Home Blog Page 168

संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे फोटो व्हायरल, वातावरण तापलं, आज बीड जिल्हा बंदची हाक

0

बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होऊन आता जवळपास तीन महिन्यांचा कालावधी उलटला असून अजूनही एक मारेकरी बाहेर मोकाट फिरतोय. तर बाकीच्या आरोपींना मोक्का लावण्यात आला आहे. या निर्घृण हत्येने संपूर्ण राज्य हादरलं आहे. संतोष देशमुख यांची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली. याच दरम्यान काल रात्री देशमुख यांच्या हत्येचे काही फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत. अत्यंत क्रूरतेने, आणि बेदमपणे मारहाण करून देशमुख यांचा जीव घेण्यात आला. त्यांच्या हत्येचे हे फोटो समोर आले असून सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले असून त्यामुळे बीड जिल्ह्यात संतापाची लाट उसळल्याचं दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर आज , मंगळवार 4 मार्च रोजी बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे.

संतोष देशमुख यांची क्रूरपण हत्या करणाऱ्या आरोपींना फाशी दिली जावी अशी मागणी करण्यात येत आहे. देशमुख हत्या प्रकरणातील आरोप पत्रात, सरपंच देशमुख यांची हत्या नेमकी कशी झाली याचे फोटो समोर आले. त्यानंतर संतापाची लाट पसरली आहे. त्याच पार्श्वभूमीवर हा बंद पुकारण्यात आला आहे. एक दिवस कुलूप लावून शासनाचा निषेध करण्याचे आवाहन या बंददरम्यान करण्यात येत आहे,

हत्येचे फोटो व्हायरल

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी सीआयडीने चार्जशीट दाखल केली आहे. यात 66 पुरावे आणि 184 जबाब महत्त्वाचे ठरले आहेत. सध्या हे प्रकरण न्यायालयात असून याप्रकरणी नवनवीन खुलासे समोर येत आहेत. संतोष देशमुख हत्येप्रकरणी दाखल केलेल्या आरोप पत्रातून अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत. त्यातच आता संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली या प्रकरणी, हत्येचा घटनाक्रम दाखवणारे फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत. फोटोमध्ये आरोपींनी देशमुख यांना केलेली अमानुष मारहाण आणि हत्या कशी केली हे स्पष्टपणे दिसून येते. या हत्येच्या कटात सहभाग असलेले आरोपीही या फोटोत दिसत आहेत. विष्णू चाटे, सुदर्शन घुले, प्रतीक घुले, सुधीर सांगळे, महेश केदार, जयराम चाटे, कृष्णा आंधळे हे सर्वजण या फोटोत पाहायला मिळत आहे. हे फोटो आणि व्हिडिओ अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एकाच्या स्मार्टफोनवर शूट करण्यात आले होते.

ते फोटो पाहून शब्दच फुटत नाहीत, त्या कुटुंबाचं काय होत असेल ? बजरंग सोनावणे यांचा उद्विग्न सवाल

0

बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला आता जवळपास तीन महिने होत आले आहेत. 9 डिसेंबर रोजी त्यांची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या मुद्यावरून गेल्या कित्येक दिवसांपासून राज्यातील वातावरण अतिशय तापलेलं असून काल रात्री एक महत्वाची घडामोड घडली. संतोष देशमुख यांच्या हत्येचा एक व्हिडीओ आणि काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अत्यंत निर्दयीपणे आरोपींनी त्यांची हत्या केली आणि त्यानंतरही तके हसत होते. हे भीषण फोटो पाहून कोणाच्याही काळजाचं पाणी होईल. मात्र हे व्हिडीओ समोर आल्यामुळे आता राजकीय घडामोडींनाही वेग आला असून काल रात्री देवगिरी बंगल्यावर एक महत्वाची बैठक पार पडली. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, धनंजय मुंडे यांच्यासह अनेक महत्वाचे नेते उपस्थित होते. त्यात झालेल्या चर्चेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडेंना राजीनामा देण्यास सांगितल्याची माहिती समोर आली असून आज थोड्याच वेलात धनंजय मुडे मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा सुपूर्त करू शकतात, अशी माहिती समोर येत आहे.

बजरंग सोनावणेंचा उद्विग्न सवाल

संतोष देशमुखांच्या हत्येनंतर त्यांना न्याय मिळावा, आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी ही मागणी धरून लावणारे बीडचे खासदार बजरंग सोनावणे यांनी टीव्ही9 मराठीशी संवाद साधत या सर्व मुद्यावर त्यांची भूमिका मांडली. ” मुख्यमंत्र्यांनी मुंडेंना राजीनामा देण्यास सांगितलं, हे मी तुमच्या माध्यमातून ऐकत आहे. पण कशामुळे एवढा वेळ लागतोय ? याचं उत्तर दिलं पाहिजे. इतकं वाईट कृत्य होऊ आता इतके दिवस उलटून गेलेत , तरी आत्तापर्यंत राजीनामा का घेतला गेला नाही ? ” असा सवाल सोनवणे यांनी उपस्थित केला. ” कुठल्या मंत्र्यांना मंत्रीमंडळात ठेवायचं किंवा बडतर्फ करायचं याचा अधिकार त्यांना ( मुख्यमंत्री) आहे. तो सर्वस्वी अधिकार मुख्यमंत्र्यांकडे असतो, याच्यावर त्याच्यावर ढकलाढकली न करता त्यांनी निर्णय लवकर घ्यायला पाहिजे. तरचं हे लोकं काहीतरी करत आहेत असं बीड जिल्ह्यातील जनतेला वाटेल. माणुसकीला काळिमा फासणारी एवढी भीषण घटना आमच्या जिल्ह्यात घडली, ते फोटो पाहून तोंडातून शब्दसुद्धा उच्चारता येत नाहीयेत, आम्हालाही काळजात काही होतंय, मग त्या कुटुंबाचं काय होत असेल ? ” असा सवाल उपस्थित करत सोनावणे यांनी सरकारला जाब विचारला आहे.

नीतीमत्ता तर नाहीच पण संवेदनशीलताही नसावी ?

त्या मुलीने, त्या भावाने, त्या आईने काय करावं ? एवढी घटना घडूनही जर त्यांच्याकडे नीतीमत्ता तर नाहीच पण संवेदनशीलताही त्यांच्याकडे नसेल तर या लोकांना , राजकारण्यांना काय करायचं ? असा उद्विग्न सवाल त्यांनी केला. महाराष्ट्रातल्या एवढ्या जनतेचे हाल होत असतील, तर या राजकारणी मंडळींनी स्वत:साठी करायचं आणि जनतेसाठी काहीच करायचं नाही असा त्यांचा उद्देश दिसतोय, अशी टीकाही त्यांनी केली. माझ्याकडेल बोलण्यासारखे शब्दच नाहीत आता, असं सोनावणे म्हणाले.

संताप, संताप, संताप. त्या आरोपींना गोळ्या घाला, धनंजय देशमुख यांचा भावनावेग, तुमचे मन सुद्धा हेलावेल

0

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचे फोटो, व्हिडिओ समोर आल्यानंतर राज्यात एकच संतापाची लाट उसळली आहे. संतोष देशमुख यांची क्रूर हत्या करण्यात आल्याचा आरोप होता. गृहखात्याकडे सर्व फोटो, व्हिडिओ असतानाही आरोपी वाल्मिक कराड याला व्हिआयपी ट्रीटमेंट देण्यात येत आली. मुद्दामहून सीसीटीव्ही बंद ठेवण्यात आल्याचा आरोप होत आहे. याप्रकरणी संतोष देशमुख यांचा भाऊ धनंजय देशमुख यांनी यावर प्रतिक्रिया दिली. एक फोटो पाहून त्यांच्या मनातील घालमेल समोर आली. त्यांचा असंतोष समोर आला. या आरोपींना गोळ्या घालण्याची मागणी त्यांनी केली आहे.

……..काय म्हणाले धनंजय देशमुख?

मी निःशब्ध

मी तर एकच फोटो पाहायला आणि असे सांगताना धनंजय देशमुख यांनी आंवढा गिळला. ते म्हणाले की मला संतोष देशमुख यांच्यासोबतचे लहानपणीचे दिवस आठवले. फोटो, व्हिडिओ बघून मी निःशब्द झालो. त्यांचा शेवटचा दिवस आठवला. हे सहन नाही होऊ शकत. रात्री गावकरी आले होते. जो येईल, त्याच्या गळ्यात पडून रडावं वाटत होतं.

नियती त्यांना कधीच माफ नाही करणार

आता काय करावं ते समजत नाही. माझा चार वर्षांचा मुलगा म्हणतो की, संतोष अण्णा आल्यावर मी शाळेत जाईल. एका निष्पाप व्यक्तीचा बळी घेतला गेला ते आरोपी, त्यांचे समर्थक हे भविष्याची चिंता करत आहेत, पण त्यांना एक निष्पाप माणूस मेला याचे दुःख नसल्याची प्रतिक्रिया धनंजय देशमुख यांनी दिली.

अतिशय खालच्या स्तराची विचारसरणी घेऊन ही मंडळी जात आहेत. या आरोपींना, समर्थकांना नियती कधीच माफ करणार नाही. माझा नियतीवर संपूर्ण विश्वास आहे. यांचा काळाबाजार उठणार आहे. मला दुःख व्यक्त करण्याचा अधिकार सुद्धा या व्यक्तींनी ठेवला नाही. ही गोष्ट, ही बाब पहिल्या दिवशी समोर आली असती तर मग भयानक परिस्थिती झाली असती, आरोपी, समर्थकांनी हीच गोष्ट अपेक्षित असावी.

आरोपींना गोळ्या घाला

यावेळी धनंजय देशमुख यांनी आरोपी कुणाच्या जीवावर उडत होते. कुणाच्या जीवावर दहशत माजवत होते. कुणाच्या जीवावर हा सर्व प्रकार घडला असा सवाल केला. त्यांनी त्यावेळेच्या पोलिसांना या हत्येसाठी दोषी धरले. त्यांना सर्व माहिती असतानाही पोलिसांनी काहीच केले नाही. त्यांनी आरोपींना मोकाट सोडल्याचा आरोप केला. मागील पोलीस अधिक्षक बारगळ यांच्या मोबाईलचा सीडीआर काढला. तर त्यांना कोणत्या राजकीय नेत्यांचे फोन गेले हे समोर येईल. प्रकरण दाबण्यासाठी त्यांच्यावर कोणी दबाव टाकला हे तपासा असे ते म्हणाले.

इतक्या दिवस दुःख पाठीशी होतं. आता ते पायदळी घेणे अवघड असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. सर्व राज्याला माहिती आहे की एक ते सातपर्यंतच्या आरोपींना सांभाळणारा, त्यांना वाचवणारा माणूस कोण आहे. आरोपी कुणाच्या जीवावर उडत होते, अशी प्रतिक्रिया देत त्यांनी धनंजय मुंडे यांच्याकडे अंगुली निर्देश केला. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याविषयी बोलताना त्यांचा संताप समोर आला. ही परिस्थिती आमच्यावर का आली याचं उत्तर सरकारने द्यावे असे ते म्हणाले. सर्व मंत्रिमंडळ जरी बरखास्त केलं तरी फायदा काय, माझ्या भावाला ज्यांनी मारलं, त्यांना गोळ्या घालून मारलं तरच आम्ही त्यावर बोलू अशी प्रतिक्रिया धनंजय देशमुख यांनी दिली.

अघोरी राक्षसच! कपडे फाडले, चेहऱ्यावर लघुशंका, हसून सेल्फी अन्… संतोष देशमुखांच्या हत्येची क्रूरता पाहून तुम्हीही हादराल!

0

बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा पुरावा आता समोर आला आहे. संतोष देशमुखांना मारहाण करताना, त्यांची निर्घृण हत्या करतानाचे काही फोटो आणि व्हिडीओ आता समोर आले आहेत. या फोटोत संतोष देशमुखांची हत्या कशी करण्यात आली, त्यांना कशा पद्धतीने अमानुष मारहाण करण्यात आली, याचा घटनाक्रम समोर आला आहे. या हत्येच्या कटात सहभाग असलेले आरोपीही या फोटोत दिसत आहेत. विष्णू चाटे, सुदर्शन घुले, प्रतीक घुले, सुधीर सांगळे, महेश केदार, जयराम चाटे, कृष्णा आंधळे हे सर्वजण या फोटोत पाहायला मिळत आहे.

संतोष देशमुखांच्या हत्येची क्रूर कहाणी

  • पहिल्या फोटोत जनावरांप्रमाणे मारहाण केल्यानंतर जयराम चाटे संतोष देशमुख यांची पँट काढतोय.
  • दुसऱ्या फोटोत आरोपी महेश केदार हा त्या दृष्याचे सेल्फी घेत हैवानासारखा हसतो.
  • तिसऱ्या फोटोत अमानुष मारहाणीनंतर संतोष देशमुख अर्धमेले झाले, तेव्हा प्रतिक घुले देशमुखांच्या छातीच्या           दोन्ही बाजूला पाय टाकून चेहऱ्यावर लघवी करतो.
  • सुदर्शन घुले देशमुखांच्या शेजारी उभा राहून फोटो काढतो. त्यावेळी हैवानी आवेश चेहऱ्यावर दिसतोय.
  • मारेकरी जयराम चाटे देशमुखांच्या अंगावर शर्ट ओरबाडून काढतो. काढलेला शर्ट हातात धरुन हसतो.
  • यानंतर मारेकरी पाईप आणि वायरने देशमुखांवर वार करतात. लाथा-बुक्क्यांनी मारहाण शिवीगाळ होते.
  • वायरीसारख्या हत्याराचं बंडल देशमुखांच्या पाठीवर मारुन वार केले जात आहेत
  • दृश्य पाहून जल्लाद – राक्षसांना पाझर फुटेल, अशावेळी महेश केदार सारं हसत हसत शूट करतो.
  • मारहाणीनंतर सुदर्शन घुले हा सगळ्यांचा बाप आहे, असं देशमुखांनी म्हणावं, यासाठी त्यांना जबरदस्ती केली               जाते.
  • संतोष देशमुखांना अंतर्वस्त्रावर बसवून त्यांच्या पाठीवर पाईपने मारहाण होते.
  • हैवानासारख्या मारहाणीनंतर देशमुखांना शरीरातील रक्त ओघळून त्यांच्या तळपायापर्यंत आल्याचे दिसतंय

बीडमधील वातावरण पुन्हा एकदा तापले

संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचे 8 फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर बीडमधील वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. हे सर्व फोटो संवेदनशील आहेत. त्यामुळे हे फोटो आम्ही प्रसिद्ध करु शकत नाही.

बीडचे एसपी नवनीत कॉवत यांचे आवाहन

हे फोटो व्हायरल झाल्यानंतर आता बीडचे एसपी नवनीत कॉवत यांनी जनतेला आवाहन केले आहे. समाज माध्यमांवरील फोटो मन विचलित करणार आहे. हे प्रकरण न्याय प्रविष्ट आहे. जनतेने कायदा हाती घेऊ नये, असे आवाहन बीडचे एसपी नवनीत कॉवत यांनी केले आहे.

देवेंद्र फडणवीसांकडून धनंजय मुंडेंना राजीनामा देण्याचे आदेश; राजकीय घडामोडींना वेग

0

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे  यांना राजीनामा देण्यास सांगितले आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातले धक्कादायक फोटो समोर आल्यावर काल (3 मार्च) रात्री उशिरा राजकीय घडामोडींना वेग आला आहे. देवगिरी बंगल्यावर सोमवारी रात्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, सुनील तटकरे आणि धनंजय मुंडे यांची बैठक पार पडली होती. या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस यांना धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्यास सांगितल्याचे सूत्रांची माहिती आहे. त्यानुसार आज धनंजय मुंडे आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा सादर करतील, अशी शक्यता आहे.

संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा सूत्रधार वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांना निकटचा सहकारी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांच्या निवडणुकीतील प्रचाराची आणि त्यांच्या अनुपस्थितीत जिल्ह्यातील कारभाराची सूत्रे हाताळत होता. संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिक कराडचे नाव आल्यापासून धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी होत होती. मात्र, धनंजय मुंडे यांचा या प्रकरणात थेट सहभाग नाही, असे सांगत अजित पवार यांनी त्यांची पाठराखण केली होती. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचा निर्णय त्यांचा पक्ष घेईल, अशी भूमिका घेतली होती. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची केवळ चर्चाच सुरु होती. मात्र, सोमवारी संतोष देशमुख यांच्या हत्या करतानचे क्रूर फोटो समोर आल्यानंतर राज्यातील वातावरण संतप्त झाले आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेणे भाग पडल्याची चर्चा आहे.

माणसाच्या रुपातला हैवान कॅमेऱ्यात कैद

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानं महाराष्ट्र नुसता हादरला नाही , तर या हत्येच्या घटनेनं महाराष्ट्राचं समाजकारण, राजकारण ढवळून निघालं. संतोष देशमुखांची हत्या करतानाचे आरोपींचे फोटो एबीपी माझाच्या हाती लागले आहेत. माणसाच्या रुपातला हैवान कॅमेऱ्यानं कैद केला आहे. हे सर्व फोटो आणि व्हिडीओ आरोपी महेश केदारच्या फोनमधून जप्त करण्यात आले आहेत. आरोपी महेश केदारच्या फोनमधून जवळपास 15 व्हिडीओ आणि 8 फोटो जप्त करण्यात आलेत. या व्हिडीओत सुदर्शन घुलेसह इतर आरोपीही दिसतायत. कपडे काढून संतोष देशमुखांच्या जीव जाईपर्यंत मारले, व्हिडिओ काढला आणि आनंद साजरा केल्याचं फोटोमधून दिसून येत आहे.

सुदर्शन घुलेच्या कारने सांगितलं देशमुख हत्येचं कौर्य, गाडीत सापडले 19 पुरावे

0

बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो समोर आल्यानंतर राज्यभरात आरोपींविरोधात संतापाची लाट उसळली आहे. वाल्मिक कराड हाच सरपंच देशमुख यांच्या हत्येचा मुख्य सूत्रधार असल्याचे सीआयडीने आपल्या आरोपपत्रात म्हटले आहे.

तपासात आरोपी सुदर्शन घुलेच्या ब्लॅक कलरच्या एसयुव्हीने संतोष देशमुख हत्येचं कौर्य सांगितले आहे. सुदर्शन घुलेच्या कारमध्ये पोलिसांना 19 पुरावे सापडले आहेत.

वाल्मिक कराडच संतोष देशमुखांच्या हत्येचा मास्टरमाईंड असल्याचे समोर आले आहे. खंडणी, ॲट्रॉसिटी हत्या हे तिन्ही प्रकरण एकत्रित केले असून तिन्ही प्रकरण एकाच कारणातून घडल्याचा आरोप ही दोषारोप पत्रात करण्यात आला आहे. कट कुठे रचला याची माहिती आणि पुरावे सीआयडीच्या हाती लागले आहेत.

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात ब्लॅक कलरची एसयूव्ही वापरण्यात आली होती. गाडी मध्ये 19 महत्त्वाचे पुरावे सापडले आहेत. सीआयडीच्या तपासात आरोपी सुदर्शन घुलेची काळ्या रंगाची स्कार्पिओ गाडी ठरली महत्त्वाची ठरली.

सुदर्शन घुलेच्या कारमधून कोणते पुरावे सापडले…

  • – आरोपींनी वापरलेले तीन मोबाईल सापडले व्हिडिओ आढळून आला.
  • – कारमधून दोन गॉगल्स सापडले
  • – सुदर्शन घुले चे मारहाण करतानाचे काळ्या रंगाचे जॉकेटही स्कार्पिओ गाडीत सापडले.
  • – सहा आरसी बुक सापडले
  • – सुदर्शन घुलेचे, एटीएम कार्ड, पॅन कार्ड, 41 लांबीचा पाईप सापडला
  • – लोखंडी पाईप ज्याला क्लच वायर बसवून तयार केलेले हत्यार
  • – रक्ताचा डाग असलेला सीट कव्हर तुकडा सीआयडीला सापडला…

फरार आरोपी कृष्णा आंधळेच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर मारहाणीचा व्हिडीओ…

कृष्णा आंधळेची मोकारपंती असा या व्हाट्सअॅप ग्रुपचं नाव होते. या ग्रुपमध्ये 5 ते 6 जणांनी संतोष देशमुख यांना कसं मारहाण होते हे पाहिले होते. फॉरेन्सिककडून हा व्हिडिओ सीआयडीला मिळाल्यानंतर त्याचे छोटे छोटे 10 ते 12 व्हिडिओ तयार झाले आणि त्यातूनच या व्हिडीओमधील व्यक्ती आणि सीआयडीने या प्रकरणात ताब्यात घेतलेली व्यक्ती यांची फॉरेन्सिक तपासणी झाली. या व्हिडिओतील काही फोटो हे या आरोप पत्रात जोडण्यात आले आहेत. सुदर्शन घुले हा कशा प्रकारे संतोष देशमुख ला मारहाण करतोय हे दिसत आहे.

‘श्री संत तुकाराम’ इथेनॉल, को-जन प्रकल्प पूर्णत्वास; सचोटी अन् शेतकरीहित धोरणावरच तुल्यबळ लढतीस सर्वपक्षीय ‘टीम नाना’ सज्ज?

0

मुळशी, मावळ, हवेली, खेड, शिरूर तालुक्यातील शेतकरी विकास व्हावा या उदात्त हेतूने विदुरा उर्फ नानासाहेब नवले यांनी कासारसाई (ता. मुळशी) येथे संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याची निर्मिती करण्यात आल्यानंतर अद्यावत तंत्रज्ञानाने युक्त सहकारी तत्त्वावरील साखर कारखाना कार्यरत राहावा यासाठी कायमच प्रयत्न केले आहेत. सर्वपक्षीय संचालक मंडळ कार्यरत असल्याने श्री संत तुकाराम सहकारी कारखान्याच्या कोणत्याही प्रशासकीय कामासाठी या प्रणालीचा ‘दुग्ध शर्करा’ म्हणून उपयोग होत आहे. आजही महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व विद्यमान अध्यक्ष नानासाहेब नवले यांच्या नेतृत्वात संचालक मंडळ अहोरात्र काम करत आहे. आजपर्यंत कारखान्याच्या संचालकांनी सभासदांच्या हिताची अनेक कामे मार्गी लावली असून शेतकरी हित हेच महत्त्वाचे मानत कोणत्याही राजकीय परिवेशाचा विचार न करता राजकारण एका बाजूला आणि साखर कारखाना एका बाजूला अशी भूमिका घेत ‘टीम नाना’ यंदाच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.

वाढत्या शहरीकरणाच्या कचाट्यात सध्या श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे कार्यक्षेत्र दिवसेंदिवस कमी होत असताना संस्थापक नानासाहेब नवले यांच्या नेतृत्वात अत्यंत सोचटीने काम करत असताना यंदाच्या निवडणुकीमध्ये मात्र मावळ भोर वेल्हा मुळशी आणि शिरूर हवेली भागातील काही गडगंज लोकांच्या मनीषा कारखान्याचा ताबा घेण्याच्या असल्यातरी सुद्धा स्वच्छ कारभार आणि सचोटीने शेतकरी हीत जपण्यात गेले पाच वर्ष काम केले असल्याची ग्वाही त्यांच्यामार्फत दिली जात आहे. उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे संचालक तुकाराम विनोदे, दिलीप दगडे, अनिल लोखंडे, चेतन भुजबळ, बाळकृष्ण कोळेकर, शिवाजी पवार, बाळासाहेब बावकर, अंकुश उभे, मधुकर भोंडवे, सुभाष राक्षे, महादेव दुडे, शामराव राक्षे, दिनेश मोहिते, ज्ञानेश नवले, नरेंद्र ठाकर, सखाराम गायकवाड, शुभांगी गायकवाड, ताराबाई सोनवणे, प्रवीण काळजे, सुभाष जाधव या ‘टीम नाना’ चमूने कार्यकारी संचालक साहेबराव पठारे यांचे तंतोतंत नियोजन कारखान्याच्या हितास कारणी पाडले आहे.

सहकार हे घरचंच कार्य

श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखाना संचालक मंडळामधील सर्व संचालक कारखान्याच्या कोणत्याही कामात व्यक्तिगत लक्ष घालत सर्वात जास्त फायदा कारखान्याला कसा होईल याचाच विचार करत असतात. त्यामुळेच फक्त ऊस गाळप आणि त्या क्षमतेनुसार राज्य शासनाकडून काही मदत निधी मिळवणे ही भूमिका न ठेवता विभिन्न प्रकल्प शेतकरी हितार्थ राबवण्याची गेली पाच वर्ष काम केले आहे. नुकताच सुरू करण्यात आलेला इथेनॉल प्रकल्प हे त्याचेच उदाहरण….. ४५ हजार लिटर क्षमतेचा आसवणी (इथेनॉल) प्रकल्प वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने प्रकल्प अहवाल तयार केला. प्रकल्पाची किंमत ९२ कोटी ३२ लाख ठरली. प्रकल्प उभारणीस महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने ७८ कोटी रुपयांचे मध्यम मुदत कर्ज दिले. या कर्जासाठी बँकेच्या नियमानुसार स्वभाग भांडवलातून कारखान्याने १६ कोटी रुपये उभे केले. ठेकेदारांकडून दर्जेदारपणे काम करून घेतल्याने ९२ कोटी ३२ लाखांचा हा प्रकल्प ७९ कोटी ५५ लाख रुपयांमध्ये पूर्ण झाला. कमी वेळेत हा प्रकल्प उभा झाल्याने या प्रकल्पास केंद्र शासनाकडून सबव्हेंशन स्किमअंतर्गत व्याजामध्ये सवलतीच्या दराचा फायदा मिळणार आहे.

बँकेचे ७८ कोटींचे कर्ज मंजूर असतानाही ६४ कोटी ३३ लाख रुपयेच कर्ज घेतले गेले, कमी खर्चात, विक्रमी वेळेत कारखान्याने ११ महिन्यांत हा प्रकल्प कार्यान्वित केला. आज कारखान्याकडे २८ हजार लिटर इथेनॉल उपलब्ध असून 3 लाख ४१ हजार लिटर स्पिरीट तयार केले आहे. मुळशी, मावळ, हवेली, खेड, शिरूर या पाच तालुक्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याने ऊस उत्पादकांना इतर प्रकल्पांतूनही आर्थिक सक्षमता मिळावी, यासाठी इथेनॉल प्रकल्प सुरू करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला. प्रकल्पातून शासनाच्या नियमानुसार सर्व आवश्यक परवानगी घेऊन इथेनॉल व रेक्टिफाइड केलेले आहे. स्पिरिट उत्पादन सुरू केले ज्यूस किंवा सिरपपासूनही इथेनॉल उत्पादन मिळेल, अशी मशिनरी बसविली गेली आहे. भविष्यात याचाही विचार करण्याचा विद्यमान संचालक मंडळाचा मानस आहे.

बदललेल्या सत्ताकरणांच्या गणितात श्री संत तुकाराम साखर कारखान्याचे निवडणुकीचे बिगूल; आजपासून निवडणूक प्रक्रिया सुरू

0

मावळ, मुळशी, हवेली, खेड व शिरूर अशा पाच तालुक्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या आणि बदललेल्या सत्ताकरणांच्या गणितामुळे चुरशीची होणाऱ्या श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखाना संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून आज सोमवारपासून (दि.3) सुरू होत आहे. श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखाना संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया आज सोमवारपासून (दि.3) सुरू होणार महिनाभराच्या प्रचारानंतर दिनांक 5 एप्रिलला मतदान होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी मुकुंद पवार यांनी दिली.

श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखाना सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाल्याने कायमच या कारखान्यावरती विद्यमान अध्यक्ष माजी खासदार नाना नवले यांचे असलेले वर्चस्व आणि नव्या राजकीय समीकरणामुळे इच्छुकांच्या मनीषाला मिळालेले बळ यामुळे कासारसाईच्या या कारखान्याच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये कारखान्याच्या कार्यक्षेत्रामधील सर्वच भागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने नवीन नेतृत्व उदयास आले असून गट नंबर ५ खेड-हवेली- शिरूर या मतदारसंघातून पूर्वी जिल्हा परिषद सदस्य असलेले माऊली कटके तर गट नंबर 2 पौड-पिरंगुट मध्येही भोर वेल्हा मुळशी मतदारसंघातून मोठ्या घराण्याचा पराभव करून शंकर मांडेकर यांनी तालुक्यातील पकड सिद्ध केली असून या वाढत्या जनाधाराचा आधार घेत संत तुकाराम सहकारी साखर कारखाना सार्वत्रिक निवडणूक रंजक वळणावरती जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मावळ मतदार संघातून सर्वाधिक मताधिक्याने विजयी झालेल्या सुनील शेळके यांची ही मनीषा श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखाना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली चालावा अशी असल्याने गट नंबर 3 तळेगाव-वडगाव व गट नंबर 4 सोमाटणे-पवनानगर  या दोन्ही गटांमध्ये तब्बल सहा आणि लक्षणीय संचालक नियुक्त करण्यात येणार असल्याने गट नंबर तीन आणि चार या दोन गटाकडे श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याची वाटचाल आणि कारभार कोणाच्या हाती राहणार यावरती भवितव्य अवलंबून राहणार आहे. विद्यमान संचालकामध्ये बापू भेगडे यांच्यावतीने या दोन गटांवरती वर्चस्व मिळवण्यासाठी कायमच प्रयत्न सुरू असताना सर्वाधिक मताधिक्याने विजय झालेले सुनील शेळके आणि बापू भेगडे या निमित्ताने पुन्हा एकदा आमने-सामने येण्याची शक्यता नाकारता येत नाही. विद्यमान संचालक माजी खासदार विदुरा उर्फ नाना नवले यांच्या विषयी सर्व सभासदांमध्ये आप्तेष्ट पणाची भूमिका असली तरी सुद्धा संचालक मंडळाच्या कार्यभारावर या निवडणुकीचे भवितव्य अवलंबून आहे.

मावळ, मुळशी, हवेली, खेड व शिरूर अशा पाच तालुक्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या श्री संत तुकाराम साखर कारखान्यात एकूण 22 हजार 258 मतदारसंख्या असून 21 संचालक कार्यरत आहेत. संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी 3 ते 7 मार्चपर्यंत सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत समिती सभागृह, पहिला मजला, साखर संकुल, शिवाजीनगर, पुणे येथे नामनिर्देशन पत्र विक्री व स्वीकृती होणार आहे. प्राप्त नामनिर्देशन पत्राच्या छाननीची प्रक्रिया त्याच ठिकाणी १० मार्च रोजी सकाळी ११ वाजल्यापासून कामकाज संपेपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. तसेच, नामनिर्देशन पत्र मागे घेण्यासाठी २५ मार्चपर्यंत दुपारी ३ वाजेपर्यंत वेळ देण्यात आली आहे. त्यानंतर २६ मार्च रोजी अंतिम विधीग्राह्य नामनिर्देशन पत्रांची यादी प्रसिद्ध करणे व पात्र उमेदवारांना निशाणी (निवडणूक चिन्ह) वाटपाची कार्यवाही निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात करण्यात येणार आहे.

}{ श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखाना निवडणूक कार्यक्रम }{

10 मार्चला नामनिर्देशन पत्र छाननी

प्राप्त नामनिर्देशन पत्राच्या छाननीची प्रक्रिया 10 मार्च रोजी सकाळी 11 वाजल्यापासून कामकाज संपेपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे.

25 मार्च नामनिर्देशन पत्र मागे

तसेच, नामनिर्देशन पत्र मागे घेण्यासाठी दिनांक 25 मार्चपर्यंत दुपारी 3 वाजेपर्यंत वेळ देण्यात आली आहे.

26 मार्च अंतिम नामनिर्देशन पत्रांची यादी व निशाणी निवडणूक चिन्ह वाटप

दिनांक 26 मार्च रोजी अंतिम विधीग्राह्य नामनिर्देशन पत्रांची यादी प्रसिद्ध करणे व पात्र उमेदवारांना निशाणी (निवडणूक चिन्ह) वाटपाची कार्यवाही निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात करण्यात येणार आहे.

5 एप्रिलला मतदान

दिनांक 5 एप्रिल रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 5 या वेळेत मतदानप्रक्रिया घेण्यात येणार असून,

6 एप्रिल मतमोजणी

मतमोजणी दिनांक 6 एप्रिल रोजी होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी पवार यांनी दिली.

मतदारसंघ व प्रतिनिधी संख्या :

1. व्यक्ती उत्पादक सभासद

  • गट नंबर 1 हिंजवडी-ताथवडे – संचालक संख्या 3
  • गट नंबर 2 पौड-पिरंगुट  – संचालक संख्या 3
  • गट नंबर 3 तळेगाव-वडगाव  – संचालक संख्या 3
  • गट नंबर 4 सोमाटणे-पवनानगर  – संचालक संख्या 3
  • गट नंबर ५ खेड-हवेली-शिरूर  – संचालक संख्या 4

2. अनुसूचित जाती/जमाती  – संचालक संख्या  1

3. महिला राखीव प्रतिनिधी  – संचालक संख्या 2

4. इतर मागासवगीय प्रतिनिधी  – संचालक संख्या 1

5. विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग प्रतिनिधी  – संचालक संख्या 1

महायुतीत नाराजीनाट्य? एकनाथ शिंदेंचे नवं दबावतंत्र, ऐन अधिवेशनात हा मोठा निर्णय; कामकाजातून पूर्णपणे…

0

निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले असले तरी सत्ता वाटपाच्या मुद्यावरून धुसफूस सुरू असल्याची चर्चा सुरू आहे. महायुतीच्या सरकारमध्ये खाते वाटपानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील शिवसेनेमध्ये नाराजी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. विद्यमान उपमुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना त्यांनी घेतलेल्या काही निर्णयांवर चौकशी सुरू झाली आहे. तर, काही निर्णयांना स्थगिती देण्यात आली आहे. या सगळ्यावरून एकनाथ शिंदे हे नाराज असल्याचे म्हटले जात होते. आता अधिवेशनात आता त्यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

सोमवारपासून राज्याचे अर्थसंकल्पीय विधीमंडळ अधिवेशन सुरू झाले आहे. या अधिवेशनात विरोधी पक्ष हा धनंजय मुंडे, माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक होण्याची शक्यता आहे. त्याशिवाय, राज्यातील शेती आणि कायदा-सुव्यवस्थेच्या मुद्यावरही विरोधक आक्रमक होणार आहेत. अशातच या विधीमंडळ अधिवेशनात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. एकनाथ शिंदे हे विधीमंडळ अधिवेशनाच्या कामकाजातून पूर्णपणे अलिप्त राहणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

शिंदे यांच्याकडील खात्याची जबाबदारी इतरांकडे…

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अधिवेशनाच्या कामकाजापासून अलिप्त राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजातून अलिप्त राहणार का असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्याकडील तिन्ही खात्या संदर्भातील विचारण्यात येणाऱ्या प्रश्नाची जबाबदारी शिवसेनेच्या इतर मंत्र्यांकडे देण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे असणाऱ्या नगरविकास खात्या संदर्भातील प्रश्नांची जबाबदारी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. सार्वजनिक उपक्रम एमएसआरडीसीच्या संदर्भातील उत्तरांची जबाबदारी मंत्री दादा भुसे यांच्याकडे देण्यात आली आहे. तर गृहनिर्माण विभागाची जबाबदारी ही पर्यटनमंत्री शंभुराज देसाई यांच्याकडे असणार आहे.

महायुतीत कुरघोडी नाट्य?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मागील सरकारच्या काळात घेण्यात आलेल्या काही निर्णयांवर चौकशी लावण्यात आली आहे. यामध्ये शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांकडे असलेल्या खात्याचे निर्णय संशयाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. काही निर्णय हे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेले आहेत. तर, दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्याकडून समांतर सरकार चालवले जात असल्याची चर्चा सुरू झाली होती. त्यामुळे महायुतीमध्ये कोल्ड वॉर सुरू आहे, असे म्हटले जात आहे. तर, दुसरीकडे, आमच्यात कसलही कोल्डवॉर नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वारंवार सांगण्यात येत आहे. मात्र तरीही अधिवेशन कामकाजातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अलिप्ताच्या निर्णयावर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

महिला दिनानिमित्त लाडक्या बहिणींना मोठं गिफ्ट! ‘या’ तारखेला मिळणार फेब्रुवारीचा हप्ता अन् मार्चचा…

0

लाडक्या बहिणींसाठी सरकारनं खूशखबर दिली आहे. महिलादिनाच्या पूर्वसंध्येला या योजनेसाठी पात्र असलेल्या महिलांच्या खात्यात फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जमा होणार आहे.तसंच मार्च महिन्याचा हप्ता देखील लवकरच देण्यात येणार आहे, अशी माहिती महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.

आदिती तटकरे म्हणाल्या, “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता आम्ही ८ मार्चच्या महिलादिनाच्या पूर्वसंध्येला आम्ही सर्व महिलांच्या खात्यात थेट उपलब्ध करुन देणार आहोत. पाच ते सहा तारखेपासून याची प्रक्रिया सुरु होईल. आत्तापर्यंत आम्ही २ कोटी ४० लाख महिलांपर्यंत या योजनेचा लाभ पोहोचवला आहे. विरोधक सुरुवातीपासून याबाबत आरोप करत आहेत, ही योजना त्यांना खुपते आहे. गेल्या पाच-सहा महिन्यांपासून या योजनेला जो प्रतिसाद मिळतो आहे, त्यामुळं विरोधकांमध्ये या योजनेबाबत नैराश्य पसरलेलं आहे”

मार्च महिन्याचा हप्ता कधी?

फेब्रुवारीचा हप्ता महिला दिनाच्या पूर्वसंध्येला खात्यात जमा करण्यात येणार आहे. तर मार्च महिन्याचा हप्ता हा सध्याचं जे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात बजेट सादर झाल्यानंतर अर्थ खात्याकडून जेव्हा या योजनेसाठीचं बजेट उपलब्ध करुन दिलं जाईल, त्यानंतर मार्चचा हप्ता खात्यात वर्ग केला जाणार आहे.