Home Blog Page 204

‘लाडकी बहीण’बाबत आता मुख्यमंत्री फडणवीसांनीच स्पष्ट सांगितलं, म्हणाले मला आनंद कि, बहिणींनी स्वत: निर्णय..

0

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने लागू केलेल्या लाडकी बहीण योजनेची पडताळणी राज्य सरकारकडून करण्यात येत आहे. योजनेच्या निकषांमध्ये न बसणाऱ्या लाडक्या बहिणीने आपला योजनेचा फायदा सोडावा, असे आवाहन देखील राज्यसरकारने केले आहे. एकीकडे राज्य सरकार स्वतःहून लाडक्या बहिणींना योजनेचा फायदा सोडण्याचा आवाहन करत आहे. तर दुसरीकडे चारचाकी गाडी असलेल्या बहिणीची यादी सरकारकडून करण्यात येत आहे.या पार्श्वभूमीवर लाडकी बहीण योजनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे.

पुणे दौऱ्यावरती असताना माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मला अतिशय आनंद आहे.दिल्ली विधानसभेवर २७ वर्षा नंतर भाजपचा झेंडा रोवला गेला आहे. दिल्लीतील नागरिकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास दाखवला आहे आणि आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांचा बुरखा फाटला आहे. केजरीवाल यांनी खोटी आश्वासन देऊन दिल्लीवर राज्य केलं मात्र त्या खोट्या आश्वासनांच्या परंपरेचा आज अंत झाला आहे. खोट राजकारण चालणार नाही हे दिल्लीच्या लोकांनी दाखवून दिलं आहे. दिल्लीतील मराठी माणूस हा भाजपच्या बाजूने उभा राहिला याचा मला आनंद असल्याचे देखील फडवणीस म्हणाले.

राहुल गांधींना लगावला टोला –

राहुल गांधी यांनी काल घेतलेली पत्रकारपरिषद हे त्यांचे कव्हर फायरिंग होतं. त्यांना माहीत होतं दिल्लीत आपल्याला काही यश मिळणार नाही. त्यामुळे हरल्यानंतर काय मुद्दे मांडायचे याची त्यांनी पूर्वीच तयारी करून ठेवली होती अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.

राहुल सोलापूरकरांना सुनावलं –

राहुल सोलापूरकर यांनी केलेल्या वक्तव्याबाबत बोलत असताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावर बोलत असताना जनभावनेचा विचार करूनच बोलणं आवश्यक आहे. इतिहासाचं विकृतीकरण हे कोणाच्याही हाताने होऊ नये. त्यांनी याबाबत माफी मागितली आहे आणि त्याबाबत योग्य ती कारवाई होईल, असं आश्वासन देवेंद्र फडणीस यांनी दिल.

तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये आता नव्याने काही निकष समोर येऊ लागले आहेत. याबाबत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ”कुठलाही नवीन निकष लाडकी बहीण योजनेत लावलेला नाही. योजना घोषित केली तेव्हा जे निकष होते, त्या निकषापेक्षा वेगळे ज्यांनी अर्ज केले, त्यांच्यावरच ही कारवाई होत आहे. मला आनंद आहे की, आमच्या काही लाडक्या बहिणींनी स्वत: निर्णय केला की आम्ही आता निकषाबाहेर गेललो आहोत, त्यामुळे आता आम्ही हा लाभ घेणे सोडतो आहोत. कुणाचेही पैसे आम्ही परत घेतले नाही, परत मागणार नाही.

एकनाथ शिंदेंची रणनीती होणार यशस्वी; अमित शाहांच्या भेटीनंतर महायुतीमधील कोंडी सुटणार?

0

राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळाले. मात्र, महायुतीमधील सत्ता वाटपाचा घोळ शेवटच्या क्षणापर्यंत सुरु होता. त्यामुळे सरकार स्थापनेला वेळ लागला. त्यातच खातेवाटपावरून नाराजी असल्याने शपथविधीला वेळ लागला. त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तारही काही काळ लांबला होता. त्यानंतर पालकमंत्री पदावरून महायुतीमधील तीन पक्षात रस्सीखेच पहावयास मिळाली. त्यामुळे महायुतीमध्ये सर्व काही आलबेल नसल्याची चर्चा रंगली होती. त्यातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा सुरु असतानाच दोन दिवसापूर्वी एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांची दिल्लीत भेट घेतली. त्यामुळे या भेटीवेळी नेमके काय घडले ? त्यामुळे येत्या काळात महायुतीमधील तीन पक्षातील कोंडी सुटणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पालकमंत्री पदावरून गेल्या काही दिवसापासून तिढा आहे. प्रजाकसत्ताक दिनापूर्वी रायगड, नाशिकसह काही जिल्ह्यांमध्ये पालकमंत्री पदावरून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. त्यामुळे महायुतीमध्ये एकवाक्यता नसल्याची चर्चा सुरू आहे. पालकमंत्री पदाच्या वादाबाबत एकनाथ शिंदे यांनी शाह यांच्यासोबत चर्चा केली असल्याची शक्यता आहे.

यावेळी अमित शाहसोबत राज्यातील महायुतीमध्ये पालकमंत्री पद, शिवसेनेची होत असलेली कोंडी आणि ऑपरेशन टायगरबाबत चर्चा झाल्याचा अंदाज आहे. शाह-शिंदे भेटीत ऑपरेशन टायगरबाबत चर्चा झाली असल्याची शक्यता आहे. शिंदे गटाकडून ठाकरे गटाला खिंडार पाडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. येत्या काळात ठाकरेंचे 6 खासदार फुटून शिंदे गटात अथवा भाजपमध्ये आल्यास केंद्रातील सरकार अधिक स्थिर होणार आहे. मात्र, शुक्रवारी ठाकरे गटाच्या सगळ्या खासदारांनी एकत्र पत्रकार परिषद घेत आपण ठाकरे यांच्यासोबत असल्याचे जाहीर केले. त्यामुळे ऑपरेशन टायगरबाबत चर्चा झाली असल्याची शक्यता आहे.

राज्यातील विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठे यश मिळाले. त्याशिवाय, महायुतीमध्ये राष्ट्रवादी असल्याने बहुमताचा आकडा वाढला आहे. त्यामुळे सत्ता वाटपाच्या वाटाघाटातीत शिवसेनेची ताकद कमी पडल्याची चर्चा सुरू होती. मात्र, तरीदेखील एकनाथ शिंदे यांनी भाजपकडून काही महत्त्वाची खाती खेचून घेतली आहेत.

दुसरीकडे महायुतीमध्ये शिवसेनेची कोंडी करण्याचे भाजपकडून प्रयत्न सुरु आहेत. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी घेतलेल्या काही निर्णयाचा फेरआढावा घेतला जात आहे. तर, दुसऱ्या बाजूला शिंदे यांची त्यांच्याच होम ग्राउंडवर कोंडी करण्याचे प्रयत्न भाजपकडून सुरू आहेत. ठाण्यात गणेश नाईक यांना जबाबदारी देण्यात आली आहे. भाजपकडून गणेश नाईक यांना संपर्क मंत्रीपदाची जबाबदारी दिली. त्यातच गणेश नाईक यांनी ठाण्यात जनता दरबार घेणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे शिवसेनेत अस्वस्थता वाढली असल्याचे दिसून आले.

रायगडच्या पालकमंत्री पदासाठी भरत गोगावले तर नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी दादा भुसे हे इच्छुक असताना त्यांची वर्णी लागली नाही. त्यामुळे भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिंदेंच्या शिवसेनेची कोंडी करण्यात येत असलयाचे दिसत आहे. त्यामुळे येत्या काळात शिवसेना ही झालेली कोंडी कशी सोडवणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सुनील तटकरेंचा स्थानिक स्वराज्यसाठी स्वबळाचा नारा? म्हणाले, ‘कार्यकर्त्यांचा आग्रह पण…’

0

सर्वोच्‍च न्‍यायालयात ओबीसी आरक्षणाची याचिका प्रलंबित असल्‍याने स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थांच्‍या निवडणुका रखडल्या आहेत. पण आता त्या कधीही जाहीर होण्याची शक्यता असून सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. महाविकास आघाडीत यावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. तर उद्धव ठाकरे यांची शिवसेना एकला चलोच्या मुडमध्ये दिसत आहे. त्यातच आता दिल्लीत आपचा पराभव झाल्यानंतर शिवसेना मविआतूनच बाहेर पडण्याच्या मनस्थितीत दिसत आहे. अशातच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्य खासदार सुनील तटकरे यांनी सूचक वक्तव्य केलं आहे. ज्यामुळे राज्यभर चर्चा सुरू झाल्या आहेत.

ते पुण्यातील पक्षाच्या राज्यस्तरीय बैठकीच्या आधी पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर, प्रदेश सरचिटणीस व आमदार शिवाजीराव गर्जे, मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

तटकरे यांनी, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष तयारी करत आहे. आम्ही पक्ष बांधणी करत असून पक्ष वाढीसाठी राज्यभर जात आहोत. महायुतीतील घटक पक्ष म्हणून जबाबदारीचे भान ठेवत पक्ष विस्तार आणि पक्ष संघटन मजबूत करण्यावर आमचा भर राहणार आहे.

यासाठी राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांचाही महाराष्ट्राचा दौरा निश्चित केला जाणार आहे. शिवजयंतीनिमित्त राज्यभर स्वराज्य सप्ताहाचे, तर मराठी भाषा दिनानिमित्त विविध उपक्रम आयोजित केले जाणार आहेत.

आगामी महापालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुका या स्वतंत्रपणे निवडणूक लढवावी, अशी कार्यकर्त्यांनी मागणी आहे. पण यावर भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षांचे नेते बैठक घेऊन निर्णय घेतील. एकत्रित की स्वबळावर लढायच्या हे त्या-त्या जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती अवलंबून असेल असे संकेत तटकरे यांनी दिले आहेत.

राहुल सोलापूरकरांचे आणखी एक वाद्‌ग्रस्त विधान व्हायरल; बाबासाहेबांना दत्तक घेतलं वेदानुसार ते ब्राम्हणच; अनुयायी आक्रमक!

0

अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानानंतर संबंध महाराष्ट्रात असंतोष पाहायला मिळाला. राहुल सोलापूरकर यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी जोर धरत असतानाच सोलापूरकर यांचं आणखी एक वादग्रस्त विधान सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. त्यानंतर आंबेडकरी संघटना आक्रमक झाल्या असून सोलापूरकर यांनी आंबेडकरांच्या पायावर नाक घासून माफी मागावी; अन्यथा त्याला महाराष्ट्रात फिरू देणार नाही, असा इशारा दिला आहे.

https://www.facebook.com/share/r/1EFwo46GLX/

छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्राच्या सुटकेबाबत वादग्रस्त विधान केल्यानंतर संबंध महाराष्ट्रातून राहुल सोलापूरकर यांचा निषेध करण्यात आला. काही संघटनांनी आक्रमक होत थेट सोलापूरकर यांच्या घरावर चाल केली. त्यानंतर सोलापूरकरांनी त्याबाबत माफी मागितली आहे. मात्र, सोलापूरकर यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, या मागणीवर शिवप्रेमी ठाम आहेत.

छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वाद्‌ग्रस्त विधान करणारे राहुल सोलापूरकर यांनी एका मुलाखतीदरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे वेदानुसार ब्राह्मण ठरतात, असं विधान केलं आहे. त्याबाबतचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यावर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (सचिन खरात गट) राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

सचिन खरात म्हणाले, मराठी अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी एका मुलाखतीदरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना दत्तक घेतलं आणि वेदानुसार बाबासाहेब ब्राम्हण ठरतात, असे अत्यंत निषेधार्ह विधान केलं आहे. पण, राहुल सोलापूरकर यांना मी सांगू इच्छितो की, जे वेद आहेत, त्याच्याबद्दल डॉ. बाबासाहेबांनी लिहिलेले आहे आणि डॉ. बाबासाहेबांनी आम्हाला 22 प्रतिज्ञा दिलेल्या आहेत, त्यामुळे आम्हाला राहुल सोलापूरकर यांनी काहीही शिकवू नये.

राज्य सरकारने राहुल सोलापूरकर यांच्यावर तत्काळ कारवाई करावी. राहुल सोलापूरकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बुटावर नाक घासून माफी मागावी, अन्यथा त्यांच्या तोंडाला काळे फासू, असा इशाराही सचिन खरात यांनी दिला आहे.

अजित पवारांच्या वक्तव्यावर मनसेचं प्रत्युत्तर “स्वत:च्या जीवावर लढावं आणि मग बोलावं, भाजपचा पदर धरून…”

0

विधानसभा निवडणुकीच्या निकालाची चर्चा राज्याच्या राजकारणात अजूनही सुरू आहे. विरोधकांकडून होत असलेल्या आरोपांसोबतच अनेक राजकीय नेतेही या निकालावर आश्चर्य व्यक्त करताना दिसले आहे. नुकत्याच झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या एका मेळाव्यात राज ठाकरे यांनी विधानसभेच्या निकालावर आश्चर्च व्यक्त केलं होतं. अजित पवार यांना एवढ्या जागा मिळाल्या असंही राज ठाकरे म्हणाले होते. त्यानंतर अजित पवार यांनी राज ठाकरेंवर पलटवार केला होता. अजित पवार यांच्या वक्तव्याला मनसेतून सडेतोड उत्तर मिळाल्यामुळे हा वाद वाढण्याची चिन्ह आहेत.

राज ठाकरे यांच्या वक्तव्यावर अजित पवार म्हणाले, त्यांच्या वक्तव्याशी आम्हाला काय घेणंदेणं? आम्हाला लोकांनी निवडून दिलं. आम्हाला जनतेने निवडून दिलं. लोकसभेला महायुतीला 17 जागा मिळाल्या, तेव्हा आम्ही रडत बसलो नव्हतो. तुम्हाला तुमच्या मुलाला निवडून आणता आलं नाही आणि तुम्ही गप्पा मारता. मलाही मुलाला, पत्नीला निवडून आलं नव्हतं. जनतेने जो कौल दिला तो मान्य केला पाहिजे असं अजित पवार म्हणाले होते. त्यावर आता अमित ठाकरे आणि मनसे नेत्यांकडून उत्तर आलं आहे.

“भाजपचा पदर धरल्यामुळे अजित पवारांना…”

अजित पवार यांनी दिलेल्या उत्तराला आता मनसे नेते संदीप देशपांडे यांनीही प्रत्युत्तर दिलं आहे. संदीप देशपांडे म्हणाले, त्यांचाही मुलगा, पत्नी निवडून आले नव्हते. अजित पवार यांनी भाजपशी लग्नगाठ बांधल्यामुळे त्यांना मत मिळालं. भाजपचा पदर धरल्यामुळे आम्हाला मतदान नाही, तर राज ठाकरे यांच्या नावावर मतं पडली आहे. अजित पवार यांनी स्वत:च्या जीवावर उभं राहावं आणि मग या सगळ्या वल्गना कराव्यात.

अजित पवारांच्या वक्तव्यावर अमित ठाकरे काय म्हणाले?

अजित पवार यांच्या वक्तव्यावर अमित ठाकरे म्हणाले, मी लहान आहे. त्यांना राजसाहेबच उत्तर देतील. पण मी या निवडणुकीत भरपूर शिकलो आहे. माझ्या पहिल्या निवडणुकीवरुन नाही, तर शेवटच्या निवडणुकीवरुन माझ्याबद्दलचं मत तयार करा. पुढे बोलताना अमित ठाकरे म्हणाले, EVM आलं म्हणजे प्रोग्रामिंग आलं 2017 मध्ये राज ठाकरे ममता बॅनर्जी यांच्यासह सगळ्या मोठ्या नेत्यांना भेटले होते आणि म्हणाले होते की EVM वर विश्वास नसेल तर त्यावर बहिष्कार टाका. अमित ठाकरे म्हणाले, निवडणुका बॅलट पेपरवर घेतल्या जाव्यात ही आमची जुनी मागणी आहे.

भाजपला दिल्लीत बहुमत धक्कातंत्र की महाराष्ट्र फॉर्म्युला? मुख्यमंत्रिपदास चेहरा निश्चित होण्यास आणखी वेळ  ही नावें चर्चेत? 

0

दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या मोठ्या विजयानंतर मुख्यमंत्रीपदाची संधी कुणाला मिळणार याबद्दलचे वेगवेगळे तर्क वितर्क लावले जातायत. मात्र, अंतिम निर्णय भाजप हायकमांड घेणार आहे. वेगवेगळ्या घटकांनुसार, भाजपमध्ये मुख्यमंत्री पदासाठी अनेक दावेदार आहेत. सध्या कोणीही उघडपणे आपला दावा करायला तयार नाही. मुख्यमंत्रिपदाचा चेहरा निश्चित होण्यासाठी आणखी वेळ लागू शकतो. या यादीत, परवेश वर्मा यांच्या नावाची  सर्वात जास्त चर्चा आहे.तसंच दावेदारांमध्ये अशी दोन नावे आहेत जी आमदारही नाहीत. मात्र, दिल्लीत भाजप धक्का देणार की परवेश वर्मा यांनाच संधी देणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

अरविंद केजरीवाल यांना पराभूत करून मोठा गोंधळ उडवणारे परवेश वर्मा यांचं नाव मुख्यमंत्रि‍पदाच्या शर्यतीत आघाडीवर आहे. परवेश दोनदा खासदार राहिले आहेत. नवी दिल्लीची जागा जिंकल्यानंतर परवेश  वर्मा यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचीही भेट घेतली. दिल्ली ग्रामीणमध्ये मिळालेल्या प्रचंड यशामुळे परवेश वर्मा यांच्या नावाची चर्चा जास्त आहे.

दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपने मुख्यमंत्रीपदासाठी कोणताही चेहरा निश्चित केलेला नव्हता. दिल्लीच्या निवडणुका पंतप्रधान मोदींच्या नावाने लढवल्या गेल्या. विजयानंतर आता सर्वांना मुख्यमंत्रिपदाच्या घोषणेची प्रतीक्षा आहे. वेगवेगळ्या कारणांमुळे, भाजपमध्ये मुख्यमंत्री पदासाठी अनेक दावेदार आहेत.

जर निवडून आलेल्या आमदारांव्यतिरिक्त मुख्यमंत्री निवडला गेला तर खासदार मनोज तिवारी आणि बांसुरी स्वराज हे देखील भाजपचे मुख्यमंत्रिपदाचे चेहरे असू शकतात. भाजप मोठ्या बहुमतानं सत्तेत आल्याने अशा परिस्थितीत दिल्लीचा विकास आणि सामाजिक समीकरणं लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांची निवड केली जाईल असं चित्र आहे.

रोहिणीमधून निवडणूक जिंकलेले विरोधी पक्षनेते विजेंद्र गुप्ता यांचंही नाव या शर्यतीत आहे. विजेंद्र हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष राहिले आहेत. ते 2015 ते 2020 पर्यंत विरोधी पक्षनेते होते. यानंतर रामवीर सिंह बिधुरी विरोधी पक्षनेते झाले. बिधुरी खासदार झाल्यानंतर विजेंद्र यांना पुन्हा विरोधी पक्षनेते बनवण्यात आले आहे. या यादीत सतीश उपाध्याय, जितेंद्र महाजन आणि अजय महावार यांची नावेही समाविष्ट आहेत.

‘भाजपकडे एक इन्स्ट्रूमेंट आहे, यामुळेच २७ वर्षांनी मोठा विजय’; दिल्ली महाविजयानंतर भाजप मंत्र्याचे सूचक विधान

0

पुणे : २७ वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर भाजपचे दिल्लीतील ‘सत्ता’स्वप्न पूर्णत्वास आले आहे. भाजपने दिल्ली विधानसभा निवडणुकीत महाविजय मिळवला आहे. ४८ जागांवर भाजपने विजय मिळवला आहे. तर आपला केवळ २२ जागांवर समाधान मानावे लागले आहे. तर काँग्रेसचा यंदाही सुपडासाफ झाला आहे. यावर राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. यातच मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही भाजपच्या दिल्लीतील महाविजयावर प्रतिक्रिया दिली आहे. ‘भाजपकडे एक इन्स्ट्रूमेंट आहे, त्यामुळे मोठा विजय मिळतो’ असे मोठे विधान बावनकुळे यांनी केले आहे.

बावनकुळे म्हणाले, भाजपला ऐतिहासिक विजय मिळाला आहे. ७० पैकी ४८ सीट मिळाल्या आहेत. दिल्लीकरांनी भाजपवर विश्वास या निकालामध्ये प्रतिबिंबित होत आहे. केजरीवाल आणि काँग्रेसच्या गैरकारभारामुळे २७ वर्षानंतर भाजपला हा विजय मिळाला आहे. २७ वर्षांत जो विकास झाला नाही त्यासाठी मोदींच्या नेतृत्वात भाजप सरकार न्याय देणार आहे. तर मत विभाजनाचा मुद्द्यावर प्रश्न विचारला असता बावनकुळेंनी हा दावा खोडून काढला आहे. ‘मतविभाजन झाले यात काही तथ्य नाही. महाराष्ट्रात आघाडीवाले एकत्र होते तरी काही फायदा झाला नाही. आमचे संघटन काम करत आहेत, योग्य उमेदवार आणि निवडणुकीचं कौशल्य आहे, हे भाजपकडे इन्स्ट्रूमेंट आहे, त्यामुळे भाजपला मोठा विजय मिळतो’ असेही बावनकुळेंनी नमूद केले.

तर काँग्रेसवर टीकास्त्र डागत बावनकुळे म्हणाले, काँग्रेसने आता आत्मचिंतन केले पाहिजे. उद्यापासून मशीन खराब झाली म्हणू नये. राहुल गांधींना महाराष्ट्राचा निकाल पचवत नाहीये. काँग्रेस पार्टी नीतिमत्तेमुळे हरलेली आहे. राहुल गांधी हे विकसित भारताच्या पद्धतीला निगेटिव्ह पद्धतीने घेत आहेत, त्यामुळे जनता राहुल गांधींना दूर करत आहे. काँग्रेसचे ना मॉडेल आहे, ना नीतिमत्ता आहे. २०४७ पर्यंत काँग्रेस पार्टी दिसणार नाही. मोदींनी विकसित भारत दाखवला आहे.

आप-काँग्रेसच्या राजकारणावर बोट ठेवत चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, काँग्रेस आणि आपची जर युती झाली असती तर भाजपला ७० पैकी ७० जागा मिळाल्या असत्या. काँग्रेससोबत आप गेली असती तर एकही जागा जिंकता आली नसती. कारण काँग्रेस पार्टी एक असं ग्रहण आहे की, ज्यामुळे आप पार्टी संपूर्ण डुबली असती. काँग्रेसला सोबत न घेतल्याने आप थोडीफार वाचली आहे, अशी घणाघाती टीकाही बावनकुळेंनी केली आहे.

निवडणूक निकालावर केजरीवालांचे मोठे वक्तव्य विरोधी पक्षाची भूमिका निभावणार नाही तर लोकांमध्येही राहून आणि त्यांची…

0

दिल्ली विधानसभा निवडणुकीचा अंतिम निकाल समोर येण्यास सुरुवात झाली आहे. या निकालामध्ये भाजपाने 27 वर्षांनंतर दिल्लीत कमळ फुलवले आहे. पण धक्कादायक बाब म्हणजे 2020 प्रमाणेच काँग्रेसला यंदाही भोपळा फोडता आलेला नाही.तर दुसरीकडे आपचे दोन मोठे नेते म्हणजेच माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना पराभवाचा धक्का बसला आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालाची अंतिम आकडेवारी अद्याप समोर आलेली नाही. मात्र भाजपाने या निवडणुकीत बहुमताचा आकडा पार करत एकहाती सत्ता मिळवली आहे. त्यामुळे आता अरविंद केजरीवाल यांनी पराभव मान्य करत या निवडणूक निकालावर भाष्य केले आहे.

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालावर भाष्य करण्यासाठी अरविंद केजरीवाल यांनी त्यांचा एक व्हिडीओ ट्वीट केला आहे. त्यात त्यांनी म्हटले की, आम्ही जनतेचा जनादेश मोठ्या नम्रतेने स्वीकारतो. या विजयाबद्दल मी भाजपाचे अभिनंदन करतो आणि आशा करतो की लोकांनी ज्या आश्वासनांसाठी त्यांना मतदान केले आहे, ते सर्व ते (भाजपा) पूर्ण करतील. परंतु गेल्या 10 वर्षांत आम्ही आरोग्य, शिक्षण आणि पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात खूप काम केले आहे. त्यामुळे आता आम्ही फक्त विरोधी पक्षाची भूमिका बजावणार नाही तर लोकांमध्येही राहून आणि त्यांची सेवा करत राहू, असे अरविंद केजरीवाल यांनी स्पष्ट केले.

केजरीवलांच्या साम्राज्याला सुरुंग, पण यूट्यूबर ‘ध्रुव’च्या प्रतिक्रियेनं भूवया उंचावल्या! नेमकं म्हणाला तरी काय?

0

दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजप तब्बल 27 वर्षानंतर सत्तेत परतला आहे. या ऐतिहासिक विजयाने आम आदमी पक्षाचा (आप) दारुण पराभव झाला. माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि ज्येष्ठ नेते मनीष सिसोदिया यांना आपली जागा वाचवता न आल्याने सर्वात मोठा धक्का बसला आहे. दिल्लीत गेल्या दशकभरापासून सत्तेत असलेला आम आदमी पक्ष या निवडणुकीत पूर्णपणे विखुरलेला दिसला.

नेत्यांना अडकवण्यासाठी एजन्सीचा वापर केला आणि अनेक धोरणे रखडली

निवडणुकीच्या निकालानंतर, यूट्यूबर ध्रुव राठीने आम आदमी पार्टीच्या पराभवासंदर्भात एक पोस्ट शेअर केली ज्यामध्ये त्यांनी पराभवाची मुख्य कारणे दिली आणि भाजपवर निशाणा साधला. राठी म्हणाला की, गेल्या काही वर्षांत दिल्लीत कोणतेही मोठे विकास काम झाले नाही कारण भाजपने आप सरकारला सुरळीतपणे काम करण्यापासून रोखण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले. त्यांनी आरोप केला की भाजपने नायब राज्यपालांच्या मदतीने आप सरकारचे आदेश रोखले, कायदेशीर बाबींमध्ये नेत्यांना अडकवण्यासाठी एजन्सीचा वापर केला आणि अनेक धोरणे रखडली.

भाजपच्या रणनीतीवर प्रश्न उपस्थित केले

ध्रुव राठी पुढे म्हणाला की 2023 मध्ये जीएनसीटीडी कायदा मंजूर झाल्यानंतर दिल्लीवर अप्रत्यक्षपणे भाजपचे राज्य होते. त्यांच्या समस्यांना खरेच जबाबदार कोण हे आता जनतेला स्पष्ट दिसेल. आगामी काळात दिल्लीत वायू प्रदूषण, यमुना प्रदूषण, पायाभूत सुविधांच्या समस्या आणि स्वच्छता या मुद्द्यांवर चर्चा होणार का? इतर राज्यांप्रमाणे धार्मिक ध्रुवीकरण करून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्यात भाजप यशस्वी होणार का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

केजरीवाल यांनी पराभव स्वीकारत भाजपचे अभिनंदन केले

दरम्यान, निवडणूक निकालानंतर अरविंद केजरीवाल यांनी जाहीरपणे पराभव स्वीकारला आणि विजयाबद्दल भाजपचे अभिनंदन केले. ते म्हणाले, “आम्ही जनतेचा निर्णय नम्रपणे स्वीकारतो. या मोठ्या विजयासाठी मी भाजपचे अभिनंदन करतो आणि आशा करतो की ते जनतेच्या अपेक्षा पूर्ण करतील.” ‘आप’ने गेल्या 10 वर्षात शिक्षण, आरोग्य, वीज, पाणी अशा क्षेत्रात काम केले, मात्र आता विरोधी पक्षाची भूमिका बजावत जनतेची सेवा करत राहणार असल्याचेही ते म्हणाले. निवडणूक चमकदारपणे लढल्याबद्दल त्यांनी आप कार्यकर्त्यांचे आभार मानले.

दुःख कमी होत नाही, वाढत चाललेय; मुख्य आरोपी अद्यापही फरार न्यायासाठी कोणते दार ठोठवायचे? देशमुख कुटुंबाचा आर्त सवाल

0

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे 9 डिसेंबर रोजी अपहरण करून हत्या करण्यात आली. संतोष देशमुखांच्या निर्घृण हत्येने बीड जिल्ह्याच नव्हे तर सगळ्या महाराष्ट्र हादरला. देशमुखांच्या हत्या प्रकरणानंतर राज्यातील वातावरण ढवळून निघाले. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला 2 महिने पूर्ण होत आहेत. पण दु:ख कमी होण्याऐवजी वाढत चालले आहे, न्यायासाठी कोणतं दार ठोठवायचे असा आर्त सवाल संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख यांनी केला आहे.

सरपंच संतोष देशमुख हत्याकांडाने बीड जिल्हा हादरला होता. या घटनेला दोन महिने पूर्ण होऊन देखील घटनेतील मुख्य मास्टर माईंड समोर आलेला नाही. तर मुख्य आरोपी कृष्णा आंधळे हा अद्यापही फरार आहे. दरम्यान या प्रकरणाचा तपास सीआयडीसह एसआयटी करत आहे. मागील दोन महिन्यांपासून देशमुख कुटुंबीय न्यायासाठी धडपड करत आहेत.

देशमुख कुटुंबाचा आर्त सवाल…

धनंजय देशमुख यांनी म्हटले की, माझे दुःख कमी होत नाही. दुःख वाढत चालले आहे. न्यायाच्या भूमिकेत सर्वजण आहेत. मात्,र माझा भाऊ कुठून येणार? त्यासाठी कोणते दार ठोठवायचे वेदना भयानक असल्याचे त्यांनी म्हटले. धनंजय यांनी म्हटले की, कृष्णा आंधळे कागदोपत्री दोन महिने फरार होता. त्याला अभय दिले नसते तर हा गुन्हा थांबला असता. त्यामुळे याला सर्वस्वी जबाबदार कोण? हे प्रशासनाने आम्हाला सांगावे, असा सवालही त्यांनी केला आहे.

धनंजय देशमुख यांनी म्हटले, आरोपींना अभय देत गेला म्हणून पुढच्या घटना घडत गेल्या. एसआयटी आणि सीआयडीचा तपास योग्य पद्धतीने सुरू आहे. मात्र घटना घडल्यानंतर आरोपींचे मोबाईल सुरूच होते. कोणतेही मोबाईल स्ट्रेस केले नाही. ही सहजपणे गोष्ट घेण्यात आली. गांभीर्याने घेण्यात आली नाही. शोध होत नाही म्हणून म्हटलं जात आहे. गु्न्हेगाराला अभय दिल्याने मोठी घटना घडली आहे. त्याला सर्वस्वी जबाबदार प्रशासन असून हे कागदपत्रे देखील सिद्ध करून दाखवणार आहोत, असं धनंजय देशमुखांनी म्हटले.