Home Blog Page 109

श्री रामेश्वर पॅनलचा बहुमतानेच विजय होणार; भाग भांडवलदार कर्जदार ठेवीदारांच्या विश्वासावर संचालकांचा ठाम विश्वास

0

सन 1992 साली स्थापन झालेल्या श्री रामेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेच्या 32 वर्षातील पारदर्शक कारभार, संस्थेची आर्थिक स्थिती, सधन परिवारातील सर्व संचालक मंडळ, कर्ज वितरणातील नियमितता, संचालक कर्मचारी वर्गाची सौहार्दपूर्ण वर्तणूक आदी बाबींवर संस्थेचे सभासद विशेष खुष असून रामेश्वर पॅनल प्रचंड बहुमताने निवडून येण्यास कोणतीही अडचण नसल्याचे संस्थापक बाळासाहेब हगवणे यांनी सांगितले. 27000 भाग भांडवलावरून 32 वर्षे पूर्वी स्थापन झालेली संस्थेची आजपर्यंत उलाढाल ६५ कोटी करण्यामध्ये विद्यमान पॅनल मधील सर्व संचालक उमेदवारांचा पहिल्या दिवसापासून संस्थेच्या जड-घडणीत मोलाचा वाटा आहे.

खडकवासला परिसरामध्ये सर्वसामान्य गरजूवंतांच्या मदतीला श्री रामेश्वर नागरी सहकारी पतसंस्था कायमच धावत आली आहे. 32 वर्षापासून योग्य स्थानिक माणसाच्या हातात पतसंस्थेचा कारभार राहिल्याने भागभांडवलामध्ये प्रचंड वाढ झाली आहे. मुळात कोणताही व्यक्तिगत हेतू मनात न धरता गेली तीस वर्षे या संस्थेचा कारभार सुरू असल्याने कर्जदार व सभासद यांनाही या गोष्टीचा अभिमान कायमच वाटत होता. मुळात प्रतिष्ठित लोकांची या संस्थेच्या पदाधिकारी म्हणून वर्णी लागल्यापासून संचालकांच्या हितसंबंधातून श्री रामेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेवरती स्थानिकांचा प्रचंड विश्वास आजही आहे. कोणाच्याही व्यक्तिगत स्वार्थ हेतुला खतपाणी न घालण्याची भूमिका घेतल्यानेच नाराज गटाने आज पतसंस्थेवर मतदान घेऊन संचालक मंडळ निवडण्याची वेळ आली असली तरी सुद्धा निर्मळ निस्वार्थ हेतू असणाऱ्या श्री रामेश्वर पॅनललाच मतदार कायम पसंती देतील अशी ग्वाही संस्थापक बाळासाहेब हगवणे यांनी यावेळी दिली.

श्री रामेश्वर नागरी सहकारी पतसंस्था आजची स्थिती एकूण- व्यवसाय ५७ कोटी

  • ठेवी ३३ कोटी (पुणे जिल्हा कार्यक्षेत्र)
  • दरवर्षी लाभांश वाटप
  •  कर्ज वाटप २४ कोटी
  • सभासदांच्या सुरक्षित ठेवी २० कोटी
  • ठे्वींवर आकर्षक व्याजदर
  • ९0% पर्यत कर्ज तारण व्यवस्था
  • फिरते भांडवल ५३ कोटी
  • सुवनिधी १२ कोटी
  • एनपीए ५%

संस्थेच्या पुढील वाटचालीमध्ये सभासदांना आर्थिक साक्षर करण्यासाठी प्रशिक्षण व्यवस्था उभी करणे, पतसंस्थेची उलाढाल आगामी काळात २०० कोटी पर्यत करणे आणि एनपीए दर ०% करण्याचे ध्येय असून नवीन व्यवसाय सुरू करणाऱ्या उद्योजक तरूणांना व्यवसाय उभारणी व विकासासाठी सुलभ कर्ज योजना राबविणे, नवीन आकर्षक व्याजदराच्या थेट योजना कार्यान्वित करणे, सभासदांना व्यक्तिगत विमा संरक्षण लाभ देण्याच्या योजना तयार करणे यासाठी श्री रामेश्वर पॅनल बांधील राहील. येत्या 27 तारखेला सभासद मतदारांचे विश्वासावर श्री रामेश्वर पॅनल कपबशी चिन्हावर शिक्के मारून प्रचंड बहुमताने निवडून द्यावे असे आवाहन विकास दांगट पाटील, बाळासाहेब घुले, देविदास लगड, विकास मते संचालकांनी केले आहे.

100 कोटी पर्यंतचा पसारा असलेली बँक ही योग्य व्यक्तीच्या हातात राहणे गरजेचे असल्याने श्री रामेश्वर पॅनल हीच सभासदांची पहिली पसंती असल्याने मतदारांची भेटीगाठी बैठकांच्या दरम्यान जाणून येत असल्याचे उमेदवार राजेंद्र हगवणे, सचिन दांगट, अभिजीत घुले यांनी सांगितले. श्री रामेश्वर पतसंस्थेची ज्या जयप्रकाश नगर येथे स्थापना झाली तेथील सभासद सुद्धा ठामपणे श्री रामेश्वर पॅनलच्या मागे उभे राहणार आहेत असे बिनविरोध निवडून आलेले विकास कोल्हे, नागेश शिंदे यांनी सांगितले.

विरोधी पॅनलला 13 उमेदवार देखील मिळाले नाहीत. स्वहिताच्या मागण्या पूर्ण न झाल्याने विरोधास विरोध म्हणून त्यांनी पॅनल उभा केला. तो सुद्धा 13 पैकी 7 जागांवर उमेदवार ताकद नसलेले, स्थानिक नसलेले, अनेक अनेक वर्षांचा संस्थेचा संस्थेची काडीमात्र संबंध नसलेले उमेदवार आहेत. श्री रामेश्वर पॅनलचे 4 उमेदवार बिनविरोध निवडून येणे ही संचालकांच्या कामाची पावती असल्याचे वीनाताई मते, मनीषा मोरे यांनी विश्वासाने बोलून दाखवले.

हल्ल्याच्या 2 तासांनंतर काश्मीरच्या मशिदींमधून मोठी घोषणा, पाकिस्तानपर्यंत पोहोचेल आवाज

0

मंगळवारी जम्मू आणि काश्मीरमध्ये पुन्हा एकदा मोठा दहशतवादी हल्ला झाला. पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांना लक्ष्य केलं. या हल्ल्यात सुमारे 27 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी आहेत. त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहे. हल्ल्यानंतर अनेक मुद्दे समोर येत आहेत. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे जम्मू आणि काश्मीरमधील नागरिकांना देखील मोठा धक्का बसला आहे. सध्या पहलगाममध्ये तणावग्रस्त परिस्थिती आहे. दरम्यान, काश्मीरच्या मशिदींमधून घोषणा देण्यात आल्याची माहिती देखील समोर येता आहे.

काश्मीरच्या मशिदींमधून दहशवाद्यांनी घडवून आणलेल्या हल्ल्याचा निषेध करण्यात आला. अशा लोकांवर कारवाई करण्याचे आवाहन देखील सरकारला करण्यात आलं आहे. काश्मीरमध्ये झालेल्या बदलांमुळे कश्मिरी नागरिकांनी देखील हल्ल्याचा निषेध केला आहे. काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचे समर्थक दिसत नाहीत. पहलगाम हल्ल्यानंतर तिथल्या लोकांनी कँडल मार्च काढला तक अनेक ठिकाणी बंद पुकारण्याचा आला आहे. त्याचे पडसाद निश्चितच पाकिस्तानपर्यंत पोहोचतील.

हल्ल्याच्या दोन तासांनंतर, काश्मीरच्या मशिदींमधून एक ऐतिहासिक घोषणा करण्यात आली. पहलगाम हल्ला इस्लाम आणि मानवतेच्या विरोधात असल्याचे म्हटलं गेलं. दहशतवादाला कोणताही धर्म नसतो आणि हा हल्ला काश्मीरची शांतता आणि एकता नष्ट करण्याचा कट आहे.

काश्मीर हे आमचं घर आहे आणि आम्ही ते दहशतवाद्यांच्या हाती जाऊ देणार नाही… अशी देखीर घोषणा काश्मीरच्या मशिदींमध्ये करण्यात आली . काश्मीरच्या धार्मगुरुंनी सरकारकडे दहशतवाद्यांचा खात्मा करण्याची मागणी केली. ते म्हणाले, असे भ्याड हल्ले करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी…

किश्तवाडमधील मशिदीतून करण्यात आलेली घोषणा
किश्तवाडमधील मशिदीतून सांगण्यात आलं की, पहलगाममध्ये घडलेली घटना हृदयद्रावक आहे. हल्ल्यात अनेक निष्पापांचे जीव गेले, दहशतवादाच्या नावाखाली लोक मारले गेले, संपूर्ण इस्लामी समुदाय याचा तीव्र निषेध करतो आणि सरकारकडून चौकशीची मागणी करतो. जो कोणी गुन्हेगार आहे त्याच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे. या हल्ल्याच्या निषेधार्थ बुधवारी किश्तवाड बंद राहिल…

लोकांनी मेणबत्त्या पेटवल्या आणि काढला कँडल मार्च
जम्मू आणि काश्मीरमधील बारामुल्ला येथे पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या विरोधात स्थानिक लोकांनी कँडल मार्च काढून निषेध केला. दरम्यान, श्रीनगरमध्ये स्थानिक लोकांनी मेणबत्त्या पेटवून निषेध केला. काश्मीरचा लाल चौक, जो पूर्वी गर्दीने गजबजलेला असायचा, तो हल्ल्यानंतर रिकामा दिसत होता.

मंगळवारी झालेल्या हल्ल्यात अनेकांना अपले प्राण गमवावे लागले आहेत. अनंतनाग, पहलगाम, कुपवाडा, बारामुल्ला, बांदीपोरा, पुलवामा, बडगाम, शोपियान, श्रीनगर येथे मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी कँडल मार्च काढण्यात आला.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया

0

जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला तर 20 जण जखमी झाले. या घटनेच्या काही तासांतच पाकिस्तानने त्यावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. “या घटनेशी आमचा काहीही संबंध नाही. आम्ही सर्व प्रकारच्या दहशतवादाला नकार देतो”, असं पाकिस्तानने स्पष्ट केलंय. पहलगाममधील दहशवादी हल्ल्याशी पाकिस्तानचा कोणताही संबंध नाही, असं पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले. इतकंच नव्हे तर “हा हल्ला भारतातील केंद्र सरकारच्या विरोधात होता. मणिपूर, नागालँडपासून काश्मीरपर्यंत अशांतता असून या हल्ल्याला देशातील परिस्थितीच जबाबदार आहे”, अशी टीका त्यांनी केली.

“भारतातील केंद्र सरकारला नागालँड, मणिपूर, काश्मीर आणि छत्तीसगडसह अनेक राज्यांमध्ये निषेधांचा सामना करावा लागतोय. सरकार अनेकांचं शोषण करत असल्याने याला देशातील परिस्थिती जबाबदार आहे. आम्ही कोणत्याही स्वरुपात दहशतवादाचं समर्थन करत नाही. स्थानिक लोक दहशतवाद्यांचे लक्ष्य असू नयेत. आमच्या या भूमिकेबद्दल आम्हाला कोणतीच शंका नाही. परंतु जर स्थानिक पातळीवर भारत सरकारला लक्ष्य करत असतील तर पाकिस्तानला लक्ष्य करणं सोपं होतं”, असंदेखील आसिफ म्हणाले. यावेळी पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांबद्दल शोकसंवेदना व्यक्त केल्या.

‘इंडिया टुडे’नं दिलेल्या वृत्तानुसार, पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबाचा (LeT) वरिष्ठ कमांडर सैफुल्लाह कसुरी ऊर्फ खालिद हा पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार असल्याचं गुप्तचर यंत्रणांनी म्हटलंय. सैफुल्लाह खालिद हा पाकिस्तानातील गुजरानवाला शहरातून काम करत असल्याची सूत्रांची माहिती आहे. पाकव्याप्त काश्मीरमधील इतर दोन कार्यकर्त्यांनीही या हल्ल्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याचं समजतंय.

काश्मीरमधील हा गेल्या सहा वर्षांतील सर्वांत मोठा दहशतवादी हल्ला होता. यावेळी दहशतवाद्यांनी पहिल्यांदाच पर्यटकांना लक्ष्य केलं. पहलगाममधील ‘मिनी स्वित्झर्लंड’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बैसरन भागात मंगळवारी अतिरेक्यांनी पर्यटकांवर गोळीबार केला. बैसरन खोऱ्यात टेकडीवरून खाली उतरून दहशतवाद्यांनी पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केला. 40 पर्यटकांना घेरून त्यांना लक्ष्य केलं. तिथं जाण्यासाठी अरुंद वाट असल्याने पर्यटकांना आडोशाला जाण्याची संधी मिळाली नाही.

हातात AK-47, पेहेलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांचा पहिला फोटो समोर

0

जम्मू-काश्मीरमधील पेहेलगाम येथे मंगळवारी दुपारी भीषण दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. पेहेलगाम येथे दहशतवादी हल्ला करणाऱ्या एका अतिरेक्याचा फोटो समोर आला आहे. घटनास्थळावरचा हा फोटो आहे. या दहशतवाद्याच्या हातात बंदूक दिसत आहे. फोटोमध्ये दहशतवाद्याचा चेहरा दिसत नाहीय. पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवाद्यांच्या शोधसाठी सर्च ऑपरेशन सुरु आहे. NIA ची टीम श्रीनगमरध्ये पोहोचली आहे. फॉरेन्सिक टीम सुद्धा दाखल झाली आहे. आर्मी, सीआरपीएफ, एसओजी, जम्मू पोलिसांनी संपूर्ण परिसराला घेराव घातला आहे. हेलिकॉप्टर आणि ड्रोनच्या सहाय्याने दहशतवाद्यांचा शोध सुरु आहे. सीआरपीएफ आणि जम्मू-काश्मीर पोलीस मुगल रोडवर तैनात आहेत. दरम्यान सुरक्षा यंत्रणांकडून पेहेलगाम हल्ल्यातील तीन दहशतवाद्यांच स्केच जारी करण्यात आलं आहे.

पहलगाममध्ये सुरक्षा पथकांच ऑपरेशन संपल्यानंतर एनआयएची टीम लोकेशवर पोहोचली आहे. पेहेलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या पर्यटकांचे मृतदेह पहलगाम हॉस्पिटलमधून श्रीनगरला पाठवण्यात आले आहेत. पहलगामच्या बैसारन खोऱ्यात हा हल्ला झाला. यात लोकांना निवडून-निवडून लक्ष्य करण्यात आलं.

भारतात दाखल होताच विमानतळावर घेतली बैठक

या हल्ल्याची बातमी समजल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसीय सौदी अरेबिया दौरा अर्ध्यावर सोडून मायदेशी परतले. दिल्ली विमानतळावर आज सकाळी उतरताच त्यांनी एअरपोर्टवर एक बैठक घेतली. या बैठकीला NSA अजित डोवाल, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर उपस्थित होते.

अमित शाह-राहुल गांधींमध्ये चर्चा

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह काल रात्रीच श्रीनगरमध्ये दाखल झाले. आज सकाळी त्यांनी घटनास्थळाला पेहेलगामला भेट दिली. काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पेहेलगाम हल्ल्यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत चर्चा केली.

महाराष्ट्रातील किती पर्यटकांचा मृत्यू ?

सध्या देशात शाळांना उन्हाळी सुट्टया सुरु आहेत. शिवाय उकाडा देखील प्रचंड आहे. त्यामुळे पर्यटक थंड हवेच्या ठिकाणी फिरण्यासाठी म्हणून काश्मीरला पसंती देतात. काल पेहेलगाममध्ये देशभरातून पर्यटक आले होते. त्याचवेळी दहशतवाद्यांनी सुनियोजित पद्धतीने हल्ला केला. यात महाराष्ट्रातील सहा पर्यटकांचा मृत्यू झाला.

पीएम मोदींची विमानतळावर दाखल होताच तातडीची बैठक; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तात्काळ श्रीनगरला रवाना

0

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सौदी अरेबियाचा दौरा अर्ध्यावर सोडून मायदेशी परतले आहेत. ते आज सकाळी दिल्लीत दाखल झाले. दिल्ली एअरपोर्टवर NSA अजित डोवाल, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि परराष्ट्र सचिवांनी त्यांना पहलगाम दहशतवादी हल्ल्यासंबंधी ब्रीफिंग दिली. आता थोड्याच वेळात पीएम मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सुरक्षा विषयक कॅबिनेट समितीची बैठक होईल. पीएम मोदी सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर असताना हा दहशतवादी हल्ला झाला. मंगळवारीच पीएम मोदींनी काश्मीरच्या स्थितीचा आढावा घेतला व निर्देश दिले होते.

पीएम मोदी आणि सौदी अरेबियाचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्यामध्ये जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यासंदर्भात चर्चा झाली. मोहम्मद बिन सलमान यांनी या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला आहे.

नियोजित बैठक दोन तास उशिराने सुरु झाली

मंगळवारी दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी पीएम मोदी सौदी अरेबियाला गेले होते. त्याचवेळी हा दहशतवादी हल्ला झाला. मोदींनी तिथे सर्वप्रथम पोहोचल्यानंतर काश्मीरच्या स्थितीचा आढावा घेतला. त्यामुळे क्राऊन प्रिन्ससोबतची नियोजित बैठक दोन तास उशिराने सुरु झाली. पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यात 26 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यात बहुतांश पर्यटक होते. 2019 पुलवामा हल्ल्यानंतर काश्मीर खोऱ्यातील हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला आहे.

डिनरच्या कार्यक्रमात सहभागी नाही

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीएम मोदी यांनी सौदी क्राऊन प्रिन्ससोबत द्विपक्षीय चर्चा केली. पण अधिकृत डिनरच्या कार्यक्रमात सहभागी झाले नाहीत. दौऱ्याचा कालावधी कमी करुन मंगळवारी रात्रीच मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला. पहलगाम येथे झालेल्या या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तात्काळ काल श्रीनगरला रवाना झाले. त्यांनी श्रीनगरमध्ये उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीला जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला, उपराज्यपाल मनोज सिन्हा उपस्थित होते. पहलगाममध्ये ज्यांनी हल्ला घडवून आणला, त्यांच्यापैकी एकालाही सोडणार नाही हे भारत सरकारने स्पष्ट केलं आहे.

‘यूपीएससी’त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी

0

केंद्रीय लोकसेवा आयोगाने घेतलेल्या २०२४ मधील परीक्षेचा अंतिम निकाल मंगळवारी जाहीर केला. यावेळी पहिल्या दोन स्थानांवर मुलींनी बाजी मारली आहे. प्रयागराजची शक्ती दुबे ही अव्वल ठरली आहे, तर हरियाणाच्या हर्षिता गोयलने दुसरे स्थान पटकावले आहे. तर पुण्याच्या अर्चित डोंगरेने तिसरे स्थान मिळविले आहे. एकूण १००९ उमेदवारांची नावे गुणवत्ता यादीत समाविष्ट आहेत. त्यापैकी ९५ विद्यार्थी महाराष्ट्रातील आहेत.

यंदा पहिल्या पाच यशस्वी उमेदवारांमध्ये तीन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. पहिल्या २५ उमेदवारांमध्ये ११ महिला आणि १४ पुरुषांचा समावेश आहे. निवड झालेल्या उमेदवारांमध्ये ४५ दिव्यांग व्यक्तींचाही समावेश आहे, ज्यामध्ये १२ अस्थिव्यंगिकदृष्ट्या अपंग, आठ दृष्टिहीन, १६ श्रवणदोष आणि नऊ बहुअपंगत्व असलेले उमेदवार आहेत. यूपीएससीने म्हटले आहे की, शिफारस केलेल्या २४१ उमेदवारांची उमेदवारी तात्पुरती ठेवण्यात आली आहे आणि एका उमेदवाराचा निकाल राखून ठेवण्यात आला आहे.

टॉप १० यशस्वी उमेदवारांत पाच मुलींचा समावेश :

१. शक्ति दुबे, २. हर्षिता गोयल, ३. अर्चित पराग डोंगरे,

४. मार्गी चिराग शाह, ५. आकाश गर्ग, ६. कोमल पुनिया,

७. आयुषी बंसल, ८. राज कृष्ण झा, ९. आदित्य विक्रम अग्रवाल,

१०. मयंक त्रिपाठी

शक्ती दुबे : तिसऱ्या प्रयत्नात मिळाले यश

उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील शक्ती दुबे टॉपर आहे. अलाहाबाद तिने विद्यापीठातून बी. एससी. केले. त्यात ती सुवर्णपदक विजेती होती. त्यानंतर २०१८ मध्ये बायोकेमिस्ट्रीमध्ये एम. एस्सी केले. यामध्येही ती सुवर्णपदक विजेती होती. नंतर ती स्पर्धा परीक्षांकडे वळली. यूपीएससीत राज्यशास्त्र व आंतरराष्ट्रीय संबंध हे पर्यायी विषय घेतले. गेल्या वर्षी ती मुलाखतीपर्यंत पोहोचली होती. मात्र, १२ गुणांनी कट ऑफपासून दूर राहिली. तिसऱ्या प्रयत्नात तिने हे यश मिळविले.

हर्षिता गोयल : सीए झाली; समाजसेवाही

हर्षिता मूळची हरियाणातील हिसारची रहिवासी असून, गेल्या अनेक वर्षापासून गुजरातमधील वडोदरा येथे वास्तव्यास आहे. तिने आपले शालेय शिक्षण वडोदरा येथून केले. यानंतर त्यांनी वडोदरा येथील महाराज सयाजी राव विद्यापीठातून बी. कॉमचे शिक्षण घेतले. हर्षिता सीए आहे. तिने पॅलेसेमिया व कर्करोगग्रस्त मुलांसाठी अहमदाबाद येथील बिलीफ फाउंडेशनबरोबर काम केले आहे. हर्षिता सीए आहे. तिचे पर्यायी विषय आंतरराष्ट्रीय संबंध व राज्यशास्त्र होते.

अचिंत डोंगरे : तत्त्वज्ञान पर्यायी विषय घेतला

पुण्याचा रहिवासी असलेला २६ वर्षीय अर्चित हा एक अभियंता आहे. त्याने तामिळनाडूतील वेल्लोर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (व्हीआयटी) मधून बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी (इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी) पदवी घेतली आहे. अर्चितने सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेत तत्वज्ञान हा पर्यायी विषय घेऊन तिसरा क्रमांक पटकावला. तो तिसऱ्या प्रयत्नात परीक्षा उत्तीर्ण झाला आहे. ध्यानधारणा, स्क्वॅश खेळणे हे त्याचे छंद आहेत.

आता धर्मादाय रुग्णालयात रुग्णांवर होणार मोफत उपचार?; मार्गदर्शक तत्त्वे जाहीर

0

महाराष्ट्र शासनाच्या विधी व न्याय विभागाने सोमवारी राज्यातील धर्मादाय रुग्णालयासाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करून महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत योजना लागू करण्यास सांगितले आहे. तसे झाल्यास सर्वच नागरिकांना धर्मादाय रुग्णालयात मोफत उपचार मिळण्याची शक्यता आहे. राज्यात एकूण ४५६ धर्मादाय रुग्णालये असून त्यापैकी ७६ रुग्णालये मुंबईत आहेत. विशेष म्हणजे, काही पंचतारांकित रुग्णालयात सर्वसामान्य नागरिक उपचार घेऊच शकत नाही इतके उपचार महाग आहे. मात्र किती धर्मादाय रुग्णालये शासनाच्या या योजना लागू करतात हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे. सोमवारी धर्मादाय सहआयुक्त पुणे यांच्या अध्यक्षतेखालील चौकशी समितीने धर्मादाय रुग्णालयासाठी काही शिफारशी केल्या होत्या. त्यामध्ये एका शिफारशीनुसार, निर्धन रुग्णनिधी शिल्लक नसल्यामुळे रुग्ण उपचारापासून वंचित राहू नये यासाठी राज्यातील सर्व धर्मादाय रुग्णालयांनी आरोग्याशी संबंधित महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना, आयुष्मान भारत योजना, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम इत्यादी व अन्य सर्व आरोग्याशी संबंधित योजना लागू कराव्यात, असे सांगितले आहे. सध्याच्या घडीला महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना महात्मा फुले जन आरोग्य योजना लागू आहेत.

विशेष करून मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर येथील पंचतारांकित रुग्णालये आहेत ज्याचा समावेश धर्मादाय रुग्णालय वर्गवारीत करण्यात येतो. त्यांनीही महात्मा फुले जन आरोग्य योजना लागू केली तर सर्व नागरिकांना या योजनेंतर्गत मोफत उपचार मिळण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो.

उपचारांचे दर ठरवून दिले आहेत

शासकीय योजना लागू कराव्यात असे सांगण्यात आले आहे; मात्र बंधनकारक करण्यात आलेले नाही. अनेक धर्मादाय रुग्णालयांचा कल या योजना लागू होऊ नये याकडे अधिक असतो. बहुतांश धर्मादाय रुग्णालये शासनाचे दर परवडत नाहीत म्हणून ही योजना घेत नाही. त्यांनी उपचारांचे जे दर ठरवून दिले आहेत, ते फार कमी असल्याची तक्रार होत आहे. महात्मा फुले योजनेतील उपचाराचे दर बदलण्यासाठी आरोग्य विभागाने एक समिती स्थापन केली आहे.

पहलागाम दहशतवादी हल्ल्यानंतर एअर इंडियाचा मोठा निर्णय, श्रीनगरहून 2 जादा उड्डाण आणि ‘या’ सेवा मोफत

0

जम्मू काश्मीरच्या पहलागाम या ठिकाणी पर्यटकांवर दहशतवादी हल्ला करण्यात आला. या घटनेत २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. या हल्ल्यानंतर टाटा समूहाच्या एअर इंडिया या विमान कंपनीने मोठा निर्णय घेतला आहे.बुधवारी दोन जादा विमानं श्रीनगरहून उड्डाण करणार आहेत. तसंच ३० एप्रिल पर्यंत श्रीनगरसाठी ये-जा करणाऱ्या विमानांची वेळ बदलणं आणि तिकिट रद्द केल्यास पूर्ण रिफंड या दोन सेवा सुरु केल्या आहेत.

पर्यटकांवर दहशतवादी हल्ला

मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पहलगाममध्ये सशस्त्र दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळीबार केल्याने काश्मीरमधून बाहेर पडू इच्छिणाऱ्या पर्यटकांना बाहेर काढण्याची मागणी करण्यात आली होती. रामबन जिल्ह्यात नुकत्याच आलेल्या पूर आणि भूस्खलनामुळे जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग बंद आहे. गेल्या तीन दिवसांपासून मोठ्या संख्येने पर्यटक काश्मीरमध्ये अडकून पडले आहेत. यामुळेही टूर ऑपरेटर्स आणि ट्रॅव्हल एजंट्सकडून अडकलेल्या पर्यटकांना हवाई मार्गाने बाहेर काढण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर टाटांच्या एअर इंडिया या विमान कंपनीने ३० एप्रिल पर्यंत रिफंड आणि कॅन्सलेशनच्या सेवा मोफत दिल्या आहेत.

एअर इंडियाने दिल्या या मोफत सेवा

पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाल्यानंतर पर्यटक चिंतेत आहेत. प्रत्येकाला आपलं घर गाठणं महत्त्वाचं वाटतं आहे. त्या पार्श्वभूमीवर आज श्रीनगहून दिल्ली आणि मुंबईसाठी दोन अतिरिक्त विमानांची उड्डाणं होणार आहेत. श्रीनगरहून दिल्लीसाठी सकाळी ११.३० वाजता विमान उड्डाण करणार आहे. तर श्रीनगर ते मुंबई हे विमान दुपारी १२ वाजता उड्डाण करणार आहे. या विमानाच्या तिकिटांचं बुकिंग सुरु करण्यात आलं आहे. श्रीनगरहून जाणारी इतर विमाने वेळापत्रकाप्रमाणे असतील असंही एअर इंडियाने स्पष्ट केलं आहे. एअर इंडियाने या श्रीनगरसाठी ३० एप्रिल २०२५ पर्यंत कन्फर्म बुकिंग असलेल्या प्रवाशांना कॅन्सलेशन आणि रिशेड्यूलिंग या दोन सेवा मोफत पुरवल्या आहेत. तिकिट रद्द केल्यास प्रवाशांना पूर्ण पैसे परत मिळणार आहेत. एअर इंडिया एक्स्प्रेसची विमानं श्रीनगरहून बंगळुरु, दिल्ली, हैदराबाद आणि कोलकाता या ठिकाणांसाठी थेट फ्लाईट आहेत. तसंच एअर इंडिया कंपनीची विमानं दिल्ली आणि मुंबई या ठिकाणीही विमानसेवा पुरवते. इंडिगो, अकासा, स्पाईसजेट या कंपन्यांची विमानंही श्रीनगरला ये-जा करतात.

प्रत्यक्षदर्शींनी काय काय सांगितलं?

एका पर्यटकाने सांगितल्यानुसार दहशतवाद्यांनी पर्यटकांना नावं विचारुन ठार केलं. एक महिला रडत तिच्या नवऱ्याला वाचवण्यासाठी टाहो फोडत होती हे दृश्यही कॅमेरात कैद झालं आहे. जो माणूस व्हिडीओ रेकॉर्ड करत होता तो तिला शांत राहण्याचं आवाहन करत होता असाही एक व्हिडीओ समोर आला आहे. एक लहान मुलगा सांगतो ते लोक समोरुन आले आणि त्यांनी गोळीबार सुरु केला. माझ्या नवऱ्याला दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून ठार केलं असं एका आक्रोश करणाऱ्या महिलेने सांगितलं.

महाराष्ट्रात पाणीसंकट गडद ३६ पैकी १७ जिल्ह्यांत टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू निम्म्या महाराष्ट्रात टंचाई!

0

राज्यावरील पाणी टंचाईचे संकट दिवसेंदिवस गंभीर होत असून, आजमितीस ३६ पैकी १७ जिल्ह्यांत टंचाईचा प्रश्न अधिक गडद झाला आहेय त्यामुळे जिल्हा प्रशासनाने कार्यालयात बसून नव्हे, तर थेट पाणी टंचाई असलेल्या भागांत दौरे करून तत्काळ उपाययोजना कराव्यात. १५ जुलैपर्यंत पाणी साठा पुरेल, असे नियोजन करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

शिंदे यांनी दृकश्राव्य माध्यमातून सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्याधिकारी यांच्याशी संवाद साधत पाणीटंचाईचा आढावा घेतला. ‘ग्रामीण असो किंवा शहरी भाग, लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये. यंदा उन्हाळा तीव्र आहे. त्यामुळे पुढील दोन महिने पिण्याचे पाणी जपून वापरा,’ असे आदेश शिंदे यांनी या वेळी दिले.

या वेळी प्रत्येक जिल्ह्यात किती टँकर सुरू आहेत आणि गेल्या वर्षी काय परिस्थिती होती, याचाही आढावा शिंदे यांनी घेतला. तसेच जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषदा आणि मुख्याधिकारी यांना प्रत्यक्ष गावपाड्यांमध्ये भेटी देऊन पाण्याची सद्यास्थिती जाणून घेण्याच्या व टंचाई असलेल्या भागात तत्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. या बैठकीला पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव नवीन सोना, ग्रामविकास प्रधान सचिव एकनाथ डवले, नगरविकास प्रधान सचिव के. एच. गोविंदराज, पाणीपुरवठा प्रधान सचिव संजय खंदारे आदी उपस्थित होते.

टंचाईग्रस्त भागाशी संपर्क ठेवण्याचे निर्देश

सध्या राज्यातील १७ जिल्ह्यांत ४४७ गावे आणि १,३२७ पाड्यांत टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असून, टँकरच्या मागणीत वाढ होत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी बैठकीत दिली. त्यावर राज्याच्या विविध भागांत पाणीटंचाई उद्भवली असून येणाऱ्या दोन महिन्यांत प्रशासनाने दक्षता घ्यावी आणि सातत्याने टंचाईग्रस्त भागाशी संपर्क ठेऊन सर्व्हेक्षण करावे व योग्य ती पाऊले तातडीने उचलावी. ज्या जिल्ह्यांनी कृती आराखडा सादर केला नाही त्यांनी दोन-तीन दिवसांत सादर करावा. प्रशासनाने डोळ्यात तेल घालून टंचाईला तोंड देण्याचे आणि नियोजनबद्ध पद्धतीने पाऊल टाकून काम करण्याचे आदेशही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिले.

यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले जिथे पाणी पुरवठा योजना प्रलंबित आहेत, त्या लवकरात लवकर पूर्ण करा. काही ठिकाणी लोकांना अतिशय दुरून पाणी आणावे लागते, अशा ठिकाणी तत्काळ टँकर सुरू करावे. आवश्यकतेप्रमाणे विहिरी अधिग्रहित कराव्यात. पाण्याचे प्रमाण कमी झाले की, स्त्रोत दूषित होऊ शकतात. हे पाणी पिण्यायोग्य आहे किंवा नाही ते तपासण्याची गरज आहे. कोणत्याही परिस्थितीत पिण्याचे पाणी वाहून नेणारे टँकरही चांगले आणि स्वच्छ असावेत . प्रत्येक टँकरवर ‘जीपीएस’ लावावे असे आदेशही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

काश्मीर दहशतवादी हल्ला राज ठाकरे संतप्त, धर्म विचारला ही मुजोरी? ” पुढच्या १० पिढ्यांना सुद्धा थरकाप उडायला हवा…”

0

काश्मीर येथील पहलगाम या ठिकाणी पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यानंतर सर्वच स्तरातून प्रतिक्रिया उमटत आहेत. पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर गुरुवारची सकाळ श्रीनगरमध्ये प्रचंड तणावपूर्ण वातावरणात सुरू झाली. बाजारपेठा ओस पडल्याचं दिसून येत असून अनेक सामाजिक संघटना व राजकीय पक्षांनी या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी श्रीनगर बंदची हाक दिली आहे. दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दहशतवादी हल्ल्यावर सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. हल्लेखोरांचा असा बंदोबस्त करा की पुढच्या १० पिढ्यांना ते आठवून त्यांचा थरकाप उडाला पाहिजे अशी मागणी राज ठाकरेंनी केली आहे.

राज ठाकरेंची पोस्ट काय?

जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना तीव्र निषेध व्यक्त करत आहे. या घटनेत जे लोक मृत्यूमुखी पडले, त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भावपूर्ण श्रद्धांजली… ही घटना अतिशय गंभीर आहे आणि या प्रसंगात सरकारच्या पाठीशी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पूर्णपणे उभी राहील.

आता असा बंदोबस्त करा की…

केंद्र सरकारने या हल्लेखोरांचा आता असा बंदोबस्त करावा की या हल्लेखोरांच्या पुढच्या १० पिढ्यांच्या ते आठवून सुद्धा थरकाप उडायला हवा… १९७२ साली म्युनिक ऑलिम्पिकच्या वेळेस इस्रायली खेळाडूंवर पॅलेस्टिनी अतिरेक्यांनी हल्ला केला… यानंतर इस्रायलने या अतिरेक्यांना, या हल्ल्याच्या सूत्रधारांना अशा पद्धतीने मारलं होतं की पुढे दीर्घकाळ पॅलेस्टिनी लोकांच्या मनात दहशत बसली होती. भारताचे आणि इस्रायलचे संबंध उत्तम आहेत… केंद्र सरकार इस्रायल सरकारच्या पाऊलावर पाऊल टाकून या दहशतवाद्यांना आणि त्यांच्या मागच्या एकूण एक पाठीराख्यांना कायमच संपवेल अशी अपेक्षा व्यक्त करतो.

या देशात आमच्या हिंदूंच्या अंगावर याल तर आम्ही सगळे हिंदू म्हणून एकत्र तुमच्या अंगावर जाऊ- राज ठाकरे

या हल्ल्याबद्दल वाचताना एक धक्कादायक गोष्ट समोर आली… एका प्रत्यक्षदर्शी महिलेने सांगितलं की हल्लेखोरांनी गोळ्या झाडताना समोरच्याच्या धर्म विचारला… ही तुमची मुजोरी ? मी अनेकदा माझ्या भाषणात म्हणतो तसं की या देशात आमच्या हिंदूंवर जर कोणी अंगावर याल तर आम्ही सगळे हिंदू म्हणून एकत्र येऊन तुमच्या अंगावर जाऊ… या हल्लेखोरांच्या मागचे सूत्रधार कुठेही लपले असू देत त्यांना आपली शक्ती काय आहे हे कळलंच पाहिजे…

केंद्र सरकार कठोर होईल यात माझ्या मनात शंका नाही-राज ठाकरे

केंद्र सरकारने काश्मीरमधून ३७० कलम हटवलं. त्यानंतर सगळं जरा सुरळीत होत आहे आणि पर्यटकांचा ओघ वाढला आहे असं दिसत असताना, जर असा हल्ला झाला तर भविष्यात काश्मीरमध्ये जमीन विकत घेऊन, उद्योगधंदे कोण सुरु करेल ? त्यामुळे केंद्र सरकारने याचा विचार करून ठोस कृती आखावी….हे सगळं करताना केंद्र सरकार कठोर होईल याबद्दल माझ्या मनात कुठलीच शंका नाहीये… आणि त्यांच्या मागे या देशातील सगळे राजकीय पक्ष उभे राहतील. सरकारने एकदाच काय तो दणका द्यावा, बाकीच्यांचं माहित नाही पण महाराष्ट्र नवनिर्माण सेना नक्की सरकारच्या सोबत असेल.

राज ठाकरे

अशी पोस्ट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली असून दहशतवादी हल्ल्याचा निषेध नोंदवला आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्यांचा सौदी अरेबियाचा दौरा अर्धवट सोडला आहे आणि ते भारतात परतले आहेत. आज केंद्राची उच्च स्तरीय बैठक घेतली जाईल. गृहमंत्री अमित शाह यांनीही आम्ही हल्लेखोरांना सोडणार नाही असं म्हटलं आहे.