Home Blog Page 189

उपमहाराष्ट्र केसरी तर झालो, पण बक्षीसच मिळालं नाही; महेंद्र गायकडवाने सांगितलं यामागचं ‘राजकारण’

0

वादाने गाजलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा आणखी एक भोंगळ कारभार समोर आला आहे. अहिल्यानगरमध्ये झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा उपविजेता महेंद्र गायकवाड याला उपविजेते पदासाठी असलेले बक्षीसच मिळालं नसल्याचं समोर आहे. या गोष्टीचं राजकारण सुरू असल्यानेच आपल्याला बक्षीस मिळालं नसल्याचा आरोप महेंद्र गायकवाड याने केला.

यंदाची महाराष्ट्र केसरी स्पर्धा चांगलीच गाजली. पृथ्वीराज मोहोळ आणि महेंद्र गायकवाड यांच्यामध्ये झालेल्या अंतिम लढाईत पृथ्वीराज मोहोळला विजयी घोषित करण्यात आलं. तर पंचांच्या निर्णयावर नाराज होऊन मैदान सोडून गेलेला महेंद्र गायकवाड हा उपविजेता ठरला.

बोलेरो गाडीचं बक्षीस

स्पर्धेतील उपविजेत्याला बोलेरो गाडी हे बक्षीस ठेवण्यात आलं होतं. पण महेंद्र गायकवाडला हे बक्षीस अद्याप मिळालंच नसल्याचं समोर आलं. या स्पर्धेमध्ये झालेल्या राजकारणामुळे आपल्याला बक्षीस मिळालं नसल्याचं महेंद्र गायकवाड याने एबीपी माझाशी बोलताना सांगितलं. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद आणि महाराष्ट्र कुस्तीगीर संघाने एकत्र येऊन काम करावे. जेणेकरून पैलवानांचं नुकसान होणार नाही असं आवाहन महेंद्र गायकवाड याने केलं.

एकच महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा घ्या, चंद्रहार पाटील उपोषण करणार

राज्यात चार-चार महाराष्ट्र केसरी स्पर्धा भरवण्यात येतात हा महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा अपमान असून राज्यात एकच महाराष्ट्र केसरी स्पर्धा घ्यावी अशी मागणी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील याने केली. या मागणीसाठी मंगळवारी सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पैलवान चंद्रहार पाटील लाक्षणिक उपोषण करणार आहे. वन नेशन वन इलेक्शन प्रमाणे महाराष्ट्रात देखील कुस्ती संघटनेचीही एकच संघटना असली पाहिजे, यासाठी लवकरच मुख्यमंत्र्यांना देखील भेटणार असल्याचं पैलवान चंद्रहार पाटील याने स्पष्ट केलं आहे.

आमदार रोहित पवार यांच्याकडून घेण्यात येणाऱ्या कुस्ती स्पर्धेला आपला विरोध असून याविरोधात लाक्षणिक उपोषण करणार असल्याचं पैलवान चंद्रहार पाटील यांनी म्हटलं आहे

मोदींच्या घरी राहुल गांधी ज्या बैठकीस गेले, त्याच बैठकीवर काँग्रेसने घेतला आक्षेप; काय घडलं?

0

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली सोमवारी मुख्य निवडणूक आयुक्तांच्या निवडीसाठी महत्वाची बैठक पार पडली. पंतप्रधानांच्या निवासस्थानी झालेल्या यै बैठकीला निवड समितीतील सदस्य व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधीही उपस्थित होते. मात्र, ही बैठक संपताच काँग्रेसने त्यावर आक्षेप घेतला आहे. विद्यमान मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार हे 18 फेब्रुवारीला निवृत्त होत आहेत. यापार्श्वभूमीवर नवीन आयुक्तांच्या निवडीसाठी समितीची बैठक झाली. पंतप्रधान या समितीचे अध्यक्ष आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, राहुल गांधी आणि कायदा मंत्री अर्जून राम मेघवाल हे या बैठकीला उपस्थित होते. निवड समितीतून सरन्यायाधीशांना वगळण्यात आल्याने वाद निर्माण झाला होता. त्यावरून काँग्रेसने सुप्रीम कोर्टातही धाव घेतली आहे.

पंतप्रधानांच्या निवासस्थानी बैठक पार पाडल्यानंतर काँग्रेसने तातडीने पत्रकार परिषद घेत बैठकीवर आक्षेप घेतला. पक्षाचे नेते अभिषेक मनु सिंघवी यांनी सांगितले की, निवडणूक आयुक्तांच्या निवड समितीची बैठक म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे उल्लंघन आहे. त्यामुळे ही बैठक पुढे ढकलायला हवी होती. निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीबाबत पंतप्रधान विरोधी पक्षनेते आणि सरन्यायाधीशांच्या समितीमार्फत व्हायला हवी, असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे.

मुख्य निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीबाबत संतुलित निर्णय व्हायला हवा. त्यांच्या निवड प्रक्रियेत केवळ कार्यपालिकेचा समावेश नकोय. नवीन अधिनियमाला आव्हान देण्यात आले असून हे प्रकरण सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे. सुप्रीम कोर्टाने म्हटले होते की, 19 फेब्रुवारीला या मुद्द्यावर सुनावणी होईल आणि समितीचे कामकाज कसे व्हायला हवे, याबाबत निकाल दिला जाईल, असे काँग्रेसने स्पष्ट केले आहे.

ज्ञानेशकुमार यांचे नाव आघाडीवर

मुख्य निवडणूक आयुक्तपदाच्या शर्यतीत विद्यमान निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचे नाव आघाडीवर आहे. निवड समितीची बैठक पार पडली असून त्यांच्याच नावाची घोषणा समितीकडून केली जाण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीआधी दोन निवडणूक आयुक्तांच्या निवडीवरही काँग्रेसने आक्षेप घेतला होता. आता त्यापैकी एक अधिकारी मुख्य आयुक्त होणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे काँग्रेसकडून त्यावर जोरदार आक्षेप घेतला जात आहे.

सरपंच ‘संतोष अण्णा’साठी मस्साजोगकरांचा संयम सुटला टोकाची भूमिका गावकऱ्यांचे मंत्रालयावर आत्मदहन होणार

0

बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्येला जवळपास 70 दिवस झाले आहे. न्याय नाही मिळाला तर आर पारची लढाई लढू, अशी टोकाची भूमिका मस्साजोगच्या गावकऱ्यांनी घेतली आहे. आरोपी कृष्णा आंधळे याला अटक करण्यासाठी 25 फेब्रुवारीपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. जर मागण्या पूर्ण झाल्या नाही तर मस्साजोगकर थेट मंत्रालयावर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

संतोष देशमुख यांच्या हत्येला जवळपास 70 दिवस होत आले आहे. अद्याप सरकारने कोणतीही ठोस भूमिका घेतलेली दिसत नाही. त्यामुळे आता आपल्या गावच्या सरपंच अण्णाच्या न्यायासाठी मसाजोगच्या गावकऱ्यांची टोकाची भूमिका घेतली आहे. प्रशासनावर विश्वास नाही आपण सर्वजण मिळून राज्यपालाची भेट घेऊ तसेच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यावर विश्वास राहिला नाही, अशी देखील चर्चा यावेळी झाली.

गावकऱ्यांचा अन्नत्यादाचा इशारा

आजच्या बैठकीत सर्व गावकऱ्यांनी अन्नत्याग आंदोलन करण्या संदर्भांत चर्चा झाली. आंदोलनावर गावकऱ्यांचे एकमत झाले आहे. न्याय मिळेपर्यंत अन्नत्याग आंदोलन करायचे, यावर गावकऱ्यांनी हात वर करून अनुमोदन दिले आहे. ग्रामस्थांनी अगोदर एक दिवसाचा लाक्षणिक उपोषण करणार आहे. प्रशासन आलं तर त्यांना सांगू मंत्रालयावर जाऊन सर्व गावकऱ्यांनी आत्मदहन करायचं. थेट मंत्रालयावर आंदोलन करण्याची गावकऱ्याच्या बैठकीत चर्चा झाली. 25 फेब्रुवारीपर्यंत प्रशासनाला अल्टिमेटम त्यानंतर अन्नत्याग आंदोलन करण्यावर गावकरी ठाम असून पुढील आंदोलनाची दिशा ठरली.

मस्साजोगकरांच्या प्रमुख मागण्या काय?

पीआय महाजन पीएसआय राजेश पाटीलला सह आरोपी करा

कृष्णा आंधळेला अटक करा

उज्वल निकमांची तात्काळ नियुक्ती करा

प्रकरण फास्ट कोर्टात चालवा

आरोपींना पळून नेल्याची मदत करणाऱ्यांना सीडीआर करून त्यांना आरोपी करा

घटना झाल्यावर कळमच्या दिशेला गाडी का गेली याची चौकशी करा

आवादा कंपनीची भूमिका स्पष्ट करा

वाशी पोलीस ठाण्याचे पीआय रमेश घुले यांना बडतर्फ करून सहआरोपी करा

धनंजय देशमुख यांना अतिरिक्त सुरक्षा पुरवा

आता आर पारची लढाई…

गृहमंत्र्यांना एक निवेदन तयार करू त्यावरती गृहमंत्री काय उत्तर देतात त्यावर वाट पाहू…आठ दिवसाची मुदत त्यांना देऊ आणि त्यानंतर आपलं आंदोलन करू. गृह मंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद नाही दिला तर तीव्र आंदोलन करू. त्याचबरोबर राज्यपालांना ही निवेदन जन संदर्भात चर्चा झाली आवादा कंपनीची भूमिका अद्याप पर्यंत समोर आलेली नाही ती भूमिका देखील समोर आली पाहिजे. खंडणी प्रकरणात त्यांनी पण पुरावे प्रशासनाला दिले पाहिजेत. गृहमंत्री मुख्यमंत्री कोणीही असो आम्ही मागे सरकणार नाही, असे गावकरी म्हणाले.

दुसरे आंतरराष्ट्रीय टेम्पल कनव्हेंशन जगभरातील १,८८७ मंदिरे सहभागी; फडणवीसांनीही घेतले तिरुपतीचे दर्शन, म्हणाले…

0

आंतरराष्ट्रीय मंदिर परिषद आणि प्रदर्शन (ITCX) २०२५ आजपासून आंध्रप्रदेशातील तिरुपतीमध्ये सुरु झाले असून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जगप्रसिद्ध तिरुपती बालाजी मंदिरात दर्शन घेतले. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, मंदिरे ही ज्ञानाची केंद्रे व्हावीत असा आमचा प्रयत्न आहे. यावेळी त्यांची राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष परम पूज्य स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांच्यासमवेत भेट झाली.

देशभरातील मंदिरांचे व्यवस्थापन योग्य प्रकारे व्हावे, परंपरा योग्य प्रकारे चालाव्यात आणि मंदिरे ही ज्ञानाची केंद्रे व्हावीत हा प्रयत्न या टेम्पल कन्वेंक्शनच्या माध्यमातून केला जात आहे. तिरुपती बालाजीचे दर्शन घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, भगवान बालाजीचे दर्शन घेण्याची माझी आज इच्छा पूर्ण झाली, त्यांनी निवडणुकीत जो आशिर्वाद दिला आणि आम्हाला यश मिळाले आहे.

या आंतराष्ट्रीय परिषदेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू उपस्थित राहणार आहेत.यासोबतच अयोध्येचे स्वामी आनंदगिरी महाराज, आशिष शेलार, प्रवीण दरेकर आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ अधिकारी देखील या अधिवेशनाच्या उद्घाटनाला उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि अंत्योदय प्रतिष्ठान यांच्या संयुक्त सहकार्याने हा कार्यक्रम आयोजित केला जात आहे. या कार्यक्रमाबद्दल लोकांमध्ये खूप उत्साह आहे.

जगातील १,८८७ मंदिरे सहभागी

भाजपचे आमदार प्रसाद लाड यांच्या अध्यक्षतेखाली हे दुसरे आंतरराष्ट्रीय टेम्पल कनव्हेंशन आंध्र प्रदेशात होत आहे, ज्यामध्ये जगभरातील १,८८७ मंदिरे सहभागी होत आहेत. या कार्यक्रमात मंदिर व्यवस्थापन, अर्थव्यवस्था, सामाजिक कार्य आणि गर्दी नियंत्रण यासारख्या महत्त्वाच्या विषयांवर सखोल चर्चा केली जाईल. आयटीसीएक्स २०२५ हिंदू, शीख, बौद्ध आणि जैन संस्थांना एकत्र करेल. या जागतिक कार्यक्रमात मंदिर व्यवस्थापनातील नाविन्यपूर्ण दृष्टिकोन आणि सर्वोत्तम पद्धतींवर चर्चा केली जाईल, ज्यामध्ये शाश्वत परिसंस्था, डिजिटलायझेशन आणि मंदिर-आधारित अर्थव्यवस्था वाढविण्यासाठीच्या धोरणांवर लक्ष केंद्रित केले जाईल.

मंदिराच्या व्यवस्थापनावर चर्चा

या कन्वेक्शनमध्ये निधी व्यवस्थापन आणि गर्दी नियंत्रणापासून ते स्थिरता आणि सुरक्षा प्रोटोकॉलपर्यंत मंदिराच्या विविध कामकाजावर चर्चा केली जाईल. हा कार्यक्रम एआय, डिजिटल टूल्स आणि फिनटेक सोल्यूशन्सद्वारे मंदिर व्यवस्थापनाचे आधुनिकीकरण करण्यावर लक्ष केंद्रित करेल. लंगर आणि अन्न वितरण व्यवस्था, कचरा व्यवस्थापन आणि कायदेशीर पालन या प्रमुख क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले जाईल. वैद्यकीय सहाय्य, शैक्षणिक कार्यक्रम आणि धर्मादाय उपक्रम यासारख्या आवश्यक सामुदायिक सेवांवरही चर्चा होईल. या सर्वांचा उद्देश अधिक कार्यक्षम आणि सामाजिकदृष्ट्या प्रभावी मंदिर परिसंस्था निर्माण करणे आहे.

पुणे विधानसभा पराभव धसका ‘मनपा’साठी मविआचा झाला मोठा निर्णय; जे सोडून जाणार त्याची चिंताही नाही

0

विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड यश मिळाले. महाविकास आघाडीचा दारुन पराभव झाला. या निवडणुकीतील महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, काँग्रेस या तिन्ही पक्षांना मिळून 50 चा आकडाही गाठता आला नाही. त्यानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांची तयारी सर्वच पक्षांनी सुरु केली आहे. पुण्यात महाविकास आघाडीच्या स्थानिक नेत्यांची बैठक महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झाली. या बैठकीत मनपा निवडणुका स्वतंत्र नाही तर एकत्र लढवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे पुणे मनपाची निवडणूक चुरशीची होणार आहे.

आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीने पुण्यात महाविकास आघाडीची संघटनात्मक बैठक सोमवारी झाली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यालयात ही बैठक झाली. बैठकीला महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांचे शहराध्यक्ष उपस्थित होते. त्यात महापालिका निवडणुका लवकरच लागणार असल्याची शक्यता लक्षात घेऊन रणनीती तयार करण्यात आली. या पार्श्वभूमीवर पुण्यात महाविकास आघाडी कामाला लागली आहे.

असा झाला निर्णय

पुण्यात महायुतीचे आव्हान पेलण्यासाठी महत्वाचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. पुणे महापालिका निवडणूक महाविकास आघाडी एकत्रितच लढवण्याचा निर्णय घेण्यात आला. पुणे शहरासाठी हा निर्णय आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सांगितले. आता मनपा निवडणुकीला सामोरे कसे जायचे, जागा वाटप या विषयांवर लवकरच चर्चा होणार आहे. त्यासाठी महाविकास आघाडीचे प्रमुख नेते पुण्यात येणार आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सांगितले की, गेली तीन वर्ष भाजपने या निवडणुका होऊ दिल्या नाही. तीन वर्षानंतर आता निवडणुका होणार आहे. २५ तारखेला सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येणार आहे. मनपा आयुक्तांची भूमिका याबाबत महाविकास आघाडीच्या बैठकीत चर्चा झाली. पक्ष सोडून जे जाणार आहेत, त्याची आम्हाला चिंता नाही. काही लोक वेगळ्या अपेक्षेने जात आहेत, त्यांचा अपेक्षाभंग होईल, असे जगताप यांनी सांगितले.

एकनाथ शिंदेंचा मास्टर स्ट्रोक; 20 तारखेला मुहूर्तही ठरणार, सर्व खासदार, आमदारांना तयार राहण्याच्याही सूचना?

0

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेकडून सातत्यानं शिवसेना ठाकरे गट आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरून टीका करण्यात येत आहे. आता एकनाथ शिंदे यांचा मास्टर स्ट्रोक समोर आला आहे. सूत्रांकडून मिळत असलेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या सर्व खासदार आणि आमदारांसोबत फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात प्रयागराज येथे कुंंभस्नानास जाणार आहेत. शिवजयंती साजरी झाल्यानंतर 20 फेब्रुवारी रोजी कुंभस्नानासाठी प्रयागराजला कधी जायचं याचा मुहूर्त ठरणार असल्याची माहिती समोर येत आहे. साधारण फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात एकनाथ शिंदे हे आपल्या सर्व आमदार, खासदारांसह प्रयागराजला जाण्याची शक्यता आहे.

एकनाथ शिंदेंचा मास्टर स्ट्रोक

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेकडून सातत्यानं शिवसेना ठाकरे गट आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरून टीका करण्यात येत आहे. त्यातच आता एकनाथ शिंदे हे आपल्या सर्व आमदार आणि खासदारांसह फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात प्रयागराजला जाण्याची शक्यात आहे.  कुंभस्नानाच्या माध्यमातून हिंदुत्वाच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला शिवसेना एकप्रकारे आव्हान देणार आहे. हा एकनाथ शिंदे यांचा मास्टर स्ट्रोक असल्याचं बोललं जात आहे.

उद्धव ठाकरेंना धक्यावर धक्के

एकीकडे एकनाथ शिंदे हे आता आपल्या सर्व आमदार आणि खासदारांना घेऊन प्रयागराजला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ते फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात प्रयागराजला कुंभमेळ्यासाठी जाणार आहेत.  तर दुसरीकडे त्यांचे उद्धव ठाकरे यांना धक्क्यावर धक्के सुरू आहेत. आतापर्यंत अनेक नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. काही दिवसांपूर्वीच शिवसेना ठाकरे गटाचे मोठे नेते राजन साळवी यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते जितेंद्र जनावळे यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. ते शिवसेना ठाकरे गटाचे विलेपार्लेचे उपविभाग प्रमुख होते. जनावळे हे येत्या वीस तारखेला शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

विधानसभेचा अपयश पचवून शरद पवारांची स्थानिक निवडणुकांसाठी पुन्हा उभारी; २८ फेब्रुवारीला मुंबईत बैठक

0

आधी लोकसभा निवडणुकीतील दैदिप्यमान यश व नंतर विधानसभेतील अपयश पचवून ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी पुन्हा नव्याने उभारी घेतली आहे. २८ फेब्रुवारीला त्यांनी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस (शऱद पवार) पक्षाच्या सर्व आजी माजी खासदार आमदार व नगरसेवकांची बैठक आयोजित केली आहे. पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी ही माहिती दिली. २५ फेब्रुवारीला राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांसंदर्भात उच्च न्यायालयात दाखल असलेल्या याचिकांचा निकाल अपेक्षित आहे. इतर मागावर्गीय ( ओबीसी) गटांसाठीच्या राखीव जागा त्यांची अधिकृत लोकसंख्या नोंदणी झाली नसताना निश्चित कशा करणार या व आणखी काही मुद्द्यांवर ही सुनावणी असून त्यात राज्य सरकार प्रतिवादी आहे. याच कारणावरून मागील सलग ५ व ३ वर्षे राज्यातील जिल्हा परिषद, नगरपालिका, महापालिका यांच्या सार्वत्रित निवडणूकाच झालेल्या नाहीत. सर्व ठिकाणी प्रशासकीय कारभार सुरू आहे. सर्वच राजकीय पक्षांमधील या निवडणूका लढवू इच्छिणारे या प्रशासकीय अवस्थेला कंटाळले असून निवडणूकांच्या प्रतिक्षेत आहेत.

एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेसचा राज्यातील अपवाद वगळता सर्वच जिल्हा परिषदा व मोठ्या महापालिकांवर वरचष्मा होता. अजित पवार बाजूला गेल्यानंतर मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूकच झालेली नाही. अजित पवार आता राज्यातील महायुती सरकारमध्ये आहेत, त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचा स्वतंत्र गट आहे व आमचाच पक्ष खरा हा त्यांचा दावा विधानसभा अध्यक्ष स्तरावर मान्य झाला आहे. त्यामुळेच शरद पवार आता त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घेऊन या निवडणूकीत काय करणार याची राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे. स्वत: पवार यांनीच पुढाकार घेत मुंबईतील या बैठकीचे आयोजन केले असल्याचे काही पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

दिल्ली चेंगराचेंगरी पीडितांना शवागारातच मृताच्या नातेवाईकांना १० लाख रुपयांची सानुग्रह मदत गावी पाठवले मृतदेह

0

नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर शनिवारी रात्री चेंगराचेंगरी झाली. या अपघातात १८ जणांना जीव गमवावा लागला. मृतांमध्ये १४ महिलांचाही समावेश आहे. या दुर्घटनेतील मृतांना आणि जखमी झालेल्यांना सरकारने नुकसान भरपाई जाहीर केली आहे. मृतांच्या कुटुंबीयांना १० लाख रुपयांची भरपाई दिली जाईल, असे सरकारने म्हटलं. याशिवाय नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीत गंभीर जखमी झालेल्यांना अडीच लाख रुपये आणि जखमींना एक लाख रुपये देण्याची घोषणा करण्यात आली. त्यानंतर भरपाईही वाटप सुरू झालं आहे. मात्र ही भरपाई देण्याच्या पद्धतीवरुन आता प्रश्न उपस्थित केला जात आहे.

शनिवारी नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीत १८ लोकांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर रेल्वेने पीडित कुटुंबांना आर्थिक मदत जाहीर केली. रविवारी सकाळी कुटुंबीय मृतदेह घेण्यासाठी रुग्णालयात पोहोचले तेव्हा त्यांना रेल्वेकडून १० लाख रुपये रोख देण्यात आले. ही रक्कम १०० आणि ५०० ​​च्या नोटांच्या बंडलमध्ये वाटण्यात आली. “मृतांचे शवविच्छेदन तीन रुग्णालयांमध्ये करण्यात आहे. त्यानंतर शवागारात असलेल्या प्रत्येक मृताच्या नातेवाईकांना १० लाख रुपयांची सानुग्रह मदत देण्यात आली. त्यानंतर रुग्णवाहिकांची व्यवस्था करुन काही तासांतच मृतदेह त्यांच्या नातेवाईकांसह आणि सुरक्षा रक्षकांसह त्यांच्या गावी पाठवण्यात आले,” अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली.

मात्र रेल्वे मंत्रालयाने २०२३ मध्ये यासंदर्भात एक मार्गदर्शक सूचना जारी केली होती. मार्गदर्शक तत्त्वांनुसार, रेल्वे तत्काळ मदतीसाठी फक्त ५०,०० रुपये रोख देऊ शकते. उर्वरित रक्कम चेक, आरटीजीएस, एनईएफटी किंवा इतर पद्धतींद्वारे दिली जाते. इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, मृतांच्या कुटुंबीयांना रोख रक्कम दिल्यानंतर रेल्वे प्रशासनाने त्यांच्यासोबत सुरक्षा कर्मचारीही तैनात केले. जेणेकरून रोख रक्कम पीडितांच्या सुरक्षितपणे घरी पोहोचवता येईल.

दरम्यान, रेल्वे मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही तात्काळ मदत आहे आणि ती भरपाईपेक्षा वेगळी आहे. सर्व जखमींवर लेडी हार्डिंग हॉस्पिटल आणि लोक नारायण जयप्रकाश हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत.

Shriram Finance raises over USD 500mn equivalent marking- SACE covered Loan facility

0

Pune : Shriram Finance Limited (SFL), among the India’s largest NBFC and the flagship company of the Shriram Group, has successfully availed a landmark External Commercial Borrowing (ECB) SACE Push loan facility. This transaction represents the largest SACE, an Italian export credit agency controlled by the Ministry of Economy & Finance, Italy,  covered loan facility ever raised by a NBFC in India from SACE, reinforcing SFL’s position as a leader in offshore fundraising and its ability to diversify funding sources strategically.

This 10-year long-tenor facility is backed by SACE, underlines a strong global partnership aimed at promoting the financing of Italian vehicles, both new and used, under SFL’s Social Finance Framework. The transaction saw participation from leading global financial institutions, including HSBC, Deutsche Bank, KfW IPEX-Bank, ING Bankand J.P. Morgan as Mandated Lead Arrangers and Lenders amounting to EUR 393 million and USD 100 million highlighting the strong confidence of international lenders in SFL’s creditworthiness. HSBC acted as the Sole ECA (Export Credit Agency). Coordinator and ING Bank acted as the Social Loan Coordinator for the transaction.

SFL’s collaboration with SACE reaffirms its ability to structure innovative funding solutions that align with its long-term business strategy. The transaction further demonstrates SFL’s agility in tapping offshore financing markets and expanding its lender base to support sustainable business growth.

This milestone highlights SFL’s demonstrated ability to tap into international capital markets, effectively optimizing its funding costs while maintaining a diverse funding mix. With this recent transaction, SFL has successfully secured over USD 2.50 billion in offshore funding in the current financial year, the highest by any NBFC in India in structured finance and sustainable funding initiatives.Commenting on the successful fundraise, Mr. Umesh Revankar, Executive Vice Chairman of Shriram Finance Limited, stated: “This landmark transaction showcases our strong ability to navigate global financial markets and forge strategic partnerships with international lenders. Our association with SACE and leading global banks reinforces the confidence that global financial institutions have in SFL’s vision and operational strength. This facility not only enhances our ability to provide financing for Italian vehicles and equipment’s but also strengthens our commitment to financial inclusion and economic development.”

Gautam Bhansali, Head-India & South Asia of SACE stated: “Our relationship with Shriram Finance has only strengthened since 2019 when we executed our first Push Facility and since then over € 100 Mn equivalent of Italian products have been supported by them. This new unique facility is expected to further strengthen our partnership as we simultaneously support Italian excellence and Social activities of Shriram Finance in India.”

Mr. Ajay Sharma, Head of Banking, HSBC India, said, “We are delighted to work alongside SFL to arrange this landmark SACE-backed financing facility, further enhancing our relationship with them and reinforcing HSBC’s strong capabilities as a global ECA arranger. This transaction marks our fourth SACE-backed deal in India in the past 12 months, underscoring our commitment to supporting Indian clients and our strong relationship with the Italian ECA, which spans more than four decades.”

This transaction aligns with SFL’s strategic focus on expanding its lender base and accessing diversified pools of capital to support its mission of empowering small business owners and individuals with responsible financial solutions. By leveraging global partnerships, SFL continues to lead the way in mobilizing sustainable capital for India’s growth and development.

महाराष्ट्रातील धक्कादायक प्रकार! अंत्ययात्रा सुरु असताना नातेवाईक मृतदेह रस्त्यात टाकून वाट दिसेल तिथे पळत सुटले; वाचा नेमक प्रकरण काय?

0

महाराष्ट्राच्या जळगाव एक अत्यंत धक्कादायक प्रकार घडला आहे. अंत्ययात्रा सुरु असताना नातेवाईक मृतदेह रस्त्यात टाकून वाट दिसेल तिथे पळत सुटले. याला कारण ठरल्या आहेत त्या मधमाशा. अचानक मधमाशांनी हल्ला केल्याने अत्यंयात्रेत सहभागी झालेले लोक वाट दिसेल तिथे पळत सुटले. मधमाशांच्या हल्ल्यात तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

जळगावच्या पारोळा तालुक्यात ही घटना घडली आहे. नगाव गावात एका व्यक्तीचा मृत्यू झाला. मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नगाव गावात स्मशान भूमीकडे नेत असताना अचानक मधमाधांचे पोळ उठले. अंत्ययात्रेत सहभागी नागरिकांवर अचानक मधमाशांनी हल्ला केला. यामुळे एक गोंधळ उडाला. मधमाशांनी हल्ला केल्यानंतर स्वतः चा बचाव करण्यासाठी अंत्ययात्रेत सहभागी झालेले शोकाकुल नातेवाईक आणि ग्रामस्थ शव सोडून वाट मिळेल तिकडे पळत सुटले.

या मधमाशांच्या हल्ल्यात चार जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी पारोळा येथील कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या हल्ल्यात तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. साधु भागा भिल (वय 75), ओंकार शंकर भिल (वय 65) आणि मधुकर सजन भिल (वय 55) अशी जखमींची नावे आहेत. तिघेही नगाव येथील रहिवासी आहेत.

महाराष्ट्रातील एक लोकप्रिय ट्रेकिंग पाईंट असलेल्या कर्नाळ किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी आलेल्या विद्यार्थी आणि इतर पर्यटकांवर मधमाशांनी हल्ला केल्याची घटना 15 फेब्रुवारी रोजी घडली होती. कर्नाळा किल्ल्यावर40 ते 50 पर्यटकांवर मधमाशांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात एका पर्यटकाचा मृत्यू झाला. तर, पाच जण गंभीर जखमी झाले होते. मधमाशांच्या झुंडीने हल्ला केल्याने पर्यटक धावत सुटले. धावताना पडून नऊ जण जखमी झाले यात एका पर्यटकांचा मृत्यू झाल्याचे समजते.