Home Blog Page 187

राज्य मंत्रिमंडळ बैठकीतील 6 मोठे निर्णय; ANTF मध्ये 346 पदासांठी भरती, 6 वा वित्त आयोगही स्थापन होणार

0

राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात संपन्न झाली. आजच्या बैठकीत 6 मोठे व महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यामध्ये, सहाव्या राज्य वित्त आयोगाची स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे. तसेच, अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्ससाठी (एएनटीएफ) एकूण 346 नवीन पदे निर्माण करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे, राज्य सरकारच्या एनटीएफ फोर्समध्ये 346 पदांसाठी लवकरच जाहीरात निघू शकते. स्पर्धा परीक्षा किंवा भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी ही चांगली संधी असणार आहे. दरम्यान, छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारीत छावा सिनेमा टॅक्स फ्री करण्याची मागणी करण्यात येत होती. त्यामुळे, आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेतला जाईल, अशी शक्यता वर्तवण्यात आली. मात्र, आजच्या बैठकीत छावा सिनेमा टॅक्स फ्री करण्यासंदर्भात कुठलाही निर्णय झाल्याचे दिसून येत नाही.

आजच्या मंत्रिमंडळ निर्णय (संक्षिप्त)

1) कृष्णा-कोयना उपसा सिंचन योजनेतील म्हैसाळ उपसा सिंचन योजनेसाठी सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यास तसेच योजनेची ऊर्जा कार्यक्षमता सुधारण्यासाठी 1594.09 कोटी रुपयांना प्रशासकीय मान्यता.
या योजनेतून अवर्षण प्रवण भागात 1,08,197 हेक्टर क्षेत्राला लाभ
(जलसंपदा विभाग)

2) अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्ससाठी (एएनटीएफ) एकूण 346 नवीन पदे निर्माण करण्यास मंजुरी, यासाठी 22.37 कोटी रुपये इतका निधी खर्च करणार
(गृह विभाग)

साउथ इंडियन बँकेतर्फे मुदत ठेव गुंतवणूकीसाठी ‘एसआयबी क्विक एफडी’चा नवा पर्याय सादर

0

– यूपीआयव्दारे अन्य बँकांतील निधीचा वापर करून गुंतवणूक करता येणार    

पुणे – साउथ इंडियन बँकेने खातेदारांसाठी ‘एसआयबी क्विक एफडी’ ही नवीन ठेव योजना सादर केली आहे. बँकेच्या खातेदारांना त्यांच्या अन्य बँक खात्यांमधील निधी वापरून मुदत ठेवी (एफडी) उघडण्याची सुलभता ठेवीचा हा नवीन प्रकार प्रदान करतो. ग्राहकांना युपीआय वापरून डिजिटल पद्धतीने या एफडीमध्ये गुंतवणूक करता येत असल्याने हा ठेव प्रकार खातेदारांसाठी सुलभता त्याचबरोबर अनुकूलता वाढवतो.

ग्राहकांना सोपे, सुटसुटीत आणि कार्यक्षम डिजीटल बँकींग पर्याय प्रदान करत साउथ इंडियन बँक त्याव्दारे नवनवीन आविष्कार सादर करत आहे. तसेच ग्राहकांना अनुभवसंपन्नही बनवत आहे. एसआयबी क्विक एफडीमुळे मुदत ठेव अगदी झटपट करणे शक्य झाले असून ही प्रक्रिया अतिशय सुटसुटीत झाली आहे. वैध केवायसी असलेले ग्राहक युपीआयचा वापर करुन अगदी सहज मुदत ठेव सुरु करु शकतात. त्यामुळे पहिल्यापेक्षा ठेवींतील गुंतवणूक अधिक सुरक्षित झाली आहे.

प्रमुख वैशिष्ट्येः

  • पुर्व खातेसंबंधाची गरज नाहीः साउथ इंडियन बँकेत बचत खाते नसले तरी ग्राहक ही मुदत ठेव सुरु करु शकतो.
  • झटपट आणि कागदविरहित प्रक्रिया: संपूर्ण एफडी बुकिंग प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल आहे. त्यामुळे अवघ्या ५ मिनिटांत जलद आणि त्रासमुक्त गुंतवणूकची खात्री मिळते.
  • युपीआय वापरून एफडीमध्ये निधी जमा करा: ग्राहक आपले युपीआय वापरून त्यांच्या मुदत ठेवीमध्ये निधी जमा करू शकत असल्याने ही प्रक्रिया आणखी सुटसुटीत झाली आहे.
  • मोजक्या कागदपत्रांची गरजः फक्त पॅन आणि आधार तपशील आवश्यक असल्याने एफडी सुरु करण्याची प्रक्रिया सुलभ होते.
  • २४*७ उपलब्धता: या प्रक्रियेत लवचिकता असल्याने मुदत ठेव कधीही उघडता येतात.
  • परवडण्यायोग्य गुंतवणूकीचा प्रवेश: मुदत ठेवी अवघ्या १,००० रुपयांपासून सुरू करता येत असल्याने या ठेवी अधिकाधिक लोकांसाठी उपलब्ध झाल्या आहेत.
  • आकर्षक परतावा: स्पर्धात्मक व्याजदरांसह मुदतपूर्व पैसे काढण्याची लवचिकता.
  • सुरक्षित आणि विमा संरक्षण: मनाची शांती सुनिश्चित करण्यासाठी ५ लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींना DICGC विम्याअंतर्गत सुरक्षा कवच प्रदान करण्यात आलेले आहे.

अधिक माहितीसाठी येथे भेट द्याः https://quickfd.southindianBank.com/

‘बिल्डरने बनावट कागदपत्रे तयार करून राजकीय…’, 6500 डोंबिवलीकर बेघर होण्यावरुन राऊत संतापले

0

डोंबिवलीमधील 6500 कुटुंब बेघर होणार असल्याची माहिती समोर आली आहे. महारेराच्या माध्यमातून करण्यात सर्वात मोठा घोटाळा उघडकीस आल्यानंतर येत्या काही दिवसांत डोंबिवलीत 65 बेकायदा इमरती जमीदोस्त केल्या जाणार आहेत. या बेकायदा इमारती पाडण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले असून घरं जमीनदोस्त झाल्यानंतर इथं राहणाऱ्या 6500 कुटुंबांवर बेघर होण्याची वेळ येणार आहे. याच मुद्द्यावरुन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पक्षाने थेट भारतीय जनता पार्टी आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबरोबरच त्यांच्या खासदारपुत्रावर निशाणा साधला आहे.

वेदना सरकारला होत नाही का?

ठाकरेंच्या पक्षाचे प्रवक्ते तसेच राज्यसभा खासदार संजय राऊत यांना पत्रकारांनी डोंबिवलीमधील या बेकायदेशीर 65 इमारतींबद्दल प्रश्न विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना राऊतांनी, “प्रश्न असा आहे की सरकार काय करतं? जनतेच्या भावनेतून हे सरकार आलेलं आहे असं देवेंद्र फडणवीस सांगतात. अजित पवार सांगतात. एकनाथ शिंदे सांगतात. डोंबिवली मध्ये 62 इमारतींवर बुलडोझर चालवला किमान साडेसहा ते सात हजार कुटुंब रस्त्यावर आले याची जबाबदारी कोणत्या सरकार घेणार त्या भागाचे आमदार रवींद्र चव्हाण आहेत. बिल्डरने बनावट कागदपत्रे तयार करून राजकीय पाठबळ मिळून शासकीय यंत्रणा ताब्यात घेतली. या घरांवर नागरिकांना कर्ज मिळाले आहेत. 6500 कुटुंबं एका क्षणात रस्त्यावर येता त्याची वेदना सरकारला होत नाही का?” असा सवाल उपस्थित केला आहे.

थेट गौतम अदानींचा उल्लेख

“गौतम अदानी, त्याच्या प्रकल्पासाठी इतके मेहनत केली जाते तर या सरकारने डोंबिवलीच्या साडेसहा हजार लोकांवर मेहरबानी केली असती तरी लोक बेघर झाली नसती,” असा टोला राऊतांनी लगावला. “रवींद्र चव्हाण पळून जात आहेत लोकांना भेटी देत नाहीत हा काय प्रकार आहे?” असा सवाल राऊतांनी उपस्थित केला आहे. “तुम्ही मस्साजोग सरपंचांचा विषय घेत आहात दुसरीकडे 6000 लोकांना बुलडोझर खाली चिरडून मारलं दोन्ही ठिकाणी मृत्यूच आहे, मरण आहे,” असंही राऊत म्हणाले. तसेच पुढे बोलताना, “6 हजार 500 घराच्या प्रकरणांमध्ये कोण राजीनामा घेणार रवींद्र चव्हाण या भागामध्ये अनेक वर्ष आमदार आहेत, ते राजीनामा देणार का?” असा सवाल राऊतांनी विचारला आहे.

G-payमध्ये AI व्हॉईस कमांड ची एंट्री; आवाजाने होणार पेमेंट, कसं वापराल हे फीचर? पाहा एका क्लिकवर

0

गुगल पे वापरकर्त्यांसाठी एक मोठी खुशखबरी आहे. लवकरच, गुगल पे वापरकर्त्यांना व्हॉईस कमांड्स वापरून UPI पेमेंट्स करण्याची सुविधा मिळणार आहे. गुगलने याबाबत अधिकृतपणे घोषणा केली आहे की या नवीन AI फीचरवर सध्या काम सुरु आहे.

व्हॉईस कमांडसह UPI पेमेंट्स झाले सोपे

गुगल पे च्या लीड प्रोडक्ट मॅनेजर शरथ बुळसु यांनी सांगितले की, या नवीन फीचरमुळे डिजिटल पेमेंट्स करण्याची प्रक्रिया खूपच सोपी होईल. यामुळे, अगदी ते वापरकर्ते ज्यांना डिजिटल पेमेंट्ससाठी टायपिंगची अडचण येते, ते सहजतेने व्हॉईस कमांडसह UPI पेमेंट्स करू शकतील. तथापि, या फीचरच्या पूर्ण तपशीलांबाबत अजून काही अधिकृत माहिती मिळालेली नाही.

गुगलपे मध्ये व्हॉईस कमांड्स जोडल्यामुळे, निरक्षर व्यक्ती देखील ऑनलाइन पेमेंट्स करणे सोपे जाईल. एका रिपोर्टनुसार, वापरकर्ते फक्त बोलून पेमेंट्स करू शकतील. याशिवाय, गुगल भारत सरकारसोबत ‘भासिनी AI’ प्रकल्पावर काम करत आहे, ज्यामुळे लोकल भाषांमध्ये पेमेंट्स करणे अधिक सुलभ होईल.

सायबर फसवणूक विरोधात गुगलचा उपाय

गुगल पे सायबर फसवणुकीच्या वाढत्या धोख्यांना रोखण्यासाठी मशीन लर्निंग आणि AI तंत्रज्ञानात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहे. यामुळे, भारतातील ऑनलाइन फसवणुकीपासून वापरकर्त्यांचे संरक्षण होईल.

Googlr Pay चे भारतीय बाजारात वर्चस्व

भारतात UPI पेमेंट्सच्या बाबतीत गुगल पे आणि फोन पे हे दोन प्रमुख प्लॅटफॉर्म्स आहेत. नोव्हेंबर 2024 च्या अहवालानुसार, गूगल पे चा 37% बाजार हिस्सा आहे, तर फोनपे 47.8% बाजार हिस्सेदार आहे. हे दोन्ही प्लॅटफॉर्म मिळून भारतात 80% पेक्षा जास्त UPI मार्केटवर वर्चस्व ठेवतात. व्हॉईस फीचर लाँच झाल्यानंतर गुगलपे वापरकर्त्यांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. गुगल पे च्या या नव्या AI फीचरमुळे डिजिटल पेमेंट्स अधिक सोपे आणि सुरक्षित होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे भारतातील मोठ्या प्रमाणात लोक या सुविधेचा लाभ घेऊ शकतात.

15000 मिळवायचे असतील तर आधी ‘हे’ काम करा, अन्यथा सरकारच्या ELI योजनेचा लाभ मिळणार नाही

0

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेद्वारे चालवली जात असलेल्या एम्प्लॉयमेंट लिंक्ड इन्सेंटिव्ह योजनेचा लाभ घेण्यासाठी, युनिव्हर्सल अकाउंट नंबर सक्रिय करणे आणि बँक खाते आधारशी लिंक करणे अनिवार्य आहे. श्रम आणि रोजगार मंत्रालयानं याबाबत 2 फेब्रुवारीलाच अधिकृत परिपत्रक जारी केलं आहे. तुम्ही जर हे काम केलं नसले तर लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण करा अन्यथा, तुम्हाला एम्प्लॉयमेंट लिंक्ड इन्सेंटिव्ह या योजनेचा लाभ मिळणार नाही.

UAN म्हणजे काय?

युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) हा कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) द्वारे कर्मचाऱ्यांना प्रदान केलेला 12-अंकी क्रमांक आहे. हे कर्मचारी आणि नियोक्ता दोघांसाठीही महत्त्वाचे आहे. कारण त्याच्या मदतीने कर्मचारी त्याच्या EPF खात्याची माहिती मिळवू शकतो आणि ते सुरक्षित ठेवू शकतो. UAN च्या मदतीने कर्मचारी त्यांची PF शिल्लक ऑनलाइन तपासू शकतात. PF ट्रान्सफर करु शकतात आणि त्यातून पैसेही काढू शकतात.

एम्प्लॉयमेंट लिंक्ड इन्सेंटिव्ह (ELI) स्कीम म्हणजे काय?

केंद्र सरकारने सुरू केलेल्या एम्प्लॉयमेंट लिंक्ड इन्सेंटिव्ह (ELI) योजनेचा उद्देश नवीन कर्मचाऱ्यांना आर्थिक सहाय्य देणे हा आहे. या अंतर्गत पहिल्यांदाच नोकरी मिळवणाऱ्या कर्मचाऱ्यांना थेट लाभ हस्तांतरण (DBT) द्वारे एक महिन्याच्या पगाराच्या रुपात सरकारकडून आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम कमाल 15000 रुपयांपर्यंत असू शकते आणि ती तीन हप्त्यांमध्ये दिली जाते.

ELI योजनेच्या अटी काय?

कर्मचाऱ्यांचे मासिक वेतन 1 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.
कर्मचाऱ्यांचा UAN क्रमांक सक्रिय असावा.
कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात आधार लिंक असणे आवश्यक आहे.
सरकारने दिलेली ही मदतीची रक्कम थेट कर्मचाऱ्याच्या बँक खात्यात पाठवली जाते.

तुम्ही UAN कसे सक्रिय करु शकता?

1) EPFO ​​च्या अधिकृत वेबसाइटवर जा [unifiedportal-mem.epfindia.gov.in](https://unifiedportal-mem.epfindia.gov.in).

2) महत्त्वाच्या लिंक्स विभागात जा आणि UAN सक्रिय करा वर क्लिक करा.

3) आता तुमचा UAN नंबर, आधार क्रमांक, नाव, जन्मतारीख, आधारशी लिंक केलेला मोबाईल नंबर आणि कॅप्चा कोड टाका

4) माहिती भरल्यानंतर, घोषणा बॉक्स तपासा आणि “ऑथोरायझेशन पिन मिळवा” बटणावर क्लिक करा

5) तुमच्या आधारशी लिंक केलेल्या मोबाईल नंबरवर OTP येईल, तो एंटर करा आणि सबमिट करा.

6) UAN सक्रिय झाल्यानंतर, EPFO ​​कडून तुमच्या मोबाईल नंबरवर पासवर्ड पाठवला जाईल.

7) आता UAN नंबर आणि पासवर्डच्या मदतीने लॉग इन करा.

8) लॉग इन केल्यानंतर, तुम्ही तुमचा पासवर्ड बदलू शकता.

राज्यात उन्हाचा चटका, किती दिवस असणार वाढलेले तापमान, हवामान तज्ज्ञाने दिले तापमान वाढीचे कारण?

0

राज्यातील तापमानात अचानक बदल झाला आहे. दोन दिवसांपासून तापमान वाढले आहे. त्यामुळे उन्हाचा चटका जाणवू लागला आहे. अचानक तापमान वाढल्यामुळे दुपारी अंगाची लाहीलाही होत आहे. राज्यातील कमाल तापमााचा पारा 36 अंश सेल्सियसपर्यंत गेले आहे. अजून दोन दिवस राज्यात वाढलेले तापमान कायम असणार आहे. पुणे येथील हवामान विभाग तज्ज्ञ सुदीप कुमार यांना अचानक वाढलेल्या तापमान वाढीचे कारण दिले आहे.

का झाली तापमान वाढ?
हवामान विभाग तज्ज्ञ सुदीप कुमार यांनी सांगितले की, राज्यात पुढील दोन दिवस 34 ते 35 अंश सेल्सिअस तापमान असणार आहे. तापमानातील ही वाढ उत्तर भारतामध्ये झालेल्या हवामान बदलामुळे झाली आहे. अजून दोन दिवस उन्हाचा तडाखा राज्यात राहणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. साधारणपणे एक ते दोन सेल्सियसने कमाल आणि किमान तापमानात वाढ होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाचा आहे.

दिवसा कडक ऊन, रात्री थंड
राज्यात सध्या दिवसा कडक ऊन जाणवत आहे. तसेच रात्रीच्या वेळी थंडी वाढत आहे. त्यामुळे विचित्र वातावरणाचा सामाना नागरिकांना करावा लागत आहे. साधारणपणे मार्च महिन्यात होळीनंतर तापमान वाढ होत असते. परंतु यंदा फेब्रुवारीच्या मध्यामध्ये वाढलेले तापमान हे उत्तर भारतातील झालेल्या हवामान बदलामुळे आहे. हे वाढलेले तापमान साधारण दोन-तीन दिवस असणारा आहे. गेल्या २४ तासांत सोलापूरसोबत, सांगली, परभणी, विदर्भातील ब्रह्मपुरी, अकोला, नागपूर, चंद्रपूर, वर्धा या भागातील तापमान ३६ अंशावर गेले.

पुण्यात तापमान वाढले
पुणे शहरातील कोरेगाव पार्कमध्ये यंदाच्या हंगामातील सर्वोच्च तापमानाची नोंदवण्यात आले. 17 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 ते 5 पर्यंत पुण्यात कडक ऊन होते. त्यावेळी कोरेगाव पार्क 38.3 अंश सेल्सियस तापमान नोंदवण्यात आले. यामुळे पुणेकरांना चांगलाच उन्हाचा चटका जाणवत होता. तापमान वाढीमुळे ठिकठिकाणी रुमाल, टोप्यांची दुकाने दिसू लागली आहे.

हमासचा नवीन चीफ रस्त्यावर उतरताच इस्रायलने फक्त 3 सेकंदात खेळ संपवला, काय केलं?

0

दक्षिण लेबनानच्या रस्त्यावर सोमवारी हमास चीफ खुलेआम, बिनधास्त फिरत होता. या दरम्यान एका इस्रायली ड्रोनने हमास चीफ मोहम्मद शाहीनच अवघ्या तीन सेकंदात काम तमाम केलं. युद्धविराम करारातंर्गत इस्रायलला दक्षिण लेबनानमधून पूर्णपणे मागे हटायचं होतं, त्यावेळी हा हल्ला झाला. इस्रायल आणि हिज्बुल्लाहमध्ये 14 महिने चाललेल युद्ध संपवण्यासाठी हा करार करण्यात आला होता. इस्रायली सैन्याने लेबनानमध्ये हमासच्या ऑपरेशन्सचा प्रमुख मोहम्मद शाहीनला संपवलं. अलीकडे लेबनानी क्षेत्रातून इस्रायली नागरिकांवर हल्ले झाले, त्यामागे मोहम्मद शाहीनचा हात असल्याचा आरोप इस्रायलने केला. मोहम्मद शाहीनने केलेल्या हल्ल्यांना इराणच समर्थन होतं, असा दावा इस्रायली सैन्याने केला. हमासने शाहीनच्या मृत्यूची पुष्टी करताना त्याला एक सैन्य कमांडर ठरवलं.

हल्ल्यानंतर समोर आलेल्या फुटेजमध्ये एका कारला आगीच्या ज्वाळांनी वेढलेलं. इस्रायलला जानेवारी अखेरपर्यंत दक्षिण लेबनानमधून पूर्णपणे मागे हटायचं होतं. पण ही मर्यादा 18 फेब्रुवारीपर्यंत वाढवण्यात आली. इस्रायली सैन्य मंगळवारपर्यंत पूर्णपणे मागे हटणार की, नाही? ते स्पष्ट नाहीय. युद्धविराम असूनही इस्रायल दक्षिण आणि पूर्व लेबनानमध्ये हल्ले करत आहे. जिथे मिसाइल आणि अन्य सैन्य उपकरण आहेत तसच दहशतवादी लपलेल्या ठिकाणांना आम्ही लक्ष्य करतोय असं इस्रायलच म्हणणं आहे.

कुठे इस्रायली सैन्य कायम राहणार?

दुसऱ्याबाजूला लेबनानचा आरोप आहे की, इस्रायलला जाणूनबुजून त्यांची भूमी आपल्या ताब्यात ठेवायची आहे. म्हणून ते सैन्य माघारीला वेळ लावत आहेत. मंगळवारची मुदत संपल्यानंतरही इस्रायली सैन्य दक्षिण लेबनानमध्ये पाच रणनितीक ठिकाणी कायम राहिल, असं एका इस्रायली अधिकाऱ्याने सांगितलं. नोव्हेंबरमध्ये युद्धविरामाचा करार झाला. त्या अंतर्गत इस्रायली सैन्य माघारी फिरणार होतं. लेबनानच्या सरकारने इस्रायली सैन्य माघारीला होणाऱ्या विलंबाला कडाडून विरोध केला आहे.

की या क्षेत्रात नवीन संघर्ष होणार

या घटनेनंतर इस्रायल आणि लेबनानमध्ये तणाव वाढू शकतो. लेबनानने आधीच संयुक्त राष्ट्राकडे हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. आमच्या सुरक्षेला प्राधान्य देत आम्ही आवश्यक पावलं उचलत राहणार असं इस्रायलने म्हटलं आहे. इस्रायल ठरलेल्या मुदतीत सैन्याला माघारी बोलावणार का? की या क्षेत्रात संघर्षाची नवीन स्थिती उदभवणार

‘मातोश्री’वर असं दृश्य कधीच दिसलं नव्हतं, पक्ष सोडताच थेट…; जितेंद्र जनावळेंची ती कृती चर्चेत, VIDEO

0

सध्या ठाकरे गटातून अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या वाटेवर आहेत. मुंबईतून विलेपार्ल्याचे उपविभागप्रमुख जितेंद्र जनावळे हे येत्या 20 फेब्रुवारीला शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्यांच्या प्रवेशाची बातमी येताच आता ठाकरे गट सक्रीय झाला आहे. जनावळे यांना मातोश्रीवर भेटण्यासाठी बोलावलं. उद्धव ठाकरे यांच्याकडे अनिल परब यांची तक्रार करणार असल्याच जनावळे यांनी सांगितलं. “विलेपार्ले विधानसभेबाबत निर्णय घेणारे अनिल परब, संजय राऊत कोण?” असा सवाल त्यांनी केला. त्यांनी ठाकरे गटाच्या विलेपार्ले उपविभागप्रमुख पदाचा राजीनामा दिला.

“संजय राऊत आणि अनिल परब हे विलेपार्लेबाबत निर्णय घेणारे कोण? माझ्या शिवसेनाप्रमुखांची विलेपार्ले विधानसभा यांनी आम आदमी पार्टीला दिली. त्यावेळी आम्ही उद्धव ठाकरेंना भेटून ठामपणे सांगितलं झाडूचा प्रचार करायला आमचा विरोध आहे. मशालकडे ही विधानसभा घ्या. लढून जिंकायच आहे” असं जितेंद्र जनावळे म्हणाले.

मनातली खदखद बाहेर काढताना काय म्हणाले?

“मला विलेपार्ले लढवायची आहे. मला तो वॉर्ड भाजपकडून काढून शिवसेनेला द्यायचा आहे. ही माझी तडफ होती. पण माझी तडफ लक्षात घेतली नाही. सहावर्ष मला त्या विधानसभेतून काढून बाहेर ठेवलं. तुमचे मनसुबे काय? शिवसेनेला जिंकवायच की, भाजपला? याचा विचार झाला पाहिजे” असं जितेंद्र जनावळे म्हणाले. मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी आलेले असताना त्यांनी मनातली ही खदखद बोलून दाखवली. ठाकरे गटातून अनेक कार्यकर्ते एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करत आहेत.

मातोश्रीसमोर का डोकं टेकलं?

उद्धव ठाकरेंना भेटून बाहेर आल्यानंतर त्यांनी मातोश्रीसमोर डोकं टेकवून नमस्कार केला. या बद्दल जनावळे यांना विचारलं असता ते म्हणाले की, “मंदिर आहे, मंदिरात जाताना आणि मंदिरातून येताना मंदिराच्या उंबरठ्यावर माणूस झुकतो. आज मी त्या ठिकाणी पाया पडलो. आता हे काय समजायचय ते समजून जा. साहेबांच्या बोलण्यातून विभागाच्या बाबतीत काही निर्णय होईल तसं दिसत नाही. साहेब काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत आहेत असं वाटत नाही”

युपीमधील जमिनीच्या वादाचा मुंबईत घेतला बदला! प्रेमाचं नाटक, भेट अन् लोखंडी रॉड व दगडाने ठेचून केला शेवट

0

जमिनीच्या वादातून एकाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्याची निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना मुंबईत समोर आली आहे. उत्तर प्रदेश येथील कौटुंबिक जमिनीच्या वादातून झालेल्या भांडणाचा राग मनात धरून जोगेश्वरी मुंबई येथील ओला चालक अक्रम कुरेशी वय 22 वर्ष याचे प्रेमिकेकडून फसवून भिवंडी येथे भेटण्यास बोलावून दबा धरून बसलेल्या आरोपींनी तरुणाची निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी तरुणीसह पाच जणांना भिवंडी तालुका ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे.

नेमकं प्रकरण काय?

या घटनेप्रकरणी पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भिवंडी पोलीस ठाणे हद्दीत मौजे पोगाव गावाजवळ, तानसा पाईप लाईन शेजारील रस्त्यावर 17 जानेवारी रोजी अक्रम इकबालुद्दीन कुरेशी वय 22 वर्ष रा. जोगेश्वरी, मुंबई या ओला चालकाची गाडी भाडे घेऊन आले असता अज्ञाताने लोखंडी रॉड व दगडाने ठेचून त्याची निर्घृणपणे हत्या केल्याची घटना समोर आली होती. याप्रकरणी अज्ञाता विरोधात भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सीसीटीव्ही फुटेज तपासले अन्…

घटनेचे गांभीर्य लक्षात घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादासो एडके यांनी दोन स्वतंत्र पथक तयार करून गुन्ह्याचा तपास सुरू केला. घटनास्थळा जवळील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यामध्ये मृत तरूण हा एका महिलेसोबत येत असताना दिसून आला. पोलिसांनी मोबाईलच्या तांत्रिक तपासावरून संशयित महिला जस्सी तिवारी हिला ताब्यात घेऊन तिच्याकडे कसून चौकशी केली असता या हत्येच्या गुन्ह्याची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे.

भांडणाचा राग मनात धरून त्याला मारण्याचा कट

महिलेकडे केलेल्या तपासात मोहमंद कैफ मोहंमद रफिक कुरेशी, वय 22 वर्षे, इसामुद्दीन रियाजुद्दिन कुरेशी, वय 35 वर्षे, सलमान मो. शफिक खान,वय 32 वर्षे,सुहेल अहमद कुरेशी, वय 28 वर्षे, सर्व रा. मौजे हैदरपुर, जि. प्रतापगढ,उत्तर प्रदेश येथून पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. पोलिसांच्या चौकशीत हत्या झालेल्या युवक अक्रम कुरेशी याचे आरोपींसोबत प्रतापगड उत्तर प्रदेश येथील जमिनीच्या वादातून जुलै 2022 मध्ये झालेल्या भांडणाचा राग मनात धरून त्याला मारण्याचा कट रचण्यात आला होता.

प्रेमाच्या नाटक, त्यानंतर त्याला भेटण्यासाठी बोलावलं..

त्यामध्ये आरोपींनी पूर्वनियोजित कट रचून आरोपी मोहम्मद कैफ याने आपली प्रेयसी असलेल्या जस्सी तिवारी हिची मदत घेतली. तिने मयत अक्रम कुरेशी यास प्रेमाच्या नाटक केले त्यानंतर त्याला भेटण्यासाठी भिवंडी येथे बोलावून हत्या करण्याच्या नियोजित स्थळी ती त्याच्या सोबतकारमध्ये बसून गेली. त्याठिकाणी आधीच उपस्थित असलेल्या चौघा जणांनी अक्रम याच्यावर लोखंडी रॉड व दगडाने हल्ला चढवत त्याची निर्घृणपणे हत्या केली. कोणतेही धागेदोरे नसताना पोलिसांनी मोठ्या कौशल्याने या गुन्ह्याचा तपास करीत या पाचही जणांना बेड्या ठोकल्या आहेत. या संपूर्ण घटनचा तपास सध्या भिवंडी तालुका ग्रामीण पोलीस करीत आहे. दरम्यान मयत अक्रमच्या कुटुंबियांनी हत्या करणाऱ्या आरोपींना कठोर शासन करण्याची मागणी केली आहे.

कराचीच्या नॅशनल स्टेडियममध्ये भारताचा ध्वज का लावण्यात आला नाही? PCB ने दिले उत्तर

0

आसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या रूपाने पाकिस्तान 24 वर्षांत प्रथमच मोठ्या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करत आहे. 19 फेब्रुवारीपासून ही स्पर्धा सुरू होत आहे. पाकिस्तानमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सातत्याने काही वाद निर्माण होताना दिसत आहे. आता ताजा वाद भारताच्या झेंड्यावरून झाला आहे. या स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या देशांचे झेंडे कराचीच्या नॅशनल स्टेडियमवर लावण्यात आले आहेत. मात्र त्यात भारताचा ध्वज नाहीये. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि चाहत्यांनी त्यावर संताप व्यक्त केला. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पाकिस्तानला स्पष्टीकरण देण्यासाठी पुढे यावे लागले आहे.

काय म्हणाले पाकिस्तानी क्रिकेट बोर्ड?

पाकिस्तानने आपल्या स्टेडियममध्ये भारतीय ध्वज फडकावण्यास नकार दिल्यावर चाहत्यांकडून सोशल मीडियावर प्रचंड टीका झाली. हे प्रकरण तापल्यावर आता पीसीबीने आता प्रतिक्रिया दिली आहे. पाकिस्तानी क्रिकेट बोर्डने (PBC) यावर उत्तर देत सांगितले आहे की, आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी केवळ पाकिस्तानमध्ये खेळणाऱ्याच देशांचे झेंडे स्टेडियममध्ये फडकवले गेले आहेत.

पीसीबीच्या एका सूत्राने आयएएनएस या वृत्तसंस्थेला सांगितले की, “तुम्हाला माहिती आहे की, आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 दरम्यान भारत आपले सामने खेळण्यासाठी पाकिस्तानमध्ये येणार नाही. कराचीच्या नॅशनल स्टेडियम, रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम आणि लाहोरच्या गद्दाफी स्टेडियममध्ये ज्या देशांचे झेंडे फडकवले गेले आहेत जे तिथे खेळायला येणार आहेत.” भारत दुबईमध्ये हायब्रीड मॉडेलमध्ये खेळणार आहे.

बघा व्हायरल व्हिडीओ

‘या’ देशांचे सामने होणार कराचीमध्ये

कराची स्टेडियमवर न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि इंग्लंड संघांचे सामने होणार आहेत.

बीसीसीआय, पीसीबी आणि आयसीसी यांच्यात करार

भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी पाकिस्तानला जाण्यास नकार दिला होता. यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला (ICC) स्पर्धा हायब्रीड मोडमध्ये बदलावी लागली. BCCI, PCB आणि ICC यांच्यात एक करार झाला, ज्या अंतर्गत पाकिस्तान क्रिकेट संघ येत्या काही वर्षात भारत-यजमान आयसीसी स्पर्धांमध्ये आपले सामने खेळणार नाही.