Home Blog Page 99

पुणे विमानतळ बिझी पुण्याच्या आकाशात विमानांच्या ‘घिरट्या’; नागरिकात चर्चा, कारण तरी काय? 

0

22 एप्रिल रोजी पहलगाम दहशतवादी हल्ला झाला. त्यात 26 जणांना जीव गमवावा लागला. तेव्हापासून भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढला आहे. दोन्ही देशांनी एकमेकांना हवाई सीमा बंद केली आहे. नियंत्रण रेषेवर गोळीबार सुरू आहे. पाकिस्तानने तर अंतर्गत सुद्धा युद्धाची तयारी सुरू केली आहे. नागरिकांना सातत्याने युद्ध होणार असल्याने खबरदारी म्हणून काय करायचे याची माहिती देण्यात येत आहे. त्यातच आकाशात सतत विमानांच्या घिरट्या दिसत असल्याने पुणेकरांमध्ये चर्चा रंगली आहे.

२०० ते २५० विमानाच्या घिरट्या

भारतीय विमानांसाठी पाकिस्तानचे हवाई क्षेत्र बंद झाले. परिणामी, उत्तर भारतातून विशेषतः दिल्ली, लखनौ व अमृतसर विमानतळावरून उत्तर अमेरिका, मध्य पूर्व, युरोप, पश्चिम आशियातील शहरांना जाण्यासाठी आता महाराष्ट्राच्या व काही प्रमाणात गुजरातच्या हवाई क्षेत्राचा वापर केला जात आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या आकाशात विमानांची संख्या वाढली आहे. दररोज सुमारे २०० ते २५० विमाने महाराष्ट्र व गुजरातच्या हवाई क्षेत्राचा वापर करून अरबी समुद्रावरून जात आहेत.

हवाई उड्डाणाचा कालावधी वाढला

पहलगाममध्ये पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झाल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्ताननेभारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद केले आहे. यामुळे विमानांचा उड्डाण कालावधी वाढला आहे. उत्तर भारतातील विमानांना गुजरात आणि महाराष्ट्रातील हवाई मार्गाचा वापर करावा लागत आहे.

डेस्टिनेशननुसार उड्डाणाचा कालावधी वेगळा असला, तरी एक ते दोन तासापर्यंतचा कालावधी वाढला आहे. अंतर वाढल्याने विमानांचे इंधन जास्त प्रमाणात वापरले जात आहे. अशा परिस्थितीत विमान कंपन्यांनी नफे खोरीचा विचार केलेला नाही.अद्याप विमानाच्या तिकीट दरात वाढ केलेली नसल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.विमान कंपन्यांनी रीरूट केल्यावर तो मार्ग लांबचा ठरणार आहे. इंधन व मनुष्यबळाचा वापर वाढल्याने येत्या काळात विमान कंपन्या तिकीट दरात वाढ करण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रवाशी नाराज झाले आहेत. तर या विमान वाहतुकीचा पुणे विमानतळाला किती फायदा होतो हे लवकरच समोर येईल.

‘भेटी लागी जीवा, लागिलीसे आस’…संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचं वेळापत्रक जाहीर

0

आपल्या लाडक्या विठुरायाला भेटण्यासाठी लाखो वारकरी आषाढात पंढरपूरला जातात. टाळ- मृदुंग,भगवी पताका आणि मुखी विठूनामाचा गजर करत वैष्णवांचा मेळा विठूरायांच्या दर्शनासाठी जातो. महाराष्ट्रातून वेगवेगळ्या ठिकाणाहून संतांच्या पालख्या विठुरायाच्या दर्शनाला निघतात. संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. १८ जून २०२५ रोजी संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे प्रस्थान देहूतून होणार आहे. तर आळंदीतून १९ जून २०२५ रोजी संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे प्रस्थान पंढरपूरच्या दिशेने होईल. दोन्ही संस्थानाकडून पालख्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलेय.

संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचा प्रवास

संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी १९ जून रोजी आळंदी येथील दर्शन मंडप इमारतीत पहिला मुक्काम करेल. २० जून रोजी पालखी पुण्यातील भवानीपेठ येथे पोहोचेल. तर २१ जून रोजी पुण्यातच मुक्कामी असेल. २२ जून रोजी पुण्याहून सासवडला प्रवास करताना शिंदे छत्री येथे आरतीसाठी विसावा आणि हडपसर येथे दुपारची विश्रांती होईल. २३ जून रोजी सासवड येथे मुक्काम असेल. २४ जून जेजुरी, २५ जून वाल्हे, २६ जून रोजी लोणंद, २७ जून तरडगाव, २८ जून फलटण आणि २९ जून बरड येथे पालखी थांबेल. ३० जून नातेपुते, १ जुलै माळशिरस, २ जुलै वेळापूर, 3 जुलै भंडीशेगाव आणि 4 जुलै वाखरी येथे मुक्काम होईल.

संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचा प्रवास

संत तुकाराम महाराजांची पालखी १८ जून रोजी श्रीक्षेत्र देहू येथून पंढरपूरकडे प्रस्तान करेल. आकुर्डी येथे पहिला मुक्काम असेल. २० तारखेला आकुर्डीमधून निघेल अन् नानापेठ पुणे येथे मुक्कामी असेल. २१ जून रोजी तुकाराम महाराज यांची पालखी निवडुंगा विठ्टळ मंदिरात दिवसभरेल. २२ तारखेला लोणीकारभोर, २३ तारखेला यवत, २४ तारखेला वरवंड, २५ तारखेला उडंबडी गवळ्याची, २६ तारखेला बारमती,२७ जून सणसर, २८ जून निमगाव केतकी, २९ जून इंदापूर,३० जून सराटी,१ जुलै अकलूज, २ जुलै बोरगाव श्रीपूर, ३ जुलै पिराची कुरोली, ४ जुलै वखारी (पंढरपूर) येथे मुक्काम असेल.

भरबाजारात हिंदुत्ववादी कार्यकर्त्याच्या हत्येनं खळबळ; पोलिसांचे ६ मेपर्यंत संपूर्ण शहरात प्रतिबंधात्मक आदेश

0

हिंदुत्ववादी कार्यकर्ता सुहास शेट्टी याची भरबाजारात मंगळुरू जवळील सुरथकल येथे हत्या करण्यात आल्याने खबरदारीचा उपाय म्हणून परिसरामध्ये प्रतिबंधक आदेश लागू करण्यात आलेले आहेत. सध्या देशातील हिंदू मुस्लिम वाद अत्यंत टोकावर असताना भरबाजारामध्ये हिंदुत्ववादी कार्यकर्त्याची हत्या परिसरामध्ये तणाव निर्माण करत असल्याने पोलिसांनी  आजपासून ६ मेपर्यंत संपूर्ण शहरात प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. जुलै २०२२ मध्ये झालेल्या एका हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि हिंदुत्ववादी कार्यकर्ता सुहास शेट्टी याची भरबाजारात हत्या करण्यात आली. त्यामुळं परिसरात तणाव निर्माण झाला आहे. या घटनेनंतर पोलिसांनी शुक्रवारपासून ६ मेपर्यंत संपूर्ण शहरात प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत.

सुहास शेट्टीची हत्या गुरुवारी रात्री साडेआठच्या सुमारास शहरातील बाजपे पोलीस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आली. अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला होता. या घटनेनंतर परिसरात तणाव वाढल्यानं पोलिसांनी कलम १६३ अंतर्गत मंगळुरू शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत.

शहराचे पोलीस आयुक्त अनुपम अग्रवाल यांनी हे आदेश जारी केले आहेत. त्यानुसार, जाहीर सभा, बैठका, रॅली आणि घोषणाबाजी करणे, तसेच शस्त्र म्हणून वापरात असलेल्या वस्तू बाळगण्यास मनाई करण्यात आली आहे. सुहास शेट्टी हा कथितपणे स्थानिक हिंदू संघटनांशी संबंधित होता, असे सांगण्यात येत आहे. त्याच्याविरोधात अनेक गुन्हे दाखल होते. पोलिसांच्या माहितीनुसार, सुहास शेट्टी हा सुरथकलमध्ये २०२२ मधील मोहम्मद फाजिल याच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी होता.

भरबाजारात हत्या

मंगळुरू शहराच्या बाहेरील बाजपेमधील किन्नीपदावू परिसरात गुरुवारी साडेआठ वाजता शेट्टी याची हत्या झाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेट्टी हा आपल्या साथीदारांसह एका कारमधून जात होता. त्याचवेळी अन्य एक कार आणि पिकअप वाहनातून आलेल्या पाच ते सहा हल्लेखोरांनी त्याला अडवलं. त्यावेळी त्याच्यासोबत पाच साथीदारही होते. किन्नीपदावू येथे ही कार अडवण्यात आली होती. त्यानंतर हल्लेखोरांनी धारदार शस्त्रांनी शेट्टीवर हल्ला केला. त्यात तो गंभीर जखमी झाला. त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे त्याला मृत घोषित करण्यात आले.

तुरुंगातून सुटून आला होता सुहास शेट्टी

पोलिसांच्या माहितीनुसार, शेट्टी काही दिवसांपूर्वीच विविध गुन्ह्यांत शिक्षा भोगून तुरुंगातून बाहेर आला होता. शेट्टीच्या हत्येनंतर शेकडोंचा जमाव रुग्णालयाबाहेर जमा झाला होता. विविध संघटनांशी कथितरित्या संबंध असल्याच्या कारणातून त्याची हत्या झाली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. हे प्रकरण संवेदनशील असल्याने पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी मोहीम हाती घेतली आहे.

ही हत्या पूर्वनियोजित असल्याचा संशय पोलिसांच्या प्राथमिक तपासानंतर व्यक्त करण्यात आला आहे. शेट्टीच्या हत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे.

हिटमॅन रोहित शर्माने RCB च्या चाहत्यांना डिवचलं; ‘६०० धावा करण्याचा काय उपयोग, जर ट्रॉफी नसेल.’

0

प्रत्येक हंगामात, मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार आणि सध्याचा सलामीवीर रोहित शर्मा आयपीएल हंगामात मोठी कामगिरी करत नाही किंवा ऑरेंज कॅप जिंकत नाही याबद्दल चर्चा असते.तथापि, रोहित शर्माचा याच्याशी काहीही संबंध नाही. त्याला असे वाटते की त्याने हंगामात ४०० धावा केल्या तरी संघाने ट्रॉफी जिंकावी. त्याने स्पष्टपणे म्हटले आहे की जर तुम्ही ५००-६०० धावा केल्या आणि संघ हरला तर त्यात काही फायदा नाही. एक प्रकारे, रोहित शर्माने असे काही म्हटले आहे, जे विराट कोहली आणि केएल राहुलच्या चाहत्यांचे मन दुखावेल.

धावा करायला कोणाला आवडत नाही?

कारण विराट-राहुल असे फलंदाज आहेत, जे जवळजवळ प्रत्येक हंगामात ५००-६०० किंवा त्याहून अधिक धावा करतात, परंतु संघ ट्रॉफी जिंकत नाही. यावर बोलताना रोहित शर्माने विमल कुमारला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, “धावा करायला कोणाला आवडत नाही? मी हे इतक्या वर्षांपासून सांगत आहे. जेव्हा तुम्ही चांगले करत नाही तेव्हा ते निश्चितच निराशाजनक असते. जर तुम्ही संघात योगदान दिले नाही तर ते दुखावते. मी माझी खेळण्याची पद्धत बदलू शकत नाही. मला माहित आहे की त्यात एक धोका आहे, परंतु मी तीच चूक पुन्हा पुन्हा न करण्याचा प्रयत्न करतो.”

मी संपूर्ण डाव वेड्यासारखा खेळू शकत नाही – रोहित शर्मा

हिटमॅन म्हणाला, “पहिल्या सहा षटकांमध्ये, मी खूप चान्स घेतो आणि मला माहित आहे की एकदा मी पहिले सहा षटके खेळलो की, त्यानंतर काय करायचे ते मला माहित आहे. मला खेळ चालू ठेवावा लागतो आणि मी संपूर्ण डाव वेड्यासारखा खेळू शकत नाही, परंतु मला सुरुवातीला चान्स घेणे आवडते. हा माझा खेळ आहे.” यानंतर एका हंगामात ५००-६०० धावा करण्याच्या प्रश्नावर हिटमॅन पुढे म्हणाला, “मला एक प्रभावी खेळी खेळावी लागते. माझे ध्येय कधीच असे नव्हते की मला एका हंगामात इतक्या धावा कराव्या लागतील. मी सामने जिंकण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही ६०० धावा केल्या, ७०० धावा केल्या किंवा ८०० धावा केल्या तरी काही फरक पडत नाही. जर तुम्ही ट्रॉफी किंवा सामना जिंकला नाही, तर काही फरक पडत नाही. मी २०१९ मध्ये हे शिकलो आहे.”

सामने किंवा ट्रॉफी जिंकत, नसाल तर इतक्या धावा करुण उपयोग काय?

रोहित शर्मा म्हणाला, “जर तुम्ही विश्वचषकात अंतिम फेरीत पोहोचला नाही आणि अंतिम सामना जिंकला नाही, तर मी त्या ५०० किंवा ६०० धावांचे काय करेन? ठीक आहे, ते तुमच्यासाठी चांगले आहे, पण ते संघासाठी चांगले नाही, बरोबर? पण मी असे म्हणत नाही की मी २०-३० धावा केल्या तरी संघ जिंकत आहे. मी तेच म्हणत नाही. माझे लक्ष संघासाठी कसे योगदान देऊ शकतो यावर आहे. असे योगदान जे संघाला फायदेशीर ठरते. मी तेच विचार करतो. पहा, जेव्हा जेव्हा मुंबई इंडियन्सने ट्रॉफी जिंकली आहे, तेव्हा आमच्या संघातील कोणीही ऑरेंज कॅप जिंकलेली नाही.”

पहलगाम हल्ल्यानंतर युद्धाची शक्यता पाकिस्तानला 57 मुस्लिम देशांचा पाठिंबा

0

पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानावर कारवाई करण्यासाठी भारत सज्ज झाला आहे. भारताकडून कारवाईचे संकेत दिल्याने पाकिस्तानची घाबरगुंडी उडाली आहे. त्यामुळे जगभरातून मदत मिळवण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून करण्यात येत आहे. त्यामध्ये 57 मुस्लिम राष्ट्रांची संघटना असणाऱ्या ओआयसीने (ऑर्गेनाइजेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन) पाकिस्तानला साथ देण्याची घोषणा केली आहे. ओआयसीकडून (OIC) भारताकडून कारवाई हा शांततेसाठी मोठा धोका असल्याचे म्हटले आहे.

न्यूयाॅर्कमध्ये OIC संघटनेच्या राजदूतांची बैठक झाली. या बैठकीत पाकिस्ताने दक्षिण आशियाच्या शांततेबाबत मुद्दा उपस्थित केला. तसेच संयुक्त राष्ट्रामधील पाकिस्तानचे राजदूत आसिम इफ्तिखार अहमद यांच्याकडून भारत उचलत असलेले पाऊले ही राजकीय हेतुने प्रेरित आणि बेजबाबदार असल्याचे म्हटले आहे. त्यांनी OIC संघटनेतील देशांना भारताच्या भूमिकेवर आणि त्याद्वारे होणाऱ्या परिणामांचा विचार करण्याचे आवाहन केले होते.

द एक्सप्रेस ट्रिब्यून या वर्तमानपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, OIC च्या राजदुतांनी पाकिस्तान आणि त्यांच्या जनतेला समर्थन असल्याचे म्हटले आहे. तसेच भारत पाकिस्तानामधील तणाव हा चर्चेच्या माध्यमातून कमी केला जावा तसेच काश्मीरच्या मुद्द्यावर शांततेच्या मार्गाने तोडगा काढण्याचे आवाहन केले आहे. संघटनेने आपण पाकिस्तानसोबत असल्याचेही म्हटले आहे.

अमेरिकेचे उपराष्ट्रपती काय म्हणाले?

भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाची शक्यता वर्तवली जात असताना अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी व्हान्स यांचे वक्तव्य चर्चेत आले आहे. त्यांनी म्हटले आहे की, भारताने दहशतवाद्यांच्या विरोधात कारवाई जरूर करावी. पण युद्धाची परिस्थिती निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी.

OIC मध्ये कोणते मुस्लिम देश?

OIC मुस्लिम देशांची संघटनेची स्थापना 1969 मध्ये झाला. या संघटनेमध्ये आशिया, अमेरिका, आफ्रिका, युरोप खंडातील जवळपास सर्वच देशांचा समावेश आहे. सौदे अरेबिया, इराण, इराक, पाकिस्तान, बांग्लादेश, तुर्की, अफगाणिस्तान, इंडोनेशिया, इजिप्त, लिबिया, सोमालिया, नायजेरिया, अल्बानिया अशा देशांचा यामध्ये समावेश आहे.

चुन-चुनकर मारेंगे

गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्लीत एका कार्यक्रमात पाकिस्तानाला जाहीर इशारा दिला. ते म्हणाले की, हा मोदींचा भारत आहे. चुन-चुनकर मारेंगे. पहलगाम हल्ल्यानंतर ज्यांना वाटते आहे की हा त्यांचा विजय आहे त्यांना सोडले जाणार नाही. दहशतवाद मुळापासून संपवला जाईल.

पहलगाम हल्ला ताजा तरी ‘या’ राज्यात सरकार स्थापन करण्याच्या हालचाली, अमित शाह अ‍ॅक्टिव्ह

0

पहलगाम हल्यानंतर आंतकवाद्यांना धडा शिकवण्याची तयारी केंद्रात सुरू आहे. लष्कराला कारवाईचे पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आले आहे. या सगळ्यांमध्ये आता मणिपूरमध्ये सरकार बनवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत

मणिपूरच्या 21 आमदारांनी गृहमंत्रालयाला पत्र लिहून राज्यातील राष्ट्रपती राजवट हटवण्याची मागणी केली. तसेच सरकार स्थापन करण्याची मागणी केली आहे. गृहमंत्रालयाकडून हे पत्र सार्वजनिक करण्यात आले आहे.आमदारांचे पत्र गृहमंत्रलायला मिळाल्याने नवे सरकार स्थापन करण्याची जबाबदारी अमित शाह यांच्यावर आली आहे. आमदारांनी पत्रात दावा केला आहे की, राष्ट्रपती शासन लागू होऊन तीन महिने झाले तरी देखील राज्यात शांतता नाही. हिंसाचाराच्या घटना घडतच आहेत. नवे सरकारच्या स्थापनेमुळे हिंसाचार शांत होईल, असा दावा पत्रात करण्यात आला आहे. सरकार स्थापन करण्यासाठी राज्यपालांकडे दावा न करता अमित शाहांना पत्र लिहिल्याने काँग्रेसने आमदारांच्या कृतीवर टीका देखील केली आहे.

पुन्हा हिंसाचार भडकण्याची भीती

आमदारांनी आपल्या पत्रात राष्ट्रपती राजवट कायम राहिल्याचा राज्याची स्थितीत बदल होणार नसल्याचे म्हटले आहे. कारण त्यासाठी कोणतेही ठोस पाऊल उचलल्याचे दिसत नाही. त्यामुळे लोकांमध्ये भीती आहे की पुन्हा हिंसाचार भडकेल. अनेक नागरिक आणि संघटना राष्ट्रपती राजवटीचा विरोध करत आहेत. केंद्र सरकारने फेब्रुवारी महिन्यात जी आकडेवाडी दिली आहे. त्यानुसार मणिपूरमधील हिंसाचारात तब्बल 250 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

आमदारांवर काँग्रेस भडकली

21 आमदारांनी राष्ट्रपती राजवट हटवण्याची मागणी करणारे पत्र राष्ट्रपतींना लिहिल्याने मणिपूर काँग्रेसचे अध्यक्ष मेघचंद्र सिंह यांनी राग व्यक्त केला. राज्यपालांना बाजुला करत थेट गृहमंत्रालयाला पत्र लिहिण्यावर आक्षेप घेतला. त्यांनी म्हटले की या आमदारांना इंफाळमधील राजभवनमध्ये जायला हवे होते तेथे सरकार बनवण्याचा दावा करायला हवा होता. मात्र, त्यांनी पत्र लिहण्यासाठी गृहमंत्रालय आणि पंतप्रधान कार्यालय निवडले. त्यांच्या कृत्य पाहाता ते सरकार स्थापन करण्याबाबत गंभीर नसल्याचे दिसते.

पुण्यातील ग्रामपंचतींचा ठराव बाहेरच्या मुस्लिमांना गाव मशिदीत नो एन्ट्री…; ‘पहलगाम’नंतर गावांमध्ये तणाव वाढला

0

पहलगाम दहशतवादी हल्ल्याचे परिणाम देशभर झाल्याचं दिसतंय. पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यात तर एक वेगळाच प्रकार समोर आला आहे. अनेक गावांमध्ये तणाव वाढला असून, घोटावडे, पिरंगुट, वडकी आणि लवळे या गावांच्या ग्रामपंचायतींनी एक वेगळा निर्णय घेतला आहे. बाहेरील मुस्लिमांना मशिदींमध्ये नमाज अदा करण्यास बंदी घालणारे ठराव या ग्रामपंचायतींनी मंजूर केले आहेत.

गावांमधील सार्वजनिक ठिकाणी बॅनर लावून या निर्णयाची माहिती देण्यात आली आहे. दर शुक्रवारी मशिदींमध्ये वाढणारी गर्दी कायदा आणि सुव्यवस्थेवर परिणाम करू शकते, त्यामुळे फक्त गावातील स्थानिक रहिवासीच मशिदीत नमाज अदा करू शकतील, असं ठरावात म्हटलं आहे.

पिरंगुटचे पोलिस पाटील प्रकाश पवळे म्हणाले की, गावातील शांतता आणि सुरक्षितता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, या निर्णयामुळे स्थानिक मुस्लिम समाजात भीती आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. लवळे गावातील शैस्तेखान इनामदार म्हणाले, पूर्वी आम्ही गावातील मशिदीपासून दूर असलेल्या शेडमध्ये नमाज अदा करायचो, आता परिस्थिती जास्त भयावह झाली आहे.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर जातीय तणाव वाढला

पिरंगुट सुन्नी मस्जिद ट्रस्टचे अध्यक्ष नबिलाल शेख म्हणाले की, ही मशीद संपूर्ण तालुक्यातील सर्वात मोठी मशीद आहे. बाहेरूनही लोक इथं येतात. आता आमचे नातेवाईकही नमाज पठणासाठी येऊ शकणार नाहीत. 76 वर्षांत पहिल्यांदाच असं वातावरण पाहायला मिळालं आहे.

कोणीही तक्रार दाखल केलेली नाही?

वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल विभूते म्हणाले की, आतापर्यंत कोणत्याही मुस्लिम व्यक्तीने तक्रार दाखल केलेली नाही. हा निर्णय सर्व समुदायांच्या संमतीने घेण्यात आला आहे असंही पोलीस म्हणाले.

मोदी ‘निवृत्तीच्या उंबरठ्यावर’ म्हणत ठाकरेंचा बिनशर्त पाठिंबा!; कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांचे स्लीपर सेल सक्रिय

0

पर्यटकांच्या सुरक्षेच्या कारणास्तव कश्मीर खोऱ्यातील 48 पर्यटनस्थळे बंद करण्याचा निर्णय आता गृहखात्याने घेतला. म्हणजे कश्मीरात गेलेल्यांच्या सुरक्षेबाबत सरकारला खात्री नाही. कश्मीर पूर्णपणे सुरक्षित व दहशतवादमुक्त झाल्याचे सरकार सातत्याने सांगत होते ते खरे नव्हते. पर्यटनस्थळे बंद करण्याचा निर्णय जम्मू-कश्मीर सरकारने घेतला, पण कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांचे स्लीपर सेल सक्रिय झाल्याची माहिती केंद्रीय गुप्तचर खात्याने पुरवली आहे,” असं ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलं आहे. ‘सामना’च्या अग्रलेखामधून पाकिस्तानविरुद्ध युद्ध लढण्यासंदर्भातील भारताची तयारी किती आहे यासंदर्भात भाष्य करण्यात आलं आहे.  विशेष म्हणजे महाराष्ट्रातील सत्ता नाट्यानंतर सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करणाऱ्या शिवसेनेनं यावेळेत त्यांची बाजू घेतली आहे.

इंदिरा गांधी आणि मोदींच्या काम करण्यातील फरक

“पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला कसा घ्यायचा याबाबत पंतप्रधान मोदी यांनी तीनही सैन्य दलांना सर्वाधिकार दिले आहेत. पाकिस्तानला मूंहतोड जवाब देण्याची जबाबदारी सशस्त्र दलांना दिली. याबाबतची वेळ आणि लक्ष्य आता सैन्याने ठरवायचे आहे. पाकिस्तानच्या बाबतीत काय करायचे याचा निर्णय राजकीय इच्छाशक्तीनुसार पंतप्रधान मोदींना घेता आला असता. एकतर मोदी हे पंतप्रधान आहेत. पाकिस्तानला धडा शिकवण्याची भाषा ते सातत्याने करीत आहेत. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हेसुद्धा पाकड्यांच्या बाबतीत आक्रमक आहेत व पाकिस्तानच्या घरात घुसून मारण्याच्या बाबतीत त्यांचे मत ठाम आहे, पण निर्णय घेण्याची वेळ आली तेव्हा भारतीय सैन्याला मोकळीक दिल्याचे स्पष्ट केले. घरात घुसून मारायचे की नाही हे ठरत नाही. 1971 साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी जनरल सॅम माणेकशॉ यांना सकाळीच भेटीसाठी बोलावले आणि मार्च महिन्यातच पाकिस्तानवर चढाई करण्याचे सांगितले. तेव्हा जनरल माणेकशॉ यांनी तसे करण्यास नकार दिला. सेना युद्धासाठी पूर्णपणे तयार नसल्याचे त्यांनी पंतप्रधान गांधी यांना तोंडावर सांगितले. त्यामुळे इंदिरा गांधी नाराज झाल्या. ‘‘मोसम, हवा, बर्फ यामुळे परिस्थिती अनुकूल नाही,’’ असे ते म्हणाले. त्यांनी इंदिरा गांधींकडे सहा महिन्यांचा वेळ मागितला, पण शंभर टक्के विजयाची गॅरंटी दिली. सॅम माणेकशॉ यांच्या नेतृत्वाखालीच युद्ध लढले गेले व त्यात पाकिस्तानचा दारुण पराभव झाला. पाकिस्तानचे दोन तुकडे झाले व तो निर्णय इंदिरा गांधी यांनी राजकीय इच्छाशक्तीच्या बळावर घेतला. युद्ध कसे व कोठे करायचे हे सर्वाधिकार पंतप्रधान गांधी यांनी भारतीय सैन्यप्रमुखांनाच दिले, पण युद्ध हवे हा निर्णय इंदिरा गांधी यांचा होता. आता हे पंतप्रधान मोदी यांनी भारतीय सैन्यावर सोडले आहे. दिल्लीत सातत्याने बैठका सुरू आहेत,” असं ठाकरेंच्या सेनेनं इंदिरा गांधी आणि पंतप्रधान मोदींच्या कामाच्या शैलीतील फरकावर बोट ठेवताना म्हटलं आहे.

“पाकड्यांना प्रत्यक्ष युद्धाचा अनुभव नाही”

“दहशतवादी कारवाया होणार आहेत व काही प्रमुख नेत्यांच्या जीवितास धोका आहे, अशी माहिती आता गुप्तचरांना मिळाली. पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादी आमच्या सुरक्षा दलांवर हल्ले करण्याच्या तयारीत असल्याची माहिती केंद्रीय गुप्तचर खात्याच्या लोकांना मिळाली आहे. गुप्तचरांचे हे काम वाखाणण्यासारखेच आहे. फक्त त्यांना पहलगाम हल्ल्याबाबत माहिती मिळाली नाही व त्याआधी पुलवामा हल्ल्याची खबर लागली नाही. हे असे का घडले? याचा तपास होणे गरजेचे आहे. पहलगामचा दहशतवादी हल्ला विसरता येणार नाही. पाकिस्तान हा कमजोर, कमकुवत देश आहे. धर्मांध टोळ्यांच्या हातात देशाची सूत्रे आहेत. पाकिस्तानच्या राजकारणावर लष्कराचे प्राबल्य आहे. तेथे निवडणुका वगैरे हे थोतांड आहे. कोणाला विजयी करायचे व कोणाला तुरुंगात पाठवायचे याचा निर्णय लष्कर घेत असते. लष्कराने पाकिस्तानातील अनेक राजवटी उलथवून लावल्या व स्वतः सत्ता हाती घेतली, पण या पाकड्यांना प्रत्यक्ष युद्धाचा अनुभव नाही,” असं लेखात म्हटलं आहे.

पाकिस्तानचे चार तुकडे करून मोदी…

“पाक लष्करी अधिकाऱ्यांच्या छाताडावर असंख्य पदके आणि फिती लटकताना पाहून आश्चर्य वाटते. ही पदके, फिती मिळवायला हे लोक कधी व कोणत्या युद्धभूमीवर गेले? पाक लष्कराचा पूर्ण वेळ राजकारणात जातो. पुन्हा तेथील लष्कर भ्रष्टाचाराने पोखरले आहे ते वेगळेच. अशा पाक लष्कराने आता उगाच वल्गना करू नयेत. भारतीय सैन्यात निष्ठा, नीती, संयम आणि शौर्याचा अपूर्व मिलाफ आहे. त्या जोरावर ते कोणत्याही कठीण प्रसंगाशी सामना करू शकतात. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांनी पाकड्यांशी लढण्याचे सर्वाधिकार सैन्याला दिले हे बरे झाले. स्वतः मोदी यांना प्रत्यक्ष युद्धभूमीवर वावरण्याचा व भूमिगत राहून कार्य करण्याचा अनुभव आहे. बांगलादेशच्या स्वातंत्र्यासाठी आपण सत्याग्रह केला व त्यासाठी तुरुंगातही गेल्याचा खुलासा खुद्द मोदी यांनी मागे केला आहे. म्हणजे मोदी यांना देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्रत्यक्ष युद्धात सहभागी होण्याचा अनुभव आहे. पाकबरोबरच्या युद्धात मोदी यांचा हा अनुभव कामी येईल. बांगलादेश युद्धाच्या वेळी मोदी 20-22 वर्षांचे असतील. आता ते 75 वर्षांचे आहेत. म्हणजे राजकीय निवृत्तीच्या उंबरठ्यावर आहेत. जाता जाता ते उरलेल्या पाकिस्तानचे चार तुकडे करून इतिहासात अमर होतील. त्यामुळे मोदी यांच्या पाठीशी सगळ्यांनी उभे राहायला हवे,” असं ‘सामना’च्या अग्रलेखात म्हटलं आहे.

मूर्खपणा विरोधकांनी करू नये

“कश्मीरवर चर्चा करण्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा अशी मागणी झाली आहे. सर्वपक्षीय बैठकीत मोदी व त्यांच्या भूमिकांना सढळ हस्ते पाठिंबा दिल्यावर आता स्वतंत्र अधिवेशन घेऊन काय साध्य करणार? मोदी यांनी पाकड्यांना धडा शिकवण्यासाठीचे अधिकार भारतीय सैन्याला दिले आहेत. त्यामुळे कश्मीरचे काय? पाकिस्तानला धडा शिकवणार काय? हे प्रश्न मोदींना विचारण्याचा मूर्खपणा विरोधकांनी करू नये. आपले लष्कर सक्षम आहे. लष्कराची फत्ते झाल्यावर पंतप्रधान मोदींचे काम सुरू होईल,” असा विश्वास ठाकरेंच्या शिवसेनेनं व्यक्त केला आहे.

पहलगाम हल्ल्यात पाकच्या कटाचे पुरावे मिळाले, NIA अहवालात मोठे खुलासे, बेताब व्हॅलीत शस्त्रास्त्रं लपवली

0

जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथील बैसरन व्हॅलीत गेल्या आठवड्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला आहे. 26 निष्पाप पर्यटकांच्या मृत्यूमुळे फक्त भारतच नव्हे तर अख्खं जग हळहळलं. या हल्ल्याचा तपास NIA कडून करण्यात येत असून त्याच संदर्भात एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. पहलगाममधील हल्ल्यात पाकिस्तानच्या कटाचे पुरावे मिळाले असं NIA च्या सूत्रांमार्फत समजतंय. NIA च्या अहवालात पाकविरोधात पुरावे मिळाल्याचा उल्लेख असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पहलगाम येथील दहशतलवादी हल्ल्याचा प्राथमिक तपास अहवाल NIA कडून तयार करण्यात आला आहे.

या अहवालात पाकिस्तानी दहशतवादी संघटना लष्कर ए तोयबा, आयएसआय आणि पाकिस्तान लष्कराने हल्ल्याचा कट रचल्याची माहिती असल्याचे समोर आलं आहे. बेताब व्हॅलीमध्ये दहशतवाद्यांनी शस्त्रं लपवली होती असंही तपासात उघड झालं आहे. याप्रकरणी तब्बल दीडशे जणांची चौकशी करण्यात आली. तसेच घटनास्थळी मिळालेल्या गोळ्यांच्या पुंगळ्या तपासासाठी पाठवण्यात आल्या आहेत. NIA हा अहवाल लवकरच केंद्रीय गृहमंत्र्यांकडे सादर करणार आहे.

एनआयएकडून सविस्तर रिपोर्ट तयार

पहलगाम येथील दहशतलवादी हल्ल्यानंतर जो प्राथमिक तपास करण्यात आला त्याचा सविस्तर रिपोर्ट एनआयएने तयार केला आहे. या मध्ये पाकिस्तानविरोधातील सर्व पुरावे सापडल्याचे नमूद करण्यात आलं आहे. पाकिस्तानी आर्मी, लष्कर आणि इतर दहशतवादी संघटना त्यांच्याविरोधातील सर्व पुरावे या रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आले आहेत.

कुठे लपवली शस्त्रं ?

त्याचसोबत हल्ला करणारे दहशतवादी हे बैसरन व्हॅलीमध्ये नेमके कसे आले, पहलगामपर्यंत ते कसे पोहोचले, त्यांनी कोण-कोणत्या मार्गांचा वापर केला  तसेच त्यांनी जिथे शस्त्र लपवली त्या ठिकाणाचा उल्लेखही एनआयएच्या अहवालात करण्यात आला आहे. निष्पाप पर्यटकांवर गोळीबार करणाऱ्या, त्यांचा जीव घेणाऱ्या दहशतवाद्यांनी बेताब व्हॅलीमध्ये सर्व शस्त्रास्त्रं लपवून ठेवली होती, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

योग्य ठिकाणांचा वापर करत दहशतवादी पहलगामच्या बैसरन व्हॅलीत पोहोचले आणि मंगळवारी दुपारी त्यांनी पर्यटकांवर गोळीबार करत त्यांना लक्ष्य केले.  मात्र या सगळ्या तपासादरम्यान, OGW  या दहशतवादी संघटनेची सगळी जी काही सूत्रं आहेत ती कशा पद्धतीने ऑपरेट होत होती, ते दहशतवादी हँडलरच्या संपर्कात कशा पद्धतीने होते, या सगळ्या मुद्यांचा सविस्तर रिपोर्ट एनआयएने तयार केलेला आहे. हा रिपोर्ट आता गृहमंत्रायलकडेही सादर करण्यात येणार आहे.

मात्र या हा रिपोर्ट तयार करत असताना पहलगाममध्ये जिथे हल्ला झाला, तिथे वेगवेगळी आधुनिक यंत्रणांचा वापर करून एनआयने गेल्या काही दिवसांत आरोपींचा माग काढण्याचा प्रयत्न केला आहे. पाकिस्तानी आर्मी आणि तेथील दहशतवादी संघटना कशा पद्धतीने या दहशतवाद्यांना ऑपरेट करत होत्या,  या सगळ्याचे पुरावे या प्राथमिक रिपोर्टमध्ये आहेत. येत्या काळात भारत काय भूमिका घेतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अमेरिका भारताच्या समर्थनात, TAFT ची अमेरिकन टीम भारतीय यंत्रणांना प्रशिक्षण देणार पाकच्या तंबूत घबराट

0

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढलेला आहे. जगाचं लक्ष सध्या या दोन्ही देशांवर आहे. पाकिस्तान सतत युद्धबंदीचं उल्लंघन करून भारताला चिथावणी देताना दिसतोय. तर दुसरीकडे भारतानेही सध्या आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यातच आता अमेरिका सुद्धा भारताच्या मदतीला धावून येताना दिसतेय. भारताने अमेरिकेसोबत एक मोठा लष्करी करार केला आहे.

अमेरिकेने भारताला सागरी देखरेखीसाठी तंत्रज्ञान आणि उपकरणं विकण्याच्या कराराला मान्यता दिली आहे. हा करार इंडो-पॅसिफिक मेरीटाईम डोमेन अवेअरनेस (IPMDA) कार्यक्रमांतर्गत करण्यात आला आहे. भारताच्या सागरी सीमांवर देखरेख आणि सुरक्षा मजबूत करणे आहे हा या कराराचा उद्देश आहे.

पहलगाम’नंतर तणाव

हा करार 130 दशलक्ष डॉलर्सचा आहे. भारताने अमेरिकेला सी व्हिजन सॉफ्टवेअर, टेक्निकल असिस्टन्स फील्ड टीम (TAFT) प्रशिक्षण, रिमोट सॉफ्टवेअर आणि इन्टेलिटिक सपोर्ट आणि इतर उपकरणांची मागणी केली होती. सी-व्हिजन सॉफ्टवेअर हे वेब-आधारित सॉफ्टवेअर आहे. सागरी हालचालींवर नजर ठेवण्यासाठी ते महत्वाचं आहे. त्यात भारताच्या गरजांनुसार काही विशेष सुधारणाही समाविष्ट आहेत. हे सॉफ्टवेअर जहाजांच्या हालचाली, बेकायदेशीर कामं आणि सागरी सीमांमधील पर्यावरणीय धोक्यांवर लक्ष ठेवण्यास मदत करते.

तांत्रिक सहाय्य आणि प्रशिक्षण (TAFT) मधील अमेरिकन तज्ञांची एक टीम भारतीय यंत्रणांना प्रशिक्षण देणार आहेत. त्यामुळे नौदल आणि इतर दल या तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे वापर करू शकणार आहेत. त्याच वेळी, रिमोट सपोर्ट सॉफ्टवेअर आणि डेटा विश्लेषणासाठी रिमोट टेक सपोर्ट करणार आहे.

दरम्यान, या करारामुळे दोन्ही देशांमधील संरक्षण सहकार्याला चालना मिळेल. अमेरिका भारताला एक प्रमुख संरक्षण भागीदार मानतो. त्यामुळे इंडो-पॅसिफिक आणि दक्षिण आशियातील शांतता आणि स्थिरतेसाठी ते महत्त्वाचं आहे. यूएस डिफेन्स सिक्युरिटी कोऑपरेशन एजन्सी (DSCA) नुसार, या करारामुळे प्रादेशिक लष्करी संतुलनावर परिणाम होणार नाही. त्यामुळे भारतात अमेरिकन लष्करी कर्मचाऱ्यांच्या तैनातीचीही आवश्यकता भासणार नाही.