Home Blog Page 170

जयंतरावांच्या मनात नक्की? त्यांचंही ठरलं?; गडकरींना आमंत्रण, बावनकुळेंची भेट, चंद्रकांत पाटलांशी गुफ्तगू

0

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा नेहमीच होत असतात. आतापर्यंत तरी या अफवाच ठरल्या आहेत. स्वतः पाटील यांनीही या चर्चांवर उत्तर देत पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी जयंत पाटील यांचे झालेले गुफ्तगू या चर्चांना पुन्हा कारणीभूत ठरले आहे.

जयंत पाटील भाजप प्रवेश करणार असल्याच्या चर्चा मागील तीन वर्षांपासून सुरू आहेत. ते भाजप प्रवेश का करणार याची 10 कारणे सांगणारा व्हिडीओ भाजपच्याच अधिकृत ट्विटर हँन्डेलवरून प्रसिद्ध करण्यात आला होता. वादानंतर तो डिलीटही झाला. त्यानंतरही पाटील यांच्याविषयीच्या चर्चा थांबल्या नाहीत. मुलाच्या लोकसभा तिकीटासाठी ते भाजपमध्ये जाऊ शकतात अशी चर्चा होत राहिली. जयंत पाटील मात्र शरद पवार यांच्यासोबत कायम राहिले.

आता विधानसभा निवडणुकीनंतर पाटील महाविकास आघाडीपासून अलिप्त राहिल्याचे दिसून आले. तर पुन्हा एकदा भाजपशी जवळीक वाढली. इतकी की रिकामे ठेवण्यात आलेले मंत्रिपद त्यांचेच असल्याच्या चर्चा झाल्या. गेल्याच महिन्यात नितीन गडकरी सांगली दौऱ्यावर आले होते. ते पाटील यांच्या शैक्षणिक संस्थेच्या कार्यक्रमात उपस्थित राहिले होते. त्यानंतर जिल्ह्यात जयंत पाटील यांच्याविषयी पुन्हा सर्वांच्याच मनात शंकेची पाल चुकचुकली.

मात्र त्या सर्व चर्चांना गडकरींसह भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पूर्णविराम दिला होता. तर जयंत पाटील देखील अशी बातम्यांमुळे पूर्ण वैतागले होते. त्यांनी थेट पत्रकारांचीच शाळा घेत आता गडकरी साहेब राष्ट्रवादीत अशा बातम्या देणार का असा सवाल केला होता. या चर्चा शांत होतात की नाही तेच जयंत पाटील आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी गुप्त भेट झाल्याची बातमी आली.

पण या भेटीवर दोन्ही नेत्यांनी स्पष्टीकरण दिले. यावेळी त्यांनी ही भेट आपण मतदारसंघातल्या विकासकामांसाठी घेतली असल्याचं सांगितलं आहे. तसेच या भेटीवेळी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्तेही उपस्थित असल्याचे सांगितले आहे. याला बावनकुळे यांनीही दुजोरा दिला होता.

आता भाजपचे वरिष्ठ नेते तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यांशी भेट झाल्याने नव्या चर्चा सुरू झाल्या आहेत. ब्राह्मण समाजाच्यावतीने आयोजित सत्कार सोहळ्यात जयंत पाटील आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यासपीठावरच एकमेकांच्या कानात चर्चा केली. यानंतर दोघांनी निरोप घेतला. या गुफ्तगुमुळे आता उपस्थितांच्याही भुवया उंचावल्या आहेत.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपल्या मनोगतातही जयंत पाटील यांचे विशेष कौतुक केले. शिवाय एकाचवेळी बाहेर पडत असल्याचेही त्यांनी सांगितले. व्यासपीठावरील चर्चेनंतर जाताना पुन्हा एकदा त्यांनी तिथेच कानात चर्चा केली. उपस्थित सर्व लोकप्रतिनिधी आणि नागरिकांचेही याकडेच लक्ष गेले. पण दोघांतील चर्चा गुलदस्त्यात राहिल्यानेच आता असून पुन्हा एकदा चर्चेला सुरूवात झाली आहे.

बहुमताच्या जोरावर कामकाज रेटणार नाही. अर्थसंकल्पीय अधिवेशन किती दिवस? अजितदादांनी स्पष्टच सांगितले

0

अर्थसंकल्पीय अधिवेशनात आम्ही बहुमताच्या जोरावर कामकाज रेटणार नाही. आम्ही चार आठवड्यांचे अधिवेशन ठेवले आहे. येत्या अधिवेशनात प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्याची आमची तयारी आहे. महायुतीचे सरकार चांगलं चालावं यासाठी आमचा सर्वांचा प्रयत्न आहे. राज्य विधिमंडळाचं हे अर्थसंकल्पीय अधिवेशन चार आठवडे चालणार आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले.

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपासून सुरू होणार आहे. या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेवेळी उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची एकत्रित पत्रकार परिषद पार पडली.

‘वास्तविक सरकार नवीन येत असतात. जनतेच्या मनात असेल तर बदल करत असते. चांगले काम केल तर जनता सरकारला पुन्हा संधी देत असते. आम्हाला प्रचंड बहुमत मिळाले . आमचं सरकार चांगलं चालावं. आमचं काम व्यवस्थित चालू आहे. आम्हाला विरोधकांशी चर्चा करायची होती. मात्र, विरोधकांनी भलंमोठं पत्र सरकारला दिलंय. आमची विरोधकांशी चर्चा करायची तयारी आहे, असे अजित पवार यांनी सांगितलं.

‘आमचं 238 आमदारांचं बहुमत आहे. विरोधी पक्षाकडे फक्त ५० आमदार आहेत. आम्ही बहुमताच्या जोरावर कामकाज रेटणार नाही. आम्ही चार आठवड्यांचं अधिवेशन ठेवलं आहे. जागतिक महिला दिनाच्या दिवशी अधिवेशन ठेवून पुण्यश्री अहिल्यादेवी होळकर यांची ३०० वी जयंती आहे. आम्ही त्यांच्याविषयी चर्चा ठेवली आहे. अशा प्रकारे महायुतीचं सरकार प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्याच्या तयारीत आहे, असे पवार पुढे म्हणाले.

‘विरोधकांच्या आरोपांमध्ये तथ्य असेल तर उत्तर देऊ. कारण नसताना विरोधाला विरोध होत असेल तर, त्याला किती महत्व द्यायचं हे त्यानुसार ठरवलं जाईल. असं साधारण अधिवेशन चालवलं जाईल. जी बिले येतील, त्यावर चर्चा होईल. त्यावर साधक बाधक चर्चा होईल, असे अजित पवार यांनी सांगितले.

पुणे पुन्हा हादरले! बापलेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना; बापाकडून पोटच्या १४ वर्षीय मुलीवर बलात्कार…..

0

पुण्यातील स्वारगेट एसटी डेपोमध्ये उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये २६ वर्षीय तरुणीवर बलात्काराची घटना ताजी असतानाच पुणे शहर पुन्हा हादरले आहे. पुण्यामध्ये १४ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आलाय. बापानेच आपल्या पोटच्या मुलीवर बलात्कार केला. याप्रकरणी नराधम बापाला पोलिसांनी अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात पुन्हा लैंगिक अत्याचाराची घटना समोर आली आहे. बापानेच आपल्या १४ वर्षांच्या मुलीवर बलात्कार केला. बाप लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी ही घटना पुण्यातील नांदेड सिटी परिसरात घडली आहे. स्वतःच्या १४ वर्षांच्या मुलीवर नराधम बाप ८ महिन्यांपासून बलात्कार करत होता. आई घराबाहेर गेल्यावर नराधम बाप मुलीवर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार करत होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी १४ वर्षे वयाची असून आरोपी बापाचे वय ४५ आहे. आरोपीचे पत्नीसोबत भांडण झाल्याने पत्नी विभक्त राहत होती तर घरात १४ वर्षीय पीडित मुलगी आणि आरोपी वडील असे दोघेच राहत होते. मागील वर्षी जुलै महिन्यात आरोपीने मुलीला धमकी देत मारहाण करत जबरदस्तीने लैंगिक संबंध ठेवले. याबाबत कुठेही वाच्यता न करण्यास सांगत तिला धमकी दिली. त्यानंतर नराधम बाप तिच्यावर सतत बलात्कार करत राहिला.

दरम्यान नोव्हेंबरमध्ये आरोपीची पत्नी घरी परत आली. मात्र पत्नी कामावर गेल्यानंतर त्याने पुन्हा हा प्रकार सुरूच ठेवला. फेब्रुवारीपर्यंत आरोपी स्वतःच्या मुलीसोबत जबरदस्ती करत लैंगिक संबंध ठेवायचा. दरम्यान दोन दिवसांपूर्वी बालहक्क समितीने नांदेड सिटी परिसरात अशा प्रकारचे कृत्य घडत असल्याची माहिती पुणे पोलिसांना दिली होती. त्यानंतर नांदेड सिटी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी वडिलांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

याप्रकरणी पुण्यातील नांदेड सिटी पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोस्को कायद्यांतर्गत नराधम बापावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ४५ वर्षीय नराधम बापाला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. बाल हक्क समितीने हा प्रकार उघडकीस आणला आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करत नराधम बापाला शनिवारी बेड्या ठोकल्या. पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.

दरम्यान, पुण्यातल्या स्वारगेट एसटी डेपोमध्ये २५ फेब्रुवारीला तरुणीवर बलात्कार करण्यात आला होता. पुण्यावरून ही तरुणी फलटणला निघाली होती. आरोपी दत्ता गाडेने या तरूणीवर शिवशाही बसमध्ये बलात्कार केला. याप्रकरणी पुणे पोलिसांनी ७० तासांनंतर आरोपीला शिरूर येथून अटक केली. आरोपी सध्या पोलिस कोठडीमध्ये आहे. आज आरोपीची डीएन चाचणी केली जाणार आहे.

भाजप केंद्रीय राज्यमंत्री मुलीसोबत सुरक्षारक्षक असतानाही छेडछाड, मुक्ताई मंदिरात नेमकं काय घडलं?

0

पुण्यातील स्वारगेट येथील तरूणीवर झालेल्या अत्याचाराचा मुद्दा तापलेला असतानाच भाजपच्या एका बड्या नेत्याच्या मुलीची छेड काढण्याचा प्रकार घडलाय. भरयात्रेत काही टवाळखोरांनी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसह तिच्या मैत्रिणींची छेड काढली.सुरक्षारक्षक असूनही टवाळखोरांनी मुलींची छेड काढली.

या प्रकरणी आरोपींविरोधात पोक्सोअंतर्गत गु्न्हा दाखल केला असून, पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. पण त्या दिवशी नेमकं घडलं काय? हे प्रकरण कधी आणि कुठे घडलं?

नेमकं घडलं काय?

जळगावातील मुक्ताईनगर येथे यात्रा सुरू आहे. ही यात्रा खूप मोठी असते. या यात्रा महोत्सवात केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांची मुलगी तिच्या मैत्रिणीसोबत गेली होती. रक्षा खडसे यांची मुलगी तिच्या मैत्रिणींसोबत आकाशपाळण्यामध्ये गेली. मात्र, अचानक काही टवाळखोर आले. त्यांनी मुलींची छेड काढली.

सुरक्षारक्षकांनी टवाळखोरांना अडविण्याचा प्रयत्न केला. परंतु टवाळखोर त्यांच्यासमोर बधले नाहीत. मुलींना धक्काबुक्की केली. नंतर पसार झाले. सुरक्षारक्षकानं तातडीनं पोलीस ठाण्यात जात तक्रार दाखल केली. याची माहिती रक्षा खडसे यांना मिळाल्यानंतर त्यांनी तातडीनं पोलीस ठाण्यात धाव घेतली. काही तासात आरोपींना अटक झालीच पाहिजे, अशा सूचना त्यांना दिल्या.

पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

आरोपींवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, आरोपींना पकडण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही. खडसे यांनी आरोपींवर लवकरात लवकर कारवाई झाली पाहिजे, अशा सूचना दिल्या आहेत. या प्रकरणात जळगावाचं वातावरण तापलंय. मंत्र्यांच्या मुलीही सुरक्षित नाहीत का? असा सवाल उपस्थित होत आहे.

स्वारगेटमध्ये जे घडलं ते दोघांच्या सहमतीनेच;अत्याचार प्रकरण आरोपीच्या वकिलाचा कोर्टात मोठा दावा, नक्की काय घडले

0

पुणे येथील स्वारगेट बसस्थानकावर 25 फेब्रुवारी रोजी एका 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार झाला. यानंतर राज्यभरात संतापाचा उद्रेक झाला. या प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याला अखेर 72 तासानंतर पोलिसांनी अटक केली आहे. त्याला शुक्रवारी संध्याकाळी कोर्टात सादर करण्यात आले. यावेळी पोलिसांनी त्याची 14 दिवसांची पोलीस कोठडी मागितली. परंतु आरोपीच्या वकिलांनी आरोपीचा बचाव करताना मोठा दावा केला. मुलगी स्वतःहून बसमध्ये गेलीय. मुलीच्या मर्जीने हे संबध झाले आहेत, असे आरोपीचे वकील कोर्टात म्हणाले. सरकारी वकिलांनी आरोपीच्या वकिलांचा दावा खोडून काढला. दरम्यान, दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकल्यानंतर कोर्टाने आरोपीला 12 मार्चपर्यंत पोलीस कोठडी दिली.

काय म्हणाले आरोपीचे वकील

कोर्टात युक्तीवाद करताना आरोपीचे वकील वजीदखान बीडकर, साजिद खान यांनी म्हटले की, मुलगी स्वतःहून बसमध्ये गेली. मुलीच्या मर्जीने हे संबध झाले आहेत. दोघांच्या सहमतीने हे सगळं झाले आहे. त्यामुळे आरोपीला जास्तीत जास्त दोन दिवस कोठडी द्यावी. आरोपीचे फोटो माध्यमांमध्ये आले आहेत. मग बुरखा घालून आरोपीला कोर्टात का आणले गेले? असा प्रश्न आरोपीच्या वकिलांनी विचारला.

आरोपीवर गुन्हे दाखल आहेत. पण गुन्हे सिद्ध झाले नाहीत. त्यामुळे त्याला सराईत गुन्हेगार म्हणता येणार नाही. हे प्रकरण माध्यमांमुळे वाढले आहे. त्यामुळे आरोपीला 2 दिवसांची पोलीस कोठडी द्यावी, अशी मागणी वकील वजीदखान यांनी केली.

सरकारी वकिलांनी खोडला दावा

सरकारी वकिलांनी आरोपीच्या वकिलांचा दावा खोडून काढला. सरकारी पक्षातर्फे कोर्टात सांगण्यात आले की, आरोपीने ताई म्हणत फिर्यादीला फसवले. तुमच्या गावाला जाणारी बस कोठे लागते ते दाखवतो, असे सांगून बसमध्ये घेऊन गेला. आरोपी सराईत गुन्हेगार आहे. त्याचावर 6 गुन्हे दाखल आहे. त्यातील 5 महिला फिर्यादी आहेत. यावरून आरोपीचा महिलाकडे बघण्याचा दृष्टीकोन समजतो.

यासाठी हवी 14 दिवसांची कोठडी

आरोपीने आणखी असे गुन्हे केले आहेत का? याचा तपास करायचा आहे. आरोपीने गुन्हा केल्यानंतर तो कोणाच्या संपर्कात होता? याचा तपास करायचा आहे. गुन्हा केला तेव्हा आरोपीकडे मोबाईल होता. त्याचा तपास करायचा आहे, यामुळे आरोपीला 14 दिवसांची पोलीस कोठडी मिळावी, अशी मागणी सरकारी पक्षाकडून करण्यात आली.

स्वारगेट बलात्कार प्रकरण: तरुणीसोबत नेमकं काय घडलं?; युक्तिवाद काय! आरोपी गाडेला 12 मार्चपर्यंत पोलीस कोठडी

0

पुण्यातीस स्वारगेट बस स्थानकात उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार करणारा आरोपी दत्तात्रय गाडेला 12 मार्चपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आलीय. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी टी.एस. गायगोले यांनी असे आदेश दिले आहेत. मागील दोन- तीन दिवसांपासून आरोपी गाडे फरार होता. गुरुवारी मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास पुणे पोलिसांनी आरोपी गाडेच्या शिरुर येथून मुसक्या आवळल्या आणि त्याला अटक केली. दरम्यान, स्वारगेट बलात्कार प्रकरणात तरुणीसोबत नेमकं काय घडलं? कोर्टात दोन्ही बाजूंनी काय युक्तीवाद करण्यात आला, याबाबत सविस्तर माहिती जाणून घ्या…..

तपास अधिकारी नंद्रे यांनी म्हटलं की, पहाटे 5.45  वेळी वाट बघत उभ्या होत्या. ते तुम्हाला कुठे जायचं आहे? फिर्यादी यांनी सांगितले की, इथून बस जाते. मी 15 वर्ष इथे काम करतो. माझ्यावर विश्वास ठेवा. वारंवार ताई ताई म्हणत, त्याने विश्वास संपादन केला. तिच्यावर विश्वास ठेऊन आणि ते या शब्दाचा मान ठेऊन ती त्याच्या सोबत गेली. एकही प्रवासी दिसला नाही म्हणून त्या माघारी येऊ लागल्या. दादा मला खाली जायचे आहे. त्याने दरवाजा लावला आणि गळा दाबून अत्याचार केला.

तिच्यावर पुन्हा एकदा लैंगिक अत्याचार केला. त्या रडू लागल्या. मूळ गावी जाणाऱ्या बस मध्ये बसल्या. आणि मित्राला फोन केला. मित्राला कॉल  केल्यानंतर त्याने पोलिसांना माहिती द्यायला सांगितलं. त्यानुसार तक्रार दाखल झाली. समाजात तीव्र पडसाद उमटले आहेत. त्याच्या हातात मोबाईल दिसत आहे. त्याचे कपडे आणि मोबाईल जप्त करणे आहे. सर्वांगांनी वैद्यकीय तपासणी करणे अनिवार्य आहे. अशा प्रकारचे गुन्हे त्याने केले आहेत का? यामध्ये आणखी कोणी साथीदार आहेत का? हे बघायचे आहेत. त्याला इतके दिवस कोणी सहारा दिला? याची माहिती घ्यायची आहे.हा आरोपी सराईत आहे. आतापर्यंत 6  गुन्हे आहेत. यातील जबरी चोरीचा गुन्हा आहे. एक गुन्हा वगळता त्याने सर्व गुन्हे महिलांसोबत केले आहेत. त्यामुळे त्याची 14 दिवसांची रिमांड मिळणे गरजेचे आहे.

डिफेन्स लॉयर यांनी कोर्टात युक्तीवाद केला की, ती मुलगी बस मध्ये स्वतःहून गेली आहे. CCTV मध्ये कुठेही तो तिला घेऊन गेलेला दिसत नाही. दोघांमध्ये झालेली गोष्ट एकमेकांच्या संमतीने झाले आहेत. हे बलात्काराच्या प्रकरणात येत नाही. दोघांच्या संमतीमुळे हे झाले आहे. फक्त भावनिक करण्याचा प्रयत्न आहे. माध्यमांवर वर माझा चेहरा दीसला आहे. मला रेकॉर्ड वर घेतलं तरी माझ्या एकट्याचा रोल नाही. गुन्हा सिद्ध झाला तर गुन्हा होतो. माझ्यावर गुन्हा सिद्ध झालेला नाही. मला सराईत गुन्हेगार कसे म्हणत आहेत? माझा भाऊ माझ्यासारखा दिसतो म्हणून त्याला का ताब्यात घेतलं? माध्यमामुळे आरोप होत आहेत.

महाराष्ट्र पुन्हा संतापला! सेन्सॉर बोर्डाचा उर्मटपणा.. ‘कोण आहेत नामदेव ढसाळ?’ प्रखरता सामाजिक संदेश खटकले

0

दलित समाजातील जळजळीत वास्तव ‘गोलपीठा’ या कविता संग्रहातून समाजासमोर आणणारे दलित, गोरगरिबांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात दलित पँथरसारख्या चळवळीतून विद्रोहाची तलवार उपसणारे पद्मश्री, विद्रोही कवी नामदेव ढसाळ यांचा जीवनावर आधारित ‘चल हल्लाबोल’ या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाने परवानगी नाकारली आहे. धक्कादायक बाब म्हणजे सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटातील सर्व कविता काढून मगच प्रदर्शित कराव्यात अशी अट निर्मात्यांसमोर ठेवली. इतकंच नाही तर त्यांनी थेट ‘कोण नामदेव ढसाळ, आम्ही ओळखत नाही’ असा सवाल नोटीसमध्ये विचारल्याने नव्या वादाला तोंड फुटलं आहे.

सेन्सॉर बोर्डाला त्यांच्या कवितांतील प्रखरता आणि सामाजिक संदेश खटकले आहेत. बोर्डाच्या म्हणण्यानुसार, या कविता काढल्याशिवाय चित्रपटाला परवानगी मिळणार नाही. यावर या सिनेमाचे दिग्दर्शक आणि निर्माते महेश बनसोडेंनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की, ‘नामदेव ढसाळ यांच्याशिवाय हा चित्रपट अपूर्ण आहे. त्यांच्या कविता हा चित्रपटाचा आत्मा आहेत.’

दरम्यान, चित्रपटाच्या प्रदर्शनाला उशीर झाल्याने निर्मात्यांचे आर्थिक नुकसान होत असून, ते याविरुद्ध कायदेशीर लढा देण्याच्या तयारीत आहेत.

सेन्सॉर बोर्डाचे अधिकारी रेवणकर आणि सय्यद रबी हश्मी यांनी चित्रपटाच्या निर्मात्यांना याबाबत नोटीस पाठवली होती. त्यात नामदेव ढसाळ कोण आहे, आम्हाला माहीत नाही. त्यांच्या कविता काढल्या तरच चित्रपटाला परवानगी मिळेल असा फतवा काढल्याने दलित समाजाकडून संताप व्यक्त केला जात आहे. UA साठी रिजेक्ट करण्यात आला असून A श्रेणीसाठी सेन्सॉर बोर्डाने अनेक सूचना केल्या आहेत.

सेन्सॉर बोर्डाने नोटीसीत काय म्हटलंय?

वाघ्या-मुरळीचा डान्सला ज्याला आपण लोकनृत्य म्हणतो त्याला काय म्हणतात हे सेन्सॉर बोर्डाला माहीत नव्हतं. नोटीसीत स्टेज डान्स लिहिलं आहे.

मंदिराचे सीन्स काढायला सांगितलं.

हरामखोर शब्द काढून टाकण्याची सूचना

नामदेव ढसाळ्यांच्या कवितेतील शिव्या काढण्याची सूचना

कोण नामदेव ढसाळ, आम्हाला माहीत नाही असं अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.

आता सोशल मीडियावर या निर्णयाविरुद्ध तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेकांनी सेन्सॉर बोर्डावर अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटल्याचा आरोप केला आहे. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यास ढसाळ यांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचतील, अशी आशा चाहत्यांना आहे. आता सर्वांचे डोळे निर्मात्यांच्या पुढील कारवाईकडे लागले आहेत.

पुणे बलात्कार प्रकरणी सर्वात मोठा धक्कादायक दावा, पीडितेची महिनाभराची ओळख अन् इतक्या रुपयांचा व्यवहार

0

पुण्यात एका 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याची मंगळवारी (२५ फेब्रुवारी) पहाटे खळबळजनक घटना घडली. पुण्यातील स्वारगेट एसटी डेपोमध्ये असलेल्या शिवशाही एसटी बसमध्ये तिच्यावर अतिप्रसंग करण्यात आला. या घटनेनतंर संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी दत्तात्रय गाडे अटक करण्यात आली असून त्याला 12 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दत्तात्रय गाडे हा 35 वर्षांचा असून तो शिरुरच्या गुनाट गावात राहतो. याच गावातून पोलिसांनी दत्तात्रय गाडेच्या मुसक्या आवळल्या. पुण्यातील अत्याचार प्रकरणी नवनवीन खुलासे समोर येत आहेत. त्यातच आता आणखी एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे.

पुणे बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या दत्तात्रय गाडेच्या परिचयातील एका वकिलाने धक्कादायक दावा केला आहे. आरोपी आणि पीडित महिनाभरापासून एकमेकांना ओळखायचे, असा दावा अॅड. सुमीत पोटे यांनी केला आहे. घटनेवेळी आरोपी आणि पीडितेमध्ये साडेसात हजारांचा पैशांचा व्यवहार झाला, असेही सुमीत पोटे यांनी सांगितले. मात्र या पैशांच्या व्यवहाराबाबत सुनावणीवेळी कोणताही उल्लेख झाला नाही, अशी माहिती त्यांनी दिली. ते टीव्ही 9 मराठीशी बोलत होते.

आरोपी आणि त्या सदर तरुणीशी ३१ दिवसांपासून ओळख

“आम्ही कोर्टाच्या परवानगीने आरोपीशी चर्चा केली. आरोपीने आम्हाला जी माहिती दिली आहे, त्यानुसार आरोपी आणि त्या सदर तरुणीशी ३१ दिवसांपासून ओळख आहे. जर तुम्ही सीसीटीव्ही फुटेज नीट पाहिलं, तर ती तरुणी आरोपीच्या मागे मागे जात आहे. तसेच आरोपी तिला घेऊन जाताना कुठेही जबरदस्ती करत नाही. तसेच बसमधून उतरतानाही आधी आरोपी खाली येतो, त्यानंतर ती येते. त्यानंतर अवघ्या ५० मीटर अंतरावर स्वारगेट पोलीस स्टेशन असताना ती तिथे तक्रार करण्यासाठी तिथे गेली नाही. त्यानंतर ती स्वत:च्या गावाकडे गेली. यानंतर ती हडपसरमध्ये उतरली आणि तिने पुन्हा स्वारगेटमध्ये येत पोलिसात तक्रार दाखल केली”, असे अॅड. सुमीत पोटे यांनी सांगितले.

आरोपीने साडेसात हजार रुपये रोख स्वरुपात दिले

“त्या महिलेला मी साडेसात हजार रुपये रोख स्वरुपात दिले आहेत. त्यावरुन त्यांचे वाद झाले. यानंतर तो आरोपी निघून गेला आणि कुठेही जबरदस्ती केलेली नाही. त्याने तिला ऑनलाईन पैसे देतो, असे सांगितलं. तर तिने ऑनलाईन नको रोख हवे असं सांगितले. त्यामुळे त्याने रोख पैसे दिले. माझं आणि आरोपींचं युक्तीवादानंतर बोलणं झालं. त्यामुळे मी याबद्दल कोर्टाला काहीही सांगितलेले नाही”, अशीही माहिती अॅड. सुमीत पोटे यांनी दिली.

तो कॉल प्रशांत कोरटकरनेच…. इंद्रजित सावंत यांना धमकी देणाऱ्या कोरटकरचे CM फडणवीसांसह या नेत्यांशी संबंध

0

इतिहास संशोधक इंद्रजित सावंतांना धमकी दिल्याचा आरोप असणाऱ्या प्रशांत कोरटकर सध्या पोलिसाना सापडत नाही. कोरटकरला ताब्यात घेऊन चौकशी करण्यासाठी कोल्हापूर पोलीस नागपुरात तळ ठोकून आहेत. तपासानंतर तो कॉल प्रशांत कोरटकरनेच केल्याचे प्रथमदर्शनी दिसून आल्याची माहिती आहे. त्याच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त असतानाही कोरटकर घरातून गायब झाला असल्याची माहिती आहे. सध्या त्याच्या मित्रासोबत कोरटकर इंदोरला पळून गेल्याचं कळतं आहे.

प्रशांत कोरटकरबाबत नवी माहिती समोर…

दरम्यान, आता या प्रशांत कोरटकरबाबतच्या अनेक गोष्टी समोर येत आहेत. विशेष म्हणजे त्याची लाईफस्टाईफ. त्याचे महागड्या गाड्यांमध्ये फिरतानाचे व्हिडीओ आणि देवेंद्र फडणवीसांसह अनेक दिग्गज नेत्यांसोबतचे हसत खेळतानाचे फोटो आणि व्हिडीओ…..

काही फोटो जे समोर आले आहेत त्यावरुन कोरटकरचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांशी अत्यंत जवळचे संबंध असल्यासारखे दिसून येत आहे. यावरुन सोशल मीडियात काही नेटीजन्स फडणवीसांना देखील घेरत आहेत. ‘इंद्रजित सावंत यांनी पोलिसात तक्रार दाखल केली तरी चौकशीत काहीच साध्य होणार नाही. पोलिसच काय.. महाराष्ट्र प्रशासन देखील प्रशांत कोरटकरांच्या पाठीशी आहे.’ असं एका यूझरने म्हटलं आहे.

याशिवाय कोरटकरचे एकनाथ शिंदे यांच्यासोबत देखील फोटो आणि सेल्फी व्हिडीओज आहेत. शिवाय भाजप-महायुतीच्या अन्य काही नेत्यांसोबतही त्याचे फोटो दिसून आले आहेत. याशिवाय बड्या-बड्या अधिकाऱ्यांसोबतचे फोटो देखील दिसून येत असल्याने त्याच्यावर होणाऱ्या कारवाईबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.

त्याचे महागड्या गाड्यांमध्ये फिरतानाचे काही व्हिडीओज देखील आम्हाला सोशल मीडियात मिळाले. एकूणच प्रशांत कोरटकरवर धमकी प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर आता तो पोलिसांना मिळत नाहीए. त्याची ही लाईफस्टाईल आणि नेत्यांसोबतचे सख्य पाहता त्याच्यावर काय कारवाई होते हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

मातोश्रीवर आमदारांची बैठक; ‘मविआ’त पुन्हा बेबनाव?ठाकरेंची शिवसेना या पदाचा विधानसभा अध्यक्षांकडे दावा

0

मुंबई : ठाकरेंची शिवसेना लवकरच विरोधी पक्षनेते पदाचा दावा विधानसभा अध्यक्षांकडे करणार आहे. आज मातोश्रीवर आमदारांची बैठक झाली. या बैठकीमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनात पक्षाशी रणनीती आणि विरोधी पक्ष नेते पदासंदर्भात चर्चा झाली आहे. विरोधी पक्षनेते पदासाठी भास्कर जाधव, आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभू यांच्या नावावर विचार झाल्याची माहिती मिळत आहे. अनुभव आणि विषय मांडण्याची आक्रमकता पाहता भास्कर जाधव यांचं नाव विरोधी पक्षनेते पदासाठी आघाडीवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

आमदारांच्या बैठकीत नेमकं काय झालं?

विरोधी पक्षनेते पदा संदर्भात विधानसभा विधान परिषद आमदारांसोबत तासभर उद्धव ठाकरे यांनी चर्चा केली आहे. आपणच आपल्यापैकी नाव विरोधी पक्षनेते पदासाठी सांगावं असं उद्धव ठाकरे यांनी आपल्या आमदारांना सांगितलं आहे. मात्र, पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे जो निर्णय घेतील सर्व आमदारांना मान्य असेल असं मत बैठकीत आमदारांकडून व्यक्त करण्यात आलं आहे. विरोधी पक्षनेते पदासाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून दावा केला जात असताना नाव जरी समोर आलं नसलं तरी पत्रावर सर्व आमदारांच्या सह्या घेण्यात आल्या आहेत. दरम्यान, विरोधी पक्षनेता नेमकं कोण होणार याचा निर्णय अद्याप झाला नसला तरी भास्कर जाधव, आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभू यांची नावं आघाडीवर आहेत.

महाविकास आघाडीतील मित्रपक्षांनांही विश्वासात घेणार

विरोधी पक्षनेते पदासाठीच ठाकरेंच्या शिवसेनेकडून पत्र लवकरच विधानसभा अध्यक्षांना  देण्यात येणार आहे. विरोधी पक्षनेते पदावर ठाकरेंच्या शिवसेनेकडून दावा सांगत असताना महाविकास आघाडीतील मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्ष आणि काँग्रेस या दोन पक्षांना सुद्धा विश्वासात घेतलं जावं यासंदर्भात नेत्यांमध्ये चर्चा झाली आहे. त्यामुळे मित्र पक्षांसोबत सुद्धा ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते चर्चा करणार आहेत. विधानसभा विरोधी पक्षनेते पदावर दावा करत असताना विधान परिषद विरोधी पक्षनेते संदर्भात काय करायचं यावर सुद्धा उद्धव ठाकरे यांनी आपल्या आमदारांसोबत चर्चा केली आहे. सोबतच राज्यातील सध्याचे विषय खास करुन सर्वसामान्यांच्या अडचणी मुंबई आणि ग्रामीण भागातील विषय या सगळ्या संदर्भात अर्थसंकल्पीय अधिवेशनात कोणते नेमके महत्त्वाचे विषय मांडायचे यावर आमदारांसोबत चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे.