Home Blog Page 185

लाडकी बहीण योजनेतून आणखी ९ लाख महिला वगळणार; सरकारने छाननीसाठी लावले नवे निकष

0

विधानसभा निवडणुकीत गेम चेंजर ठरलेल्या लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांची संख्या आणखी ९ लाखांनी कमी होणार आहे. याआधी ५ लाख महिलांना या योजनेतून वगळण्यात आलं होते. लाडकी बहीण योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर मोठा परिणाम होत असून या योजनेतील अपात्र होणाऱ्या महिलांची संख्या आणखी वाढणार आहे. सरकारकडून लाभार्थी महिलांच्या अर्जाची छाननी केली जात आहे. या योजनेतून अपात्र होणाऱ्या महिलांची संख्या १५ लाखांपर्यंत पोहचण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

सरकारकडून मिळणाऱ्या लाडकी बहीण योजनेचा लाभ ८३ टक्के विवाहित महिलांना होत आहे, ११.८ टक्के अविवाहित आणि ४.७ टक्के विधवा महिलांना योजनेतून दर महिना १५०० रूपये दिले जात आहेत. ३०-३९ या वयोगटातील महिला या योजनेचा सर्वाधिक लाभ घेत आहेत. २१-२९ वयोगटातील २५.५ टक्के महिला योजनेच्या लाभार्थी आहेत. ६०-६५ या वयोगटात केवळ ५ टक्के लाभार्थी महिला आहेत. राज्यात पुणे जिल्ह्यातून सर्वाधिक अर्ज लाडकी बहीण योजनेसाठी प्राप्त झालेत. त्यानंतर नाशिक, अहिल्यानगर जिल्ह्यांचा समावेश आहे. कोकणातील सिंधुदुर्गमध्ये सर्वात कमी महिला या योजनेचा लाभ घेतात.

राज्यात पुन्हा सरकारमध्ये आल्यास या योजनेतील लाडक्या बहि‍णींना दिले जाणारे पैसे २१०० रूपये दर महिना करू असं आश्वासन महायुतीने दिले होते. महायुती राज्यात पुन्हा सत्तेत आली आहे मात्र निवडणुकीपूर्वी दिलेल्या घोषणेने सरकारवर आर्थिक दबाव वाढला आहे. पुढील महिन्यात राज्याचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. सध्या योजनेतील अपात्र महिलांना वगळण्याची प्रक्रिया सुरू आहे. आतापर्यंत ५ लाख लाडक्या बहि‍णींना या योजनेतून वगळण्यात आले आहे. आणखी ९ लाख महिला योजनेत अपात्र ठरतील असे निकष लावले जात आहे. त्यामुळे १५ लाखांपर्यंत लाडक्या बहिणी अपात्र ठरू शकतात.

सरकारने लावले नवे निकष- 

ज्यांच्या घरी चार चाकी वाहन त्या घरातील महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाही

सरकारी नोकरीत असणाऱ्या महिलांना वगळण्यात येईल

दिव्यांग योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना अपात्र ठरवलं जाईल.

लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा रु. १५००/- किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असेल तर त्यांनाही वगळण्यात येणार आहे.

यजमान पाकिस्तानचा पहिल्याच मॅचमध्ये दणदणीत पराभव, स्पर्धेतून लवकरच पॅकअप?

0

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील पहिल्याच मॅचमध्ये पाकिस्तानचा पराभव झाला आहे. कराचीतील नॅशनल स्टेडियमवर झालेल्या सामन्यात न्यूझीलंडनं पाकिस्तानचा 60 रन्सनी पराभव केला. न्यूझीलंडनं दिलेलं 321 रन्सचं आव्हान पाकिस्तानला पेलवलं नाही. त्यांची संपूर्ण टीम 47.2 ओव्हर्समध्ये 260 रन्सवरच ऑल आऊट झाली.

पाकिस्तानचं आव्हान धोक्यात!

पाकिस्तानमध्ये तब्बल 29 वर्षांनी आयसीसीची स्पर्धा होत आहे. पहिल्या मॅचमध्ये यजमान टीम जिंकेल अशी त्यांच्या फॅन्सना आशा होती. पण, मोहम्मद रिझवानच्या टीमनं त्यांची निराशा केली. पाकिस्तानचा सुपरस्टार बाबर आझमनं हाफ सेंच्युरी झळकावत 64 रन काढले. पण, त्यासाठी त्यानं तब्बल 90 बॉल बॉल घेतले. सर्वात महत्त्वाचं म्हणजे टीमला सर्वाधिक गरज असताना तो आऊट झाला.

पाकिस्तानचा पुढील सामना 23 तारखेला भारताविरुद्ध दुबईत होणार आहे. तर शेवटची लढत बांगलादेशविरुद्ध होत आहे. आजच्या पराभवानंतर गतविजेत्या पाकिस्तानला सेमी फायनल गाठण्यासाठी पुढील दोन्ही सामने जिंकावेच लागतील. अन्यथा त्यांचं आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात येऊ शकतं.

न्यूझीलंडकडून दोघांची सेंच्युरी

त्यापूर्वी न्यूझीलंडनं पहिल्यांदा बॅटिंग करताना खराब सुरुवातीनंतरही निर्धारित 50 ओव्हर्समध्ये 5 आऊट 320 पर्यंत मजल मारली. न्यूझीलंडकडून विल यंग (Will Yung) आणि टॉम लॅथम (Tom Latham) यांनी सेंच्युरी झळकावली. यंगनं 107 तर टॉम लॅथमनं नाबाद 118 रन केले. ग्लेन फिलिप्सनं 39 बॉलमध्ये 61 रनची आक्रमक खेळी करत न्यूझीलंडला 320 चा टप्पा गाठून दिला. न्यूझीलंडचा पुढील सामना 24 तारखेला बांगलादेशविरुद्ध होणार आहे.

दिल्लीत पुन्हा महिलाराज कोण आहेत नव्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता? आमदारकीची पहिलीच टर्म निवडीत कोणता फॅक्टर निर्णायक?

0

दिल्लीत 27 वर्षांनी सत्तेत कमबॅक करणाऱ्या भाजपानं नवा मुख्यमंत्री जाहीर केला आहे. रेखा गुप्ता यांची भाजपानं दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी निवड केली आहे. गुप्ता या दिल्लीच्या चौथ्या महिला मुख्यमंत्री आहेत. यापूर्वी सुषमा स्वराज (भाजपा), शिला दीक्षित (काँग्रेस), आतिषी (आम आदमी पक्ष) या महिलांनी दिल्लीचं मुख्यमंत्रीपद भूषविले आहेत.

कोण आहेत रेखा गुप्ता?

दिल्लीतील नवनिर्वाचित भाजपा आमदारांच्या बैठकीत रेखा गुप्ता यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. रेखा गुुप्ता या दिल्लीतील शालीमार बाग विधानसभा मतदारसंघातील आमदार आहेत. 50 वर्षांच्या गुप्ता यापूर्वी दक्षिण दिल्ली नगर निगमच्या महापौर होत्या. विशेष म्हणजे त्यांची ही आमदारकीची पहिलीच टर्म आहे.

रेखा गुप्ता यांचा जन्म हरियाणातील जिंद जिल्ह्यात 1974 साली झाला. त्या दोन वर्षांच्या असताना त्यांचे कुटुंबीय दिल्लीत स्थायिक झाले. रेखा गुप्ता यांचे वडिल स्टेट बँकेत मॅनेजर होते. त्यांनी एलएलबीपर्यंत शिक्षण घेतले आहे. त्यांचं संपूर्ण शिक्षण दिल्लीमध्ये झालं आहे.कॉलेजमध्ये असतानाच त्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (ABVP) संपर्क आला. त्या अभाविपच्या कामात सक्रीय होत्या. दिल्ली विद्यापीठाच्या सचिव म्हणूनही त्यांनी काम केलं आहे.

रेखा गुप्ता या दिल्ली भाजपाच्या सरचिटणीस आणि भाजपा महिला मोर्चाच्या उपाध्यक्ष देखील आहेत. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी शालीमार तदारसंघातून विजय मिळवला. गुप्ता यांनी आम आदमी पक्षाच्या वंदना कुमारी यांचा पराभव केला. या निवडणुकीत रेखा गुप्ता यांना 68200 मतं मिळाले. तर वंदना कुमारी यांना 38605 मतं मिळाली होती.

कोणती गोष्ट ठरली निर्णायक?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या(RSS) सुचनेनंतर रेखा गुप्ता यांची मुख्यमंत्रिपदी निवड झाल्याचं मानलं जात आहे. आरएसएसनंच महिला मुख्यमंत्रीचा प्रस्ताव दिला होता. भाजपाच्या वरिष्ठ नेतृत्त्वानं तो प्रस्ताव मान्य केला. त्यानंतर त्यांच्या नावाची आमदारांच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले. गुप्ता बुधवारी (20 फेब्रुवारी 2025) दुपारी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील.

‘छावा’ सिनेमाला मोठा झटका?, तात्काळ प्रदर्शन थांबवा संभाजी ब्रिगेड आणि इतिहास संशोधकांचा हा मोठा आक्षेप

0

अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री रश्मिता मंदाना स्टारर ‘छावा’ सिनेमा 14 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला. सिनेमा बॉक्स ऑफिसवर तुफाम कमाई करताना दिसत आहे. सिनेमाने पाच दिवसांत 165 कोटींची कमाई केली आहे. तर जगभरात सिनेमा 200 कोटी रुपयांता टप्पा पार केला आहे. सोश मीडियावर आणि चाहत्यांमध्ये सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ‘छावा’ सिनेमाची चर्चा रंगली आहे. एकेकडे सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगलीच मजल मारत आहे तर, दुसरीकडे सिनेमाचं प्रदर्शन थांबवण्याची मागणी करण्यात येत आहे.

‘छावा’ सिनेमा चित्रपटगृहात प्रदर्शित झाल्याच्या पाच दिवसांनंतर सिनेमाचं प्रदर्शन थांबवण्याची मागणी होत आहे. सिनेमा पुन्हा वादाच्या भोवऱ्यात अडकताना दिसत आहे. संभाजी ब्रिगेड आणि इतिहास संशोधकांनी चित्रपटातील ऐतिहासिक विकृतीकरणावर आक्षेप घेतला आहे.

संभाजी महाराज आणि सोयराबाईंबाबत चुकीचे प्रसंग दाखवल्याचा आरोप संभाजी ब्रिगेड आणि इतिहास संशोधकांनी केला आहे. याबाबत सेन्सॉर बोर्डाकडे निवेदन सादर करण्यात आल्याची देखील माहिती मिळत आहे. योग्य पडताळणी न करता मंजुरी दिल्याची तक्रार देखील केली आहे. शिवाय ओटीटी आणि अन्य माध्यमांवर प्रदर्शन रोखण्यासाठी कारवाईची मागणी देखील करण्यात आली आहे. आता याप्रकरणी पुढे काय होत पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सांगायचं झालं तर, ‘छावा’सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वी देखीव वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याचा इतिहास मांडणारा बहुप्रतिक्षित ‘छावा’ या हिंदी सिनेमाच्या ट्रेलरवरून वाद निर्माण झाला होता. या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर त्यातील एका दृश्यावरून विविध स्तरांतून आक्षेप घेण्यात आला होता.

छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणाी येसूबाई यांचा लेझीम नृत्य करतानाचा हा प्रसंग होता. अखेर सिनेमातून लेझीम नृत्य करतानाचा सीन वगळ्यानंतर सिनेमा मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला. सध्या सर्वत्र ‘छावा’ सिनेमाची चर्चा रंगली आहे.

शंभुराज देसाईंचा मोठा गौप्यस्फोट; ‘ठाकरे नाही तर हा बडा नेता होणार होता सीएम, एका रात्रीत गेम झाला अन्..’

0

विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना ठाकरे गटाला गळती लागली आहे, अनेक नेते आणि पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश करत आहेत. पक्षाला लागलेली गळती ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासाठी डोकेदुखीचा विषय ठरला आहे. तसेच अजूनही शिवसेना ठाकरे गटातील अनेक नेते नाराज असल्याची चर्चा सुरू आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आता शिवसेना ठाकरे गट ॲक्शन मोडमध्ये आला आहे, ठाकरे गटाकडून पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात झाली आहे, यावरून शिवसेनेते नेते आणि मंत्री शंभुराज देसाई यांनी शिवसेना ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे, त्यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना डिवचलं आहे.

नेमकं काय म्हणाले शंभुराज देसाई?

ते कधीही भेटीगाठी घेत नाहीत, ते थेट मुंबईला बोलवतात. आमचा जर एखादा सदस्य रुसला तर आम्ही घरी जाऊन बसतो. यांचे आमदार खासदार निघाले तर यांचे पॅचअप कुठे तर मुंबईला बोलावून? नाराज पदाधिकाऱ्यांची समजूत त्यांच्या दारात जाऊन करायची असते त्याला आपल्या दरबारात बोलावून समजूत निघत नसते. त्यांनी जागेवर बसून कितीही हातपाय झटकले तरी त्याचा काहीही उपयोग होणार नाही, असा टोला देसाई यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.

संजय राऊतांना प्रत्युत्तर

दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीत आम्ही निवडून आल्यानंतर 21 दिवस आम्हाला मुंबईमध्ये फिरवलं होतं. शिंदे साहेबांकडे बोट दाखवून उद्धव साहेबांनी सांगितलं होतं की आम्हाला सामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्री बनवायचं आहे. एका रात्रीमध्ये असं काय घडलं? संजय राऊत आता बोलत आहेत की पवारसाहेबांचा विरोध होता. हेच ते पाच वर्षांपूर्वी का बोलले नाहीत? अजून सुद्धा पवार साहेबांच्या मांडीला मांडी लावून बसतात. माझं आव्हान आहे शरद पवारांच्या प्रवक्त्यांनी सांगावं आमचा एकनाथ शिंदे यांच्या नावाला विरोध होता. राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी आम्हाला खासगीत सांगितले होते की हा अधिकार फक्त उद्धव ठाकरे यांचा आहे, यामध्ये आम्ही हस्तक्षेप करणार नाही, असंही यावेळी देसाई यांनी म्हटलं आहे.

राहुल गांधी यांनी तोडले अकलेचे तारे, शिवाजी महाराजांना जयंतीच्या दिवशी वाहिली श्रद्धांजली

0

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीला आपल्या अकलेचे तारे तोडले आहे. त्यामुळे राहुल गांधी नवीनच वादात अडकले आहे. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंतीच्या दिवशी श्रद्धांजली वाहिली आहे. त्यामुळे भाजप आक्रमक झाला आहे. राहुल गांधी यांच्या ट्विटनंतर भाजपने जोरदार टीका केली आहे.

“कदाचित माझी वेळ वाईट सुरू, पण लक्षात ठेवा..”, ‘इंडियाज गॉट लेटेंट’च्या वादावर काय म्हणाला समय रैना?

0

‘इंडियाज गॉट लेटेंट’ या शोमध्ये युट्यूबर रणवीर अलाहबादियाने एका स्पर्धकाला आईवडिलांबद्दल अश्लील प्रश्न विचारल्यानंतर मोठा वाद सुरू झाला. या शोचा कर्ताधर्ता कॉमेडियन समय रैना, रणवीर अलाहबादिया आणि इतर परीक्षकांविरोधात विविध राज्यांमध्ये एफआयआर दाखल झाले आहेत. सध्या समय रैना त्याच्या शोजमुळे परदेशात आहे. कॅनडामधील एडमंटनमधील मायर होरोविट्झ थिएटरमध्ये त्याचा लाइव्ह शो पार पडला. या शोला उपस्थित राहिलेल्या एका चाहत्याने सोशल मीडियावर समयबद्दल पोस्ट लिहिली आहे. त्यानंतर समयनेही शोवरून सुरू असलेल्या वादावर उपरोधिक प्रतिक्रिया दिली.

शुभम दत्ता नावाच्या एका चाहत्याने फेसबुकवर समयच्या शोबद्दल पोस्ट लिहिली आहे. यात त्याने त्याचा अनुभव सांगितला आहे. ‘द शो मस्ट गो ऑन.. समय रैनाचा शो पाहिल्यानंतर अखेर मला या वाक्याचा खरा अर्थ समजला आहे. या शोला आजच्या पिढीतील ज्यांना ‘बिघडलेले’ म्हटलं जातं, असे जवळपास सातशे सदस्य उपस्थित होते. ते बेंबीच्या देठापासून समयच्या नावाची घोषणा करत होते. या सर्वांसमोर उभा राहिलेल्या समय रैनाच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं होतं’, असं त्याने लिहिलं.

समय रैनाने त्याच्या शोची सुरुवात प्रेक्षकांचे आभार मानत केली. याविषयी शुभमने लिहिलं, ‘प्रचंड मानसिक दबावाखाली असलेला, डोळ्यांखाली काळी वर्तुळं, थकलेला चेहरा, काळ्या रंगाची हुडी घालून आलेला 25 वर्षांचा तो मुलगा प्रेक्षकांसमोर आला आणि त्याने माइकमध्ये सर्वांत आधी म्हटलं, माझ्या वकिलाची फी भरल्याबद्दल धन्यवाद.’ जेव्हा शो सुरू होतो, तेव्हा प्रेक्षकांमधील एक तरुण समयबद्दल विनोद करतो. तेव्हा रणवीर अलाहबादियाच्या वादाचा संदर्भ देऊन समय त्याला त्याच्याच अंदाजात प्रत्युत्तर देतो.

“या शोमध्ये अशा बऱ्याच संधी येतील, जेव्हा तुम्हाला वाटेल की मी खूप काही हास्यास्पद बोलू शकतो. पण तेव्हा ‘बीअर बायसेप्स’ला (रणवीर अलाहबादिया) आठवा भावांनो”, असं समय म्हणतो. रणवीरच्या अश्लील टिप्पणीमुळे समय आणि त्याच्या शोविरोधात एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. देशभरात यावरून मोठा वाद सुरू असतानाही समयने दोन तासांपर्यंत प्रेक्षकांना हसवल्याबद्दल चाहत्याने त्याच्या पोस्टमध्ये खूप कौतुक केलं आहे.

‘आयुष्यातील सर्वांत आव्हानात्मक काळातून जात असतानाही या माणसाने त्याच्या कॉमेडिने प्रेक्षकांना दोन तासांपर्यंत हसवलं. त्यानंतर शो संपताना तो म्हणाला, “शायद समय खराब चल रहा है मेरा, पर याद रखना दोस्तों, मैं समय हूँ”, (कदाचित माझी वेळ वाईट सुरू आहे, पण लक्षात ठेवा मित्रांनो, मीच वेळ आहे.)

दोन मंत्र्यांच्या सोबतीने नवं आंदोलन उभारण्याचा सरकारचा डाव, मनोज जरांगेंचा खळबळजनक दावा

0

मराठा आरक्षणाची मागणी दडपण्यासाठी सरकारनं दोन मंत्र्यांच्या सोबतीनं नवं आंदोलन उभारण्याचा डाव रचल्याचा खळबळजनक दावा मनोज जरांगेंनी केलाय.दोन मंत्र्यांना सोबत घेत सरकार नवे मराठा आरक्षण आंदोलन उभं करण्याच्या तयारीत असल्याचं सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आंदोलनाबाबत दोन मंत्र्यांनी चर्चा केल्याचा गौप्यस्फोट मनोज जरांगेंनी केला. धाराशिव येथे शिवजयंती उत्सवासाठी आल्यानंतर नव्या मराठा आरक्षणाबाबत मनोज जरांगेंनी माध्यमांना मराठा आरक्षणावरून दोन मंत्र्यांना घेऊन सरकार नवंच मराठा आंदोलन उभं करणार असल्याचा प्लॅनच मनोज जरांगेंनी सांगितला आहे. मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील हे काही दिवसांपूर्वीच आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसले होते. सरसकट मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याची त्यांची मागणी आहे.

काय म्हणाले मनोज जरांगे?

आता जे गोरगरीब मराठ्यांचं आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाच्या समोर मराठा आरक्षणावरून सरकार नवं आंदोलन उभारण्याच्या तयारीत असल्याचं मनोज जरांगे म्हणाले.आम्ही म्हणू तसे ऐका, अन्यथा षडयंत्र रचून बदनाम करू अशी सरकाची भूमिका आहे. मराठ्यांच्या आंदोलनासमोर प्रति आंदोलन सरकार उभं करणार आहे. दोन मंत्री आहेत या आंदोलनात. दोन मंत्री पाठपुरावा करणार. 12-13 दिवस आमरण उपोषण करणार. या आंदोलनानंतर सरकारच बैठक लावणार आहेत. या सगळ्या आंदोलनाला देवेंद्र फडणवीसांची साथ आहे. हे त्यातल्या एका मंत्र्यानंच मला सांगितलं. असा दावा मनोज जरांगेंनी केला.

दरम्यान, 22 फेब्रुवारी ते 22 मार्च आपल्याला काही गोष्टी कराव्या लागणार आहेत. आपण एक आलो तर राहिलेले आरक्षण पण मिळेल असे मनोज जरांगे म्हणाले होते. नुसती गर्दी आणि मोठ्या सभेतून आपल्या समस्या सुटणार नाहीत. गावात येणारी अडचण सांगायला हक्काचं ठिकाण आपल्याला द्यावं लागणार आहे. त्यासाठी प्रत्येक गावात एक सेवक द्यावा लागणार आहे. त्याला संपूर्ण गाव अडचणी सांगेल असे जरांगे पाटील म्हणाले. त्यासाठी एक महिना आपण ते काम करत आहोत. असं जरांगे म्हणाले होते. दरम्यान आज धाराशिव जिल्ह्यात ठिकठिकाणी शिवजयंतीच्या कार्यक्रमाला जरांगे पाटील हजेरी लावणार आहेत. धाराशिवमध्ये जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत भव्य दुचाकी रॅली ही निघणार आहे.

भाजपनं शब्द पाळला असता तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले असते; खासदार संजय राऊतांचा दावा, सगळंच सांगितलं…

0

एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री व्हायची इच्छा होती. मात्र त्यावेळी महाविकास आघाडीच्या एका प्रमुख नेत्याने सांगितलं एकनाथ शिंदे फार जुनियर आहेत. त्यांच्या हाताखाली आम्ही काम करणार नाही. म्हणून एकनाथ शिंदे त्यांच्या बाबतीत विचार होऊ शकला नाही, हे मी वारंवार सांगितले आहे. एकनाथ शिंदे विधिमंडळ नेते झाले होते. पण महाविकास आघाडीत आज जे त्यांच्याबरोबर बसलेले आहेत ते अजित पवार आणि इतर सहकारी, तसेच दिल्लीमध्ये ज्यांनी त्यांचा नुकताच सत्कार केला ते शरद पवार यांनी स्वत: विरोध दर्शवला. या सर्वांची भूमिका होती एक मेसेंजर आम्हाला चालणार नाही.

एकनाथ शिंदे फार ज्युनिअर आहेत, त्याच्या हाताखाली आमचे वरिष्ठ नेते काम करणार नाही. असे मत अनेक नेत्यांचे होते. त्यांनी जर शब्द पाळला असता 50-50चा तर शिंदेच तेव्हा मुख्यमंत्री झाले असते. असा दावा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे. त्यावेळी मुख्यमंत्री पदासाठी इतर कुठले नाव पुढे आणण्याचा प्रश्नच येत नव्हता. उद्धव ठाकरे त्या बाबतीत प्रामाणिक आहेत. मात्र भारतीय जनता पक्षाने आपला शब्द पाळला नाही. अशी टीका ही त्यांनी केली आहे.

रोज उठून तुम्ही दिल्लीला उठाबशा काढत आहात

विधानसभेमध्ये त्यांनी ज्या पद्धतीने निवडणूक आयोग, पैसा आणि यंत्रणेचा वापर केला त्याच्यामुळे ती झाकी आहे. या शिवाय त्यांनी वेगळं काही आणले आहे का? तुम्ही आज ज्यांच्या दावणीला धनुष्यबाण बांधलेला आहे, चोरलेला आहे ते काही योग्य आहे का? रोज उठून तुम्ही दिल्लीला उठाबशा काढत आहात. त्या बाळासाहेब ठाकरे यांना, माननीय शिवसेनाप्रमुखांना मान्य आहे का? त्यांना आत्मचिंतनाची गरज आहे. अशी टीका ही खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केली आहे. त्यांना जर आत्मचिंतनाला कुठे जायचं असेल तर कामाख्या मंदिर किंवा अन्या कुठे जायचं असेल तर त्यांनी जावं आणि आत्मचिंतन करावं. आपण मूळ शिवसेनेबाबत जे विधान करतो ते किती तथ्य आणि सत्य आहे, हे तपासावं. असेही ते म्हणाले.

एकनाथ शिंदे स्वतः ‘त्या’ निर्णयामध्ये सहभागी होते- संजय राऊत

काँग्रेसच्या दावणीला शिवसेना कधीच कोणी बांधली नाही. भारतीय जनता पक्षाने आज जे बसले आहेत त्यांच्याबरोबर त्यांनी शब्द पाळला नाही. त्यांनी बेइमानी केली आणि त्या निर्णयामध्ये स्वतः एकनाथ शिंदे सहभागी होते. हा सामुदायिक निर्णय होता. त्यांचे मत फक्त त्यांना कोणते खाते मिळत आहे याच्यावर होतं, असेही संजय राऊत म्हणाले.

कुछ तो गडबड है..धस- मुंडेंच्या भेटीवर वडेट्टीवारांची तिरकस टीका

0

धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांच्या भेटीनंतर राज्याच्या राजकारणाला वेग आला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीचा जोर वाढत असताना झालेली भेट नक्की कशासाठी झाली? असा प्रश्न विरोधकांना पडलाय. तब्येत बरी नसल्याने ही भेट घेतल्याचं सुरेश धस यांनी सांगितलं असलं तरी डोळ्यांचा ऑपरेशन हे नॉर्मल असतं काही सिरीयस होतं का? त्यावेळेस जाऊन भेटायला मंत्रिमंडळातील कोणीच गेले हे कशाला.. कुछ तो गडबड.. है काहीतरी साध्य करण्यासाठीच धस गेले असतील. धस आणि मुंडे भेटीवर संशय निर्माण होत आहे असं विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी या भेटीवर तिरकस टीका केली आहे.

ते धस स्वतःच्या प्रदेशाध्यक्ष संदर्भात प्रश्न निर्माण करत असतील तर सुरेश धस कोणाच्या इशाऱ्यावर हिम्मत दाखवत आहेत हे बावनकुळेंनीच शोधून काढावं असेही वडेट्टीवार म्हणालेत.

काय म्हणाले विजय वडेट्टीवार ?

‘आता ती भेट चार तास झाली, की चार मिनिट झाले पण भेट झाली हे खर आहे..एकमेकांचे पप्पी घेण्यासाठी गेले होते का? डोळ्याच ऑपरेशन हे नॉर्मल असतं. काही सिरीयस होते का? त्यावेळेस जाऊन भेटायला मंत्रिमंडळातील कोणीच गेले नाही. हे कशाला भेटायला गेले. कुछ तो गडबड है. काहीतरी साध्य करण्यासाठी धस गेले असतील… त्यावर संशय निर्माण होत आहे.. ते धस स्वतःच्या प्रदेशाध्यक्ष संदर्भात प्रश्न निर्माण करत असतील तर सुरेश धस कोणाच्या इशाऱ्यावर हिम्मत दाखवत आहे ते बावनकुळे यांनी शोधून काढावं. सध्या प्रचंड बहुमत आहे. पण हे सरकार असं का वागत आहे. या सरकारमध्ये एक वाक्यता का नाही..तीन मुंडीचा सरकार तीन दिशेला का बघत आहे… यांच्या आपसात कुरघोड्या सुरू आहे… त्यावरच या सरकारचं अधिपतन होईल आणि जनता सरकारला नाकारेल. असे वडेट्टीवार म्हणाले.

मुख्यमंत्र्यांचा काही चुकलं नाही गोपनीयतेची शपथ घेत असेल तर त्याला बाहेर जाऊ नये, चॅनलला हेडलाईन दाखवण्यासाठी तुम्ही सोर्स वापरता त्याला एखादा कॅबिनेट मंत्री बळी पडतो. प्रत्येक मुख्यमंत्री या सूचना देत असतात. मंत्रिमंडळात फितूर आहे का देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून फितूर याचा शोध घेण्यासाठी विरोधकांचा आवश्यकता असेल तर आहे त्यांना मदत करू ते जर आम्हाला मागणी करतील तर आम्ही त्यांना नाव देऊ. असंही ते म्हणाले.