Home Blog Page 174

स्वारगेट बस स्थानक तरूणीवर बलात्कार, अजितदादाही संतापले, आयुक्तांना निर्देश घटना क्लेशदायक, संतापदायक

0

स्वारगेटसारख्या गजबजलेल्या बस स्थानक परिसरात एका तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे स्वारगेट बस स्थानकाच्या जवळच पोलीस चौकी आहे. शिवाय पोलीस कर्मचारी बस स्थानकावर वेळोवेळी गस्त घालत असतात. मात्र तरीही बलात्कासारखा घृणास्पद गुन्हा करण्याची आरोपीची हिम्मत झाली. स्वारगेट बस स्थानकातील घटना क्लेशदायक, संतापदायक, शरमेने मान खाली घालायला लावणारी असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

स्वारगेट बसस्थानकात एका २६ वर्षीय मुलीवर बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. बुधवारी सकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. दत्तात्रेय रामदास गाडे असे आरोपीचे नाव आहे. पुणे पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

अत्यंत दुर्दैवी, क्लेशदायक, सुसंस्कृत समाजातील सर्वांना संताप आणणारी स्वारगेटची घटना

पुण्यातील बलात्कार प्रकरणावर बोलताना अजित पवार म्हणाले, पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात आपल्या एका भगिनीवर झालेल्या बलात्काराची घटना अत्यंत दुर्दैवी, क्लेशदायक, सुसंस्कृत समाजातील सर्वांना संताप आणणारी, शरमेने मान खाली घालायला लावणारी आहे. या गुन्ह्यातील आरोपीने केलेला गुन्हा अक्षम्य असून त्याला फाशीशिवाय दुसरी शिक्षा असू शकत नाही.

मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातलंय, मी पण पोलीस आयुक्तांना निर्देश दिलेत

मी स्वतः पुणे पोलीस आयुक्तांना यासंदर्भात व्यक्तिशः लक्ष घालून तपास करण्याचे, आरोपीला तात्काळ अटक करण्याचे निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही यांनीही हा गुन्हा गांभीर्याने घेतला असून पोलिसांना आवश्यक सूचना दिल्या आहेत. पोलिसांकडून आरोपीला लवकरात लवकर अटक केली जाईल आणि त्याला कायद्यानुसार कठोरात कठोर शिक्षा होईल.

आरोपीच्या शिक्षेसाठी राज्य शासन सर्व पावले उचलेल, हा विश्वास महाराष्ट्रातील माझ्या तमाम बंधू-भगिनी, मातांना देतो. पीडित बहिणीला न्याय, मानसिक आधार, सर्वतोपरी मदत करण्याच्या सूचना महिला व बाल विकासमंत्री तसेच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष यांना देण्यात आल्या आहेत, असे अजित पवार यांनी सांगितले.

स्वारगेट डेपोतून बसमध्ये तरुणी आरोपीसोबत कशी गेली? अखेर प्रश्नाचं उत्तर समोर! शिवशाही बसच्या ड्रायव्हरचा जबाब….

0

पुण्यातील घटनेचा सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. पुण्यातील स्वारगेट बस डेपोत तरुणीवरील अत्याचार झाल्याच्या घटनेने पोलिसांनी तातडीने कारवाई करायला सुरुवात केली आहे. पोलिसांचे पथके आरोपीच्या मागावर आहेत. आरोपी दत्ता गाडे फरार आहे. पुणे पोलिसांचे पथके त्याच्या शोधावर आहे. पोलिसांनी कारवाईदरम्यान शिवशाहीच्या बसच्या एसटी ड्रायव्हरचा जबाब हाती आला आहे.

पुण्यातील स्वारगेट बस डेपोतील त्या शिवशाही एसटी ड्रायव्हरचा जबाब साम टीव्हीच्या हाती आला आहे. पुण्यातील स्वारगेट बस स्थानकातील ‘त्या’ एसटी बस चालकाने वरिष्ठांना सुपूर्द जबाब केला. मी त्या बसचा वाहक आहे, असं सांगून आरोपीने तरुणीवर अत्याचार केल्याचं चालकाने सांगितलं. स्वारगेट ते सोलापूर एसटी बस विनावाहक (कंडक्टर) होती. त्यानंतर मंगळवारी पहाटे ३ वाजून ४० मिनिटांनी एसटी बस स्वारगेट आगारात पोहोचली होती. या बस चालकाने बस स्वारगेट बस स्थानकात रसवंतीगृहासमोर पुढे उभी केली.

बस चालकाने काय जबाब दिला?

बसचालकाने जबाबात म्हटलं की, सकाळी ६ वाजेदरम्यान मी बसचा वाहक आहे, असे सांगून एका प्रवासी महिलेला एका अज्ञात प्रवाशाने बसमध्ये घेऊन गेले. त्यानंतर त्यांच्यासोबत जबरदस्ती केली, असे जबाबात नमूद करण्यात आलं आहे.

दरम्यान, शिवशाही बस अत्याचार प्रकरणात स्वारगेटच्या एसटी डेपो व्यवस्थापनामधील काही जणांची चौकशी होण्याची शक्यता आहे. पोलिसांकडून व्यवस्थापन विभागातील कर्मचाऱ्यांची चौकशी होण्याची शक्यता आहे. व्यवस्थापन कार्यालयात पहाटे कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांची चौकशी देखील होण्याची शक्यता आहे. तसेच स्वारगेट डेपोमध्ये कार्यरत असलेल्या सुरक्षा रक्षकांची सुद्धा पोलीस चौकशी होण्याची शक्यता आहे.

संतोष देशमुख प्रकरणात उज्वल निकम यांची नियुक्ती; मनोज जरांगे पाटलांची पहिली प्रतिक्रिया समोर, म्हणाले….

0

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली. या प्रकरणात ज्येष्ठ वकील उज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी संतोष देशमुख यांचं कुटुंब आणि ग्रामस्थांकडून करण्यात आली होती. अखेर या प्रकरणात आता ज्येष्ठ वकील उज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे, उज्वल निकम यांच्या नियुक्तीवर मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

नेमकं काय म्हणाले मनोज जरांगे पाटील?

उज्वल निकम साहेबांची जी नियुक्ती झाली ती चांगली गोष्ट आहे. परंतु यामध्ये विशेष जे महत्त्वाचं आहे ते म्हणजे जे सहआरोपी आहेत ते कधी होणार आहेत? हा मोठा कळीचा मुद्दा आहे. नुसतं भावनिक होऊन चालणार नाही, सरकार जर मस्साजोग प्रकरणात छुपा अजेंडा राबवत असेल तर ते जमणार नाही. मागच्या तीन महिन्यात कोणी सहआरोपी झाले का? मागच्या दोन महिन्यांपासून निकम साहेबांच्या नियुक्तीची मागणी सुरू आहे. तिला 2 महिने लागले, शेवटी त्यासाठी आंदोलनच करावं लागलं, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, गोर गरीबांना या राज्यात न्याय नाही. फक्त कागद दाखवून लोकांना भावनिक करायचं. ते सहआरोपी झाले का? दोषी पोलिसांना सहआरोपी केलं का? खंडणी आणि खून करणाऱ्याला ज्यांनी साथ दिली त्यांना सहआरोपी केलं का? तर नाही. गाड्या पुरवणारे, पैसा पुरवणारे कोणालाच सहआरोपी करण्यात आलं नाही, आळंदीला कोण गेले होतं? ते सहआरोपी झाले का तर नाही, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

धनंजय देशमुख यांना धमकी देणारे सहआरोपी झाले का? अजिबात नाही, तर मला एक म्हणायचं आहे, या प्रकरणांमध्ये प्रगती काय झाली. फक्त कागद दाखवून भावनिक करणे हे दिशाभूल करण्याचे काम सातत्यानं मुख्यमंत्र्यांकडून सुरू आहे. उज्वल निकम यांची नियुक्ती करण्याचं हे साधं काम आहे, परंतु मुख्य काम आहे ते म्हणजे त्यांना ज्यांनी -ज्यांनी मदत केली त्यांना सहआरोपी करावं, अशी मागणी यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे.

पाकिस्तानचं डोकं फिरलंय! म्हणे हा भारताचा जादूटोणा?११ खेळाडूंसाठी २२ मांत्रिक; चर्चेचा VIDEO व्हायरल

0

आयसीसी चॅम्पियन्स ट्ऱॉफीत रविवारी हाय व्हॉल्टेज सामना पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने शानदार विजयाची नोंद केली. या पराभवामुळे यजमान पाकिस्तानचा संघ दुसऱ्याच सामन्यानंतर स्पर्धेतून बाहेर पडला आहे. या सामन्यानंतर पाकिस्तानचा सेमीफायनलमध्ये जाण्याचा मार्ग जवळजवळ बंद झाला आहे. या विजयानंतर संपूर्ण भारतात एकच जल्लोष दिसून आला. भारती फॅन्स फटाके फोडून जल्लोष साजरा करताना दिसून आले.

तर तर दुसरीकडे पाकिस्तानचे फॅन्स निराश दिसून आले. पाकिस्तानच्या पराभवानंतर सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय, ज्यात काही लोकं पाकिस्तानच्या पराभवाबाबत चर्चा करताना दिसून येत आहेत. दरम्यान एका व्यक्तीने तर भारतीय संघ जादूटोणा करुन जिंकले आहेत, असा आरोप केला आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

https://x.com/RatishShivam/status/1893904078154920198?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1893904078154920198%7Ctwgr%5E372fd8f70c15cce1a3f925e85942d75025f26ba1%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fapi-news.dailyhunt.in%2F

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, काही लोकं एका पॉडकास्टमध्ये भारत- पाकिस्तान सामन्याबाबत चर्चा करताना दिसून येत आहेत. एक व्यक्ती म्हणाला, भारतीय संघ जिंकावा म्हणून या संघाने २२ मांत्रिक दुबईत पाठवले होते. या व्यक्तीने असा दावा केलाय की, पाकिस्तानच्या प्रत्येक खेळाडूसाठी २ भटजी पाठवण्यात आले होते, जे खेळाडूंसाठी जादूटोणा करत होते.

तू साराला डेट करतोय का? गिलने अखेर सांगूनच टाकलं; गिलच्या बहिणीसोबत एकाच कारमध्ये हा व्हिडिओ पुन्हा होतोय व्हायरल…

0
  1. भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज शुभमन गिल आपल्या फलंदाजीमुळे नेहमीच चर्चेत असतो. इंग्लंड विरुद्ध झालेल्या वनडे मालिकेपासून त्याच्याकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मैदानातील कामगिरीसह गिल आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळेही नेहमीच चर्चेत असतो. अनेक माध्यमातील वृत्तांमध्ये, शुभमन गिलचं नाव सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरसोबत जोडलं गेलं आहे. नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय, ज्यात गिलला सारा तेंडुलकरबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नाचं उत्तर देताना गिल काय म्हणाला? जाणून घ्या.

व्हिडिओ होतोय व्हायरल –

https://x.com/Anshika_in/status/1894276947527753892?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1894276947527753892%7Ctwgr%5Eb34d9648d8a5335019024061d4b207527ba86dfd%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fapi-news.dailyhunt.in%2F

गिल सध्या भारतीय संघासोबत दुबईत आहे. आपल्या शानदार फलंदाजीमुळे त्याची जोरदार चर्चा सुरू आहे. व्हायरल होत असलेला व्हिडिओ आताचा नसून जुना आहे. मात्र तो ट्रेंड करत असल्याने हा व्हिडीओ पुन्हा एकदा व्हायरल होऊ लागला आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये होस्ट गिलला विचारते, तू साराला डेट करतोय का? यावर उत्तर देताना गिल म्हणतो, ‘ कदाचित..’

शुभमन गिल आणि सारा तेंडुलकरचं नाव खूप आधीपासून जोडलं जात आहे. दोघांचे काही फोटो देखील व्हायरल झाले होते. मात्र दोघेही एकमेकांना डेट करत असल्याची कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. सारा तेंडुलकर अनेकदा भारताचा सामना पाहण्यासाठी आली आहे. यासह काही महिन्यांपूर्वी ती शुभमन गिलच्या बहिणीसोबत एकाच कारमध्ये दिसून आली होती.

अख्खी राष्ट्रवादी उद्या पहिल्यांदाच एकाच मंचावर; शरद पवार, अजित पवार, पटेल आणि भुजबळही साथ- साथ

0

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर पवार कुटुंबात वितुष्ट आलं होतं. पवार कुटुंबातील काही सदस्यांनी तर एकमेकांच्या विरोधातही निवडणुका लढवल्या होत्या. यावरून पवार कुटुंबात काहीच अलबेल नसल्याचं बोललं जात होतं. पण त्यानंतर अजित पवार आणि शरद पवार यांच्या बैठका आणि काही कामानिमित्ताने बैठका होत गेल्या. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनीही शरद पवार यांची मध्यंतरी भेट घेतली होती. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादीतील दुरावा काहीसा दूर झाल्याचं सांगितलं जात होतं. आता तर उद्या एका कार्यक्रमाच्या निमित्ताने अख्खी राष्ट्रवादीच एका मंचावर येणार आहे. पहिल्यांदाच राष्ट्रवादीचे सर्व नेते एकाच मंचावर पाहायला मिळणार आहे.

शरद पवार यांचे स्वीय सहायक तुकाराम धुवाळी यांचं नुकतंच निधन झालं आहे. शरद पवार यांना सुरुवातीपासूनच धुवाळी यांनी साथ दिली होती. धुवाळी यांच्या जाण्यामुळे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाच्या नेत्यांकडून शोक व्यक्त केला गेला. धुवाळी यांचे दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांशी अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. धुवाळी यांचं निधन झाल्याने त्यांच्या शोकसभेचं आयोजन करण्यात आलं आहे. उद्या संध्याकाळी 4.30 ते 6.30 वाजेपर्यंत वाय. बी. सेंटर येथे ही शोकसभा पार पडणार आहे.

पहिल्यांदाच एकत्र येणार

या शोकसभेच्या निमित्ताने दोन्ही राष्ट्रवादीचे प्रमुख नेते एकत्र येणार आहेत. शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी उपस्थित राहणार आहेत. सोबतच राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ, सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील आदी नेते यावेळी उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पहिल्यांदाच दोन्ही राष्ट्रवादीचे नेते एकाच मंचावर दिसणार आहेत.

कोण होते धुवाळी?

तुकाराम धुवाळी हे शरद पवार यांचे अत्यंत जुने सहकारी आणि स्वीय सहायक होते. शरद पवार हे गेल्या 60 वर्षापासून राजकारणात आहेत. तर धुवाळी यांनी 1977 पासून म्हणेज पवार यांना 53 वर्ष साथ दिली आहे. अखेरच्या श्वासापर्यंत धुवाळी हे शरद पवार यांची सावली बनून राहिले होते. त्यामुळेच त्यांचे पवार कुटुंबीयांशी जिव्हाळ्याचे संबंधही झाले होते. शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू, प्रामाणिक, सचोटीने वागणारा आणि अत्यंत निगर्वी व्यक्ती म्हणून धुवाळी यांची ओळख होती.

शिक्कामोर्तब! चॅम्पियन्स ट्रॉफी ग्रुप A मधील टॉप 2 संघ ठरले पाकिस्तान अन् बांगलादेश चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेर

0

आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी २०२५ च्या सेमीफायनलसाठी दोन संघांनी सीट कन्फर्म केली आहे. ग्रुप ‘ए’ मधील न्यूझीलंड आणि भारताने सोबतच सेमीफायनलमध्ये एन्ट्री मारली आहे. न्यूझीलंडने सोमवारी बांगलादेशविरोधात पाच गडी राखून विजय मिळवला. त्यानंतर न्यूझीलंडसोबत भारत देखील पुढच्या टप्प्यात पोहोचला आहे.

न्यूझीलंडच्या विजयानंतर बांगलादेश आणि यजमान पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेर गेले आहेत. दोन्ही संघांनी सुरुवातीच्या सामन्यात पराभूत झाले होते. बांगलादेशाला न्यूझीलंड व्यतिरिक्त भारताकडूनही ६ विकेटने पराभव स्वीकारावा लागला. पाकिस्तानला न्यूझीलंडने ६० धावांनी पराभूत केले. तर भारताने पाकिस्तानवर ६ गडी राखून विजय मिळवला आहे.

बांगलादेश आणि पाकिस्तानचा गुरुवारी सामना होणार आहे. या सामन्यात जिंकून दोन्ही संघांना काहीच फायदा होणार नाही. न्यूझीलंड आणि भारत त्यांचा शेवटचा लीग सामना दोन मार्च रोजी खेळणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी उतरला आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफीत एकूण ८ संघ आहेत. त्यातील ग्रुप बीमधील संघांची सेमीफायनलमध्ये जागा निश्चित झालेली नाही. ग्रुप ‘बी’मध्ये ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान या संघांचा समावेश आहे. यामध्ये दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया संघाने प्रत्येकी एक-एक सामना जिंकला आहे.

बांगलादेश विरुद्ध न्यूझीलंड सामन्यात अष्टपैलू रचिन रविंद्र चांगलाच चमकला. त्याने रावळपिंडी मैदानात बांगलादेशाविरोधात शतक ठोकलं. न्यूझीलंडला बांगलादेशने विजयासाठी २३७ धावांचं आव्हान दिलं होतं. न्यूझीलंडने आव्हानाचा पाठलाग करताना ७२ धावांमध्ये तीन गडी गमावले. विल यंग शून्य धावांवर बाद झाला.

कॉनवे अवघ्या ३० धावांवर बाद झाला. तर केन विलियमसन्सने ५ धावा केल्या. त्यानंतर रचिन रविंद्रने संघाचा डाव सावरला. त्याने १०५ चेंडूत ११२ धावा कुटल्या. त्याने फलंदाजी करताना १२ चौकार आणि १ षटकार लगावला. टॉम लॅथम आणि रचिनने १२९ धावांची भागिदारी रचली. न्यूझीलंडने ४६.१ षटकात बांगलादेशवर विजय मिळवला.

धक्कादायक! शिवशाही बसमध्ये महिलेवर बलात्कार, पुणे हादरले

0

पुण्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे, शिवशाही बसमध्ये महिलेवर बलात्कार करण्यात आल्याची संतापजनक घटना घडली आहे. २६ वर्षीय तरूणीवर स्वारगेट एसटी बस स्टँडमध्ये अभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये महिलेवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे.पहाटे अंधाराचा फायदा घेत नराधमाने महिलेवर बलात्कार केला अन् पळ काढला. पोलिसांकडून आरोपीचा शोध घेण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटे साडेपाच वाजता ही धक्कादायक घटना घडली. पोलीस स्टेशनमध्ये याबाबत तक्रार कऱण्यात आली आहे. पोलिसांची पथके आरोपीच्या मागावर आहेत. शिवशाही बसमध्ये बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आल्यानंतर पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. पुणे पोलिसांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित कऱण्यात येत आहेत.

पुण्यामध्ये आज पहाटे साडेपाच वाजता स्वारगेट बस स्टँडवर उभ्या असणाऱ्या शिवशाही बसमध्ये बलात्कार केल्याची धक्कादायक आणि संतापजनक घटना घडली आहे. महिला एकटीच असल्याचा फायदा घेत नराधमाने महिलेवर बलात्कार केला, त्यानंतर तेथून पळ काढला. या प्रकारानंतर पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. पुणे पोलिसांकडून आरोपीचा शोध घेण्यात येत आहे.

26 वर्षाची तरुणी पुण्यातून फलटणच्या दिशेने निघाली होती. स्वारगेट एसटी स्टँडच्या परिसरात आल्यानंतर एका ठिकाणी ती थांबली होती. त्यावेळी एका अनोळखी व्यक्तीने तिला फलटणला जाणारी एसटी बस दुसऱ्या ठिकाणी थांबली असल्याचं सांगितलं. माझी एसटी याच ठिकाणी थांबते, तिकडे जाणार नाही असं त्या मुलीने त्याला सांगितलं. मात्र एकट्या मुलीचा फायदा घेत त्या तरुणाने तिला त्याच्या शब्दात अडकवले.

स्वारगेट एसटी स्टँड परिसरात असलेल्या एका अंधाराच्या ठिकाणी एक शिवशाही बस उभी होती. या ठिकाणी ती मुलगी गेल्यानंतर तिने ही एसटी तर बंद आहे असं देखील सांगितलं. तू टॉर्च लावून आत मध्ये जा हीच एसटी काही वेळात फलटणला निघेल, असं या नराधमाने तिला सांगितले आणि स्वतः सुद्धा बसमध्ये शिरला. त्याने तिच्यावर जबरदस्ती केली आणि त्यानंतर तो तिथून पसार झाला. घडलेला संपूर्ण प्रकार या मुलीने पोलिसांना सांगितलेला असून पोलिसांची विविध पथकाकडून आरोपीचा शोध घेतला जातोय.

मुख्यमंत्र्यांकडून बदल्यांचा धडाका सुरूच… ७ बड्या IAS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या

0

मुंबई : राज्यातील सात बड्या आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा निर्णय मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतला. मंगळवारी सायंकाळी बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत. धाराशिवचे चर्चेतील जिल्हाधिकारी सचिन ओंबासे यांची बदली करून कीर्ती किरण पुजार यांना धाराशिव येथे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

कोणकोणत्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत?

१. श्री राजेंद्र निंबाळकर (IAS: २००७) व्यवस्थापकीय संचालक, MSSIDC, मुंबई यांची व्यवस्थापकीय संचालक, सारथी, पुणे म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

२. श्री संजय यादव (IAS: २००९) जिल्हाधिकारी, मुंबई शहर, मुंबई यांची राज्य प्रकल्प संचालक, समग्र शिक्षा अभियान, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

३. डॉ. राजेंद्र भारुड (IAS:२०१३) आयुक्त, TRTI, पुणे यांना प्रकल्प संचालक, RUSA, उच्च आणि तंत्रशिक्षण विभाग, मुंबई म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

४. श्री दीपक कुमार मीना (IAS: २०१३) अतिरिक्त आदिवासी आयुक्त, ठाणे यांची सहआयुक्त, राज्य कर, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

५. श्री समीर कुर्तकोटी (IAS: २०१३) यांची आयुक्त, TRTI, पुणे म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

६. श्री महेश आव्हाड (IAS: २०१५) व्यवस्थापकीय संचालक, हाफकिन बायो-फार्मा कॉर्पोरेशन, मुंबई यांना महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरण, मुंबई येथे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

७. श्री कीर्ती किरण पुजार (IAS: २०१८) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, रत्नागिरी यांना धाराशिव येथे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

मनोज जरांगे पाटील यांचा पुन्हा सरकारवर हल्लाबोल; तपास यंत्रणेला स्वातंत्र्य नाही,  शिंदे मुख्यमंत्री असते तर…;

0

बीड जिल्ह्यातल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली. या घटनेला दोन महिने उलटून गेले आहेत. मात्र अद्यापही या प्रकरणातील आरोपींना शिक्षा झालेली नाही, तसेच एक आरोपी फरार आहे. या सर्व पार्श्वभूमीवर संतोष देशमुख यांचं कुटुंब आणि मस्साजोगच्या ग्रामस्थांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केलं आहे. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी देखील आज या आंदोलनाला भेट दिली. या भेटीनंतर सरकारवर हल्लाबोल करताना मनोज जरांगे पाटील यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

नेमकं काय म्हणाले मनोज जरांगे?

आता एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असते तर या प्रकरणाचा निपटारा झाला असता, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. शिंदे साहेबांनी काम केलं, गाव खेड्यात शब्द असतो पहिला सरपंच होता खूप चांगलं काम होतं, दुसरा आल्यावर त्याच्यापेक्षा चांगलं काम केलं तर लोक म्हणतात पहिल्या सरपंचापेक्षा त्यांनं चांगलं काम केलं. शिंदेंचा कालखंड आम्ही बघितला, त्यांनी आंदोलनाला यशाकडे नेलं. सगळ्या जाती-धर्माच्या लोकांना सोबत घेऊन काम केलं, पण तुम्ही माणसं मरून सुद्धा न्याय देत नाहीत, माणसं मरून देखील आंदोलन करावं लागत आहे, असा हल्लाबोल यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.

दरम्यान पुढे बोलताना संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात नियुक्त करण्यात आलेल्या एसआयटी, सीआयडीला तपासाचं स्वातंत्र्य नाही असा आरोप देखील त्यांनी केला आहे. त्यांना जर तापासाचं स्वातंत्र्य असतं तर  आज बीडचं अर्ध जेल भरलं असतं. दीडशे ते दोनशे सहआरोपी झाले असते. त्यामुळे हे सत्य आहे की, तपास यंत्रणेला स्वातंत्र्य नाही, असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, मंत्री, आमदार, खासदार यांना वाटत असेल आम्ही खूप हुशार आहोत, पण जनता तुमच्यापेक्षाही हुशार आहे, सरकारचा छुपा अजेंडा सुरू आहे. गोड बोलून तीन महिने घातले असा आरोपही यावेळी जरांगे पाटील यांनी केला आहे.