कर्नाटकमध्ये 5.8 किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्याची स्थिती पावसाचा मोठा इशारा, पुढील 24 तास धोक्यात, तब्बल इतक्या जिल्ह्यात…

0
6

राज्यात पावसाला सुरूवात झाली. पावसाचा जोर कमी होण्याचा अंदाज असतानाच मुसळधार पाऊस कोसळत आहे. अनेक ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस सुरू आहे. सातारा, पुणे आणि रायगडच्या घाटमाथ्यावर जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला. राजस्थानमधील श्रीगंगानगर शाहजहानपूर, बंकुरा, ईशान्य भारतातील मिझोरामपर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला. कर्नाटकमध्ये 5.8 किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. रत्नागिरी, ठाणे, नाशिक, कोल्हापूर जिल्हाच्या घाटमाथ्यावर अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यात काही भागात पाऊस हजेरी लावेल. यासोबतच मुंबईतही आज पाऊस असेल. काही भागात रात्रभर मुंबईत पाऊस कोसळत आहे. सकाळीही पाऊस सुरू होता. दमदार पाऊस हजेरी लावताना दिसत आहे.

अधिक वाचा  महापालिकेत पुन्हा ५०० सुरक्षा रक्षक भरती संख्या थेट २४१५ ; ‘वाट्या’साठी सत्ताधाऱ्यांत जुंपली; १३६ कोटी ३१ लाख रुपयांचा खर्च

संततधार पाऊस काही भागात कोसळत असल्याने पिकांना अधिक फायदा होत आहे. यासोबतच धरणे ओव्हर फ्लो झाली आहेत. धरणामधील पाणी पातळीत मोठी वाढ झाली. पुढील दोन दिवस राज्यात पाऊस कायम राहिल. मुंबईतील पाणीसाठा त्याच्या एकूण क्षमतेच्या सुमारे 88.93 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. जवळपास धरणे भरली आहेत. ज्यामुळे पिण्याचे पाण्याचे संकट मिटल्याचे दिसतंय.भंडारा शहरासह जिह्यातील ग्रामीण भागात पावसानं चांगलीचं हजेरी लावली. काल आणि आज दुसऱ्या दिवशी पावसानं हजेरी लावल्यानं वातावरणात गारवा निर्माण झाला असून भात उत्पादक शेतकऱ्यांसाठी हा पाऊस दिलासादायक ठरला आहे. हवामान विभागानं भंडारा जिल्ह्याला आज ग्रीन अलर्ट दिलेला असतानाही भांसारसह लाखनी, साकोली, तुमसर, मोहाडी तालुक्यातील काही भागात पावसाच्या सरी बरसल्या.

अधिक वाचा  FDA ची सर्वात मोठी कारवाई; ११ कोटींची औषधं जप्त, ६०७ उत्पादक आणि २,२९५ विक्री आस्थापनांची तपासणी २१ जणांना बेड्या

नंदुरबार जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे 250 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पिण्याच्या पाण्याची चिंता अद्याप कायम आहे. जिल्ह्यात अनेक भागांत झालेल्या पावसामुळे खरीप पिकांना जीवनदान मिळाले असून, पेरणीच्या कामांना वेग आला आहे. मात्र, पिण्याच्या पाण्याच्या दृष्टीने आवश्यक असलेला दमदार आणि सलग पाऊस अद्याप झालेला नाही. नंदुरबार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विरचक धरणातील पाणीसाठ्यात काही प्रमाणात वाढ झाली असली, तरी तो समाधानकारक नसल्याचे चित्र आहे.