बौद्धजन पंचायत समितीच्या वतीने संत कबीरांची ६२८ वी जयंती मोठ्या उत्साहात संपन्न

0
3

मुंबई दि. ४ (रामदास धो. गमरे):  बौद्धजन पंचायत समिती केंद्रीय कार्यालय येथे थोर संत व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे दुसरे गुरु संत कबीर यांचा ६२८ वा जयंती महोत्सव उपकार्याध्यक्ष मनोहर सखाराम मोरे यांच्या अधिपत्याखाली बौद्धजन पंचायत समिती डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह, भोईवाडा, परेल, मुंबई १२ येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

सदर प्रसंगी संत कबीरांच्या व महामानवांच्या प्रतिमांना मान्यवरांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले तद्नंतर संस्कार समितीचे अध्यक्ष मंगेश पवार, मनोहर बा. मोरे, आदर्श बौद्धाचार्य व चिटणीस श्रीधर साळवी यांच्या सुमधुर आणि गोडवाणीने धार्मिक पूजापठण संपन्न झाले. समितीचे सरचिटणीस राजेश घाडगे यांनी आपल्या भारदस्त आवाजात लाघवी भाषाशैलीत सूत्रसंचालन व प्रास्ताविक सादर करीत असताना संत कबीर हे भारतातील एक थोर संत, विचारवंत, कवी आणि समाजसुधारक होते त्यांनी हिंदू आणि मुस्लिम धर्मातील अंधश्रद्धा, कर्मकांड आणि जातीभेद याला कडाडून विरोध केला त्यांनी मानवता, प्रेम, सत्य, सदाचार आणि ईश्वरभक्ती याचा संदेश दिला त्यांचे दोहे आजही सर्वसामान्य माणसांना मार्गदर्शक ठरतात असे नमूद करीत त्यांनी संत कबीरांच्या जीवनावर प्रकाश टाकला.

अधिक वाचा  महापालिकेत पुन्हा ५०० सुरक्षा रक्षक भरती संख्या थेट २४१५ ; ‘वाट्या’साठी सत्ताधाऱ्यांत जुंपली; १३६ कोटी ३१ लाख रुपयांचा खर्च

अध्यक्षीय भाषणात बोलत असताना मनोहर सखाराम मोरे यांनी “डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी संत कबीरांना गुरू का मानले तर भगवान गौतम बुद्धानंतर सम्राट अशोक त्यानंतर सातवाहन शासन व त्यानंतर संत कबीराने तथागत गौतम बुद्धांचा विचार आपल्या कलेच्या माध्यमातून मांडत असताना अंधश्रद्धेवर प्रहार केला आणि खऱ्या अर्थानं समता, बंधुता याचा संदेश देत समाजात जनजागृती केली” असे नमूद केले.

सदर प्रसंगी विवाह मंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ तथा रामदास धो. गमरे, कार्यालयीन सचिव संजय मोहिते, प्रदीप तांबे, लेखा परीक्षक तांबे गुरुजी (सावरकर), निवडणूक मंडळाचे सदस्य अशोक कदम, राहुल कदम, निलेश जाधव आदी मान्यवर आणि सर्व शाखांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अधिक वाचा  करणीयमेत्तसुत्त म्हणजे मैत्री, सद्भावना आचरणात आणण्याचा धम्म मार्ग होय – कल्याणमित्र महेश कांबळे

सरतेशेवटी राजेश घाडगे यांनी आपल्या भाषणात “बहुजन समाजातील प्रत्येक राष्ट्रपुरुषांचा जयंती महोत्सव असो स्मृतिदिन असो हा बौद्धजन पंचायत समितीच्या वतीने न चुकता आपण आपल्या परीने साजरा करीत असतो” असे नमूद केले त्याचप्रमाणे संत कबीरांचा ६२८ वा जयंती महोत्सव यशस्वीपणे साजरा करण्यासाठी अथक परिश्रम घेणाऱ्या सर्वांचे व उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.