Home Blog Page 134

School of Retail (SUAS) Signs MoU with Retailers Association of India (RAI) and Riya Fashion Indore

0

Indore, April 3, 2025 – The Retailers Association of India (RAI) is the national trade body representing the retail sector in India. Symbiosis University of Applied Sciences, along with representatives from the Retailers Association of India (RAI) – Lawrence Fernandes, Director of Retail Learning and Member Relationship, and the founders of Riya Fashion Indore, Rupesh Jain and Jyoti – have signed a Memorandum of Understanding (MoU). This ceremony marks a significant milestone in the School of Retail’s ongoing commitment to collaboration and innovation. The event highlights the shared vision between the two institutions, with the primary goal of contributing meaningfully to the growth of India’s retail industry.

“These agreements aim to create a collaborative framework for education, research, internships, and innovation, bridging the gap between academia and industry. This partnership provides a major platform for the students and faculty of Symbiosis University of Applied Sciences to engage with leading retail organizations. The collaboration will include internship and placement opportunities, development of retail labs, guest sessions, seminars, and more.” – Prof. Vinith Kumar Nair, Vice Chancellor, Symbiosis University of Applied Sciences

hashtag#symbiosis hashtag#symbiosisuniversity hashtag#MoU hashtag#symbiosisindore hashtag#collaboration Dr Arpita Basak Dr A Shridhar Prof.(Dr.)Vinith Kumar Nair

सिंबायोसिसच्या विद्यार्थ्यांनी घेतले ‘वाधवन’ बंदर आणि भारतीय अर्थव्यवस्थेचे धडे

0

वाधवनबंदराचे भारताच्या आर्थिक विकासातील धोरणात्मक महत्त्व

पुणे, एप्रिल २०२५ मागील काही काळात पहिले तर कंटेनर जहाजांचे आकारमान वाढत आहे, ज्यासाठी १८ ते २० मीटर खोल पाणी आवश्यक आहे. भारतातील कोणत्याही बंदरात सर्वात मोठ्या कंटेनर जहाजाला सामावण्यासाठी आवश्यक खोल पाणी नाही.त्या साठी लागणारे  खोल पाणी असलेले बंदर अर्थव्यवस्थेसाठी  फायदेशीर ठरेल आणि लॉजिस्टिक्सचा खर्च कमी करेल. या सर्व समस्यांवर ‘वाधवन’ बंदर एक उपाय म्हणून समोर  येत आहे.

‘वाधवन’ बंदर कसे भारतीय अर्थव्यवस्थेला योगदान देईल या विषयावर एक अत्यंत माहितीपूर्ण उद्योग तज्ञांची व्याख्यान सत्र सिंबायोसिस स्कील्स ॲन्ड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी (एसएसपीयू) मधील बीबीए पोर्ट्स आणि टर्मिनल मॅनेजमेंट विद्यार्थ्यांना दिले गेले.

पाठक यांनी वाधवन पोर्टच्या स्थानिक फायद्यांवर चर्चा केली आणि त्याचे महत्त्व स्पष्ट केले, या बंदराच्या विकासामुळे विद्यमान प्रमुख बंदरे जसे की जेएनपीटी आणि मुंद्रा यावर असलेला ताण कमी होईल, व्यापाराच्या कार्यक्षमतेला चालना मिळेल, निर्यात क्षमता वाढेल, आणि लॉजिस्टिक्स खर्च कमी होईल. तसेच या व्याख्यानात समुद्री क्षेत्रातील करिअर संधींवर चर्चा करण्यात आली, विशेषत: पोर्ट मॅनेजमेंट, लॉजिस्टिक्स, कस्टम्स हँडलिंग आणि आंतरराष्ट्रीय व्यापार या क्षेत्रांमध्ये विद्यार्थ्यांना या वाढत्या उद्योगामध्ये असणाऱ्या संधींची माहिती देण्यात आली.

महाराष्ट्रात केवळ दोन मोठी बंदरे आहेत, ती म्हणजे मुंबई आणि जवाहरलाल नेहरू पोर्ट (JNPA), या बंदरांमध्ये कमी खोली असल्याने त्याठिकाणी फक्त छोटे जहाजे थांबू शकतात. याच कारणामुळे मुंबईच्या उत्तर दिशेच्या अरब महासागरातील वाधवन या ठिकाणी एक नवीन बंदर तयार करणे अत्यंत योग्य आणि अनुकूल ठरले आहे, कारण इथे २० मीटर खोल पाणी नैसर्गिकरित्या उपलब्ध आहे, जे सुमारे ४ ½ नॉटिकल मैलांवर आहे. या स्थानाच्या जवळपास १० किमी अंतरावर राष्ट्रीय रेल्वे ग्रीड आणि ३५-४० किमी अंतरावर एनएच 8 आहे. नैसर्गिकरित्या पूरक ही रचना भारताच्या आर्थिक विकासाला मदत करेल.

“विदयार्थ्यांना जवाहरलाल नेहरू पोर्ट अथॉरिटी (JNPA) कडून होणाऱ्या वाधवन पोर्टच्या बांधकामाची संकल्पना, वाधवन बंदराच्या कार्यक्षमता, वाधवन या स्थानाचे महत्त्व, अरब समुद्रातील खोल जलस्रोत, बंदराची भूमिका, समुद्री क्षेत्रामध्ये नोकरीच्या संधी आणि त्यात उत्कृष्टता साधण्यासाठी लागणारी कौशल्ये याबाबत माहिती मिळाली. या व्याख्यानाने विद्यार्थ्यांना निश्चितपणे मदत होईल.” – आशुतोष झुंजूर, सहाय्यक प्राध्यापक, एसएसपीयू

नामांकित बांधकाम व्यावसायिक ‘बढेकर ग्रुप’ने असंख्य प्रकल्प करून नाते विश्वासाचे दृढ करावे : मंत्री माधुरी मिसाळ

0

पुणे ता.२: कोथरूड परिसरातून प्रवास करताना अनेक ठिकाणी ‘बढेकर ग्रु’पचे बोर्ड लागलेले दिसतात, त्या बोर्डावरची टॅगलाईन ‘नाते विश्वासाचे’ मला खूप आवडली. लोकांमधून मला समजले की, ‘बढेकर ग्रुप’ बांधकाम चांगले व वेळत पूर्ण करतात’, त्यामुळे अशा नामांकित बांधकाम व्यावसायिक कंपनीने असंख्य बांधकाम प्रकल्प साकारावेत,” अशी भावना राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी व्यक्त करून, ‘बढेकर ग्रुप’च्या सहकारनगर येथील प्रकल्प पूर्तीसाठी शुभेच्छा दिल्या. ‘बढेकर ग्रुप’च्या माध्यामातून सहकार नगर येथे पुनर्विकसित होत असलेल्या ‘भावेश’ या गृहप्रकल्पाचे भूमिपूजन अक्षय्य तृतीया’च्या शुभमुहर्तावर बुधवार (ता.३०) करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मंत्री मिसाळ बोलत होत्या. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, माजी नगरसेविका मोनिका मोहोळ, बढेकर ग्रुप’चे संस्थापक अध्यक्ष प्रवीण बढेकर, माजी शिक्षण अधिकारी बजरंग अवारी, सोसायटीचे सभासद आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रवीण बढेकर म्हणाले, ”आमच्या कार्याची दखल घेऊन मंत्री माधुरी मिसाळ यांनी दिलेला विश्वास आमच्यासाठी मोठा सन्मान आहे. ‘नाते विश्वासाचे’ ही टॅगलाईन आमच्या बांधकामाच्या प्रत्येक टप्प्याला मार्गदर्शक ठरते. सहकारनगर सारख्या प्रतिष्ठित भागात ‘भावेश’ गृहप्रकल्पाचे भूमिपूजन अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर झाले, ही आमच्यासाठी शुभ सुरुवात आहे. सोसायटीच्या सभासदांचा विश्वास, प्रशासनाचे पाठबळ, आमच्या कामाला नवी दिशा देतो. दर्जा आणि वेळेचे भान ठेवून प्रकल्प पूर्ण करणे, हे आमचे प्रथम कर्तव्य आहे.”

0

१मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त बाभुळसर बू!ग्रामपंचायत कार्यालय समोर मनोज मचाले संत तुकाराम सोसायटी चेअरमन यांच्या हस्ते ध्वजास श्रीफळ वाढवून तसेच सर्व ज्येष्ठ मंडळी यांच्या हस्ते पूजन करून , ध्वजारोहण सरपंच सौ.दिपाली महेंद्र नागवडे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी प्रमुख उपस्थिती मध्ये बाभुळसर विका सहकारी संस्था चेअरमन भरतभाऊ नागवडे, मा.सरपंच गणेश मचाले, माजी उपसरपंच सुनील देशवंत, ग्रामपंचायत सदस्या मनीषा नागवडे, पोलिस पाटील मीना पाडळे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संतोष नागवडे, महेंद्र नागवडे मा.उपाध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती, रामदास नेते नागवडे, जयवंत नागवडे शिरूर तालुका सरचिटणीस राशप गट, सचिन नागवडे संचालक बाभुळसर वि.का, सोमनाथ नागवडे, नानासो नागवडे, भोसले महाराज, दत्तात्रय वाल्मिक नागवडे चेअरमन कशिमाई दूध संस्था, दिलीप बाप्पू नागवडे, बाळासो थोरात, ग्रामसेवक गायकवाड, अमित नागवडे, कृष्णा पाडळे, शिपाई भंडलकर, मुख्याध्यापक चवधर, कोथिंबीरे सर, प्रतिभा म्हस्के, मीना माने आदी ग्रामस्थ आणि विद्यार्थी उपस्थित होते.

यादिनानिमित्त सर्व ग्रामस्थांनी गावा मध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात आले. सरपंच, ग्रामस्थ आणि शाळा व्यवस्थापन समिती यांच्या वतीने जिल्हा परिषद शाळेमध्ये शासनाचा चावडी वाचन या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांनी चावडी वाचन केले.

वाघ्या कुत्र्याचा पुरावा नाही, संभाजीराजेंनी दाखवले 3 जुने फोटो, हाकेंच्या ‘त्या’ आरोपालाही उत्तर

0

छत्रपती संभाजी हे आज पुरातत्व खात्याच्या महासंचालकांच्या भेटीसाठी गेले होते. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत पुन्हा एकदा आपली भूमिका स्पष्ट केली. “वाघ्या कुत्र्याचं स्मारक हटवावं हे मी मुख्यमंत्र्‍यांना पत्र लिहिलं होतं. आज पुरातत्व खात्याच्या महासंचालकांची भेट घेतली आणि सविस्तर इतिहास सांगितला. पुरातत्व खात्याकडून मिळालेल्या गोष्टी त्यांच्यासमोर मांडल्या.” असं संभाजीराजे म्हणाले. यावेळी त्यांनी काही जुने पुरावे दाखवले आणि त्यांच्यावर झालेल्या आरोपांनाही उत्तर दिलं आणि 31 तारखेचा अल्टीमेटम का दिला याचं कारणही सांगितलं.

अन्यथा ते संरक्षित स्मारक होईल…

संभाजीराजे म्हणाले, पुरातत्व खात्याकडून माहितीच्या अधिकारात मागवलेल्या माहितीमध्ये स्पष्टपणे सांगितलंय की, वाघ्या कुत्र हे संरक्षित स्मारकामध्ये नाही. 1936 ला हे स्मारक बांधलं. जर 2036 पर्यंत ते काढलं नाही, तर 100 वर्ष पूर्ण होतील आणि ते प्रोटेक्टेड मॉन्यूमेंट म्हणून संरक्षित होईल असं संभाजीराजे म्हणाले.

राजसंन्यास नाटकातून वाघ्याची दंतकथा…

संभाजीराजे यांनी पुढे सांगितलं की, वाघ्या कुत्र्‍याच्या समाधीला कुठलाही ऐतिहासिक संदर्भ नाही. महाराजांना अग्नी देत असताना त्यानं उडी मारल्याचीही माहिती नाही असं संभाजीराजे यांनी सांगितलं. यावेळी संभाजीराजेंनी तीन वेगवेगळे फोटो दाखवत तिथे वाघ्या कुत्र्‍याची समाधी नव्हती असं सांगितलं. डाव्या, उजव्या, सेंटरच्या अशा कुठल्याही इतिहासकारांनी याचा उल्लेख केला नाही.  शिवाजी महाराजांकडे कुत्रे असतील. मात्र, छत्रपची संभाजी महाराजांची बदनामी करणाऱ्या राजसंन्यास नाटकातून वाघ्या कुत्र्‍याची दंतकथा निर्माण झाली. शिवरायांच्या समाधीपेक्षा ही समाधी उंच आहे, यावरूनही त्यांनी सवाल उपस्थित केला.

विरोध करणाऱ्यांनी पुरावे दाखवावेत

लक्ष्मण हाके यांनी काही आरोप करत वाघ्या कुत्र्‍याची समाधी काढण्यास विरोध दर्शवला होता. त्यावर संभाजीराजे म्हणाले, जे लोक वाघ्या कुत्र्‍याची समाधी काढण्याला विरोध करत आहेत, त्यांना आणि आम्हाला सरकारने बोलवावं. पुरावे दाखवावे असं संभाजीराजे म्हणाले.

लक्ष्मण हाके यांनी केलेल्या आरोपांवर बोलताना संभाजीराजे म्हणाले, दुर्दैवानं तुकोजीराव होळकर महाराजांचं नाव तिथे प्रोजेक्ट केलं जातंय. त्यांनी या स्मारकासाठी मदत केली असं म्हटलं जातंय. मात्र, मला स्पष्ट करायचं की, मल्हारराव होळकर, यशवंतराव होळकर, अहिल्यादेवी यांनी स्वराज्य स्थापनेसाठी योगदान दिलं. अशावेळी तुकोजीराव महाराज कुत्र्‍याच्या समाधीला मदत कशी करतील? तुम्ही त्यांना बदनाम करत आहात असं संभाजीराजे म्हणाले. छत्रपती घराण्याचे आणि होळकर घराण्याचे जुने संबंध आहेत. तसंच, धनगर बांधवांचं आणि आमचं जवळचं नातं आहे हे सांगत माझा चालक, स्वयंपाकी, अंगरक्षक सगळे धनगर आहे असं संभाजीराजे म्हणाले.

31 मेचा अल्टीमेटम का?

31 मेचा अल्टीमेटम का दिला असाही सवाल उपस्थित होत होता. त्यावर संभाजीराजे म्हणाले, मी 31 मेचा अल्टीमेटम दिलेला नाही. राज्य शासनाचं धोरण आहे. धोरण सांगतंय की 31 मे पर्यंत गडकोटांवरचं अतिक्रमण काढा. त्यामुळे मी विनंती केली की, ज्या वाघ्या कुत्र्‍याचे पुरावे नाही ते सुद्धा 31 मे रोजी काढून टाका अशी भूमिका मांडली.

फडणवीसांनी प्रशांत परिचारकांच्या निष्ठेची केली कदर; दुःखाच्या प्रसंगात दिला मोठा आधार!

0

विधीमंडळाचे अधिवेशन संपताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (ता.29 मार्च) देवदर्शन केले. सकाळी तुळजा भवानीचे, तर दुपारी विठ्ठल-रुक्मिणी आणि त्यानंतर नीरा नरसिंहपूर येथील कुलदैवत असलेल्या लक्ष्मी नृसिंहाचे दर्शन केले. त्यांनी तीर्थक्षेत्र विकास आराखड आणि पंढरपूर कॉरिडॉर कामाचा आढावाही घेतला. या धावपळीत त्यांनी भारतीय जनता पक्षाचे निष्ठावंत माजी आमदार प्रशांत परिचारक यांची घरी जाऊन आवर्जून भेट घेतली आणि दुःखाच्या प्रसंगातही सोबत असल्याचे सांगून मोठा आधार दिला.

देवेंद्र फडणवीस हे पंढरपूरच्या दौऱ्यावर आले होते, त्यावेळी त्यांनी माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या घरी जाऊन त्यांची सांत्वनपर भेट घेतली. परिचारक यांचे वडिल प्रभाकर परिचारक यांचे महिनाभरापूर्वी निधन झाले. मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशन असल्यामुळे फडणवीसांना पंढरपूरला येत आले नव्हते. मात्र, अधिवेशन संपताच फडणवीस पंढरपूर दौऱ्यावर आले आणि त्यांनी परिचारक यांचे घरी जाऊन सांत्वन केले.

वडिलांच्या निधानामुळे प्रशांत परिचारक यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या दुःखद प्रसंगात कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे राहणे हे एका नेत्याचे कर्तव्य असते, हे लक्षात घेऊन फडणवीसांनी प्रशांत परिचारक यांना खंबीर आधार दिला. यावेळी दोघांमध्ये काही काळ चर्चाही झाली.

प्रशांत परिचारक हे २०२१ च्या पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीत भाजपच्या उमेदवाराचे प्रबळ दावेदार होते. मात्र, महाविकास आघाडी सरकार उलथवून टाकण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूरचे पोटनिवडणूक जिंकण्याचा चंग बांधला होता. मात्र, भाजपकडून माजी आमदार परिचारक यांच्याबरोबरच समाधान आवताडेही इच्छूक होते. फडणवीस यांनी परिचारक यांची समजून घालून आवताडेंना उमेदवारी दिली होती आणि विशेष म्हणजे राष्ट्रवादीची निर्णायक ताकद असूनही समाधान आतवाडेंना निवडून आणण्यात परिचारक यांनी मोठी भूमिका निभावली होती.

पोटनिवडणुकीनंतर परिचारक यांना विधान परिषदेवर संधी देण्यात येईल, असे सांगितले जात होते. मात्र, संधी असूनही परिचारक यांना पक्षाकडून न्याय मिळू शकला नाही. त्यानंतर आलेल्या लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्षाकडून त्यांना ऑफर होती. मात्र, भाजपवर असलेली निष्ठा परिचारक यांनी ढळू दिली नाही. विरोधी पक्षाचे ऑफर नाकारून त्यांनी माढ्यातील भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासाठी प्रयत्न केले.

लोकसभा निवडणुकीत उमेदवारीत डावलण्यात आल्यामुळे नाराज झालेल्या मोहिते पाटलांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न प्रशांत परिचारक यांनी केला होता. तसेच, विधान सभेच्या निवडणुकीवेळी परिचारक यांनी पंढरपूरमधून निवडणूक लढविण्याची तयारी केली होती. मात्र, तत्कालीन समीकरणे लक्षात घेऊन भाजपकडून समाधान आवताडेंनाच पुन्हा उमेदवारी देण्यात आली. या वेळी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीडून परिचारक यांना ऑफर होती. पण त्यावेळी त्यांनी भाजपवर निष्ठा राखली.

विधानसभेची निवडणुकीवेळी परिचारक यांची समजूत काढण्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे पंढरपुरात परिचारक वाड्यावर आले होते. त्या वेळी परिचारक हे लवकरच विधीमंडळात दिसतील, असा शब्द त्यांनी जाहीरपणे दिला होता. नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत परिचारक यांना संधी मिळेल, असे वाटत असतानाच विदर्भ आणि मराठवाड्यातील नेत्यांना संधी देण्यात आली, त्यामुळे परिचारक यांच्याकडे पुन्हा दुर्लक्ष करण्यात आले. मात्र फडणवीस यांनी आज परिचारक यांचे घरी जाऊन सांत्वन करत आपण परिचारक यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे दाखवून दिले आहे.

पंढरपुर काॅरिडाॅरचे काम पुढील तीन महिन्यांत सुरू होणार; देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

0

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पंढरपूरच्या दौऱ्यावर आले होते. श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतल्यानंतर फडणवीस यांनी पालकमंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन पंढरपूर कॉरिडॉरचा आराखडा पाहिला, त्यानंतर माध्यमांशी बोलताना फडणवीसांनी कॉरिडॉरबाबत मोठी घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ असलेल्या उज्जैन काशी विश्वेश्वरच्या धर्तीवर ‘पंढरपूर कॉरिडॉर’ला येत्या तीन महिन्यांत कामाला सुरुवात होणार आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

पंढरपूरच्या दौऱ्यावर आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (ता. 29 मार्च) श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले. त्यानंतर विभागीय आयुक्त, पालकमंत्री, जिल्हाधिकारी आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन त्यांनी तयार केलेला आराखडा पाहिला. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी पंढरपूर कॉरिडॉरबाबत भाष्य केले.

पंढरपूर कॉरिडॉरच्या आराखड्याला हिरवा कंदील दाखवलेला आहे. आत्तापर्यंत कोणत्याही प्रकल्पग्रस्तांना मोबदला दिलेला नाही, त्याच्यापेक्षा जास्त मोबदला पंढरपूरमधल्या कॉरिडॉरबाधितांना देण्यात येईल, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

पंढरपूर कॉरिडॉरसाठी काही व्यावसायिक जागा, मालमत्ता, काही घरे ताब्यात घ्यावी लागणार आहेत, त्या लोकांचेसुद्धा योग्य पद्धतीने पुनर्वसन केलं जाईल त्यांना चांगला मोबदला दिला जाईल. कॉरिडॉरबाबतची काही कामे आषाढी यात्रेपूर्वी सुरू होतील आणि आषाढीच्या नंतर यामधील काही कामे सुरू होतील, अशी माहितीही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.

रायगड किल्ल्यावरील वाघ्या कुत्र्याचा पुतळा हटविण्यावरून मुख्यमंत्री फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली आहे. प्रत्येक गोष्टीत वाद करण्याची गरज नाही. धनगर आणि मराठा असा वाद करणे, योग्य नाही. संभाजीराजे छत्रपती जर म्हणत असतील मी त्यांना वेळ देत नाही, तर त्यांच्या भूमिकेवर त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे त्यांना मी फोनवर बोलतो आणि तसेच मी प्रत्यक्ष भेटत असतो.

कर्जमाफीबाबत अजितदादांनी घेतलेली भूमिका योग्य आहे, तीच सरकारची भूमिका आहे. त्यांनी कधीही शक्य नाही, असे बोलले नाहीत, असे म्हणत अजित पवारांच्या भूमिकेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाठराखण केली.

गुढीपाडवा नवे संकल्प करून वाटचाल करण्याचा दिवस; गुढीपाडवा साजरा करण्यामागे ‘या’ अनेक कथा, माहित असायलाच हव्या

0

भारतीय संस्कृतीत ‘चैत्र शुद्ध प्रतिपदा’ हा दिवस ‘महापर्व’ म्हणून साजरा करण्याची परंपरा आहे. महापर्वाच्या अर्थात नववर्षाच्या या पहिल्या दिवशी नवे संकल्प करून प्रगतीकडे वाटचाल सुरू करण्याचा हा दिवस आपण ‘गुढीपाडवा’  म्हणून साजरा करतो. या दिवशी विजयाचे प्रतिक म्हणून घराच्या अंगणात गुढी उभारली जाते. ही गुढी का उभारली जाते? गुढीपाडवा चैत्र शुद्ध प्रतिपदेलाच का साजरा करतात? गुढी उभारण्यापूर्वी ब्रम्हदेवाची पूजा का केली जाते व गुढी उभारून झाल्यावर विष्णू देवाची पूजा करतात? सर्वकाही दडलंय या कथांमध्ये, तेव्हा या पौराणिक कथा सर्वांना माहित असायलाच हव्यात.

शालिवाहन शकास सुरुवात

शालिवाहन ह्या राजाने शालिवाहन शकास सुरुवात केली आणि या शकाची सुरुवात अर्थात आरंभ म्हणजेच गुढीपाडवा होय. शक सुरु करणारा पहिला महाराष्ट्रीयन राजा म्हणून आजही शालिवाहन राजाचे महत्त्व आहे. शालिवाहनाने मातीचे सैन्य तयार केले, त्यावर पाणी शिंपडून मातीच्या सैन्यात प्राण भरला. मग या सैन्यांच्या मदतीने त्याने प्रभावी शत्रूंचा पराभव केला, अशी आख्यायिका आहे. या विजयाप्रित्यर्थ शालिवाहन शके सुरु होऊन नवीन वर्षाची सुरुवात होते. या दिवशी पंचाग वाचन करून आणि देवी सरस्वतीचे पूजन करून हिंदू नववर्षाचे स्वागत करण्याची प्रथा आहे.

हे एक कारण महाभारतामध्ये सापडते

गुढीपाडवा साजरा करण्याचे एक कारण महाभारतामध्ये सुद्धा सापडते. यानुसार महाभारतातील आदिपर्वामध्ये उपरीचर नामक राजाने इंद्रामार्फत त्याला मिळालेली कळकाची काठी इंद्राला नमन म्हणून जमिनीमध्ये रोवली आणि दुसऱ्या दिवशी त्या काठीची पूजा केली. हा दिवस होता नवीन वर्षाचा पहिला दिवस, म्हणून गुढीपाडवा साजरा करतात अशी आख्यायिका सुद्धा आहे.

ब्रम्हदेवाने केली विश्वनिर्मिती

ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली तो हाच पवित्र दिवस. ब्रम्हदेवाने विश्वनिर्मिती केली ती पाडव्याच्या दिवशीच आणि पुढे “सत्य-युगाची” सुरुवात झाली आणि म्हणुनच नुतन वर्षारंभ म्हणुन चैत्र शुक्ल प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा साजरा केला जातो  असे म्हणतात. या दिवशी विश्वातिल तेज तत्व आणि प्रजापती लहरी या मोठ्या प्रमाणात उत्सर्जीत होतात आणि गुढीच्या माध्यमाने आपण त्या अधिकाधीक संचित करायचा प्रयत्न करतो.

मत्स्यरूपी विष्णूंचा जन्म

भगवान विष्णूंनी मत्स्य रूप धारण करून शंकासुराचा वध केला, त्या मत्स्यरूपी विष्णूंचा जन्म चैत्र-शुद्ध प्रतिपदेचाच. शंखासुर नावाचा सागरापासून उत्पन्न झालेला आणि सदैव सागरातच वास्तव्य करणारा बलाढ्य राक्षस होता. या राक्षसाने जबरदस्तीने वेदहरण केले व तो सागराच्या तळाशी दडी मारून बसला. मग देवदेवता, ऋषीमुनींनी क्षीरसागरामध्ये योगनिद्रेत असलेल्या भगवान विष्णूंना जागृत केले आणि शंखासुरास धडा शिकवण्याकरिता सांगितले. भगवान विष्णूंनी मत्स्यरूप धारण करून शंखासुराचा ठावठिकाणा शोधून काढला व त्याचा शिरच्छेद करणार इतक्यात शंखासुर म्हणाला की, भगवान आपल्या हातून मज मरण यावे याकरिताच मी वेद पळविले. आपण माझा वध अवश्य करावा; परंतु माझी एक इच्छा अशी की माझे कलेवर तुम्ही नेहमी आपल्या डाव्या हातात धारण करावे तसेच माझ्या कलेवराच्या स्पर्शाच्या जलाने आपणांस स्नान केल्याखेरीज आपली पूजा पूर्ण होणार नाही असा मला वर द्यावा.’’ भगवान विष्णूंनी ‘तथास्तु’ म्हटले आणि शंखासुराचा वध केला. त्या दिवसापासून विष्णूने हातात शंखास धारण केले.

गुढी विजयध्वजाचे प्रतिक

गुढी म्हणजे फक्त ब्रम्हध्वजच नाहि तर तो विजयध्वज देखिल आहे. जेव्हा “श्री राम” लंकेवर विजय मिळवुन अयोध्येला परतले तेव्हा प्रजेने त्यांचे स्वागत ध्वज उभारुन मोठ्या आनंदाने केले. चैत्र शुध्द प्रतिपदेच्याच दिवशी प्रभू रामांचा चौदा वर्षांचा वनवास संपला होता, म्हणून हा आनंदोत्सवाचा दिवस साजरा करतात असे सांगितले जाते.

तसेच, असे ही सांगितले जाते की, चैत्र शुद्ध प्रतिपदेला प्रभू रामाने वालीचा वध करून त्याच्या छळातून प्रजेला मुक्त केले; तो हा विजयोत्सवाचा दिवस. घरातून वालीचा, आसुरी शक्तींचा रामाने दैवी शक्तीने नाश केला याचे गुढी ही सूचक आहे

रामराजेंचा रणजितसिंहांना धोबीपछाड अखेर करून दाखवलंच!; कोर्टातून ‘श्रीराम’वरचा प्रशासक हटवला

0

फलटणच्या श्रीराम सहकारी साखर कारखान्यावरील प्रशासकाची नियुक्ती मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केली आहे. भाजपचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. विधान परिषदेचे माजी सभापती आणि आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांनी यातून रणजितसिह यांना पुन्हा एकदा धोबीपछाड दिल्याची चर्चा आहे. हायकोर्टाच्या निकालामुळे राजे गटात सध्या आनंदाचे वातावरण आहे. श्रीराम कारखाना 20 वर्षाहून अधिक काळ रामराजे नाईक निंबाळकर यांच्या ताब्यात आहे. कारखान्याची निवडणूक जवळ आली आहे. अशातच श्रीराम कारखान्याबाबत माजी सनदी अधिकारी विश्वासराव भोसले यांनी उच्च न्यायालयात मतदार यादीबाबत याचिका दाखल केली होती. या याचिकेतील हरकतीचे गांभीर्य लक्षात घेऊन कारखान्याची निवडणूक सहकार मंत्रालयाने पुढे ढकलली होती.

श्रीराम कारखान्याने सादर केलेल्या मतदार याद्यांचे प्रारूप हे सहकार कायदा व उपविधीप्रमाणे तयार न करता निवडणूक अधिकारी यांना सादर केले आहे. त्यावर हरकती घेऊनही या मतदार याद्या दुरुस्त न करता सदोष मतदार याद्या केल्याने ही निवडणूक कायदेशीर व पारदर्शी होणार नाही. त्यामुळे प्रशासक नियुक्त करण्याची मागणी केली रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केली होती.

याबाबत योग्य तो निर्णय घेण्याबाबत शासनाने साखर प्रादेशिक सहसंचालकांना आदेश दिले होते. त्यानुसार, सर्व परिस्थितीचा अभ्यास करून, कारखान्याच्या संचालक मंडळाची मुदत संपली आहे. कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीच्या मतदार यादीबाबत तक्रार आहे.

याबाबत याचिकाही दाखल झाली आहे. अशा परिस्थितीत भविष्यात होणारी निवडणूक ही निःपक्ष व पारदर्शक पद्धतीने होण्यासाठी श्रीराम कारखान्यावर प्रशासकाची नियुक्ती गरजेची आहे, असे निरीक्षण नोंदवले होते.

त्यानंतर प्रशासक म्हणून फलटणच्या प्रांताधिकारी प्रियांका आंबेकर यांची नियुक्ती करण्यात आली होती. तसा त्यांनी कार्यभारही स्वीकारला होता. पण सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात श्रीराम साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉ. बाळासाहेब शेंडे यांनी उच्च न्यायालयात धाव घेऊन अपील दाखल दाखल केले होते. चुकीच्या पद्धतीने प्रशासक नेमल्याचे उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.

उच्च न्यायालयाने निकाल देताना कारखाना संचालक मंडळाची बाजू योग्य असल्याने सांगितले. तसेच राज्य सरकारने नेमलेला प्रशासक उच्च न्यायालयाने हटविला आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे राजे गटामध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. आता प्रशासक नियुक्ती रद्द केल्याने आता कारखान्याच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे.

‘सुग्रीव कराडच्या सांगण्यावरूनच सुदर्शन घुलेला मारहाण’, कोण आहे हा सुग्रीव कराड? या दांपत्याला ताब्यात घेण्यास SIT लाही केली मदत

0

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणांमध्ये आता आणखी एक नाव समोर आलं आहे. आरोपी महेश केदार आणि जयराम चाटे यांच्या जबाबातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. जयराम चाटे आणि महेश केदार यांनी जो कबुली जबाब दिला आहे त्यामध्ये मस्साजोग गावचे सुग्रीव कराड यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला आहे. फरार कृष्णा आंधळेने सुदर्शन घुलेच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी संतोष देशमुखला धडा शिकवायचा आहे. असे आम्हाला सांगितल्याचं जयराम चाटे आणि महेश केदार याने आपल्या जबाबात सांगितलं आहे.

जयराम चाटे आणि महेश केदार यांचा जबाबात सुग्रीव कराड हे नाव कुठून आलं समोर? 

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी नवनवीन आणि धक्कादायक खुलासे हे सातत्याने होत आहे. आता याचप्रकरणी मस्साजोग गावतील सुग्रीव कराड या व्यक्तीचं नाव हे जयराम चाटे आणि महेश केदार यांच्या जबाबातून समोर आलं आहे. या दोन्ही आरोपींचा नेमका जबाब काय आहे हे आपण जाणून घेऊया….

जयराम चाटे आणि महेश केदार यांनी जो कबुली जबाब दिला आहे त्यामध्ये मस्साजोग गावचे सुग्रीव कराड यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला आहे. जबाबानुसार, ‘सुदर्शन घुलेला सुग्रीव कराडच्या सांगण्यावरून सरपंच संतोष देशमुख आणि मस्साजोगच्या ग्रामस्थांनी मारहाण केली होती. त्यावरून घुले आणि वाल्मिक अण्णाची बदनामी झाली आहे त्याचा आपल्याला बदला घ्यायचाय. असं कृष्णा आंधळेने आम्हाला सांगितलं होतं.’

जयराम चाटे आणि महेश केदार यांनी दिलेल्या जबाबात खंडणीचा मात्र कुठेही उल्लेख नाही. तर सुदर्शन घुलेच्या अपमानाचा बदला घेण्यासाठीच म्हणून संतोष देशमुखांना मारहाण करण्यात आली असं त्यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय घडलं होतं?

6 डिसेंबर रोजी आवादा कंपनी परिसरात सुदर्शन घुले आणि त्याच्या टोळीने तेथील सुरक्षा रक्षकाला मारहाण केली होती. यावेळी ही माहिती जेव्हा संतोष देशमुखांना समजली तेव्हा ते तात्काळ घटनास्थळी गेले. त्यानंतर संतोष देशमुख यांनी त्या ठिकाणी येऊन काम करणाऱ्या लोकांना मारहाण करू नका, लोकांना रोजगार मिळू द्या. असं घुले आणि त्यांच्या टोळीतील इतरांना सांगितलं. पण यावरून संतोष देशमुख आणि आरोपी सुदर्शन घुलेमध्ये जोरदार वाद झाला.

पण याच वादानंतर आपला अपमान झाला असा राग मनात धरून संतोष देशमुख यांचा बदला घेण्यासाठी सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून सुदर्शन घुलेने त्याच्या साथीदारांसह देशमुखांची क्रूर हत्या केली. मात्र आता कबुली जबाबात सुग्रीव कराड हे नाव समोर आलं आहे.

कोण आहे सुग्रीव कराड?

सुग्रीव कराड हा मूळचा केजचा रहिवासी आहे. तो एक स्थानिक पातळीवर राजकारणात सक्रीय असलेल्या कुटुबांतून आलेला आहे. त्याची आई ही केजच्या पंचायत समितीची सदस्य होती. तर त्याची पत्नी देखील नगरसेविका होती. सुग्रीव कराड हा वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंसाठी स्थानिक राजकारणासाठी काम करत असल्याचंही बोललं जातं. तसंच तो खासदार बजरंग सोनावणेंचे विरोधकही आहे.

केज नगरपरिषद निवडणुकीत बजरंग सोनवणेंच्या मुलीविरोधात त्याच्या पत्नीने निवडणूक देखील लढवली होती. ज्यामध्ये सुग्रीव कराडची पत्नीने विजयही मिळवला होता.

दरम्यान, आता अशीही माहिती समोर येत आहे की, आरोपींना पकडून देण्यासाठी सुग्रीव कराडनं SIT ला मदत केल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे. संभाजी वायबसे आणि पत्नीला ताब्यात घेतल्यास अधिक माहिती मिळेल अशी माहिती सुग्रीव कराडनं SIT ला  दिल्याचंही सूत्रांनी सांगितलंय.