Home Blog Page 110

‘पहलगाम’चा वार जिव्हारी; PM मोदींनी ‘सौदी’चा दौरा आटोपला; मोठा निर्णय? सुरक्षा समितीची बैठक बोलावली

0

जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये मंगळवारी (ता.22) भीषण दहशतवादी हल्ला करण्यात आला आहे. यावेळी धर्म विचारत दहशतवाद्यांनी थेट पर्यटकांनाच लक्ष्य केलं आहे. यावेळी त्यांनी 40 ते 50 फायर करण्यात आल्याची माहिती आहे. आता याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या हल्ल्याची गंभीर दखल घेत सौदी अरेबियाचा दौरा आटोपता घेतल्याची माहिती समोर येत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बुधवारी(ता.23) पहाटे पाचच्या दरम्यान भारतात दाखल होण्याची शक्यता आहे. या जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे मोदींनी नियोजित वेळेपूर्वीच यूएईचा दौरा आटोपता घेतला आहे. त्यामुळे रात्री बुधवारी(ता.22) मध्यरात्रीच पंतप्रधान मोदी भारताकडे रवाना होणार असल्याची माहिती आहे.

सौदी अरेबियाच्या सरकारने आयोजित केलेल्या डिनरलाही पंतप्रधान मोदी उपस्थित राहिले नाहीत. बुधवारी पहाटे नरेंद्र मोदी पाच वाजता दिल्लीत दाखल होणार आहेत. या दहशतवादी हल्ल्यानंतर मोदींनी कॅबिनेट सुरक्षा समितीची बैठक बोलावली आहे. या बैठकीत कॅबिनेट सुरक्षा समिती आणि तिन्ही सैन्याच्या प्रमुखांसोबतही मोदी सुरक्षेची आढावा घेणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये चर्चा होणार आहे. पहलगाम येथील हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गृहमंत्री अमित शाह यांच्याशी फोनवरुन चर्चा केली होती. यानंतर शाह यांना श्रीनगरला पाठवण्यात आलं होतं. त्यानंतर आता मोदींनी सौदी अरेबियाचा दौरा आटोपता घेतल्याची मोठी माहिती समोर आला आहे.

जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये भीषण दहशतवादी हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात तब्बल 28 पर्यटकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. तसेच या हल्ल्यात अनेकजण जखमी झाले आहेत. हा हल्ला पहलगाममधील अनंतनाग जिल्ह्यातील बैसरन खोऱ्याच्या वरच्या बाजूला टेकड्यांवर फिरण्यासाठी गेलेल्या पर्यटकांवर दहशतवाद्यांनी घडवून आणला.

कोणालाही सोडणार नाही…!

पंतप्रधान मोदींनी या दहशतवादी हल्ल्याच्या घटनेवर प्रतिक्रिया देत कडक इशाराही दिला आहे.’एक्स’वर केलेल्या पोस्टमध्ये ते म्हणतात,जम्मू-काश्मीरच्या पहलगामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मी तीव्र निषेध नोंदवतो. ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले, त्यांच्याबद्दल माझ्या संवेदना आहेत.जखमी लोक लवकरात लवकर बरे व्हावेत अशी मी प्रार्थना करत असल्याच्या भावनाही त्यांनी व्यक्त केल्या.

तसेच पीडित लोकांना शक्य तितकी सर्व मदत पुरवली जात आहे. या घृणास्पद कृत्यामागील लोकांना शिक्षा होईल, त्यांना सोडले जाणार नाही! त्यांचा नापाक अजेंडा कधीही यशस्वी होणार नाही. दहशतवादाविरुद्ध लढण्याचा आपला निर्धार दृढ आहे आणि तो आणखी मजबूत होईल अशी ग्वाहीही मोदींनी यावेळी दिली.

दहशतवादी हल्ल्यात पुण्यातील दोघांचा मृत्यू, मुख्यमंत्र्यांची माहिती; म्हणाले, ज्यांनी हे केलंय… 

0

दहशतवादी हल्ल्यात पुण्यातील दोघांचा मृत्यू, मुख्यमंत्र्यांची माहिती; म्हणाले, ज्यांनी हे केलंय…

जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये पर्यटकांवर दहशतवादी हल्ला करण्यात आलाय. या भ्याड हल्ल्यात २७ पर्यटकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये महाराष्ट्रातील दोन पर्यटकांचा समावेश आहे तर काही जण जखमी झाले आहेत.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहलगाममधील हल्ल्याचा निषेध व्यक्त केला. पहलगाममध्ये दहशतवाद्यांकडून झालेल्या हल्ल्यात महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू झाला असल्याचंही फडणवीस यांनी सांगितलं. तिथल्या प्रशासनाकडून जखमींना आणि तिथं असलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना मदत केली जात असल्याची माहितीही फडणवीस यांनी दिली.

फडणवीस म्हणाले की, नाव विचारून खूपच चुकीचा हल्ला झाला आहे. जम्मू काश्मीरच्या विकासाला रोखण्याचा प्रयत्न झालाय. मात्र काश्मीर किंवा भारताचा विकास रथ थांबणार नाही. गृहमंत्रीही तिथं पोहोचतायत. महाराष्ट्रातले दोघे मृत्यूमुखी पडले आहेत. काही जण जखमी झाले आहेत. तिथं प्रशासनाकडून मदत केली जात आहे. आम्हीही त्यांच्या संपर्कात आहे.

TRFने घेतली पहलगाममध्ये हल्ल्याची जबाबदारी; कलम ३७० हटवल्यानंर उदय, वैष्णोदेवी भाविकांच्या बसवर केलेला हल्ला

पहलगाममध्ये ज्या शक्तींनी हे केलंय त्यांचा नायनाट केल्याशिवाय भारत थांबणार नाही. मी तिथल्या प्रशासनाच्या संपर्कात आहे. कलम ३७० नंतर खूप वेळ गेलाय. काश्मीरचा विकास होत आहे आणि तो पाहवत नाहीय त्यामुळे अशा प्रकारचा हल्ला केला जात आहे असंही फडणवीस म्हणाले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही भ्याड हल्ल्याचा निषेध करताना म्हटलं की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाचे गृहमंत्री अमित शहांना तिकडं पाठवलंय. निरपराध पर्यटकांना मारण्यात कसली मर्दुमकी आहे? हा भ्याड हल्ला आहे. हे पाकडे सर्जिकल स्ट्राइकनंतर बिळात लपले होते. या पाकड्यांचा बदला जशास तसा घेतला जाईल. त्यांना चोख प्रत्युत्तर दिलं जाईल. भारताचे पंतप्रधान आणि गृहमंत्री पाकड्यांना सोडणार नाहीत. निरपराधांचं बलिदान व्यर्थ जाऊन देणार नाहीत.

पुण्यातील दोन कुटुंबं

काश्मीर हल्ल्यावेळी पहलगाममध्ये पुण्यातील ५ जण असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. आसावरी जगदाळे, प्रगती जगदाळे, संतोष जगदाळे, कौस्तुभ गनबोटे, संगीता गनबोटे अशी त्यांची नावे आहेत.यातील जगदाळे कुटुंबीय हे कर्वेनगर परिसरातील असून गणबोटे कुटुंबीय हे पुण्यातील रास्ता पेठेत असल्याची प्राथमिक माहिती समजते.

‘एकही दहशतवादी सोडणार नाही,’ पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींनी खडसावलं

0

जम्मू काश्मीरमधल्या पहलगाममध्ये पर्यटकांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. या हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या हल्ल्यानंतर सैन्यानं सर्च ऑपरेशन सुरु केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांनी या हल्ल्यानंतर तातडीनं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा केली. त्यांनी गृहमंत्र्यांना श्रीनगरला जाण्याचे निर्देश दिले आहेत. त्याचबरोबर या हल्ल्याला जबाबदार असलेल्या दहशतवाद्यांना सोडणार नाही, असा इशारा पंतप्रधान मोदींनी दिला आहे.

पंतप्रधान मोदींनी X वर या हल्ल्याच्या संदर्भात पोस्ट केली आहे. त्यामध्ये त्यांनी म्हंटलं आहे की, ‘जम्मू काश्मीरमधल्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मी तीव्र निषेध करतो. ज्या लोकांनी आपल्या प्रिय व्यक्तींना गमावलंय, त्यांच्याबद्दल संवेदना व्यक्त करतो. पीडित व्यक्तींना शक्य असेल ती सर्व मदत दिली जात आहे. या घृणास्पद हल्ल्याच्यामागे जे आहेत, त्यांना न्यायालयाच्या कठड्यात आणले जाईल. त्यांना सोडले जाणार नाही! त्यांचा नापाक अजेंडा कधीच यशस्वी होणार नाही. दहशतवादाशी लढण्याचा आमचा संकल्प कायम आहे आणि तो आणखी मजबूत होईल.

‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या हल्ल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी श्रीनगरला जाण्याचे निर्देश दिले आहेत. पंतप्रधानांनी निर्देश दिल्यानंतर शाह श्रीनगरला रवाना झाले आहेत.हल्ल्याची माहिती मिळताच त्यांनी त्यांच्या घरी बैठक बोलावली. या उच्चस्तरीय बैठकीत गृह सचिव आणि आयबी प्रमुखांसह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

जम्मू आणि काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर, CRPF DG, जम्मू आणि काश्मीर DG, सैन्य अधिकारी आणि इतर अनेक वरिष्ठ अधिकारी देखील व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठकीत सहभागी झाले.

पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण

0

जम्मू आणि काश्मीर पुन्हा एकदा दहशतवाद्यांच्या हल्ल्याने हादरले आहे. पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर भीषण हल्ला केला आहे. या हल्ल्यात अनेक पर्यटकांचा मृत्यू झाल्याचे म्हटलं जात असलं तरी दोन पर्यटकांच्या मृत्यूची माहिती समोर आली आहे. तर १० पर्यटक आणि २ स्थानिक लोक गंभीर जखमी झाले आहेत. दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला आहे. या हल्ल्याची जबाबदारी टीआरएफ या दहशतवादी संघटनेने घेतली आहे.

मंगळवारी साडेतीनच्या सुमारास अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात दहशतवाद्यांनी निष्पाप पर्यटकांना लक्ष्य केले. या हल्ल्यात २७ पर्यटकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या वाढण्याची भीती आहे. हा हल्ला बैसरन या गवताळ प्रदेशाजवळ झाला. दहशतवादी संघटना द रेझिस्टन्स फ्रंटने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. टीआरएफ ही लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेची संलग्न संघटना आहे. पाकिस्तानमधील शेख सज्जाद गुल हा टीआरएफचे प्रमुख आहे.

दोन ते तीन दहशतवादी पोलिसांच्या गणवेशात होती. पर्यटकांना लक्ष्य करण्यासाठी त्यांनी हा हल्ला केला होता. दहशतवाद्यांनी पर्यटकांची नावे विचारल्यानंतर त्यांच्यावर गोळीबार सुरु केला. हल्ल्यानंतर गोंधळ उडताच दहशतवाद्यांनी पर्यटकांवर मोठ्या प्रमाणात गोळीबार केला. त्यामुळे अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

टीआरएफ ही दहशतवादी संघटना २०१९ मध्ये सुरु आली. ५ ऑगस्ट २०१९ रोजी जम्मू आणि काश्मीरमधून कलम ३७० हटवताच ही संघटना संपूर्ण काश्मीरमध्ये सक्रिय झाली. पण थोड्याच वेळात या दहशतवादी संघटनेने डझनभर दहशतवादी हल्ले केले. २०२३ मध्ये बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायद्याअंतर्गत टीआरएफ दहशतवादी संघटनेवर बंदी घालण्यात आली होती. टीआरएफची निर्मिती पाकिस्तानपासून सुरू होते. पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआय आणि लष्कर-ए-तैयबा यांनी मिळून ‘द रेझिस्टन्स फ्रंट’ या नवीन दहशतवादी संघटनेचा पाया रचला होता.

जम्मू आणि काश्मीरमध्ये टीआरएफ केलेल्या प्रत्येक हल्ल्यानंतर एक पत्र जारी करते. त्यानुसार पहलगाम हल्ल्यातही दहशतवादी संघटनेने असेच एक पत्र जारी केले आहे. “जम्मू-काश्मीरमध्ये बाहेरून येणाऱ्या लोकांना डोमिसाईल जारी केला जात आहे. हा प्रयत्न जम्मू आणि काश्मीरची लोकसंख्या खराब करण्याचा आहे. स्थानिक नसलेले लोक तिथे येतात आणि स्वतःची पर्यटक म्हणून ओळख सांगतात आणि डोमिसाईल मिळवतात. त्यानंतर तिथे जमीन ताब्यात घेण्याचा खेळ सुरू होतो,” असे सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या पत्रात म्हटले आहे. मात्र टीआरएफकडून या पत्राची अधिकृत घोषणा झालेली नाही.

“जम्मू आणि काश्मीरमध्ये ८५ हजारांहून अधिक डोमिसाईल जारी करण्यात आले आहेत. हे डोमिसाईल स्थानिक लोकांना नाही तर बाहेरील लोकांना देण्यात आले आहे. याद्वारे जम्मू-काश्मीरची लोकसंख्या खराब करण्याचा प्रयत्न केला जात आहे. असे दहशतवादी हल्ले जम्मू आणि काश्मीरमध्ये बेकायदेशीरपणे लोकांना वसवण्याच्या प्रयत्नांचे परिणाम आहेत,” असे टीआरएफने म्हटलं आहे.

पहलगाममध्ये दहशतवादी उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या कलमा पढायला सांगितलं पँट काढली अन्…!

0

दक्षिण काश्मिरातील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २७ जणांना मृत्यू झला आहे. पहलगाम पर्यटन भागातील बैसरन व्हॅलीमधील डोंगरावरून दहशतवादी खाली आले आणि त्यांनी तिथे उपस्थित असलेल्या पर्यटकांना त्यांची नावे विचारून गोळ्या घातल्या. या हल्ल्यात दोन परदेशी नागरिकांचाही मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. लष्कर-ए-तैयबाशी संबंधित रेझिस्टन्स फ्रंटने (टीआरएफ) या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. दुपारी ३ वाजताच्या सुमारास हा हल्ला झाला. यावेळी दहशतवाद्यांनी महिला आणि वृद्धांसह अनेकांना लक्ष्य केले.

या हल्यादरम्यानचे काही व्हिडिओदेखील समोर आले आहेत. यात, ठीक-ठिकाणी जखमी लोक रडताना आणि आक्रोश करताना दिसत आहेत. एका व्हिडिओमध्ये, एक पीडित महिला रडत रडत सांगत आहे की, “आम्ही भेळपुरी खात होतो, तेव्हा बाजूने दोन लोक आले आणि त्यापैकी एक जण म्हणाला, हा मुस्लीम दिसत नाही, घाला गोळी आणि त्यांनी माझ्या पतीला गोळी घातली.”

‘दहशतवाद्यांनी कलमा पढायला सांगितले अन्…’ –

सीएनएन-न्यूज१८ ने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, गोळी झाडण्यापूर्वी, कोण कोणत्या धर्माचे आहे, हे लक्षात यावे, यासाठी दहशतवाद्यांनी लोकांना ‘कलमा’ पढायला सांगितला. याशिवाय, दहशतवाद्यांनी पर्यटकांना त्यांची पँट काढायला सांगितली आणि त्यांचे ओळखपत्रही तपासल्याचे सूत्रांनी सांगितले.

माध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपवण्यात आला आहे. शोध मोहीम संपल्यानंतर, राष्ट्रीय तपास संस्थेचे (एनआयए) एक पथक पहलगाममध्ये पोहोचण्याची शक्यता आहे.

चुडा भरलेली नवविवाहिता सुन्न, लग्नानंतर काश्मिरला फिरायला गेलेल्या जोडप्यावर दहशवाद्यांचा हल्ला, नवऱ्यावर गोळ्या झाडल्या!

0

जम्मू काश्मीरमधील पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर विदारक दृश्यं समोर आली आहेत. पर्यटक आणि स्थानिकांवर झालेल्या या गोळीबारात, लग्नानंतर जम्मूमध्ये फिरायला आलेल्या जोडप्यालाही टार्गेट करण्यात आलं. या गोळीबारात मयत झालेल्या पतीच्या शेजारी खिन्न मनाने बसलेली पत्नी पाहून उपस्थितांच्या काळजात धस्स झालं. या महिलेने दहशतवाद्यांनी तिच्या पतीला केवळ मुस्लिम नसल्याचं सांगितल्यामुळे गोळ्या घातल्याचं म्हटलं आहे.

पहलगाममध्ये पोलिसांच्या वेषात आलेल्या दहशतवाद्यांनी पर्यटकांना आपला निशाणा बनवला. पर्यटकांची नावे विचारून त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. या वेळी एक नवविवाहित जोडपेदखील दहशतवाद्यांच्या हल्लातून सुटले नाही. या जोडप्यातील पुरुषाला आधी त्याचा धर्म विचारला आणि मग त्याला गोळ्या घालण्यात आल्याचं त्याच्या पत्नीने सांगितलं. ही महिला आपल्या पतीला वाचवण्यासाठी लोकांना आवाहन करत होती. पण त्याचा काही उपयोग झाला नाही. शेवटी खिन्न मनाने ती मृत पतीच्या शेजारी बसली.

Jammu Kashmir Pahalgam Terror Attack : 27 हून अधिक जणांचा मृत्यू

जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या पर्यटकांवरील हल्ल्यामध्ये 27 हून अधिक पर्यटकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. या आकड्यामध्ये वाढ होऊ शकते. तसेच अनेकजण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

या दहशतवादी हल्ल्यातील जखमींमध्ये राजस्थानच्या पर्यटकांसह महाराष्ट्राच्याही काही पर्यटकांचा समावेश आहे. तसंच काही स्थानिक नागरिकही यात जखमी झाले आहेत. तसंच त्यांनी धर्म विचारून गोळ्या झाडल्या अशी प्रत्यक्षदर्शींची माहिती आहे. सुरक्षा दलाकडून शोधकार्य सुरू आहे. दहशतवादी पोलीस युनिफॉर्ममध्ये असल्याची माहिती आहे. या हल्ल्यामागे टीआरएफ दहशवादी संघटनेचा हात आहे. सीआरपीएफची क्विक रिअॅक्शन टीम घटनास्थळावर तैनात करण्यात आली आहे.

पुण्यातील दोघांची प्रकृती गंभीर

जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील पर्यटकांवर देखील मोठं संकट ओढवलंय. एकूण जखमी पर्यटकांमध्ये चार महाराष्ट्रातील पर्यटकांचा समावेश आहे. माणिक पाटील आणि एस भालचंद्र अशी दोघांची नाव समोर आली आहेत.

जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला, 27 जणांचा मृत्यू!

0

जम्मू काश्मीरमधील पहलगामध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला आहे. या हल्ल्यात एकूण 27 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.

टीआरएफ संघटनेनं हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली
अतिरेक्यांनी लोकांची नावे विचारून लोकांवर हल्ले केले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार या हल्ल्यात मृतांचा आकडा 27 वर पोहोचला आहे. घटनास्थळी सीआरपीएफच्या तुकड्या तैनात करण्यात आले आहे. टीआरएफ या दहशतवादी संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. पहलगाममध्ये फिरायला आलेल्या पर्यटकांवर हा हल्ला झाला आहे.

नावं विचारून करण्यात घालण्यात आल्या गोळ्या
मिळालेल्या माहितीनुसार गुजरात, तमिळनाडू, उडिसा, महाराष्ट्र या राज्यातील पर्यटकांवर हा हल्ला झाला. दहशतवाद्यांनी काही पर्यटकांवर त्यांची नावं विचारून हल्ला करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील एक पर्यटक गंभीर जखमी आहे. तर इतर तीन पर्यटक जखमी आहेत. या सर्वांवर रुग्णालया उपचार केले जात आहेत.

अमित शाह तातडीने जम्मू-काश्मीरकडे रवाना
हा भ्याड हल्ला झाल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तातडीने जम्मू-काश्मीरला रवाना झाले आहेत. या हल्ल्यात सहभागी असणाऱ्यांना सोडले जाणार नाही, असे अमित शाहांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील या हल्ल्याचा निषेध केल करत मृतांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत.

सरकारी कंपनीमुळे देशातील 6 बँका संकटात 8000 कोटी रुपये पाण्यात? काय आहे प्रकरण? बेल आउट पॅकेज की विक्री

0

विजय मल्ल्यापासून ते नीरव मोदी आणि मेहुल चोक्सीपर्यंत सर्वांनी बँकांचे पैसे बुडवले आहेत. त्यांनी बँकांकडून कर्ज घेतले आणि नंतर ते कर्ज फेडले नाही. पण यावेळी सरकारी कंपनीने घेतलेले कर्ज बुडण्याची शक्यता आहे. ही कंपनी देशाबाहेर पळून जाण्याची शक्यता नाही पण यावेळीही बँकांचेच नुकसान होणार आहे. प्रत्यक्षात, दूरसंचार कंपनी एमटीएनएल सात बँकांकडून आणि इतर काही ठिकाणांहून घेतलेले कर्ज फेडण्यात अपयशी ठरली आहे.

सतत तोट्यात चालणाऱ्या या कंपनीने सात सरकारी बँकांकडून घेतलेले 8,346 कोटी रुपयांचे कर्ज थकवले आहे. म्हणजेच ही रक्कम अद्याप देण्यात आलेली नाही. कंपनीने स्वतः नियामक फाइलिंगद्वारे शेअर बाजाराला ही माहिती दिली आहे.

कर्जाचा बोजा सतत वाढत आहे

31 मार्च 2025 पर्यंत, कंपनीवरील एकूण थकित कर्ज 33,568 कोटी रुपये आहे. यामध्ये 8,346 कोटी रुपये बँक कर्ज, 24,071 कोटी रुपये सॉवरेन गॅरंटी बाँड आणि 1,151 कोटी रुपये दूरसंचार विभागाकडून रोख्यांवर व्याज देण्यासाठी घेतलेले कर्ज आहे.

कोणत्या बँकांकडून कर्ज घेतले आहे?

एमटीएनएलच्या थकीत कर्जांमध्ये सर्वात मोठा वाटा युनियन बँक ऑफ इंडियाचा आहे, या बँकेकडून कंपनीने 3,633 कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. या व्यतिरिक्त:

इंडियन ओव्हरसीज बँक – ₹ 2,374 कोटी

बँक ऑफ इंडिया – ₹ 1,077 कोटी

पंजाब नॅशनल बँक – ₹ 464 कोटी

स्टेट बँक ऑफ इंडिया – ₹ 350 कोटी

युको बँक – ₹ 266 कोटी

इतर कर्जांसह एकूण रक्कम – ₹ 8,346 कोटी

कंपनीने म्हटले आहे की ऑगस्ट 2024 ते फेब्रुवारी 2025 दरम्यान या बँकांना कर्ज आणि व्याजाची परतफेड करण्यात आलेली नाही.

कंपनीला होत असलेला तोटा आणि कर्जामुळे एमटीएनएलने आधीच अनेक वेळा सरकारकडे मदत मागितली आहे. आता प्रश्न असा आहे की सरकार या संकटात सापडलेल्या कंपनीला आणखी एक बेलआउट पॅकेज देणार की ही कंपनी खाजगी कंपन्यांना विकणार हा मोठा प्रश्न आहे.

एमटीएनएल कंपनी काय करते?

एमटीएनएल म्हणजेच महानगर टेलिफोन निगम लिमिटेड ही एक सार्वजनिक क्षेत्रातील (पीएसयू) दूरसंचार कंपनी आहे. ही कंपनी 1 एप्रिल 1986 रोजी स्थापन झाली. ही कंपनी भारत सरकारच्या दळणवळण मंत्रालयाच्या (दूरसंचार विभाग – दूरसंचार विभाग) अंतर्गत येते.

एमटीएनएलची सुरुवात विशेषतः दिल्ली आणि मुंबई सारख्या दोन प्रमुख महानगरांमध्ये टेलिफोन सेवा देण्यासाठी करण्यात आली होती. बीएसएनएल सारख्या मोठ्या दूरसंचार नेटवर्कला पाठिंबा देणे आणि शहरी भागात जलद, आधुनिक दूरसंचार सेवा देणे हे कंपनीचे उद्दिष्ट होते.

कंपनीचा इतिहास

1986 : एमटीएनएलची स्थापना झाली, सुरुवातीला फक्त फिक्स्ड लाईन (लँडलाइन) सेवा देत होती.

1990 चे दशक: मोबाईल सेवा सुरू झाल्या.

2001: ट्राय-ब्रॉडबँड आणि एडीएसएल सेवा सुरू.

2009-10: 3जी सेवा सुरू करणाऱ्या भारतातील पहिल्या दूरसंचार कंपन्यांपैकी एक कंपनी.

26/11 हल्ल्यात काँग्रेस अन् राष्ट्रवादीचा वाटा; भाजप नेत्याच्या गंभीर आरोपांवर अजितदादांचं सडेतोड उत्तर

0

मुंबईवर झालेल्या 26/11 च्या आतंकवादी हल्ल्याबाबत भाजपच्या नेत्याने गंभीर आरोप केले आहेत. तत्कालीन सरकारमधील असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचा 26/11 च्या हल्ल्यांमध्ये वाटा होता, असा आरोप भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष माधव भंडारी यांनी केला आहे. माधव भंडारी यांच्या हस्ते रविवारी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात निर्दोष सुटलेले विक्रम भावे त्यांनी लिहिलेल्या ‘दाभोलकर हत्या आणि मी’ पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

माधव भंडारी म्हणाले, “26/11 चा जो इतका मोठा आतंकवादी हल्ला झाला स्थानिक प्रशासनावर प्रभाव असलेल्या व्यक्तीच्या सहभागाशिवाय हा हल्ला घडू शकत नाही”. मुंबईवर हल्ला होणार याबाबत सगळ्यांना कल्पना होती,’ या हल्ल्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा वाटा होता, अस खळबळजनक दावा भाजप उपाध्यक्ष माधव भंडारी यांनी रविवारी केला आहे.

याबाबत अजित पवार यांना विचारला असता अजित पवार म्हणाले, या प्रकरणांमध्ये चौकशी करावी आज केंद्रामध्ये आपले सरकार आहे तसंच राज्य सरकारमध्ये देखील आपलं सरकार आहे. तसेच पोलीस यंत्रणा देखील आपल्या ताब्यात आहे. त्यामुळे याची चौकशी करावी आणि यामध्ये जो दोशी असेल त्याच्यावरती कारवाई करण्यात येईल, असं अजित पवार यांनी सांगितला आहे.

ज्यावेळेस 26/11 घडलं त्यावेळेसच्या मुख्यमंत्र्यांनी, गृहमंत्र्यांची ती जबाबदारी होती. त्यांनी ती उत्तर द्यायला हवी, अजित पवार गृहमंत्री नव्हते. मी बोलल्याचा अर्थ कोणी काय काढायचा ते ज्याने त्यांनी ठरवावे, असंही अजित पवार यांनी म्हटले.

दरम्यान, या वक्तव्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आल्यानंतर माधव भंडारी यांनी पुन्हा माध्यमांशी संवाद साधला. माधव भांडरी म्हणाले, काल मी जे भाषण केलं त्याचा वेगळा अर्थ घेतला गेला. जे मी बोललो नाही ते तोंडामध्ये घातला आहे. पण मी 26/11 हल्ला माहिती होता की नाही, त्यावेळच्या सरकारला, एका प्रेस नोटद्वारे हल्ला होणार असल्याची शक्यता आहे, अशी माहिती दिली होती.

त्यातील 85% जागे सहित माहिती होती. पाच महिने अगोदर सरकारला जर माहिती होतं हल्ला होणार आहे, तर मग ती सरकारची जबाबदारी होती हल्ला रोखण्याची. माहिती असून सुद्धा राज्य सरकारने तो हल्ला का रोखला नाही. 26/11 हल्ल्यात अनेक अधिकारी आणि कर्मचारी शहीद झाले. मग आता राणाला भारतात, आल्यावर त्यावर चर्चा सुरू झाली, त्यावेळेसच्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी राज्यकर्त्यांनी यावर बोललं पाहिजे, असेही माधव भंडारी यांनी म्हटले.

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर वेगवेगळ्या विविध पातळींवरुन कारवाई; ‘या’ शिफारशींमुळे रुग्णालय मोठ्या अडचणीत

0

मागील काही दिवसांपासून गाजत असलेल्या तनीषा भिसे मृत्यू प्रकरणात विविध अहवालांतील निष्कर्ष लक्षात घेत डॉ. सुश्रुत घैसास आणि दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर कारवाई करण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्याचे समजते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही कारवाई वेगवेगळ्या पातळीवरून होणार आहे.

डॉ. घैसास आणि दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर कारवाई करण्याची परवानगी वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अहवालानुसार केली जाईल. रुग्णालयाला १० लाख रुपयाचा दंड ठोठावण्यात आला असून ही रक्कम मृत भिसे यांच्या मुलांच्या नावे मुदत ठेव योजनेत जमा केली जाईल.

इंडियन मेडिकल कौन्सिलच्या व्यावसायिक नियमांचे उल्लंघन झाल्याने मेडिकल कौन्सिलच्या माध्यमातून डॉ. घैसास आणि रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी अशी शिफारस समितीने केली आहे. महाराष्ट्र सुश्रुषागृह नोंदणी नियम २०२१ नुसार पुणे महापालिकेने कार्यवाही करावी.

मुंबई पब्लिक ट्रस्ट अ‍ॅक्ट १९५० चा भंग झाल्याने विधी व न्याय विभागाने धर्मादाय आयुक्तांमार्फत कारवाई करावी अशी शिफारस करण्यात आली आहे.

विधी व न्याय विभाग चौकशीअंतर्गत दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला १० लाख रुपये दंड ठोठावण्यात यावा अशी शिफारस करण्यात आली आहे.

यातील प्रत्येकी पाच लाखांच्या दोन मुदत ठेवी केल्या जातील आणि भिसे यांच्या दोन्ही मुली सज्ञान झाल्यावर व्याजासह त्यांना ही रक्कम द्यावी, अशी शिफारस करण्यात आली आहे.

या दोन्ही मुलींच्या उपचारांचा खर्च मुख्यमंत्री सहायता निधीतून याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला आहे.

व्यवस्थेत बदल

धर्मादाय रुग्णालय व्यवस्थेत मोठे बदल सुचवण्यात आले आहेत. धर्मादाय रुग्णालयातील रुग्णसेवा ही संपूर्णत: ऑनलाइन ठेवली जाईल. त्याचे केंद्रीय स्तरावरून नियोजन केले जाईल. मुख्यमंत्री धर्मादाय कक्षाच्या माध्यमातून हे नियोजन होईल. धर्मादाय रुग्णालयात येणाऱ्या कोणत्याही रुग्णाला अ‍ॅडव्हान्स मागता येणार नाही. धर्मादाय रुग्णालयाने १० टक्के निधी हा गरीब रुग्णांसाठी वापरला की नाही, याची माहिती नियमितपणे सादर करावी लागणार आहे. उद्या (ता. २२) होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या अहवालावर चर्चा होण्याची शक्यता आहे.