्या वतीने नव्या तयारीसह मंत्रिमंडळाच्या बैठकीत शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादनाला मान्यता दिली आहे. कोल्हापूरमध्ये शेतकऱ्यांनी विरोध केल्यानंतर विधानसभा निवडणुकीच्याआधी भूसंपादन थांबवलं होतं. मात्र आज पुन्हा एकदा भूसंपादनाला मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.

महाराष्ट्र शक्तिपीठ महामार्ग – पवनार (जि.वर्धा) ते पत्रादेवी ( जि. सिंधुदुर्ग) या महाराष्ट्र गोवा सरहद्द शिघ्रसंचार द्रुतगती महामार्गास मान्यता.

राज्यातील साडेतीन  शक्तिपीठ , दोन ज्योतिर्लिंग  आणि  पंढरपूर अंबेजोगाईसहित 18 तीर्थक्षेत्रांना जोडणारा शक्तिपीठ महामार्ग

सदर प्रकल्प महामंडळामार्फत राबवणार असून प्रकल्पाच्या आखणीस तसेच भूसंपादनासाठी 20 हजार कोटी रुपयांच्या तरतुदीस आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.

शक्तिपीठ महामार्ग कोणत्या जिल्ह्यातून जाणार?

विदर्भातील वर्धा ते कोकणातील बांधापर्यंत एकूण 805 किलोमीटरचा शक्तिपीठ महामार्ग असणार आहे.  राज्यातील वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या 12 जिल्ह्यांतून शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे. हा महामार्ग सहा पदरी असेल. महामार्गावर 26 ठिकाणांवर इंटरचेंज असेल. 48 मोठे पूल, 30 बोगदे, आठ रेल्वे क्रॉसिंग असतील. शक्तिपीठ महामार्गासाठी तब्बल 86 हजार कोटी रुपयांचा  खर्च येणार आहे.

कोणत्या देवस्थानांना हा महामार्ग जोडणार?

कोल्हापूर – अंबाबाई,  तुळजापूर – तुळजाभवानी. नांदेड – माहूरची रेणुका देवी या तीन शक्ती पीठांना जोडणारा हा महामार्ग असणार आहे.

परळी वैजनाथ,  हिंगोली जिल्ह्यातील  औंधा नागनाथ (नागेश्वर), माहूरची रेणुकादेवी, तुळजापूरची तुळजाभवानी, पंढरपुरचे विठ्ठल रखुमाई मंदिर, कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर, सोलापुरातील सिद्धरामेश्वर, अक्कलकोट, गाणगापूर, कारंजा (लाड), नृसिंहवाडी, औदुंबर या बारा देवस्थानांना हा महामार्ग जोडणार आहे.

महामार्गासाठी किती जमीन लागणार?

या महामार्गामुळे बारा जिल्ह्यातील 27 हजार 500  एकरांची जमीन हस्तांतरित होणार आहे. त्यामुळे  शक्तिपीठ महामार्गाविरोधात कोल्हापुरातील शेतकरी आक्रमक झाले आहेत.  ठेकेदारांची शक्ती वाढवण्यासाठी गरज नसताना महामार्गाचा घाट घातल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.  हा महामार्ग वर्धा जिल्ह्यातून सुरू होऊन यवतमाळ, नांदेड, धाराशिवमार्गे सिंधुदुर्ग येथे संपणार आहे.

लोकसभा निवडणुकीत बसला फटका

शक्तिपीठ महामार्गात कोल्हापूर जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार असल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत. प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गाच्या मुद्द्यामुळे महायुतीचे अनेक उमेदवार लोकसभेत पडलेत असल्याचं लोकसभेच्या निकालानंतर स्पष्ट झालं होतं.

 

शेतकऱ्यांचा  महामार्गाला आक्षेप का?

रस्त्यातील डोंगर पोखरून बोगदे निर्माण केले जाणार, अनेक ठिकाणी भर घालून छोट्या नद्या-नाले  बुजवले जाणार.

शेतकऱ्यांबरोबर पर्यावरणाचाही विध्वंस होणार

सध्याच्या जमिनी या आमच्या जगण्याचे एकमेव साधन आहे. विशेषत: जमिनी यापूर्वीच गुंठ्यावर आल्या आहेत. आता जमिनी संपादित केल्यास शेतकरी अल्पभूधारक अथवा भूमीहीन होऊ शकतो.

काही जमिनी या बारमाही बागायती आहेत तर काही भविष्यात एनए प्रयोजनाच्या आहेत. विमानतळ, रेल्वे स्थानक, रेल्वे कोच कारखाना, साखर कारखाना, औद्योगिक वसाहतीपासून जवळच्या अंतरावर जमिनी आहेत. त्यामुळे जमिनीचे मूल्य दिवसेंदिवस वाढत आहे. या जमिनी संपादित केल्यास कधीही भरुन न येणारे नुकसान होणार आहे.

प्रभाग रचना राज्य सरकारचे सुधारित शुद्धिपत्रक हा विभाग ‘निरीक्षक’; नंतरच अंतिम प्रस्ताव निवडणूक आयोगाकडे

0

राज्यामध्ये सध्या महानगरपालिकेसह पंचायत समिती स्थानिक स्वराज्य संस्था आणि जिल्हा परिषदा यांच्या निवडणुकांसाठी प्रभाग प्रश्न तयार करण्याचे काम सुरू असतानाच महाराष्ट्र शासनाच्या नगररचना विभागाच्या वतीने एक नवीन शुद्ध शुद्धिपत्रक जारी करण्यात आले आहे. स्थानिक प्रशासनाच्या वतीने अंतिम करण्यात आलेल्या सभागृहावरती निवडणूक आयोग निर्णय घेऊन प्रभाग रचनेची प्रक्रिया अंतिम करणारा असे असतानाच अचानक नगर विकास विभागाच्या वतीने प्राधिकृत अधिकारी नेमण्याची सोय करून राज्य शासनाने संपूर्ण राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपली भूमिका कायम ठेवली आहे. महाराष्ट्र राज्य सरकारचे सध्या असलेले प्रचंड बहुमत आणि विभिन्न स्थानिक स्वराज्य संस्थांवर राज्यातील नेत्यांच्या असलेले वर्चस्व यातून हा शुद्धीपत्राचा जावई शोध निघला आहे की काय अशी शंका निर्माण झाली आहे. या नव्या शुद्धिप्रत्रामुळे विकेंद्री लोकशाहीला धोका निर्माण झाला असून निवडणूक आयोग यावरती काय भूमिका घेतो याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

राज्य शासनाच्या नव्या शुद्धीपत्रानुसार महानगरपालिका, नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या प्रभाग रचनेचे प्रस्ताव राज्य सरकारच्या नगरविकास विभागामार्फत राज्य निवडणूक आयोगाला सादर केले जाणार आहेत. नगरविकास विभागाने सोमवारी प्रभाग रचनेचे विविध टप्पे आणि त्यासाठी जबाबदार असलेले संबंधित अधिकारी याबाबत शुद्धिपत्रक जारी केले. नगरविकास विभागाने १० जून रोजी मुंबईसह २९ महापालिका तसेच नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या प्रभाग रचनेचे प्रारूप तयार करण्याचे आदेश जारी केले होते. त्यानुसार मुंबईसह अ, ब, क आणि ड महापालिका क्षेत्रातील प्रभाग रचनेचे प्रारूप तयार करण्याची जबाबदारी संबंधित महापालिका आयुक्तांवर सोपविण्यात आली आहे. आता नव्याने आलेल्या आदेशाप्रमाणे संबंधित आयुक्तांना अगोदर नगर विकास विभागाच्या प्राधिकृत अधिकाऱ्याकडे प्रभागाची रचना सादर करावी लागणार आहे.

प्रारूप प्रभाग रचना तयार करून त्याला राज्य निवडणूक आयोगाची मान्यता घेण्याची जबाबदारी आयुक्तांवर सोपविण्यात आली होती. त्यानुसार आयुक्तांकडून थेट आयोगाला प्रारूप सादर होणे अपेक्षित होते. महाराष्ट्र शासनाच्या वतीने प्रभाग रचनेमध्ये दखल देत शुद्धिपत्रक काढण्यात आल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांची गळचेपी होण्याची शक्यता निर्माण झाली असून राजकीय पक्षांच्या हस्तक्षेपाने संबंधित प्रभाग रचना बाधित होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राज्यातील सध्याचे राजकारण ‘सत्तेसाठी बेरजेची गणित’ असे वर्गीकृत झाल्याने प्रभाग रचनाही सत्ताधारी पक्षांच्या बाजूने जाण्याची भीती सर्वसामान्य नागरिकांना वाटत आहे.

प्रभाग रचना अशी होणार

मुंबईसह प्रत्येक महापालिकेला नगरविकास विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव आणि प्रधान सचिवांना प्रभागांची प्रारूप रचना सादर करावी लागणार आहे. त्यानंतर विभागाकडून छाननी होऊन प्रभाग रचनेच्या मान्यतेचा प्रस्ताव आयोगाला सादर होईल.

निवडणूक आयोगाची मान्यता मिळाल्यानंतर आयुक्त प्रभागरचना प्रसिद्ध करतील. या प्रभाग रचनेवर राज्य सरकारने प्राधिकृत केलेला अधिकारी सुनावणी घेईल. या सुनावणीनंतर मसुदा आयुक्त नगरविकास विभागाला सादर करतील.

ड वर्ग महापालिकांसाठी ही पद्धत

ड वर्ग महापालिकेत प्रभाग रचना तयार करून संबंधित महापालिका आयुक्त त्याचा आराखडा जिल्हाधिकाऱ्यांना सादर करतील. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत हा प्रस्ताव नगरविकास विभागाला मान्यतेसाठी पाठवला जाईल.

पुढे नगरविकास विभागाकडून राज्य निवडणूक आयोगाला प्रभाग रचनेचा प्रस्ताव पाठवण्यात येईल. नगरपरिषदा आणि नगरपंचायतींमधील प्रभाग रचना संबंधित मुख्याधिकारी यांच्याकडून केली जाईल. नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या प्रभाग रचनेचा प्रस्ताव संबंधित जिल्हाधिकारी नगरविकास विभागाला सादर करतील.

प्रभाग रचेनला राज्य निवडणूक आयोगाकडून मान्यता मिळाल्यानंतर ती प्रसिद्ध करणे आणि त्यावर हरकती, सूचना विचारात घेऊन सुनावणी घेण्याची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. तर अंतिम प्रभाग रचना मुख्याधिकारी जाहीर करतील.

Drishyam 3 ऑक्टोबरपासून फ्लोरवर; अजय देवगनच्या चित्रपटाबाबत मोठी अपडेट

0

अभिनेता अजय देवगनच्या ‘Drishyam’ फ्रँचायझीच्या तिसऱ्या भागावर काम सुरू झाले असून, ‘Drishyam 3’ ची शूटिंग ऑक्टोबर 2025 पासून सुरू होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

दिग्दर्शक जीतू जोसेफ यांनी सांगितले की, चित्रपटाची स्क्रिप्ट जवळपास अंतिम टप्प्यात असून, हिंदी, मल्याळम आणि तेलुगू या तीन भाषांमध्ये एकाच वेळी हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे.

चित्रपटाचे कथानक तिन्ही भाषांमध्ये सारख्याच धाटणीचे असेल, मात्र स्थानिक प्रेक्षकांची आवड लक्षात घेऊन काही बदल केले जातील. हिंदीमध्ये अजय देवगन, मल्याळममध्ये मोहनलाल आणि तेलुगूमध्ये वेंकटेश मुख्य भूमिकेत असतील.

चित्रपटात पुन्हा एकदा सस्पेन्स आणि इमोशनचा मेळ असेल, अशी माहिती दिग्दर्शकांनी दिली. प्रेक्षकांचा उत्साह लक्षात घेता, तिन्ही वर्जन एकाच दिवशी प्रदर्शित करून स्पॉयलर टाळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

‘Drishyam’ ही फ्रँचायझी 2013 मध्ये सुरू झाली होती आणि यापूर्वीचे दोन्ही भाग बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरले आहेत. त्यामुळे ‘Drishyam 3’ कडे प्रेक्षकांचे विशेष लक्ष लागले आहे.

काजोलच्या ‘माँ’चा सोनाक्षीच्या ‘निकिता रॉय’शी टक्कर; 27 जूनला भीतीचा सामना भीतीशीच!

0

बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री काजोल पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. तिचा आगामी ‘माँ’ हा एक हॉरर चित्रपट असून 27 जून 2025 रोजी तो प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे. ‘शैतान’च्या प्रोड्यूसरने हा चित्रपट बनवला असून काजोल एका नव्या आणि थरारक भूमिकेत दिसणार आहे. गेल्या ५ वर्षांमध्ये फक्त सहा चित्रपटांमध्ये झळकलेली काजोल आता एका हटके भूमिकेसह परतते आहे.

पण या चित्रपटाला थेट टक्कर देण्यासाठी येतेय ‘निकिता रॉय’, ज्यामध्ये सोनाक्षी सिन्हा मुख्य भूमिकेत आहे. हा सुद्धा एक हॉरर चित्रपट आहे आणि तो देखील 27 जून 2025 रोजीच प्रदर्शित होणार आहे. दोन्ही चित्रपट एकाच दिवशी, एकाच जॉनरमधून (हॉरर) सिनेमागृहांमध्ये रिलीज होणार असल्यामुळे एक मोठा बॉक्स ऑफिस क्लॅश होण्याची शक्यता आहे.

सोनाक्षीचा परफॉर्मन्स मागील काही प्रोजेक्ट्समध्ये लक्षणीय राहिला असून ‘धाकड’ सिरीजमधील तिचं काम विशेष गाजलं. ‘निकिता रॉय’चा ट्रेलरदेखील प्रेक्षकांना चांगलाच भावला आहे. यामध्ये परेश रावल यांच्यासारखे अनुभवी अभिनेते महत्त्वाच्या निगेटिव्ह भूमिकेत दिसणार आहेत.

हा योगायोग दुर्मिळ आहे, जिथे एकाच दिवशी दोन हॉरर फिल्म्स बॉलिवूडमधून एकमेकांसमोर उभ्या आहेत. काजोलची स्टार पॉवर निश्चितच अधिक असली, तरी सोनाक्षीचा चित्रपट सुद्धा कमकुवत नाही. आता कोणती ‘भिती’ भारी पडते आणि प्रेक्षक कोणत्या भीतीला स्वीकारतात हे 27 जूननंतरच कळेल!

रिंकू सिंह आणि खासदार प्रिया सरोज यांची लग्नाची तारीख पुढे ढकलली, जाणून घ्या कारण

0

भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू रिंकू सिंह आणि समाजवादी पक्षाच्या जौनपूर (मच्छलीशहर) लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या युवा खासदार प्रिया सरोज यांचा विवाह लवकरच होणार होता. दोन्ही कुटुंबीयांकडून लग्नाची तयारी जोरात सुरू होती. मात्र आता ही लग्न सोहळा काही काळासाठी पुढे ढकलण्यात आला आहे.

या महिन्यातच दोघांची सगाई लखनऊतील एका हॉटेलमध्ये पार पडली होती. येत्या 18 नोव्हेंबर 2025 रोजी त्यांचा विवाह वाराणसीतील ताज हॉटेलमध्ये होणार होता. पण आता रिंकू सिंहच्या क्रिकेटच्या व्यस्त कार्यक्रमामुळे ही तारीख पुढे ढकलण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नोव्हेंबरमध्ये रिंकू सिंह काही महत्वाच्या क्रिकेट स्पर्धांमध्ये सहभागी होणार असल्यामुळे तो उपलब्ध राहणार नाही. त्यामुळे दोन्ही कुटुंबीयांनी विवाह समारंभाची तयारी थांबवली आहे. हॉटेल बुकिंग आता 2026 च्या फेब्रुवारी अखेरीस हलवण्यात आले आहे. मात्र, नवीन तारीख अद्याप निश्चित करण्यात आलेली नाही.

सध्या सोशल मीडियावर रिंकू सिंह आणि प्रिया सरोज यांच्या साखरपुड्यातील भावनिक क्षणांचे व्हिडिओ आणि फोटोही मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले आहेत. साखरपुड्याच्या कार्यक्रमात राजकारण आणि खेळविश्वातील अनेक दिग्गज उपस्थित होते. प्रिया सरोजच्या डोळ्यांत आलेले अश्रू आणि दोघांचा मनमोहक अंदाज पाहून चाहत्यांनी त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव केला होता.

लीड्स टेस्टमध्ये शतक झळकावून केएल राहुल म्हणाला – “मी माझी पोझिशन विसरलो होतो”

0

भारताच्या केएल राहुलने लीड्स टेस्टमध्ये शानदार शतक ठोकून टीम इंडियाला मजबूत स्थितीत पोहोचवले. चौथ्या दिवशीच्या खेळानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत राहुलने केलेल्या एका वक्तव्यामुळे चर्चा सुरू झाली आहे की, तो अप्रत्यक्षपणे टीम इंडियावर टीका करत होता का?

राहुलने पत्रकार परिषदेत सांगितले की, गेल्या काही वर्षांत तो आपली बॅटिंग पोझिशन विसरला होता. कधी त्याला ओपनिंगसाठी, कधी नंबर 3, कधी 5 किंवा अन्य क्रमांकावर खेळायला पाठवले गेले. त्यामुळे त्याच्या भूमिकेमध्ये सातत्य नव्हते. त्याच्या या वक्तव्यातून भारतीय संघ व्यवस्थापनाच्या निर्णयांवर प्रश्न उपस्थित झाल्याचे दिसले.

तथापि, राहुलने हेही स्पष्ट केले की, त्याला जी जबाबदारी देण्यात आली, ती त्याने स्वीकारली आणि त्या प्रत्येक भूमिकेचा अनुभव घेण्याचा प्रयत्न केला. त्याला स्वतःला नव्याने सिद्ध करण्याची संधी मिळाली आणि तो त्या क्षणांचा आनंद घेत होता.

केएल राहुलने लीड्स टेस्टच्या दुसऱ्या डावात 247 चेंडूंवर 137 धावा करत टीम इंडियाचा डाव भक्कम केला. त्याच्या या खेळीमुळे भारताने इंग्लंडसमोर 371 धावांचे लक्ष्य ठेवले. राहुल म्हणाला, “माझ्यासाठी फार काही बदललेलं नाही. फरक इतकाच आहे की आता मी धावा करत आहे. पूर्वी सुरुवात चांगली असली तरी मोठ्या स्कोरमध्ये रूपांतर करता येत नव्हतं.”

राहुलच्या या वक्तव्यातून त्याच्या मनातील खंत आणि आत्मविश्वास दोन्ही झळकले. टीममधील भूमिकेतील अनिश्चिततेवर भाष्य करतानाच, आपल्या जबाबदारीवरही तो ठाम होता.

देशातील पहिलं वैद्यकीय महाविद्यालय, केवळ ₹40,500 मध्ये होते MBBS शिक्षण

0

NEET UG 2025 परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना लवकरच काउंसिलिंग प्रक्रियेचा सामना करावा लागणार आहे. देशभरात यंदा 1,18,190 MBBS जागांवर प्रवेश घेतला जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर, देशातील सर्वात पहिले वैद्यकीय महाविद्यालय असलेल्या कोलकाता मेडिकल कॉलेज विषयी माहिती पुढे आली आहे.

हे महाविद्यालय 28 जानेवारी 1835 रोजी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने स्थापन केले होते. येथे एकूण 250 MBBS जागा असून, त्यापैकी 38 जागा ऑल इंडिया कोट्यातून आणि 212 जागा राज्य कोट्यातून भरल्या जातात.

या कॉलेजमध्ये MBBS कोर्ससाठी एकूण ट्यूशन फी ₹40,500 आहे, तर हॉस्टेल फी ₹648 वार्षिक आहे. सध्याच्या आकडेवारीनुसार, 2024 मध्ये जनरल कोट्यासाठी कट-ऑफ रँक 3427 होती. यंदा 2025 मध्ये जनरल कोट्यासाठी कट-ऑफ 610 ते 630 गुणांदरम्यान राहण्याची शक्यता आहे.

विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल, वाय-फाय, खेळाचे मैदान, जिम आणि सांस्कृतिक कार्यक्रम अशा विविध सुविधा या महाविद्यालयात उपलब्ध आहेत. कोलकाता मेडिकल कॉलेजचा परिसर सुमारे 26 एकरांवर पसरलेला आहे. देशातील सर्वात जुने आणि विश्वासार्ह वैद्यकीय शिक्षण केंद्र म्हणून या कॉलेजची ओळख आहे.

MLC 2025: पत्नी पाण्यात तर पती मैदानात विजेता; मैथ्यू शॉर्टची झंझावाती खेळी

0

अमेरिकेत सुरू असलेल्या मेजर लीग क्रिकेट (MLC) स्पर्धेत एका अशा खेळाडूने तडाखेबाज कामगिरी केली आहे, ज्याची पत्नीही काही कमी नाही. जो क्रिकेटच्या मैदानात चौकार-षटकार ठोकतो, त्याची पत्नी पाण्यात वेगाने पोहून विक्रम करते. हा खेळाडू म्हणजे ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू मैथ्यू शॉर्ट आणि त्याची पत्नी मॅडी विल्सन – एक आंतरराष्ट्रीय जलतरणपटू आहे.

मैथ्यू शॉर्टच्या नावावर जसे वर्ल्ड कप विजेता आहे, तसेच मॅडी विल्सनने २०१६ आणि २०२० ऑलिम्पिकमध्ये २ सुवर्णपदकांसह ४ पदके जिंकली आहेत. त्यामुळेच “पाण्यात तिचा आणि मैदानात त्याचा मुकाबला नाही” असे म्हटले जात आहे.

MLC 2025 मध्ये शॉर्ट सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न्सचा कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वाखालील संघाने मुंबई इंडियन्स न्यूयॉर्क संघाविरुद्ध आधी फलंदाजी करताना २० षटकांत २४६ धावांचा डोंगर रचला. शॉर्टने ४३ चेंडूंमध्ये ९१ धावा ठोकल्या, ज्यात ५ षटकार आणि ९ चौकारांचा समावेश होता. त्याचा स्ट्राइक रेट होता २११.६२.

मुंबई इंडियन्स न्यूयॉर्क संघ २४७ धावांचा पाठलाग करताना फक्त १९९ धावा करू शकला आणि सामना ४७ धावांनी हरला. युनिकॉर्न्ससाठी हा सलग दुसरा विजय ठरला. पहिल्या सामन्यातही शॉर्टने २९ चेंडूंमध्ये ६१ धावा करून सामना जिंकून दिला होता.

शॉर्टची MLC 2025 कामगिरी (२ सामने):

  • एकूण धावा: १५२
  • षटकार: ९
  • सामनावीर पुरस्कार: २
  • स्ट्राइक रेट: २००+

पत्नी पाण्यात ऑलिम्पिक पदक जिंकते आणि पती मैदानात संघाला विजय मिळवून देतो – मैथ्यू शॉर्ट आणि मॅडी विल्सन हे खऱ्या अर्थाने ‘पॉवर कपल’ म्हणावे लागेल.