Home Blog Page 163

“संतोष देशमुख ही एका व्यक्तीची नाही, तर नैतिकतेची हत्या मान खाली गेली”; पंकजा मुंडेंनी मांडली सविस्तर भूमिका

0

‘माझ्या पराभवानंतर कार्यकर्त्यांनी आत्महत्या केल्या. मी लोकसभेला हरले तरीही माझी मान खाली गेली नाही. पण, संतोष देशमुख हत्या प्रकरणात माझी मान खाली गेली आहे’, अशी खंत राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली.संतोष देशमुख हत्या, बीड जिल्ह्यातील उसवलेली सामाजिक वीण आणि कार्यकर्त्यांची गुन्हेगारी या मुद्द्यावर पंकजा मुंडेंनी सविस्तर भूमिका मांडली. पंकजा मुंडे यांनी एका मुलाखतीत बीड जिल्ह्यातील सामाजिक आणि राजकीय परिस्थितीवर भाष्य केले.

संतोष देशमुख हत्या प्रकरणाबद्दल बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, “संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपी कोण आहेत, हे न्यायालयातील सुनावणीतून समोर येईल. ही एका व्यक्तीची नाही, तर नैतिकतेची हत्या आहे. एका माणसाचा जीव जातो. त्याबाबत वातावरण निर्मिती कऱण्यात येते. एका समाजाला, जातीला गुन्हेगाराच्या पिंजऱ्यात उभे केले जाते. यामुळे सगळा समाज सुन्न झाला आहे.”

“सत्तेवर आहे, जे करायचे ते करा; हे सांगणे चुकीचे”

“संतोष देशमुख माझा बुथ प्रमुख होता, कार्यकर्ता होता; त्यामुळे मलाही दुख वाटतंय. सत्तेमुळे अहंकार निर्माण होतो. सत्ता असताना कार्यकर्त्यांना सांभाळणे अवघड असते. मी सत्तेवर आहे, जे करायचे ते करा, असे राजकीय नेत्यांकडून सांगितले जाते; हे चुकीचे आहे”, असे म्हणत पंकजा मुंडेंना राजकीय नेत्यांच्या भूमिकेवर टीका केली.

“बीडचे नाव गोपीनाथ मुंडे यांच्याशी जोडले होते, आता बीडचे नाव वाईट अर्थाने घेतले जात आहे. वंजारी समाजाच्या मुलांना वसतिगृहे, शाळांमध्ये वाईट वागणूक दिली जात आहे. बीडमध्ये सामाजिक ऐक्याला तडा गेला आहे. लोकांच्या आक्रमक भाषणांमुळे समाजांमधील संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. वंजारी समाजाला लक्ष्य केलं जात असून हे चुकीचे आहे”, अशी नाराजी पंकजा मुंडेंनी व्यक्त केली.

लोकसभेला मला त्याचा फटका बसला

“लोकसभा निवडणुकीत बीडमध्ये माझा सहा हजार मतांनी पराभव झाला. मी निवडणूक लढवण्यास उत्सुक नव्हते. मराठा आरक्षण प्रश्न पेटला होता. मराठा विरुद्ध ओबीसी, असा संघर्ष तीव्र असतानाच्या काळात मी लोकसभा लढवली. त्याचा मला फटका बसला. परिस्थिती माझ्या विरोधात होती. त्यामुळे मी पराभव स्वीकारला. माझ्या पराभवानंतर कार्यकर्त्यांनी आत्महत्या केल्या. मी लोकसभेला हरले तरीही माझी मान खाली गेली नाही. पण, संतोष देशमुख प्रकरणात माझी मान खाली गेली आहे”, अशी सल पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली.

आज राज्याचा अकरावा अर्थसंकल्प; वित्तीय तूट २ लाख १० हजार कोटींवर तूट कमी करण्याचे अजित पवारांपुढे आव्हान

0

उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार हे सोमवारी राज्याचा वर्ष २०२५-२६ चा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. नव्याने सत्तेवर आलेल्या महायुती सरकारचा हा पहिला अर्थसंकल्प असून वित्तमंत्री म्हणून अजित पवार यांचा हा अकरावा अर्थसंकल्प असणार आहे. विधानसभा निवडणुकीत महायुतीला भरघोस विजय मिळवून देण्यात सरकारने दिलेल्या मोफत योजनांचा मोलाचा वाटा आहे. मात्र यामुळे आधीच महसुली तूट असलेल्या राज्याच्या तिजोरीवर आणखी भार पडला आहे. त्यामुळे सोमवारी अर्थसंकल्प सादर करताना वाढता खर्च, महसुली तूट, राज्यावरील वाढते कर्ज, देणी आणि वाढत्या प्रशासकीय खर्चावर नियंत्रण याचे आव्हान वित्तमंत्र्यांसमोर असणार आहे.

जुलै २०२४ मध्ये सुरू झालेल्या ९६,००० कोटींच्या योजनांमुळे २०२४-२५ च्या अखेरीस वित्तीय तूट १.१० लाख कोटींच्या घरात असेल असा अंदाज होता. मात्र पावसाळी अधिवेशनातील ९४,६१० कोटींच्या पुरवणी मागण्या, चालू २०१८-१९ ते २०२२-२३ दरम्यान दरवर्षी कर्ज सरासरी ९.९२% दराने वाढले आहे. २०२३-२४ मध्ये राज्यावरील कर्जाचा बोजा ७ लाख ११ हजार २७८ कोटी रुपये होता, २०२४-२५ या आर्थिक वर्षात त्यात १० टक्के वाढ होऊन तो ७ लाख ८२ हजार ९९१ कोटी रुपयांपर्यंत गेला आहे. अधिवेशनातील ६,४०० कोटींच्या पुरवणी मागण्या विचारात घेता अंदाजाच्या तुलनेत राज्याची वित्तीय तूट २ लाख १० हजार कोटींवर जाणे अपेक्षित आहे.

ही बाब लक्षात घेता अजित पवार लाडकी बहीण, शेतकऱ्यांना मोफत वीज यासह इतर योजनांसाठी तरतूद करताना महसूल वाढीसाठी कर वाढवण्याचा मार्ग अवलंबणार का याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

लाडक्या बहिणींना २१०० रुपये देणार का?

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत राज्य सरकार सध्या दरमहा लाडक्या बहिणींना १५०० रुपये देते. विधानसभा निवडणुकीत ही रक्कम २१०० रुपये करण्याचे आश्वासन महायुतीने दिले होते. त्यामुळे या अर्थसंकल्पात यासंदर्भात वित्तमंत्री घोषणा करणार का याकडे लक्ष आहे.

कर्जाची चिंता

वाढत्या कर्जाच्या बोजाबाबत नीती आयोगाने राज्य सरकारला यापूर्वीच सावध केले आहे. २०१८-१९ ते २०२२-२३ दरम्यान दरवर्षी कर्ज सरासरी ९.९२% दराने वाढले आहे.

२०२३-२४ मध्ये राज्यावरील कर्जाचा बोजा ७ लाख ११ हजार २७८ कोटी रुपये होता, २०२४-२५ या आर्थिक वर्षात त्यात १० टक्के वाढ होऊन तो ७ लाख ८२ हजार ९९१ कोटी रुपयांपर्यंत गेला आहे.

हावडा येथून किडनॅप मुलीची पुणे स्टेशनला साबुद्दीन शेख या रिक्षाचालकाच्या मदतीने सुटका; महाराष्ट्र रिक्षा पंचायत कार्यालयात सन्मान

0

दिनांक 3 मार्च 2025 रोजी पुणे पोलिसांना सकाळी 11 वाजता आझाद हिंद हावडा एक्सप्रेस मधून एका अज्ञात व्यक्तीने एका मुलीचे अपहरण केल्याची टीप मिळाली होती, पुणे स्टेशन पोलिसांनी स्थानिक पुणे स्टेशन मधील पी एस अमर रिक्षा संघटनेच्या सभासदांना या गोष्टीची कल्पना दिली व आझाद हिंद हावडा एक्सप्रेस ट्रेन फलाट क्रमांक एक वर आल्याबरोबर पोलिसांच्या मदतीने स्थानिक रिक्षावाल्यांनी सुद्धा ट्रॅप लावला व अपहरण केलेल्या मुलीची सही सलामत सुटका केली, याबद्दल महाराष्ट्र रिक्षा पंचायत श्री राष्ट्रीय अध्यक्ष माननीय श्री बाबा कांबळे यांच्या सूचनेप्रमाणे महाराष्ट्र रिक्षा पंचायतच्या मंगळवार पेठ कार्यालयात जाबाज रिक्षा चालक शाबुद्दीन शेख यांचा शाल श्रीफळ व प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

पुण्याचे पोलीस आयुक्त यांच्यावतीने सुद्धा या रिक्षा चालकाचा सन्मान प्रशस्तीपत्र देऊन करण्यात येईल असे आश्वासन आनंद तांबे यांनी दिले, हा सन्मान महाराष्ट्र रिक्षा पंचायत चे वरिष्ठ उपाध्यक्ष त्याचप्रमाणे समर्थ सेवा रिक्षा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री आनंद उर्फ बंडू शेठ तांबे यांच्या शुभहस्ते करण्यात आला. याप्रसंगी महाराष्ट्र रिक्षा पंचायत चे पुणे शहर अध्यक्ष मेहबूब शेख कार्याध्यक्ष विलास केमसे संजय शिंदे अविनाश वाडेकर सातभाई शेख तोसीब शेख साबीर भाई विजय शेळके इत्यादी प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

टीम इंडिया अपराजित ‘चॅम्पियन्स’, न्यूझीलंडवर 4 विकेट्सने मात, 25 वर्षांपूर्वीचा हिशोब चुकता

0

टीम इंडियाने दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये इतिहास घडवला आहे. टीम इंडियाने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील अंतिम सामन्यात न्यूझीलंडवर विजय मिळवला आहे. रोहितसेनेने अंतिम सामन्यात किवींवर 4 विकेट्सने मात करत ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. न्यूझीलंडने टीम इंडियाला विजयासाठी 252 धावांचं आव्हान दिलं होतं. टीम इंडियाने हे आव्हान 6 विकेट्स गमावून 49 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. टीम इंडियाने 254 धावा केल्या. टीम इंडियाची ही चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याची एकूण तिसरी वेळ ठरली. तसेच टीम इंडियाने या विजयासह न्यूझीलंडचा 25 वर्षांपूर्वीचा हिशोब चुकता केला.

टीम इंडियाची बॅटिंग

कर्णधार रोहित शर्मा आणि उपकर्णधार शुबमन गिल या दोघांनी विजयाचा पाया रचला. या दोघांनी 105 धावांची सलामी भागीदारी केली. मात्र त्यानंतर टीम इंडियाने 17 धावांच्या मोबदल्यात झटपट 3 विकेट्स गमावल्या. शुबमन 31, विराट कोहली 1 आणि रोहित शर्मा 76 धावा करुन आऊट झाले. त्यामुळे टीम इंडिया अडचणीत आली.

त्यानंतर अक्षर पटेल आणि श्रेयस अय्यर या दोघांनी चौथ्या विकेटसाठी निर्णायक 61 धावांची भागीदारी केली. त्यानंतर श्रेयस अय्यर 48 धावांवर बाद झाला. त्यांनतर अक्षर आणि केएल राहुल या दोघांनी पाचव्या विकेटसाठी 20 धावा जोडल्या.त्यानंतर अक्षर पटेल 29 धावा करुन माघारी परतला.

त्यानंतर केएल राहुल आणि हार्दिक पंड्या या दोघांनी सहाव्या विकेटसाठी 38 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. मात्र विजयासाठी अवघ्या काही धावा हव्या असताना हार्दिक 18 धावा करुन आऊट झाला. त्यानंतर रवींद्र जडेजा मैदानात आला. जडेजाने काही धावा केल्या. त्यानंतर भारताला विजयासाठी 2 हव्या होत्या. तेव्हा रवींद्र जडेजाने 49 व्या ओव्हरमधील शेवटच्या बॉलवर चौकार ठोकला आणि टीम इंडियाने विजय मिळवला. तर केएल राहुल याने 33 बॉलमध्ये नॉट आऊट 34 रन्स केल्या. तर न्यूझीलंडकडून कॅप्टन मिचेल सँटनर आणि मायकल ब्रेसवेल या दोघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या. तर कायले जेमीन्सन आणि रचीन रवींद्र या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.

पहिल्या डावात काय झालं?

दरम्यान त्याआधी टॉस जिंकून न्यूझीलंडने 50 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 251 धावा केल्या. डॅरेल मिचेल आणि मायकल ब्रेसवेल या दोघांनीा सर्वाधिक धावा केल्या. डॅरेल मिचेल याने 63 तर मायकल ब्रेसवेलने 53 धावांचं योगदान दिलं. रचीन रवींद्र याने 37 तर ग्लेन फिलिप्सने 34 धावा केल्या. तर टीम इंडियसााठी कुलदीव यादव आणि वरुण चक्रवर्ती या दोघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या. तर मोहम्मद शमी आणि रवींद्र जडेजा या दोघांनी 1-1 विकेट घेतली.

टीम इंडियाचा वर्ल्ड रेकॉर्ड

टीम इंडियाने या विजयासह वर्ल्ड रेकॉर्ड केला. टीम इंडियाची चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याची ही तिसरी वेळ ठरली. आतापर्यंत एकाही संघाला 3 वेळा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकता आलेली नाही. टीम इंडियाने याआधी 2002 (संयुक्त विजेता) आणि 2013 साली चॅम्पियन्स ट्रॉफी उंचावली होती. त्यानंतर आता 14 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर भारतीय संघाने ही कामगिरी केलीय.

पराभवाची अचूक परतफेड

टीम इंडियाने अंतिम सामन्यात किंवीवर विजय मिळवत 25 वर्षांआधीच्या पराभवाची परतफेड केली. याच न्यूझीलंडने टीम इंडियाला 2000 साली चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील अंतिम सामन्यात पराभूत केलं होतं. टीम इंडियाने आता किवींना पराभूत करत परतफेड केली.

टीम इंडियाचा दुबईतील 10 वा विजय

टीम इंडियाने या विजयासह दुबईत अजिंक्य राहण्याचा विक्रम कायम राखला. टीम इंडियाचा हा या स्टेडियममधील 11 वा सामना होता. भारताचा हा दुबईतील 10 वा एकदिवसीय विजय ठरला. तर एकमेव मॅच टाय झाली होती.

अजित पवार उद्या जयंत पाटलांचा हा विक्रम मोडणार हा मानाचा तुरा शिरपेचात; शेतकरी व्यापाऱ्यांसह संपूर्ण महाराष्ट्राचे अर्थसंकल्पाकडे लक्ष

0

उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार  हे उद्या सोमवार दिनांक 10 मार्च 2025 रोजी राज्याचा वर्ष 2025-26 चा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. नव्याने सत्तेवर आलेल्या महायुती सरकारचा हा पहिला अर्थसंकल्प आहे. अर्थमंत्री म्हणून अजित पवार यांचा हा अकरावा अर्थसंकल्प असणार आहे. या अर्थसंकल्पाकडे शेतकरी, उद्योजक, व्यापाऱ्यांसह संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलं आहे.

अजित पवार हे आर्थिक शिस्तीचे कठोर प्रशासक

अजित पवार हे आर्थिक शिस्तीचे कठोर प्रशासक म्हणून ओळखले जातात. जनमताची नाडी ओळखून अर्थसंकल्पात लोकाभिमुख निर्णय जाहीर करताना राज्याच्या विकासप्रक्रियेला धक्का बसणार नाही याची काळजी ते घेत असतात. विकासयोजनांना निधी उपलब्ध करुन देण्यात तसेच पायाभूत विकासाची प्रक्रिया गतिमान ठेवण्यात ते सातत्याने यशस्वी ठरले आहेत. कोविडच्या संकटकाळात अनेक राज्यांची अर्थव्यवस्था अडचणीत असताना अजित पवार यांनी महाराष्ट्राची आर्थिक शिस्त बिघडू दिली नव्हती, त्याबद्दल त्यांच्या कार्याचा केंद्रीय पातळीवर गौरव झाला आहे.

शेतकरी, कष्टकरी, महिला, दलित, आदिवासी, विद्यार्थी, युवक हे घटक त्यांच्या अर्थसंकल्पाच्या केंद्रस्थानी

शेतकरी, कष्टकरी, महिला, दलित, आदिवासी, विद्यार्थी, युवक हे घटक त्यांच्या अर्थसंकल्पाच्या केंद्रस्थानी राहिले आहेत. 2021 चा अर्थसंकल्प 8 मार्च जागतिक महिला दिनी जाहीर करताना त्यांनी तो राज्यातील महिला शक्तीला समर्पित केला होता. 2022 चा अर्थसंकल्प स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मृतीदिनी 11 मार्च रोजी सादर केला होता. तो छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्य, त्याग, समर्पण, स्वराज्यनिष्ठेला समर्पित होता. कृषी, उद्योग, दळणवळण, आरोग्य, मनुष्यबळ विकास या पंचसूत्रीवर आधारीत अर्थसंकल्पही त्यांनी सादर केला आहे. मागील वर्षीचा निवडणूकपूर्व अर्थसंकल्प  सर्वसमावेशक, क्रांतीकारी अर्थसंकल्प होता. महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेवर आणण्यात त्या अर्थसंकल्पातील लोकोपयोगी, लोकप्रिय निर्णयांचा महत्वाचा वाटा होता. उद्या सादर होणाऱ्या अर्थसंकल्पाकडून राज्यातील जनतेला अनेक अपेक्षा असून अजित पवार त्या अपेक्षांवर खरे उतरतील, हा विश्वासही जनतेच्या मनात आहे.

अजित पवार विक्रमाच्या वाटेवर

उपमुख्यमंत्री अजित पवार हे उद्या त्यांचा 11 वा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. त्यानंतर ते शेषराव वानखेडे यांच्यानंतर (13 वेळा) दुसरे सर्वाधिक (11) वेळा अर्थसंकल्प सादर करणारे अर्थमंत्री ठरतील. शेषराव वानखेडे यांनी 13 वेळा, अजित पवार यांनी  उद्याचा अर्थसंकल्प धरून 11 वेळा, त्यांच्यानंतर सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा मान जयंत पाटील (10 वेळा) आणि  सुशीलकुमार शिंदे (9 वेळा) यांना जातो.

स्वातंत्र्य लढ्याशी संबंध नसणाऱ्यांच्या हाती देशाची सूत्रे; आरएसएसवाले गच्चीतून देशप्रेम शिकवतात,: उद्धव ठाकरे

0

मुंबई : ज्यांचा स्वातंत्र्य लढ्यामध्ये काडीचाही संबंध नाही अशा लोकांच्या हाती आज देशाची सूत्रे आहेत. पाकिस्तानविरोधात युद्ध सुरू झाले तर हे गच्चीतून देशप्रेम शिकवतात असा टोला उद्धव ठाकरे यांनी आरएसएस आणि भाजपला लगावला. दैवतांवरून भांडण लावणारे आता भाषेच्या मुद्द्यावरून वाद निर्माण करत आहेत असाही आरोप त्यांनी केला. मुलुंड येथील कालिदास नाट्यगृहात पार पडलेल्या ईशान्य मुंबई पदाधिकारी निर्धार शिबीरात उद्धव ठाकरे बोलत होते.

उद्धव ठाकरे म्हणाले की, “आरएसएसवाले हे गच्चीत काठ्या घेऊन बसतात, त्या काठ्या कपडे वाळत घालायला ठिक आहे. पाकिस्तानविरोधात युद्ध सुरू असताना घराच्या गच्चीतून हे देशप्रेम शिकवणारे लोक आहेत. जसा यांचा देशाच्या स्वातंत्र्य लढ्याशी संबंध नाही तसाच संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याशी काही संबंध नाही. ज्यांचा स्वातंत्र्याशी संबंध नाही त्यांच्या हातात देशाची सूत्रे आहेत.”

आम्ही मोहन भागवतांचे फॉलोअर आहे. तेच कुंभमेळ्यात गेले नाहीत तर आम्ही कसे जाणार? असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला. छावा चित्रपट आला. त्यामध्ये भाजप वाल्यांचा कर्तृत्व काय? त्यामध्ये तुमचा काय संबंध? आणाजी पंताने भगव्याला डाग लावलेला पाहायला जायचं असेल तर जा असाही टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.

तुम्ही उद्धव ठाकरे होऊच शकत नाही

देवेंद्र फडणवीसांवर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, “कामाला स्थगिती द्यायला काय उद्धव ठाकरे आहे का? असं विचारणारे फडणवीस हे उद्धव ठाकरे कधीच होऊ शकणार नाहीत. आपल्या राज्याचे नुकसान होऊन त्यांच्या मालकाच्या मित्राचे खिसे भरणारे हे उद्धव ठाकरे कधीच होऊ शकणार नाहीत.”

भाजपवाले दैवतावरून भांडण लावतात

आम्हीही जय श्री राम म्हणतोय. रामावर यांचा काय अधिकार आहे? आम्हाला भाजपमुक्त राम पाहिजे असं उद्धव ठाकरे म्हणाले. ते म्हणाले की, “आम्ही जय श्रीराम म्हणणारच, पण भाजपवाल्यांना जय शिवाजी, जय भवानी म्हणायला लावणार. तुम्ही आता दैवतावरून भांडणे लावताय?”

भाषिक प्रांतवाद सुरू केला

संघाच्या भैयाजी जोशी यांनी मराठी भाषेवरून केलेल्या वक्तव्याचा समाचार उद्धव ठाकरेंनी घेतला. ते म्हणाले की, “गुजरातबद्दल आम्हाला द्वेष नाही. पण हे लोक आता भाषिक प्रांतवाद सुरू करत आहेत. देशामध्ये आम्ही हिंदू आहेत, तर महाराष्ट्रात आम्ही मराठी आहोत. घाटकोपरची भाषा गुजराती म्हणतात. आम्हाला शिकवू नका. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातही यांनी फुट पाडण्याचं काम केलं.”

आपलं काम जागांच्या साठेमारीत आपण मारलं हे लोकांना सांगू शकलो नाही; त्यांनी मात्र हेतू परस्पर…. ठाकरेंकडून चुकीची जाहीरपणे कबुली

0

मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज निर्धार शिबिरात विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून झालेली चूक जाहीरपणे मान्य केली. गेल्या अनेक दिवसांपासून महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम घोटाळा झाल्याचा आरोप केला जात होता. पण आता अखेर उद्धव ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवामागील कारण मान्य केलं आहे. “लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत एक नक्की मान्य केलं पाहिजे की, आपण गाफील राहिलो. लोकसभेला आपण आपल्याला जिंकायचंच आहे म्हणून लढलो, त्वेषाने लढलो. तर महायुती लोकसभेला आपणच जिंकणार कारण मोदी आहेत अशा अविर्भावात होते”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

“लोकसभेनंतर विधानसभा निवडणुका आल्या. मधल्या काळात मतदारांचे घुसवाघुसवी झाली. आपण ज्या मानसिकतेत होतो की, आपल्याला जिंकायचंच आहे त्या मानसिकतेत महायुती होती आणि आम्ही जिंकलो आहोत, अगदी आपले मित्रपक्ष सुद्धा जॅकेट शिवून तयार होते. बस आता जिंकलोच, मी घोड्यावर बसणार आणि विधानसभेत जाणार. त्या निकालानंतर मला काही जणांनी सांगितलं, काँग्रेसवाले काही लोक आले, राष्ट्रवादीवाले काही आले, आणि म्हणाले एक चूक झाली ती झालीच. ते नाव जाहीर करायचं सोडून द्या. त्याचा इतिहास झाला. पण त्यांनी सांगितलेलं फार महत्त्वाचं होतं. विधानसभेत आपण केलेलं काम हे जागांच्या साठेमारीत आपणच मारुन टाकलं”, असं उद्धव ठाकरे जाहीरपणे म्हणाले.

‘लोकांना आपण आपलं काम सांगूच शकलो नाही’

“हे खरं आहे. आपण काय करत गेलो? तुम्ही किती देणार? एवढे, तुम्ही काय करणार हे, आम्ही हे, याच्यात राहिलो. अरे पण आपण उत्तमरित्या सरकार चालवून दाखवलं. जगभरात आणीबाणीपेक्षाही वाईट परिस्थिती होती त्यावेळीही आपण महाराष्ट्र थांबू दिला नव्हता हे आपण लोकांना सांगूच शकलो नाही. तेच काम त्यांनी केलं. भ्रष्टाचाराचा नुसता आगडोंब केला. इथे सुरज बसला आहे. काय? खिचडी घोटाळा? संजय राऊतला आतमध्ये टाकलं होतं. पण घाबरुन सोडून दिलं. जा बाबा जा. तिकडे गेलास तर बरं. काही शेपट्या घालून गेले. त्या सगळ्यांना तिकडे घेऊन जणू काही गंगास्नान घातलं”, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या एकदिवस आधी महाविकास आघाडीला आपल्या विजयाची खात्री होती. विशेष म्हणजे मुख्यमंत्री कोण होणार यावरुन मविआत विविध दावे केले जात होते. तसेच विधानसभा निवडणुकीवेळी जागावाटपावरुन मविआत प्रचंड संघर्ष बघायला मिळाला होता. तसेच काही ठिकाणी झालेली बंडखोरी यामुळे त्याचा मविआला फटका बसला होता. हेच उद्धव ठाकरे यांनी जाहीरपणे मान्य केलं आहे.

पुणे मेट्रोच्या रुळावर धोकादायक आंदोलन नागरिक संतप्त; अग्निशमन दल बोलवले पक्षशिस्ती विरोधी गोष्टी आंदोलनकर्त्यांची पक्षातून हकालपट्टी

0

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या शहरातील काही पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी पुणे मेट्रोच्या रुळावर उतरून आंदोलन केले. या अनपेक्षित आंदोलनामुळे मेट्रोची वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली, परिणामी प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. नागरिकांनी या प्रकारावर तीव्र संताप व्यक्त केला. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले, तर पक्षाने त्यांची तात्काळ हकालपट्टी केली.

शिवाजीनगर कोर्ट येथून पुढे वनाजच्या दिशेने जाणाऱ्या मेट्रोच्या फेऱ्या अचानक रद्द करण्यात आल्या. त्यामुळे मेट्रोने प्रवास करणाऱ्या नागरिकांना शिवाजीनगर मेट्रो स्टेशनवर उतरवण्यात आले. त्यानंतर रामवाडीहून आलेल्या प्रवाशांना शिवाजीनगर कोर्ट येथे उतरून पुढील प्रवासासाठी रिक्षा आणि कॅबचा पर्याय शोधावा लागला. अशीच परिस्थिती छत्रपती संभाजी उद्यान स्टेशनवरील प्रवाशांचीही झाली. त्यांना तेथून पुढे रामवाडीच्या दिशेने मेट्रोने प्रवास करता आला नाही.

प्रवाशांना कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती

मेट्रोकडून याबाबत प्रवाशांना कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती. त्यामुळे आपल्या कामाच्या ठिकाणी वेळेवर पोहोचण्याच्या घाईत असलेल्या प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. तब्बल तासभर हा गोंधळ सुरू होता, ज्यामुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात संताप निर्माण झाला होता.

रोजगार मिळत नसल्यासह विविध मागण्यांसाठी आंदोलन

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाच्या काही कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी तरुणांना रोजगार मिळत नसल्यासह विविध मागण्यांसाठी महापालिका मेट्रो स्थानकाच्या रुळावर उतरून आंदोलन केले. यावेळी मेट्रोसह अन्य ठिकाणी स्थानिक तरुणांना संधी दिली जात नसल्याचा आरोप करत मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करण्यात आली.

अग्निशमन दलाला देखील पाचारण

आंदोलकांना मेट्रोच्या रुळांवरून हटवण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न केले तसेच अग्निशमन दलाला देखील पाचारण करण्यात आले. हे आंदोलन धोकादायक पद्धतीने होत असल्याने अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सुरक्षेची विशेष काळजी घेतली. अखेर पोलिसांनी आंदोलकांची समजूत काढत त्यांना रुळांवरून बाजूला केले आणि ताब्यात घेतले.

आंदोलनकर्त्यांच्या प्रमुख मागण्या

आंदोलनकर्त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण मागण्या मांडल्या, त्यामध्ये पुढील मुद्दे विशेषत्वाने उपस्थित करण्यात आले:

  • सुशिक्षित पदवीधर बेरोजगारांना रोजगार                     मिळायलाच हवा.
  • प्रत्येक शाळेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, महात्मा ज्योतिबा फुले, लोकमान्य टिळक, सरदार वल्लभभाई पटेल, झाशीची राणी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांचा इतिहास शिकवला गेला पाहिजे.
  • शाळा आणि शिक्षणाचा वाढता व्यावसायिकीकरण रोखला गेला पाहिजे.
  • प्रत्येक तरुण-तरुणीला स्वसंरक्षणासाठी लाठी-             काठीचे प्रशिक्षण मिळाले पाहिजे.
  • महिलांवरील सर्व प्रकारचे लैंगिक अत्याचार पूर्णतः        थांबले पाहिजेत.
  • शाळा आणि महाविद्यालयामध्ये शिक्षण पूर्णतः              मोफत करावे.
  • शासकीय रुग्णालयांमधील भ्रष्टाचार पूर्णतः बंद             झाला पाहिजे.
  • संपूर्ण महाराष्ट्रातील शासकीय रुग्णालयांमध्ये            औषधांसह मोफत वैद्यकीय सेवा उपलब्ध करून               द्यावी.
  • जिल्हाधिकारी कार्यालय, महानगरपालिका, नगरपालिका आणि इतर शासकीय कार्यालयांमध्ये सामान्य नागरिकांना त्वरित सेवा मिळावी आणि त्यांच्याशी सन्मानपूर्वक वागणूक दिली गेली पाहिजे.
  • शासकीय निधीचा वापर हा केवळ सामान्य जनतेच्या हितासाठीच झाला पाहिजे.
  • राजकारणातील घराणेशाही पूर्णतः बंद झाली पाहिजे.

या सर्व मागण्यांसाठी आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आणि प्रशासनाने लवकरात लवकर यावर निर्णय घ्यावा, अशी मागणी केली.

आंदोलन करणाऱ्या नरेंद्र पावटेकरांची पक्षातून तात्काळ हकालपट्टी

या संदर्भात माहिती देताना राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) पक्षाचे नेते प्रशांत जगताप म्हणाले, “नरेंद्र पावटेकर हे कसबा विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्ते होते. त्यांनी तीन महिन्यांपूर्वी पक्षात प्रवेश केला होता. मात्र, प्रवेशानंतर त्यांनी पक्षाच्या कोणत्याही आंदोलनात किंवा कार्यक्रमात सहभाग घेतलेला नव्हता. अशा परिस्थितीत रविवारी त्यांनी पुणे मेट्रोच्या विरोधात आंदोलन केले. आंदोलन करताना पोलिसांशी हुज्जत घालणे तसेच पुणेकरांच्या दैनंदिन वाहतुकीत अडथळा निर्माण करणे या प्रकारचे कृत्य त्यांनी केले, जे पूर्णपणे निषेधार्ह आहे.”

“आजचे त्यांचे आंदोलन हे वैयक्तिक होते आणि त्याचा पक्षाशी कोणताही संबंध नाही. शिवाय, पुणेकरांना अडवणे आणि पोलिसांसोबत वाद घालणे यासारख्या गोष्टी पक्षाच्या शिस्तीच्या विरोधात आहेत. त्यामुळे पक्षाने निर्णय घेत त्यांच्या तात्काळ हकालपट्टीची कारवाई केली आहे,” असेही प्रशांत जगताप यांनी स्पष्ट केले.

धक्कादायक राज्यात सहकार पुन्हा धोक्यात; साखर उद्योगाच्या नाड्या या 9 समूहांकडेच अजित पवार अग्रेसरच

0

सामान्य शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन सहकाराच्या माध्यमातून उभारलेला व महाराष्ट्राच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावलेला साखर उद्योग परत काही मूठभर नेत्यांच्या हातात एकवटत असल्याचे नवे चित्र पुढे आले आहे. एकूण गाळपापैकी तब्बल २७ टक्के गाळप या नऊ सहकारी व खासगी उद्योगसमूहांकडून होत आहे. सहकारातून खासगीकरण व त्यातूनही पुन्हा आता आर्थिक सत्तेचे केंद्रीकरण असा प्रवास सुरू झाला आहे.

गत हंगामात राज्यात सहकारी व खासगी असे २०७ कारखाने सुरू होते. या नऊ समूहांकडे त्यातील ५० कारखाने आहेत. त्यांनी २ कोटी ९० लाख मे. टन गाळप केले आहे.

मूळचे कारखाने सहकारी व नंतरचे मात्र सोयीनुसार खासगी असेही चित्र समूहांमध्ये दिसते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा थेट संबंध नसली तर त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांचा समूह काम करतो.

सर्वच पक्षांच्या नेत्यांनी हे क्षेत्र व्यापले आहे. मोठे समूह झाल्याने काही फायदे होत असले तरी मूठभरांच्या हाती हा उद्योग एकवटला जाण्याची भीती व्यक्त होत आहे.

प्रमुख समूह             गाळप क्षमता             प्रत्यक्ष गाळप

अजितदादा ग्रुप             ६४ हजार             ८० लाख

विठ्ठलराव शिंदे               २३ हजार             ३६ लाख

बारामती अॅग्रो             २८ हजार             ३५ लाख

लातूर देशमुख-१             १९ हजार             २८ लाख

पुणे ओंकार ग्रुप             २९ हजार             २५ लाख

लातूर देशमुख-२           १८ हजार             २४ लाख

सोनहिरा                     १८ हजार             २२ लाख

राजारामबापू               १६ हजार               २० लाख

भैरवनाथ समूह             २० हजार             १९ लाख

अथनी समूह                 १७ हजार             १४ लाख

सहकारी व खासगी उद्योग समूहातील एकत्रिकरणाचा वेग पाहता एकल कारखान्यांना भविष्यात तीव्र स्पर्धेला तोंड द्यावे लागेल. आर्थिक शिस्तीसह कारखाने पूर्ण क्षमतेने चालवण्याचे आव्हान त्यांच्यापुढे असेल.

 – विजय औताडे, साखर उद्योगाचे अभ्यासक

बीड ‘खोक्या’ भोसलेच्या मुसक्या आवळणार, वन विभाग अधिकाऱ्यांची टीम घटनास्थळी; 7 मार्चला गुन्हा दाखल

0

भाजपचा पदाधिकारी आणि आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता असलेला सतीश भोसले उर्फ खोक्या भोसलेच्या अडचणी सातत्याने वाढत आहेत. त्याचे एकापाठोपाठ एक कारनामे सध्या बाहेर येत आहेत. खोक्या भोसलेने शिरुर कासार या ठिकाणी एका व्यक्तीला बॅटने मारहाण केली होती. त्याला मारहाण करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानतंर आता सतीश उर्फ खोक्या भाई याने चक्क परिसरातील हरणांची शिकार करुन त्यांचे मांस खाल्ल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यानंतर आता लवकरच सतीश भोसलेच्या मुसक्या आवळण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे.

शिरूर तालुक्यातील बावी गावातील महेश ढाकणे आणि दिलीप ढाकणे यांनी सतीश उर्फ खोक्या भोसले यांच्या साथीदाराला हरणाची शिकार का करताय म्हणून अडवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र सतीश उर्फ खोक्या भोसले यांच्यासह इतर सहा जणांनी दिलीप ढाकणे व महेश ढाकणे यांना जबर मारहाण केली होती. याप्रकरणी काल 7 मार्च रोजी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

हरीण आणि काळविटाचे सांगाडे जप्त

याप्रकरणी आज पाटोदा येथील वन अधिकाऱ्यांनी भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी त्यांना या परिसरामध्ये मृत प्राण्याचे सांगाडे आढळून आले. हे सांगाडे हरीण आणि काळविटाचे असल्याची प्राथमिक माहिती आहे. यापूर्वी सतीश उर्फ खोक्या भोसले आणि त्याच्या साथीदाराने अनेक हरण, ससे मारल्याचा आरोप होत आहे. वन विभागाच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. त्यांना हरणाचे शिंग सापडले. त्यांनी ते जप्त केले असून फॉरेन्सिक लॅबकडे तपासासाठी पाठवले आहे.

कडक शिक्षा झाली पाहिजे, वनप्रेमीची मागणी

याप्रकरणी वनप्रेमी सिद्धार्थ सोनवणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आरोप करणं आणि गुन्हा दाखल करणं यात फरक आहे. 200 हरणांची शिकार केली, असं कळलं पण तशी नोंद कुठे नाही. तशी घटना आपणास निदर्शनास आली नाही. या ठिकाणी तीन ते चार महिन्यांपूर्वी काळवीटाचे सांगाडे सापडले आहेत. जो कोणी यातील आरोपी असेल, त्याला कडक शिक्षा झाली पाहिजे. प्राणी मित्र संघटना यासाठी पाठीशी राहणार आहे. आम्ही शिकारीचे प्रकार रोखले आहेत. ज्या ठिकाणी पानवटे आहेत, त्या ठिकाणी परिभागाने विशेष बंदोबस्त लावला पाहिजे, अशी मागणी सिद्धार्थ सोनावणे यांनी केली.