Home Blog Page 191

स्मार्ट बाणेर बालेवाडीतील जनसेनेच ‘अन् मोल’ शास्त्र; ‘कमळ’ हाती अन् ‘तळागाळा’ची नाती

0

पुणे शहराचा अभिमान आणि स्वाभिमान म्हणून बाणेर बालेवाडी या भागाची स्मार्ट सिटी अंतर्गत झालेली ओळख आज अभिमानास्पद असतानाच कोथरूड मतदारसंघातील ‘हिंदुत्वाचा बालेकिल्ला’ अशी ओळख निर्माण करत जनसेनेच ‘अन् मोल’ शास्त्र उदयास येत असून जनसेवेची घरात मिळालेली परंपरा ‘कमळ’ हाती घेऊन ‘तळागाळा’तील लोकांच्या जनसेवार्थ अमोल बालवडकर हा ‘छावा’ स्मार्ट सिटीच्या नाविन्याच्या ‘झालर’मध्ये ‘हिंदुत्वाचे तोरण’ घरोघरी पोहोचवण्यामध्ये मग्न आहे. कोथरूड विधानसभा मतदारसंघांमधील प्रभाग क्रमांक- ९ भारतीय जनता पक्षाचा मैलाचा दगड म्हणून या नेतृत्वाची भरभराटी आणि वाटचाल सुरू आहे. अशा या हिंदुत्ववादीच्या छाव्यास वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा!

भारतीय जनता पक्ष आणि त्याच विचाराला पाठिंबा देत कोथरूड विधानसभा मतदारसंघातील उमेदवाराचा विजय सुकर करण्यात 2009 2014 2019 आणि 2024 सलग ४ वेळा या प्रभागात माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी केलेल्या कामाची प्रचिती पक्षातील नेत्यांनाही आहे. सुरुवातीला 2024 मध्ये अधिकृतपणे या मतदारसंघात निवडणूक लढवण्यासाठी मनातील इच्छा व्यक्त केल्यानंतर ‘कोथरूड’ मध्ये नवा ट्विस्ट आला अन् ‘छाव्या’च्या स्वाभिमानी अन विनीत भूमिकेमुळे पक्ष नेतृत्वाला नव्या पिढीचा एक सक्षम चेहरा मिळाला असून कमळ हाती घेऊन तळागावातील लोकांच्या सेवार्थ एक टीम तयार झाली आहे. कोथरूड भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला हे मान्य केल्यानंतर या बालेकिल्लातील प्रभाग 9 एक तरबेज आणि सक्षम शिलेदार(सरदार) म्हणून या छाव्या कडे पाहिले जात आहे. कोथरूड मधील सुमारे 1 लाख 30 हजारांचे प्रतिनिधित्व असणाऱ्या या भागातील संघनिष्ठीत श्रीराम भक्त हिंदुत्ववादी नव्या छाव्याची कार्यपद्धती ‘कमळ’ हाती अन् ‘तळागाळा’ची नाती याच्या जीवावर स्मार्ट बाणेर बालेवाडीतील जनसेनेच ‘अन् मोल’ शास्त्र नवी ओळख निर्माण होत आहे.

कोथरूड विधानसभा मतदारसंघांमध्ये केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, महाराष्ट्र राज्याचे मंत्री चंद्रकांतदादा पाटील, खासदार मेधा कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली असंख्य नवी पिढी हिंदुत्वाच्या विचाराने मतदारसंघांमध्ये कार्यरत असताना त्यांच्यासाठी अमोल बालवडकर यांचे कार्य आणि कार्यपद्धती एक आदर्शवत उदाहरण निर्माण झाले आहे. सेवाभावी वृत्ती विनम्र व्यक्तिमत्व आणि भविष्याचा वेध घेणारी कृती या तिहेरी संगमाच्या जोरावरती भारतीय जनता पक्षाचे अविरत कार्य या भागामध्ये सुरूच आहे म्हणूनच कोथरूड विधानसभा मतदारसंघ म्हटलं की एकच नाव येतं ते म्हणजे भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला आणखी मजबूत करणारे अमोल(भैय्या) रतन बालवडकर!  पुणे महापालिकेच्या लांबलेल्या निवडणुका ही काही जणांसाठी अडचण बसत असली तरी सुद्धा प्रभाग न मधील भारतीय जनता पक्षाचे अमोल बालवडकर ही संधी जनसेवार्थ व्यतीत करून ‘आत्मसंतुष्टी’ मात्र मिळवत आहे.

लाडकी बहिण फेब्रुवारीचा हफ्ता कधी? 5 लाख लाभार्थी वगळलं? आम्ही तिघे सांगतोय…. ही योजना: अजित पवार

0

ज्या कुटुंबांचं आर्थिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील महिलांसाठी सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये दर महिन्याला दीड हजार रुपये जमा करण्यात येतात. गेल्या जुलैपासून या योजनेच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली. आतापर्यंत लाडक्या बहिणींना या योजनेचे सात हाफ्ते मिळाले आहेत, आता फेब्रुवारीचा हाफ्ता कधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. फेब्रुवारीचा हाफ्ता देखील आता लवकरच मिळण्याची शक्यता आहे. याबाबत उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी मोठी अपडेट दिली आहे, ते नाशिकमध्ये बोलत होते.

नेमकं काय म्हणाले अजित पवार?

फेब्रुवारीचा हाफ्ता कधी मिळणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. याबाबत अजित पवार यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. लाडक्या बहिणींनी सरकार आणण्यासाठी मोठी जबाबदारी पार पडली. मी इथे येण्यापूर्वीच चेकवर सही करून आलो आहे. त्यामुळे लवकरच फेब्रुवारीचे पैसे त्यांच्या खात्यावर जमा होतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांनी पण सांगितलं आणि मी पण सांगतो ही योजना बंद होणार नाही, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

2100 रुपये कधीपासून मिळणार?

दरम्यान आमचं सरकार राज्यात पुन्हा सत्तेत आलं तर आम्ही लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ अशी घोषणा महायुतीच्या नेत्यांकडून विधानसभा निवडणुकीच्या वेळी करण्यात आली. आता पुन्हा एकदा राज्यात महायुतीचं सरकार आलं आहे, त्यामुळे आता 2100 रुपये कधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मात्र राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतरच यावर निर्णय होण्याची शक्यता आहे, अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर लाभार्थी महिलांना दर महिन्याला 2100 रुपये मिळण्याचा अंदाज आहे.

पाच लाख लाभार्थी महिलांना वगळलं

दरम्यान या योजनेसाठी काही निकष बनवण्यात आले होते. मात्र निकषात न बसणाऱ्या महिलांनी देखील या योजनेसाठी अर्ज केला होता. त्यांनाही या योजनेचा लाभ देण्यात आला. मात्र आता या योजनेत न बसणाऱ्या पाच लाख महिलांची नावं वगळ्यात आली आहेत.

‘छावा’ने कमाईचे रेकॉर्ड मोडले, दुसऱ्या दिवशीच ‘एवढ्या’ गल्ला; बॉलिवूड सर्वात मोठा पीरियड ड्रामा चित्रपट बनेल?

0

गेल्या काही काळापासून, बॉलिवूडमध्ये असे चित्रपट प्रदर्शित होऊ शकलेले नाहीत जे प्रेक्षकांना चित्रपटगृहात येण्यास भाग पाडतील. चित्रपट यायचे, लोक ते पाहायचे आणि नंतर विसरून जायचे. पण आता विकी कौशल, रश्मिका मंदान्ना आणि अक्षय खन्ना यांच्या चित्रपट ‘छावा’ ने ती पोकळी भरून काढल्याचे दिसते. त्यांचा चित्रपट पाहण्यासाठी लोक मोठ्या संख्येने थिएटरमध्ये पोहोचत आहेत. पहिल्या दिवशी मोठी कमाई केल्यानंतर, दुसऱ्या दिवशीही चित्रपटाने चांगली कमाई केली आहे.

‘छावा’ने दुसऱ्या दिवशीही केली भरपूर कमाई

त्याच्या कारकिर्दीतील सर्वात मोठी ओपनिंग दिल्यानंतर, विकी कौशलने दुसऱ्या दिवशीही कमाईचे सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. पहिल्या दिवशी 31 कोटी रुपये कमाई केल्यानंतर, ‘छवा’ने दुसऱ्या दिवशीही जबरदस्त कमाई केली आहे. सॅकॅनिल्कमधील एका वृत्तानुसार, ‘छावा’ने दुसऱ्या दिवशी सुमारे 36.5 कोटी रुपयांची कमाई केली आहे, ज्यामुळे दोन दिवसांत एकूण कमाई 67.5 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. तथापि, हे आकडे अद्याप अंतिम नाहीत.

‘छावा’ बॉलिवूडचा सर्वात मोठा पीरियड ड्रामा चित्रपट बनेल का?

आतापर्यंत बॉलिवूडमध्ये अनेक पीरियड ड्रामा चित्रपट बनले आहेत ज्यांना प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळाले आहे. ‘जोधा अकबर’, ‘पद्मावत’, ‘बाजीराव मस्तानी’, ‘मणिकर्णिका’, ‘तान्हाजी’, हे असे चित्रपट आहेत ज्यांनी बॉक्स ऑफिसवर खूप कमाई केली आहे. पण सर्वांना मागे टाकत, विकी कौशलचा ‘छावा’ वर येत असल्याचे दिसते.

‘छावा’ ने या चित्रपटांच्या सुरुवातीच्या कलेक्शनला आधीच मागे टाकले आहे. याआधी, दीपिका पदुकोण, शाहिद कपूर, रणवीर सिंग स्टारर ‘पद्मावत’ चित्रपटाने पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी सर्वाधिक कमाई केली होती. ‘पद्मावत’ने पहिल्या दिवशी 19 कोटी आणि दुसऱ्या दिवशी 32 कोटी रुपयांची कमाई केली होती. ‘छावा’ ने हे सर्व रेकॉर्ड मोडले आहेत आणि पीरियड ड्रामा चित्रपटांमध्ये एक नवा रेकॉर्ड निर्माण केला आहे.

‘छावा’ची तिसऱ्या दिवसाची कमाई किती?

‘छावा’ सिनेमाने रिलीजच्या पहिल्याच दिवशी, शुक्रवारी भारतात पहिल्याच दिवशी ३३.१ कोटी रुपये कमावले. दुसऱ्या दिवशी कलेक्शनमध्ये वाढ झाली. शनिवारी ‘छावा’ने तब्बल ३९.३ कोटी रुपये कमावले. रिलीजनंतरच्या पहिल्या रविवारी म्हणजेच तिसऱ्या दिवशी ‘छावा’ने ४८.५ कोटी रुपये कमावले, अशी माहिती इंडस्ट्री ट्रॅकर सॅकनिल्कने दिली आहे. चित्रपटाचे तीन दिवसांचे भारतातील कलेक्शन ११६.५ कोटी रुपये झाले आहे. तिसऱ्या दिवसाची आकडेवारी ही प्रारंभिक आहे, त्यामुळे यात बदल होण्याची शक्यता आहे. ‘छावा’च्या जगभरातील कमाईचे आकडे अद्याप समोर आलेले नाही.

‘छावा’ चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे, तर समीक्षकही या चित्रपटाचं खूप कौतुक करत आहेत. विकी कौशलने त्याच्या करिअरमधील सर्वोत्कृष्ट अभिनय या चित्रपटात केला आहे, असं म्हणत अनेकांनी त्याचं कौतुक केलं आहे. चित्रपटात विकी कौशलबरोबरच रश्मिका मंदाना, अक्षय खन्ना, विनित सिंह, आशुतोष राणा, संतोष जुवेकर, सारंग साठ्ये, सुव्रत जोशी, निलकांती पाटेकर, शुभांकर एकबोटे, दिव्या दत्ता, नील भूपालम, प्रदीप राम सिंह रावत, डाएना पेंटी, रोहित पाठक हे कलाकार आहेत.

“मला या आकड्यांपेक्षा…”, अभिनेता संतोष ‘छावा’च्या कलेक्शनबद्दल पोस्ट

लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ चित्रपटाच्या निर्मितीसाठी १३० कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. चित्रपटाची कमाई पाहता लवकरच निर्मिती खर्च वसूल होईल असं दिसत आहे.

संतोष देशमुख खून प्रकरणी बीडचं राजकारण पुन्हा तापणार, आज दुपारी ग्रामस्थांची एक महत्त्वपूर्ण बैठक

0

बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून मागील काही काळापासून बीड जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. याप्रकरणातील एक आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे. त्याला पोलिसांकडून शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र त्याचा काहीच थांगपत्ता लागत नाहीये. यामुळे मस्साजोगचे ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. शिवाय, एकही आरोपी सुटला तर टोकाचं पाऊल उचलू अशी थेट भूमिका संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी घेतली आहे. यामुळे आता बीडचं राजकारण पुन्हा एकदा तापताना दिसत आहे.

अशात आता मस्साजोगमध्ये आज दुपारी ग्रामस्थांची एक महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात न्याय मिळावा. यासाठी आता मासाजोगचे गावकरी आणि देशमुख कुटुंबीयांना आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यासाठी आजची बैठक महत्त्वाची असणार आहे. यातच भाजप आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांची गुप्त भेट घेतल्याने त्यांच्या भूमिकेवर देखील संशय व्यक्त केला जातोय.

या सर्व घटना घडामोडीनंतर आता संतोष देशमुखांना न्याय मिळवून देण्यासाठी गावकरीच आंदोलन हातात घेऊ शकतात, अशा शक्यता निर्माण झाल्या आहेत. असं झालं तर बीडमधील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे. आज होणाऱ्या या बैठकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. या बैठकीमध्ये मस्साजोगचे गावकरी काय निर्णय घेणार? देशमुख कुटुंबाच्या न्यायासाठी लढा आणखी तीव्र होणार का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

बीड जिल्ह्यात जमाव बंदी आदेश लागू

खरं तर, बीड जिल्ह्यात गेले काही दिवसापासून मराठा आरक्षण व ओबीसी आरक्षण या प्रश्नावर नागरिक एकत्र येत आहेत. त्याचबरोबर 15 फेब्रुवारी रोजी मनोज जरांगे पाटील हे सामूहिक साखळी उपोषणासाठी बसणार होते. त्या अनुषंगाने व बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग येथील संतोष देशमुख खून प्रकरणाने बीड जिल्ह्यात अनेक सामाजिक संघटना न्याय मागण्यासाठी एकत्र येत आहेत. तसेच जिल्ह्यात सध्या दहावी आणि बारावीची परीक्षा चालू आहे तर दहावीची परिक्षा २१ फेब्रुवारीपासून चालू होणार आहे. त्या अनुषंगाने हे जमाबंदी आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश लागू करण्यात आला आहे.

15 फेब्रुवारी ते 01 मार्च पर्यंत हा आदेश लागू असणार आहे. त्यामुळे 2 किंवा त्यापेक्षा जास्त लोकांना एकत्र येता येणार नाही असं आदेशात नमूद करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक बीड, यांच्या अहवालावरून बीड जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी, महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37(1)(3) प्रमाणे जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांना आवाहन करण्यात येते की कोणीही लाठी,काठी, बंदूक, तलवार, कोणतेही ज्वलनशील पदार्थ जवळ बाळगणार नाहीत असे झाल्यास आपल्यावर दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल.

पुणे ठाकरे सेनेचे ‘डॅमेज’ कंट्रोलसाठी तात्या मैदानात!; मिशन पुणे लॉन्च 8 मतदारसंघासाठी 2 दिवसीय प्रोग्रॅम

0

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या शिंदेंच्या सेनेने पुण्यामध्ये लॉन्च केलेले मिशन पुण्याची चर्चा आहे. मिशन पुण्याच्या माध्यमातून ठाकरेंच्या सेनेतील आणि काँग्रेस मधील नाराजांना आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न शिंदेची सेना करीत आहे.आगामी काळामध्ये ठाकरेंच्या सेनेला आणखी गळती लागण्याची शक्यता असतानाच ठाकरे सेनेने देखील मिशन पुणे लॉन्च केले आहे. त्याची जबाबदारी ठाकरे सेनेने वसंत मोरे यांना दिली आहे. ‘कोणतेही युद्ध जिंकायचे असेल तर प्रथम त्याचे नियोजन करावे लागते,’ असे वसंत मोरे म्हणाले.

आगामी पुणे महापालिका निवडणुकीसाठी ठाकरेंच्या सेनेने तयारीला सुरुवात केली आहे. महापालिकेचे निवडणूक समन्वयक म्हणून वसंत मोरे यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निवड केली आहे.

यानंतर वसंत मोरे हे ठाकरे सेनेला लागलेल्या गळतीच्या पार्श्वभूमीवर डॅमेज कंट्रोलच्या कामाला लागले आहे. महापालिका निवडणुका कधी होतील हे निश्चित नसताना देखील आत्तापासूनच ठाकरे सेनेने पालिका इच्छुकांच्या मुलाखती घेण्यास सुरुवात केली आहे.

सोमवार आणि मंगळवार या दोन दिवशी पुणे शहरात येणाऱ्या आठ विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत. या मतदारसंघातून ठाकरे सेनेकडून महापालिकेची निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेल्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना मुलाखतीला उपस्थित राहण्याचे आवाहन वसंत मोरे यांनी केले आहे.

मिशन पुणे महानगरपालिका अंतर्गत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या तसेच खासदार संजय राऊत यांच्या आदेशाने माजी पर्यावरण मंत्री आमदार आदित्य ठाकरे यांच्या सहकार्याने पुणे जिल्हा संपर्कप्रमुख आमदार सचिन आहीर तसेच पुणे शहर सहसंपर्कप्रमुख आदित्य शिरोडकर यांच्या मार्गदर्शनात पुणे शहरप्रमुख संजय मोरे तसेच शहरप्रमुख गजानन थरकुडे यांच्या नियोजन सहकार्यात सोमवारपासून पुणे मनपा निवडणूक इच्छुक उमेदवारांसाठी मुलाखतीचा कार्यक्रम घेण्यात येणार आहे.

शिवसेना मध्यवर्ती कार्यालय (पुलाची वाडी, पुणे) येथे या मुलाखती होणार आहेत.

सोमवार 17 फेब्रुवारी

दु .3 वा. छत्रपती शिवाजीनगर विधानसभा,

दु. 4 वा. हडपसर विधानसभा ,

सायं. 5 वा. कोथरूड विधानसभा,

सायं. 6 वा. पुणेकॅन्टोन्मेंट विधानसभा

मंगळवार 18 फेब्रुवारी

 दु. 3 वा. पर्वती विधानसभा

 दु. 4 वा. कसबा विधानसभा

सायं. 5 वा. वडगाव शेरी विधानसभा

सायं. 6 वा. खडकवासला विधानसभा

असा मुलाखतीचा कार्यक्रम असेल.

“नव्यांना राम राम आणि निष्ठावंतांना थांब थांब…” नाराज पुणे शहर उपशहर प्रमुख आज ‘शिवधनुष्य’ हाती घेणार

0

पुणे शहर शिवसेना म्हटलं की शिवसेनेचा बालेकिल्ला आणि तळागाळापर्यंत बांधणी असलेल्या कोथरूड विधानसभा मतदारसंघ कायमच चर्चेत असतो. हिंदुहृद्यय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि त्यानंतर उद्धव साहेब ठाकरे व आदित्य ठाकरे या सर्वांनाच कायम प्रचंड साथ आणि सोबत देण्यामध्ये कोथरूड विधानसभा मतदारसंघाचा अग्रक्रम लागतो. पुणे शहर शिवसेनेमध्ये प्रचंड पडझड झाली असली तरी सुद्धा कोथरूड विधानसभा मतदारसंघांमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला म्हणावे तसे सक्रिय सभासद मिळत नव्हते… असंख्य प्रयत्न केल्यानंतरही कोथरूड विधानसभा मतदारसंघांमध्ये कार्यकारणी जाहीर करण्यापर्यंत सुद्धा धाडस एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला करता आले नाही. परंतु आज कोथरूड शिवसेनेमध्ये मोठे खिंडार पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवसेना (उबाठा) गटामध्ये सक्रिय असलेल्या आणि आदित्य ठाकरे यांची जवळीक असणारे शिवसेना पुणे शहर उप प्रमुख राजेश पळसकर यांनी पक्षातील नव्या प्रवृत्तीच्या विरोधात नाराजी व्यक्त करत जय महाराष्ट्र करण्याचा निर्णय घेऊन आज हाती धनुष्यबाण बांधण्याचे निश्चित केले आहे.

अलीकडच्या काळात राजकीय महत्वकांक्षा मनात ठेऊन काही जनपक्षाची पदे, उमेदवाऱ्या मिळवून कार्यभाग साधून निघून जात आहेत अशा पक्षाशी निष्ठा नसलेल्यांना मोठ्या पदावर घेण्याचा नवीन पायंडा काही नेत्यांकडून पाडला जात आहे. सध्या संघटनेत हि संकल्पना काही नेते राबवीत आहेत ते माझ्या सारख्या शिवसैनिकाला न पटणारे आहे. त्यामुळे आज रोजी शिवसेना पक्षातील माझ्या उपशहर प्रमुख शिवसेना, पुणे शहर पदाचा राजीनामा देत आहे. असे जाहीर करताना त्यांनी नुकत्याच पुणे शहरात नव्याने जाहीर करण्यात आलेल्या जबाबदाऱ्यांवरती ही आक्षेप घेतला आहे. गेल्या सहा महिन्यांमध्ये विभिन्न पक्षांमध्ये सक्रिय असणाऱ्या लोकांनी या पक्षात येऊन घेतलेली पदे कदाचित या नाराजीला कारणीभूत असू शकतात.

राजेश पळसकर यांनी पाठवलेले राजीनामापत्र- 

एक गणेश मंडळाचा कार्यकर्ता म्हणून समाजामध्ये काम करीत असताना वंदनीय मा. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या विचारांनी प्रेरीत होऊन सन २००२ साली कॉलेज जीवनात भारतीय विद्यार्थी सेनेचा सदस्य होऊन शिवसेना परिवारासोबत जोडलो गेलो. तेव्हापासून आजतागायत गेली २३ वर्षे पक्षाने दिलेल्या विविध जबाबदाऱ्या कोणत्याही अपेक्षा व लालसा न करता प्रामाणिकपणे पार पाडत आलो. साम दाम दंड भेद या नीतीने संघटना वाढीसाठी काम करत राहिलो.

मागून आलेले अनेक जन पक्षाच्या माध्यमातून विविध संविधानिक पदावर गेले, तरीही कोणतीही तक्रार न करता पक्षासाठी झटत राहिलो. हे करताना पक्षाच्या आंदोलनाचे अनेक गंभीर गुन्हे देखील माझ्यावर दाखल होऊन अनेकदा तुरुंगवारी देखील झाली. आजपर्यंत पक्षावर आलेल्या संकटकाळात देखील निष्ठावंत म्हणून पक्षासोबत राहिलो. परंतू अलीकडच्या काळात राजकीय महत्वकांक्षा मनात ठेऊन काही जन पक्षाची पदे, उमेदवाऱ्या मिळवून कार्यभाग साधून निघून जात आहेत अशा पक्षाशी निष्ठा नसलेल्यांना मोठ्या पदावर घेण्याचा नवीन पायंडा काही नेत्यांकडून पाडला जात आहे. सध्या संघटनेत हि संकल्पना काही नेते राबवीत आहेत ते माझ्या सारख्या शिवसैनिकाला न पटणारे आहे. त्यामुळे आज रोजी शिवसेना पक्षातील माझ्या उपशहर प्रमुख शिवसेना, पुणे शहर पदाचा राजीनामा देत आहे. तूर्तास इतकेच,

संघटनेमध्ये काम करीत असताना सर्व मान्यवर नेते, संपर्क प्रमुख, राज्यभरातील पदाधिकारी व शिवसैनिक यांचे कायमच मार्गदर्शन व सहकार्य मिळत गेले, त्यांचा मी कायमच ऋणी राहील धन्यवाद…

उद्धव ठाकरे यांना अजून एक धक्का, आदित्यंचा सगळ्यात जवळचा साथीदार पक्ष सोडणार

0

लोकसभेला जोमात असलेल्या पण विधानसभेला गाफील राहिल्याने निकाल विरोधात गेल्यापासून उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची अवस्था दिवसेंदिवस वाईट होत चाललेली आहे. भविष्यातील संधी ओळखून अनेक सहकारी त्यांची साथ सोडत आहेत. तीन टर्मचे राजापूर लांजाचे आमदार राजन साळवी यांनी दोन दिवसांपूर्वीच शिंदे गटात प्रवेश केला.

मुंबई महानगरपालिकेसह इतरही महापालिकांच्या निवडणुका तोंडावर असताना उद्धव ठाकरे यांचे थंडावलेले रुप पाहता कार्यकर्तेही चिंतेत आहेत. गद्दार पालुपदच किती दिवस म्हणायचे? अशी कुजबूजही कार्यकर्त्यांमध्ये होत आहे. विधानसभा गमावूनही पक्षनेतृत्व हवा तसा कार्यक्रम देत नाही किंबहुना पदाधिकारी कार्यकर्त्यांचे म्हणणेच ऐकून घेत नसल्याचे चित्र पाहता महत्त्वकांक्षी नेत्यांनी आपापले निर्णय घ्यायला सुरुवात केली आहे.

आदित्यंचा खांद्याला खांदा लावून काम करणारा नेता फोडला

माजी आमदार राजन साळवी यांच्या पक्षप्रवेशाच्या चर्चांचा धुरळा खाली बसतो न बसतो तोच ठाकरे गटाच्या युवासेनेचे कार्यकारिणी सदस्य रुपेश कदम यांनीही एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. रविवारी १६ फेब्रुवारी रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ते शिवसेनेचा भगवा हाती घेणार आहेत. आदित्य ठाकरे यांच्या सर्वांत जवळचे पदाधिकारी म्हणून रुपेश कदम यांची ओळख आहे. युवासेनेच्या संघटनवाढीत त्यांचे मोठे योगदान मानले जाते.

संघटना वाढीसाठी रुपेश कदम यांनी तोलामोलाची भूमिका

रुपेश कदम यांच्यासोबत महाराष्ट्रातील त्यांचे असंख्य कार्यकर्ते देखील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल होणार आहेत. आदित्य ठाकरे ज्यावेळी सरकारमध्ये काम करत होते, त्यावेळी संघटना वाढीसाठी रुपेश कदम यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडल्याचे सांगितले जाते. आदित्य ठाकरे यांचे खास आणि विश्वासू निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख होती.

दिंडोशीत सुनील प्रभू यांना तिकीट रुपेश कदम नाराज

दिंडोशी विधानसभेतून सुनील प्रभू यांना तिकीट दिल्याने रुपेश कदम नाराज होते. यंदाच्या विधानसभेला त्यांना दिंडोशी विधानसभेतून उमेदवारी हवी होती. त्यामुळे निवडणूक काळापासूनच ते पक्षावर नाराज होते. अखेर निकालाच्या दोन महिन्यांनंतर त्यांनी पुढील राजकारणाचा रस्ता साफ करून शिंदे यांच्या नेतृत्वात काम करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या शिंदे गटातील प्रवेशाने युवा शिवसैनिकांचा भरणा मोठ्या प्रमाणात पक्षात होऊ शकतो, असे सांगितले जाते.

राष्ट्रवादी माजी नगरसेवक वनराज आंदेकर हत्या 1700 पानी चार्टशीट मोठे खुलासे; यापूर्वी 3 ठिकाणी ट्रॅप कोयत्यानं शक्य नव्हतं..

0

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर पुण्यातील नाना पेठ परिसरात रात्री साडेआठच्या सुमारास गोळीबार करुन हत्या करण्यात आली होती. मागील वर्षी 1 सप्टेंबर 2024 रोजी पाच गोळ्या झाडून भर रस्त्यात हल्ला करण्यात आला होता. अशातच या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर येत आहे. पोलिसांनी 21 आरोपींवर 3400 पानांचे आरोपपत्र दाखल केलं आहे. यामध्ये अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. आरोपींनी यापूर्वी तीन ठिकाणी वनराज यांचा खून करण्यासाठी ट्रॅप लावला होता, अशी माहिती समोर आलीये.

 

कोयत्याने शक्य नसल्याने पिस्तुल आणलं

 

पोलिसांनी तपास पुर्णकरून मोक्कानुसार 3400 पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केलं. आरोपींकडून 8 पिस्तूल, 13 जिवंत काडतूसे, 7 कोयते, 7 दुचाकी 3 कार जप्त केल्या होत्या. वनराज आंदेकरचा खून करण्यासाठी अभिषेक खोंड आणि संगम वाघमारे या दोघांनी मध्य प्रदेशाच्या बॉर्डरवरून 8 पिस्तुले, 21 जिवंत काडतुसे विकत आणली होती. कोयत्याने वार करण्याचा प्लॅन तयार केला गेला होता. मात्र, कोयत्याने मारणं शक्य नसल्याने पिस्तुल आणलं अन् तयारी केली गेली. तुषार कदम, आकाश म्हस्के, अनिकेत दुधभाते आणि सागर पवार यांनी सर्व मिळून 1 लाख 60 हजार जमा केले अन् काडतुसे विकत आणली.

 

गार्डन वडापाव जवळ झाला असता गेम

 

मध्य प्रदेशातून पिस्तुल विकत आणल्यानंतर समीर काळे याने नारायणपूर जवळील माळराणावर फायरींगचा सराव केला होता. पुण्यातील बोपदेव घाटात प्लॅन रचला गेला. तीन वेळा मारण्याचे प्रयत्न फेल गेल्यानंतर चौथ्यांदा प्लॅन यशस्वी ठरला. खून करण्यासाठी दोनदा सापळा रचण्यात आला. पहिल्यांदाच, आरोपींना पवळे चौक कुंभार बावडी येथील कार्यालयाजवळ कुऱ्हाड घेऊन थांबविण्यात आले. नवरात्र उत्सव २०२३ निमित्त वनराज आंदेकर गार्डन वडापाव जवळ आरतीसाठी येणार असल्याची माहिती आरोपींना मिळाली होती.

 

कुऱ्हाडीने मारण्याचा कट फसला

 

दुसऱ्यांदा वनराज आंदेकर लग्नासाठी महर्षीनगर येथील मंगल कार्यालयात जाणार होते, परंतु वनराज आंदेकरसोबत असलेल्या त्याच्या सहकाऱ्यांच्या गर्दीमुळे हत्येचा कट फसला. वनराज आंदेकर यांना पिस्तूल आणि कुऱ्हाडीने मारण्याचा कट रचला होता. सोमनाथ गायकवाड यांच्या सांगण्यावरून 1 सप्टेंबर 2024 रोजी वनराज आंदेकर यांची हत्या करण्यात आली. आरोपी दीपक तोरमकर आणि विवेक कदम हे वनराज आंदेकरची रेकी करण्यासाठी दुचाकीवरून नाना पेठेत आले होते.

 

बियर शॉपसमोर सापळा रचला

 

वनराज आंदेकर आणि शिवम आंदेकर दोघांनाही कूल अँड कूल बियर शॉपसमोर थांबवण्यात आले. रात्री 9 वाजण्याच्या सुमारास, आरोपी तुषार कदम, आकाश म्हस्के, समीर हे काळे पिस्तूल घेऊन उभे होते. अजिंक्य सुरवसे, ओम देशखैरे, साहिल केंडले, उमेश किरवे, संगम वाघमारे, अनिकेत दुधभाते, श्री गायकवाड तसेच हातात कुऱ्हाडी घेऊन डबल आणि ट्रिपल सीट बाईकवर आलेले दोन अल्पवयीन मुलेही उपस्थित होते. वनराज आंदेकर यांच्यावर प्रथम गोळीबार करण्यात आला आणि नंतर कुऱ्हाडीने वार करून त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली. तसेच, शिवम आंदेकर याला मारण्याच्या उद्देशाने त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. परंतु शिवम आंदेकर बचावला. शिवमला गोळी लागली नव्हती, अशी माहिती समोर आली आहे.

भाजप स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढणार? गिरीश महाजनांचा मोठा खुलासा

0

येत्या काही दिवसांमध्ये राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ शकतात, असे संकेत मिळत आहेत. या पार्श्वभूमीवर आता सर्वच राजकीय पक्षांकडून तयारीला सुरुवात झाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काही पक्षांकडून स्वबळाची देखील चाचपणी होत आहे, भाजप देखील स्वबळावर निवडणूक लढू शकतो अशी चर्चा सुरू आहे. यावर आता भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

नेमकं काय म्हणाले महाजन?

स्वबळाचा नारा मी अजून दिलेला नाही, मात्र जळगाव जिल्ह्यामध्ये भाजप 50 टक्क्यांपेक्षा जास्त जागा जिंकू शकते. जळगाव जिल्हा परिषदेमध्ये 70 पेक्षा जास्त जागा भाजप जिंकेल, मित्र पक्षही आमच्यासोबत असतील. जळगाव ,धुळे, नंदुरबार, नगर, नाशिक या जिल्ह्यांमध्ये आम्हाला स्पष्ट बहुमत मिळाले आहे, असं गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे.

दरम्यान राज्यात लवकरच लव्ह जिहादविरोधी कायदा येण्याची शक्यता आहे. या कायद्याचा अभ्यास करण्यासाठी एका समितीची स्थापना करण्यात आली आहे, यावर देखील गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. लव्ह जिहाद कायदा हा लागू झालाच पाहिजे. आठ राज्यांमध्ये हा कायदा लागू आहे. त्यामुळे अतिशय महत्त्वाचं पाऊल आहे, लव्ह जिहाद कायदा महाराष्ट्रात सुद्धा लागू झाला पाहिजे या मताचा मी आहे, असं गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे.

दरम्यान शिवसेना ठाकरे गटातून शिवसेनेत आणि भाजपमध्ये जोरदार इनकमिंग सूरू आहे. अशातच शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव हे देखील नारज असल्याची माहिती समोर येत आहे. यावर देखील महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘तिकडे एकाच माणसाला संधी आहे, ते म्हणजे संजय राऊत, क्षमतेपेक्षा जास्त ते त्या ठिकाणी बोलत आहेत. क्षमता नसताना सुद्धा बडबड करत आहेत. बाकी लोकांना तिथे कुठेही स्थान नाही, अशी प्रतिक्रिया यावेळी गिरीश महाजन यांनी दिली आहे. त्यांनी पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.

पुणे महानगरपालिकेचा मोठा निर्णय, प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर बंदी; मूर्तीचे विसर्जनच फक्तं 3 ठिकाणीच बंधनकारक

0

पुणे महानगरपालिकेने प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींसंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. महानगरपालिकेने पुण्यात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती बनविणे अथवा विसर्जित करण्यावर बंदी घातली आहे. गणपती किंवा इतर कोणत्याही सणांच्या पार्श्वभूमीवर पीओपीच्या मूर्ती बनवल्यास कारवाई करण्यात येणार आहे. पुणे महापालिकेने यासंदर्भात आदेश काढले आहे.

पुणे मनपाचा काय आहे आदेश

केंद्रीय पर्यावरण वने व वातावरणीय बदल विभागाकडून यापूर्वीच प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर बंदी घालण्यात आली आहे. त्यानंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती बनवणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती करण्याऐवजी नैसर्गिक आणि पर्यावरणपूरक जैविक घटक पदार्थांपासून तयार करण्यात आलेल्या मूर्ती तयार कराव्या, असे पुणे महानगरपालिकेने म्हटले आहे. तसेच सर्व मूर्तीचे विसर्जन कृत्रिम तलावातच / रहिवासी संकुलातील टाकीमध्ये अथवा मूर्ती स्वीकृती केंद्रामध्ये करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

उच्च न्यायालयाने, केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल विभाग तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून मूर्ती बनवण्यासंदर्भात मार्गदर्शक तत्त्वे जारी केले आहेत. मूर्तीकारांनी मूर्ती रंगवण्यासाठी हळद, चंदन आणि गेरूचा वापर करण्याचे निर्देश दिले आहेत. फुले, कपडे आणि इतर पूजा साहित्य पर्यावरणपूरक असावे, असेही म्हटले आहे.

दरम्यान मूर्तीकर संघटनांनी पीओपी मूर्ती बंदीच्या निर्णयास विरोध केला आहे. यामुळे लाखो लोकांच्या रोजगारावर परिणाम होणार आहे, असे मूर्तीकर संघटनेचे पदाधिकारी हितेश जाधव यांनी सांगितले.