Home Blog Page 175

एकनाथ शिंदेंकडून नीलम गोऱ्हेंची पाठराखण, “त्या काहीही खोटं बोलल्या नाहीत त्या फक्तं जागा चुकल्या

0

दिल्लीतील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील एका चर्चासत्रात शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या डॉ.नीलम गोऱ्हे यांनी ठाकरे गटावर टीका केली होती. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळायचं, असा खळबळजनक आरोप डॉ.नीलम गोऱ्हे यांनी केला. या आरोपानंतर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी नीलम गोऱ्हे यांना अब्रू नुकसानीची कायदेशीर नोटीस बजावली आहे. यानंतर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

एकनाथ शिंदे यांनी नुकतंच मुंबईतील एका कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी त्यांनी जोरदार भाषण केले. या भाषणादरम्यान त्यांनी नीलम गोऱ्हे यांची पाठराखण केली. त्यासोबतच त्यांनी ठाकरे गटाला टोला लगावला. “नीलम गोऱ्हेंनी त्यांचे काळे धंदे बाहेर काढेल, त्यामुळे त्यांना मिरची लागली”, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

“हा एकनाथ शिंदे त्यांना पुरुन उरला होता”

“नीलम गोऱ्हे हे दिल्लीच्या व्यासपीठांवरुन एक वाक्य बोलल्या आता ते व्यासपीठ बरोबर होतं की चुकीचं होतं हा भाग वेगळा. परंतु ते काही जणांना एवढं झोंबलं की मिरच्या लागल्या. हा एकनाथ शिंदे त्यांना पुरुन उरला होता. गोऱ्हेंनी त्यांचे काळे धंदे बाहेर काढेल, त्यामुळे त्यांना मिरची लागली. नीलम गोऱ्हेंच्या आधीही अनेक लोक हे बोलले आहेत”, असे एकनाथ शिंदेंनी म्हटले.

“त्यांचं पोट दुखत आहे”

“जेव्हा आम्ही उठाव केला, तेव्हाला रोज आम्हाला शिव्याशाप दिले. मी कधीही आरोपाला उत्तर दिलं नाही. मी कामातून उत्तर दिले. त्यामुळे महायुती सरकार लोकप्रिय ठरलं. जेव्हापासून यांची खुर्ची गेली, तेव्हापासून यांना मिरची लागली आहे. त्यांचं पोट दुखत आहे”, असा टोला एकनाथ शिंदेंनी लगावला.

“काहीही खोटं बोलल्या नाहीत”

“त्यांना खोके नाही कंटेनर लागतात, असे राज ठाकरे बोलले होते. नारायण राणे, रामदास कदम, नितेश राणे असे अनेकजण बोललेत. हे काही नवीन नाही. पण नीलम ताई बोलल्यानंतर त्यांच्या मागे इतके लागले, त्यांना इतक्या मिरच्या लागल्या, पण नीलम ताईंवर इतक्या खालच्या दर्जावर जाऊन बोलणं, आरोप करणं त्यांना शोभत नाही. त्या खरं बोलल्या. काहीही खोटं बोलल्या नाहीत. आम्ही देना बँक आहोत आणि समोर लेना बँक आहेत, म्हणून ते जे बोलल्या ते कटू सत्य आहे”, असेही एकनाथ शिंदे म्हणाले.

“तेव्हा नीलम ताई चांगल्या होत्या”

“नीलम गोऱ्हे या महिलेंवर अत्याचार झाला किंवा इतर काहीही झालं तर त्या पहिल्या धावून जायच्या, तेव्हा नीलम ताई चांगल्या होत्या. आताही शक्ती विधेयकात त्यांचे मोठं योगदान आहे. महिला सक्षमीकरणासाठी त्या काम करतात. हीच पोटदु:खी आहे. ती पोट:दुखी थांबत नाही, कारण ते डॉक्टरकडून औषध घेत नाहीत, कंपांऊडरकडून औषध घेतात”, असा टोलाही शिंदेंनी लगावला.

‘छावा’ पाहिल्यानंतर विश्वास नांगरे पाटील यांची मनाला भिडणारी पोस्ट; ‘हाथी घोडे, तोफ तलवारे..’

0

सध्या सोशल मीडियावर आणि थिएटरमध्ये लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ याच चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्यगाथेवर आधारित या चित्रपटात विकी कौशल, रश्मिका मंदाना आणि अक्षय खन्ना यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. हा चित्रपट पाहिल्यानंतर सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकजण सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त करत आहेत. आता आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांनीसुद्धा ‘छावा’ पाहिल्यानंतर पोस्ट लिहिली आहे. छत्रपती संभाजी महाराजांकडून आपण काय शिकावं, याबद्दलही त्यांनी लिहिलंय.

विश्वास नांगरे पाटील यांची पोस्ट-

‘छावा.. जिंदा रहे. काळजाला चिरत जातात या काव्यपंक्ती, ज्यावेळी छत्रपती संभाजी महाराजांच्या डोळ्यांत धगधगत्या सळ्या खुपसल्या जातात, त्यांची जीभ खेचून काढली जाते. सळसळतात धमन्या, ज्यावेळी त्यांच्या जखमांवर मीठ चोळले जाते. ‘मन के जीते जीत, मन के हारे हार , हार गये जो बिनलढे,उनपर हैं धिक्कार’.. केवढी उमेद केवढी प्रेरणा देणारे हे शब्द. स्वतःला मैदानात भिडायची, लढायची आणि शेवटच्या श्वासापर्यंत झुंझायची ऊर्जा देतात.

‘हाथी घोडे, तोफ तलवारे, फौज तो ‘तेरी सारी हैं पर जंजिरोंमे जकडा हुआ मेरा राजा अब भी सब पे भारी हैं! छत्रपती संभाजी महाराज हे एक गारूड आहे. मराठी माणसाच्या स्वभिमानाचे, स्फुल्लिंगाच प्रतीक आहे, स्वराज्याच्या स्वप्नाचे जिवंत, मूर्तिमंत द्योतक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे प्रौढ, प्रताप, पुरंदर स्वरूप आहे. असा पराक्रमी, शूर आणि चतुरस्त्र भूप होणे नाही. प्रभु शंभूराजे, शतशः नमन तुम्हाला. काय घ्यावं आम्ही

मावळ्यांनी तुमच्या धगधगत्या आयुष्यातून?’

‘आम्ही घ्यावा निर्भयपणा, आम्ही सोडावी लाचारी आणि गुलामगिरी, विचारांची आणि कृतींची. आम्ही सोडावं स्वार्थी आणि घुस्मटलेलं जगणं, घ्यावी कणभर तरी आपल्याकडून जिद्द, करारी बाणा आणि महाराष्ट्र धर्म! समतेचा, नीतिमत्तेचा शिकावा धडा. राहावा मनोमनी चिंतावा क्षणोक्षणी, शेर शिवराज आणि त्यांचा छावा! जगदंब जगदंब!,’ अशी पोस्ट त्यांनी लिहिली आहे.

‘छावा’ हा चित्रपट 14 फेब्रुवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. आतापर्यंत या चित्रपटाने 417.20 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. या चित्रपटातील प्रत्येक भूमिकेनं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. विकी कौशलने साकारलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेचं विशेष कौतुक होत आहे.

महाराष्ट्र सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये, स्कूल बसेससाठी पुढच्या वर्षीपासून नवे नियम; नियम लागू करण्यामागील कारणे वाचा 

0

महाराष्ट्र परिवहन विभाग पुढील शैक्षणिक वर्षापासून खाजगी स्कूल बसेससाठी नवीन नियम लागू करणार आहे.प्रत्येक स्कूल बसमध्ये पॅनिक बटन, अग्निशमन स्प्रिंकलर, जीपीएस ट्रॅकिंग सिस्टम आणि सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे बंधनकारक असेल. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी या सर्व सुरक्षा यंत्रणांचा योग्य प्रकारे वापर सुनिश्चित केला जाणार आहे. पालकांकडून वाहतूक शुल्क आकारणाऱ्या शाळा किंवा खाजगी बस ऑपरेटरकडे केंद्रीकृत सीसीटीव्ही देखरेख प्रणाली असणे गरजेचे असेल. या नियमांचे पालन न करणाऱ्या स्कूल बसेसवर कठोर कारवाई केली जाणार आहे.

राज्यातील विविध शाळा आणि खाजगी बस ऑपरेटरद्वारे चालवल्या जाणाऱ्या स्कूल बसेसच्या कार्यपद्धतीबाबत पालकांकडून मोठ्या संख्येने तक्रारी आल्याने महाराष्ट्र परिवहन विभागाने या समस्येवर तोडगा काढण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत, पुढील शैक्षणिक वर्षापासून स्कूल बसेससाठी नवीन नियम लागू करण्यात येणार आहेत.

नवीन नियम लागू करण्यामागील कारणे :

पालकांकडून वारंवार बस सेवेसंबंधी गैरव्यवस्थापन, सुरक्षा उणिवा आणि अपघाताच्या घटनांबाबत तक्रारी प्राप्त झाल्यात. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी स्कूल बसेसच्या व्यवस्थापनात अधिक पारदर्शकता आणि जबाबदारी आणणे आवश्यक असल्याचे लक्षात आले. खासगी बस ऑपरेटर आणि शाळांकडून वाहतूक शुल्क घेतले जात असतानाही सुरक्षा उपायांमध्ये हलगर्जीपणा होत असल्याच्या तक्रारी होत्या.

वाहतूक मंत्री प्रताप सरनाईक यांचे मत :

वाहतूक मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, “विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या खासगी स्कूल बसेससाठी नवीन नियमावली तयार केली जाईल. तसेच, पालकांकडून वाहतूक शुल्क आकारणाऱ्या संस्था किंवा स्कूल बस ऑपरेटरनी बसेसचे केंद्रीकृत सीसीटीव्ही निरीक्षण अनिवार्यपणे करावे.” असे ते म्हणाले.

नवीन नियमांत काय असेल?

1. सुरक्षा यंत्रणा : प्रत्येक स्कूल बसमध्ये खालील सुविधा असणे अनिवार्य असेल :

पॅनिक बटन – आपत्कालीन परिस्थितीत त्वरित मदतीसाठी.

अग्निशमन स्प्रिंकलर – आग लागल्यास त्वरित नियंत्रणासाठी.

जीपीएस ट्रॅकिंग सिस्टम – बसचे थेट लोकेशन पाहण्यासाठी.

सीसीटीव्ही कॅमेरे – विद्यार्थी आणि बस स्टाफच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी.

2. केंद्रीकृत सीसीटीव्ही निरीक्षण प्रणाली :

ज्या शाळा किंवा बस ऑपरेटर पालकांकडून वाहतूक शुल्क आकारतात, त्यांच्यासाठी ही प्रणाली बंधनकारक असेल. या प्रणालीद्वारे बसच्या हालचाली आणि आतील घडामोडींवर सतत देखरेख ठेवली जाईल.

3. नियमांचे पालन न केल्यास कारवाई :

या सुरक्षा नियमांचे पालन न करणाऱ्या स्कूल बसेसवर कठोर कारवाई केली जाणार आहे. नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधित बस ऑपरेटरचा परवाना रद्द केला जाण्याची शक्यता आहे.

नियमावली तयार करण्यासाठी समितीची स्थापना :

निवृत्त वाहतूक अधिकारी जितेंद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीला एका महिन्यात अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. समिती स्कूल बस व्यवस्थापनातील तांत्रिक सुधारणा, सुरक्षितता उपाय आणि अंमलबजावणी यासंबंधी शिफारशी करेल. या शिफारशींवर आधारित अंतिम नियम निश्चित केले जातील.

या निर्णयाचे उद्दिष्ट:

स्कूलबस ऑपरेशन्समध्ये अधिक जबाबदारी आणणे.

विद्यार्थ्यांसाठी प्रवास अधिक सुरक्षित आणि निर्भय बनवणे.

पालकांच्या तक्रारींना योग्य उत्तर देत सुरक्षा उपायांची काटेकोर अंमलबजावणी करणे.

अंमलबजावणी कधी होईल?

समितीचा अहवाल सादर झाल्यानंतर परिवहन विभाग त्याचा आढावा घेईल.

अंतिम नियमावली तयार केल्यानंतर ती अधिकृतरीत्या जाहीर केली जाईल.

येत्या शैक्षणिक वर्षापासून हे सर्व नियम अनिवार्य होतील.

विद्यार्थ्यांची सुरक्षितता ही शाळा व्यवस्थापन, बस ऑपरेटर आणि शासनाची सामूहिक जबाबदारी आहे. या नवीन नियमांमुळे स्कूल बसेसच्या व्यवस्थापनात सुधारणा होईल आणि शालेय विद्यार्थ्यांचा प्रवास अधिक सुरक्षित व नियोजनबद्ध होईल.

लाडकी बहि‍ण आत्ता तब्बल ५० लाख महिलाच अपात्र?; सत्तेनंतर निकष अंमल ९ लाख महिला अपात्र १६२० कोटी वाचले

0

लाडकी बहीण योजनेत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात. लाडकी बहीण योजनेत आता ५० लाख महिलांचे अर्ज बाद होणार आहे. सरकार ५० लाख महिलांचे अर्ज अपात्र करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

विधानसभा निवडणुकीनंतर ९ लाख महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहे. आता सत्तेनंतर ९ लाख महिलांचे पैसे बंद होणार आहेत. यामुळे सरकारचे १,६२० कोटी रुपये वाचले आहेत.लाडकी बहीण योजनेनुळे ३६०० कोटींचा भार महिलांवर पडत आहे. या योजनेत जानेवारीत ५ लाख महिला तर फेब्रुवारीत ४ लाख महिलांना अपात्र केले आहे. यानंतर आता ५० लाख महिलांचे अर्ज बाद करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

फडणवीस सरकारने घेतले ७ मोठे निर्णय, वाचा मंत्रिमंडळ बैठकीत काय काय झालं?

0

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. माणिकराव कोकाटे आणि धनंजय मुंडे हे मंत्रि आजच्या बैठकीला हजर राहिले नव्हते. मंत्रिमंडळाच्या बैठकीत सात महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.पु णे, ठाणे, परळी, बारामती आणि बीडसाठी आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठे निर्णय घेण्यात आले.

मंत्रिमंडळ बैठकीत कोण कोणते निर्णय घेतले ?

1) पौड, ता. मुळशी, जिल्हा पुणे येथे लिंक कोर्टऐवजी दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग या न्यायालयाची स्थापना करण्यास मान्यता.

(विधी व न्याय विभाग)

2) ठाणे जनता सहकारी बँकेत सार्वजनिक उपक्रम, महामंडळे यांना खाते उघडण्यासाठी परवानगी

(वित्त विभाग)

3) 1976 पूर्वीच्या पाटबंधारे प्रकल्पाने बाधित पुनर्वसित गावठाणांमध्ये नागरी सुविधा पुरवण्यासाठी प्रलंबित कामांचा कृती कार्यक्रम राबविण्याचा निर्णय; अशा 332 गावठाणासाठी 599.75 कोटी रुपयांच्या तरतुदीस मंजूरी

(मदत व पुनर्वसन विभाग)

4) महाराष्ट्र राज्य आधारसामग्री (डेटा) धोरणास मान्यता; राज्य डेटा प्राधिकरण स्थापन करणार. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली नियामक समिती.

(नियोजन विभाग)

5) बारामती जिल्हा पुणे येथे नवीन पशुवैद्यक पदवी महाविद्यालय स्थापन करण्यास मंजुरी. यासाठी 564.58 कोटी रुपयांच्या तरतूदीस मंजूरी

(कृषि व पदुम विभाग)

6) परळी, जिल्हा बीड येथे नवीन पशुवैद्यक पदवी महाविद्यालय स्थापन करण्यास मंजुरी. यासाठी 564.58 कोटी रुपयांच्या तरतूदीस मंजूरी

(कृषि व पदुम विभाग)

7) महाराष्ट्र महामार्ग अधिनियम कलम 18(3) 1955 मध्ये सुधारणा, तसेच महाराष्ट्र महामार्ग अध्यादेश 2025 ला मान्यता

(सार्वजनिक बांधकाम विभाग)

पुण्यात २१ वर्षीय तरूणाची मेट्रो स्टेशनवरून उडी मारली, नंतर रस्त्यावर गाडीनं चिरडलं; आत्महत्येपूर्वी एक चिठ्ठीही

0

पुण्यातूनएक धक्कादायक बातमी समोर येत आहे. एका २१ वर्षीय विद्यार्थ्याने मेट्रो स्टेशनवरून उडी घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. उडी मारल्यानंतर रस्त्याने जाणाऱ्या एका वाहनाने त्याला चिरडले. यात त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना सोमवारी २४ फेब्रुवारीला सायंकाळी ६ वाजेच्या दरम्यान घडली आहे. या धक्कादायक घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

पिंपरी चिंचवडमधील संत तुकाराम नगर मेट्रो स्टेशनवर एका २१ वर्षीय तरूणानं आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्याने मेट्रो स्टेशनवरून उडी घेतली. उडी घेतल्यानंतर रस्त्याने जाणाऱ्या एका वाहनाने त्याला चिरडलं. सुजल संजय मानकर असं मृत तरूणाचे नाव आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कडलक यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुजल मानकर डीवाय पाटील कॉलेजमध्ये शिकत होता. त्याच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची होती. सोमवारी सायंकाळी तो संत तुकाराम नगर मेट्रो स्टेशनवरील प्लॅटफॉर्मवर चढला आणि थेट रस्त्यावर उडी मारली.

रस्त्यावर पडल्यानंतर त्याला एका वाहनाने चिरडलं. मुलाला गाडीने चिरडल्यानंतर स्थानिकांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. त्याला तातडीने वायसीएम रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, आत्महत्या करण्यापूर्वी त्यानं एक चिठ्ठी लिहिली होती. त्यात त्याने कुटुबांच्या आर्थिक परिस्थितीमुळे आत्महत्या करून मृत्यू करत असल्याचं नमूद केलं.

आत्ता एसटीचा मोफत प्रवासही बंद होणार? परिवहन मंत्र्यांची मोठी अपडेट; आमचा याला विरोध असून, आम्ही

0

महिलांना एसटीच्या प्रवास तिकिटामध्ये अर्धी सूट देण्यात आली आहे, त्यामध्ये महिलांना अर्ध्या तिकिटाच्या दरात राज्यभरात कुठेही प्रवास करता येतो. त्यामुळे महिलांची एसटी प्रवासाला पसंती मिळत असून, एसटीचे प्रवासी वाढण्यास मदत झाली आहे, दुसरीकडे वय वर्ष 65 वर्षांवरील नागरिकांना देखील प्रवास दरात अर्धी सूट मिळते, तर ज्यांचं वय हे 75 वर्षांपेक्षा अधिक आहे, अशा स्त्री व पुरुषांना राज्यभरात कुठेही एसटीनं मोफत प्रवास करता येतो. तसेच विद्यार्थ्यांना देखील रोजच्या प्रवासासाठी एसटीकडून पासच्या स्वरुपात मोठी सवलत देण्यात येते. मात्र एसटी तोट्यात असल्यामुळे मोफत प्रवासाची योजना बंद होणार आहे, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे, यावर आता परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

नेमकं काय म्हणाले सरनाईक

एसटी बसला सर्वसामान्यांची लाईफलाईन म्हणून ओळखलं जातं. सुरक्षित आणि स्वस्त प्रवासासाठी प्रवासी एसटीलाच पसंती देतात. लांबच्या पल्ल्यासाठी एसटी बसच्या प्रवासाला पसंती दिली जाते. तसेच परिवहन विभागाने एसटीच्या माध्यमामथून प्रवाशांसाठी अनेक सोई उपलब्ध करून दिल्या आहेत. मात्र एसटी तोट्यात असल्यामुळे मोफत प्रवास बंद होणार, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे, यावर आता परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मोठा खुलासा केला आहे. मोफत प्रवासाचा निर्णय बंद होणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे, त्यामुळे आता या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.

दरम्यान डिजिटल बोर्ड लावण्यासंदर्भात देखील त्यांनी यावेळी प्रतिक्रिया दिली आहे. एसटीला विश्वासात घेतल्याशिवाय हे करणं चुकीचं आहे, एसटी महामंडळाला माहिती व जनसंपर्क विभागाने विश्वासात घेतलं नाही हे चुकीचं आहे. आम्ही यामाध्यमातून उत्पन्न वाढवतोय, मात्र आम्हाला माहिती व जनसंपर्क विभागाने विश्वासात घ्यायला पाहिजे होतं. आमचा याला विरोध असून, आम्ही माहिती व जनसंपर्क विभागाला टेंडर प्रोसेस थांबवण्यास सांगितलं आहे, असं सरनाईक यांनी म्हटलं आहे.

दरम्यान कर्नाटकात बसवर हल्ला झाला, चालकाला दमदाटी करण्यात आली, त्यानंतर आम्ही बसेस थांबवल्या आहेत. कोणी अस्मितेवर घाला घालत असेल तर हे चुकीचं आहे, असंही यावेळी सरनाईक यांनी म्हटलं आहे.

पाकिस्तानात तब्बल २९ वर्षांनंतर स्पर्धेचे आयोजन ज्याची भीती होती तेच… चॅम्पियन्स ट्रॉफीवर दहशतवादी हल्ल्याचं संकट

0

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेचे आयोजन पाकिस्तानात केले गेले आहे. तब्बल २९ वर्षांनंतर पाकिस्तानात कुठल्याही आयसीसीच्या स्पर्धेचे आयोजन केले गेले आहे. पाकिस्तानात स्पर्धेचे आयोजन न करण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे, दहशतवादी हल्ल्याची भीती. त्यामुळेच भारतीय संघाने पाकिस्तानात जाऊन खेळण्यास नकार दिला होता. आता चॅम्पियन्स ट्रॉफी पाहण्यासाठी पाकिस्तानात येणाऱ्या फॅन्सचं टेन्शन वाढवणारी बातमी समोर येत आहे.

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानकडे आहे. मात्र भारताने पाकिस्तानात जाऊन खेळण्यास नकार दिला आहे. त्यामुळे भारतीय संघाचे सामने दुबईत खेळवले जात आहेत. तर उर्वरीत सर्व संघांचे सामने पाकिस्तानात आयोजित केले जात आहेत. या स्पर्धेतील सामने पाहण्यासाठी येणाऱ्या परदेशी पाहूण्यांचे अपहरण करण्याचा प्लान केला जात आहे, अशी माहिती पाकिस्तानच्या गुप्तचर विभागाकडून देण्यात आली आहे.

इस्लामिक स्टेट खोरासान प्रांत (ISKP) अरब आणि चिनी नागरिकांचे खंडणीसाठी योजना आखत आहेत. या देशांमधून येणाऱ्या नागरिकांसाठी वापरल्या जाणाऱ्या विमानतळ, बंदरे आणि निवासी क्षेत्रांवर ते नजर ठेवून आहेत.

गुप्तचर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, इस्लामिक स्टेट खोरासान प्रांतचे कार्यकर्ते घर भाड्याने घेण्याची योजना आखत आहेत. शहरांच्या बाहेरील भागात जिथे सीसीटीव्ही नाहीत किवा फक्त मोटरसायकल आणि रिक्षाने पोहोचता येईल अशीच ठिकाणं निवडली असती. हे अपहरणकर्ते, रात्रीच्या वेळी अपहरण करुन त्या व्यक्तींना या घरांमध्ये ठेवण्याचा प्लान करत आहेत.

आता अफगाणिस्तानच्या गुप्तचर संस्थेने अधिकाऱ्यांना महत्वाच्या ठिकाणांवर इस्लामिक स्टेट खोरासान प्रांतच्या संभाव हल्ल्याबद्दल सतर्क केलं आहे. याबाबत माहिती मिळताच, संबधितांचा शोध घेण्यासाठी जोरदार प्रयत्नही सुरु केले आहेत.

धक्कादायक व्याज वसुलीपोटी महिलेवर सतत बलात्कार; राहते घर स्व: मर्जीने विकतेय स्टॅम्पपेपरवर लिहून घेतले

0

दरमहा १० टक्के व्याजाने दिलेल्या ७० हजार रुपयांच्या वसुलीसाठी खासगी सावकार रामा विठ्ठल जानकर (वय ४६, रा. शिवप्रसाद कॉलनी, कदमवाडी) याने महिलेवर बलात्कार केला. दारू पाजून काढलेले महिलेचे अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. हा प्रकार २०१४ ते जून २०२४ या काळात घडला. पीडित महिलेने फिर्याद देताच शाहूपुरी पोलिसांनी सोमवारी (दि. २४) खासगी सावकार जानकर याला अटक केली.

शाहूपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक संतोष डोके यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेने कौटुंबीक अडचणीतून रामा जानकर या खासगी सावकाराकडून ७० हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. मुद्दल आणि दरमहा १० टक्के व्याजाने हप्ते परत करायचे होते. कालांतराने कर्जाचे हप्ते थकल्याने जानकर याने वसुलीसाठी तगादा लावला. वेळेत हप्ते देणार नसल्यास शरीरसंबंध ठेवायला लागतील, असे सांगून वेळोवेळी तिच्यावर बलात्कार केला.

दारू पाजून मोबाइलवर तिचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ काढले. ते व्हायरल करण्याची धमकी देऊन पुन्हा बलात्कार केला. थकलेल्या कर्जाची रक्कम तीन लाख रुपये असल्याचे सांगून तिचे राहते घर स्वत:च्या मर्जीने विकत असल्याचे स्टॅम्पपेपरवर लिहून घेतले. त्याच्या त्रासाला कंटाळून अखेर पीडितेने सोमवारी शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी तातडीने जानकर याला अटक केली.

मुंबई स्थित ‘गुहागर’वासीयांचा मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न

0

मुंबई दि. २५ (रामदास धो. गमरे) बौद्धजन मागासवर्गीय नागरी सहकारी पतसंस्था (मर्या.) गुहागर, या पतसंस्थेच्या वतीने गुहागर तालुक्यातील मुंबईस्थित रहिवासीयांचा मेळावा संस्थेचे चेअरमन के. सी. जाधव यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह, परेल, मुंबई – १२ येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

सदर मेळाव्याचा प्रारंभी चेअरमन के. सी. जाधव यांच्या शुभहस्ते ज्योत प्रज्वलित करून कार्यक्रमास सुरवात करण्यात आली तद्नंतर चेअरमन के. सी. जाधव यांनी पाहुण्यांचे स्वागत केले व कार्यक्रमास सुरवात केली. वाक्कुशल संजय तांबे यांनी स्पष्ट, सुंदर आणि प्रभावशाली शैलीने अत्यंत लाघवी पध्दतीने सूत्रसंचालन करून सर्वांचे मन वेधून घेतले. तालुका संघाचे चेअरमन तसेच पतसंस्थेचे संचालक दीपक मोहिते यांनी प्रास्ताविक सादर करताना गेल्या चार वर्षात पतसंस्थेच्या कामकाजाची मुहूर्तमेढ करण्यापासून त्याच्या आजवरच्या जडणघडणीचा प्रवास, त्यावेळी उदभवलेल्या समस्या त्यावर मात करण्यासाठी सर्वांनी केलेले परिश्रम, मेहनत यावर प्रकाश टाकत पतसंस्थेचे उद्घाटन झाल्यापासून आजवर पतसंस्थेचे सभासद, ठेवी वाढण्यासाठी कोणते कोणते उपक्रम राबविले व पतसंस्था गतिमान केली यासंदर्भातील आढावा घेत, सुरवातीच्या काळात काही तांत्रिक गोष्टींची पूर्तता न झाल्याने पतसंस्था केवळ ग्रामीण भागापुरती मर्यादित असल्याने ग्रामीण भागतीलच सभासदांनाच घ्यावे लागले परंतु आता सर्वच तांत्रिक गोष्टींची पूर्तता करून पतसंस्था आता मान्यताप्राप्त झाल्यामुळे गुहागर तालुक्यातील नोकरीधंद्यामुळे मुंबईस्थित रहिवास्यांना ही गावचा रहिवासी दाखला किंवा तत्सम कोणताही पुरावा उपलब्ध करून दिल्यास सभासद करून घेण्यात येणार आहे, तसेच पतसंस्थेच्या उन्नतीसाठी काही सूचना, उपाययोजना असल्यास त्यांचाही आढावा घेण्यासाठी आपण हा मेळाव्याचे आयोजन केले आहे असे नमूद केले. पतसंस्थेचे तज्ञ संचालक शांतिदुत जाधव यांनी अनेक पतसंस्था, त्यांची घटना, कार्यपद्धती, आलेख, सभासदांचा अभिप्राय याचा अभ्यास करून योजना कश्या असाव्यात यासंदर्भात तक्ता बनवून आपण इतर पतसंस्थेपेक्षा कमी व्याजदरात तारण देऊन पतसंस्था व ठेवीदार यांना जास्तीतजास्त नफा देऊन दोघांचाही उत्कर्ष कसा होईल व सभासद पट कसा वाढेल यावर सुनियोजित नियोजन करून त्याची मुद्देसूद माहिती दिली, तसेच तज्ञ संचालक शैलेंद्र पवार यांनी आपल्या शुभेच्छापर भाषणात “पतसंस्था निर्माण करतेवेळी जे संचालक मंडळ स्थापन करण्यात आले ते संचालक वर्षभराचे आहेत तरी नवीन येणारे संचालक हे सभासदांमधून येतील आणि कामकाज पुढे नेतील तसेच इतर पतसंस्थेपेक्षा आपला व्याजदर कमी असल्याने आपली पतसंस्था सर्वाना सोबत घेऊन पुढे जाणारी आहे त्यामुळे सर्वांनी त्यात सहभागी होऊन एकत्रितरित्या सर्वांचा उत्कर्ष होण्यासाठी पुढे या” असे मार्गदर्शनपर आवाहन केले. सोबतच सुभाष मोहिते, शशिकांत मोहिते, राजाभाऊ तथा रामदास धो. गमरे, अरुण गमरे, अप्पा सावंत, पवार, न्यायदान कमिटीचे सचिव कदम, कैलास मोहिते, दीपक सावंत आदी सभासदांनी पतसंस्थेच्या कामकाजाबाबत संचालक मंडळाने ७४ वर्षानंतर का होईना परंतु आपल्या बौद्धबांधवांच्या हक्काची पतसंस्था निर्माण करण्यासाठी संचालक मंडळाने अथक परिश्रम घेतले व छोटेसे रोपटे लावून भविष्यात त्याचा वटवृक्ष होण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी पाऊल उचलले याबद्दल त्यांचे कोडकौतुक केले. त्यावेळी शशिकांत मोहिते यांनी आपल्या शुभेच्छापर भाषणात “ही पतसंस्था निर्माण होण्यासाठी गाव व मुंबई संचालक मंडळाचे मोठे योगदान असून त्यांच्या कार्याचा मी साक्षीदार आहे अनेक संकटांना तोंड देत त्यांनी ही पतसंस्था निर्माण करून तालुका संघाला सहकार क्षेत्रात पाऊल टाकण्यासाठी मार्ग मोकळा करून दिला आणि वेळप्रसंगी सर्वसामान्य नागरिकांच्या पाठिशी खंबीरपणे उभी राहणारी हक्काची पतसंस्था निर्माण केली त्याबद्दल संचालक मंडळाचे मी आभार मानतो तसेच सर्व सभासदांनी आपली इतर पतसंस्था, बँका यातील खाती आपल्या पतसंस्थेत उघडावी, आपल्या शाखेतील, विभागातील, भावकितील, मित्रपरिवारातील स्वकियांना पतसंस्थेचे सभासद बनवून घ्यावे” असे नमूद केले. संचालक राजाभाऊ तथा रामदास धो. गमरे यांनी शुभेच्छापर भाषण देताना “मागासवर्गीय कोट्यातून आपण पतसंस्था घेतल्याने जास्तीतजास्त सभासद हे आपले असतील व त्याचे फायदे आपण आपल्या बौद्ध बांधवांना मिळवुन देऊ व गुहागर तालुक्यातील मुंबईस्थित राहिवासीयांना ही जास्तीतजास्त प्रमाणात सभासद बनवून घेऊ व पतसंस्था गतिमान करण्यास कटिबद्ध होऊ” असे नमूद केले.

सरतेशेवटी दीपक मोहिते यांनी सदर कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी अथक परिश्रम घेणाऱ्या सर्वांचे व गुहागर तालुक्यातील मुंबईस्थित उपस्थित रहिवासीयांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.