Home Blog Page 98

नवले पुलावर ब्रेक फेल-ट्रकची धडक, दुचाकीस्वार टायरखाली, अवघ्या ८-१० तासांत दोन भीषण अपघात आणि दोन जणांचा मृत्यू

0

पुणे : नवले ब्रिजवरील अपघात मालिका काही थांबण्याचे नाव घेत नाही. अवघ्या १० तासांत नवले ब्रिजवर दुसऱ्यांदा भीषण अपघाताची घटना घडली आहे. वेगात असलेल्या ट्रकने दोन ते तीन वाहनांना जोरदार धडक दिल्याने एक दुचाकीस्वार जागीच ठार झाला असून, इतर काही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

प्राथमिक माहितीनुसार, हा अपघात ट्रकचा ब्रेक फेल झाल्यामुळे घडला. ब्रेक फेल झाल्यानंतर ट्रक चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि समोरून जाणाऱ्या वाहनांवर ट्रक आदळला. या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला असून, इतर वाहन चालक व प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे.

या अपघातात तीन ते चार वाहनांचे नुकसान झाले असून, काही गाड्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अपघातस्थळी बघ्यांची गर्दी झाली होती. त्यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.

विशेष म्हणजे, याच नवले ब्रिजवर काही तासांपूर्वी आणखी एक अपघात झाला होता. त्या अपघातातही एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. त्यामुळे अवघ्या ८-१० तासांत दोन अपघात आणि दोन जणांचा मृत्यू झाल्याने नवले ब्रिजवरील सुरक्षेच्या प्रश्नावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की, या ठिकाणी अपघात टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्यात याव्यात. ट्रक व मोठ्या वाहनांची तपासणी, वाहतूक नियंत्रणासाठी अतिरिक्त उपाय गरजेचे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

गोरे बदनामी प्रकरणात नवा ट्विस्ट; रामराजे अन्‌ संबंधित महिलेच्या संभाषणाची क्लिप व्हायरल, धक्कादायक विधाने आली समोर

0

ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या बदनामी प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते तथा विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि संबंधित महिला यांच्यातील संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे.त्यामध्ये ‘मी थोडीसी सोय करतो,’ असे विधान रामराजेंनी केल्याचे दिसत आहे, त्यामुळे संबंधित महिलेला रामराजेंनी आर्थिक मदत केल्याचे त्या संभाषणातून दिसून येत आहे. यातील संभाषणावरून हा व्हिडिओ दिवाळीतील असल्याचे स्पष्ट होत आहे.

दरम्यान, गोरे प्रकरणातील महिलेशी बोलतानाचा ऑडिओ व्हायरल झाल्यामुळे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. वडुज पोलिसांनी कालच रामराजे नाईक निंबाळकर यांना पोलिस ठाण्यात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर आज ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने निंबाळकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. व्हायरल झालेल्या या ऑडिओ क्लिपची ‘सरकारनामा’ पुष्टी करत नाही.

ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेला एक कोटीची रक्कम स्वीकारताना अटक करण्यात आली होती. तिच्या पाठोपाठ पत्रकार तुषार खरात, शिवसेना शिंदे गटाचे नेते अनिल सुभेदार यांनाही अटक करण्यात आली आहे. त्यानंतर शुक्रवारी वडूज पोलिसांनी रामराजे नाईक निंबाळकर यांच्यासह १२ जणांना पोलिस ठाण्यात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते.

वडूज पोलिसांकडून समन्स जाहीर झाल्यानंतर अवघ्या काही तासांतच दुसऱ्याच दिवशी संबंधित महिला आणि रामराजे नाईक निंबाळकर यांच्या संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे, त्यामुळे सातारा जिल्ह्यात चर्चेला एकच उधाण आले आहे. आता रामराजेंचे पाऊल काय असणार, याकडे संपूर्ण सातारा जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमध्ये रामराजे हे प्रदीप असे नाव घेत आहेत. तुम्ही इतकं धाडस केलंय. तुम्ही घरीच थांबा, प्रदीप तुमच्याकडे येईल. तुमची थोडी सोय करतो, असे ते म्हणताना दिसून येत आहेत. त्याहून मोठं म्हणजे दिवाळीनंतर कूपमध्ये तुमची सोय करतो, कूपर माझ्या शेजारीच आहे, असेही ते महिलेशी बोलत असल्याचे स्पष्ट होत आहे.

मी एका ठिकाणी नोकरीसाठी गेले होते, पण त्याच्या माणसांनी तेथे येऊन सांगितले की, तुम्ही त्या बाईला कामावरून ठेवू नका. संबंधित लोकांनी एका महिन्यात मला कामावरून काढून टाकलं होतं. या प्रकरणात मी संपूर्णपणे डिस्टर्ब झाले आहे. माझे आर्थिक गणित कोलमडले आहे. मी काही ठिकाणी कामं मिळवली होती. पण जयकुमारनी माझ्या विरोधात गुन्हा नोंदवला आणि त्याच्या बातम्या छापून आल्यामुळे माझी कामे गेली. मी हे पैशासाठी करतेय, असा प्रचार त्यांनी सुरू केला. दिवाळी असतानाही मी सध्या मोकळी झाले आहे, असेही संबंधित महिला या ऑडिओ क्लिपमध्ये बोलत आहे.

कुपरमध्ये तुमचं दिवाळीनंतर काम होईल. तुमची सोय होऊन जाईल. पुण्यात माझ्या ओळखीचं एक हॉस्पिटल आहे, त्या ठिकाणी काम करू शकता, असं रामराजे संबंधित महिलेशी बोलताना म्हणत आहेत. त्यावर मी पुण्यात जायला तयार आहे. साताऱ्यात मला त्याची लोक त्रास देत आहेत, असेही संबंधित महिला बोलताना स्पष्ठपणे ऐकायला येत आहे. हे सांगताना मात्र रामराजेंचे नाव पुढे येऊ नये, असेही ती म्हणत आहे. मात्र, जयकुमार गोरेंनी माझंही नाव घेतलं आहे, असे रामराजे सांगत आहेत. त्यावर त्यांनं घेऊद्यात. पण मी म्हटलं पाहिजे की आपल्या दोघांमध्ये कॉन्टक्ट आहेत. त्यावर रामराजेही ‘त्याला कोण घाबरतंय’ असे म्हणत आहेत.

दरम्यान, वडूज पोलिसांकडून आलेले समन्स आणि व्हायरल ऑडिओ क्लिपचे टायमिंग जुळून आल्याचे दिसून येत आहे. खरं खोटं हे पोलिस तपासात निष्पन्न होईल. मात्र, या ऑडिओ क्लिपमुळे रामराजेंच्या भोवती संशयाचे धुके निर्माण झाले आहे.

शक्तिपीठ हा अडाणी यांना रेड कार्पेट टाकण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांची खटाटोप सुरू; काँग्रेसही राज्यात ‘भाकरी’ फिरवणार- सपकाळ

0

विधानसभेतील दारुण पराभवानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पाठोपाठ आता काँग्रेसमध्ये भाकरी फिरणार आहे. आता काँग्रेसमध्येही संघटनात्मक बदल होणार आहे, असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिले आहेत. 2025 मध्ये देशाबरोबरच महाराष्ट्रातही काँग्रेसमध्ये संघटनात्मक बदल होतील. जो सर्वात जास्त फसवणूक आणि भ्रष्टाचार करतो त्याला सरकार शब्बासकी देत आहे आणि राज्य सरकारच्या शंभर दिवसाच्या कामगिरीवर हर्षवर्धन सपकाळ यांनी टीका केली आहे. त्यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबद्दलही भाष्य केलं. ते म्हणाले की, धनंजय मुंडे राजीनामा देण्यासाठी तयार नव्हते, जनतेच्या उद्रेकामुळे भीतीपोटी सरकारने मुंडेंचा राजीनामा घेतला.

शरद पवारांनंतर काँग्रेसही राज्यात ‘भाकरी’ फिरवणार

शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनंतर आता काँग्रेसमध्येही संघटनात्मक बदल होणार असल्याचे संकेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिले आहेत. 2025 हे वर्ष काँग्रेसने संघटनात्मक वर्ष म्हणून घोषित केले आहेत .देशभर काँग्रेसमध्ये बदल होतील त्याचबरोबर महाराष्ट्रातीलही संघटनेत बदल होतील असं सपकाळ यांनी सांगितले. जो जास्त भ्रष्टाचार करेल त्याला सरकार शब्बासकी देते अशी टीका राज्य सरकारच्या शंभर दिवसाच्या कारभारावर सपकाळ यांनी केली आहे. संविधानिक पद्धतीने अजित पवार मुख्यमंत्री झाले तर आनंदच होई. दुःख व्हायचं कारण नाही अशा शब्दात अजित पवार यांना मुख्यमंत्री होण्याच्या मुद्द्यावर हर्षवर्धन सपकाळ यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

ज्या ज्या ठिकाणी जातीजातीमध्ये तेढ निर्माण झाला आहे काही, चुकीच्या घटना घडतात त्या ठिकाणी सद्भावना यात्रा सुरू आहे. धनंजय मुंडे यांचा राजीनामा हा नैतिकतेच्या मुद्द्यावर झालेला नाही. संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो व्हायरल झाल्यानंतर संताप उसळल्यामुळे घाबरलेल्या सरकारने त्यांचा राजीनामा घेतला. धनंजय मुंडे राजीनामा द्यायला तयार नव्हते. गौतम अदानी आणि शरद पवार यांच्या भेटीवर सपकाळ यांनी बोलणं टाळलं. गौतम अदानी यांच्या भेटीवर शरद पवार यांनीच बोललेलं योग्य राहील. शक्तिपीठ महामार्ग हा गौतम अडाणी यांना रेड कार्पेट टाकण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांची खटाटोप सुरू आहे. त्यामुळे शक्तिपीठ महामार्गाला आम्ही विरोध करतो आहोत, असं त्यांनी स्पष्ट सांगितलं.

पौड येथील नागेश्वर मंदिरात देवीच्या मूर्तीची विटंबना; गावात तणावाचे वातावरण, ग्रामस्थांकडून गाव बंदची हाक

0

पौड (ता. मुळशी) येथील नागेश्वर मंदिरातील देवीच्या मूर्तीची विटंबना केल्याचा दुर्दैवी प्रकार घडला असून या घटनेनंतर दोन व्यक्तींवरती पौड पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तरी हा सर्व प्रकार शुक्रवारी 2 मे रोजी दुपारच्या सुमारास घडला असल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकारामुळे संपूर्ण गावामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यावेळी ग्रामस्थांच्या वतीने गाव बंदची हाक देण्यात आली. या दुर्दैवी घटने बाबत शिवाजी मारुती वाघवले (वय 34) यांनी पौड पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली असता त्यांच्या तक्रारीनुसार चांद नौषाद शेख (वय 19) आणि नौषाद शादाब शेख (वय 44) यांच्यावर पौड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

या घटनेबाबत पौड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चांद नौषाद शेख याने मंदिरात प्रवेश करून मंदिराचे गेट बंद केले. त्यानंतर त्याने अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीला खाली पाडून मूर्तीची विटंबना केली. ही संपूर्ण घटना सी. सी. टी.व्ही. कॅमेऱ्यामध्ये कैद झाली असुन या घटनेनंतर आरोपी चांद नौषाद शेख (वय 19) आणि नौषाद शादाब शेख (वय 44) यांच्यावर पौड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचे गांभीर्य ओळखता मंदिर व मशीदला पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या संपूर्ण घटनेचा पुढील तपास हा पौड चे पोलिस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी कांबळे व त्यांचे इतर सहकारी करीत आहेत.

या दुर्घटनेनंतर या ठिकाणी कुठलाही अनुसूचित प्रकार घडू नये. यासाठी पुणे मुख्यालयातील अतिरिक्त पोलीस पथक तसेच हवेली विभागातील पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले होते. त्यानंतर मुळशी तालुक्यातील मुख्य चौकामध्ये नाकाबंदी करण्यात आली. तसेच कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी काही गावांमधील मुख्य मंदिरे व मज्जिद या ठिकाणी चोख बंदोबस्त देखील ठेवण्यात आला होता. हे कृत्य उघड होताच नागरिकांनी संबंधित आरोपीला चोप दिला त्यानंतर त्याला पोलिसांच्या हवाली केले. पोलिसांच्या वतीने संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करीत त्याला कोर्टा समोर हजर केले. या घटनेनंतर ग्रामस्थांच्या वतीने निदर्शने करीत पौड येथे शांततेच्या मार्गाने मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर हा मोर्चा पौड पोलीस स्टेशनं येथे आल्यानंतर ग्रामस्थांच्या वतीने पौड पोलिसांना निवेदन देण्यात आले. यामध्ये संबंधित आरोपीला संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली.

पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींना पहिल्यांदाच भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा

0

पहलगाम दहशतवादी हल्लयानंतर संपूर्ण देशात संतापाचीलाट आहे, या हल्ल्यात २६ निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला. या हल्ल्यानंतर आता पहिल्यांदाच जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी शनिवारी पंतुप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. ही भेट पंतप्रधानांच्या निवासस्थानी झाली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, साधारणपणे अर्धातास चाललेल्या या बैठकीत दोन्ही नेत्यांनी हल्ल्यानंतरच्या परिस्थितीवर चर्चा केली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी पंतप्रधान मोदींशी सिंधू पाणी कराराच्या स्थगितीसंदर्भात आणि त्याच्या परिणामांसंदर्भातही चर्चा केली. या दहशतवादी हल्ल्यानंतर ओमर अब्दुल्ला म्हणाले होते. आमचे राजकारण एवढे संकुचित नाही की, या संकटाच्या काळात आम्ही सरकारकडे संपूर्ण राज्याचा दर्जा मागू.

तत्पूर्वी, जम्मू काश्मीर विधानसभेच्या विशेष अधिवेशनाला संबोधित करताना ओमर अब्दुल्ला म्हणाले होते, “काही दिवसांपूर्वी आम्ही या सभागृहात भेटलो होतो, तेव्हा अर्थसंकल्पासह काही इतर महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली होती. तेव्हा आपण अशा परिस्थिती भेटू असे कुणालाही वाटलं नव्हतं. या हल्ल्याने आम्हाला अंत:करणापासून हादरवून टाकलं आहे. मी त्या नौदल अधिकाऱ्याच्या विधवा पत्नीला काय उत्तर देऊ, आपल्या वडिलांना रक्ताच्या थारोळ्यात पडलेलं पाहणाऱ्या त्या मुलाला काय उत्तर देऊ, असा प्रश्न मला पडला आहे.”

ओमर अब्दुल्ला पुढे म्हणाले होते, “मागच्या २६ वर्षांमध्ये पहिल्यांदा जम्मू काश्मीरमधील लोकांना कुठल्याही हल्ल्यानंतर अशा प्रकारे घराबाहेर पडताना पाहिले आहे. कठुआपासून श्रीनगरपर्यंत लोक घराबाहेर आले आणि त्यांनी काश्मिरींना असे हल्ले नको आहेत, असे सांगितले. हे माझे शब्द नाहीत तर हे प्रत्येक काश्मिरी नागरिकाचे शब्द आहेत. या देशातील कुठल्याही विधानसभा किंवा संसदेपेक्षा जम्मू काश्मीर विधानसभा पहलगाममध्ये झालेल्या २६ लोकांच्या मृत्यूचे दु:ख अधिक समजते. तुमच्यासमोर असे लोक आहेत. ज्यांच्यापैकी कुणी आपले जवळचे नातेवाईक गमावले आहेत. तर कुणी आपले वडील, कुणी आपले काका गमावले आहेत. आपल्यापैकी अनेक सहकारी असे आहेत ज्यांच्यावर हल्ले झालेले आहेत. २००१ च्या ऑक्टोबर महिन्यात श्रीनगरमध्ये झालेल्या हल्ल्यात ४० जणांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे पहलगाममध्ये मारल्या गेलेल्या लोकांचं दु:ख या विधानसभेपेक्षा अधिक कुणाला समजू शकत नाही,” अशा शब्दात ओमर अब्दुल्ला यांनी आपली भावना व्यक्त केली होती.

बाभुळसर बू! येथे महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण

0

१मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त बाभुळसर बू!ग्रामपंचायत कार्यालय समोर मनोज मचाले संत तुकाराम सोसायटी चेअरमन यांच्या हस्ते ध्वजास श्रीफळ वाढवून तसेच सर्व ज्येष्ठ मंडळी यांच्या हस्ते पूजन करून, ध्वजारोहण सरपंच सौ.दिपाली महेंद्र नागवडे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी प्रमुख उपस्थिती मध्ये बाभुळसर विका सहकारी संस्था चेअरमन भरतभाऊ नागवडे, मा.सरपंच गणेश मचाले, माजी उपसरपंच सुनील देशवंत, ग्रामपंचायत सदस्या मनीषा नागवडे, पोलिस पाटील मीना पाडळे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संतोष नागवडे, महेंद्र नागवडे मा.उपाध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती, रामदास नेते नागवडे, जयवंत नागवडे शिरूर तालुका सरचिटणीस राशप गट, सचिन नागवडे संचालक बाभुळसर वि.का, सोमनाथ नागवडे, नानासो नागवडे, भोसले महाराज, दत्तात्रय वाल्मिक नागवडे चेअरमन कशिमाई दूध संस्था, दिलीप बाप्पू नागवडे, बाळासो थोरात, ग्रामसेवक गायकवाड, अमित नागवडे, कृष्णा पाडळे, शिपाई भंडलकर, मुख्याध्यापक चवधर, कोथिंबीरे सर, प्रतिभा म्हस्के, मीना माने आदी ग्रामस्थ आणि विद्यार्थी उपस्थित होते.

यादिनानिमित्त सर्व ग्रामस्थांनी गावा मध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात आले.सरपंच,ग्रामस्थ आणि शाळा व्यवस्थापन समिती यांच्या वतीने जिल्हा परिषद शाळेमध्ये शासनाचा चावडी वाचन या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांनी चावडी वाचन केले.

मॉडर्न विकास मंडळ, पुणे तर्फे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी मध्ये तृतीय क्रमांक मिळवलेल्या कु. ऋतुजा वऱ्हाडे यांचा सन्मान

0

मॉडर्न विकास मंडळ, पुणे या संस्थेच्या वतीने दिनांक ०१ मे २०२५ रोजी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून पुण्याचे नाव देशपातळीवर गौरव पूर्णः कामगीरी करणारी कु.ऋतुजा वऱ्हाडे या १७ वर्षीय विध्यार्थिनीने राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी(NDA) प्रवेश परीक्षेच्या १५४ व्या कोर्सच्या निकालात ऐतिहासिक यश मिळवले. देशात प्रथम (AIR 1) सर्वसाधारण यादीत तृतीय क्रमांक पटकावत तिने महाराष्ट्रासह संपूर्ण भारताला अभिमानास्पद कामगिरी केली.

या तिच्या अभिमानास्पद कामगिरी बद्दल माजी केंद्रीय मंत्री मा.प्रकाशजी जावडेकर यांच्या हस्ते गौरविण्यात आले, या प्रसंगी भाजपा महाराष्ट्र कार्यालयीन मंत्री मा.रवीजी अनासपुरे, प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक मा.प्रवीणजी बढेकर, संपादक सकाळ माध्यम समूह (मल्टीमिडिया) चे श्री.अंकितजी काणे, नगरसेवक मा. जयंतजी भावे, डॉ.संदीप बुटाला व सौ.मनीषाताई बुटाला हे मान्यवर प्रमुख उपस्थित होते.

तसेच यशोतेज अकादमीचे संचालक श्रीयुत तेजस पाटील सर यांना देखील गौरविण्यात आले, विशेष म्हणजे कु.ऋतुजा वऱ्हाडे हिने यशोतेज अकादमी मध्ये श्रीयुत तेजस पाटील सर यांचे मार्गदर्शन घेतले.

मॉडर्न विकास मंडळ महाराष्ट्र दिनानिमित्त रक्तदान शिबिराला उत्साही प्रतिसाद; शहरभरातील मान्यवरांच्याही भेटी अन् शुभेच्छा 

0

मॉडर्न विकास मंडळ, पुणे या संस्थेच्या वतीने दिनांक ०१ मे २०२५ रोजी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून सलग ३५ व्या वर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन माजी केंद्रीय मंत्री मा.प्रकाशजी जावडेकर यांच्या हस्ते करण्यात आले, या प्रसंगी पुणे शहर भाजपा अध्यक्ष मा.धीरजजी घाटे, भाजपा महाराष्ट्र कार्यालयीन मंत्री मा.रवीजी अनासपुरे, प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक मा.प्रवीणजी बढेकर, संपादक सकाळ माध्यम समूह (मल्टीमिडिया) चे श्री.अंकितजी काणे, पुणे मनपा मा. नगरसेविका सौ.मोनिकाताई मोहोळ, भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष मा.करणजी मिसाळ, नगरसेवक मा. जयंतजी भावे, यांच्या प्रमुख उपस्थित कार्यक्रम संपन्न झाला.

या रक्तदान शिबिरामध्ये १८२ रक्तदात्यांनी रक्तदान केले. या प्रसंगी नगरसेवक मा.दीपकजी पोटे, भाजपा पुणे शहर सरचिटणीस मा.पुनीतजी जोशी, भाजपा कोथरूड मध्य मंडलाचे अध्यक्ष निलेशजी कोंढाळकर, भाजपा कोथरूड दक्षिण मंडलाचे अध्यक्ष कुलदीपजी सावळेकर, सरचिटणीस दीपकजी पवार, बाळासाहेब टेमकर, अँड. मितालीताई सावळेकर, सचिन मोकाटे, दत्ताभाऊ भगत, सौ.अश्विनीताई जाधव, सौ.सुप्रियाताई माझिरे, सौ.विद्याताई टेमकर, दिनेश माझिरे, दिलीपराव उंबरकर, गिरीशजी भेलके, श्रीमती स्वातीताई मोहोळ, अमितजी तोरडमल, कुणालजी तोंडे, सूचित देशपांडे, बाळासाहेब विचारे, सुनीलशेठ गेहलोत, रवींद्र सारूक, सिताराम खाडे, सागर शेडगे इत्यादी मान्यवरांनी रक्तदान शिबिराला भेट दिली. या ३५ व्या रक्तदान शिबिराचे संयोजन डॉ.संदीप बुटाला व सौ.मनीषाताई बुटाला यांनी केले. हे शिबीर यशस्वी करण्यासाठी मंडळाच्या सर्व पदाधिकारी व हितचिंतकांनी विशेष मेहनत घेतली.

Training and Certificate Distribution by Symbiosis Skills University for Employees of Avinash Cargo Pvt. Ltd.

0

 

Pune, 23 April 2025 – “Business and trade are constantly evolving, and so are the ways in which they are operated. Therefore, employees working in any organization must continually learn and master new technical and industrial skills. It is essential to stay updated with technologies like Digital Technology, Artificial Intelligence, and Machine Learning. Symbiosis Skills University is actively working to prepare both students and working professionals for these emerging fields. As part of this initiative, the University has provided training and certificates to 29 managerial-level employees of Avinash Cargo Pvt. Ltd. on various topics,” shared Dr. Swati Mujumdar, Pro-Chancellor, Symbiosis Skills and Professional University, during the certificate distribution ceremony.

The School of Ports, Terminal Management and Logistics at Symbiosis Skills and Professional University successfully conducted a 4-month Leadership Development Program (January–April 2025) for the managerial employees of Avinash Cargo Pvt. Ltd. (ACPL). The impactful journey concluded with a Certificate Distribution Ceremony.

The second batch of the program included team leads and frontline leaders from the CRM team, Sales team, Logistics Operations, and Export Operations Management, representing the second division of ACPL. A total of 29 participants received training in various subject areas.

Shri Avinash Shelke, Director of Avinash Cargo Pvt. Ltd., shared, “The training provided by Symbiosis Skills University is extremely beneficial for our employees. Most of them have only basic educational backgrounds and often face challenges that require higher and more modern training. This type of training equips them with essential skills like decision-making, leadership, and teamwork. It also helps them stay up to date in a fast-changing work environment.”

Mr. Raghavan Santhanam, Director of the School of Ports, Terminal Management and Logistics at SSPU, said, “There is a growing need for highly skilled employees in business. Although there are numerous schools and universities in India, students rarely receive the kind of training actually needed for real-world work. Hands-on experience is hard to come by, and Symbiosis Skills University is working extensively to bridge this gap.”

Earlier, in the first batch of the program, 30 Country Managers from the first division of Avinash Cargo Pvt. Ltd. received training under the Certificate Program in Competency Development in the Logistics Sector.

देशातील पहिल्या 8900 कोटींच्या डीप-सी ऑटोमेटेड बंदराचं मोदींच्या हस्ते लोकार्पण; 30 वर्षाचं स्वप्न…

0

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळमध्ये 8,900 कोटी रुपये खर्चाच्या व्हिझिंजम आंतरराष्ट्रीय बंदराचं उद्घाटन केलं आहे. यावेळी मुख्यमंत्री पिनाराई विजयनही उपस्थित होते. व्हिझिंजम बंदराचं उद्घाटन केल्यानंतर मोदी यांनी अत्यंत महत्त्वाचं विधान केलं. एकीकडे विशाल समुद्र असून तिथे संधी आहे. तर दुसरीकडे नैसर्गिक सौंदर्य आहे. या दोन्हींच्यामध्ये व्हिझिंजम इंटरनॅशनल डीप वॉटर मल्टीपर्पज सीपोर्ट आहे. हा पोर्ट नव्या युगाच्या विकासाचं प्रतिक आहे, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनुी आज सकाळी 10.15 वाजता तिरवनंतपुरम शहरातून हेलिकॉप्टरने बंदर परिसरात आले. हार्ड हॅट घालून मोदींनी बंदराची पाहणी केली. बंदरावर असलेल्या सुविधांचा आढावाही घेतला. त्यानंतर दुपारी 11.33 वाजता त्यांनी केरळचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर, मुखय्मंत्री पिनराई विजयन, अदानी समूहाचे चेअरमन गौतम अदानी आणि तिरूवनंतपुरमचे काँग्रेस खासदार शशि थरूर यांच्या उपस्थितीत पहिल्या टप्प्याचं औपचारिक उद्घाटन केलं.

या बंदराच्या उद्घाटनानंतर आता केरळ वैश्विक सागरी मानचित्रावर दिमाखात विराजममान होईल. हे बंदर तिरुवनंतपुरम जिल्ह्यात आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापार आणि शिपिंगमध्ये भारताची भूमिका बदलू शकते. यावेळी अदानी यांनीही भाषण केलं. व्हिझिंजममध्ये इतिहास, नियती आणि संधी एकसाथ आली तर केरळ पुन्हा एकदा भारताचं प्रवेशद्वार होईल. केरळचं 30 वर्षाचं स्वप्न साकार होईल, असं गौतम अदानी म्हणाले.

डिसेंबर 2015मध्ये करारावर सह्या

व्हिझिंजम इंटरनॅशनल सीपोर्ट लिमिटेडचे माजी एमडी आणि सीईओ एएस सुरेश बाबू यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केलं. 2014मध्ये चौथे टेंडर काढण्यात आलं. जवळपास पाच कंपन्यांनी टेंडर मिळवण्यास पात्र ठरल्या होत्या. त्यातील केवळ तिघांनीच टेंडर दस्ताऐवज खरेदी केले. शेवटी अदानी यांनी मूल्य बोली दिली. आणि सप्टेंबर 2015मध्ये करारावर स्वाक्षऱ्या झाल्या. त्यानंतर डिसेंबर 2015पासून कामाला सुरुवात झाली, असं सुरेश बाबू म्हणाले.

आपल्याला इथे एक आंतरराष्ट्रीय ट्रान्सशिपमेंट पोर्ट मिळालं हे खूप बरं झालं. हे भारतासाठीची एक योजना आणि अदानी कंसेशनेअर असल्याने त्याची विशेषज्ञतेच्यासोबत हे बंदर चांगलं काम करेल याची मला आशा आहे. कंसेशनेअरसमोर येणाऱ्या अडचणी पाहता हे काम केवळ अदानीच करू शकले असते. कारण भारत आणि केरळची परिस्थिती ते जाणून आहेत. त्यांच्याकडे या क्षेत्राचं नॉलेज आहे, असंही त्यांनी सांगितलं.

ऐतिहासिक क्षण

केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी हा ऐतिहासिक क्षण असल्याचं म्हटलंय. जेव्हा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिझिंजम आंतरराष्ट्री बंदराला राष्ट्राला समर्पित केलं. तेव्हाचा क्षण ऐतिहासिक ठरला. हा एक ऐतिहासिक प्रकल्प आहे. देशातील कोणत्याही राज्याद्वारे बंदरासाठी करण्यात आलेली ही सर्वात मोठी गुंतवणूक आहे. यातील दोन तृतियांश हिस्सा केरळ सरकारने भरला आहे. विकासाच्या प्रती राज्य कठिबद्ध असल्याचं यातून दिसून येतंय, असं मुख्यमंत्री विजयन म्हणाले.

हा खोल समुद्रातील बंदर भारतातील सर्वात मोठा बंदर विकासक आणि अदानी समूहाचा भाग असलेल्या अदानी पोर्ट्स अ‍ॅन्ड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड (APSEZ) ने सार्वजनिक-खासगी भागीदारीअंतर्गत विकसित केला आहे.

विदेशी व्यापार आणि महसूल वाढेल

व्हिझिंजम हे भारताचे पहिले समर्पित ट्रान्सशिपमेंट बंदर आहे आणि देशातील पहिले अर्ध-स्वयंचलित बंदर देखील आहे. हे एक प्रमुख आंतरराष्ट्रीय शिपिंग मार्गापासून फक्त 10 सागरी मैलांवर स्थित आहे. हे खूप खोल असल्यामुळे मोठ्या मालवाहू जहाजांना सहजपणे सामावून घेऊ शकते.

आतापर्यंत भारतातील सुमारे 75 टक्के ट्रान्सशिपमेंट कंटेनर श्रीलंकेच्या कोलंबो बंदरातून हाताळले जात होते, ज्यामुळे परकीय चलन आणि महसुलाचे मोठे नुकसान होत होते. व्हिझिंजममुळे त्या वाहतुकीपैकी मोठा हिस्सा पुन्हा भारतात येण्याची अपेक्षा आहे.

या बंदराला आतापर्यंत कोणत्याही राज्य सरकारकडून भारतात सर्वाधिक गुंतवणूक मिळालेली आहे. केरळ सरकार या प्रकल्पाच्या एकूण खर्चाच्या दोन तृतीयांश भागाची भरपाई करत आहे, ज्यात ब्रेकवॉटरच्या बांधकामाचा संपूर्ण खर्च समाविष्ट आहे – हे एक अत्यंत महत्त्वाचे पायाभूत घटक असून बंदर सर्व ऋतूंमध्ये सुरळीत चालू राहील याची खात्री करतो.