Home Blog Page 188

जामनेर ‘देवाभाऊ केसरी’त अमृता पुजारी विजय चौधरीचे वर्चस्व; जगभरातील 9 देशांचे नामवंत पैलवानही पराभूत

0

जळगाव : नमो कुस्ती महाकुंभ २ अंतर्गत देवाभाऊ केसरी आंतरराष्ट्रीय कुस्ती दंगलमध्ये महिला महाराष्ट्र केसरी अमृता पुजारी आणि ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरीसह सर्वच भारतीय पैलवानांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरील परदेशी पैलवानांना धूळ चारत आपले वर्चस्व दाखवून दिले.

जगभरातील 9 देशांमधून आलेल्या नामवंत पैलवानांना केले पराभूत

देवाभाऊ केसरीच्या निमित्ताने आयोजित आंतरराष्ट्रीय दंगलमध्ये महाराष्ट्र केसरी विजेत्यांनी जगभरातील 9 देशांमधून आलेल्या नामवंत पैलवानांना पराभूत करीत कुस्तीच्या मैदानी परंपरेचा अभिमान वाढवला. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेप्रमाणे कुस्तीत महिलाना समान सन्मान देताना या मैदानातील पहिली आणि शेवटची कुस्ती महिलांची लावण्यात आली. कुस्तीच्या इतिहासात प्रथमच महिला कुस्तीला हा सन्मान मिळाल्यामुळे महिला कुस्तीपटूंमध्ये आणि कुस्तीप्रेमी मध्ये आनंदाचे वातावरण दिसले.

पन्नास हजारांपेक्षा अधिक कुस्तीप्रेमींचा जनसागर

आपल्या तालुक्यात कुस्तीच्या मैदानात लढण्यासाठी आंतरराष्ट्रीय पैलवान येणार असल्यामुळे आज पन्नास हजारांपेक्षा अधिक कुस्तीप्रेमींचा जनसागर पसरला होता. महाराष्ट्र केसरी विजेत्या अमृता पुजारीने रोमानियाच्या ऑलिम्पियन कॅटालिना क्सेन्टने हिच्यावर वर्चस्व गाजवत विजय मिळविला. शेवटच्या कुस्तीमध्ये अमृताने उत्कृष्ट डावपेच आणि चपळाईने गुण मिळवत आपला पराक्रम सिद्ध केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते विश्वविजेता व ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांची कुस्तीला सलामी देण्यात आली. सर्व विजेत्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते मानाची गदा देऊन गौरविण्यात आले.

आशियाई विजेता उझबेकिस्तानच्या सुक्सरोब जॉनला चितपट

जामनेर नगरीत झालेल्या या दंगलीत विजय चौधरीने दबदबा दाखवताना आशियाई विजेता उझबेकिस्तानच्या सुक्सरोब जॉनला केवळ दोन मिनिटांत चीतपट करीत प्रेक्षकांची मने जिंकली. पहिली महिला महाराष्ट्र केसरी प्रतीक्षा बांगडीने फ्रान्सच्या वर्ल्ड चॅम्पियन अंजलीक गोन्झालेझ हिच्यावर सहज विजय मिळवला. तिच्या अचूक चालींमुळे तिने विरोधकाला गुण मिळवण्याची संधी दिली नाही. तसेच, महाराष्ट्र केसरी विजेती सोनाली मंडलिक हिने एस्टोनियाच्या मार्टा पाजूला हिला पराभूत करून प्रथम गुण घेत प्रभावी विजय मिळवला.

युरोपियन चॅम्पियन मोल्दोवाच्या घेओघे एरहाणला चितपट

महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखने युरोपियन चॅम्पियन मोल्दोवाच्या घेओघे एरहाणला चितपट करीत आपली ताकद सिद्ध केली. तसेच, महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटीलने जॉर्जियाच्या वर्ल्ड चॅम्पियन इमामुकवर विजय मिळवत भारतीय कुस्तीतील स्वतःचे स्थान भक्कम केले. उप-महाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाडने रोमानियाच्या युरोपियन चॅम्पियन फ्लोरिन ट्रिपोन याला पराभूत करत उत्कृष्ट कामगिरी बजावली. डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षेने वर्ल्ड चॅम्पियन गुलहिरमो लिमाला सहज चितपट केले. त्याच्या कुस्तीतील सफाईदार खेळाने उपस्थित प्रेक्षक भारावून गेले.

महाराष्ट्र चॅम्पियन बाळू बोडके आणि मुन्ना झुंजुर्के यांनी अनुक्रमे हरियाणाच्या राष्ट्रीय विजेत्या मनजीत मेला व दिल्लीच्या हरिओमी ट्रॅक्टर यांना पराभूत करून आपली ताकद दाखवली. महाराष्ट्राचा राष्ट्रीय विजेता शिवा चव्हाण आणि हरियाणाच्या त्रिमूर्ती केसरी रजत मंडोथी यांची कुस्ती अत्यंत चुरशीची ठरली आणि अखेरीस बरोबरीत सोडवण्यात आली. पंजाबच्या भारत केसरी भूपिंदर सिंह याने हरियाणाच्या राष्ट्रीय विजेता युधिष्ठिर दिल्ली याला चितपट करत प्रभावी विजय नोंदवला. महाराष्ट्राचा भवानी केसरी वेताळ शेळके याने दिल्लीच्या आंतरराष्ट्रीय विजेता जॉन्टी गुज्जर याचा पराभव करून प्रेक्षणीय विजय मिळवला. तसेच, महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीरने इराणच्या एशिया मेडालिस्ट जलाल म्हजोयूब याला चितपट करत जबरदस्त कौशल्य दाखवले.

या सर्व कुस्त्यासाठी पंच आणि संयोजक म्हणून हिंदकेसरी रोहित पटेल यांनी काम पाहिले. शेवटच्या ३ कुस्त्यासाठी पंच म्हणून मंत्री गिरीश महाजन यांनी काम पाहिले. ९ देशांच्या या स्पर्धेत भारत, फ्रान्स, मोल्दोवा, उझबेकिस्तान, रोमानिया, एस्टोनिया, इराण, ब्राझील आणि जॉर्जिया या देशाचे खेळाडू सहभागी झाले होते. राजू आवळे कोल्हापूर यांच्या हलगीच्या आवाजने मैदान दुमदुमले होते.

कुस्तीत महाराष्ट्राचा दबदबा – मुख्यमंत्री

“जागतिक पटलावर महाराष्ट्राच्या खेळाडूंनी आपली छाप पाडली आहे, ही अभिमानास्पद बाब आहे,” असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले. त्यांनी ऑलिम्पिक, कॉमनवेल्थ व एशियन गेम्समध्ये भारतीय खेळाडूंच्या कामगिरीचे कौतुक केले. “मागील काही काळात मॅटवरील कुस्तीला अधिक प्राधान्य मिळाले होते, मात्र आता मातीवरील कुस्तीने दमदार पुनरागमन केले आहे. कुस्तीच्या माध्यमातून भारताला पहिले ऑलिम्पिक पदक मिळवून देणारे खाशाबा जाधव होते. आज विजय चौधरी, सोनाली मंडलिक यांसारखे खेळाडू परदेशी प्रतिस्पर्ध्यांवर मात करत आहेत,” असे त्यांनी सांगितले. या स्पर्धेत नऊ देशांतील आंतरराष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू सहभागी झाल्याने ती अधिक रोमांचक ठरली. तसेच, “गिरीश महाजन यांनी विद्यापीठ स्तरावर कुस्तीमध्ये चांगली कामगिरी केली होती. आज राजकारणातही त्यांनी प्रतिस्पर्ध्यांना चित केले आहे!” असे मिश्कील टिप्पणी करत त्यांनी गिरीश महाजन यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले.

सलग ११ तास चाललेल्या या कुस्तीदंगलमध्ये आयोजन राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षाताई खडसे, खासदार स्मिताताई वाघ, माझी मंत्री आ. अनिल पाटील, आमदार सर्वश्री सुरेश भोळे ( राजूमामा ), मंगेश चव्हाण, संजय कुटे, चंद्रकांत सोनवणे, चंद्रकांत पाटील, अमोल पाटील, अमोल जावळे, अनुपभैय्या अग्रवाल, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्यासह कुस्तीगीर संघटनेचे रामदास तडस, जामनेरच्या माजी नगराध्यक्ष साधनाताई महाजन, कुस्तीगीर संघटनेचे पदाधिकारी, विविध देशांतून आलेले कुस्तीपटू आणि ५० हजारपेक्षा अधिक कुस्तीप्रेमींनी उपस्थिती लावली.

महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल.. आता तरी एकत्र या ! राज ठाकरे-उद्धव ठाकरेंना कोणी दिली साद ?

0

शिवसेनेतून राज ठाकरे जेव्हा बाहेर पडले तेव्हा मोठा भूकंप झाला होता. पक्षातून बाहेर पडल्यावर त्यांनी मनसे अर्थात महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा स्वत:चा पक्ष स्थापन केला. मात्र आजही दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं अशी अनेक मराठी माणसांची इच्छा असून त्यासाठी त्यांना वेळोवेळी साद घातली जाते. हीच भावनिक साद आता पुन्हा घालण्यात आली असून ‘ठाकरे बंधूंनी एकत्र यावं’ अशा आशयाचे बॅनर्स शिवसेना भवनासमोर लावण्यात आले आहेत. या बॅनरवर राज आणि उद्धव ठाकरे यांचा बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत असलेला एकत्रित फोटोही लावण्यात आला आहे. मराठी माणसाच्या हितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असा उल्लेखही या बॅनरवर करण्यात आला आहे. महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने या दोन्ही नेत्यांनी एकत्र यावी अशी मागणी केली जात आहे. त्यामुळे आता ठाकरे बंधूंचे पुन्हा मनोमिलन होऊन ते एकत्र येणार का हे पाहणं महत्वाचं ठरेल.

ठाकरे बंधूंना भावनिक साद

शिवसेना भवनच्या समोरच या आशयाचे बॅनर लागले आहेत. उद्धव ठाकरे,मध्यभागी बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या बाजूला राज ठाकरे या तिघांचा एकत्रित असा हा फोटो बॅनरवर लावण्यात आला आहे. ” महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला आहे. मराठी माणूस द्विधा मनस्थितीत आहे. राजसाहेब ठाकरे आणि उद्धव साहेब ठाकरे आता तरी आता तरी एकत्र या, मराठी माणूस आपली वाट पहात आहे ” अशा आशयाचे हे बॅनर सध्या लागलेले दिसत आहेत.

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे अनेकदा कौटुंबिक कार्यक्रमात एकत्र पहायाला मिळाले आहेत, त्यांनी पुन्हा एकत्र यावं अशी विधानं सामान्य माणसांपासून, अनेक कार्यकर्ते, काही नेत्यांनीही आत्तापर्यंत केली आहेत, त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. पण राज किंवा उद्धव ठाकरे , यांच्यापैकी कोणीही किंवा शिवेसना- मनसेकडून एकत्र येण्याबाबतची कोणतीही घोषणा आत्तापर्यंत करण्यात आलेली नाही. मात्र शिवसेना भवनासमोर पुन्हा लागलेल्या या बॅनरने संपूर्ण मुंबईचं नव्हे तर राज्याचं लक्ष वेधून घेतलं असून राज आणि उद्धव यांचे मनोमिलन होते का, त्यांची युती होते का याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. ते पुढे काय भूमिका मांडतात याकडेही अनेकांचं लक्ष असेल.

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात अनेक वर्षांपासून मतभेद आहेत. राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना नावाने नव्या पक्षाची स्थापना केली, त्या पक्षाला राज्यात चांगला प्रतिसाद मिळाला होता. राज ठाकरे यांचा झंझावात राज्यभरात बघायला मिळाला होता. त्यामुळे पहिल्याच विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांच्या पक्षाचे तब्बल 13 आमदार निवडून आले होते. पण नंतर गोष्टी बदलत गेल्या. असं असलं तरीही एकदा उद्धव ठाकरे यांची प्रकृती बिघडली होती तेव्हा राज ठाकरे त्यांच्या भेटीला गेले होते. उद्धव ठाकरेंना डिस्चार्ज मिळाला तेव्हा राज ठाकरे यांनी कार चालवत अनेकांचं लक्ष वेधून घेतलं होतं. पण हे दोन्ही बंधू अनेक वर्षांपासून राजकारणात एकत्र आलेले बघायला मिळाले नाहीत.

अखेर पाच-सहा वर्षांपासूनच्या मांजरांच्या त्रासातून मार्व्हल बाऊंटी रहिवाशांची सुटका; 70 मांजरांचे स्थलांतरही पूर्ण

0

हडपसर – साडेसतरानळी परिसरातील मार्व्हल बाऊंटी सोसायटीमध्ये एका महिलेने आपल्या सदनिकेत सुमारे तीनशे मांजरे पाळली होती. या मांजरांचे ओरडणे तसेच, लघवी व विष्ठेच्या दुर्गंधीने येथील रहिवासी हैराण झाले होते. दरम्यान, काल (ता. १६) पालिकेने संबंधित महिलेला नोटीस बजावल्यानंतर आज तेथून या मांजरांचे स्थलांतर करण्यात आले आहे. त्यामुळे गेली काही वर्षांपासून त्रस्त असलेल्या येथील रहिवाशांनी सुटकेचा श्वास घेतला आहे. या कारवाईमुळे रहिवाशांनी आनंद व्यक्त केला आहे.

मार्व्हल बाऊंटी सोसायटीतील नवव्या मजल्यावरील एका सदनिकेत रिंकू व त्यांची बहीण रितू भारद्वाज यांनी मांजरे पाळली होती. त्यासाठी त्यांनी दहा कामगारांची नेमणूक केली होती. ते कामगार सोसायटीच्या लिफ्ट मधून विष्ठा नेत असल्याने रहिवाशांना गेली पाच वर्षांपासून त्याचा त्रास सहन करावा लागत होता.

याबाबत सोसायटीने पालिका व पोलिसांकडे अनेकदा तक्रारही केली होती. मात्र, पालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाने तब्बल पाच वर्षांनंतर काल सदनिकेची पाहणी केली असता त्यामध्ये त्यांना सुमारे तीनशेच्यावर मांजरे आढळून आली. सदनिका उघडताच उग्र दुर्गंधीने तेही हैराण झाले. अधिकाऱ्यांनी संबंधीत महिलेला नोटीस देऊन मांजरे येथून हलविण्यास सांगितले.

दरम्यान, आज दुपारपर्यंत सुमारे सत्तर मांजरांचे स्थलांतर करण्यात आले आहे. राहिलेली मांजरेही तातडीने स्थलांतरित करावीत, अशी सूचनाही संबधीत महिलेला केली असल्याचे पालिकेच्या मुख्य पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सारिका पुंडे यांनी सांगितले.

‘आमची १४० सदनिका असलेली मोठी सोसायटी आहे. त्यातील नवव्या मजल्यावर साडेतीनशे बीएचकेच्या सदनिकेत भारद्वाज भगिनींनी मांजरे पाळली आहेत. त्यांची संख्या पन्नास-साठ असावी, असे वाटले होते. त्याबाबत पालिकेकडे तक्रारही केली होती. मात्र, काल झालेल्या पाहणीत ही संख्या तीनशेच्यावर असल्याचे समजले. सोसायटीतील नागरिकांना गेली पाच-सहा वर्षांपासून मांजरांचे ओरडणे व दुर्गंधी सहन करावी लागत आहे. पालिका अधिकाऱ्यांनी सोसायटीचा हा प्रश्न आता तडीस न्यावा.’

– कल्पेश दवे, चेअरमन, मार्व्हल बाऊंटी सोसायटी

‘जास्त प्राण्यांमुळे परिसरात आमोनिया वायूचे प्रमाण वाढते. आम्ही कारवाईसाठी गेलो तेंव्हा सोसायटीत उग्र दुर्गंधी येत होती. सदनिका उघडताच ही दुर्गंधी आणखी उग्र झाली. त्यामुळे आम्ही हैराण झालो. सर्व घरात तीनशेच्यावर मांजरे आढळली. त्यांची विष्ठा व मूत्रही दिसून आले. लहान मुले व ज्येष्ठांना श्वसनाचा आजार होण्याचा धोका आहे. ही सर्व बाब व नागरिकांच्या तक्रारीची दखल घेऊन ही कारवाई करण्यात आली आहे.’

– डॉ. ललिता गावडे – खुटाळे, पशुधनविकास अधिकारी, महापालिका, पुणे.

शिंदे-फडणवीस नाराजीचा नवा अंक?; सुरक्षाकपात केल्याने शिवसेनेचे आमदार संतापले

0

शिवसेना आमदारांच्या आणि काही नेत्यांच्या सुरक्षेमध्ये कपात केल्याची माहिती समोर आली आहे. शिवसेना शिंदे गटाच्या आमदार आणि नेत्यांना वाय दर्जाची सुरक्षा होती. पण त्यात आत कपात केल्याने आमदारांनी संताप व्यक्त केला आहे. ज्या आमदार, नेत्यांच्या जीवाला कोणताही धोका नाही अशा नेत्याची सुरक्षा कमी करण्यात आल्याची माहिती मिळत आहे, यात भाजपच्या आणि राष्ट्रवादीच्याही काही नेत्यांचाही समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील नेत्यांच्या व्हीआयपी सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला असून ज्या नेत्यांच्या जीवाला धोका नाही त्यांच्या सुरक्षेमध्ये कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामध्ये भाजप, राष्ट्रवादीसह शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांचा समावेश आहे.

या आधी शिवसेनेच्या आमदारांना वाय दर्जाची सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात येत होती. त्यामध्ये या आमदारांच्या पुढे-मागे पोलिसांच्या गाड्या असायच्या. तसेच या आमदारांच्या घराबाहेरही पोलिस सुरक्षा तैनात असायची. ही सर्व सुरक्षा आता कमी करण्यात आली आहे.

आता शिंदेंच्या आमदारांसोबत आता एकच सुरक्षा रक्षक असणार आहे. त्यामुळे याआधी सरकारी सुरक्षेचा लवाजमाी घेऊन फिरणाऱ्या आमदारांना आता केवळ एका रक्षकासह फिरावं लागणार आहे, त्यामुळे शिवसेनेच्या आमदारांनी संताप व्यक्त केला आहे.

शिवसेना फुटल्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आणि त्यानंतर त्यांनी शिवसेना आमदारांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली होती. त्यावेळी एकनाथ शिंदेंसोबत आलेल्या आमदारांना त्यावेळी वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली होती. यावरुन सरकारवर टीकाही होत होती.पण अडीच वर्षांच्या काळात ती सुरक्षा कायम ठेवण्यात आली होती. पण आता सुरक्षेत कपात करण्यात आली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र यांच्यात नाराजीचा नवा अकं सुरु होणार की काय अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

आज काँग्रेस अध्यक्षपदाचा पदभार; काँग्रेसच्या पुर्ण नियुक्तींमध्येही ‘सकपाळ’ पॅटर्नचं!; संघटनात्मक बदल होणार

0

आज काँग्रेस अध्यक्षपदाचा पदभार घेतील आता काँग्रेसच्या पुर्ण नियुक्तींमध्येही ‘सकपाळ’ पॅटर्नचं!; महाराष्ट्र काँग्रेसमध्ये आणि संघटनात्मक बदल होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. येत्या आज अध्यक्ष पदाचा पदभार घेती त्यानंतर ते आपली महाराष्ट्रातील नावी कार्यकारणी जाहीर करतील.

लोकसभेला चांगली कामगिरी करणाऱ्या काँग्रेसला विधानसभा निवडणुकीत सपाटून मार खावा लागला. यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष असलेल्या नाना पटोले यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदावरून पायउतार करण्यात येणार हे जवळपास निश्चित मानलं जात होत. त्यामुळे या प्रदेशाध्यक्ष पदासाठी अनेक दिग्गज नेत्यांची नावे समोर येत होती. मात्र या सर्व दिग्गज नावांना डावलून काँग्रेस संघटनात्मक काम करणाऱ्या एका नव्या चेहऱ्याला संधी देण्यात आली आहे.

काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी हर्षवर्धन सकपाळ यांची निवड झाल्यानंतर काँग्रेसच्या अनेक स्थानिक नेत्यांना हर्ष झाला असल्याचं पाहायला मिळत आहे. कारण ज्या प्रकारे दिग्गजांना डालून संघटनात्मक काम करणाऱ्या नेत्याची प्रदेशाध्यक्षपदी वर्णी लावण्यात आली त्याच पद्धतीने आता महाराष्ट्रातील इतर नियुक्तीच्या वेळी देखील प्रस्थापितांना डावलून नव्यांना संधी देण्यात येईल अशी, अपेक्षा करण्यात येत आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हर्षवर्धन सकपाळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष पदासाठी गेले काही दिवस अमित देशमुख, सतेज पाटील, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, विश्वजीत कदम, विजय वडेट्टीवार, ॲड. यशोमती ठाकूर, नितीन राऊत, अशा बड्या नेत्यांची नावे चर्चेत होती. मात्र या सर्वांना डावलून हर्षवर्धन सकपाळ यांची नियुक्ती झाल्यानंतर आता महाराष्ट्र काँग्रेसमध्ये आणि संघटनात्मक बदल होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. येत्या मंगळवारी अध्यक्ष पदाचा पदभार घेतील त्यानंतर ते आपली महाराष्ट्रातील नावी कार्यकारणी जाहीर करतील.

या कार्यकारणीमध्ये आपली वर्णी लागावी यासाठी अनेक दिग्गज नेत्यांनी हर्षवर्धन सकपाळ यांच्याकडे फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. हर्षवर्धन सकपाळ यांना शुभेच्छांचे फोन करून त्यांची भेटण्याची वेळ या नेत्यांकडून मागितली जात आहे. हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेऊन आपण मागील कार्यकारणीमध्ये दिलेलं पद कशाप्रकारे सांभाळलं याबाबत माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. असं असलं तरी काँग्रेसच्या तळागाळातील नेत्यांना मात्र आता हर्षवर्धन पाटील यांच्याकडून सघटनात्मक काम करणाऱ्या नव्या दमाच्या कार्यकर्त्यांना संधी दिली जाईल असा विश्वास वाटत आहे.

शहराध्यक्षासाठी देखील फिल्डिंग-

तसेच दुसरीकडे पुणे शहरात सध्या प्रभारी अध्यक्ष म्हणून अरविंद शिंदे हे काम पाहत आहेत. मात्र गेल्या काही महिन्यांपासून अरविंद शिंदे यांना बदलून नवा शहराध्यक्ष करावा यासाठी शहरातील काही नेते फिल्डिंग लावताना पाहायला मिळत आहेत. नाना पटोले प्रदेशाध्यक्ष असताना शहराध्यक्ष बदलण्याबाबत स्थानिक नेत्यांकडून मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्यात आले. मात्र नाना पटोले अरविंद शिंदे यांच्या वरच विश्वास दाखवला.

मात्र आता प्रदेशाध्यक्ष बदलाल्याने पुन्हा एकदा नव्या प्रदेशाध्यक्षाकडे शहराध्यक्ष बदलण्याबाबतची फिल्डिंग लावण्यास काँग्रेसच्या नेत्यांनी सुरुवात केली आहे. तिकडे शहराध्यक्ष बदलण्याबाबत फिल्डिंग लावण्यात येत असताना दुसरीकडे मात्र अरविंद शिंदे यांना प्रभारी शहराध्यक्ष न ठेवता पूर्णवेळ शहराध्यक्ष करावं यासाठी देखील फिल्डिंग लावण्यात येत आहे.

काँग्रेसने हर्षवर्धन सपकाळ यांना प्रदेशाध्यक्ष बनवल्यानंतर अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झाला आहे. ज्या पद्धतीने हर्षवर्धन पाटील यांची नियुक्ती करण्यात आली त्याच पद्धतीने राज्यामध्ये देखील आता हर्षवर्धन सकपाळ पॅटर्न प्रमाणेच सर्व नियुक्त्या होतील अशी अपेक्षा आता काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना वाटत आहे.

देशाच्या नव्या निवडणूक आयुक्तांच्या नावाची घोषणा, राहुल गांधी असहमत

0

देशाच्या नव्या निवडणूक आयुक्तांच्या नावाची घोषणा झाली आहे. ज्ञानेश कुमार देशाचे नवे निवडणूक आयुक्त असतील. ते राजीव कुमार यांची जागा घेतील. राजीव कुमार आज 18 फेब्रुवारीला रिटायर होत आहेत. 19 फेब्रुवारीला ज्ञानेश कुमार CEC च पद संभाळतील. या संबंधी अधिसूनचा जारी करण्यात आली आहे. राष्ट्रपतींनी मुख्य निवडणूक आयुक्तांची नियुक्ती केली आहे असं अधिसूचनेत म्हटलं आहे. ज्ञानेश कुमार यांच्याजागी आता डॉ. विवेक जोशी निवडणूक आयुक्त असतील. ज्ञानेश कुमार 1988 बॅच केरळ केडरचे IAS अधिकारी आहेत. मागच्यावर्षी मार्च पासून ते निवडणूक आयुक्ताच्या पदावर आहेत. ज्ञानेश कुमार यांची मुख्य निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती करण्यात येत असल्याची अधिसूचना काढण्यात आली आहे.

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी नव्या निवडणूक आयुक्तांच्या निवडीवर समाधानी नाहीयत. त्यांनी असहमत असल्याची नोट पाठवली आहे. सुप्रीम कोर्टात या विषयी सुनावणी सुरु असल्याने त्यांनी बैठक स्थगित करण्याची मागणी केली होती. अधिसूचना जारी होण्याआधी PMO मध्ये निवड समितीची बैठक झाली. या बैठकीला पीएम मोदी, अमित शाह आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी उपस्थित होते. मुख्य निवडणूक आयुक्ताच्या नियुक्तीसाठी मोदी सरकारने जी तत्परता दाखवली, त्यावर काँग्रेसने प्रश्न उपस्थित केलेत. सुप्रीम कोर्टात या संबंधी 19 फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने बैठक स्थगित करण्याची मागणी केली होती.

सुप्रीम कोर्टात काय विषय आहे?

काँग्रेस कार्यालयात पत्रकारांशी बोलताना पक्षाचे कोषाध्यक्ष अजय माकन, वरिष्ठ नेते अभिषेक मनु सिंघवी आणि गुरदीप सप्पल म्हणाले की, “मुख्य निवडणूक आयुक्त आणि अन्य निवडणूक आयुक्त (नियुक्ति, सेवा अटी आणि कार्यकाळ) अधिनियम 2023 ला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आलं आहे” “हा विषय सुप्रीम कोर्टात आहे. 19 फेब्रुवारीला सुनावणी आहे. त्यामुळे सरकारने बैठक स्थगित केली पाहिजे” असं सिंघवी म्हणाले. सुप्रीम कोर्टात सुनावणी प्रभावी पद्धतीने होईल, हे सुनिश्चित केलं पाहिजे असं ते म्हणाले. नव्या कायद्यानुसार पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते यांची समिती मुख्य निवडणूक आयुक्ताची निवड करते.

निवड करताना उल्लंघन काय झालय?

सुप्रीम कोर्टाने 2 मार्च 2023 रोजी एका निर्णयात म्हटलं होतं की, मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्तांच्या निवडीसाठी पंतप्रधान, लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि मुख्य न्यायाधीशांची समिती असली पाहिजे. वर्तमान समितीमध्ये या आदेशाच स्पष्टपणे उल्लंघन आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचा हवाला देताना म्हटलय की, केवळ कार्यपालिकेद्वारे नियुक्ती प्रक्रिया झाली, तर आयोग पक्षपाती आणि कार्यपालिकेची एक शाखा बनेल.

चॅम्पियन्स ट्रॉफीत टीम इंडियाच्या जर्सीवर पाकिस्तानचं नाव; चर्चा तर होणारच…

0

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 सुरू होण्यास अवघा एकच दिवस उरला असून उद्यापासून, अर्थात 19 फेब्रुवारीपासून क्रिकेटच्या रणसंग्रामाला प्रारंभ होणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळणारे सर्व, 8ही संघ हे नव्या जर्सीमध्ये दिसणार आहे. या आयसीसी स्पर्धेसाठी टीम इंडियाच्या जर्सीचा रंग आणि डिझाइनही समोर आले आहे. विशेष म्हणजे इतर संघांप्रमाणेच भारतीय संघाच्या जर्सीवरही पाकिस्तानचे नाव लिहिलेले असेल. खरंतर, ICC च्या इव्हेंटमध्ये टीम्सच्या जर्सीवर टूर्नामेंटच्या लोगोसोबतच यजमान देशाचं नावही लिहीण्यात येतं. यंदा ICC चॅम्पियन्स ट्रॉफीचं यजमानपद हे पाकिस्तानकडे आहे. त्यामुळेचे या टूर्नामेंटसाठी सज्ज असलेल्या भारतीय संघाच्या जर्सीवर पाकिस्तानचंही नाव असेल.

मात्र, भारतीय संघाची जर्सी वेगळी असू शकते, अशी अटकळ याआधी बांधली जात होती. त्यावर पाकिस्तानचे नाव लिहीण्यात आलं नसेल अशीही चर्चा होती. पण, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या जर्सीमधीलतीय खेळाडूंचे फोटोसमोर आल्यानंतर त्यावर यजमान देशाचे म्हणजेच पाकिस्तानचे नाव असेल हे ( त्या फोटोंतून) स्पष्ट झालं. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी तयार करण्यात आलेल्या जर्सीचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या खांद्यावर तिरंगा आहे. तर समोर INDIA असे मोठ्या अक्षरात लिहिलेले आहे. ही जर्सी निळ्या रंगाची आहे, जी वर्षानुवर्षे टीम इंडियाची ओळख आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या जर्सीतील टीम इंडियाचे फोटो !

टीम इंडियाच्या 15 खेळाडूंनी नवीन जर्सीमध्ये फोटोशूट केले. हे सर्व तेच खेळाडू आहेत, ज्यांची या स्पर्धेसाठी निवड झाली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या नव्या जर्सीतील टीम इंडियाच्या खेळाडूंचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

चॅम्पियन्स ट्रॉफीत भारतीय संघाचा कार्यक्रम कसा असेल ?

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 ही येत्या 19 फेब्रुवारीपासून ( बुधवार) सुरू होत आहे. आयसीसीच्या या स्पर्धेत टीम इंडिया दुसऱ्या दिवसापासून म्हणजेच 20 फेब्रुवारीपासून आपल्या मोहिमेला सुरुवात करेल. संघाचा पहिला सामना बांगलादेशविरुद्ध होणार आहे, जो दुबईतील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. यानंतर 23 फेब्रुवारीला भारत वि पाकिस्तान असा सामना रंगणार आहे. आणि 2 मार्च रोजी ग्रुप स्टेजच्या शेवटच्या मॅचमध्ये भारत विरुद्ध न्यूझीलंड असा सामना होईल.

ज्ञानेश कुमार बनले भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त, नव्या कायद्याअंतर्गत झाली नियुक्ती

0

ज्ञानेश कुमार यांची भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) म्हणून नियुक्ती झाली आहे. ते राजीव कुमार यांची जागा घेणार आहेत. नव्या कायद्यांतर्गत नियुक्त होणारे ते पहिले मुख्य निवडणूक आयुक्त ठरले आहेत. ज्ञानेश कुमार हे १९८८ बॅचचे केरळ कॅडरचे आयएएस अधिकारी आहेत. त्यांना मार्च २०२३ मध्ये निवडणूक आयुक्त म्हणून नेमण्यात आले होते. आता ते तीन सदस्यीय निवडणूक आयोगाचे नेतृत्व करणार आहेत. आयोगातील अन्य सदस्यांमध्ये उत्तराखंड कॅडरचे अधिकारी सुखबीर सिंह संधू यांचा समावेश आहे.

ज्ञानेश कुमार यांच्या कार्यकाळात २०२४ मध्ये बिहार विधानसभेची निवडणूक तसेच २०२५ मध्ये पश्चिम बंगाल, आसाम आणि तामिळनाडूमधील विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत.

संसदेने गेल्या वर्षी निवडणूक आयोगाच्या सदस्यांच्या नियुक्तीसाठी नवीन कायदा मंजूर केला होता, ज्यानुसार आता पंतप्रधान, विरोधी पक्षनेते आणि केंद्रीय मंत्री यांच्या समितीमार्फत नियुक्ती प्रक्रिया पार पडते.

आंतरराष्ट्रीय दर्जाच्या 20 शाळा उघडण्यास अदाणी समूह देणार 2000 कोटी, 30% वंचित विद्यार्थ्यांना मिळणार लाभ

0

आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळा देशभरात बनाव्यात. त्या शाळांमध्ये सर्व सामान्य मुलांना मोफत शिकता यावे या उद्देशाने अदाणी समूहाने 2000 कोटीची मदत देण्याची घोषणा केली आहे. या रक्कमेतून देशभरात 20 शाळा नव्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळा उभारल्या जाणार आहेत.जेम्स एज्युकेशन या संस्थेबरोबर हा करार करण्यात आला आहे. या शाळांमध्ये 30 टक्के जागा या दारिद्र रेषेखाली असलेल्या विद्यार्थ्यांसाठी मोफत असणार आहेत.

अदाणी समूहाचे चेअरमन गौतम अदाणी यांनी आपला छोटा मुलगा जीत अदाणी यांच्या लग्ना वेळी सामाजिक कार्यासाठी 10,000 कोटी दान करण्याची घोषणा केली होती. त्यातील 6 हजार कोटी हे रुग्णालयांसाठी तर 2 हजार कोटी हे कौशल्य विकासासाठी देण्याचे जाहीर केले. त्यानंतर 2 हजार कोटी हे आता नव्या शाळांच्या निर्माणासाठी दिले जाणार आहेत. याबाबतचा करार जेम्स एज्युकेशन या संस्थेबरोबर सोमवारी करण्यात आला.

याबाबत अदाणी समूहाच्या अदाणी फाऊंडेशनने माहिती दिली आहे. देशभरात शिक्षणाची मंदिरं उभी करण्यासाठी शिक्षण क्षेत्रातली अग्रगण्य असलेल्यी जेम्स एज्युकेशन या संस्थेबरोबर आम्ही सहकार्य करणार आहोत. यासाठी अदाणी परिवार मार्फत दोन हजार कोटीचे सुरूवातीचे योगदान देण्यात आले आहे. समाजातील सर्व वर्गातील लोकांना जागतिक दर्जाचे शिक्षण आणि त्यासाठी आवश्यक असलेल्या सोयीसुविधा मिळाव्यात ही प्राथमिकता असल्याचं स्पष्ट केलं आहे. अदाणी फाऊंडेशन देशातील 19 राज्यातील 6 हजार 769 गावात काम करत आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे सूप वाजले! ‘या’ दिवशी सादर होणार राज्याचा अर्थसंकल्प

0

३ मार्च ते २१ मार्चपर्यंत अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार आहे. राज्यपालांच्या अभिभाषणाने या अधिवेशनाची सुरुवात होईल. तर १० मार्च रोजी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार सन २०२५-२६ या वर्षाचा अर्थसंकल्प सादर करतील.दरम्यान, यावेळी कोणत्या विभागाला किती निधी मिळतो, याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे.

लाडक्या बहिणींना २१०० रुपये मिळणार?

यंदाच्या अर्थसंकल्पानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेतील पात्र महिलांना २१०० रुपये ही वाढीव रक्कम मिळणार असल्याचे सांगण्यात येत होते. दरम्यान, आता या अधिवेशनानंतर लाडक्या बहिणींना २१०० रुपये मिळतात का? याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.