सर्वात मोठी बातमी! शिंदेंच्या मंत्रिमंडळ सहभागाबद्दल सस्पेन्स अखेर दूर; ही नवी अट दिल्लीकडून मान्य होणार?

0
50

महाराष्ट्राच्या राजकारणातील अत्यंत महत्वाची अपडेट समोर आली आहे. विधानसभा निवडणुकीत मतदारांनी महायुतीला कौल दिला. यानंतर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस विराजमान होणार हे जवळपास निश्चित झाले आहे. आपण मंत्रिमंडळात असू म्हणत अजित पवारांनीदेखील उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याचे निश्चित केले आहे. असे असताना एकनाथ शिंदे यांनी याबद्दल कोणतीच वाच्यता केली नव्हती. शिंदे नाराज असल्याची चर्चा काही दिवसांपुर्वी रंगली होती. या पार्श्वभूमीवर आता विश्वसनीय सुत्रांकडून महत्वाची अपडेट समोर आली आहे.

काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नव्या मंत्री मंडळात सहभागी होण्यासाठी सकारात्मक असल्याची माहीती विश्वसनीय सुत्रांनी दिली आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नव्या मंत्री मंडळात सहभागी होण्यासाठी सकारात्मक असल्याची माहीती समोर आली आहे. एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पद स्वीकारणार आहेत तसेच सरकारमध्ये सामील होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. लवकरच याबद्दल अधिकृत घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

अधिक वाचा  15 सप्टेंबर 4 दिवस, 4 रात्र, पाचव्या दिवशी थेट आझाद मैदान; मुंबईला जाण्याचा जरांगेंनी सांगितला मार्ग; …आर या पारची लढाई!

वर्षा निवासस्थानी पार पडली. बंद दाराआड दोघांमध्ये सुमारे तासभर चर्चा झाली. त्यावेळी शिंदे यांनी गृहमंत्रीपदाची मागणी केली. जर देण्यात अडचणी असतील तर निर्णय होईपर्यंत रिक्त ठेवावे, अन्यथा चुकीचा मेसेज जाईल, असे सांगितले. त्यासोबतच गुरुवारी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचाच फक्त शपथविधी न करता सोबत काही आमदारांनाही मंत्री पदाची शपथ द्यावी, अशी मोठी मागणी केली आहे.

या मागणीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीतील हायकमांडसोबत चर्चा करून दोन्ही अटीबाबत कळवितो, असे सांगितले असल्याची माहिती विश्वसनीय सूत्राने दिली. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत निर्णय होण्याची शक्यता आहे.

संध्याकाळपर्यंत उत्तर

राज्यात सरकार स्थापन कऱण्यासाठी राज्यपालांनी महायुतीला निमंत्रण दिलं आहे. दरम्यान राज्यपालांची भेट घेतल्यानंतर महायुतीच्या तिन्ही नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली. एकनाथ शिंदे , देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी यावेळी आपल्या भूमिका मांडल्या. दरम्यान देवेंद्र फडणवीस यांच्या विधानावरुन एकनाथ शिंदे अद्यापही मंत्रिमंडळात सहभागी होण्यासाठी तयार नसल्याचं दिसत आहे. एकनाथ शिंदे यांनी संध्याकाळपर्यंत तुम्हाला उत्तर मिळेल असं सांगितलं आहे. तर दुसरीकडे अजित पवारांनी मी तर शपथ घेतोय असं सांगितल्यानंतर एकच हशा पिकला.

अधिक वाचा  करणीयमेत्तसुत्त म्हणजे मैत्री, सद्भावना आचरणात आणण्याचा धम्म मार्ग होय – कल्याणमित्र महेश कांबळे

काय म्हणाले फडणवीस?

“मी एकनाथ शिंदे यांना भेटून शिवसेनेच्या वतीने त्यांना मंत्रिमडंळात राहण्याची विनंती केली आहे. शिवसेना, महायुतीच्या सर्व आमदारांची तशी इच्छा आहे. त्यांचाही सकारात्मक प्रतिसाद मिळेल याची खात्री आहे,” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. “आम्ही महायुतीच्या वतीने राज्यपालांना पत्र दिलं आहे. राज्यात नवं मंत्रिमंडळ स्थापन कऱण्यासाठी दावा केला आहे. राज्यपालांनी आमचा दावा घेतल्यानंतर आम्हाला 5 तारखेला संध्याकाळी 5.30 वाजता शपथविधीची वेळ नेमून दिली आहे. आज भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस, जनस्वराज्य, युवा स्वाभिमान, रासप आणि अपक्ष अशी एक मोठी महायुती झालेली आहे. या सगळ्यांच्या सहीचं पत्र दिलं आहे,” अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

अधिक वाचा  कोर्टाच्या आदेशानंतर मनोज जरांगे यांची ही तयारी अन् मुंबईतील आंदोलनाबाबत घेतला ”हा” मोठा निर्णय

 “मी शिवसेनेचे अध्यक्ष आणि विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानतो. त्यांनी शिवसेनेच्या वतीने माझ्या समर्थनार्थ पत्र दिलं आहे. महायुतीचा मुख्यमंत्री म्हणून माझा शपथविधी करावा अशी विनंती त्यांनी राज्यपालांना केली आहे. तसंच राष्ट्रवादीच्या वतीने अजित पवार यांनीही त्याच आशयाचं पत्र दिलं आहे. आमच्या मित्रपक्षांनीही तशाच प्रकारची विनंती केली आहे. सर्वांच्या विनंतीचा मान ठेवून राज्यपालांनी निमंत्रित केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत उद्या 5.30 वाजता आझाद मैदानात हा सोहळा पार पडला जाणार आहे. तिन्ही पक्षाचे नेते उपस्थित असतील,” असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.