Home Blog Page 184

लॉरीनं धडक दिली अन्… सौरव गांगुलीच्या कारचा अपघात; तोपर्यंत बाजूलाच उभं राहून दादाला करावी लागली प्रतीक्षा

0

चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पहिल्याच सामन्यात विजयी सलामी देत भारतीय क्रिकेट संघानं धडाकेबाज सुरुवात केली आणि क्रिकेटप्रेमींचा आनंद द्विगुणित झाला. पण, या आनंदाला गालबोट लागलं ते एका चिंता वाढवणाऱ्या बातमीनं. भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि BCCI चा माजी अध्यक्ष सौरव गांगुली याच्या कारला दुर्गापूर एक्स्प्रेसवे इथं भीषण अपघात झाला. दंतनपूर इथं हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.

अपघातामध्ये गांगुलीच्या कारला काही प्रमाणात नुकसान झालं असल्याचं वृत्त समोर आलं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी म्हणून गांगुली बर्दावानच्या दिशेनं निघाला होता. राज्यातील इतर भागांप्रमाणंच दंतनपूर इथंही पावसाला सुरुवात झाली होती. याचदरम्यान गांगुलीची रेंज रोव्ह नियंत्रित वेगानं रस्त्यावरून जात असतानाच समोरून आलेल्या लॉरीनं त्याच्या कारला धडक दिली आणि वाहनावरील नियंत्रण सुटलं.

कारचालकानं तातडीनं समयसूचकता बाळगत पुन्हा वाहनावर नियंत्रण मिळवलं आणि ब्रेक मारला, ज्यामुळं मागे असणारी सर्व वाहनं एकामागून एक एकमेकांवर आदळली. गांगुलीच्या कारच्या मागे असणाऱ्या वाहनाचीही त्याच्या कारला धडक बसली. पण, यामध्ये सुदैवानं कोणालाही गंभीर इजा झाल्याची नोंद नाही. अपघातानंतर गांगुलीनं परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत रस्त्याच्या बाजूला उभं राहून काही वेळ प्रतीक्षा केली आणि काही वेळानं तो आयोजित कार्यक्रमासाठी निघून गेला. सौरव गांगुलीला या अपघातात कोणतीही इजा झाली नसून, तो सुखरुप असल्याचं वृत्त समोर आलं आहे.

अखेरीस तिरंग्याच्या वादावर पाकिस्तानने गुडघे टेकले, कराचीमध्ये झळकला भारताचा ध्वज

0

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीला सुरुवात झाली आहे. या स्पर्धेचे यजमानपद यंदा पाकिस्तानकडे आहे. स्पर्धेची घोषणा झाली तेव्हापासूनच अनेक वाद सुरु होते. ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वी कराचीतील नॅशनल स्टेडियमवर भारतीय ध्वज नसल्यामुळे वाद निर्माण झाला होता. आता यात सुधारणा झाल्याचे दिसत आहे. सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या ताज्या फोटोमध्ये दिसून येत आहे की चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी सहभागी होणाऱ्या इतर देशांसोबत भारताचा ध्वजही लावण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी जेव्हा नॅशनल स्टेडियममध्ये भारताचा ध्वज दिसत नव्हता तेव्हा मोठा वाद झाला होता, पण आता सर्व काही सुरळीत दिसत आहे.

नक्की काय झालं होतं?

कराचीतील नॅशनल स्टेडियमवर भारतीय ध्वज नसल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला होता. व्हायरल व्हिडीओमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सहभागी झालेल्या इतर देशांचे झेंडे तिथे दिसत होते, पण भारतीय ध्वज तिथून गायब होता. यामुळे सोशल मीडियावरील अनेक चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला. याशिवाय भारतीय चाहते यावरून चांगलेच संतापलेले होते.

काय म्हणाले पाकिस्तानी क्रिकेट बोर्ड?

पाकिस्तानने आपल्या स्टेडियममध्ये भारतीय ध्वज फडकावण्यास नकार दिल्यावर चाहत्यांकडून सोशल मीडियावर प्रचंड टीका झाली. हे प्रकरण तापल्यावर पीसीबीने आता प्रतिक्रिया दिली आहे. पाकिस्तानी क्रिकेट बोर्डने (PBC) यावर उत्तर देत सांगितले की, ‘आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी केवळ पाकिस्तानमध्ये खेळणाऱ्याच देशांचे झेंडे स्टेडियममध्ये फडकवले गेले आहेत.’

राजीव शुक्ला यांनी आक्षेप घेतला होता

बीसीसीआयच्या उपाध्यक्षांनीही या वादावर प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की, पाकिस्तानी बोर्डाने प्रथम भारतीय ध्वज तेथे होता की नाही याची खात्री करावी. ती नसेल तर ती बसवायला हवी होती. राजीव शुक्ला यांनी मंगळवारी दिल्लीतील रेस्टॉरंट क्रिकेट लीगच्या प्रसंगी लाइव्हमिंटला सांगितले, “प्रथम, भारतीय ध्वज तेथे आहे की नाही याची पुष्टी केली पाहिजे. नसल्यास, तो लावायला हवा होता. सर्व सहभागी देशांचे ध्वज तेथे असायला हवे होते.”

कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंना 2 वर्षांची शिक्षा, मंत्रीपद-आमदारकीही जाणार?

0

कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना न्यायालयाने मोठा दणका दिलाय. माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ सुनील कोकाटे यांना नाशिक जिल्हा न्यायालयाने 2 वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. माणिकराव कोकाटे यांना 2 वर्षांचा कारावास आणि 50 हजारांच्या दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे. 1995 साली कागदपत्रांच्या फेरफार आणि फसवणूक केल्याचा आरोप माणिकराव कोकाटे यांच्यावर केला होता. माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी या प्रकरणी याचिका दाखल केली होती. आता नाशिक जिल्हा न्यायालयाने माणिकराव कोकाटे यांना शिक्षा ठोठावली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, 1995 ते 1997 च्या दरम्यानचे हे प्रकरण आहे. माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू सुनील कोकाटे यांनी शासनाकडून ज्या सदनिका मिळतात, त्या सदनिका घेतल्या होत्या. त्यावेळेस त्यांनी सांगितलेलं होतं की आमचं उत्पन्न कमी आहे आणि आम्हाला दुसरं घर नाहीये, अशा स्वरूपाची माहिती त्यांनी दिलेली होती. त्या सदनिका त्यांना शासनाच्या माध्यमातून मिळालेल्या होत्या. मात्र त्यावेळी तत्कालीन अधिकाऱ्यांनी या संदर्भातील तक्रार केलेली होती.

माणिकराव कोकाटेंना 2 वर्षांची शिक्षा

1995 साली कागदपत्रांची फेरफार आणि फसवणूक केल्याचा आरोप आरोप माणिकराव कोकाटे यांच्यावर करण्यात आला होता. माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी याबाबत याचिका दाखल केली होती. याबाबतचा गुन्हा नाशिकच्या सरकार वाडा पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आलेला होता. हे प्रकरण 1997 पासून सुरु होतं आणि आज या प्रकरणाचा निकाल लागलेला आहे. यामध्ये एकूण चार आरोपींना दाखवण्यात आलेले होते. त्यामध्ये माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या बंधूसह इतर दोघांचा समावेश होता. मात्र इतर दोन जणांबाबत कोर्टाने कुठल्याही स्वरूपाच्या शिक्षेची तरतूद केलेली नाही. मात्र माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू या दोघांना दोन वर्षाची शिक्षा आणि 50 हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

मंत्रीपद-आमदारकी जाणार?

दरम्यान, न्यायालयाने माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. लोकप्रतिनिधीला दोन किंवा त्यापेक्षा जास्त वर्षांची शिक्षा झाल्यास त्याचे सभागृहाचे सदस्यत्त्व रद्द होते. त्यामुळे आता माणिकराव कोकाटे यांना मंत्रिपद आणि आमदारकी गमवावी लागू शकते आणि तसे झाल्यास माणिकराव कोकाटे यांच्या राजकीय कारकीर्दीला ब्रेक लागू शकतो. त्यामुळे आता माणिकराव कोकाटे वरिष्ठ न्यायालयात जाऊन या शिक्षेला स्थगिती मिळवणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. मात्र, आता माणिकराव कोकाटे यांच्या रुपाने अजित पवार गटाचा दुसरा मंत्री अडचणीत आला आहे. धनंजय मुंडे यांच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुसर्‍या नेत्याच्या मंत्रिपदावर गंडांतर ओढावले आहे. त्यामुळे आता याप्रकरणात माणिकराव कोकाटे, अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस काय पावले उचलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मोठी बातमी, एकनाथ शिंदे यांची कार बॉम्बने उडवण्याची धमकी; नेमकं प्रकरण काय?

0

शिवसेनेचे पक्ष प्रमुख आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांची गाडी बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. गोरेगाव पोलीस ठाण्यात हा धमकीचा ई-मेल आला आहे. पोलिसांकडून ई-मेल पाठणाऱ्यांचा शोध सुरु आहे. मुंबईतल्या जवळपास 7 ते 8 पोलीस ठाणे आणि इतर विभागात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याच्या धमकीचा मेल आला आहे. ई-मेलमध्ये एकनाथ शिंदे यांची कार बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. मुंबई पोलिसाकडून या मेलचा तपास सुरू आहे. मंत्रालय पोलीस, जेजे मार्ग पोलीस ठाण्यात हा धमकीचा मेल आला आहे.

अज्ज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. सर्व तपास यंत्रणा सर्तक झाल्या आहेत. मुंबई गुन्हे शाखेकडून तपास सुरु झाला आहे. मागच्या काही दिवसांपासून निनावी धमकी देण्याचे प्रकार सुरु आहेत. एकनाथ शिंदे यांच्याच नावाचा उल्लेख का केला? हा ई-मेल कोणी पाठवला? त्यामागचा उद्देश याची चौकशी सुरु आहे. अज्ज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करुन मुंबई पोलिसांकडून शोध सुरु आहे. याआधी सुद्धा एकनाथ शिंदे यांना नक्षलवाद्यांकडून धमकी मिळाली होती. मुंबई पोलीस कसून चौकशी करत आहेत.

एकनाथ शिंदे आज कुठे आहेत?

एकनाथ शिंदे आज दिल्लीमध्ये आहेत. महायुतीचे नेते दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या शपथविधीसाठी गेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याशी संवाद साधणार असल्याची माहिती आहे. एकनाथ शिंदे हे थेट लोकांमध्ये मिसळतात. त्यांच्या सुख, दु:खाशी एकरुप होतात. सध्या त्यांच्याकडे शिवसेनेची जबाबदारी आहे. पक्ष संघटना अधिक बळकट करण्याकडे त्यांनी लक्ष केंद्रीत केलं आहे. राज्याच्या विविध भागातून मोठ्या प्रमाणात ठाकरे गटातून शिवसेनेत इनकमिंग सुरु आहे. एकनाथ शिंदे यांनी बऱ्यापैकी पक्ष विस्तार केला आहे. त्यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवून राज्यभरातील ठाकरे गटाचे पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेनेत दाखल होत आहेत.

आईशप्पथ… ती जागा फक्तं द्या असे करेल की माझं नाव देवेंद्र फडणवीस सांगणार नाही ! मुख्यमंत्र्यांनी आग्र्यातून मोठी घोषणा

0

देशभरात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. महाराष्ट्राप्रमाणेच आग्र्यातही पारंपारिक पद्धतीने शिवजयंती साजरी करण्यात आली. या सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.उत्तर प्रदेश सरकारने छत्रपती शिवाजी महाराज बंदी असलेली जागा आम्हाला द्यावी, त्या ठिकाणी असं भव्य स्मारक उभारू अशी घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली. या स्मारकाला ताजमहलपेक्षाही जास्त लोक त्याला भेट देतील, तर माझं नाव देवेंद्र फडणवीस सांगणार नाही असेही ते म्हणाले.

आग्र्याच्या किल्ल्यात छत्रपती शिवाजी महाराजांना बंदी बनवण्यात आले होते, ती कोठी आज मीना बाजार या नावाने ओळखली जाते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “योगीजींना विनंती करून ही जागा महाराष्ट्र शासन अधिग्रहीत करेल. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारले जाईल. हे स्मारक इतकं सुंदर असेल की ताजमहलपेक्षा जास्त लोक या ठिकाणी भेट देतील. असं झालं नाही तर मी देवेंद्र फडणवीस हे नाव लावणार नाही.”

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शिवाजी महाराज स्वाभिमानाने आग्र्यात राहिले. तिथून स्वराज्यात गेले आणि हारलेले 24 किल्ले त्यांनी जिंकले. पण औरंगजेब काहीच करु शकला नाही. शिवाजी महाराज केवळ राजा नव्हते, तर ते एक युगपुरुष होते.

औरंगजेब आमचा पूर्वज नाही

पुढे बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, औरंगाबादचे नामकरण आम्ही छत्रपती संभाजीनगर केलेले आहे., आमचे हिरो छत्रपती संभाजी महाराज आहेत. औरंगजेब हा जिंकण्यासाठी महाराष्ट्रात आला पण जिवंत परत गेला नाही. मात्र त्याची कबर ही महाराष्ट्रातच झाली, औरंगजेब आमचा पूर्वज नाही. किंवा तो आमचा सुपर हिरो नाही.

विकी कौशलची कार्यक्रमाला उपस्थिती

यावेळी कार्यक्रमाला अभिनेता विकी कौशल देखील उपस्थित होता. महाराष्ट्राचा लाडका देवाभाऊ असे म्हणतात असं म्हणत विकी कौशलने देवेंद्र फडणवीसांचे कौतुक केले. शिवाजी महाराजांचे शौर्य, त्यांचे धाडस आणि विचारधारा ही येणाऱ्या पिढ्यांच्या हृदयात अखंडपणे राहण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत असं आवाहनही विकी कौशलने केले.

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, डाऊन दिशेच्या गाड्या पूर्णपणे ठप्प

0

मुंबईकरांची लाईफलाईन असलेली मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत झाली आहे. टिटवाळा-खडवली दरम्यान मालगाडीचे कपलिंग तुटल्याने मध्य रेल्वे विस्कळीत झाली आहे. यामुळे डाऊन दिशेच्या सर्वच लोकल गाड्या पूर्णपणे बंद झाल्या असून प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. कसाऱ्याहून येणारी “गरीब रथ मेल” आसनगावला थांबवण्याची शक्यता आहे.

कसारा लोकलचा प्लॅटफॉर्म ओव्हरशूट

दरम्यान कसारा लोकलचा प्लॅटफॉर्म ओव्हरशूट झाल्याची घटना समोर आली आहे. मुलुंड स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वरून लोकल दोन डबे पुढे गेली. हा संपूर्ण प्रकार मंगळवारी सकाळी 9 वाजून 23 मिनिटांनी घडला, त्यानंतर लोकल 10 मिनिटं खोळंबली होती. त्यामुळे काही प्रवाशांना रुळांवर उतरून प्लॅटफॉर्मवर यावे लागले, तर मागच्या डब्यांतील प्रवाशांना गाडीत चढणे अतिशय कठीण झाले. गर्दीच्या वेळेस हा प्रकार झाल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.

मोटरमन के.जी. भावसार आणि ट्रेन मॅनेजर व्ही. सिंगापूर यांनी ही लोकल चालवली होती. मोटरमन ब्रेक वेळेवर न लावल्याने लोकल नियोजित ठिकाणी न थांबता पुढे गेल्याचे समोर आले आहे.

प्लॅटफॉर्म ओव्हरशूट हा गोंधळाचा प्रकार असला तरी Signal Passing at Danger (SPAD) पेक्षा कमी धोकादायक आहे. या घटनेच्या चौकशीचे आदेश रेल्वे प्रशासनाने दिले असून भविष्यातील उपाययोजनांवर भर देण्यात येणार आहे. .

‘छावा’ पाहणाऱ्यांसाठी गुड न्यूज; राज्य सरकारचा चांगला निर्णय

0

‘छावा’ या चित्रपटाच्या माध्यमातून जगभरात छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा पुन्हा एकदा पोहोचवली जात आहे. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर आणि टीझर प्रदर्शित झाल्यापासूनच प्रेक्षकांमध्ये त्याविषयी प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती. म्हणूनच अगदी पहिल्या शोपासून थिएटरमध्ये ‘छावा’ बघण्यासाठी गर्दी जमली आहे. अशातच हा चित्रपट पाहणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. देशातील एका राज्यात हा चित्रपट टॅक्स फ्री (करमुक्त) करण्यात आला आहे. त्यामुळे या राज्यातील प्रेक्षकांना ‘छावा’च्या तिकिटावर आता कमी पैसे मोजावे लागणार आहेत.

‘छावा’ला टॅक्स फ्री करणारं हे राज्य मध्यप्रदेश आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीदिनी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी ‘छावा’ हा चित्रपट करमुक्त करण्याची घोषणा केली. ‘छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर बनलेल्या ‘छावा’ या चित्रपटाला मी टॅक्स फ्री करण्याची घोषणा करतो,’ असं ते म्हणाले. याआधी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या चित्रपटाला राज्यात करमुक्त करण्याबद्दल प्रतिक्रिया दिली होती.

“मला आनंद आहे की छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर अत्यंत चांगला चित्रपट बनवला गेला आहे. मी अजून हा चित्रपट पाहिला नाही. मात्र मी लोकांकडून ऐकलंय की इतिहासाशी छेडछाड न करता हा चित्रपट बनवला गेला आहे. या चित्रपटाचा प्रचार करण्यासाठी आणि तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणखी काय करू शकतो, याबद्दल आम्ही विचार करू”, असं फडणवीस म्हणाले. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात 2017 च्या आधीच मनोरंजन कर हटवल्याचं त्यांनी सांगितलं. ‘छावा’ या चित्रपटाने गेल्या सहा दिवसांत 197.75 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. हा चित्रपट लवकरच कमाईचा 200 कोटींचा टप्पा पार केला आहे.

‘छावा’ या चित्रपटात अभिनेता विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराज, रश्मिका मंदानाने महाराणी येसुबाई आणि अक्षय खन्नाने औरंगजेबाची भूमिका साकारली आहे. या चित्रपटातील प्रत्येक भूमिकेनं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.

बाबा रामदेव यांनी मला ब्लॉक केलं, अब्जाधीशाचा दावा, काय आहे प्रकरण ?

0

योग गुरु आणि पतंजलीचे संस्थापक बाबा रामदेव यांचा एक व्हिडीओ सध्या बराच चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये बाबा रामदेव हे घोड्याशी शर्यत लावताना दिसत असून तो व्हिडीओ शेअर होताच प्रचंड व्हायरल झाला. हा व्हिडीओ पाहून लोकांमध्ये बाबा रामदेव यांच्या फिटनेसची चर्चा सुरू झाी. मात्र याच व्हिडीओवर एका अमेरिकन अब्जाधीशाने कमेंट केली, ती वाचून सोशल मीडियावर नवा वाद रंगला आहे. बाबा रामदेव यांच्या अँटी-एजिंग दाव्यांवर प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी मला त्यांच्या एक्स प्रोफाईलवरून ब्लॉक केल्याचा दावा या अमेरिकन व्यावसायिकाने केला आहे.

बाबा रामदेव यांनी पोस्ट केला व्हिडीओ

मंगळवारी बाबा रामदेव यांनी एक व्हिडिओ शेअर केला, ज्यामध्ये ते घोड्याशी शर्यत लावत पळताना दिसत आहेत. त्या व्हिडीओसोबत त्यांनी कॅप्शनही लिहीली होती, “जर तुम्हाला घोड्याप्रमाणे वेगाने धावण्याची ताकद, मजबूत इम्युनिटी (प्रतिकारशक्ती), अँटी-एंजिग आणि शक्ती हवी असेल, तर गोल्डन शिलाजीत आणि इम्युनोग्रिट गोल्ड खा.” असे त्यांनी त्यातच नमूदल केलं होतं. गोल्ड शिलाजीत आणि इम्युनोग्रिट गोल्ड ही पतंजलीची उत्पादनं आहेत, पतंजलीची स्थापना रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण यांनी 2006 मध्ये केली होती.

अमेरिकन अब्जाधीशाचे सवाल

मात्र बाबा राम देव यांच्या व्हिडीओतील या दाव्यांवर अमेरिकन आणि बायोहॅकर ब्रायन जॉन्सन यांनी अनेक प्रश्न विचारले आहेत. अमेरिकन व्यावसायिकाने बाबा रामदेव यांच्या अँटी-एजिंग दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि भारतातील वायू प्रदूषणाबाबत चिंता व्यक्त केली. ब्रायन जॉन्सन यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले की, “सध्या हरिद्वारमधील हवेची गुणवत्ता PM 2.5 36 µg/m³ आहे, जी दिवसाला 1.6 सिगारेट ओढण्याइतकी आहे.” एवढंच नव्हे तर “अशा प्रदूषणाच्या संपर्कात आल्याने हृदयविकाराचा धोका 40-50% वाढतो, फुफ्फुसाच्या कर्करोगाचा धोका तिप्पट होतो आणि क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज (COPD) आणि अकाली मृत्यूचा धोका वाढतो. हे सर्व तुमचे आयुष्य 7 वर्षांपर्यंत कमी करू शकते” असा दावाही त्यांनी पुढे केला.

मात्र आपण बाबा रामदेव यांच्या पोस्टवर ही कमेंट केल्यानंतर त्यांनी मला ब्लॉक केल्याचा दावा या अब्जाधीशाने केला आहे. ब्रायन जॉन्सन याने काही काळापूर्वीच निखील कामथ यांच्या पॉडकास्ट दरम्यान भारतातील हवेच्या गुणवत्तेबद्दल चिंता व्यक्त केली होती. भारतातील खराब हवेमुळे त्याला आरोग्याच्या समस्या जाणवू लागल्याने त्याने पॉडकास्ट मध्येच सोडले होते.

बांग्लादेशची टीम कमकुवत वाटते, पण हा 22 वर्षांचा मुलगा त्याच्या टीमसाठी ठरु शकतो ब्रह्मास्त्र

0

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील आज दुसरा सामना टीम इंडिया आणि बांग्लादेशमध्ये होणार आहे. बांग्लादेशची टीम स्पिन अटॅकसाठी ओळखली जाते. बांग्लादेशी कॅप्टन नजमुल हसन शांतोने भारताविरुद्ध विजय मिळवण्यासाठी आपल्या वेगवान गोलंदाजीवर विश्वास दाखवलाय. असा विश्वास दाखवण्यामागे सर्वात मोठ कारण आहे, 22 वर्षांचा युवा गोलंदाज. आम्ही बोलतोय, नाहिद राणा बद्दल. तो सतत 150 पेक्षा जास्त स्पीडने बॉलिंग करण्यात माहीर आहे. दुबईत टीम इंडियासाठी तो सर्वात मोठा धोका ठरु शकतो.

बांग्लादेशची टीम भारताच्या तुलनेत कमजोर वाटत आहे. पण नाहिद राणाच्या रुपात त्यांच्याकडे एक असं ब्रह्मास्त्र आहे, ज्याच्या बळावर दुबईत उलटफेर होऊ शकतो. 6 फुट 5 इंच उंचीच्या नाहिद राणाने मागच्यावर्षी डेब्यु केला होता. आपल्या पेसमुळे त्याने लवकरच एक वेगळी ओळख मिळवली. बांग्लादेशकडून सर्वात जास्त जलदगतीने चेंडू टाकण्याचा रेकॉर्ड त्याच्या नावावर आहे. त्याने 152 च्या स्पीडने चेंडू टाकला होता. मागच्यावर्षी पाकिस्तान विरुद्ध टेस्ट सीरीजमध्ये राणाने त्यांच्या फलंदाजांना आपल्या वेगाने हैराण केलं होतं.

विराट कोहलीसह तो दुसऱ्या फलंदाजांच्या अडचणी वाढवू शकतो

दुबईच्या खेळपट्टीवर वेगासह त्याची हाईट फायद्याची ठरु शकते. त्यामुळे त्याला चेंडूला चांगली उसळी देता येईल. दुबईत त्यामुळे तो अजून खतरनाक ठरू शकतो. मागच्यावर्षी भारत दौऱ्यावर टेस्ट सीरीजमध्ये तो जास्त यशस्वी ठरला नव्हता. चेन्नई टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये त्याने 82 धावा देऊन एक विकेट काढला. दुसऱ्या डावात 21 धावा देऊन 1 विकेट काढला. पण त्याने भारतीय फलंदाजांना मुक्तपणे फलंदाजी करु दिली नव्हती. आता दुबईत रोहित शर्मा, विराट कोहलीसह तो दुसऱ्या फलंदाजांच्या अडचणी वाढवू शकतो. बांग्लादेशचा कॅप्टन शांतोने सुद्धा भारतीय टीम विरुद्ध यश मिळवण्यासाठी राणाची गोलंदाजी महत्त्वाची ठरेल असं म्हटलं आहे.

त्याचा रेकॉर्ड काय?

नाहिद राणाला आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा जास्त अनुभव नाहीय. पण त्याच्या गोलंदाजीला धार आहे. त्याने आतापर्यंत 6 कसोटी सामन्यात 20 विकेट काढलेत. राणाने 3 वनडे मॅचमध्ये चार विकेट काढलेत. लिस्ट ए चा त्याचा रेकॉर्ड खूप शानदार आहे. त्याने 13 सामन्यात 18.46 च्या सरासरीने 30 विकेट काढलेत.

स्टूलवर चढून थ्रो डाऊनची प्रॅक्टिस

भारतीय टीमला या धोक्याची आधीच कल्पना आहे. त्यासाठी ते तयारी करत आहेत. रिपोर्ट्नुसार टीम इंडियाच्या फलंदाजांना स्टूलवर चढून थ्रो डाऊनची प्रॅक्टिस दिली जातेय. बॉलिंग मशिनवर 150 पेक्षा जास्त गतीच्या वेगवान चेंडूंवर सराव दिला जात आहे.

मंगळवार पेठ ४०० कोटी भूखंडाचा ७० कोटीत पोटभाडेकरार; या जागेत रुग्णालय उभारावे; ‘भाजप’च्या माजी नगरसेवकांची फडणवीसांकडे मागणी

0

ससून रुग्णालयाजवळ मंगळवार पेठेतील सुमारे दोन एकर मोक्याची जागा खासगी विकासकाला पोटभाडेकरारावर देण्याचा निर्णय एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना झाल्याचा आरोप आहे. हा व्यवहार थांबवून तेथे प्रस्तावित कर्करोग रुग्णालय उभारावे, असे पत्र भाजपच्या माजी नगरसेवकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिले आहे. याच जागेवरून आता भाजप अणि शिंदेसेनेत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मंगळवार पेठेतील भूखंड महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने बांधकाम व्यावसायिकाला साठ वर्षांच्या कराराने दिला आहे. सुमारे ४०० कोटींचा हा भूखंड ७० कोटींना पोटभाडेकरारावर दिल्याचा आरोप आहे. त्यावर भाजपचे महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते उज्ज्वल केसकर आणि माजी नगरसेवक सुहास कुलकर्णी यांनी ही जागा कर्करोग रुग्णालयाला द्यावी, अशी मागणी केली आहे.

‘कर्करोग रुग्णालय उभारण्याचा प्रस्ताव तयार असून, तो मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी ठेवण्यात येणार असल्याचे, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव धीरज कुमार यांनी जाहीर केले होते. ससून रुग्णालय, जिल्हाधिकारी कार्यालय, मध्यवर्ती इमारत, बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, फोटो झिंको, पोलिस आयुक्तालय आणि जिल्हा परिषद आदी महत्त्वाची शासकीय आणि निमशासकीय कार्यालये या भूखंडाच्या जवळ आहेत. सद्य:स्थितीत पश्चिम महाराष्ट्र आणि पुण्यात कर्करोग उपचारांसाठी एकही शासकीय रुग्णालय नाही. त्यामुळे या जागेवर ते उभारण्यासाठी पोट भाडेकरार रद्द करून हा भूखंड कर्करोग रुग्णालयासाठी द्यावा,’ अशी मागणी उज्ज्वल केसकर यांनी मुख्यमंत्र्याकडे केली आहे.