Home Blog Page 190

उद्धव ठाकरेंना कोकणात आणखी एक धक्का, 5 नगरसेवकांनी साथ सोडली; शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

0

महायुतीमधील मंत्री आणि शिवसेना नेते उदय सामंत यांनी ऑपरेशन टायगर सुरू झाल्याचे सांगत लवकरच शिवसेना शिंदे गटात माजी आमदार व खासादारांचे प्रवेश होणार असल्याचे म्हटले होते. त्यानुसार, आता ठाकरेंना धक्का देत शिवसेना शिंदे गटात अनेकजण प्रवेश करत आहेत. कोकणातील ठाकरेंच्या शिवसेनेचा निष्ठावंत चेहरा म्हणून ज्यांचा निवडणुकांवेळी उल्लेख झाला त्या राजन साळवी यांनीही ठाकरेंची साथ सोडून धनुष्यबाण हाती घेतला. तर, आमदार भास्कर जाधव हेही पक्षात नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळे, कोकणातून ठाकरेंच्या शिवसेनेला एकामागोमाग एक धक्के बसत आहेत. त्यातच, आता दापोली नगरपालिकेतील शिवसेना ठाकरे गटाच्या 5 नगरसेवकांनी ठाकरेंची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून आपण वेगळा गट स्थापन करत असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे, ठाकरेंच्या शिवसेनेतील आऊटगोईंग काही केल्या कमी होताना दिसून येत नाही.

एकीकडे कोकणात ठाकरेंच्या शिवसेनेला खिंडार पडत असल्याचे पाहायला मिळत असतानाच, दुसरीकडे मुंबईतील उपविभाग प्रमुखाने देखील साहेब मला माफ करा म्हणत आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. शिवसेना पक्षातील राजकीय वर्तुळात अनेक खलबतं घडत असतानाच, आता दापोलीतून 5 नगरसेवकांनी ठाकरेंची साथ सोडून शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेना नेते आणि राज्यमंत्री योगेश कदम यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या ते शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

दापोली नगर पंचायतीमध्ये शिवसेना उबाठाला खिंडार पडले असून पाच नगरसेवकांनी आपला वेगळा गट स्थापन केल्याचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे, आवश्यक त्या कागदपत्रांची देखील पूर्तता केली आहे. हे पाचही नगरसेवक करणार उद्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीतून शिवसेना उबाठात या 5 नगरसेवकांनी प्रवेश केला होता. मात्र, आता विकासकामांसाठी आपण शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. विलास शिगवण, अन्वर रखांगे, मेहबूब तळघरकर, संतोष कलकुटके आणि अश्विनी लांजेकर यांनी आपला वेगळा गट स्थापन केला आहे.

वैभव नाईक मातोश्रीवर

दरम्यान, कोकणातील ठाकरेंच्या शिवसेनेची वाताहात होत असतानाच माजी आमदार वैभव नाईक मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या भेटीला पोहोचले आहेत. वैभव नाईक यांच्या मागे मागील काही दिवसांपासून एसीबी (ACB) चौकशीचा ससेमिरा सुरु आहे. तर कोकणात अनेक पदाधिकारी ठाकरे गटाची साथ सोडत आहेत. त्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करण्यासाठी वैभव नाईक दाखल झाले आहेत.

उद्धव ठाकरेंनी बोलावली बैठक

शिवसेना ठाकरे गटाच्या खासदारांची 20 तारखेला तर आमदारांची 25 तारखेला मातोश्रीवर बैठक होणार असल्याची माहिती मिळत आहे. उद्धव ठाकरे खासदार आणि आमदारांना मार्गदर्शन करणार आहेत. दिल्लीत अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असताना आदित्य ठाकरे यांनी खासदारांची दिल्लीत बैठक घेतली होती. सध्या, ऑपरेशन टायगरच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगल्या आहेत, तशा राजकीय घडामोडीही घडत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आता उद्धव ठाकरे 20 फेब्रुवारीला खासदारांची आणि 25 फेब्रुवारीला आमदारांची बैठक घेणार आहेत.

मोठी बातमी! बँकेच्या ग्राहकांना सरकारचा मोठा दिलासा, निर्बंध लादल्यावरही ठेवीदारांना मिळणार 5 लाखांपेक्षा जास्त रक्कम?

0

निर्बंध आलेल्या बॅंकांच्या गुंतवणूकदारांना सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत आहे. विम्याअंतर्गत 5 लाख रुपयांपर्यंतची ठेव रक्कम परत केली जात असते, मात्र ही रक्कम सरकारकडून वाढवण्याचा विचार आहे. अनेक को-ऑपरेटिव्ह बॅंकेच्या गुंतवणूकदारांना निर्बंध आल्यावर अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यामुळं बॅंकांवर निर्बंध आल्यानंतर असलेल्या 5 लाख रुपयांचा विमा वाढवण्यास सरकार विचाराधीन आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या पत्रकार परिषदेत अर्थ विभागाचे सचिव एम. नागाराजू यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

को-ऑपरेटिव्ह बॅंकेच्या गुंतवणूकदारांना या निर्णयामुळं दिलासा मिळणार

को-ऑपरेटिव्ह बॅंकेच्या गुंतवणूकदारांना या निर्णयामुळं दिलासा मिळणार आहे. बॅंकेवर निर्बंध आल्यानंतर 5 लाखांहून अधिक रक्कम असल्यास ती परत मिळण्यास अडचणी येतात. अशात, बॅंकेवरील निर्बंध उठत नाहीत तोपर्यंत ती रक्कम गुंतवणूकदारांना मिळत नसते. सहसा बॅंकेवर आरबीआयनं निर्बंधांसंदर्भात कारवाई केल्यानंतर बॅंकेला आर्थिक स्थिती नीट करण्यास काही वर्षे लागतात. मात्र, अनेक बॅंका आर्थिक स्थित नीट करु शकत नाहीत आणि ते पैसे बुडतात. त्यामुळं सरकारकडून विम्याची रक्कम वाढल्यास 5 लाखांहून अधिक पैसे बॅंकेत असलेल्या ग्राहकांना परत मिळण्यास मदत होणार आहे. आरबीआयकडून न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह संदर्भात कारवाई केली जात आहे. त्यामुळं यावर आम्ही भाष्य करणार नसल्याचे मत अर्थ विभागाचे सचिव एम. नागाराजू यांनी व्यक्त केले. एखादी बॅंक बुडाली तर त्यात 5 लाखांहून अधिक पैसे गुंतवणूकदाराला मिळावे, यासाठी विमा वाढवण्यासाठी केंद्र सरकार विचाराधीन असल्याचे नागाराजू म्हणाले.

पेट्रोल आणि डिझेल संदर्भात राज्यांना निर्णय घ्यावा लागणार

पेट्रोल आणि डिझेल संदर्भात राज्यांना निर्णय घ्यावा लागणार आहे. जीएसटी काऊन्सलिंग जीएसटीसंदर्भात निर्णय घेत असतो. राज्यातील अर्थमंत्री त्यात असतात, सोबतच केंद्र सरकार असते. जीएसटी काऊन्सलिंगने याबाबत निर्णय घेतला तर काहीही अडचण नाही असे मत केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी व्यक्त केले.

जयंत पाटील कुठेही जावोत, आम्ही त्यांच्यासोबत कायम राहू; कार्यकर्त्यांची भूमिका

0

जयंत पाटील हे राष्ट्रवादी सोडणार आणि भाजपची साथ देणार गेल्या काही दिवसांपासून अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. जयंत पाटलांच्या संस्थेच्या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या चर्चांना आता अधिक बळ मिळताना दिसत आहे. जयंत पाटील यांनी त्यावर काही स्पष्ट भाष्य जरी केलं नसलं तरी त्यांच्या कार्यकर्त्यांनी मात्र भूमिका स्पष्ट केली आहे. जयंट पाटील कोणत्याही पक्षात जावोत, आम्ही त्यांच्या पाठीशी कायम राहू अशी भूमिका त्यांच्या कार्यकर्त्यांनी घेतल्याचं दिसतंय.

काय म्हणाले कार्यकर्ते?

जयंत पाटलांच्या राजकीय भूमिकेवर त्यांच्या कार्यकर्त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जयंत पाटलांनी कोणतीही भूमिका घेतली तरी आम्ही त्यांच्यासोबत आहोत असं एका कार्यकर्त्याने स्पष्ट केलं. राष्ट्रवादी जनसमान्यांत रुजवायला जयंत पाटलांनी काम केलं. पण ज्यांची पात्रता नाही असे लोकही आज जयंत पाटील यांच्यावर बोलायला लागले आहेत. पक्षाचा प्रदेशाध्यक्ष बदलण्याची मागणी करत आहेत. त्यामुळे जयंत पाटील कोणत्याही पक्षात राहोत, त्यांच्यामागे आम्ही असू अशी भूमिका कार्यकर्त्यांनी घेतल्याचं दिसतंय.

चंद्रकांत पाटलांनी हात जोडले

जयंत पाटील हे सगळ्या गोष्टींचा विचार करून निर्णय घेतील. त्यामुळे त्यांच्या पाठीशी ठामपणे असल्याची भूमिका कार्यकर्त्यांनी घेतल्याचं दिसून येतंय. या सगळ्यावर राज्याचे मंत्री आणि सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना विचारल्यानंतर त्यांनी हात जोडल्याचं दिसून आलं.

जयंत पाटील कुठे गायब?

बीडमधील सरपंच हत्या प्रकरण असो किंवा परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरण, पवारांच्या हस्ते एकनाथ शिंदेंचा पुरस्कार झाल्यानंतर संजय राऊतांनी केलेली टीका असो किंवा महायुती सरकारमधील धुसफूस असो. महाराष्ट्रात एवढ्या मोठ्या राजकीय घडामोडी सुरू असताना, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आहेत कुठे ? असा प्रश्न स्वतः त्यांच्याच पक्षातील कार्यकर्त्यांना पडला असेल तर नवल वाटायला नको.

शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा आवाज म्हणून भूमिका घेणाऱ्या जयंत पाटलांचं दर्शन गेल्या काही दिवसांत दुर्मिळ झाल्याचं दिसून येतंय. योगायोग म्हणा किंवा आणखी काही. जयंत पाटलांबाबत चर्चा सुरू असताना, जयंत पाटलांनी इस्लामपूरमधील इंजीनिअरिंग कॉलेजच्या उद्घाटनासाठी नितीन गडकरींना आमंत्रित केलं. जयंत पाटलांच्या राजाराम बापू इंजिनीअरिंग कॉलेजच्या नवीन वसतीगृहाचं आणि जिम्नॅशियमचं उद्घाटन गडकरींच्या हस्ते होत आहे. जयंत पाटील भाजपात प्रवेश करण्याबाबतच्या चर्चा अनेकदा डोकं वर काढतात. आता देखील त्या चर्चांचा पुनर्जन्म होणार का हे पाहावं लागेल.

शरद पवार यांना भाजपकडून धक्का? अनेक वर्षे शरद पवारांसोबत असलेला नेते भाजपमध्ये जाणार

0

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी झाल्यानंतर शरद पवार यांना मिळणारे धक्का थांबत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसमधून अनेक जण शरद पवार यांची साथ सोडत अजित पवार यांच्याबरोबर गेले. त्यानंतर शरद पवार यांनी पक्षाची पुन्हा उभारणी सुरु केली. परंतु शरद पवार यांच्या पक्षाला बसणारे धक्के कमी होत नाही. आता शरद पवार यांच्यासोबत अनेक वर्ष काम करणारे माजी आमदार भाजपमध्ये दाखल होणार आहे. यासंदर्भात त्यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली. ऐन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मोठा धक्का बसणार आहे.

पाचोरा येथील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी आमदार दिलीप वाघ आपल्या समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जळगाव येथील कार्यक्रमात माजी आमदार दिलीप वाघ यांनी भेट घेतली. मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेनंतर दिलीप वाघ यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला.

शरद पवार यांच्यासोबत अनेक वर्षांपासून संबंध
माजी आमदार दिलीप वाघ आणि त्यांचे परिवाराचे अनेक वर्षांपासून शरद पवारांसह अजित पवारांसोबत राजकीय संबंध आहेत. मात्र मागील विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांना उमेदवारी दिली नाही. त्यामुळे त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती. तेव्हापासून ते पक्षावर नाराज आहेत. यामुळे आपण भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती माजी आमदार दिलीप वाघ यांनी दिली.

मुंबईत होणार प्रवेश सोहळा
येत्या काही दिवसांमध्ये मुंबई येथील प्रदेश कार्यालयात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत माजी आमदार दिलीप वाघ यांचा भव्य प्रवेश सोहळा होणार आहे. माजी आमदार दिलीप वाघ यांच्या भाजप प्रवेशाने पाचोरा भडगाव मतदार संघात भाजपची ताकद वाढणार आहे. माजी आमदार दिलीप वाघ यांचे बंधू संजय वाघ देखील भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्याच सामन्यात करो या मरोची लढाई, असं असेल भारताचं गणित

0

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेत एकूण आठ संघ सहभागी झाले आहेत. आठ संघांची दोन गटात वर्गवारी करण्यात आली असून प्रत्येक संघ साखळी फेरीत तीन सामने खेळणार आहे. त्यामुळे उपांत्य फेरी गाठायची असेल तर तीन पैकी दोन सामन्यात विजय मिळवणं गरजेचं आहे. भारताच्या गटात पाकिस्तान, न्यूझीलंड आणि बांग्लादेश हे संघ आहेत. भारताचे सर्व सामने दुबईत होणार असून पहिलाच सामना बांगलादेशशी होणार आहे. भारताचा पहिला सामना 20 फेब्रुवारीला बांगलादेशशी होणार आहे. हा सामना भारतासाठी करो या मरोची लढाई असणार आहे. कारण या गटातील सर्वात दुबळा संघ म्हणून बांगलादेशकडे पाहिलं जात आहे. पण बांगलादेशने अनेकदा स्पर्धेत उलटफेर केला आहे. 2007 वनडे वर्ल्डकप स्पर्धेत याची अनुभूती आली आहे. त्यामुळे भारताने बांगलादेशला क्रिकेटच्या मैदानात कमी लेखणं महागात पडू शकतं. भारताला उपांत्य फेरी गाठायची तर पहिल्याच सामन्यात विजय मिळवावा लागणार आहे. कारण त्यानंतर पाकिस्तान आणि न्यूझीलंडचं आव्हान असणार आहे. या दोन संघांना सहज पराभूत करू अशी स्थिती नाही. त्यामुळे पहिल्याच सामन्यात भारताचं उपांत्य फेरीबाबत काय तो फैसला होणार आहे.

भारताने पहिल्याच सामन्यात विजय मिळवला तर उर्वरित दोन पैकी एका सामन्यात विजय मिळवलं तरी पुरेसं होईल. पण पहिल्या सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं तर मात्र भारताला उर्वरित दोन्ही सामन्यात काहीही करून विजय मिळवावा लागेल. अन्यथा उपांत्य फेरीचं गणित सुटणार नाही. पहिला सामना गमवल्यानंतर भारताला उर्वरित दोन सामन्यात विजयाचं दडपण असेल. दडपणाखाली चांगला प्रदर्शन करणं कठीण होईल. त्यात न्यूझीलंडने आयसीसी स्पर्धांमध्ये भारताची वाट कायम अडवली आहे. साखळी फेरीत भारताचा पहिला सामना बांगलादेशशी 20 फेब्रुवारीला, दुसरा सामना पाकिस्तानशी 23 फेब्रुवारीला आणि तिसरा सामना न्यूझीलंडशी 2 मार्चला होणार आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, रवींद्र जडेजा, वरुण चक्रवर्ती.

Liberty General Insurance & Maruti Suzuki Insurance Strengthen Insurance Awareness Efforts in Punjab

0

Pune : Liberty General Insurance, one of India’s leading non-life insurers, continues its commitment to driving insurance awareness and accessibility with another impactful event under its collaboration with Maruti Suzuki Insurance Broking Pvt Ltd. Through the ‘Bima Prachaar Aur Prasaar’ initiative, the two organizations are working together to promote financial literacy and highlight the importance of insurance protection, ensuring that individuals in both rural and urban regions understand how insurance secures their future.

This initiative aligns with the Insurance Regulatory and Development Authority of India’s (IRDAI) Insurance for All by 2047 vision. As the designated non-life insurer for Delhi, Liberty General Insurance is spearheading awareness programs in the capital while simultaneously strengthening its rural outreach in Punjab’s Gram Panchayats. These efforts reflect Liberty’s broader commitment to ‘Suraksha Ka Vada, Bima Ke Saath’—a promise to provide reliable protection through insurance solutions that empower individuals and businesses alike.

The most recent event under this initiative took place in Tarn Taran, Punjab, drawing participation from over 170 local residents. The program included free vehicle inspections and eye check-ups, along with interactive sessions designed to educate attendees on the significance of insurance in ensuring financial stability. The enthusiastic response reinforced the increasing awareness among rural communities about the role of insurance in managing risks and securing their future.

Speaking on the initiative, Mr. Anurag Rampal, Senior Vice President and National Head – Central Distribution and Marketing Team, Liberty General Insurance emphasized the importance of reaching underserved communities, stating: “Insurance is more than just a financial product—it is a safety net that protects individuals and families from unforeseen challenges. However, in many parts of the country, especially the hinterlands, awareness about insurance remains limited. Through initiatives like ‘Bima Prachaar Aur Prasaar’, and ‘Suraksha ka Vada, Bima ke Saath’, we are actively addressing this gap by engaging directly with communities, educating them, and making insurance more accessible. Partnering with Maruti Suzuki Insurance Broking allows us to extend our reach, ensuring that more people benefit from the protection that insurance offers. Our goal is to make Suraksha Ka Vada, Bima Ke Saath a reality for every household.”

This initiative is part of Liberty General Insurance’s larger strategy to support IRDAI’s rural and social sector mandates, which require insurers to underwrite policies for underserved communities. Beyond meeting regulatory obligations, Liberty remains deeply committed to financial inclusion, ensuring that even those in remote regions have access to the right insurance products and knowledge.

By continuously expanding its grassroots-level outreach, Liberty General Insurance is reinforcing its role as a responsible insurer—one that not only provides insurance solutions but also actively works to educate and empower people across both urban and rural India.

Kevin Pietersen Unveils Dram Bell Blended Scotch Whisky by Ardent Alcobev

0

Pune : Ardent Alcobev, an emerging player in India’s premium alcobev market, has unveiled Dram Bell, a luxury Blended Scotch Whisky, at an exclusive launch event held at Imara – Turf Club in Mumbai. The event was hosted by Kevin Pietersen, former England cricket captain and marquee investor in Ardent Alcobev, along with the co-founders.

Bottled in Scotland, Dram Bell is available in two variants: the Premium variant, priced at Rs. 1,750, and the Reserve variant, priced at Rs. 2,450. Each bottle represents the perfect blend of heritage and modern sophistication, offering a luxurious experience for whisky connoisseurs.

Expressing his enthusiasm for the launch, Kevin Pietersen shared his personal connection to the brand and the philosophy behind Dram Bell. “My investment in Ardent Alcobev is more than just a business decision; it’s a reflection of my values. Throughout my career, whether on the cricket pitch or in other areas of life, I’ve always valued dedication, quality, and the pursuit of perfection. Ardent upholds this same commitment while making, which is visible in every part of Dram Bell. We also encourage drinking responsibly, for enjoyment, and not for excessive consumption, so that everyone can savour and enjoy the experience in moderation.

The evening also witnessed an exclusive Whisky Masterclass led by Iain Forteath, Master Blender at Ardent Alcobev. The interactive session provided attendees with a unique opportunity to taste various expressions of Dram Bell, while discovering the intricate art of whisky blending and tasting.

Commenting on the launch, Debashish Shyam, Co-Founder and Director of Ardent Alcobev, shared, “We are redefining India’s premium whisky market with a blend that showcases unmatched quality and craftsmanship. With Kevin Pietersen as a strategic partner, we raise the brand’s profile by bridging the gap between international acclaim and preference of Indian market. This approach caters to the discerning tastes of IMFL drinkers who seek sophistication without compromising on their taste. We are confident that it will appeal to whisky connoisseurs as we merge global standards with local tastes to shape the future of Indian whisky, catering to the evolving preferences of IMFL drinkers.”

Dram Bell has been made available in Maharashtra from Nov 2024 and will be available at select retail and on-trade stores. The company will progressively expand distribution into other key markets in the North and South India.

About Ardent Alcobev Pvt. Ltd:

Ardent Alcobev Pvt. Ltd. is an emerging player in India’s premium alcoholic beverage market, founded as a joint venture between Rajasthan Liquor Ltd. (RLL) and industry veterans Debashish Shyam and Jatin Fredericks along with former English cricket captain Kevin Pietersen as a marquee investor. Ardent Alcobev is dedicated to building a portfolio of “bottled-in-origin” spirits that cater to the evolving tastes of the Indian consumer, offering global-quality products at affordable prices. The company aims to redefine the premium drinking experience in India as the market moves toward a more discerning consumer base. Ardent Alcobev will debut with Dram Bell Blended Scotch Whisky in Maharashtra in November 2024, with plans to expand its portfolio to other premium beverage categories.

 

त्यांना यात काहीतरी राजकारण करायचंय… मस्साजोगच्या गावकऱ्यांचा भाजपच्या ‘या’ नेत्याविरोधात संताप; बैठकीत काय घडलं?

0

महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या संतोष देशमुख हत्या प्रकरणात काही आरोपींना अटक झालीय. मात्र, अजूनही एक आरोपी फरार आहे. चौकशीसाठी SIT स्थापन केली. मात्र, अजूनही देशमुख कुटुंबियांच्या मनासारखा तपास होत नाहीय. आता मस्साजोगच्या ग्रामस्थांची या संबंधी बैठक होणार आहे. कृष्णा आंधळे सारखा गुन्हेगार प्रशासनाला का सापडत नाही हा मुद्दा बैठकीत असणार आहे. विशेष सरकारी वकील नियुक्त करण्यासाठी आम्ही वेळोवेळी सरकारला निवेदन दिलेत. आजपर्यंत सरकारी वकिलाची का नियुक्ती केली नाही? आरोपींना सहकार्य करणाऱ्यांना सहआरोपी का केले नाही? या मुद्यांवर चर्चा होणार आहे.

“बावनकुळे साहेबांनी सुरेश धस व धनंजय मुंडे यांची भेट घालून दिली, 25 दिवसानंतर हा विषय कसा वर येतो?. बावनकुळे साहेबांना याच्यात काहीतरी राजकारण करायचं आहे. सुरेश धस यांनी हे प्रकरण उचलून धरलं आहे. हे प्रकरण भरकटण्याचा प्रयत्न बावनकुळे करत आहेत” असं मस्साजोगच्या ग्रामस्थांच म्हणणं आहे. “लोकसभेच्या अधिवेशनात सुप्रिया सुळे यांनी हा मुद्दा प्रखरतेने मांडावा, गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन विशेष लक्ष द्यावं” अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येणार आहे.

‘मनोज दादा चीडण सहाजिक’

“धस अण्णांवर विश्वास आहे. मनोज दादा पाटील आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. एखादा माणूस या प्रकरणात पूर्णपणे स्टँड घेतो आणि अचानक भेटतो तेव्हा मनोज दादा चीडण सहाजिक आहे. बावनकुळे साहेब तुम्ही भेट घालून आणली तर त्या दिवशी सांगायला पाहिजे होतं, तुम्ही गैरसमज का पसरवत आहात?” असा ग्रामस्थांचा सवाल आहे.

‘बावनकुळे साहेब एक दिवस गावाच्या इथली परिस्थिती पहा’

“बावनकुळे साहेब एक दिवस गावाच्या इथली परिस्थिती पहा. संतोष देशमुख हे भाजपाचे बूथ प्रमुख होते. त्यांनी निस्वार्थपणे भाजपाचे काम केलं. शरद पवार यांची प्रकृती साथ देत नसतानाही त्यांनी इथे येऊन लोकांच्या भावना जाणून घेतल्या. बावनकुळे साहेब भाजपाचे मोठे नेते आहेत, त्यांनी इथे यायला पाहिजे होतं. लोकांच्या व्यथा जाणून घ्यायला पाहिजे होत्या” असं ग्रामस्थ म्हणाले. “त्यांनी तसं न करता धनंजय मुंडे व सुरेश धस यांची भेट घडवून आणली या प्रकरणाला डिव्हाईड करण्याचा प्रयत्न बावनकुळे साहेबांनी केला” असं ग्रामस्थांच म्हणणं आहे.

एकनाथ शिंदे यांचं काम तमाम होणार, शिंदे गट भाजपात होणार विलीन, बड्या नेत्याचं भाकीत; काय घडतंय?

0

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळाले. यंदाच्या निवडणुकीत भाजप मोठा पक्ष ठरल्याने देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रि‍पदी विराजमान झाले. राज्यात सत्ता आल्यानंतरही महायुतीत सातत्याने काही ना काही कारणामुळे नाराजीनाट्य पाहायला मिळत आहे. महायुतीतील तीन घटक पक्षात या ना त्या कारणाने राजकीय कुरघोडी सुरु असतात. तसेच पालकमंत्रिपदाचा तिढाही अद्याप सुटलेला नाही. त्यातच आता एका बड्या नेत्याने शिंदेंच्या शिवसेनेबद्दल मोठे भाकीत केले आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी नुकतंच पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांना विविध राजकीय घटनांबद्दल प्रतिक्रिया विचारण्यात आले. यावेळी त्यांना एकनाथ शिंदे गटाच्या ऑपरेशन टायगरबद्दलही विचारण्यात आले. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांचं काम तमाम होणार आहे. शिंदे गट हा लवकरच भाजपाच विलीन होईल, असे भाकीत वर्तवले.

एकनाथ शिंदेंचे काम तमाम होणार
“एक दिवस एकनाथ शिंदेंच्या पक्षाचा एकही आमदार निवडून येणार नाही. 2029 ला चित्र पूर्ण बदललेले असेल. भाजप आणि एकनाथ शिंदे हे भविष्यात एकत्र राहणार नाहीत. एकनाथ शिंदेंचे काम झालेले आहे. त्यामुळे आता एकनाथ शिंदेंचे काम तमाम होणार आहे, हे आता सर्वांना दिसत आहे. हे त्यांनाही माहिती आहे, त्यांच्या लोकांनाही माहिती आहे”, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.

“त्यांचा पक्ष हा भाजपमध्ये विलीन होईल किंवा त्या पक्षातील एक मोठा गट हा कोकणातील नेत्याच्या नेतृत्वाखाली भाजपबरोबर जाईल. हे तुम्ही स्टॅम्प पेपरवर लिहून घ्या. मी तुम्हाला सही देतो”, असे संजय राऊत म्हणाले.

लढण्याची इच्छाशक्ती नसलेले जात आहेत
“जे कोणी पक्ष सोडतायत ते पदाधिकारी आहेत. पुढल्या दोन दिवसांत आमची बैठक आहे. आम्ही काही जणांना नव्याने जबाबदाऱ्या देणार आहोत. आम्ही खचणारे लोक नाहीत. जाणारे जावू द्या. सत्ता, पैसा दबाव आहे. काहीतरी अडचणी आहेत. जुन्या केसेस काढल्या जातात. काही लोकांची मने कमकुवत झाली आहेत. लढण्याची इच्छाशक्ती नसलेले जात आहेत. मुर्दाड लोकांना ठेवून तर काय करायचे”, असा टोला संजय राऊतांनी लगावला.

पाकिस्तानचा रात्रीच्या अंधारात एकाचवेळी किती ठिकाणी एअर स्ट्राइक? ती संघटना किती घातक?

0

पाकिस्तानने रविवारी रात्री अफगाणिस्तानातील चार प्रांतांवर एकाचवेळी एअर स्ट्राइक केला. हा एअर स्ट्राइक दहशतवादी संघटना तेहरीक-ए-तालिबानच्या तळावर करण्यात आला. तहरीक-ए-तालिबानने पाकिस्तानला चांगलचं जेरीस आणलं आहे. तहरीक-ए-तालिबानमुळे पाकिस्तानाता हजारो निष्पाप नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. पाकिस्तानात सरकार पाडणं हा 2007 मध्ये स्थापन झालेल्या तहरीक-ए-तालिबानचा उद्देश आहे. 2007 साली पाकिस्तान आणि अफगाणिस्तान सीमेवर बैतूल्ला महसूदने एक संघटना स्थापन केली. त्याचं नाव पुढे तहरीक-ए-तालिबान ठेवण्यात आलं. सध्या नूर वली महमूद या संघटनेचा प्रमुख आहे.

तहरीक-ए-तालिबान एक दहशतवादी संघटना आहे. पाकिस्तानातून सैन्य आणि लोकशाही सरकारला सत्तेतून बेदखल करणं हा तहरीक-ए-तालिबानचा उद्देश आहे. ऑगस्ट 2008 मध्ये या दहशतवादी संघटनेवर पाकिस्तानने बंदी घातली. मात्र, तरीही पाकिस्तानला अजूनपर्यंत या दहशतवादी संघटनेला संपवता आलेलं नाही. टीटीपीमुळे पाकिस्तानचे अफगाणिस्तानसोबत संबंध बिघडले.

आतापर्यंत किती हल्ले केले?

TTP कडे सैन्य स्ट्रक्चर आहे. ही संघटना तालिबानच्या धर्तीवर काम करते. पाकिस्तान सरकारने दिलेल्या माहितीनुसार, तहरीक-ए-तालिबानकडे 10 हजार प्रशिक्षित योद्धे आहेत. ते जिहादसाठी कटिबद्ध आहेत. तहरीक-ए-तालिबानने आतापर्यंत पाकिस्तानात 600 हल्ले घडवून आणले आहेत. लाहोरच्या चर्चमध्ये बॉम्बस्फोट, 2008 साली बार्सिलोना दहशतवादी कट, मलाला युसूफजाईवर हल्ला याच संघटनेने केला. पाकिस्तानी आर्मी तहरीक-ए-तालिबानच्या रडारवर आहे.

पाकिस्तानात किती नागरिकांचा मृत्यू?

तहरीक-ए-तालिबानचे दहशतवादी IED ब्लास्टद्वारे सैन्यासोबत लढतात. ते थेट हल्ले करुन लोकांच्या मनात दहशत निर्माण करतात. दक्षिण आशिया टेररिज्म पोर्टलनुसार, पाकिस्तानात दहशतवादी हल्ल्यांमुळे वर्ष 2024 मध्ये 600 सर्वसामान्य नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

दर महिन्याला किती कोटी मिळतात?

पाकिस्तानी वर्तमानपत्र ‘द डॉन’ने दोन दिवसांपूर्वी तहरीक-ए-तालिबानबद्दल वृत्त दिलं होतं. या वृत्तानुसार तहरीक-ए-तालिबानला दहशतवादी हल्ले करण्यासाठी फंड मिळतो. टीटीपी नेता मसूदच्या कुटुंबाला दर महिन्याला 37 कोटी रुपये अफगाणिस्तानकडून मिळतात, असं या वृत्तात म्हटलं आहे. या पैशांचा उपयोग पाकिस्तानात दहशतवादी हल्ले करण्यासाठी केला जातो.

कुठे नवीन प्रशिक्षण केंद्र?

डॉनच्या वृत्तानुसार, अफगाणिस्तानच्या कुनार, नंगरहार, खोस्त आणि पक्तिका (बरमल) प्रांतात तहरीक-ए-तालिबानने नवीन प्रशिक्षण केंद्र सुरु केलय. अफगाणि युवकांना यामध्ये भरती केलं जातय. तहरीक-ए-तालिबान माजिद ब्रिगेड, बलूचिस्तान लिबरेशन आर्मी आणि तहरीक-ए-जिहाद या पाकिस्तान विरोधी संघटनांना सोबत घेऊन रणनिती आखत असतो.