Home Blog Page 202

कृष्णा आंधळेचा पत्ता सापडला? येथे लपून बसला असण्याची शक्यता; कृष्णा आंधळे कागदोपत्री दोन महिने फरार?

0

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्येला आता 2 महिने झालेत. हत्येप्रकरणी पोलीस, सीआयडी पथकं तपास करतायेत. हत्या प्रकरणानंतर राज्यभर त्याचे पडसाद उमटले, आंदोलनं झाली.मात्र देशमुख कुटुंब अजुनही न्यायाच्या प्रतिक्षेत आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणाला दोन महिने पूर्ण झाले, तरी मुख्य आरोपी कृष्णा आंधळे अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. आंधळेच्या बेपत्तेपणावर अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. दरम्यान, भाजप आमदार सुरेश धस यांनी पुन्हा एकदा या प्रकरणावर भाष्य करत तपास यंत्रणांवर विश्वास व्यक्त केला आहे.

न्याय कधी मिळणार?

जन्मदात्या बापाची क्रूर हत्या झाल्याच्या घटनेला 2 महिने उलटून गेल्याचं सांगताना वैभवीला अश्रू अनावर झाले. 9 डिसेंबर 2024 ला संतोष देशमुखांचं अपहरण करून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली. आरोपींना पकडलं असलं तरी मास्टरमाईंड अद्यापही समोर आलेला नाही. तर एक आरोपी कृष्णा आंधळे अद्यापही फरार आहे.

सुरेश धस नेमकं काय म्हणाले?

सुरेश धस यांनी कृष्णा आंधळे परराज्यात लपून बसला असण्याची शक्यता वर्तवली आहे. “तो कोकरू आहे, कुठेही लपला तरी तो सापडेल. पोलिस आणि गृहविभागावर आमचा पूर्ण विश्वास आहे. आकाच्या आकाची पिलावळ आहे आणि त्यांचा माज जिरणार आहे.” असं धस म्हणाले यावेळी त्यांनी तपासाच्या काही गोष्टी गोपनीय असल्याचे सांगून अधिक माहिती देण्यास नकार दिला. तसेच धनंजय देशमुख यांना समजवण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितलं.

धनंजय देशमुख काय म्हणाले?

माझे दुःख कमी होत नाही. दुःख वाढत चालले आहे. न्यायाच्या भूमिकेत सर्वजण आहेत. मात्,र माझा भाऊ कुठून येणार? त्यासाठी कोणते दार ठोठवायचे वेदना भयानक असल्याचे धनंजय देशमुख यांनी म्हटले आहे. कृष्णा आंधळे कागदोपत्री दोन महिने फरार होता. त्याला अभय दिले नसते तर हा गुन्हा थांबला असता. त्यामुळे याला सर्वस्वी जबाबदार कोण? हे प्रशासनाने आम्हाला सांगावे, असा सवालही धनंजय यांनी केला आहे.

आरोपींना अभय देत गेला म्हणून पुढच्या घटना घडत गेल्या. एसआयटी आणि सीआयडीचा तपास योग्य पद्धतीने सुरू आहे. मात्र घटना घडल्यानंतर आरोपींचे मोबाईल सुरूच होते. कोणतेही मोबाईल स्ट्रेस केले नाही. ही सहजपणे गोष्ट घेण्यात आली. गांभीर्याने घेण्यात आली नाही. शोध होत नाही म्हणून म्हटलं जात आहे. गु्न्हेगाराला अभय दिल्याने मोठी घटना घडली आहे. त्याला सर्वस्वी जबाबदार प्रशासन असून हे कागदपत्रे देखील सिद्ध करून दाखवणार आहोत, असं धनंजय देशमुखांनी म्हटले.

शोएब अख्तरकडून हरभजनला धक्काबुक्की, खचाखच भरलेल्या स्टेडियममध्ये खेळाडूंचा राडा, हरभजनचेही जशास तसे…..

0

सर्वांना उत्सुकता असलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीला 9 दिवसात सुरूवात होत आहे. पण सर्वांना उत्सुकता लागलीये ती, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याची… दोन्ही पारंपारिक प्रतिस्पर्धी india vs pakistan champions trophy 2025 येत्या 23 फेब्रुवारीला आमने सामने येतील. अशातच आता दोन्ही देशाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अशातच आता भारत आणि पाकिस्तानचे दोन स्टार खेळाडू एकमेकांना भिडल्याचंपहायला मिळालंय. नेमकं काय झालं? पाहा….

https://www.facebook.com/reel/1282318522992743

हरभजन अन् शोएब अख्तरची धक्काबुक्की-

दुबईतील सर्वात मोठ्या टी-20 लीगमध्ये म्हणजेच ILT20 चा अखेरचा सामना डेझर्ट वायपर्स आणि दुबई कॅपिटल्स यांच्यात खेळवला गेला होता. या सामन्यात दुबई कॅपिटल्सने विजय मिळवला. या सामन्यासाठी हरभजन सिंग आणि शोएब अख्तर उपस्थित होते. समालोचन करत असताना दोन्ही खेळाडू जेव्हा पहिल्यांदा समोरासमोर आले, तेव्हा दोघांनी मस्करीत एकमेकांना खुन्नस दिली. हरभजनने आपला तोरा दाखवला अन् शोएब अख्तर याला खुन्नस दिली. त्यावर अख्तरने देखील डोळे दाखवले. दोन्ही खेळाडूंमध्ये मस्करीत धक्काबुक्की झाली.

व्हिडीओ तुफान व्हायरल

शोएब अख्तर याने स्वत: सोशल मीडियावर याचा व्हिडीओ शेअर केला आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी तयारी करण्याची ही आपली पद्धत आहे, असं शोएब अख्तर म्हणाला. त्यावेळी त्याने सोशल मीडियावर हरभजन सिंगचं मत देखील विचारलं आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

दुबई कॅपिटल्स चॅम्पियन

दरम्यान, अंतिम सामन्यात डेझर्ट वायपर्सने दुबई कॅपिटल्ससमोर 20 ओव्हरमध्ये 190 धावांचे मोठं लक्ष्य ठेवलं होतं. याचा पाठलाग करताना कॅपिटल्स संघाने 4.5 ओव्हरमध्ये फक्त 31 धावांत 3 गडी गमावले होते. त्यानंतर दुबई कॅपिटल्स संघाने आक्रमक फलंदाजी करत टार्गेट पूर्ण केलं अन् विजेतेपद पटकावलं आहे.

पाकिस्तानचा संघ : मोहम्मद रिझवान (कॅप्टन), बाबर आझम, फखर जमान, कामरान गुलाम, सौद शकील, तय्यब ताहिर, फहीम अश्रफ, खुशदिल शाह, सलमान अली आगा, उस्मान खान, अबरार अहमद, हरिस रौफ, मोहम्मद हसनैन, नसीम शाह आणि शाहीन शाह आफ्रिदी.

टीम इंडिया : रोहित शर्मा (कॅप्टन), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, यशस्वी जैस्वाल, ऋषभ पंत आणि रवींद्र जडेजा

राज ठाकरेंची भेट का घेतली? काय झाली चर्चा? मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती; केवळ मैत्रीकरता मी त्यांच्या घरी….

0

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. राज ठाकरेंच्या शीवतीर्थ या निवासस्थानी दोन्ही नेत्यांची सव्वा तास चर्चा झाली. मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाली असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. यावर मनसेकडून काही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. पण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेटीबद्दल माहिती दिली.

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरे यांनी निकालावर संशय व्यक्त केला होता. राज्यात वाढलेल्या मतदारांच्या संख्येसह इतर मुद्द्यांवरून राज ठाकरे यांनी टीकाही केली होती. दरम्यान, आता राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंच्या निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दाखल झाल्यानं सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, चर्चा फक्त तुम्ही करताय. ही कोणतीही राजकीय भेट नाही. मुख्यमंत्री झाल्यानंतर राज ठाकरेंचा अभिनंदनाचा फोन आला. त्यावेळी मी सांगितलं होतं मी घरी येईन. मी घरी गेलो होतो, ब्रेकफास्ट केला. गप्पा मारल्या. या बैठकीचा कोणताही राजकीय संदर्भ नाही. केवळ मैत्रीकरता मी त्यांच्या घरी गेलो होतो.

रणवीर अलाहाबादियाच्या व्हायरल व्हिडीओवरही देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की,’अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या काही मर्यादा आहेत. समाजात अश्लीलतेचे काही नियम तयार केले आहेत. त्याची हद्द ओलांडली तर त्यावर कारवाई केली जाईल.’ सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर रणवीर इलाहबादिया हा स्टँडअप कॉमेडियन समय रैनाच्या शोमध्ये सहभागी झाला होता. त्यावेळी रणवीरने एका स्पर्धकाला आक्षेपार्ह प्रश्न विचारला. तुम्हाला पालकांना सेक्स करताना पहायचंय की त्यांच्यासोबत जॉइन व्हायचंय? असं रणवीरने विचारलं. यामुळे आता वाद निर्माण झाला आहे.

महाकुंभला महागर्दी ! प्रयागराज संगम रेल्वे स्टेशन बंद; शेकडो किलोमीटर रांगा, ४३ कोटी भाविकांचे स्नान

0

प्रयागराजमध्ये दररोज महाकुंभात स्नान करण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे, ज्यामुळे संपूर्ण शहर गर्दीने भरलेले आहे. रविवारपासून गर्दीची परिस्थिती अशी आहे की २० मिनिटांचे अंतर कापण्यासाठी लोक अनेक तास ट्रॅफिक जाममध्ये अडकून पडत आहे. रविवारी, प्रयागराजमधील महाकुंभ मेळ्याच्या सर्व मार्गांवर अनेक किलोमीटरपर्यंत वाहतूक विस्कळीत झाली. गर्दी इतकी मोठी होती की प्रयागराज संगम रेल्वे स्टेशन १४ फेब्रुवारीपर्यंत बंद करण्यात आले आहे. कुंभमेळा प्रशासनाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, १३ जानेवारी ते ९ फेब्रुवारी या कालावधीत ४३.५७ कोटींहून अधिक भाविकांनी संगमात स्नान केले आहे.

वाहतूक विभागाचे अतिरिक्त आयुक्त कुलदीप सिंह यानी सांगितले की, “वाहनांची संख्या खूप जास्त आहे आणि प्रवासी शक्य तितक्या लवकर त्यांच्या गंतव्यस्थानावर पोहोचण्यासाठी शक्य तितक्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत आहेत. यामुळे, बराच वेळ वाहतूक कोंडी होते आणि या गर्दीमुळे, आपल्याला मौनी अमावस्येची व्यवस्था लागू करावी लागते. ते म्हणाले, मौनी अमावस्येला जितकी गर्दी आली होती तितकीच गर्दी आता येत आहे. दूरवरचा पार्किंग लॉट ५० टक्के भरलेला आहे. जवळील पार्किंगची जागा लहान आहे तर दूरची पार्किंगची जागा मोठी आहे, तरीही वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.

ते म्हणाले की, आयईआरटी आणि बघाडा पार्किंग (मेळ्याच्या जवळ) मध्ये ४,००० ते ५,००० वाहने पार्क करण्याची क्षमता आहे, तर नेहरू पार्क आणि बेला कछार सारख्या दूरच्या पार्किंग लॉटमध्ये २०,०००-२५,००० वाहने बसू शकतात. स्नानोत्सवादरम्यान स्थानिक लोकांची वाहने धावत नाहीत, परंतु सध्या सर्व प्रकारची वाहने धावत आहेत. सिंह म्हणाले की, गेल्या कुंभमेळ्यात (२०१९) विशेषतः सामान्य दिवशी इतकी गर्दी नव्हती, परंतु यावेळी सामान्य दिवशीही इतकी मोठी गर्दी येत आहे. पुढील काही दिवस भाविकांची गर्दी कमी होण्याची शक्यता नाही, असेही त्यांनी सांगितले.

गर्दीमुळे प्रयागराज संगम स्टेशन बंद

दरम्यान, लखनऊ येथील वरिष्ठ विभागीय व्यावसायिक व्यवस्थापक (उत्तर रेल्वे) कुलदीप तिवारी म्हणाले की, प्रयागराज संगम स्थानकाबाहेर प्रचंड गर्दीमुळे प्रवाशांना स्थानकाबाहेर पडण्यास अडचण येत असल्याने, प्रयागराज संगम स्थानक बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता प्रवाशांना त्यांची ट्रेन पकडण्यासाठी प्रयागराज जंक्शनला जावे लागेल. गर्दी नियंत्रणात आल्यानंतर स्टेशन पुन्हा सुरू केले जाईल असे रेल्वे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. प्रशासनाने प्रवाशांना सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. भाविकांच्या सोयीसाठी अतिरिक्त गाड्या चालवण्याचाही विचार केला जात आहे.

रेल्वेची विशेष व्यवस्था

महाकुंभ २०२५ मध्ये येणाऱ्या भाविकांच्या प्रचंड गर्दीच्या पार्श्वभूमीवर, उत्तर मध्य रेल्वेने पुढील आदेश येईपर्यंत प्रयागराज जंक्शन स्थानकावर एकेरी वाहतुकीची व्यवस्था लागू केली आहे. उत्तर मध्य रेल्वेचे वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी अमित मालवीय यांनी ही माहिती दिली.

प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि सोयीसाठी, फक्त शहराच्या बाजूने (प्लॅटफॉर्म क्रमांक १ च्या बाजूने) प्रवेश दिला जाईल आणि बाहेर पडण्याचा मार्ग फक्त ‘सिव्हिल लाईन्स’ बाजूने असेल.

अनारक्षित तिकिटे असलेल्या प्रवाशांना दिशानिर्देशानुसार प्रवासी निवारा केंद्रातून प्रवेश दिला जाईल.

तिकीट व्यवस्था प्रवासी निवारा केंद्रांवर अनारक्षित तिकीट काउंटर, एटीव्हीएम आणि मोबाईल तिकीट या स्वरूपात असेल.

त्याचप्रमाणे, आरक्षित तिकिटे असलेल्या प्रवाशांना गेट क्रमांक पाचवरून प्रवेश दिला जाईल आणि त्यांना ट्रेन येण्याच्या अर्धा तास आधी प्लॅटफॉर्मवर जाण्याची परवानगी दिली जाईल.

64 वर्षी गाजवलं बॉक्स ऑफिस, पाच पट 250 कोटींचं कलेक्शन 2025 मधील पहिला ब्लॉकबस्टर सिनेमा दिला

0

2025 वर्षात अनेक नवीन मूव्ही पाइपलाइनमध्ये आहेत. यातील काही मूव्ही रिलीज झाले आहेत. यंदाच्या वर्षातील पहिला ब्लॉकबस्टर मूव्ही मिळाला आहे. या मूव्हीने बजेट वसूल करून त्यापेक्षा अनेक पटीने पैसे वसूल केले आहेत. हा सिनेमा 2025 मधील पहिला ब्लॉकबस्टर ठरला आहे. हा सिनेमा कोणता आहे आणि यामध्ये कोणकोण स्टार्स आहेत यावर एक नजर टाकूया….

या सिनेमाचं नाव आहे ‘संक्रांतिकी वास्तुनम’. हा एक तेलुगू सिनेमा आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन अनिल रविपुडी यांनी केलं आहे. या सिनेमात व्यंकटेश मुख्य भूमिकेत असून मीनाक्षी चौधरी, ऐश्वर्या राजेश, श्रीनिवास रेड्डी आणि साई कुमार यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा सिनेमा यंदाच्या वर्षीचा ब्लॉकबस्टर ठरला. आत्तापर्यंत रिलीज झालेल्या सिनेमांपैकी या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर कमाल केली.

‘संक्रांतिकी वास्तुनम’ हा सिनेमा 2025 चा पहिला ब्लॉकबस्टर ठरला आहे. या सिनेमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. 50 कोटींच्या बजेटमध्ये बनवलेल्या या सिनेमाने 250 कोटींचं कलेक्शन केलं आहे. 2025 चा 250 कोटींचा टप्पा ओलांडणारा हा पहिलाच सिनेमा ठरला आहे. प्रेक्षकांनी सिनेमाला भरभरून प्रतिसाद दिलाय.

दरम्यान, ‘संक्रांतिकी वास्तुनम’ या सिनेमाची स्टोरी एका विवाहित जोडप्याची आहे. ज्यांच्या आयुष्यात EX ची एन्ट्री होते आणि पूर्ण लाइफ विस्कळीत होतं. एक्स गर्लफ्रेंड अभिनेत्याकडे अपहरण प्रकरण सोडवण्यासाठी मदत मागते. त्यानंतर कहाणीत अनेक ट्विस्ट आणि टर्न येतात. बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा चांगली कामगिरी करत असून 2025 चा हा हिट सिनेमा आहे.

कॉमेडीच्या नावे बकवास… रणवीर अलाहाबादियाच्या ‘अश्लील’ प्रश्नावरून गदारोळ, काय होता तो सवाल ?

0

युट्युबर आणि कॉमेडियन रणवीर अलाहाबादियाच्या एका अश्लील प्रश्नाने सोशल मीडियावर वादळ निर्माण केले आहे. फेसबुकवर तसेच आणि एक्सच्या प्लॅटफॉर्मवर लोक रणवीर अलाहाबादियाला प्रचंड ट्रोल करत आहेत. रणवीर अलाहाबादिया यूट्यूबवर बीरबिसेप्स नावाने एक चॅनल चालवतो. हे चॅनल डबल मीनिंग संवाद, भयानक कमेंट्स टिप्पण्या आणि काहीवेळा अडल्ट कंटेंटमुळे चर्चेत असतं. यावेळीही रणवीरने अशी एक कमेंट केली आहे ज्यामुळे सोशल मीडियावर भयानक गदारोळ सुरू झाला आहे. नुकत्याच झालेल्या एका एपिसोडदरम्यान त्याच्या विधानामुळे हा वाद सुरू झाला. स्टँडअप कॉमेडियन रणवीर अलाहाबादिया हा इंडियाज गॉट टॅलेंट शोमध्ये आला होता. त्याच्यासह या शोमध्ये समय रैना, कंटेंट क्रिएटर आशीष चंचलानी, जसप्रीत सिंह आणि रिबेल कीड नावाने ओळखला जाणारा अपूर्व मुखीजा हे जज म्हणून सहभागी झाले होते.

त्या अश्लील प्रश्नावरून गदारोळ

आणि याच शोमध्ये रणवीरने एका स्पर्धकाला अश्लील, विवादास्पद प्रश्न विचारला, त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. रणवीर अलाहाबादियाने शोमधील एका स्पर्धकाला विचारले, “तुम्ही तुमच्या पालकांना आयुष्यभर दररोज इंटिमेट होताना पाहाल का किंवा एकदाच सहभागी होऊन ते कायमचे थांबवाल?” असा भयानक प्रश्न त्याने विचारला.

त्याच्या या अतिशय असभ्य प्रश्नावरून प्रचंड गदारोळ निर्माण झाला आहे. मात्र यावर रणवीरने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

सोशल मीडियावर ट्रोलिंग

यानंतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर टीकेचा पूर आला. डिजिटल मनोरंजनाच्या जगात संवेदनशीलता आणि नैतिक जबाबदारीचीदेखील गरज आहे,असे मत अनेकांनी व्यक्त केलं. तर रणवीर अलाहाबादियाने माफी मागितली पाहिजे अशी मागणी अनेक यूजर्सनी केली आहे. त्याच्यावर कायदेशीर कारवाईची मागणीही अनेकांनी केली आहे. बऱ्याच लोकांनी त्याला ट्रोल केलं आहे.

कवी नीलेश मिश्रा आणि काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेट यांनीही समावेश होता ज्यांनी रणवीर अलाहाबादिया याच्या वक्तव्यावर जोरदार टीका केली. असे विकृत क्रिएटर्स देशाच्या क्रिएटिव्ह इकॉनॉमीला आकार देतात का असा सवाल निलेश मिश्रांनी विचारला. “साधे, असभ्य आणि असंवेदनशील शब्द फक्त कंटाळवाणे लोकांसाठी आहेत. हे क्रिएटर अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली काहीही बोलू शकतात आणि त्यातून पळ काढू शकतात.” असेही ते म्हणाले.

मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल

इंडिया गॉट टैलेंट शो मध्ये झालेल्या वादग्रस्त वक्तव्याची पोलीस चौकशी सुरू झाली आहे. लाईव्ह शो दरम्यान केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याची पोलिसाकडून चौकशी सुरू आहे. पोलिसांचे पथक हॅबीटैटच्या कार्यालयात पोहोचले आहे .

तर मुख्यमंत्री देवेंद् फडणवीस यांनीही या वक्तव्याची दखल घेतली आहे. काही गोष्टी असंस्कृत पद्धतीने हाताळल्या गेल्या आहेत, जे पूर्णपणे चुकीचे आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे पण जेव्हा आपण दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर अतिक्रमण करतो तेव्हा आपले स्वातंत्र्य संपते. हे योग्य नाही, प्रत्येकाला मर्यादा असतात,असे मुख्यमंत्री म्हणाले.

महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या इन्कम टॅक्स छाप्यानंतर रामराजे निंबाळकरांचं 7 शब्दांचं Whatsapp स्टेटस चर्चेत

0

आयकर विभागाने मागील पाच दिवसांपासून साताऱ्यात केलेल्या छापेमारीमुळे येथील राजकारण चांगलेच तापले आहे. फलटण येथे आयकर विभागाने संजीवराजे नाईक निंबाळकर यांची सुरू केलेली चौकशी रविवारी पाचव्या दिवशी संपली. ही चौकशी संपल्यानंतर काही तासांमध्येच माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी आपल्या व्हॉट्सअप स्टेटसमधून विरोधकांना सूचक इशारा दिला आहे. रामराजे नाईक निंबाळकर यांचं हे व्हॉट्सअप स्टेटस मोठ्या राजकीय संघर्षाची चाहुल असल्याची चर्चा सातऱ्याच्या राजकारणात सुरु झाली आहे. पण या स्टेटसमध्ये नेमकं आहे तरी काय ते पाहूयात…

पाच दिवस सुरु होता आयकर छापा

विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे चुलत बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या घरावर आयकर विभागानं धाड टाकली. या धाडीमुळे फलटण शहरात एकच खळबळ उडाली. बुधवारी आयकर विभागाच्या कर्मचाऱ्यांनी संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या फलटण येथील निवासस्थानी, पुण्यातील निवासस्थानी , ‘गोविंद मिल्क डेअरी’वर चौकशीसाठी दाखल झाले होते. बुधवारपासून सुरु झालेली चौकशी पाचव्या दिवशी म्हणजेच रविवारी संपली. पाच दिवसापासून संजीव राजे नाईक निंबाळकर यांच्या घरासमोर त्यांचे समर्थक देखील ठिय्या मांडून होते. संजीवराजे नाईक निंबाळकरांचं डेअरी उत्पादनांचा आणि कन्स्ट्रक्शन व्यवसायसुद्धा आहे. या धाडीमुळे चर्चांना उधाण आलंय. सोबतच आयकर विभागाच्या छापेमारीला राजकीय कंगोरे असल्याचीही चर्चा रंगली होती.

रामराजे निंबाळकरांच्या व्हॉट्सअप स्टेटसमध्ये काय?

राजकीय हेतूने ही छापेमारी करण्यात आल्याचं बोललं जात असतानाच आता ही छापेमारी संपल्यानंतर रामराजे निंबाळकरांनी सूचक विधान आपल्या व्हॉट्सअप स्टेटसमधून केलं आहे. “सुरुवात तुम्ही केली आहे शेवट मी करणारच,” असं अवघ्या सात शब्दांचं व्हॉट्सअप स्टेटस रामराजे नाईक निंबाळकर यांनी ठेवलं आहे.

भरपूर प्रश्नांचा मारा

आयकर विभागाकडून या छापेमारीदरम्यान संजीवराजे नाईक निंबाळकरांवर प्रश्नांची सरबत्ती करण्यात आल्याचे समजते. फलटण येथील घरावरील छाप्यादरम्यान आयकर विभागाने संजीवराजे निंबाळकर आणि त्यांच्या कुटुंबीयांना अनेक प्रश्न विचारले. त्यांच्याजवळील अनेक कागदपात्रांची चौकशी करण्यात आली. चौकशीत काहीही सापडलं नसल्याची माहिती संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी दिली. माझ्याकडून काहीही जप्त केलं नाही. ही छापेमारी व्यक्तिगत माझ्यावर नव्हती. गोविंद मिल्क संदर्भात ही कारवाई होती असे देखील निंबाळकर यांनी सांगितले. या प्रकरणावरुन आता पलटणमधील राजकारण अधिक तापण्याचं चिन्ह दिसत आहे.

उद्योगमंत्री उदय सामंत नाराज? पत्र समोर येताच तातडीची पत्रकार परिषद; म्हणाले, तो माझा अधिकार!

0

महायुतीमधील शिवसनेच्या (Shivsena) मंत्र्यांचा नाराजीचा सूर कायम असल्याचे पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून शिवसेना मुख्यनेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. यावर मी नाराज नसल्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. त्यातच, आता उद्योगमंत्री उदय सामंत (uday samant) हेही नाराज असल्याचे समजते. उद्योग मंत्री उदय सामंत यांनी स्वतःच्याच उद्योग खात्यातील प्रधान सचिव आणि सीईओ यांच्याजवळ नाराजी व्यक्त करत पत्र लिहिल्याची सूत्रांची माहिती आहे. मात्र, या वृत्तानंतर उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेत आपण नाराज नसल्याचे स्पष्ट केले. तसेच मी राज्याचा कॅबिनेटमंत्री आहे, मला प्रधान-सचिवांच्या मान-सन्मानाबद्दल कळते, असे म्हणत उदय सामंत यांनी लिहिलेल्या नाराजी पत्रावरही त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

उदय सामंत यांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात तसेच उद्योग विभागाची काही महत्त्वाचे धोरणात्मक निर्णय परस्पर प्रशासकीय पातळीवर घेत असल्याबाबत पत्रातून नाराजी व्यक्त केली आहे. धोरणात्मक निर्णय, महत्त्वाचे कामकाजाबाबत आणि कामकाजाविषयी सचिव उद्योग तसेच मुख्याधिकारी, कार्यकारी अधिकारी यांनी नियमित ब्रिफिंग करावी, याची दक्षता घ्यावी असा सज्जड दमच या पत्रातून अधिकाऱ्याना भरला आहे. अधिकारी परस्पर कारभार करतात, मंत्र्यानाही विश्वासात घेत नसल्याची खंत सामंतांनी पत्रातून व्यक्त केल्याची माहिती आहे. आता, सामंत यांच्याकडून या पत्रासंदर्भात माहिती देण्यात आली आहे.

मी 4 फेब्रुवारी 2025 रोजी अंतर्गत पत्र आमच्या विभागाला दिलं, ते तुमच्यापर्यंत उशिरा पोहचलं आहे. काम कसं सुरू आहे आणि ते तुमच्यापर्यंत उशिरा पोहचलं हे आमचं यश आहे यात मी नाराज नाही. धोरणात्मक निर्णयाची माहिती आम्हाला द्यावी हेच मी पत्रातून म्हटलयं. सत्तेचं केंद्रीकरण करण्यापेक्षा विक्रेंद्रीकरण केलं. स्वत:कडचे सर्व अधिकार आपल्याकडेच ठेवण्यापेक्षा इतर अधिकाऱ्यांना ते द्यावेत, मी नाराज नाही, मी कॅबिनेटमंत्री आहे. माझ्या हाताखाली प्रधान सचिव काम करतात, प्रधान सचिव यांचा मानसन्मान आणि माझा मान सन्मान याची मला जाणीव आहे, असे म्हणत उदय सामंत यांनी पत्रावरील नाराजीसंदर्भाने स्पष्टीकरण दिले.

लोकांचं काम, उद्योजकांच काम महत्त्वाचं

लोकांना उद्योजकांना त्याचा फायदा व्हावा, या पत्रातून माझी नाराजी नाही ती महत्वाचीही नाही, लोकांचं काम उद्योजकांचं काम होणं महत्वाचं आहे. जनतेत प्रश्न मांडता यावेत यासाठी मला ब्रिफिंग व्हावी हेच म्हटले आहे. अधिकारी पत्रकार परिषद घेऊ शकत नाहीत. मी कोणाच्याही अधिकारावर गदा आणत नाही, दबाव टाकत नाही. पुरंदर विमानतळाच्या जागेचा प्रश्न सुटला,याचे उदाहरणही सामंत यांनी दिले. तसेच, सिनारमस कंपनीबाबत मला ब्रिफिंग झालं नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पत्रातून मी सूचना केल्या

एखादं काम मुंबईला येण्यापेक्षा त्या त्या जिल्ह्यात झालं तर चांगलयं ना? नागपूरमध्ये आम्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वाढदिवसा निमित्त मोफत टॅब वाटले, निविदा कपात का झाली? हे मी विचारलं तर काय बिघडलं, असा सवाल उपस्थित करत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी थेट नाराजी व्यक्त केली आहे. मी नाराज झालो तरी माझा अधिकार मला माहित आहे, 4 तारखेला दिलेलं पत्र 10 तारखेला बाहेर आलं ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. या पत्रातून सूचना किंवा कशा पद्धतीतून काम व्हायला हवं असा अर्थ काढता येऊ शकतो. मी पत्राचा अर्थ वेगळा लावलेला नाही, ज्यांनी कोणी पत्र दिलं त्यानी तो अर्थ लावला आहे, असेही सामंत यांनी स्पष्ट केलं.

सोलापूरच्या मोहोळमध्ये भीषण अपघात, देवदर्शनाला निघालेल्या भाविकांच्या मिनी बसला कंटेनरची धडक, तिघांचा मृत्यू,15 जखमी

0

सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात रविवारी दुपारी झालेल्या भीषण अपघातामध्ये देवदर्शनासाठी जात असलेल्या भाविकांच्या बसचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये तिघांचा मृत्यू झाला असून तब्बल 15 जण जखमी झाले आहेत. जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सोलापूर-पुणे महामार्गावर कोळेवाडी येथे हा अपघात घडला. या अपघातानंतर घटनास्थळी जखमींना रुग्णालयात नेण्याची धावपळ आणि नातेवाईकांची रडारड सुरु होती.

प्राथमिक माहितीनुसार, कोळेवाडी येथील रस्त्यावर एका कंटेनरची दुचाकीशी धडक झाली. त्यानंतर हा कंटेनर राँग साईडला गेला आणि मिनी बसला जाऊन धडकला. कंटेनर वेगात असल्यामुळे त्याची धडक बसताच मिनी बस जागीच पलटी झाली. त्यामुळे अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले. यापैकी एकाचा जागीच मृत्यू झाला, तर दोघांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती आहे. या अपघातानंतर कोळेवाडी येथील घटनास्थळी अत्यंत विदारक चित्र पाहायला मिळाले. रक्तबंबाळ अवस्थेतील लोकांना स्ट्रेचरवरुन रुग्णालयात नेण्यासाठी धावपळ सुरु होती. मिनी बसमधील जखमी प्रवासी आजुबाजूला बसून आणि जमिनीवर झोपून व्हिवळत होते. काहींच्या नातेवाईकांचा मृत्यू झाल्याने त्यांचा आक्रोश सुरु होता.

अपघातग्रस्त मिनी बस ही भाविकांना घेऊन पंढरपूर आणि तुळजापूरला भवानी देवीच्या दर्शनाला जात होते. मात्र, वाटेतच काळाने त्यांच्यावर घाला घातला. या अपघातात सर्वात आधी कंटेनरला धडकलेला दुचाकीस्वार दयानंद भोसले, मिनी बस चालक लक्ष्मण पवार यांच्यासह आणखी एकाचा मृत्यू झाला आहे. कंटेनर मिनी बस आणि दुचाकीचा अपघात झाल्यानंतर सोलापूर-पुणे महामार्गावरील वाहतूक खोळंबली होती. पोलिसांनी घटनास्थळी येत क्रेनच्या साह्याने पलटी झालेली मिनीबस बाजूला केली. याप्रकरणी कंटेनर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबईच्या कोस्टल रोडवर भीषण अपघात

मुंबईच्या कोस्टल रोडवर शनिवारी रात्री भीषण अपघात झाला. शनिवारी रात्री सव्वाआठच्या सुमारास हा अपघात घडला. यावेळी गार्गी चाटे (वय 19) आणि तिचा मित्र संयम साकला हे दोघे त्यांच्या स्विफ्ट कारने प्रभादेवी येथून मरिन ड्राईव्हच्या दिशेने जात होते. त्यांची कार हाजीअली येथे अनियंत्रित होऊन पलटी झाली. यामध्ये गार्गी चाटे हिच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन तिचा मृत्यू झाला.

राज ठाकरेंची भेट का घेतली? बंद दाराआड काय चर्चा झाली?; फडणवीस स्पष्टच बोलले

0

विधानसभा निवडणुकीतील मतदानात घोळ झाल्याचा आरोप मनसे अध्यक्ष ठाकरेंनी केला होता. महायुतीच्या विजयावर त्यांच्याच लोकांचा विश्वास बसला नव्हता अशी टीकाही त्यांनी केली होती, त्यानतंर मनसे-महायुतीच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण सुरू झाले. मात्र दुसरीकडे आज सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी आज शिवतीर्थावर जाऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या. या दोन प्रमुख नेत्यांची सुमारे तासभर तरी बंद दाराआड चर्चा सुरू होती. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. पण त्यावर मनसे किंवा भाजप, यापैकी कोणत्याच पक्षाच्या नेत्यांनी मौन सोडले नाही. अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच या भेटीचं गुपित विचारण्यात आलं असता, त्यांनी थेट उत्तर दिलं.

चर्चा फक्त तुम्ही करता, ही कुठलीही राजकीय भेट नव्हती. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर राज ठाकरेंचा मला अभिनंदनाचा फोन आला होता, त्यावेळेस मी त्यांना सांगितलं होतं , मी घरी येईन. त्यामुळेच आज मी त्यांच्या घरी गेलो होतो, त्यांना भेटून गप्पा मारल्या, नाश्ता केला. आणि मग तिथून मी निघालो. आमच्या या भेटीचा किंवा बैठकीचा कुठलाही राजकीय संदर्भ नाही. केवळ मैत्रीकरता मी त्यांच्या घरी गेलो होतो, असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी विधानसभा निवडणुकांच्या निकालावर रोखठोक वक्तव्य केले होते. त्यांनी या निकालावर थेट संशय व्यक्त केला होता. त्यातच आता येत्या काळात स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे फडणवीस- ठाकरेंची भेट महत्त्वाची असल्याची चर्चा सुरू झाली.

अमित ठाकरे विधानपरिषदेतून आमदार होणार?

ठाकरे- फडणवीसांच्या भेटीनंतर आणखी एक चर्चा सुरू झाली ती म्हणजे राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांच्याबद्दल.. अमित ठाकरे यांना राज्यपाल नामनियुक्त आमदार म्हणून विधानपरिषदेवर पाठवलं जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजपच्या कोट्यातून अमित ठाकरे यांना विधानपरिषदेवर पाठवण्यात येणार असल्याचे बोललं जात आहे. सध्या राज्यपाल नियुक्त आमदारांच्या एकूण 12 जागांपैकी 5 जागा रिक्त आहेत. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत अमित ठाकरे यांचा पराभव झाला होता. यानंतर आता भाजपच्या कोट्यातून अमित ठाकरे यांना विधानपरिषदेवर पाठवलं जाणार असल्याची चर्चा सुरू झाली. आता यात किती तथ्य आहे, ते येत्या काळातच समजू शकेल.