Home Blog Page 203

“तू मरणार आहेस का?”; रक्ताने माखलेल्या वडिलांना पाहून तैमुरने विचारला प्रश्न

0

अभिनेता सैफ अली खानवर 16 जानेवारी 2025 रोजी त्याच्याच राहत्या घरात एका चोराने चाकूहल्ला केला. चोरीच्या उद्देशाने घरात शिरलेल्या आरोपीने सैफवर चाकूने सहा वार केले. या घटनेनंतर सैफने पहिली मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत सैफने घडलेल्या घटनेबद्दल सविस्तर सांगितलंय. 16 जानेवारीच्या मध्यरात्री काय घडलं, सैफने मुलांना कसं वाचवलं, त्यानंतर त्याला रिक्षामधून रुग्णालयात का नेण्यात आलं, घटनेनंतर कुटुंबीयांची काय प्रतिक्रिया होती, या सर्व प्रश्नांची उत्तरं त्याने या मुलाखतीत दिली आहेत.

चाकूहल्ल्यानंतर तैमुरची प्रतिक्रिया
चोरासोबत झालेल्या झटापटीत सैफ जखमी झाला होता. त्याचे कपडे रक्ताने माखलेले होते. चोराला खोलीतच बंद करून सैफ, करीना आणि त्यांची दोन्ही मुलं इमारतीखाली उतरले. सैफला रुग्णालयात नेण्यासाठी करीना रस्त्यावर रिक्षा किंवा टॅक्सीसाठी ओरडत होती. या घटनेविषयी सैफ म्हणाला, “करीना प्रचंड घाबरली होती. ती मदतीसाठी रस्त्यावर ओरडत होती. ती म्हणाली, तू रुग्णालयात जा आणि मी बहीण करिश्माच्या घरी जाते. ती घाबरून सर्वांना फोन करत होती, पण कोणीच जागं नव्हतं. मी ठीक आहे, मी मरणार नाही असं सांगून तिला धीर देण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तैमुरने माझ्याकडे काळजीने बघत विचारलं, तू मरणार आहेस का? मी त्याला म्हणालो, नाही.”

हल्ल्यानंतर सैफचा मोठा मुलगा इब्राहिम त्याला रुग्णालयातून घेऊन गेल्याची सुरुवातीला चर्चा होती. मात्र नंतर लिलावती रुग्णालयातील डॉक्टरांनी स्पष्ट केलं की, इब्राहिम नव्हे तर आठ वर्षांचा तैमुर सैफसोबत रुग्णालयात आला होता. इतक्या छोट्या मुलासोबत रुग्णालयात का गेलास, असा प्रश्न विचारल्यावर सैफने सांगितलं, “तो पूर्णपणे शांत होता. तो ठीक होता. तो म्हणाला, मी तुमच्यासोबत येतो. त्यावेळी असं वाटलं की जर मला काही झालं तर त्याच्या चेहऱ्याकडे फक्त बघूनच मला खूप धीर मिळेल. मला एकटं जायचं नव्हतं. तो माझ्यासाठी काय करू शकतो हे माहीत असल्यानेच माझ्या पत्नीने तैमुरला सोबत पाठवलं. कदाचित त्याक्षणी ते योग्य नव्हतं. पण मला बरं वाटलं. जरी माझं काही बरंवाईट झालं असतं, तर तो माझ्या जवळ राहावा हीच माझी इच्छा असती. त्यालासुद्धा माझी साथ सोडायची नव्हती. त्यामुळे मी, तैमुर आणि हरी आम्ही तिघं रिक्षाने रुग्णालयात गेलो.”

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विद्यार्थ्यांना कानमंत्र; म्हणाले, ज्या विषयाची भीती त्याची आधी तयारी करा

0

सध्या परीक्षेचे दिवस सुरू आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात धाकधूक निर्माण झालेली आहे. पेपर कसे जातील याची चिंता विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण झाली आहे. त्यामुळे विद्यार्थी परीक्षेचं टेन्शन घेतानाही दिसत आहेत. आज देशभरातील या विद्यार्थ्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवाद साधला. तुम्ही परीक्षेचं टेन्शन घेऊ नका. इतर विद्यार्थ्यांना किती मार्क मिळतात त्याकडे पाहू नका. तुम्ही काय करू शकता हे पाहा, असं सांगतानाच ज्या विषयाची भीती वाटते, त्या विषयाची आधी तयारी करा, असा कानमंत्रच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांना दिला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘परीक्षा पे चर्चा’ हा कार्यक्रम नुकताच पार पडला. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांशी संवाद साधला. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी विद्यार्थ्यांची सर्व स्वप्ने आणि उद्दिष्टे पूर्ण करण्याच्या दृष्टीकोनातून मदत केली. तसेच विद्यार्थ्यांना सक्षम करण्याच्या दृष्टीनेही मोदींनी त्यांच्याशी भाष्य केले. हा कार्यक्रम दिल्लीतील भारत मंडपम येथे पार पडला. या कार्यक्रमासाठी देशभरातून विद्यार्थी, पालक आणि शिक्षक सहभागी झाले होते. आजच्या कार्यक्रमासाठी ३.३० कोटींपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी आणि २०.७१ पेक्षा जास्त शिक्षकांनी नोंदणी केली होती. यातील निवडक २५०० जणांनी प्रत्यक्ष या कार्यक्रमात भाग घेतला.

नेतृत्व गुण विकसित करा

पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांना अभ्यासाचा कानमंत्र देतानाच नेतृत्व गुण कसे विकसित करायचे हे सुद्धा सांगितलं. लीडरला टीम वर्क शिकणं महत्त्वाचं आहे. कुणाला काम दिलं असेल तर त्यातील अडचणी समजून घेतल्या पाहिजे. जिथे कमी, तिथे आम्ही हा सिद्धांत तुम्ही मनात बिंबवून ठेवा. लोकांचा विश्वासच तुमच्या लीडरशीपला मान्यता देईल, असं मोदी म्हणाले.

आव्हानांचा सामना करा

यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना आव्हानांना सामोरे जाण्याचाही कानमंत्र दिला. तुम्हाला तुमच्यातील आव्हानांचा सामना करावा लागेल. मागच्यावेळी तुम्हाला 30 मार्क होते, तर तुम्हाला यावेळी 35 मार्क मिळवण्याचा प्रयत्ने केला पाहिजे. असं करून तुम्ही तुमचं टार्गेट वाढवलं पाहिजे. हे तुमच्यासाठी एक आव्हान आहे आणि तुम्हाला त्याच्याशी लढलं पाहिजे, असं मोदी म्हणाले.

प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत १ हजार ३३१ कोटी रुपयांचा निधी थकला पुरवठादारही अडचणीत

0

केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत राज्यातील पात्र शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना पोषण आहाराचा लाभ देण्यात येतो. या योजनेचा केंद्र व राज्य शासनाने १ हजार ३३१ कोटी रुपयांचा निधी थकविला आहे. यामुळे योजनेसाठी निधीची चणचण भासू लागलेली आहे. शासनाकडून निधीच मिळत नसल्याने पुरवठादारांची कोट्यावधी रुपयांची बिलेही प्रलंबितच पडलेली आहे.

राज्यातील ८६ हजार ४०० शाळांमधील सुमारे एक कोटी विद्यार्थ्यांना पोषण आहार वाटप केला जातो.केंद्र शासनाकडून ६० टक्के तर राज्य शासनाकडून ४० टक्के याप्रमाणे १०० टक्के निधी वाटपाचे सूत्र ठरलेले आहे. केंद्रांनी आपला निधीचा हिस्सा दिल्यानंतर राज्य शासनानेही आपला निधीचा हिस्सा तत्काळ उपलब्ध करून देणे आवश्यक असते. आधीचा निधी खर्च झाल्यानंतर केंद्र शासनाकडून निधीचा पुढचा हप्ता दिला जातो.

जून २०२४ पासून नवीन शैक्षणिक वर्षाला सुरूवात झाली. आठ महिने झाले तरी अद्याप पोषण आहार योजनेसाठी पुरेसा निधीच केंद्र व राज्य शासनाकडून मिळालेला नाही. केंद्र शासनाकडून १ हजार २०७ कोटी रुपये तर राज्य शासनाकडून ८१७ कोटी रुपये याप्रमाणे २ हजार २४ कोटी रुपयांचा निधी योजनेसाठी मंजूर करण्यात आलेला आहे. आतापर्यंत केंद्र शासनाकडून ३११ कोटी रुपये व राज्य शासनाकडून ३८२ कोटी रुपये असा ६९३ कोटी रुपये निधी प्राथमिक शिक्षण संचालनालयाला मिळाला असून तो खर्चही करण्यात आलेला आहे. अद्याप केंद्र शासनाकडे ८९६ कोटी रुपये व राज्य शासनाकडे ४३५ कोटी रुपयांचा निधी थकला आहे.

पुरवठादार आर्थिक अडचणीत

उपलब्ध झालेल्या निधीतून इंधन-भाजीपाला, स्वयंपाकी व मदतनीस, सेंट्र्ल किचन, डेटा एट्री अॉपरेटर यांच्या काही बिलांचा खर्च भागविण्यात आलेला आहे. पुरवठादारांना मात्र त्यांच्या बिलाची पुरेशी रक्कम अद्यापही देण्यात आलेली नाही. काही पुरवठादारांना बिलाचा अद्याप एक रुपयाही मिळालेला नाही. काही पुरवठादारांना तीन-चारच महिन्याच्या बिलाची रक्कम देण्यात आलेली आहे. आता मात्र बिलाची रक्कम न मिळाल्यामुळे पुरवठादार आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे पुरवठादारांना शासनाच्या निधीची प्रतीक्षा लागलेली आहे.

रायगडमध्ये शिंदेंच्या शिवसेनेला भाजपाचाच ‘दे धक्का’; मोठा नेत्याचा भाजप प्रवेश पक्षाला फलदायी ठरेल: खासदार

0

रायगड जिल्ह्यात भाजपने आपला मित्रपक्ष शिवसेनेला जोरदार धक्का दिलाय. शिवसेनेतील नाराज माजी जिल्हा संपर्क प्रमुख प्रकाश देसाई यांना आपल्याकडे ओढण्यात भाजप यशस्वी झाला आहे. आज प्रकाश देसाई यांनी पाली येथील मेळाव्यात आपल्या शेकडो समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला. प्रवेश करत्यावेळी खासदार धैर्यशील पाटील, आमदार विक्रांत पाटील, आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. लोकांची कामे करण्यासाठी अपेक्षित ताकद मिळत नव्हती. त्यामुळे भाजप प्रवेशाचा निर्णय घेतल्याचे प्रकाश देसाई यांनी सांगितलं. तर देसाई यांचा प्रवेश पक्षाला फलदायी ठरेल असं खासदार धैर्यशील पाटील यांनी सांगितलं.

महादजी शिंदे यांच्या भजन परंपरेत ग्वाल्हेर घराण्याच्या गायकीचा उगम आढळतो -डॉ .सदानंद मोरे

0

पुणे : कुतुबशाही आणि आदिलशाही सारखी साम्राज्ये नेस्तनाबूत करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या साम्राज्याकडे वक्रदृष्टी करू पाहणाऱ्या औरंगजेबाला सुमारे २५ वर्षे झुलवत ठेवत छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले साम्राज्य अबाधित राखण्यात महादजी शिंदे यांचा मोठा वाटा होता. महादजी शिंदे जसे लढवय्ये होते तसेच ते कवी मनाचेही होते. महादजी शिंदे यांच्या भजन परंपरेत ग्वाल्हेर घराण्याच्या गायकीचा उगम आढळतो, असे मत संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष आणि संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले .

पुणे महानगरपालिका मराठी भाषा संवर्धन समिती आणि साहित्यिक कट्टा वारजे यांच्या संयुक्त विद्यमाने वारज्यातील बाएफ संस्थेच्या डॉ.माणिभाई देसाई सभागृहात आयोजित एकदिवसीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानावरून मनोगत व्यक्त करताना डॉ. मोरे बोलत होते. महाराष्ट्र राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी व्यासपीठावर संमेलनाचे स्वागताध्यक्ष आणि पुणे मनपा शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष प्रदीप उर्फ बाबा धुमाळ, पुणे मनपा विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ, ज्येष्ठ साहित्यिक डॉ .माधवी वैद्य, साहित्यिक कट्टा वारजेचे सचिव डी. के . जोशी, प्रसिद्ध चित्रकार रूपेश पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष प्रदिप देशमुख, साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिलीप बराटे, बालसाहित्यिक राजीव तांबे, बाएफ संस्थेचे अध्यक्ष भरत काकडे आदी मान्यवर उपस्थित होते.

संमेलन उद्घाटनापूर्वी शिवचरित्र्यकार ह .भ. प .धर्मराज महाराज हांडे यांच्या हस्ते ग्रंथदिंडीचे पूजन करून ग्रंथदिंडीस प्रारंभ करण्यात आला. तसेच प्रसिध्द चित्रकार रुपेश पवार यांच्या हस्ते चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले .भोर- वेल्हा -मुळशीचे आमदार शंकर मांडेकर यांच्या हस्ते ग्रंथ महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले .

या प्रसंगी संजय भोर, बालसाहित्यिक राजीव तांबे आणि किर्तनकार आणि वारजेचे माजी उपसरपंच सतिश बोडके यांना अनुक्रमे उद्योगरत्न ,साहित्यरत्न आणि समाजरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले.
यावेळी बोलताना
डॉ. मोरे पुढे म्हणाले की, आगामी नियोजित साहित्य संमेलन दिल्लीत घेण्यावर काहींनी प्रश्न उपस्थित केले, परंतू ते प्रश्न निरर्थक असून अभिजात दर्जा प्राप्त मराठी भाषेचे धागेदोरे दूरवर आढळतात. संत साहित्य हा सर्व कला -साहित्य प्रकारांचा मूळ स्त्रोत आहे. कला साहित्याचे धागेदोरे धुंडाळयचे झाल्यास त्यांचे मूळ स्त्रोत संत साहित्यात आढळून येतात. संत साहित्याने वारकरी संप्रदाया सोबतच मराठी साहित्यचाही पाया रचलेला आहे . मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यात मराठी भाषा ही अतिप्राचीन भाषा आहे हा एक आधार होताच, परंतू ज्यावेळी जागतिक पातळीवर अभिजाततेच्या कसोटीवर खऱ्या उतरतील अशी एकही साहित्यकृती युरोपीयन भाषांमध्ये होत नव्हती , त्यावेळी १३ व्या शतकांत ज्ञानेश्वरांनी विपूल ग्रंथनिर्मिती केलेली आढळून येते. भौतिक प्रगती सोबत शारिरिक आणि बौद्धिक प्रगतीत आपण अग्रेसर होतो.

यावेळी बोलताना महाराष्ट्र राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर म्हणाल्या की, माझा प्रारब्धावर नितांत विश्वास आहे. आपले पुण्याचे पारडे हे जड असावे लागते तरच आपण चांगली पुस्तके आणि चांगल्या माणसांच्या सान्निध्यात येतो. अशा संमेलनाच्या माध्यमातूनच वैचारिक चळवळ उभी राहते. तसेच साहित्याच्या क्षेत्रात नव्याने प्रयत्न करणाऱ्यांना ही साहित्य संमेलने उपयोगी ठरतात. अशा साहित्य संमेलनाद्वारे सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडली जाते.

साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिलीप बराटे यांनीही अशा साहित्य संमेलनांचे आयोजन करणे आवश्यक
असल्याचे सांगितले. संमेलनाचे स्वागताध्यक्ष प्रदीप धुमाळ यांनी संमेलन आयोजना मागची भूमिका विशद केली.

तर पुणे मनपा विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ यांनी उपस्थितांचे स्वागत केले आणि आभार मानले .

उद्घाटन सत्रानंतर दिवसभरात डॉ .संजय उपाध्ये यांचे ‘मातृभाषा आणि मनःशांती’ या विषयावर व्याख्यान, सुप्रसिद्ध अभिनेत्री मृणाल देव – कुलकर्णी यांची मसाप कार्यवाह वि . दा . पिंगळे यांनी घेतलेली प्रकट मुलाखत, डॉ .मंगला गोडबोले यांच्या अध्यक्षतेखाली झालेला ‘भाषेसमोरील आव्हाने’ या विषयावरील परिसंवाद असे साहित्यिक कार्यक्रम झाले. परिसंवादात प्रा .मिलिंद जोशी व संजय आवटे सहभागी झाले होते. यानंतर सुप्रसिध्द कवी व गझलकार म .भा . चाहाण यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन संपन्न झाले . सांस्कृतिक कार्यक्रमाने संमेलनाची सांगता झाली .

कार्यक्रमाच्या उद्घाटन सत्राचे सूत्रसंचलन चंद्रकांत पंडित यांनी केले.

विधान परिषदेच्या ३३% जागा अद्याप रिकाम्याच; सध्याची सभागृहाची परिस्थिती काय?

0

महाराष्ट्र विधान परिषदेचे एकूण संख्याबळ ७८ इतके आहे, त्यातील २६ जागा आजमितीस रिक्त आहेत. हे ज्येष्ठांचे सभागृह ३३ टक्के रिकामे असल्याचे चित्र सध्यातरी बदलण्याची शक्यता नाही. विक्रांत पाटील, चित्रा वाघ, बाबूसिंग राठोड (भाजप), हेमंत पाटील, मनीषा कायंदे (शिंदेसेना), पंकज भुजबळ, इद्रिस नायकवाडी (अजित पवार गट) अशा सातजणांना राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून विधान परिषदेवर आधीच पाठविण्यात आले आहे. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी ऑक्टोबर २०२४ मध्ये त्यांची नियुक्ती करण्यात आली होती.

राज्यपाल नियुक्त आमदारांची एकूण संख्या १२ असते. पाच जागा अजूनही रिक्त आहेत आणि त्या लगेच भरण्यासाठी महायुतीमध्ये सध्या कोणत्याही हालचाली दिसत नाहीत. भविष्यात या पाच जागा भरताना भाजपला तीन आणि अन्य दोन मित्रपक्षांना प्रत्येकी एक अशा जागा दिल्या जाण्याची शक्यता आहे.

सदस्यांतून आमदार निवडून पाठविण्याचाही खोळंबा

राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३ मार्चपासून मुंबईत सुरू होत असून, या अधिवेशनातही विधान परिषदेचे संख्याबळ हे एकूण संख्येच्या दोन तृतियांश इतकेच असेल. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांमधून विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या २२ पैकी तब्बल १६ जागा सध्या रिक्त आहेत. जवळपास तीन वर्षांपासून बहुतेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ शकलेल्या नाहीत. त्यामुळे त्यांच्या सदस्यांमधून विधान परिषदेवर आमदार निवडून पाठविण्याची प्रक्रिया खोळंबली आहे. या निवडणुका झाल्यानंतरच विधान परिषदेवर सदस्य निवडून देण्यासाठीची निवडणूक होईल.

अशी आहे विधान परिषदेची स्थिती-

मतदारसंघाचे नाव                             एकूण जागा                       भरलेल्या जागा                               रिक्त जागा

विधानसभा सदस्यांद्वारे निर्वाचित                 ३०                                २५                                               ०५

स्था. स्व. संस्थांद्वारे निर्वाचित                        २२                                ०६                                               १६

पदवीधर मतदारसंघांमधून निर्वाचित               ०७                               ०७                                                   ०

शिक्षक मतदारसंघामधून निर्वाचित                   ०७                              ०७                                                   ०

राज्यपाल नामनियुक्त                                      १२                                 ०७                                               ०५

कुस्तीमध्ये महाराष्ट्र सर्वात पुढे दिसावा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अपेक्षा

0

महाराष्ट्रात खूप चांगले पैलवान आहेत. पण अजूनही आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या मेडल टॅलीमध्ये महाराष्ट्र हवा त्या प्रमाणात दिसत नाही. कुस्तीच्या क्षेत्रातील रतीव महारतींनी याबाबतचा कार्यक्रम आखावा, आणि पुढील काळामध्ये एसिया, ऑलंपीक, कॅमनवेल्थ आणि वर्डकप अशा प्रकारच्या विविध स्पर्धांमधील मेडलच्या टॅलीमध्ये कुस्ती क्षेत्रात महाराष्ट्र हा सर्वात पुढे दिसावा, अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. स.प. महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित केलेल्या हिंदू गर्जना प्रतिष्ठान कुस्ती चषक स्पर्धेस मुख्यमंत्री फडणवीस यांनी शनिवारी भेट दिली. यावेळी ते बोलत होते. भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे, बालन ग्रुपचे पुनीत बालन आदींसह पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मातीतील कुस्ती ही महाराष्ट्रात खूप प्राचिन काळापासून लोकप्रिय आहे. कुस्ती आपला पारंपारिक खेळ असून आखाड्यांची मोठी परंपरा आहे. या परंपरेतून अनेक पैलवान तयार होतात. पुणे हा पैलवानाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. ही परंपरा पुढे नेण्यासाठी आशा कार्यक्रमांचे आयोजन करणे महत्वाचे आहे.

आपल्या पैलवानासांठी सरकारने अनेक योजना सुरू केल्या. विविध पुरस्कार मिळवणाऱ्या मल्लांच्या मानधनात वाढ केली आहे. यामागे अधिकाधीक मल्ल तयार झाले पाहिजेत, अशी भावना आहे. मात्र, एका गोष्टीची अपेक्षा आहे. महाराष्ट्रात खूप चांगले पैलवान आहेत. पण अजूनही आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या मेडल टॅलीमध्ये महाराष्ट्र हवा त्या प्रमाणात दिसत नाहीय.

या दृष्टीने आपणास अधिक काय करता येईल, वेगळ्या प्रकारचे काय प्रशिक्षण असावे, याचा विचार करणे गरजेचे आहे. यासाठी सरकार सुद्धा पुढाकार घ्यायला तयार आहे. मात्र, कुस्तीच्या क्षेत्रातील रतीव महारतींनी याबाबतचा कार्यक्रम आखावा, आणि पुढील काळामध्ये एसिया , ऑलंपीक, कॅमनवेल्थ, वर्डकप अशा प्रकारच्या विविध स्पर्धांमधील मेडलच्या टॅलीमध्ये महाराष्ट्र हा सर्वात पुढे दिसावा, अशी अपेक्षा असल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.

निकालानंतर आता आम आदमी पक्षात मोठी उलथापालथ?; आत्ता भगवंत मानचेही शिंदेंच्या पावलावर पाऊल? कुणी केला दावा?

0

सत्ताधारी आम आदमी पक्षाला भुईसपाट करीत भारतीय जनता पक्षाने दिल्ली विधानसभेवर आज भगवा फडकविला आहे. भाजपने ४८ जागांवर दणदणीत विजय मिळविला. तर आपला केवळ २२ जागांवर समाधान मानावे लागले. कॉंग्रेस पक्षाला या निवडणुकीतही खाते उघडता आलेले नाही. दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला भोपळाही फोडता आला नाही. परंतु, काँग्रेसचा हा भोपळाही आम आदमी पक्षाला भोवला आहे. अनेक जागांवर काँग्रेसला मिळालेल्या मतांमुळे आपचे उमेदवार थोडक्यात पराभूत झाले आहेत. त्यातून खुद्द अरविंद केजरीवालही सुटू शकले नाहीत.

भाजपने दिल्लीची निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात लढविली होती. तर, गृहमंत्री अमित शाह यांनी निवडणुकीचे व्यवस्थापन सांभाळले होते. भाजपने निवडणुकीच्या प्रचारात भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्र्यांसह खासदारांची फौज उतरविली होती. यात आपचे पानिपत झाले. भाजपचे प्रवेश वर्मा यांनी नवी दिल्ली मतदारसंघातून ३० हजार ८८ मते मिळवत अरविंद केजरीवाल यांचा ४०८९ मतांनी पराभव केला. यानंतर आता आम आदमी पक्षात मोठ्या घडामोडी घडू शकतात. तसेच पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान वेगळा विचार करू शकतात. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याप्रमाणे भगवंत मान काही ऐतिहासिक निर्णय घेऊन आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना मोठा धक्का देऊ शकतात, असे काही दावे करण्यात आले आहेत.

एकनाथ शिंदेंच्या पावलावर भगवंत मान ठेवणार पाऊल? पंजाबमध्ये खेला होणार?

पंजाबमधील काँग्रेस नेते प्रताप सिंह बाजवा यांनी याबाबत काही दावे केले आहेत. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता पंजाबमध्ये आम आदमी पक्षात मोठी उलथापालथ होऊ शकते, असा दावा बाजवा यांनी केला. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याप्रमाणे पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आम आदमी पक्षात मोठी बंडखोरी करू शकतात. पंजाबमधील ३० हून अधिक आमदार काँग्रेसच्या संपर्कात आहे आणि काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यासाठी तयार असल्याचेही बाजवा यांचे म्हणणे आहे.

भगवंत मान केंद्रीय गृह मंत्रालयाच्या संपर्कात

दिल्लीतील पराभवानंतर पंजाबमधील भगवंत मान सरकार टिकणे कठीण आहे. पंजाबमध्ये आम आदमी पक्ष आधीच दोन गटांमध्ये विभागला आहे. पंजाबमधील आम आदमी पक्ष दिल्लीच्या नेतृत्वाशी चांगला ताळमेळ ठेवण्यास सक्षम नाही. आता दिल्लीतील परभावामुळे ‘आप’चे दिल्लीतील नेतृत्व पंजाबवर जास्त लक्ष केंद्रीत करेल. पण हे मुख्यमंत्री भगवंत मान सहन करणार नाहीत. त्यामुळे आम आदमी पक्षात नेतृत्वासाठी संघर्ष होईल आणि फूट पडेल. पंजाब ‘आप’ आणि दिल्ली ‘आप’ यांच्यात अंतर्गत संघर्ष सुरु आहे. मुख्यमंत्री भगवंत मान हे केंद्रीय गृह मंत्रालयाच्या संपर्कात आहेत. भगवंत मान हे आम आदमी पक्षाच्या फुटीत एकनाथ शिंदे यांच्यासारखी भूमिका घेऊ शकतात, असे बाजवा यांनी म्हटले आहे.

दरम्यान, पंजाबमध्ये २०२२ च्या निवडणुकीत आम आदमी पक्षाने दणदणीत विजय मिळवला. ११७ जागा असलेल्या पंजाब विधानसभेत आम आदमी पक्षाने ९२ जागा जिंकल्या होत्या. मुख्यमंत्री भगवंत मान सरकारला कोणताही धोका नसल्याचे दिसत आहे. असे असले तरी दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आम आदमी पक्षावर काँग्रेस नेत्यांनी टीका केली असून, अनेक दावे-प्रतिदावे केले जात असल्याचे पाहायला मिळत आहेत.

‘…तर गोपीनाथ मुंडेवर प्रेम करणाऱ्यांचा वेगळा पक्ष उभा राहील’, पंकजा मुंडेंनी जाहीर भाषणात सांगितले

0

नाशिकमधील श्री.स्वामी समर्थ कृषी विकास व संशोधन चॅरिटेबल ट्रस्ट, दिंडोरी आणि महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित जागतिक कृषी महोत्सवाचे आज (रविवारी) मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. पंकजा मुंडे यांन शहरीकरण आणि नागरीकरण वाढत असताना पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन होणे आवश्यक आहे. पर्यावरणाचे रक्षण आणि नद्या पुनर्जीवित करीत पर्यावरण संवर्धनासाठी सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन यावेळी केले.

पंकजा मुंडे यांनी स्व.गोपीनाथ मुंडे यांचा देखील उल्लेख आपल्या भाषणात केला. त्या म्हणाल्या, ‘गोपीनाथ मुंडेंसाहेबांवर प्रेम करणाऱ्या लोकांचा एक साठा केला तर वेगळा एक पक्षच उभा राहील. गोपीनाथ मुंडेसाहेबांवर प्रेम करणाऱ्या लोकांची येवढी मोठी संख्या आहे.’

‘मुंडेंसाहेबांवर प्रेम करणारे आणि माझ्याबरोबर जोडले गेलेले लोक हे केवळ मी मुंडेंसाहेबांची मुलगी म्हणून माझ्यासोबत जोडले जाऊ शकले नसते. लोक गुणाचा वारसा स्वीकारतात. लोकं मुंडेसाहेबांच्या गुणांवर प्रेम करतात म्हणून जसं त्यांच्यावर प्रेम करणाऱ्यांचा पक्ष उभाच आहे. मुंडेसाहेबांनी भाजपच्या जन्मापासून काम केले आहे तो उभा केला आहे.’, असे देखील पंकजा मुंडे म्हणाल्या.

मुंडेंचा कार्यक्रमाला हजेरी चर्चांना उधाण

दिंडोरीमधील स्वामी समर्थ केंद्रात संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे लपल्याचा आरोप भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी केला होता. विष्ण चाटे अद्यापही फरार आहेत. त्यातच पंकजा मुंडे यांनी नाशिकच्या दौऱ्यात स्वामी समर्थ केंडरच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

मेहुण्याला तडीपारीची नोटीस मिळाली, मनोज जरांगे पाटील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर संतापले

0

जालना जिल्ह्यात वाळू माफिया आणि गुन्हेगारांवर प्रशासनाने तडीपीरीची कारवाई केली आहे. काल जालना प्रशासनाने नऊ जणांविरोधात कारवाई केली, यामध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा मेहुणा विलास खेडकर याचाही समावेश आहे. तसेच जरांगे पाटील यांच्या आंदोलनातील ५ जणांचा समावेश आहेत. या कारवाईवरुन आता जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केला आहे.

प्रशासनाने जालना जिल्ह्यात केलेल्या तडीपारीच्या कारवाईवर मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी जरांगे पाटील यांनी संताप व्यक्त केला आहे. जरांगे पाटील म्हणाले, फडणवीस सांगतात केसेस मागे घेऊ आणि दुसरीकडे नोटीसा पाठवत आहेत. तुमचा दुसरा काही विषय असेल तर आम्हाला देणं घेणं नाही, आपली भूमिका कायम आहे. आमच्या सरळ स्वभावाचा फायदा तुम्ही उचलायचा नाही. तुम्ही अंतरवलीतील आंदोलकांना जर नोटीस पाठवणार असणार, तुम्ही त्यांच्या पाठीमागे असे लागणार असेल तर मी सोडणार नाही फडणवीस साहेब असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला.

नोटीसा मागे घ्याव्यात

“तुम्ही जर मराठ्यांना वेठीस धरायचं काम केलं तर, तुमचा कार्यक्रम लावायला मला वेळ लागणार नाही. प्रामाणिक आंदोलकांना तुम्ही विकत घेऊ शकत नाही. त्यांच्यावर तुम्ही प्रेशर आणू शकत नाही. आमची अशी इच्छा होती की, मराठ्यांनी सांगावं आणि फडणवीस यांनी करावं, अशी आमची भोळीभाबडी इच्छा होती. बेमानी आणि गद्दारी हा शब्दाचा शिक्का तुमच्यावर पडू देऊ नका, आम्ही भोळे लोक आहोत, त्यामुळे सर्व हाताने मदत केली. तू रंडकुंडीला आला होता, ही गादी कधीच मिळू शकत नव्हती. या राज्यात मराठ्यांशिवाय पान हालू शकत नाही. तुमचं भागलं म्हणून उलटणार असाल तर हे तुमच्यासाठी घातक असणार आहे, त्यांनी चूक सुधारावी दिलेल्या नोटीसा मागे घ्याव्यात, असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले.

“आम्ही देवेंद्र फडणवीसला सन्मानाची वागणूक द्यायला तयार आहोत. नाहीतर पुढच्या काळात सन्मान हा शब्द डोक्यातून काढून टाकायचा, असंही जरांगे म्हणाले. मेहुण्यावरील कारवाईवर बोलताना जरांगे म्हणाले, आपण स्पष्ट सांगितलयं तुमचं बाकीचं काय माहिती नाही, आपण त्यात पडतही नाही. पण मराठा आंदोलक म्हणून जर तुम्ही त्यांना नोटीसा देणार असला, हे तुमच्यासाठी घातक आहे, असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले.