Home Blog Page 146

तुमच्या आकासमोरच सत्तेचा माज दाखवा! मंत्री गिरीश महाजन यांना अंबादास दानवेंनी सुनावले

0

विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात आज दिशा सालियान प्रकरणावरून गदारोळ झाला. विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे बोलत असताना समोरून मंत्री गिरीश महाजन त्यांच्या बोलण्यात अडथळा आणत होते. वारंवार मध्ये बोलत असल्याने अंबादास दानवे भडकले आणि मध्ये मध्ये तोंड घालण्याची तुमची सवय बंद करा, अशा शब्दात त्यांनी गिरीश महाजन यांना खडसावले. यावेळी महाजन आणि दानवे यांच्यात चांगलीच शाब्दिक चकमक झडली.

एकाच वेळी तुमचे चार चार लोक बोलतात, आम्ही कधी अडथळा आणतो का? मग आता माझ्या वेळेस तुम्ही मध्ये बोलण्याचे काय कारण? मुळात हा विषय तुमच्या खात्याशी संबंधित आहे का, तुम्ही त्या खात्याचे मंत्री आहात का? मग मध्ये बोलायची काय गरज आहे. नेहमीमध्ये तोंड घालायची तुमची सवय थांबवा, असा संताप अंबादास दानवे यांनी व्यक्त केला.

समोरून महाजन आणि बाकड्यावरून अंबादास दानवे एकमेकांकडे हातवारे आणि इशारे करून बोलत होते. ‘सभापती महोदय नियमानुसार मी बोलतो आहे, समोरच्या बाजूने चार चार लोक बोलत असताना आम्ही सगळ्यांचे ऐकून घेतले. मग आता मी बोलत असताना हे मध्ये का बोलतात? आम्हाला बोलायचा अधिकार नाही का? तसे असेल तर मला सांगा मी बाहेर जाऊन बसतो त्यांनाच बोलू द्या’असे म्हणत अंबादास दानवे यांनी सभापतींकडे गिरीश महाजनांना समज देण्याची मागणी केली.

सभापती माझ्याकडे पाहून बोला असे म्हणत असताना गिरीश महाजन मात्र दानवे यांना पाहून मोठ्याने बोलत होते. ‘तुम्हाला काय चौकशी करायची ती करा ना, तुम्ही मुख्यमंत्र्याच्या मांडीला मांडी लावून बसता,एसआयटी नेमलेली आहे, सरकार तुमचा आहे मग करायची ती चौकशी करा, तुम्हाला कोणी रोखले आहे? असे म्हणत अंबादास दानवे यांनी महाजन यांच्यावर संताप व्यक्त केला.

आजच आम्ही राज्यपालांची भेट घेऊन आलो, काही मंत्र्यांची नावे आम्ही तिथे दिली आहेत. नेहमी असले प्रकार खपवून घेणार नाही. मध्ये मध्ये बोलण्याची यांची खोड नेहमीचीच आहे, त्यांना शांत करा नाहीतर माझ्या तोंडून चुकीचा शब्द गेला तर अवघड होऊन जाईल, असा इशारा अंबादास दानवे यांनी दिला. दोन्ही बाजूने सभागृहात गोंधळ होण्याची परिस्थिती निर्माण झाली. गिरीश महाजन आणि अंबादास दानवे एकमेकांकडे पाहून हातवारे करत बोलत होते.

दानवे आपल्या जागेवरून महाजन यांच्या दिशेने जाणार तेवढ्यात सचिन अहिर यांनी त्यांना रोखले. गोंधळ अधिकच वाढणार याचा अंदाज आल्यानंतर सभापती राम शिंदे यांनी सभागृहाचे कामकाज 15 मिनिटांसाठी तहकूब केले. माइक बंद झाल्यानंतरही दानवे आणि महाजन एकमेकांना उद्देशून मोठमोठ्याने बोलतच होते. दरम्यान अंबादास दानवे यांनी माज आणि मस्ती आमच्यासमोर चालणार नाही. सत्तेची मस्ती आमच्यासमोर दाखवायची नाही, सत्तेचा माज आला असेल तर मंत्री यांनी आपल्या आकासमोर दाखवावा आमच्याकडे नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया सोशल मीडियावर दिली.

जागतिक चिमणी दिवस कामगार भूषण कवी राजेंद्र वाघ यांची बोलकी वास्तववादी काव्य रचना

0

जागतिक चिमणी दिन हा दिवस २० मार्च रोजी साजरा केला जातो. हा दिवस घरातील चिमण्या आणि नंतर शहरी वातावरणात आढळणाऱ्या इतर सामान्य पक्ष्यांबद्दल आणि त्यांच्या लोकसंख्येला असलेल्या धोक्यांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी नियुक्त केला जातो. हा नेचर फॉरएव्हर सोसायटी ऑफ इंडियाने इको-सिस अॅक्शन फाउंडेशन (फ्रान्स) आणि जगभरातील असंख्य इतर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांच्या सहकार्याने आयोजित केलेला एक आंतरराष्ट्रीय उपक्रम आहे. नेचर फॉरएव्हर सोसायटीची स्थापना मोहम्मद दिलावर यांनी केली होती, ज्यांनी नाशिकमध्ये घरातील चिमण्यांना मदत करण्याचे काम सुरू केले होते. चिमणी दिन साजरा करण्याची कल्पना नेचर फॉरएव्हर सोसायटीच्या कार्यालयात झालेल्या अनौपचारिक चर्चेदरम्यान सुचली. घरातील चिमणी आणि इतर सामान्य पक्ष्यांच्या संवर्धनाचा संदेश देण्यासाठी आणि सामान्य जैवविविधतेच्या सौंदर्याचे कौतुक करण्यासाठी एक दिवस साजरा करण्यासाठी घरातील चिमणींसाठी एक दिवस राखून ठेवण्याची कल्पना होती जी खूप गृहीत धरली जाते. पहिला जागतिक चिमणी दिन २०१० मध्ये जगाच्या वेगवेगळ्या भागात साजरा करण्यात आला.

जागतिक चिमणी दिनाचे एक व्यापक दृष्टिकोन म्हणजे एक असे व्यासपीठ प्रदान करणे जिथे घरातील चिमणी आणि इतर सामान्य पक्ष्यांच्या संवर्धनावर काम करणारे लोक नेटवर्किंग, सहयोग आणि संवर्धन कल्पनांची देवाणघेवाण करू शकतील ज्यामुळे चांगले विज्ञान आणि सुधारित परिणाम मिळतील. जगाच्या विविध भागांतील लोकांना एकत्र येऊन एक अशी शक्ती तयार करण्यासाठी एक बैठकीचे मैदान प्रदान करणे हे आहे जे सामान्य जैवविविधता किंवा कमी संवर्धन दर्जाच्या प्रजातींचे संवर्धन करण्याच्या गरजेबद्दल वकिली आणि जागरूकता पसरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकेल. परंतु आज सर्वत्र जागतिक चिमणी दिवस साजरा होत असताना वारजे येथील कामगार भूषण कवी राजेंद्र वाघ यांनी चिमणी या विषयावर वाढत्या शहरीकरनामुळे पर्यावरणाचा होणारा ऱ्हासाबाबत खंत व्यक्त केली आहे.

काव्य रचना –

चिमणी

चिव चिव करणारी चिमणी

दिसत नाही हल्ली

कुणी बंद केला तिचा

चिवचिवाट हल्ली

पूर्वी घरात यायची

आरश्यात पहायची

कधी कधी परसात

छोटे घरटे बांधायची

अंडी द्यायची

पिल्लांना भरवायची

पिल्लांच्या पंखाना बळ द्यायची

आणि पिल्ले उडू लागली, की भुर्रकन उडून जायची

चिमणी कुठे गेली असेल

चिमणी का गेली असेल

माणसापासून दूर

का माणसांनीच केले तिला दूर

सृष्टीला कोणाची  लागली नजर

चिमणी येत नाही नजरेसमोर…… चिमणी येत नाही नजरेसमोर

राजेंद्र वाघ, पुणे

नागपूर दंगल बांगलादेश कनेक्शन, मुख्य सूत्रधार पोलीस तपासात समोर पोलिसांवरील हल्ला कधीही क्षम्य नाहीच : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0

नागपूर पोलिसांवरील हल्ला क्षम्य नाही. हल्लेखोरांना सोडणार नाही, कबरीतून खोदून काढू असा आक्रमक इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधानसभेत दिला. उपराजधानीत सोमवारी रात्री झालेल्या दंगलीचा मुद्दा काँग्रेसचे ज्येष्ठ सदस्य नाना पटोले व अन्य सदस्यांनी उपस्थित केला. यावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, हा हल्ला पूर्वनियोजित होते की नाही, यासंदर्भात चौकशी सुरू आहे. माहिती घेत आहोत. अजून अंतिम निष्कर्षाला आलो नाही, असे पोलिस आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. आयुक्त वा मी वेगळे बोलतो, असे नाही. बाकी सर्व बाबी क्षम्य असल्या तरी पोलिसांवरील हल्ला सहन केला जाणार नाही. निर्धारित कालावधीत हल्लेखोरांवर कठोर कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

महालमधील दंगलीदरम्यान ‘हल्ला केला, आता घरात घुसू’ अशा आशयाची पोस्ट समाजमाध्यमावर व्हायरल झाली. जमावाला चिथावणी देण्यास कारणीभूत ठरलेल्या समाजमाध्यमांवरील अनेक पोस्टपैकी ही कमालीचा आक्षेपार्ह मजकूर असलेली पोस्ट बांगलादेशातून प्रसृत करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्यावतीने सोमवारी औरंगजेबाची कबर खोदण्याच्या मागणीसाठी महालातील गांधीगेट येथे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे सायंकाळी तीव्र पडसाद उमटले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर सोमवारी सायंकाळी हिंसाचार उफाळला. जमावाने जोरदार दगडफेक केली. गाड्या जाळल्या. पोलिसांवर हल्ला केला. महिला पोलिसाचा विनयभंग करण्यात आला. हिंसाचार सुरू होण्याआधीपासून समाजमाध्यमांवर अनेक वादग्रस्त व आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल झाल्या. सायबर पोलिसांना फेसबुकवर एक संवेदनशील पोस्ट आढळली. यात चिथावणी देण्यासह आक्षेपार्ह मजकूर लिहिला होता. पोलिसांनी या पोस्टचा मागोवा घेतला असता तिचे मूळ बांगलादेशात असल्याचे समोर आले.

शहरातील दंगलीचा सूत्रधार म्हणून फहीम शमीम खान (वय ३८) याचे नाव पोलिस तपासात समोर आले. फरीम हा मायनॉरिटिज डेमोक्रॅटिक पार्टीचा शहाराध्यक्ष असून त्याने लोकसभा निवडणूक लढवली होती. न्यायालयाने त्याला शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याच्या चौकशीत अधिक माहिती मिळण्याची शक्यता आहे. फहीम संजयबाग कॉलनी, यशोधरनगर येथील रहिवासी आहे. धर्माचा आधार घेऊन फहीमने सोमवारी कट्टर विचारसरणीच्या तरूणांना एकत्र केले. प्रक्षोभक भाषणे देऊन जमावाला हिंसाचार करण्यासाठी चिथावणी दिली, असा त्याच्यावर आरोप आहे.

राज्यसभेत साकेत गोखलेंची अमित शहावर टीका …प्रचंड गदारोळ! अमित शहांही सभागृहात संतापले; मी कोणालाही घाबरत नाही…..

0

‘मी इथे कोणाच्याही कृपेने आलेलो नाही, सात वेळा निवडणुका जिंकल्यानंतर मी इथे आलो आहे. मला कोणाचीही भीती वाटत नाही,’ अशा शब्दांत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बुधवारी राज्यसभेत संताप व्यक्त केला. तृणमूल काँग्रेसचे सदस्य साकेत गोखले यांनी शहा यांच्याबाबत केलेल्या व्यक्तिगत टीकेमुळे तीन-चार मंत्र्यांसह संतप्त भाजप खासदारांनी उभे राहून, गोखले यांनी सभागृहाची माफी मागावी अशी मागणी केली. खुद्द शहा यांनी गोखले यांना फटकारले.

राज्यसभेत गृह मंत्रालयाच्या कामकाजावरील चर्चेची सुरुवात गोखले यांनी वापरलेल्या भाषेमुळे प्रचंड गदारोळाने झाली. गोखले यांनी केंद्रीय संस्थांचा गैरवापर केल्याचा आरोप करत प्रलंबित सीबीआय खटल्याचा उल्लेख करण्यास सुरुवात करताच शहा यांनी आक्षेप घेतला. यानंतर गोखले यांनी तडीपार, साबरमती तुरुंग असे वादग्रस्त शब्द वापरून शहा यांच्यावर शेरेबाजी करताच, सभागृह नेते जे. पी. नड्डा, संसदीय कामकाजमंत्री किरन रिजीजू आदींनी या आक्षेपार्ह टिप्पण्या मागे घेण्याची मागणी केली. ‘आम्ही येथे एखाद्या विचारसरणीला विरोध करून आलो नाही. ज्या सीबीआय प्रकरणांबद्दल ते बोलत आहेत, ते निवडणूक हिंसाचारासाठी नोंदवले गेले आहेत. जमीनदारी कोण करत आहे याकडे संपूर्ण देशाचे लक्ष आहे,’ असे संतापलेले शहा म्हणाले.

गोखले म्हणाले की, ‘तेदेखील (गृहमंत्री शहा) साबरमती तुरुंगात राहिले आहेत, मीदेखील साबरमती तुरुंगात राहिलो आहे.’ यावर सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी प्रचंड गदारोळ केला. सभापती जगदीप धनखड यांनी गोखले यांना त्यांची टिप्पणी मागे घेण्याचे आवाहन केले. तेव्हा गोखले म्हणाले की, ‘भाजपचे लोक ती डिलीट करतील, पण ममता बॅनर्जींचे सैनिक माघार घेणार नाहीत.’ यानंतर गोखले म्हणाले की, ‘आधी सीएए येईल, नंतर एनआरसी लागू केले जाईल. २०२०मध्ये सीएए अधिसूचित करण्यात आले. परंतु २०२१ च्या बंगाल निवडणुकीत त्याचा त्यांना फायदा झाला नाही. गृहमंत्रालयाचा अर्थ असा नाही की, तुम्ही घरून मंत्रालय चालवता. हुकूमशाही नावाचा एक शब्द आहे, तुमच्या नावात शहा आहे, ज्याला इंग्रजीत टेम्पर्ड म्हणतात.’ नड्डा यांनी या टिप्पणीवर आक्षेप घेतला, ‘ही एका जातीविरुद्ध टिप्पणी आहे. धनखड यांनी ही टिप्पणी कामकाजातून हटवली जाईल,’ असे नड्डा म्हणाले.

गोखले यांच्यानंतर भाजपचे डॉ. सुधांशू त्रिवेदी यांनी आसामच्या धुबरी मतदारसंघातून काँग्रेसच्या रकीबुल हसन यांच्या विजयाच्या फरकाचा संबंध एनआरसीविरोधातील निषेधाशी जोडला, तेव्हा विरोधी पक्षांनीही गदारोळ सुरु केला. यावर गृहमंत्री शहा म्हणाले की, ‘त्रिवेदी यांनी फक्त दुसऱ्या सभागृहातील सदस्याच्या विजयाचे अंतर सांगितले आहे, जे निवडणूक आयोगाच्या नोंदींमध्ये आहे. यात वैयक्तिक काहीही नाही.’

फडणवीसांना नागपूर हिंसाचारानंतर थेट प्रश्न, मुख्यमंत्र्यांचा नितेश राणेंना हा सल्ला; संविधानाने आपल्यावर कोणासोबतही अन्याय….

0

मुंबई : लोकमत समुहाकडून आयोजित विशेष कार्यक्रमात आमदार जयंत पाटलांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मुलाखत घेतली आहे. यावेळी जयंत पाटलांनी फडणवीसांना अनेक गोष्टींवर बोलते केले आहे. सध्या नागपुरातील हिंसाचार घटनेवर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत आहेत. यातच विरोधकांकडून नितेश राणे थेट निशाणा साधला जात आहे. राणेंच्या बेताल वक्तव्यामुळेच वाद उफाळला असल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे. विधानसभेतही या घटनेचे पडसाद उमटले आहेत. याचदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मंत्री नितेश राणेंना ताकीद दिली असल्याचे वृत्त समोर आले. आता फडणवीसांनी जयंत पाटलांसोबतच्या या मुलाखतीत नितेश राणेंना संयम बाळगण्याचा सल्ला दिला आहे. यावेळी फडणवीसांनी भाजपचे दिवंगत नेते अटलबिहारी वाजपेयी यांचा दाखला दिला आहे.

मुलाखतीत आमदार जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना नितेश राणेंबाबत प्रश्न विचारला. ‘तुम्ही मंत्री आहात तुम्ही संयम बाळगूनच या ठिकाणी बोललं पाहिजे’ असा सल्ला फडणीवीसांनी राणेंना दिला. फडणवीस म्हणाले, ‘मला वाटतं, आपण मंत्री असतो तेव्हा आपण संयमानेच बोललं पाहिजे. मंत्री म्हणून आपली एक भूमिका आहे, ज्याचा उल्लेख आदरणीय अटल बिहारी वाजपेयींनी केला होता. मंत्री म्हणून आपल्याला राजधर्म पाळायचा असतो. यावेळी आपले विचार काय? आपली आवड-नावड काय? हे सर्व बाजूला ठेवून आपण संविधानाची घेतलेली आहे. संविधानाने आपल्यावर कोणासोबतही अन्याय न करता वागण्याची जबाबदारी दिली आहे. ती विसरता कामा नये’

देवेंद्र फडणवीसांनी जयंत पाटलांना उत्तर देताना अप्रत्यक्षपणे नितेश राणेंचे कान टोचले आहेत. ‘मंत्र्यांनी बोलत असताना संयम पाळला पाहिजे. आपल्या बोलण्यातून कुठेही तेढ निर्माण होणार नाही, अशा प्रकारचा प्रयत्न केला पाहिजे. कधी-कधी तरुण मंत्री बोलून जातात. त्यांच्याशी मी संवाद करतो, त्यांना मी सांगतो. की आता तुम्ही मंत्री आहात तुम्ही संयम बाळगूनच या ठिकाणी बोललं पाहिजे.’ असे म्हणत संयमाची भूमिका घेण्याचा सल्ला दिला आहे.

शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचं वर्णन कसं कराल? जयंत पाटलांच्या प्रश्नावर फडणवीसांचं उत्तर; म्हणाले, “काही भरवसा…”

0

गेल्या काही दिवसांपासून राज्याचं राजकारण वेगवेगळ्या विषयांवरून चांगलंच ढवळून निघालं आहे. औरंगजेबाच्या कबरीवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण सुरु आहे. यातच नागपूरमध्ये दंगलीची घटना घडली. यावरून उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. या टीकेला भाजपाकडून जोरदार प्रत्युत्तर दिलं जात आहे. यातच आज राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली.

या मुलाखतीत जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राज्यातील विविध विषयांच्या संदर्भात प्रश्न विचारले. या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील दिलखुलास उत्तरे दिली. लोकमत वृत्तसंस्थेच्या एका पुरस्कार सोहळ्यात देवेंद्र फडणवीस यांनी ही मुलाखत दिली. यावेळी जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याबाबत एक प्रश्न विचारला. या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस यांनी देखील एका वाक्यात उत्तर दिलं.

जयंत पाटलांनी काय प्रश्न विचारला?

शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचं दोन-दोन वाक्यात तुम्ही कसं वर्णन कराल? असा प्रश्न जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना विचारला. यावर देवेंद्र फडणवीस यांनी दोन वाक्याऐवजी एका वाक्यात उत्तर दिलं. फडणवीसांनी म्हटलं की, “एका वाक्यात उत्तर देतो. वाईट वाटून घेऊ नका. काही भरवसा नाही. या वाक्यात दोघांची देखील वागण्याची पद्धत आली. काही भरवसा नाही”, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.

मंत्र्यांच्या बेजबाबदार विधानांबाबत फडणवीस काय म्हणाले?

नागपूरमध्ये दंगल उसळल्यानंतर सरकारमधील काही मंत्री चिथावणीखोर विधाने करत असल्याबाबतचा आरोप विरोधकांनी केला. मंत्र्यांच्या या विधानांवर मुख्यमंत्र्यांनी अंकुश लावावा, अशी मागणी होत आहे. यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “जेव्हा आपण मंत्री असतो तेव्हा संयमानेच बोलले पाहिजे. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी राजधर्माचे पालन करण्याबाबत विधान केले होते. त्यामुळे आपले विचार, आपल्या आवडी-निवडी या बाजूला ठेवल्या पाहिजेत. आपण संविधानाची शपथ घेतलेली आहे. संविधानाने आपल्याला कुणाहीबरोबर अन्याय न करता वागण्याची जबाबदारी टाकली आहे. मंत्र्यांनी बोलत असताना संयम बाळगला पाहिजे. आपल्या बोलण्याने कुठेही तेढ निर्माण होणार नाही, हा प्रयत्न केला पाहिजे. कधी कधी तरूण मंत्री बोलून जातात. अशावेळी मी त्यांच्याशी संवाद साधतो त्यांना समजावून सांगतो. मंत्री असल्यामुळे संयम बाळगूनच बोलले पाहिजे”,असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

पुरंदर विमानतळ भूसंपादन सुरु होण्यापूर्वीच विरोध सुरू न्यायालयात जाण्याचा इशारा; निवृत्त न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांचा पाठिंबा 

0

पुणे : पुरंदर तालुक्यातील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) दोन हजार ८३२ हेक्टर क्षेत्र औद्योगिक क्षेत्र म्हणून जाहीर केल्यानंतर स्थानिकांनी तीव्र विरोध दर्शविण्यास सुरुवात झाली आहे. मंगळवारी बाधित होणाऱ्या सातही गावातील ग्रामस्थांनी विरोध दर्शवून न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे.

पुरंदर येथील विमानतळासंदर्भात निवृत्त न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांनी पारगाव येथे भेट देत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी मौजे पारगाव, खानवडी, एखतपूर, मुजवडी, कुंभारवळण, वनपुरी आणि उदाचीवाडी या सात गावांतील सरपंच आणि ग्रामस्थ उपस्थित होते. संबंधित क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बागायती क्षेत्र असून सरकारने दुसरीकडील गायरान तसेच वनविभागाच्या जागेची निवड करावी.

शेतकरी मोठ्या प्रमाणात भूमिहीन होणार असून पाचपेक्षा अधिक दराने मोबदला दिला, तरी जमिनी देणार नाही, अशी भूमिका यावेळी ग्रामस्थांनी मांडली. त्यामुळे न्यायालयीन लढा देण्यासाठी सात गावांचा ठराव करण्यात येणार आहे. तसेच शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी स्थानिका्ंकडून देण्यात आला आहे.

त्यामुळे पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनाला सुरुवात होण्यापूर्वीच विरोध सुरू झाल्याने प्रशासकीय पातळीवर स्थानिकांना विश्वासात घेण्यासाठी कार्यवाही करण्यात येणार आहे, असे जिल्हा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

शेतकऱ्यांच्या जमिनी संपादीत केल्या जाणार असल्या तरी, त्यांचे नुकसान होऊ दिले जाणार नाही, अशी प्रसासनाची भूमिका आहे. त्यामुळे स्थानिकांच्या भेटी घेऊन त्यांच्या मागण्या, विरोध समजावून घेत विश्वास संपादन केला जाईल.

– जितेंद्र डुडी, जिल्हाधिकारी

नाशिक हादरलं, पुणे महामार्गाला लागून आंबेडकरवाडीत दोन सख्ख्या भावांचा खून, एक मृत शहर उपाध्यक्षही राजकीय वैमनस्यातून हत्या का?

0

नाशिकला हादरवून सोडणारी घटना घडली आहे. नाशिकमध्ये खुनाचे सत्र सुरूच आहे. नाशिक उपनगर परिसरात असलेल्या आंबेडकर वाडी येथे दोन सख्ख्या भावांचा खून झाला आहे. उमेश ऊर्फ मुन्ना जाधव आणि त्यांचे बंधू प्रशांत जाधव यांच्यावर धारधार शस्त्राने वार करून त्यांची हत्या करण्यात आली. उमेश ऊर्फ मुन्ना जाधव हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शहर उपाध्यक्ष असल्याची माहिती मिळत आहे. नाशिक शहरात काल दिवसभर रंगपंचमीचा उत्साह होता. मोठ्या उत्साहात शहरात रंगपंचमी साजरी करण्यात आली. बुधवारी रात्री साडेअकराच्या सुमारास पुणे महामार्गाला लागून असलेल्या आंबेडकरवाडी भागात या दोन हत्या झाल्या.

दोन बंधुंची हत्या करून हल्लेखोर फरार झाले आहेत. हत्येच कारण अद्याप अस्पष्ट आहे. या दुहेरी हत्याकांडामुळे परिसरात भीतीच वातावरण आहे. नाशिकच्या उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन अधिक तपास सुरू झाला आहे. नाशिक शहरात मागच्या काही दिवसांपासून खून, हाणामाऱ्या, राडे अशा घटना सातत्याने घडत आहेत.

कशी हत्या झाली?

कोयता घेऊन आलेल्या हल्लेखोरांनी सार्वजनिक शौचालयासमोरच जाधव बंधुंवर भीषण हल्ला केला. अनेक वार अंगावर झाल्याने दोघे बंधु तिथेच रक्ताच्या थारोळ्या कोसळले. ही घटना घडल्यानंतर स्थानिकांनी दोघा बंधुंना तात्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात नेलं. पण तिथे डॉक्टरांनी तपसाल्यानंतर त्यांना मृत घोषित केलं. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने दोघांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर रुग्णालय परिसरात मोठी गर्दी झाली होती.

राजकीय वैमनस्यातून हत्या का?

आंबेडकरवाडी परिसरात काल रात्रीच्या सुमारास हा गुन्हा घडला. मृत पावलेल्या दोघांपैकी एक भाऊ राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा शहरउपाध्यक्ष आहे. या हत्यांमुळे परिसरात तणाव निर्माण झाला आहे. पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल केला. आरोपींच्या शोधासाठी पोलिसांच्या तुकड्या रवाना झाल्या आहेत. राजकीय वैमनस्यातून ही हत्या झाली की, आणखी काही कारण यामागे आहे, ते लवकरच स्पष्ट होईल. नाशिकमध्ये अलीकडे गुन्हेगारी वाढली आहे.

दिशा सालियनप्रकरणी आदित्य ठाकरेंवर नेमका आरोप काय? याचिकेत कुणाकुणाचा उल्लेख? वाचा A टू Z

0

दिशा सालियन हिच्या हत्येप्रकरणात आता नवीन ट्विस्ट येण्याची शक्यता आहे. दिशा सालियन हिचे वडील सतीश सालियन यांनी हायकोर्टात धाव घेतली आहे. सतीश सालियन यांनी कोर्टात याचिका दाखल करून आदित्य ठाकरेंसह अनेकांवर गंभीर आरोप केला आहे. आदित्य ठाकरे आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. तसेच दिशा सालियन प्रकरण हे सीबीआयकडे सोपवण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

आदित्य ठाकरेंवर नेमका आरोप काय?

दिशा सालियनच्या मालाडमधील घरी आधीपासूनच पार्टी सुरू होती असा याचिकेत उल्लेख.

त्यावेळी तिथे एक ग्रुप आला. ज्यामध्ये रोहन राय आणि त्यांचे मित्र होते.

यावेळी अचानक आणखी काही लोक आले. ज्यामध्ये आदित्य ठाकरे, सूरज पांचोली, दिनू मौर्या, आदित्य ठाकरे यांचे बॉडीगार्ड्स आणि आणखी काही लोक आले असा याचिकेत उल्लेख.

यानंतर दिशा सालियानचा सामूहिक बलात्कार झाला असा याचिकेत दावा.

हे सगळं पोस्टमार्टम रिपोर्टमधून गायब करण्यात आलं आणि घाईघाईत दिशावर अंत्यसंस्कार करण्यात आले, असा याचिकेत आरोप.

दिशाच्या मृत्यूनंतर आदित्य ठाकरेंनी मुंबईतल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना अनेक कॉल करून हे प्रकरण मॅनेज केलं असाही दावा.

दिशाचा जर इमारतीवरून पडून मृत्यू झाला असेल तर पोलिसांनी केलेल्या वर्णन आणि मृतदेह पडलेली अवस्था यात साधर्म्य नसल्याची माहिती.

घटना घडली त्या इमारतीचे त्या दिवशीच सीसीटीव्ही फुटेज गायब करून बनावट फुटेज त्यात स्टोर करण्यात आले असाही आरोप.

नारायण राणे आणि नितेश राणे यांनी या प्रकरणात आवाज उठवल्यामुळेच त्यांना अटक झाल्याचा दावा.

या प्रकरणात राजकीय शक्ती आणि राजकीय भ्रष्टाचार असल्यानेच दिशाला न्याय मिळाला नाही असा आरोप.

दिशाचा पोस्टमार्टम रिपोर्ट मॅनेज झाला, घटनास्थळाचे सीसीटीव्ही गायब करण्यात आले, महत्वाचे कागदपत्र गहाळ करण्यात आली, राजकीय शक्तीचा वापर करून हे प्रकरण दाबून टाकण्यात आले असा आरोप.

मुंबई पोलिसांनी दिशा सालियनचा मृतदेह कोणत्या अवस्थेत होता यासंदर्भात केलेके दावे पूर्णत खोटे असल्याचा आरोप.

दिशाचा मृतदेह खाजगी गाडीतून मित्रांनी हॉस्पिटलमध्ये नेला. पण पोलिसांनी तो रुग्णवाहिकेतून नेला आणि दिशा नग्नावस्थेत नव्हती. पंचनामा करताना तिचे आईवडील उपस्थित होते, असा केलेला दावा खोटा असल्याचा याचिकेत आरोप.

याचिकेतील प्रमुख मागण्या कोणत्या?

आदित्य ठाकरेंवर गुन्हा दाखल करा, गुन्हा दाखल करून तपास सीबीआयकडे सोपवण्यात यावा.

किशोरी पेडणेकर यांच्यावर कुटुंबियांवर दबाव टाकून दिशाभूल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करावा.

पारदर्शक तपास होण्यासाठी राज्याबाहेर तपास होऊ द्यावा.

दिशाच्या पोस्टमार्टेम करतानाचे चित्रीकरण आणि सर्व कागदपत्र समोर आणावीत.

आदित्य ठाकरे, सूरज पंचोली, दिनू मोर्या, मुंबई पोलीस आयुक्तांचे आणि आदित्यचे बॉडीगार्डचे घटनेदरम्यानचे मोबाईल टॉवर लोकेशन काढण्यात यावे.

दिशा सालियनचा फोन आणि लॅपटॉप तिचा बॉयफ्रेंड रोहन रायकडे देण्यात आला आहे. तो कुटुंबीयांकडे सोपवावा.

बौद्धजन पंचायत समितीच्या वतीने गजानन तांबे यांचा अमृतमहोत्सवी वाढदिवस मोठ्या उत्साहात संपन्न

0

मुंबई दि. १६ (रामदास धो. गमरे) बौद्धजन पंचायत समितीचे माजी चिटणीस, गटक्रमांक ३२ बोरिवली-दहिसर विभागाचे विभाग प्रतिनिधी, रिपब्लिकन सेना मुंबई विभागाचे सरचिटणीस मौजे गाव इनाम पांगरी, ता. दापोली, जिल्हा रत्नागिरी या गावचे सुपुत्र गजानन भागूराम तांबे यांच्या अमृतमहोत्सवी ७५ वा वाढदिवस व गजानन भागूराम तांबे व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. वैशाली गजानन तांबे यांच्या लग्नाचा ५५ वा वाढदिवस असा संयुक्त कार्यक्रम बौद्धजन पंचायत समितीच्या व्यवस्थापन मंडळाच्या वतीने उपसभापती विनोद मोरे यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

सदर प्रसंगी उपसभापती विनोद मोरे यांनी शुभेच्छापर भाषण देत असताना “चिटणीस असावा तर गजानन तांबें सारखा, चिटणीस पदाला न्याय देण्यासाठी तन, मन, धन अर्पण करून त्यांनी स्वतःला समाजकार्यासाठी झोकून दिले, चिटणीस पदाला साजेसा असा कारभार त्यांनी नेहमीच करीत येणाऱ्या प्रत्येकाच्या प्रश्नांना, अडचणींना मार्ग काढून देण्याच काम त्यांनी केलं, सभासदांना योग्य माहिती, मार्गदर्शन त्यांनी सदैव केले, कोकण दौरा असो, दफ्तर तपासणी असो किंवा मुंबई विभागातील कार्यकर्त्यांचे प्रश्न असो ते हसतखेळत सोडविण्याचे कार्य त्यांनी बिनचूकपणे पार पाडल, बोरिवली-दहिसर विभागात ही त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली असून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आनंदराज आंबेडकर यांच्या खांद्याला लावून त्यांनी काम केले आहे” असे गौरवोद्गार काढून त्यांनी गजानन तांबे व उभयतांस वाढदिवस व लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. गजानन तांबे व वैशाली गजानन तांबे यांचे मंगल परिणय १९७० साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह येथे झाले होते म्हणून त्यांच्या लग्नाचा ५५ वा वाढदिवस व अमृतमहोत्सवी ७५ व्या वाढदिवसाचा सन्मान त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह येथे येऊन समितीच्या वतीने करण्यात आलेला गौरव स्वीकारला. सदर वाढदिवस सोहळ्या दिवशीच बौद्धजन पंचायत समितीच्या २०२५-२६ वार्षिक बजेटची मिटिंग असल्याकारणाने सर्वच व्यवस्थापक मंडळाचे विश्वस्त, मध्यवर्ती कार्यकारिणी त्याचबरोबर कार्याध्यक्ष लक्ष्मण भगत, सरचिटणीस राजेश घाडगे, खजिनदार नागसेन गमरे तसेच प्रकाश जाधव हे उपस्थित असल्याने त्यांनीही गजानन तांबे व सौ. वैशाली गजानन तांबे यांना ७५ व्या अमृतमहोत्सवी वाढदिवसाच्या व लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.