Home Blog Page 195

समय रैनाला पोलिसांसमोर हजर व्हायला वेळ नाही, म्हणाला ‘मी भारतात नाही कारण….’

0

‘इंडियाज गॉट लेटेंट’मध्ये पालकांबद्दल केलेल्या अश्लील वक्तव्यामुळे रणवीर आणि समय रैना वादात सापडला आहे. त्यांच्याविरोधत अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच दोघांना आणि शोच्या इतर सदस्यांनाही पोलीस चौकशीसाठी एक एक करून बोलवलं जात आहे.

समयने महाराष्ट्र सायबर विभागाला मागितला काहीसा वेळ

हा वाद चिघळल्यानंतर समयने त्याच्या चॅनेलवरून शोचे सर्व व्हिडिओ काढून टाकले आहेत. समय रैनाला समन्स बजावण्यात आले त्यानुसार त्याला 17 फेब्रुवारी रोजी चौकशीसाठी महाराष्ट्र सायबर विभागासमोर हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. मात्र त्यासाठी त्याने काहीसा वेळ मागितला आहे.

17 मार्चपर्यंतचा वेळ मागितला

समय रैनाने महाराष्ट्र सायबर विभागाकडे 17 मार्चपर्यंतचा वेळ मागितला आहे. याचं कारण म्हणजे समय सध्या भारतात नसून तो अमेरिकेत आहे. त्याने पोलिसांना सांगितले आहे की, तो सध्या भारतात नसून अमेरिकेत आहे. त्याचे अमेरिकेत शो आहेत आणि त्यासाठी तो तिथे गेला आहे. त्याने शोची माहिती सायबर विभागालाही दिली आहे. त्यामुळे त्याने 17 मार्चपर्यंतचा वेळ मागितला आहे.

समय भारतात नसून समय अमेरिकेत आहे

समय रैनाने शेअर केलेल्या वेळापत्रकानुसार, त्याचे 16 फेब्रुवारी आणि 20 फेब्रुवारी रोजी अमेरिकेतही शो आहेत. अशा परिस्थितीत महाराष्ट्र सायबर विभागाने त्याला 17-18 फेब्रुवारी रोजी मुंबईत येण्यास सांगितले आहे. त्यामुळे पोलिसांनी त्याला सांगितले की तो 17-18 नंतर 20 फेब्रुवारी रोजी अमेरिकेत जाऊन त्याचा शो करू शकतो. मात्र या प्रकरणात आणखी काय अपडेट्स येणार हे पाहणे महत्त्वाचं आहे.

आसाम पोलिसही कारवाई करण्याच्या मार्गावर

गुवाहाटीमध्येही समय रैनाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत आसाम पोलिसही कारवाई करण्याच्या मार्गावर आहेत. समय रैनाचे घर पुण्यातील बालेवाडी येथे आहे. अशा परिस्थितीत, आसाम पोलीस पुण्यातील त्याच्या घरी जाण्याची शक्यता आहे. त्याच्या घरी नोटीस लावण्यात येऊन त्याला चार दिवसांत हजर राहण्यास सांगितलं जाईल असंही म्हटलं जात आहे.

पुढील कारवाई काय केली जाईल?

रणवीर अलाहाबादियाने शोमध्ये पालकांबद्दल केलेल्या एक टिप्पणीमुळे हा वाद वाढला आहे. त्यानंतर लोकांनी त्याला, या शोला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केलं. वाद वाढल्यानंतर त्याने माफीही मागितली. तसेच शओचे सर्व व्हिडिओ यूट्यूबवरून काढून टाकले मात्र तरीही हे प्रकरण शांत होताना दिसत नाहीये. आता या प्रकरणात पुढील कारवाई काय केली जाईल हे पाहणं महत्त्वाचं आहे.

ये भी दिन निकल जाएंगे… ठाकरे गटाच्या नेत्याने काळजालाच हात घातला; राजन साळवी यांच्या निर्णयावर प्रतिक्रिया काय?

0

ठाकरे गटाचे नेते राजन साळवी यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयामुळे ठाकरे गटात अस्वस्थता निर्माण झाली आहे. साळवी यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर ठाकरे गट आणि शिंदे गटातून प्रतिक्रिया येत आहे. ठाकरे गटातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे. मात्र, ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी तर काळजाला हात घालणारी प्रतिक्रिया दिली आहे. ये भी दिन निकल जाएंगे, अशी अत्यंत सूचक आणि बोलकी प्रतिक्रिया भास्कर जाधव यांनी व्यक्त केली आहे.

राजन साळवी यांच्या सारख्या जुन्या जाणत्या आणि मास लीडर असलेल्या नेत्याने पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. आज त्यांचा शिंदे गटात प्रवेशही होत आहे. त्यावर आमदार भास्कर जाधव यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. राजन साळवी यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडायला नको होती. त्यांनी आहेत त्या ठिकाणी खंबीरपणे पाय रोवून उभे राहायला पाहिजे होतं. उद्धव ठाकरे यांनी एकमेव निष्ठावंत म्हणून त्यांचा उल्लेख केला होता. राजन साळवी दुसऱ्या पक्षात जात आहेत याचा खेद वाटतो, अशी प्रतिक्रिया भास्कर जाधव यांनी व्यक्त केली.

थांबा, हे दिवस निघून जातील
पक्षप्रमुखांना ज्यांनी जायचं त्यांनी जावा असं म्हणण्याचा अधिकार आहे. पक्षप्रमुख हे बोलतात म्हणून आम्ही बोलायला लागलो हे चुकीचं आहे. पदाधिकाऱ्यांनी अशा लोकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याची आवश्यकता आहे. ये भी दिन निकल जाएंगे असा आत्मविश्वास देण्याची आवश्यकता आहे. थांबा, हे दिवसही निघून जातील, आपण एकत्र लढू, असं भास्कर जाधव यांनी म्हणाले.

एकमेव, एकनिष्ठ कुणाला म्हणायचे?
शिलेदार नेता आणि सरदार आहात म्हणून हे सरदारकीचे लक्षण नाही (विनायक राऊत यांना टोला) सरदारांनी आपल्या सैन्याला धीर दिला पाहिजे. असं वक्तव्य म्हणजे पळ काढण्यासारखं आहे. राजन साळवी आपला उल्लेख करताना एकमेव एकनिष्ठ असे म्हणायचे. आता एकमेव एकनिष्ठ कोणाला म्हणायचं हे रत्नागिरीत आल्यानंतर त्यांना विचारा, ते उत्तर देतील, असा टोला त्यांनी लगावला.

टायगर अभी जिंदा है
उद्धव ठाकरेंची शिवसेना तोडण्याचा अनेकांनी प्रयत्न केला. रोज एक माणूस फोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. उद्धव ठाकरे यांना त्रास देण्याचं काम सुरू आहे. वेगवेगळ्या मार्गाने लोकांना खेचलं जात आहे. त्यामुळे लोक अमिषाला बळी पडत आहे. आम्ही जाणाऱ्यांना थांबवत नाही, राजकारणात, व्यवहारात सूडाचे राजकारण सुरू आहे. उद्धव ठाकरेंचे 13 खासदार, 40 आमदार फोडूनही उद्धव साहेब दबावाला बळी पडत नाहीत म्हणून या लोकांची झोप उडाली आहे. टायगर अभी जिंदा हैं, असं ते म्हणाले.

राजन साळवींनी शिवबंधन तोडले, शिंदेच्या शिवसेनेत केला प्रवेश

0

कोकणातील राजापूर विधानसभेचे माजी आमदार राजन साळवी यांनी शिवबंधन तोडत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. ठाण्यातील आनंद मठाजवळ एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राजन साळवी यांचा शिवसेनेत प्रवेश झाला. राजन साळवींनी हाती धनुष्यबाण घेत शिवसेनेत प्रवेश केला. एकनाथ शिंदे यांनी राजन साळवी यांच्या गळ्यात शिवसेना शिंदे गटाचे उपरण घातलं आणि राजन साळवींचा शिंदे गटाचा प्रवेश झाला. राजन साळवींसोबत कोकणातील असंख्य पदाधिकाऱ्यांनीही शिंदे गटात प्रवेश केला. यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.

राजन साळवी यांचा पक्षप्रवेश सोहळा हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पार पडला. राजन साळवी यांच्या पक्ष प्रवेशापूर्वी एक महत्त्वाची बैठक पार पडली होती. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार किरण सामंत आणि राजन साळवी उपस्थित होते. “एकनाथ शिंदे हे माझे पहिल्यापासून गुरु होते. मागच्या काळात त्यांच्यासोबत मी जाऊ शकलो नाही. पण जाण्यासाठी निमित्त लागतं. ते निमित्त लागलं, मी या ठिकाणी आलो. शिंदे साहेबांचा आशिर्वाद घेतला” असं राजन साळवी यांनी या बैठकीनंतर म्हटलो होते.

…म्हणून धनुष्यबाण हाती घेतले
तसेच त्यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेना ठाकरे गट सोडण्याचे कारणही सांगितले होते. ‘मी बाळासाहेबांचा लाडका शिवसैनिक आहे. त्यांना अभिप्रेत असलेले काम मी आजपर्यंत केले आणि त्यांच्याच विचारांचे काम मी पुढे नेणार आहे. माझ्या पराभवाला जी मंडळी कारणीभूत आहेत, त्या संबंधीची माहिती, पुरावे मी उद्धव ठाकरे यांच्याकडे दिले. त्यानंतर वाटलं आता थांबाव, पण मतदारसंघातील माणसं, त्यांचा विकास, जिल्ह्याचा विकास यासाठी मी पुन्हा उमेदीने उभं राहिलं पाहिजे असं आग्रह या मंडळींनी धरला. विकासाच्या दृष्टीने विचार करता एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व महाराष्ट्राने स्वीकारलं आहे. त्यांच्या नेतृत्वात पुन्हा एकदा शिवसेना, धनुष्यबाण घेऊन लोकांमध्ये जाऊ’ असे राजन साळवींनी म्हटले.

राजन साळवी दुखावले
रत्नागिरी जिल्ह्यात राजन साळवी यांनी अनेक वर्षे आमदार म्हणून शिवसेनेचे प्रतिनिधित्व केले आहे. कोकणातील लांजा, राजापूर आणि साखरपा परिसरात राजन साळवी यांना मानणारा मोठा वर्ग आहे. राजन साळवी हे मातोश्रीचे निष्ठावंत म्हणून ओळखले जातात. मात्र गेल्या काही काळांपासून विनायक राऊत यांच्याशी राजन साळवी यांचा सातत्याने वाद होत आहे. या वादात उद्धव ठाकरे यांनी राऊतांची बाजू उचलून धरल्यामुळे राजन साळवी दुखावले गेले होते.

कोण आहेत राजन साळवी?
राजन साळवी हे राजापूर विधानसभेचे तीन वेळा आमदार होते. भारतीय विद्यार्थी सेनेपासून त्यांनी त्यांच्या राजकीय कारकि‍र्दीला सुरुवात केली. १९९३ ते ९४ च्या सुमारास ते शिवसेनेत सक्रीय झाले. त्यांनी पहिल्यांदा शिवसेनेचे नगराध्यक्षपद भूषवलं होतं.

राजन साळवींनी रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाप्रमुखपदही सांभाळलं होतं. २००९ मध्ये राजापूर विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदा विधानसभेवर निवडून आले. २००९ आणि २०१४ मध्येही राजन साळवी हे विधानसभेत विजयी झाले. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत उदय सामंतांचे बंधू किरण सामंतांकडून राजन साळवींचा पराभव झाला. त्यांनी पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत उपनेतेपदाचा राजीनामा दिला होता. विधानसभा निवडणुकीत विनायक राऊतांनी मदत न केल्याचा आरोप राजन साळवींनी केला होता. अवैध मालमत्ताप्रकरणी एसबीकडून राजन साळवींच्या घरी छापेमारी करण्यात आली होती.

वक्फ संशोधन विधेयक 2024 च्या संयुक्त संसदीय समितीचा अहवाल राज्यसभेत आज डॉ . मेधा कुलकर्णी पटलावर ठेवला

0

“हा अहवाल कोणत्या एका विशिष्ट समाजाच्या विरोधात नाही. उलट त्या समाजातील गरीब आणि गरजू अशा मुस्लिम बांधवांसाठी अतिशय उत्तमरीतीने निर्णय या अहवाला सुचवले आहेत. वक्फच्या मिळकतींबाबत एक नियमितता व एक कार्यपद्धतीचा अवलंब व्हावा तसेच अतिशय श्रद्धेने ज्या भावनेतून ज्या मिळकतींचे (संपत्तीचे व जमिनीचे) दान झाले असेल, त्यातून मिळणारा लाभ आणि शैक्षणिक व आरोग्याच्या दृष्टिकोनातून सुविधा या गरीब मुस्लिमांना मिळाव्यात याचा विचार करण्यात आला आहे.

श्रद्धा भावनेने दान केलेल्या जमिनीचा ताबा खाजगी आणि बेकायदेशीर पद्धतीने व व्यक्तिगतरित्या विरोधी पक्षाच्या धनदांडग्या नेत्यांनी घेतलेला असल्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. संयुक्त संसदीय समितीने गेले सहा महिने देशातील प्रत्येक राज्यात असलेल्या अनेक घटकांची संवाद साधून त्यांचे म्हणणे ऐकून घेऊन प्रत्येक मुद्द्यांचा विचार अहवालामध्ये मांडला आहे.

अतिशय लोकशाही पद्धतीने सर्वांना आपल्या सूचना मांडण्याची संधी दिली गेली होती, त्यावर मतदान घेतले गेले आणि सर्व सूचनांचा समावेश करून हा अहवाल सभागृहाच्या पटलावर सर्वांच्या अध्ययनासाठी सादर करण्यात आलेला आहे.

विरोधकांच्या खोट्या प्रचाराला प्रत्येक वेळी देश बळी पडणार नाही हे त्यांनी आता समजून घ्यावे. संविधानाच्या व लोकशाहीच्या मूल्यांचा अनादर करून कायदे मोडून यापुढे कोणतेही कार्य करू दिले जाणार नाही.” असे मत संयुक्त समितीच्या सदस्या खासदार डॉ मेघा कुलकर्णी यांनी व्यक्त केले.

नव्या आयकर कायद्यात क्रिप्टोही, नोकरदारांना मोठा फायदा, ITR भरणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी

0

आपल्या सर्वांसाठी एक महत्वाची बातमी! अर्थमंत्री निर्मला सीतारमण या गुरुवारी संसदेत नवा आयकर कायदा मांडणार आहेत. या नवीन कायद्यामुळे सर्वसामान्य करदात्यांपासून ते मोठ्या कंपन्यांपर्यंत सर्वांनाच काही नवीन बदल स्वीकारावे लागणार आहेत.जाणून घेऊया या नवीन कायद्यातील महत्वाचे मुद्दे सोप्या आणि सहज समजणाऱ्या भाषेत.

सोपा आणि सुटसुटीत कायदा:

नवीन आयकर कायदा हा जुन्यापेक्षा अधिक सुटसुटीत आणि समजण्यास सोपा करण्याच्या उद्देशाने आणण्यात येत आहे. यामध्ये अनेक क्लिष्ट तरतुदी रद्द करण्यात येणार असून काही नवीन बाबींचा समावेश करण्यात येणार आहे. यामुळे करदात्यांना त्यांचे कर भरण्याची प्रक्रिया सोपी होईल असा विश्वास आहे.

क्रिप्टो करन्सीचे नियम स्पष्ट:

आजच्या काळात क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. नवीन कायद्यात क्रिप्टो करन्सीवर कर कसा आकारला जाईल याबाबत स्पष्ट नियम असतील.

पगारदारांसाठी दिलासा:

नवीन कायद्यात पगारदार वर्गांसाठी एक महत्वाचा बदल करण्यात आला आहे. आतापर्यंत मिळणाऱ्या वेगवेगळ्या वजावटी एकत्रित करून त्या सोप्या पद्धतीने मांडण्यात येतील. मानक वजावट, गुंतवणुकीवरील सूट, घरभाडे भत्ता, रजा रोखीकरण अशा सर्व सूट एकत्रित करून कर भरण्याची प्रक्रिया सोपी करण्यात येईल.

कंपन्यांसाठी पारदर्शकता:

नवीन कायद्यात कंपन्यांसाठी कर सवलतीबाबत कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. परंतु, कंपन्यांमधील व्यवहार आणि हस्तांतरण किंमत याबाबत स्पष्ट नियम असतील. यामुळे करचोरीला आळा बसेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. नवीन कायदा समजून घेण्यासाठी करदात्यांना काही नवीन संज्ञा समजून घ्याव्या लागतील. उदाहरणार्थ, आता ‘कर निर्धारण वर्ष’ ऐवजी ‘कर वर्ष’ ही संज्ञा वापरली जाईल.

नवीन आयकर कायदा हा सर्वसामान्य करदात्यांना अनुकूल असाच असणार आहे. सोपी भाषा, स्पष्ट नियम आणि पारदर्शकता यामुळे कर भरण्याची प्रक्रिया अधिक सुलभ होईल अशी अपेक्षा आहे.

भारतीय अंतराळवीर सुनीता विल्यम्सची 200 दिवसांची प्रतीक्षा संपली! ‘या’ तारखेला पृथ्वीवर परतणार!

0

भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स या तिस-यांदा गेल्या अंतराळ मोहिमेवर गेल्या मोठ्या संकटात सापडल्या. फक्त आठ दिवसांसाठी अंतराळात गेलेल्या नासाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स या तब्बल आठ महिन्यांसाठी अंतराळात अर्थात स्पेस स्टेशनवर अडकल्या. जवळपास 200 दिवसांची प्रतीक्षा संपली आहे. सुनीता विल्यम्स यांना पुन्हा पृथ्वीवर परत आणण्याची तारीख जवळपास निश्चित झाली. यासाठी NASA ने खास प्लान बनवला आहे.

5 जून 2023 रोजी भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांनी आणखी एक नवा इतिहास रचला. बोईंगच्या स्टारलाईनर स्पेसक्राफ्टने पृथ्वीवरून उड्डाण केले. या स्पेस क्राफ्टमधूनच सुनीता आणि त्यांचे सहकारी बुच विल्मोर हे स्पेसटेशनवर गेले. प्रक्षेपणानंतर 26 तासांनी गुरुवारी रात्री 11 वाजता बोईंगच्या स्टारलाईनर स्पेसक्राफ्ट स्पेश स्टेशनवर पोहचल्या. आठ दिवसांची मोहिम फत्ते करुन मुख्य प्लान नुसार सुनीता विल्यम्स आणि बुश विल्मोर 15 जूनला पृथ्वीवर परतणार होते. 22 जूनला त्यांना पृथ्वीवर आणण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. यानंतर 9 जुलैला देखील स्पेसक्राफ्ट डॉक करण्याचा प्रयत्न करण्यात आला. सर्व प्रयत्न अपयशी ठरले.

सुनिता विलियम्स आणि विल्मोर फेब्रुवारी 2025 मध्ये एलॉन मस्क यांच्या स्पेस एक्समधील क्रू-9 च्या यानातून परतणार असल्याचे नासाने जाहीर केले होते. स्पेस एक्समधील क्रू-9 सध्या स्पेस स्टेशनला जोडललेले आहे. मात्र, यात तांत्रिक त्रुटी असल्याकारणाने हे स्पेस एक्स क्रू-9 हे यान रिकामे पृथ्वीवर आणले जाणर आहे. यातून कोणत्याही अंतराळवीराला आणले जाणार नाही.

नविन अपडेटनुसार सुनीता विल्यम्स आणि बुश विल्मोर यांना स्पेस एक्समधील क्रू- 10 मधून पृथ्वीवर परत आणले जाणार आहे. नासाने स्पेस एक्समधील क्रू- 10 मोहिमेची तयारी सुरु केली आहे. क्रू 10 मोहिमेत नासाच्या अंतराळवीर अ‍ॅन मॅक्क्लेन आणि निकोल आयर्स, जपान एरोस्पेस एक्सप्लोरेशन एजन्सीचे अंतराळवीर ताकुया ओनिशी आणि रोसकॉसमॉसचे अंतराळवीर किरील पेस्कोव्ह यांना स्पेस स्टेशनवर नेले जाणार आहे. याच स्पेस एक्स क्रू- 10 मधून सुनीता विल्यम्स आणि बुश विल्मोर यांना पृथ्वीवर आणले जाणार आहे. 12 मार्च 2025 रोजी स्पेस एक्स क्रू- 10 ये यान स्पेस स्टेशनच्या दिशेने झेपावणार आहे.

छावा चित्रपटात आत्ता ‘तानाजी’ची एन्ट्री; अजय देवगणवर ही जबाबदारी! कथानक सादरीकरणाला  वजन प्राप्त होणार

0

अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना यांचा छावा हा चित्रपट येत्या 14 जानेवारी रोजी प्रदर्शित होतेय. या चित्रपटाची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होत आहे.विशेष म्हणजे चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच या चित्रपटाने अॅडव्हान्स बुकिंगध्ये तब्बल 10 कोटी रुपये कमवले आहेत. निर्मात्यांकूडन या निर्मात्यांकडून या चित्रपटाचे जोमात प्रमोशन केले जात आहे. दरम्यान, या चित्रपटात आता अजय देवगण महत्त्वाची भूमिका निभावणार आहे.

अजय देवगणवर महत्त्वाची जबाबदारी

मिळालेल्या माहितीनुसार या चित्रपटात अजय देवगण हा अभिनेता म्हणून दिसणार नाही. मात्र त्याला या चित्रपटात महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. अजय देवगणच्या या कामामुळे चित्रपटाच्या कथानकाला तसेच सादरीकरणाला आणखी वजन प्राप्त होणार आहे.

छावा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ घालणार?

छावा हा चित्रपट येत्या 14 फेब्रुवारी रोजी सिनेमागृहांत येत आहे. संपूर्ण भारतभरात हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात विकी कौशल छत्रपती संभाजी महाराज यांचे पात्र साकारतोय. तर रश्मिका मंदाना या चित्रपटात महाराणी येसुबाई यांची भूमिका करताना दिसेल. या चित्रपटाचे अॅडव्हान्स बुकिंग पाहता प्रदर्शनानंतर तो बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ घालण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. असे असतानाच आता अजय देवगण या चित्रपटात महत्त्वाची भूमिका दिसणार आहे. त्यामुळे अजय देवगणचे फॅन्सही हा चित्रपट पाहण्यासाठी जाणार आहेत.

अजय देवगणवर नेमकी जबाबदारी काय असणार?

अभिनेता अजय देवगणवर महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. अजय देवगण चित्रपटात व्हॉईस ओव्हर देणार आहे. म्हणजेच छावा चित्रपटाचे कथानक चालू असताना अजय देवगणचा व्हाईस ओव्हर ऐकता येणार आहे. विशेष म्हणजे अजय देवगणने त्याचे व्हॉईस ओव्हरचे काम पूर्णदेखील केले आहे.

अजय देवगनने केलेली आहे मावळ्याची भूमिका

अजय देवगणचा या चित्रपटात व्हॉईस ओव्हर (नरेशन) असल्यामुळे सिनेरसिकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जिवनावर हा चित्रपट आधारलेला आहे. विशेष म्हणजे अजय देगवणने याआधी तानाजी या चित्रपटात शिवरायांच्या मावळ्याची भूमिका केलेली आहे. हा चित्रपट तेव्हा बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजला होता. त्यामुळे देखील छावा या चित्रपटाचे आणि अजय देवगणचे खास कनेक्शन जुळले आहे, असे म्हटले जातेय.

अजय देवगणच्या आगामी चित्रपटाची प्रतीक्षा

दरम्यान, अजय देगवणचे गेल्या वर्षी अनेक चित्रपट आले होते. मात्र शैतान चित्रपटाव्यतिरिक्त त्याचे अन्य चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल करू शकले नाहीत. आता अजय देवगणच्या आगामीच चित्रपटाची सर्वांना उत्सुकता लागली आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेर जाण्याचा ट्रेंड सुरूच! 11 धाकड खेळाडूंची ऐनवेळी एक्झिट, कोणत्या संघाचे किती बाहेर?

0

2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीचे उलटी गिनती सुरू झाली आहे आणि त्याआधी खेळाडूंना स्पर्धेतून बाहेर काढण्याचा ट्रेंड सुरूच आहे. आता बाहेर पडलेल्या खेळाडूंची एक मोठी यादी तयार करण्यात आली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये एकूण 8 संघ सहभागी होत आहेत आणि त्यापैकी जवळजवळ सर्व संघांचे खेळाडू बाहेर पडले आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मधून आतापर्यंत 11 खेळाडूं बाहेर पडले आहे.

ऑस्ट्रेलियाने सर्वाधिक 5 बदल

ऑस्ट्रेलियन संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी खूप आधी आपला संघ जाहीर केला होता, ज्यामध्ये स्पर्धा जवळ येताच 5 मोठे बदल देखील दिसून आले आहेत. कांगारू संघाने पहिल्यांदा संघाची घोषणा केली, तेव्हा त्यात कर्णधार पॅट कमिन्स, जोश हेझलवूड, मिचेल स्टार्क, मिचेल मार्श आणि मार्कस स्टोइनिस यांची नावे होती. आता ही सर्व नावे संघातून गायब आहेत, यामध्ये कमिन्स, हेझलवूड आणि मार्श फिट नसल्याने खेळत नाहीत, तर स्टार्कने वैयक्तिक कारणांमुळे आपले नाव मागे घेतले तर मार्कस स्टोइनिसने अचानक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करून सर्वांना आश्चर्यचकित केले.

टीम इंडियामध्येही 2 बदल, बुमराह बाहेर

भारतीय संघाने अंतिम मुदतीनंतर काही दिवसांनी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी आपला संघ जाहीर केला, ज्यामध्ये जसप्रीत बुमराहचे नाव होते, परंतु त्याच्या तंदुरुस्तीबद्दल प्रश्नचिन्ह होते. 12 फेब्रुवारी रोजी बीसीसीआयने स्पष्ट केले की, बुमराह फिट नसल्याने या स्पर्धेतून बाहेर आहे, त्याच्या जागी हर्षित राणाला संघात स्थान देण्यात आले आहे. याशिवाय, टीम इंडियाच्या संघात आणखी एक बदल करण्यात आला ज्यामध्ये यशस्वी जैस्वालच्या जागी वरुण चक्रवर्तीला मुख्य संघाचा भाग बनवण्यात आले.

अफगाणिस्तान, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेनेही केला प्रत्येकी एक बदल

अफगाणिस्तानने 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी जाहीर केलेल्या संघात एक बदल केला आहे, ज्यामध्ये जखमी गूढ फिरकी गोलंदाज अल्लाह गझनफरच्या जागी नांगेयालिया खारोटेचा समावेश करण्यात आला आहे. याशिवाय, इंग्लंडने हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे बाहेर पडलेल्या जेकब बेथेलच्या जागी टॉम बेंटनचा संघात समावेश केला आहे. पूर्ण तंदुरुस्ती नसल्याने दक्षिण आफ्रिकेने वेगवान गोलंदाज अँरिक नोर्कियाच्या जागी कॉर्बिन बॉशचा समावेश केला आहे. वेगवान गोलंदाज अँरिक नोर्किया आणि गेराल्ड कोएत्झे यांनाही दुखापतीमुळे चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मधून बाहेर पडावे लागले आहे.

पाकिस्तानचा सलामीवीर बाहेर….

2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी यजमान पाकिस्तानने आपला संघ जाहीर केला होता, ज्यामध्ये बदल देखील अपेक्षित आहेत. खरं तर, तिरंगी मालिकेत खेळणारा हरिस रौफ पहिल्या सामन्याच्या मध्यात दुखापतीमुळे मैदानाबाहेर गेला होता, त्यानंतर पीसीबीने त्याच्या जागी खेळाडूची घोषणा केली. त्याच वेळी, रौफ चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळेल की नाही याबद्दल परिस्थिती स्पष्ट नाही. पाकिस्तानचा सलामीवीर फलंदाजही दुखापतीमुळे चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर पडला आहे. घोट्याच्या दुखापतीमुळे त्याची संघात निवड झाली नाही. दुखापतीपूर्वी तो पाकिस्तान संघाचा नियमित सदस्य होता.

न्यूझीलंड संघात होणार बदल?

याशिवाय न्यूझीलंड संघाच्या संघातही बदल अपेक्षित आहेत. किवी संघाचा वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसन आयएलटी-20 मध्ये हॅमस्ट्रिंगशी झुंजताना दिसला. याशिवाय, रचिन रवींद्रची परिस्थिती अद्याप पूर्णपणे स्पष्ट झालेली नाही, जो तिरंगी मालिकेच्या पहिल्या सामन्यात चेंडू पकडताना गंभीर जखमी झाला होता.

‘छावा’मध्ये औरंगजेब साकारणाऱ्या अक्षय खन्नाने लग्न का केलं नाही? काय आहे कारण?

0

अभिनय क्षेत्रामध्ये असे अनेक कलाकार आहेत, ज्यांनी कमी चित्रपटांमध्ये काम केलं मात्र, त्यांनी आपली छाप कायमची उमटवली. अशा कलाकारांच्या व्यक्तीगत आयुष्याकडेही चाहत्यांचं लक्ष असतं. असाच आपल्या अभिनयाची छाप सोडलेला आणि कायमच चर्चेत असलेला अभिनेता म्हणजे अक्षय खन्ना. ‘हलचल’, ‘रेस’, ‘ताल’, ‘इत्तेफाक’, ‘दृश्यम 2’ यांसारख्या चित्रपटांमधील त्याच्या भूमिकेचं मोठ्या प्रमाणावर कौतुक झालं. ‘दृश्यम 2’ नंतर आता अक्षय खन्ना आगामी ‘छावा’ या चित्रपटातून अत्यंत वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये तो औरंगजेबाची भूमिका साकारत आहे. लाइमलाइटपासून दूर असलेल्या अक्षयला त्याचं खासगीपण जपायला खूप आवडतं. तो लवकरच वयाची पन्नाशी गाठणार आहे, मात्र अद्याप त्यानं लग्न केलेलं नाही. यामागचं कारण त्यानं स्वत: एका मुलाखतीत सांगितलं आहे.

लग्नाबद्दल अक्षय खन्नाचं मत काय?

अक्षय खन्नाने ‘हिंदुस्तान टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, त्याला लग्न न करण्याचा निर्णय घ्यावा लागला, कारण त्याला त्याचे आयुष्य पूर्णपणे स्वतःच्या नियंत्रणात हवं आहे. त्यानुसार, त्याचं मत आहे की लग्नामुळे आयुष्यात बरेच बदल होतात आणि तुम्हाला बऱ्याच गोष्टींमध्ये तडजोड करावी लागते. मी मॅरेज मटेरियल नाही, असं अक्षयने सांगितलं आहे.

पुढे तो सांगतो, मी स्वत:ला विवाहित या दृष्टीकोनातून पाहू शकत नाही. सोप्या भाषेत सांगायचं तर, मी मॅरेज मटेरियल नाही. मी त्यासाठी बनलेलोच नाही. लग्न ही एक कमिटमेंट असते, ज्यामुळे तुमच्या रोजच्या आयुष्यात बरेच बदल होतात. लग्नामुळे बरंच काही बदलतं. मला माझं आयुष्य माझ्याच नियंत्रणात ठेवायला आवडतं. जेव्हा तुम्ही तुमचं आयुष्य दुसऱ्या व्यक्तीसोबत शेअर करता, तेव्हा स्वत:च्या आयुष्यावर तुमचं संपूर्ण नियंत्रण राहत नाही. तुम्हाला बऱ्याच गोष्टींमध्ये तडजोड करावी लागते.

अभिनय क्षेत्रात असे अनेक कलाकार आहेत, ज्यांनी लग्न न करता मुलं दत्तक घेतली आहेत, किंवा सरोगसी पध्दतीने ते पालक झाले आहेत, भविष्यात असा काही विचार आहे का, असाही प्रश्न या मुलाखतीत अक्षय खन्नाला विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना तो म्हणाला, मी त्यासाठी तयार नाही. मला माझं आयुष्य कोणासोबत शेअर करायचं नाही. मग ते लग्न असो किंवा मुलबाळ असो. त्यांच्यामुळेही तुमच्या आयुष्यात बरेच बदल होतात. आयुष्यात आलेल्या नव्या व्यक्तीमुळे जे बदल होतात, ते मला नको आहेत. मला जे हवंय, ते त्यातून मिळणार नाही, असंही तो पुढे म्हणतो.

छावा चित्रपटातून अक्षय खन्ना प्रेक्षकांच्या भेटीला

छावा चित्रपटातून अक्षय खन्ना प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अक्षयच्या आगामी ‘छावा’ चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये अक्षयचा औरंगजेबाच्या भूमिकेतला लूक प्रेक्षकांना आकर्षित करत आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी देखील अक्षयचं कौतुक केलं आहे, अक्षय मितभाषी असून त्याचा स्वभाव देखील खूप चांगला आहे, आणि तो प्रत्येक चित्रपटात मन लावून काम करतो. ‘छावा’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची प्रतीक्षा आता सर्वांसाठी सुरू झाली आहे. उद्या (14 फेब्रुवारीला) छावा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

विराट कोहली की रजत पाटीदार? आरसीबीच्या कर्णधारपदी कोण? आयपीएल 18 व्या मोसमाआधी मोठी घोषणा

0

भारतीय क्रिकेट वर्तुळातून या क्षणाची अतिशय महत्त्वाची, मोठी आणि बहुप्रतिक्षित बातमी समोर आली आहे. आयपीएलच्या 18 व्या मोसमाला केव्हापासून सुरुवात होणार? या हंगामांचं वेळापत्रक केव्हा जाहीर होणार? याबाबतची उत्सूकता क्रिकेट चाहत्यांना लागून आहे. त्या दरम्यान रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने आपल्या नव्या कर्णधाराची घोषणा केली आहे. रजत पाटीदार याची रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. एका कार्यक्रमातून रजत पाटीदार याचं आरसीबीचा कर्णधार म्हणून नावं जाहीर करण्यात आलं आहे.

फाफ डु प्लेसीस याच्याकडे आरसीबीच्या कर्णधारपदाची जबाबजदारी होती. मात्र आरसीबीने फाफला करारमुक्त केलं. त्यामुळे आरसीबीने नव्या कर्णधाराच्या शोधात होती. कर्णधार म्हणून विराट कोहली आणि रजत पाटीदार या दोघांच्या नावाची चर्चा होती. मात्र अखेर आरसीबी टीम मॅनेजमेंटने रजत पाटीदार याच्या नावावर कर्णधार म्हणून शिक्कामोर्तब केला आहे.

रजत आरसीबीचा आठवा कर्णधार

रजत पाटीदार यासह आरसीबीचा एकूण आठवा तर चौथा भारतीय कर्णधार ठरला आहे. याआधी राहुल द्रविड, अनिल कुंबळे आणि विराट कोहली या तिघांनी भारतीय म्हणून आरसीबीची धुरा सांभाळली आहेत. तसेच केविन पीटरसन, डॅनियल व्हीटोरी, शेन वॉटसन आणि फाफ डु प्लेसतील या विदेशी खेळाडूंनी याआधी आरसीबीचं नेतृत्व केलं आहे.

आरसीबीचे कर्णधार आणि त्यांची कामगिरी

राहुल द्रविड, 14 सामने, 4 विजय, 10 पराभव
केविन पीटरसन, 6 सामने, 2 विजय, 4 पराभव
अनिल कुंबळे, 35 सामने, 19 विजय, 16 पराभव
डॅनियल व्हीटोरी, 28 सामने, 15 विजय, 13 पराभव
विराट कोहली, 143 सामने, 66 विजय, 70 पराभव
शेन वॉटसन, 3 सामने, 1 विजय, 2 पराभव
फाफ डु प्लेसीस, 42 सामने, 21 विजय, 21 पराभव

आयपीएल 2025 साठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु टीम : रजत पाटीदार (कर्णधार), विराट कोहली, लियाम लिविंगस्टोन, फिल सॉल्ट, जेकब बेथेल, देवदत्त पडिक्कल, जितेश शर्मा, कृणाल पंड्या, टीम डेव्हिड, रोमारियो शेफर्ड, भुवनेश्वर कुमार, जोश हेजलवुड, यश दयाल, रसिख डार सलाम, सुयश शर्मा, स्वप्निल सिंह, नुवान तुषारा, मनोज भंडागे, स्वास्तिक चिकारा, लुंगी एन्गिडी, अभिनंदन सिंह आणि मोहित राठी.