Home Blog Page 144

अजितदादा आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांना कोणतीच दयामाया दाखवेनात! विधानसभा भूमिकेचा धक्क्यावर धक्के अन् मोठा फटका?

0

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांना सत्ताधारी पक्षात असूनही धक्क्यावर धक्के बसत आहेत. त्यांनी आणि भाजपचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या श्रीराम कारखान्याच्या निवडणुकीला अखेर स्थगिती देण्यात आली आहे. तसेच प्रशासकाचीही नियुक्ती करण्यात आली आहे. रामराजे नाईक निंबाळकर यांचा या दोन्ही गोष्टींना विरोध होता. त्यानंतरही राष्ट्रवादी काँग्रेसकडीलच सहकार मंत्रालयाने रामराजेंना धक्का देत हे दोन्ही निर्णय घेतले आहेत.

पण सत्तेसोबत असतानाही रामराजे नाईक निंबाळकर यांना बसलेला हा पहिलाच धक्का नाही. यापूर्वी 5 फेब्रुवारी रोजी रामराजे नाईक निंबाळकर यांचे चुलत बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर आणि रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या फलटण, पुणे आणि मुंबईतील घरांवर एकाचवेळी प्राप्तिकर विभागाची धाड पडली होती. त्यापाठोपाठ काही दिवसांपूर्वी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी श्रीराम कारखान्याच्या निवडणुकीला स्थगिती देऊन प्रशासक नेमण्याची मागणी सरकारकडे केली होती. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी स्थगिती न देता निवडणूक पुढे ढकलली होती. हाही रामराजेंसाठी एक प्रकारे धक्काच होता.

प्रशासक नियुक्त झाल्यास काय परिस्थिती होते हे आपण फलटण नगरपालिकेत पाहत आहोत. प्रशासक त्यांच्यामागे नंदीबैलासारखा फिरून त्यांनी सांगितलेली कायदेशीर आणि बेकायदेशीर कामे करत असतो. हीच परिस्थिती त्यांना श्रीराम सहकारी साखर कारखान्यात अप्रत्यक्ष चुकीचे निर्णय घेऊन करायची आहे, असे म्हणत रामराजे नाईक निंबाळकर यांनी प्रशासक नियुक्तीला विरोध दर्शविला होता. पण आता निवडणुकीला स्थगिती तर दिलीच आहे शिवाय प्रशासकही नियुक्त करण्यात आला आहे.

या सगळ्या घटनांमध्ये अजित पवार मात्र चार हात लांबच आहेत. ते निंबाळकर यांना कोणतीच दयामाया दाखवताना दिसत नाहीत. यामागे त्यांच्या मनात विधानसभा निवडणुकीत रामराजेंनी ऐनवेळी दिलेल्या धक्क्याविषयीचा राग असल्याचे बोलले जात आहे. विधानसभेला दीपक चव्हाण यांची उमेदवारी फलटणमधून जाहीर झाली होती. पण संजीवराजे नाईक निंबाळकरांसह दीपक चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आणि ते महाविकास आघाडीचे उमेदवार झाले.

मग अजितदादांनी ऐनवेळी भाजपचे तालुका अध्यक्ष सचिन कांबळे पाटील यांना राष्ट्रवादीतून उमेदवारी दिली. त्यांच्या विजयासाठी फलटणमध्ये सभा घेतली. तसंच “तुम्ही फक्त दीपक चव्हाणांच्या प्रचारात जावाच, तुम्ही आमदार कसे राहता हेच बघतो”, असा इशाराच त्यांनी रामराजेंना दिला होता. “श्रीमंत बंद दाराआड बैठका घेतात. तुमच्यात धमक असेल तर आमदारकीला लाथ मारा आणि तिकडे जावा. आमदारकी पण टिकवायची आणि असा प्रचार करायचा हे योग्य नाही”, असं म्हणत रामराजेंच्या अंतर्गत बैठकांवर भाष्य केलं होतं.

पण निकालानंतर रामराजे नाईक निंबाळकर यांनी अजित पवार यांच्याशी पॅचअप केल्याच्या चर्चा होत्या. ते अजित पवार यांच्या बैठकीतही उपस्थित राहिले होते. वरिष्ठ नेत्यांचा मान देत त्यांना अजितदादांनी पहिल्या रांगेत बसवले होते. शिवाय संजीवराजे नाईक निंबाळकर पुन्हा अजित पवार यांच्या पक्षात येऊ शकतात अशा चर्चांना सुरुवात झाली होती. पण मागील काही काळात रामराजे यांना बसलेल्या धक्क्यांवर अद्यापही अजित पवार यांच्या मनात राग कायम आहे, असेच म्हणायला हवे.

महाराष्ट्राच्या विधिमंडळात ‘या’ आमदार पती-पत्नी करणार नवा रेकॉर्ड; स्वीय सहाय्यक ते आमदार कारकीर्द; चारजण पहिल्यांदाच आमदार

0

राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर अवघ्या चार महिन्यातच विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या पाच जागांसाठी निवडणूक बिनविरोध पार पडली. विधान परिषदेतील या पाच जागांसाठी जोरदार रस्सीखेच होईल, असे वाटत असताना ही निवडणूक बिनविरोध झाली. त्यामुळे या निवडणुकीसाठीचा घोडेबाजार टाळण्यात सत्ताधारी महायुतीला यश आले. यामध्ये भाजपच्या वाट्याला तीन, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट एक, तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या वाट्याला एक जागा आली आहे. त्यातच या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका जागेवर संजय खोडके हे बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे आता त्यांच्या नावे एका अनोख्या विक्रमाची नोंद होणार आहे.

विधानपरिषदेतील भाजपचे प्रवीण दटके, गोपीचंद पडळकर, रमेश कराड तर राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश विटेकर तर शिवसेना शिंदे गटाचे आमशा पाडवी हे विधानसभेवर निवडून गेल्याने यांच्या जागा रिक्त झाल्या होत्या. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसकडील एकाच जागेसाठी जवळपास 100 जण इच्छुक होते. तर शिंदेंच्या शिवसेनेकडील एका जागेसाठी इच्छुकांची संख्या मोठी होती. तर भाजपने त्यांच्या वाट्याला आलेल्या तीन जागासाठी अनेकजण इच्छुक असल्याने छाननी करून 20 जणांच्या नावाची यादी दिल्लीतील हायकमांडकडे पाठविण्यात आली होती.

चारजण झाले पहिल्यांदाच आमदार

उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी पाच जणच रिंगणात राहिल्याने भाजपचे दादाराव केचे, संदीप जोशी, संजय केणेकर, शिंदेंच्या शिवसेनेचे चंद्रकांत रघुवंशी तर राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय खोडके यांची बिनविरोध निवड झाली. विशेष म्हणजे या पाच पैकी दादाराव केचे वगळता चार जणही पहिल्यांदा आमदार झाले आहेत.

दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे संजय खोडके हे बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे आता त्यांच्या नावे एका अनोख्या विक्रमाची नोंद झाली आहे. राज्याच्या इतिहासात प्रथमच एकाच वेळी पती-पत्नी राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात सदस्य असणार आहेत. अमरावती विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या सुलभा खोडके या राष्ट्रवादीच्या आमदार आहेत. तर त्यांचे पती संजय खोडके हे विधानपरिषदेचे नवनिर्वाचित आमदार आहेत.

स्वीय सहाय्यक ते आमदार अशी आहे कारकीर्द

संजय खोडके यांनी २००० मध्ये तत्कालीन गृहमंत्री छगन भुजबळ यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम पाहिले होते. अभ्यासू वृत्ती आणि संघटनात्मक कौशल्यानं त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा अमरावती शहरात पक्षविस्तार केला. त्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीला दोनवेळा अमरावतीचे महापौर पद मिळाले. त्यामुळे त्यांना अजित पवार यांनी पहिल्यांदाच आमदारकी दिली आहे.

काँग्रेसने निलंबित केल्याने राष्ट्र्वादीत केला प्रवेश

अमरावतीमधील बडनेरा मतदारसंघातून २००४ मध्ये सुलभा खोडके या प्रथम निवडून आल्या होत्या. 2009 आणि 2014 मध्ये त्यांचा रवी राणाकडून त्या विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्या होत्या. 2024 मधील विधानसभा निवडणुकीपूर्वी त्या काँग्रेस पक्षात होत्या. पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत काँग्रेसने त्यांचे सहा वर्षासाठी निलंबन केले होते. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत त्या अमरावती विधानसभा मतदारसंघातून पुन्हा विजयी झाल्या आहेत.

साडेचार वर्ष करता येणार एकत्रित काम

राज्याच्या विधिमंडळाचा आजपर्यंतचा इतिहास पहिला तर पती-पत्नी कधीच आमदार म्हणून एकत्रीत सभागृहात पहावयास मिळाले नव्हते. आता प्रथमच खोडके पती-पत्नी सभागृहात पुढील साडेचार वर्ष एकत्रित पाहवयास मिळणार आहेत.

पती-पत्नी आमदार पण विधीमंडळात एकत्रित नव्हते

यापूर्वीचा विधिमंडळाचा इतिहास पाहिला तर माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील व त्यांच्या पत्नी शालिनी पाटील हे दोघेजण पण आमदार राहिले आहेत. मात्र, ते दोघेजण वेगवेगळ्या काळात आमदार असल्याने विधिमंडळात एकत्रित काम केले नाही. तर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण व त्यांच्या पत्नी अमिता चव्हाण हे दोघेही वेगवेगळ्या टर्ममध्ये आमदार होते. त्यासोबतच कन्नड मतदारसंघातील माजी आमदार रायभान जाधव त्यांच्या पत्नी तेजस्विनी जाधव तर हर्षवर्धन जाधव व त्यांच्या पत्नी संजना जाधव हे पती-पत्नी वेगवेळ्या टर्ममध्ये आमदार राहिले आहेत.

दौड मतदारसंघातून सुभाष कुल यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी रंजना कुल आमदार होत्या. माजी मंत्री आर. आर. पाटील यांच्या निधनानंतर पत्नी सुमन पाटील या आमदार झाल्या होत्या. पाथर्डी-शेवगाव विधानसभा मतदारसंघातून राजीव राजळे व त्यांच्या पत्नी मोनिका राजळे हे वेगवेगळ्या टर्ममध्ये आमदार राहिले आहेत.

भाजप पक्ष कार्यालयाची बिकट अवस्था पैसेच नाही! कार्यालयाची विज कापली; पालिकेची जप्तीची नोटीस भिंतींना तडे ओलाव्याने भिंती खराब

0

महाराष्ट्रामध्ये सध्या भाजप महायुतीचं सरकार आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपने सर्वाधिक जागा जिंकून आपणच मोठे भाऊ असल्याचं दाखवून दिलं. पण राज्यात भाजपची सत्ता असली तरी मुंबईजवळील बदलापूर शहरात भाजप कार्यालयाची बिकट अवस्था असल्याचं समोर आलं आहे. एवढंच नाहीतर विज बिल आणि मालमत्ता कर भरायला सुद्धा पक्ष कार्यालयाकडे पैसे नाहीत. त्यामुळे पक्ष कार्यालयाचे विज बिल थकल्यानं वीज मीटर कापण्यात आलंय.

बदलापूर शहरात विद्यमान भाजप आमदार किसन कथोरे, माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील, माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे, नंदकुमार पातकर, शरद तेली आणि संजय भोईर हे दिग्गज नेते असतांना पक्ष कार्यालयाची अशी अवस्था असल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. भाजपच्या या कार्यालयाचं गेल्या अनेक दिवसांपासून विज भरलं नाही. त्यामुळे महावितरणने मिटर कापून नेलं आहे. तसंच मालमत्ता कराची थकबाकी असल्याने पक्ष कार्यालयाला पालिकेनं जप्तीची नोटीस देखील चिटकवली आहे.

या कार्यालयाची अत्यंत दुरवस्था झालेली आहे. जागोजागी फरशा निघालेल्या आहेत. भिंतींना तडे गेलेत, अनेक भिंती ओलाव्यामुळे खराब झाल्यात. मात्र भाजपाच्या नेत्यांना, पदाधिकाऱ्यांना या कार्यालयाकडे लक्ष द्यायला वेळ नाही. त्यामुळे जुन्या भाजप कार्यकर्त्यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. अनेक पदाधिकाऱ्यांनी आणि माजी नगरसेवकांनी कार्यालयाचे डागडूजी करण्यासाठी मदतीचा आश्वासन दिलं होतं. मात्र अजून पर्यंत ती मदत कार्यालयापर्यंत पोहोचली नसल्याने भाजप कार्यालयाची दुरावस्था दिवसेंदिवस आणखीनच बिकट होत चालली आहे. देशात सगळ्यात जास्त सदस्य संख्या आणि सगळ्यात मोठा पक्ष असलेल्या बदलापूर भाजप पक्ष कार्यालयाची ही दुरवस्था पाहून आता तरी कोणी पुढाकार घेऊन त्याची दुरुस्ती करण्यासाठी पुढे येईल का? हे बघावं लागेल.

Admissions Closing Soon for Symbiosis Centre for Distance Learning’s January 2025 Batch

0
Untitled design – 1

Pune, 20 Mar 25 – Symbiosis Centre for Distance Learning (SCDL), a pioneer in distance education, is nearing the close of admissions for its January 2025 batch. The last date to apply is March 25, 2025.

For over 25 years, SCDL has been at the forefront of providing accessible and flexible education to professionals, entrepreneurs, and students. With a diverse portfolio of 40+ industry-relevant programs, the institution continues to cater to evolving career aspirations across various fields.

Recognized as one of India’s leading distance learning institutes, SCDL has an alumni base of over 800,000 professionals globally. Its programs, designed to align with industry standards, ensure broad acceptance across multiple sectors.

Individuals seeking to enhance their professional credentials through structured, self-paced learning can explore the various PG Diploma and PG Certificate programs offered by SCDL.

Industry-Ready Programs for Career Growth

SCDL offers 40+ comprehensive programs aligned with evolving industry demands, ensuring students gain in-demand skills across sectors like business, technology, and management. Some of our Top Programs includes :

 PG Diploma Programs

  • Business Administration (Executive PGDM Specializations)
  • Human Resource Management
  • Data Science & Analytics
  • Banking & Finance
  • Information Technology & Supply Chain Management
  • Export & Import Management

PG Certificate Programs (Short-term courses for specialized skill-building)

  • Digital Marketing
  • Project Management
  • Business Analytics

Corporate & Industry-Tailored Learning

  • SCDL partners with top organizations like IBM, Wipro, and Infosys to develop customized learning solutions for working professionals. These programs help businesses upskill their workforce across industries like IT, banking, healthcare, and manufacturing, ensuring employees stay competitive in a rapidly evolving job market.

 Learn Anytime, Anywhere – Cutting-Edge Digital Learning

  • SCDL ensures seamless learning with a mobile-friendly platform, allowing students to:
  • Access interactive course materials via a state-of-the-art Learning Management System (LMS)
  • Attend live & recorded lectures on-the-go
  • Engage in AI-powered proctored exams & virtual classrooms
  • Network with faculty, peers & industry experts

 Global Recognition & Career Success

SCDL’s programs are endorsed by top corporates, industry bodies, and global institutions. With strong alumni networks in leadership positions across industries, SCDL ensures students receive education that translates into real-world career success.

Why SCDL

#1 Ranked Distance Learning Institutes by Outlook

800,000+ alumni worldwide

Wide range of specialized courses at affordable fees

25% average salary increase for graduates or working professionals

SCDL has high acceptance across all Industries

Students from across the globe, Other than India top countries include UAE, United States, Kenya, etc.

दिवाळीचा पगार कापला, जेवणही करू दिलं नाही, चालकाचा पोलिसांजवळ कबुलीजबाब, काय काय सांगितलं?

0

पुण्यातील आयटी हब हिंजवडीत टेम्पो ट्रॅव्हल्सच्या जळीत कांडाने धक्कादायक वळण घेतलं आहे. तीन कर्मचाऱ्यांचा जीव घेण्याच्या उद्देशाने टेम्पो ट्रॅव्हल्स पेटवून देण्यात आल्याचं आणि हे कृत्य चालकाने केल्याचं तपासात उघड झालं आहे. मात्र, ज्यांना जीवे मारायचं होते, ते यातून बचावले आणि निष्पाप चौघांचा यात बळी गेला आहे. दिवाळी बोनससह पगार थकवला आणि चालक असून मजुरांची कामं सांगितली जात होती, म्हणून चालक जनार्दन हंबर्डीकरने हा कट रचला होता. मात्र पोलिसांच्या तपासात त्याचं बिंग फुटलं. या प्रकरणाने नेमकं वेगळं घेतलं आहे, या चालकाने केलेल्या कृत्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. पोलिस चौकशीमध्ये त्याने सर्व माहिती दिली आहे.

हिंजवडीत टेम्पो ट्रॅव्हल्सचे चालक जनार्धन हंबर्डेकर याने चौकशीमध्ये जे सांगितलं ते संतापजनक आहे. काही किरकोळ कारणावरुन आलेल्या रागाने गाडी पेटवून दिली आहे. घटनेनंतर पोलिसांना चालकाचा संशय आला होता. त्याची पोलिसांनी कसून चौकशी केली. त्यानंतर या घटनेमागचं कारण समोर आलेलं आहे. काल (गुरुवार, दि. 20) मार्च रोजी पोलिसांनी याबाबत पत्रकार परिषद घेऊन हिंजवडी हत्याकांडाबाबत माहिती दिली आहे.

चालकाला कशाचा आला होता राग?

हिंजवडीत टेम्पो ट्रॅव्हल्सचे चालक जनार्धन हंबर्डेकर याने चौकशीमध्ये त्याला कोणत्या गोष्टींचा राग आला होता ते सांगितलं आहे. कंपनीतील काही कर्मचारी-अधिकारी यांच्याकडून मिळणारी वागणूक आणि त्यामुळे चालकाच्या मनात राग आणि चीड निर्माण झाली होती. कंपनी व्यवस्थापनाने चालकाता दिवाळीत पगार कापला होता. त्याचबरोबर चालक असून देखील त्याला अत्यंत खालच्या दर्जाची वागणूक दिली जात होती, व्यवस्थित वागणूक दिली जात नव्हती, असं त्याचं म्हणणं होतं. तर मागच्या आठवड्यामध्ये त्याला जेवणाचा डबा देखील खाऊ दिला नव्हता. या कारणांमुळे चालक जनार्धन हंबर्डेकर याचा कंपनीतील तिघांवर राग होता. त्या रागाचा बदला घेण्यासाठी त्याने कट रचला होता. परंतु या घटनेत नाहक ज्या चार जणांचा बळी गेला, त्यांच्यावर चालकाच रागच नव्हताच. ज्यांच्यावर राग होता ते या घटनेमध्ये बचावले आहेत. चालकाच्या रागामुळे चार निष्पापांचा बळी गेल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

टेम्पो ट्रॅव्हल्स जाळण्याचे कारण काय?

दिवाळी बोनससह पगार थकवला आणि चालक असून मजुरांची कामे सांगितली जात होती. त्यामुळे टेम्पो चालक जनार्दन हंबर्डीकरने हा कट रचला होता. मात्र पोलिसांच्या तपासात त्याचं बिंग फुटलं. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी हत्येचा आणि हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केल्याने या घटनेवर हळहळ व्यक्त करणाऱ्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे. दरम्यान, हे सर्व कर्मचारी सकाळच्या शिफ्टला ऑफिसला चालले होते.

ते शेवटपर्यंत झगडले

गाडीच्या जळालेल्या लोखंडावर ओरखडे होते. ते शेवटच्या क्षणापर्यंत जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करत होते. कोणीतरी त्या बंद दरवाज्याला ओरबाडून उघडायचा प्रयत्न केला होता. जीवाच्या अकांताने ते दार उघडण्याचा प्रयत्न करत असतील. पण तो दरवाजा उघडला नाही. फुटलेल्या काचांवरही असेच निशाण होते. ते शेवटपर्यंत झगडले होते. या घटनेनंतर त्या जळालेल्या बसच्या कोपऱ्यामध्ये जेवणाचे डबे, जळालेल्या चपला दिसत होत्या. या बसमधील जळालेल्या सीटचा कोळसा झाला आहे. गाडीच्या आतील धातू देखील वितळला आहे.

हिंजवडी टेम्पो ट्रॅव्हल्समधील मृतांची आणि जखमींची नावं

-सुभाष भोसले, वय 42
-शंकर शिंदे, वय 60
-गुरुदास लोकरे, वय 40
-राजू चव्हाण, वय 40,
सर्व राहणार पुणे

जखमी
-प्रदीप राऊत
-प्रवीण निकम
-चंद्रकांत मलजीत
-संदीप शिंदे
-विश्वनाथ झोरी
-जनार्दन हंबारिडकर – टेम्पो चालक

‘औरंगजेबाची भूमिका जर मुस्लीम अभिनेत्याने..’; अक्षय खन्नाच्या भेटीनंतर वारिस पठाण यांचं ट्विट चर्चेत

0

लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ या चित्रपटानंतर राज्यभरात सध्या औरंगजेब हा चर्चेचा विषय ठरला आहे. याच चर्चेदरम्यान माजी आमदार आणि एमआयएम पक्षाचे नेते वारिस पठाण यांनी अभिनेता अक्षय खन्नाची भेट घेतली. अक्षय खन्नाने ‘छावा’मध्ये क्रूर औरंगजेबाची भूमिका साकारली होती. या भेटीनंतर वारिस पठाण यांनी अक्षयसोबतचे फोटो एक्स (ट्विटर) अकाऊंटवर पोस्ट केले. त्याचसोबतच त्यांनी एक सूचक ओळ लिहिली आहे. ‘छावा चित्रपटात जर ही भूमिका एखाद्या मुस्लीम अभिनेत्याने साकारली असती तर आतापर्यंत कायच्या काय झालं असतं’, असं त्यांनी लिहिलं आहे. त्यामुळे वारिस यांच्या या पोस्टने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलंय.

वारिस पठाण यांची पोस्ट-
अक्षयसोबतचे फोटो पोस्ट करत वारिस यांनी एक्स अकाऊंटवर लिहिलं, ‘छावा चित्रपटात औरंगजेबाची भूमिका साकारलेला अभिनेता अक्षय खन्ना याची आज भेट घेतली. चांगली व्यक्ती आहे. छावा चित्रपटात जर ही भूमिका एखाद्या मुस्लीम अभिनेत्याने साकारली असती तर आतापर्यंत कायच्या काय झालं असतं.’

औरंगजेबाच्या कबरीवरून नागपुरात दोन गटांत संघर्ष
औरंगजेबाच्या कबरीवरून आंदोलन झाल्यानंतर दोन गटांमध्ये संघर्ष उडाल्यामुळे नागपुरात सोमवारी तणाव निर्माण झाला. दोन्ही गटातील युवकांनी केलेल्या दगडफेकीत पोलीस जखमी झाले. हुल्लडबाजांनी रस्त्यावर जाळपोळही केली. औरंगजेबाची कबर हटविण्याच्या मागणीसाठी सोमवारी नागपुरात मोर्चा निघाला होता. त्यानंतर रात्री या मोर्चाला हिंसक वळण लागलं. या राड्यानंतर विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘छावा’चा उल्लेख केला होता. “छावा या चित्रपटामुळे राज्यात लोकांच्या भावना मोठ्या प्रमाणावर प्रज्वलित झाल्या आहेत. मला कुठल्याही चित्रपटावर टीका करायची नाहीये. परंतु औरंगजेबाबद्दलचा राग मोठ्या प्रमाणावर बाहेर येतोय”, असं ते म्हणाले.

छावा या चित्रपटात अभिनेता विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची, रश्मिका मंदानाने महाराणी येसुबाईंची आणि अक्षय खन्नाने औरंगजेबाची भूमिका साकारली होती. याशिवाय चित्रपटात आशुतोष राणा, दिव्या दत्ता, विनीत कुमार सिंग, सुव्रत जोशी, संतोष जुवेकर यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका होत्या. चित्रपटाने जगभरात कमाईचा 700 कोटींचा टप्पा पार केला आहे.

नागपूर हिंसाचारात 61 वाहनांचे नुकसान, भरपाई म्हणून मिळणार ‘इतकी’ रक्कम

0

राज्यात सध्या औरंगजेबाच्या कबरीवरुन वाद सुरु आहे. यावरुन नागपुरात दोन गट आमने-सामने आले. त्यावेळी दगडफेक, जाळपोळ अशा हिंसक घटना घडला. या घटनेचा मास्टरमाईंड मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टी (एमडीपी) शहराध्यक्ष फहीम खान असल्याचं पोलीस तपासातून समोर आलं आहे. या घटनेमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आता या नुकसानीचा पंचनामा करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, नागपुरात झालेल्या हिंसाचारात 61 वाहनांची तोडफोड करण्यात आली. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण आहे. सरकारी पंचनाम्यानुसार, या हिंसाचारात 36 कार, 22 दुचाकी, एक क्रेन आणि एका घराचे नुकसान झाले आहे.

नागपुरात झालेल्या या हिंसाचाराप्रकरणी जिल्हा प्रशासनाने नुकसानीचा पंचनामा करून भरपाई देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, ज्या व्यक्तींची वाहने पूर्णपणे जळाली आहेत त्यांना 50 हजार रुपये नुकसान भरपाई म्हणून दिली जाणार आहे. तर कमी नुकसान झालेल्या वाहनांसाठी 10 हजार रुपये नुकसान भरपाई दिली जाईल. तसेच ज्यांनी विम्याचा लाभ घेतला आहे, त्यांना मात्र ही रक्कम दिली जाणार नाही, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

घटना औरंगजेबामुळे नव्हे, तर चादर जाळल्यामुळे – प्यारे खान
महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी दिलेल्या माहितीनुसार, “या निदर्शनांदरम्यान जाळण्यात आलेली चादर कुठून आली, याचा तपास पोलीस करत आहेत. माझ्यावर आणि पोलिसांवर आरोप करण्यापेक्षा जमिनीवर राहून काम करणं चांगलं आहे. ती चादर कुठून आली, याचा तपास पोलीस करत आहेत. फॉरेन्सिक तपासणीनंतर सत्य समोर येईल. ही घटना औरंगजेबामुळे नव्हे, तर चादर जाळल्यामुळे झाली आहे, असे प्यारे खान म्हणाले.

नागपूर जिल्हाधिकाऱ्यांकडून पंचनामा सुरु
नागपुरातील हिंसाचारप्रकरणी झालेल्या नुकसानीचा पंचनामा केला जात आहे. या पंचनाम्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. या हिंसाचारात ज्यांच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे, त्यांच्या पंचनाम्याची प्रक्रिया सुरू आहे. प्रशासकीय कर्मचारी आणि अधिकारी घरोघरी जाऊन पंचनामा करत आहेत. सर्वांचा लेखाजोखा तयार करत आहेत. महाराष्ट्राचे मंत्री आणि नागपूरचे प्रभारी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पंचनामा सुरू करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर नागपूर जिल्हाधिकाऱ्यांनी पंचनामा सुरू केला.

नागपूरमध्ये झालेल्या हिंसाचारात 61 वाहनांचे नुकसान झाले. ही नुकसान भरपाई देण्याची प्रक्रिया जिल्हा प्रशासनाने सुरू केली आहे. राज्य अल्पसंख्याक आयोगाने 48 तासांच्या आत नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार आता सध्या कार्यावाही सुरु आहे.

जजच्या बंगल्याला लागली आग, समोर आले कॅश कांड, सुप्रीम कोर्टाचा थरकाप, न्यायमूर्ती यशवंत वर्मा आहेत तरी कोण?

0

दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या बंगल्यात घबाड सापडले. त्यांच्या बंगल्याला आग लागल्याचे निमित्त झाले आणि हा प्रकार समोर आला. त्यांच्या बंगल्याला लागलेली आग विझवण्यात आल्यानंतर मोठी रक्कम सापडली. त्यामुळे न्याय वर्तुळात एकच खळबळ उडाली. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात कडक भूमिका घेतली आहे. सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्या नेतृत्वातील कॉलेजियमने लागलीच कारवाई करत, संबंधित न्यायमूर्तींची बदली केली आहे. त्यांची रवानगी अलाहाबाद हायकोर्टात करण्यात आली आहे. विशेष म्हणजे आग लागली तेव्हा वर्मा हे शहरात नव्हते.

कोट्यवधी रुपयांचा पाऊस

बंगल्याला आग लागताच वर्मा यांच्या कुटुंबियांनी पोलीस आणि अग्निशमन दलाला पाचरण केले. आग विझवल्यानंतर एका खोलीत मोठी रक्कम सापडली. सगळीकडे नोटाच नोटा पडल्याचे दिसून आले. कोट्यवधी रुपयांची ही रक्कम पाहून सगळेच चक्रावले. त्यानंतर कोर्टातील वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहचले. त्यांनी या घटनेची नोंद केली. तर आता याप्रकरणात ईडी आणि सीबीआयच्या एंट्रीची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

केवळ बदलीवरच दाबणार प्रकरण?

सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमच्या काही सदस्यांनी ही गंभीर घटना असल्याने केवळ बदली करून भागणार नाही, असे मत नोंदवल्याचे समोर येत आहे. वर्मा यांनी पदाचा राजीनामा द्यावा असे त्यांना सुचवण्यात आल्याचे कळते. जर त्यांनी ही गोष्ट मान्य केली नाही तर त्यांच्यावर इन हाऊस इन्कायरी होऊ शकते. त्यानंतर पुढील कारवाई होईल.

कोण आहे न्यायमूर्ती यशवंत वर्मा?

न्यायमूर्ती यशवंत वर्मा हे दिल्ली हायकोर्टात कार्यरत होते. त्यांची आता अलाहाबाद उच्च न्यायालयात बदली करण्यात आली आहे. त्यांचा जन्म उत्तर प्रदेशमध्ये झाला आहे. त्यांनी अलाहाबाद विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केले. अलाहाबाद हायकोर्टातच त्यांनी वकिली केली. पुढे 13 ऑक्टोबर, 2021 रोजी त्यांची न्यायमूर्ती पदासाठी नियुक्ती करण्यात आली. त्यांची पहिली नियुक्ती ही दिल्ली उच्च न्यायालयातच झाली. त्यांनी आतापर्यंत ठोस आणि कायद्याच्या आधारावर दिलेल्या निकालाची वकिलांच्या वर्तुळात मोठी चर्चा झाली होती.

काय आहे दिशा सालियन प्रकरण? मायानगरीत कसा आला भूकंप, आदित्य ठाकरे का हैराण? वाचा A टू Z

0

8 जून 2020 ची ती रात्र… त्या रात्र मलाडच्या एक इमारतीत 14 व्या मजल्यावर पार्टी सुरु होती. जी दिशा सालियनच्या आयुष्यातील शेवटची पार्टी ठरली. गजबजलेल्या त्या पार्टीत अचानक शांतता निर्माण होते आणि कळतं दिशा आता जगात नाही. दिशा सालियन हिने पार्टीत अखेरचा श्वास घेतल्याचा सर्वांना कळतं आणि सर्वांना मोठा धक्का बसतो. दिशा सालियन हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, ती अभिनेता सुशांत सिंह राजपूतची माजी मॅनेजर होती. दिशाच्या निधनाला जवळपास 5 वर्ष होत आली आहेत, पण तिच्या मृत्यूचं रहस्य अद्यापही गुलदस्त्यात आहे. कोणी म्हणत आहे दिशाने आत्महत्या केली, तरी कोणी म्हणत आहे की तिची हत्या करण्यात आली. आता पुन्हा दिशा सालियन प्रकरणाने डोकं वर काढलं आहे.

दिशा सालियन हिच्या वडिलांनी बुधवारी मुंबई हायकोर्टाचे दरवाजे ठोठावले. जून 2020 मध्ये मुलीच्या गूढ परिस्थितीत झालेल्या मृत्यूची नव्याने चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. सतीश म्हणाले की, याचिकेत उच्च न्यायालयाला उद्धव ठाकरे यांचा मुलगा आदित्य ठाकरे यांच्या विरोधात एफआयआर नोंदवून या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याची विनंती करण्यात आली आहे.

दरम्यान, चार वर्षांनंतर संबंधित प्रकरण अचानक का चर्चेत आलं, असा प्रश्न उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या प्रवक्त्याला पडला. यामध्ये कट असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र विधिमंडळाचे सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना हा मुद्दा पुढे आला आहे.

याचिकेत काय म्हटलं आहे?
दिशाच्या वडिलांनी जी याचिका दाखल केली आहे, त्यामध्ये आदित्य ठाकरे यांच्या नावाचा उल्लेख आहे. दिशा सालियनचा बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली आणि त्यानंतर काही प्रभावशाली व्यक्तींना वाचवण्यासाठी राजकीय कट रचण्यात आले… असं याचिकेत म्हटलं आहे. दिशाचे वडील सतीश सालियन यांनी महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि यूबीटी शिवसेना आमदार आदित्य ठाकरे, माजी महापौर किशोरी पेडणेकर आणि इतरांवर गंभीर आरोप केले आहेत. शिवाय प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपावण्यात यावा… अशी मागणी केली आहे.

आदित्य ठाकरे का हैराण?
दिशा सालियन प्रकरण पुन्हा चर्चेत आल्यामुळे आदित्य ठाकरे हैराण झाले आहे. दिशा सालियन हत्या प्रकरणी आदित्य ठाकरे यांचं नाव चर्चेत आहे. यावर खुद्द आदित्य ठाकरे यांनी देखील प्रतिक्रिया दिला आहे. ‘गेल्या 5 वर्षांपासून माझी प्रतिमा मलीन उकरण्याचा प्रयत्न केला जात आहे. जर प्रकरण कोर्टात आहे, तर मी उत्तर देईल… देशाच्या भल्यासाठी माझा लढा सुरूच राहील.’

विधानसभेत पोहोचलं प्रकरण
भाजप नेते अमित साटम यांनी याप्रकरणी सरकारकडे उत्तरं मागितली आणि इतकी वर्षे होऊनही तपासात प्रगती का झाली नाही, असा सवाल केला. त्याचवेळी या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचं गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी सभागृहात सांगितलं. दोषी व्यक्तीच्या विरोधात कठोर कारवाई केली जाईल, मग ती व्यक्ती कोणत्याही पार्टीची असली तरी काही हरकत नाही…

अखेर काय आहे प्रकरण?
दिशा सालियन प्रकरण हे हाय – प्रोफाईल प्रकरण आहे. 8 जून 2020 मध्ये दिशा हिचा मृत्यू झाला. मलाड येथील उच्चभ्रू इमारतीवरून पडल्यामुळे दिशाचा मृत्यू झाला. रिपोर्टनुसार, पोलिसांनी सुरुवातीला दिशाची आत्महत्या ठरवून अपघाती मृत्यूचा अहवाल (ADR) दाखल केला. पण या घटनेनंतर अनेक प्रश्न समोर आले. त्यामुळे प्रकरण अधिक जटिल आणि राजकीयदृष्ट्या संवेदनशील प्रकरण बनलं आहे.

दिशा सालियन तिचा मंगेतर रोहन रायच्या अपार्टमेंटच्या 14व्या मजल्यावरून पडल्याचं सांगण्यात येत आहे. ती तिच्या मैत्रिणी आणि मंगेतरसोबत पार्टी करत असताना ही घटना घडली. आता याप्रकरणी पुढे काय होतंय पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी? अजितदादांची या लोकप्रिय योजनेची मोठी अपडेट! सध्या माहिती गोळा करण्याचं काम सुरू….

0

ज्या कुटुंबातील महिलांचं वार्षिक उत्पन्न हे अडीच लाख रुपयांपेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील महिलांसाठी राज्या सरकारनं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये दर महिन्याला दीड हजार रुपये जमा होतात.

गेल्या वर्षी जुलैपासून या योजनेच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली. आतापर्यंत एकूण 9 हाफ्ते महिलांच्या खात्यामध्ये जमा झाले आहेत. मात्र दुसरीकडे या योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर मोठा ताण पडत असल्याच्या बातम्या देखील समोर आल्या आहेत.

आम्ही पुन्हा सत्तेत आलो तर महिलांना 1500 रुपयांऐवजी 2100 रुपये देऊ अशी घोषणा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी महायुतीच्या नेत्यांकडून करण्यात आली होती. राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं. सरकार स्थापन झालं, मात्र अजूनही 2100 रुपयांबाबत कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाहीये. लाभार्थी महिलांना 2100 रुपये कधीपासून मिळणार? याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये याबाबत काहीतरी घोषणा होऊ शकते असा सगळ्यांचा अंदाज होता. महायुतीच्या मंत्र्यांनी देखील तसे संकेत दिले होते. मात्र अजूनही याबाबत कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाहीये. त्यामुळे लाभार्थी महिलांना आता 2100 रुपये कधीपासून मिळणार असा सवाल उपस्थित केला जात आहे. यावर आता अर्थमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

नेमकं काय म्हणाले अजित पवार?

लाडक्या बहिणीला 2100 रुपये देण्याच आम्ही नाही म्हटलं नाही, आर्थिक परिस्थिती पाहून आम्ही घोषणा करू, सर्व सोंग करता येतात, मात्र पैशांचे सोंग करता येत नाही. ⁠आमची परिस्थिती सुधारली की आम्ही 2100 रुपये देऊ असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. तसेच शेतकरी कर्ज माफी संदर्भात माहिती गोळा करण्याचं काम सुरू आहे, असंही त्यांनी यावेळी म्हटलं.

दरम्यान ऑनलाईन लॉटरी संदर्भात सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करू, दोन्ही बाजूंच्या सदस्यांचा समावेश यामध्ये असेल. अधिवेशन संपायच्या आत मध्ये ही समिती गठीत करण्यात येईल. धान उत्पादक शेतकरी यांना प्रती हेक्टर २० हजार रुपये दोन हेक्टर मर्यादेपर्यंत मदत देण्याचा निर्णय मागच्या कॅबिनेटला घेण्यात आला आहे. शासन निर्णय निघाल्यावर तात्काळ कार्यवाही केली जाईल असंही त्यांनी यावेळी म्हटलं.