Home Blog Page 141

प्रशांत कोरटकरला अटक, ‘या’ राज्यात बसला होता लपून; दुसऱ्या वाहनाचा शोध लागला कोल्हापूर पोलिसांची कारवाई

0

इतिहासकार इंद्रजित सावंत यांना फोनद्वारे धमकी देणारा तसेच शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या प्रशांत कोरटकराला अखेर अटक झाली आहे. महाराष्ट्राच्या बाहेर तेलंगणा राज्यात तो लपून बसला होता. पोलिसांनी त्याला तेथून अटक केली.

प्रशांत कोरटकराचा अटकपूर्व जामीन न्यायायलाने फेटाळल्याने त्याला कधीही अटक होण्याची शक्यता होती. तो परदेश पळून गेल्याच्या देखील चर्चा होत्या. मात्र,त्याच्या पत्नीने त्याचा पासपोर्ट कोल्हापूर पोलिसांकडे स्वाधीन केल्याने तो देशाबाहेर गेला नसल्याचे स्पष्ट झाले होते. आज (सोमवारी) अखेर त्याला तेलंगणातून अटक करण्यात आली.

गेल्या महिनाभरापासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या कोरटकरला तेलंगणा राज्यातून अटक केल्याची माहिती समोर येत आहे. 24 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना फोनद्वारे धमकी दिली होती. त्या दिवसांपासून कोरटकर हा फरार होता.

कोल्हापूर जिल्हा आणि सत्र न्यायालयाकडून त्याने मध्यंतरी अंतरिम जामीन मिळवला होता. 11 मार्च रोजी अंतरिम जामिनाची मुदत संपल्यानंतर कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात झालेल्या सुनावणीवेळी अंतरिम जामीन मुदतवाढ अर्ज फेटाळण्यात आला होता. हा अर्ज फेटाळल्यानंतर पुन्हा एकदा कोरटकर हा फरार झाला होता. अखेर आज सोमवारी कोल्हापूर पोलिसांनी त्याच्यावर तेलंगणा राज्यात कारवाई करत अटक केली.

कोल्हापूर पोलिसांना सातत्याने गुंगारा देण्यासाठी त्यांनी तीन दिवसांपूर्वी दुबईतील फोटो शेअर केला होता. त्यामुळे कोरटकर हा दुबईला फरार झाल्याची चर्चा राज्यात सुरू होते. इतिहास संशोधक इंग्रजीत सावंत यांनी कोरटकर याचा पासपोर्ट पोलिसांनी जमा करून घ्यावा अशी मागणी केली होती. त्यानंतर कोरटकर यांच्या पत्नीने त्यांचा पासवर्ड कोल्हापूर पोलिसांकडे सुपूर्द केला होता. कोल्हापूर पोलीस तपासाच्या मागावर असतानाच कोरटकर हा तेलंगणा राज्यात असल्याची माहिती मिळाली. त्यावरून कोल्हापूर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

अशी झाली अटक

कोरटकर ला 11 मार्चपर्यंत अंतरिम जामीन मिळाल्यानंतर फॉरेन्सिक लॅब मधील तपासणीसाठी आणि आवाजाचे सॅम्पल घेण्यासाठी कोरटकर यांना अटक होणे गरजेचे होते. मात्र अंतरिम जामीन मिळाल्याने कोरडकरला अटक करता येत नव्हती. मात्र तोपर्यंत कोरटकर ज्या वाहनातून तो फिरत होता. त्या वाहनाच्या मार्गावर कोल्हापूर केसांचे एक पथक लक्ष्य ठेवून होते. अखेर अंतरिम जामीनाची मुदत संपल्यानंतर पुन्हा मुदतवाढ मिळण्याचा अर्ज फेटाळल्यानंतर कोरटकर यांनी पहिल्या वाहनाचा ताबा सोडून दुसऱ्या वाहनातून प्रवास सुरू केला. त्यामुळे तपासात अडचणी आल्या. अखेर कोल्हापूर पोलिसांना दुसऱ्या वाहनाचा देखील शोध लागल्याने तेलंगणा येथे जाऊन कोरटकर याच्यावर अटकेची कारवाई केली.

माफी मागेन पण… कुणाल कामराने मुंबई पोलिसांसमोर ठेवली एकच अट, पोलीसही निरुत्तर संवादात काय घडलं?

0

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा यांनी केलेल्या टीकामुळे राजकीय वातावरण तापत आहे. मुंबई पोलिसांनी कुणाल कामराशी संपर्क साधला. पोलीस आणि कामरा यांच्यात फोनवरून प्राथमिक चौकशी झाली. यानंतर त्याने प्रतिक्रिया दिली आहे. तसेच माफी मागण्यातही नकार दर्शवला आहे. याबरोबरच माफीसाठी एक अट ठेवली आहे.

जेव्हा पोलिसांनी कुणालला विचारले की त्याला त्याच्या विधानाबद्दल काही पश्चात्ताप आहे का, तेव्हा कुणाल म्हणाला की त्याने पूर्ण जाणीवपूर्वक हे विधान दिले आहे. यामुळे त्याला कोणताही पश्चात्ताप नाही. कुणाच्या सल्ल्यानुसार स्टेटमेंट देण्याबाबत कुणाल म्हणाला की, ते माझे बँक खाते तपासू शकतात. मी कॉन्ट्रॅक्ट का घेऊ आणि मी मराठीतही कोणताही शो केलेला नाही. मी हा कार्यक्रम हिंदीमध्ये केला आहे. मी सुपारी घेतली नाही.

पोलिसांनी विचारले की, तुम्हाला तुमचे विधान मागे घ्यायचे आहे की माफी मागायची आहे? तर कुणालने उत्तर दिले की जर न्यायालयाने मला माफी मागण्यास सांगितले तर मी माफी मागेन. यापूर्वी, मुंबई पोलिसांनी कामराच्या जबाबाच्या प्रकरणी दोन एफआयआर नोंदवले होते. एक कुणाल कामरा विरुद्ध आहे, तर दुसरा एफआयआर स्टुडिओमधील तोडफोडीच्या संदर्भात दाखल करण्यात आला आहे.

शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी कुणाल कामराने ज्या स्टुडिओमध्ये व्हिडिओ शूट केला होता त्या स्टुडिओची तोडफोड केली आहे. त्यानंतर स्टुडिओचा काही भाग बेकायदेशीर असल्याचे सांगत बीएमसीनेही स्टुडिओवर कारवाई केली आहे. तसेच बुलडोजर चालवला आहे.

यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, त्याने माफी मागावी. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली अनुचित टिप्पण्या खपवून घेतल्या जाणार नाहीत. कामराचा उद्देश लोकांच्या नजरेत शिंदे यांना कमी लेखणे हा होता. विरोधी पक्ष या गोष्टींना पाठिंबा देत आहे आणि कामरा विरोधकांसोबत आहेत का हे विचार करण्यासारखे आहे. जर तुम्ही पैसे घेऊन प्रसिद्धीसाठी संवैधानिक पदांवर असलेल्या लोकांचा अपमान करत असाल तर ते सहन केले जाणार नाही.

वाघ्या कुत्रा आला कुठून? इंद्रजित सावंतांनी दिलं उत्तर; म्हणाले, संभाजीराजेंची मागणी योग्य

0

रायगडवरील वाघ्या कुत्र्याची समाधी हटवावी अशी मागणी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केलीय. या समाधीला कोणताच ऐतिहासिक पुरावा नसल्याचं भारतीय पुरातत्व खात्यानंही स्पष्ट केलंय. त्यामुळे ३१ मे पर्यंत ही समाधी हटवावी असं संभाजीराजेंनी पत्रात म्हटलंय. आता यावर इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांनीही प्रतिक्रिया दिलीय. इतिहासात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वाघ्या कुत्र्याचा कुठेच उल्लेख नाही. राम गणेश गडकरींच्या नाटकातून वाघ्या कुत्र्याची निर्मिती झाल्याचं इंद्रजित सावंत म्हणाले.

वाघ्या कुत्र्याचं स्मारक हे कपोलकल्पित आहे. इतिहिसात याची कोणतीही नोंद नाहीय. इतिहास आणि दस्ताऐवजात कोणतीही नोंद नाही तरी त्या स्मारकाला संरक्षण देण्यात येतंय. वाघ्या कुत्र्याचं स्मारक करून छत्रपती शिवाजी महाराजांना कमी लेखण्याचा काहींचा प्रयत्न होता अशी प्रतिक्रिया इंद्रजित सावंत यांनी दिली.

वाघ्या कुत्र्याचा विषय कुठून आला याबाबत बोलताना इंद्रजित सावंत म्हणाले की, राम गणेश गडकरी यांच्या एका नाटकातून वाघ्या कुत्र्याची निर्मिती झाली. वाघ्या कुत्र्याच्या स्मारकाबद्दल संभाजीराजे छत्रपती यांनी केलेली मागणी योग्य आहे.

रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी शेजारीच कथित वाघ्या कुत्र्याची समाधी आहे. या समाधीला कोणताही ऐतिहासिक आधार नसल्याचं सांगत याआधी अनेकवेळा शिवप्रेमींनी विरोध केलाय. वाघ्या कुत्र्याचा पुतळा शिवप्रेमींनी हटवलासुद्धा होता. मात्र प्रशासनाकडून तो पुन्हा बसवण्यात आला. आता त्या पुतळ्याला पोलिसांचं संरक्षणही देण्यात आलंय.

बंगळुरूच्या निरुपमा- राजेंद्र नृत्याविष्कार आकर्षण; नामदार चंद्रकांतदादा पाटील आयोजित दुसऱ्या पंडिता रोहिणी भाटे नृत्य महोत्सवाची उत्साहात सांगता

0

विख्यात भरतनाट्यम नृत्यांगना निरुपमा आणि राजेंद्र यांचा डौलदार पदन्यास, समर्थ अभिनय आणि आकर्षक हस्तमुद्रा यांचा मेळ जमलेला नृत्याविष्कार हे नामदार चंद्रकांतदादा पाटील आयोजित युवा सुराज्य प्रतिष्ठानच्या संयोजनातून आणि शास्त्रीय नृत्य संवर्धन संस्थेच्या वतीने प्रस्तुत पंडिता रोहिणी भाटे नृत्य महोत्सवाच्या अखेरच्या सत्राचे प्रमुख आकर्षण ठरले.

श्रीकृष्णाच्या रासलिलेवर आधारित कथाभागातून सादर केलेल्या नृत्याविष्कारातून संवेदनशील अभिनयाचे, सुंदर देहबोलीचे दर्शन रसिकांना घडले. तर मनिषा नृत्यालयाने कथ्थकच्या माध्यमातून शिवभूषण सादर केले. या कलाकृतीस रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. याशिवाय कलासक्त नृत्य संस्थेने सादर केलेल्या योगिनी या ओडिसी नृत्याविष्कारास आणि उत्तुंग अभिनयाला रसिकांनी भरभरून दाद दिली.

आजच्या कार्यक्रमात मुद्रा कथक नृत्य संस्थेने ‘गणेश ध्रुपद’ (कथ्थक), स्वरदा नृत्य संस्था ‘चरिष्णू’ (भरतनाट्यम्), आरोहिणी नृत्य संस्थेने ‘शिव ध्रुपद’ (कथ्थक), स्नेहललितने ‘तिल्लान’ (भरतनाट्यम्), रुपक नृत्यालयने ‘चतरंग’ (कथ्थक), शिल्पा नृत्यालयाने एक श्लोकी रामायण (कथ्थक), नृत्यांजली संस्थेचे श्री गणेश (भरतनाट्यम्), नृत्यभारती संस्थेचे राग सागर (कथ्थक), कलासाधनम् नृत्य संस्थेचे डमरु (भरतनाट्यम्), अर्चना नृत्यालयाचे ठुमरी (कथ्थक), रुपक कलासदनने अंजनेय स्तुती (भरतनाट्यम्) आदी नृत्याविष्कार सादर केले.सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार म्हणाले की, पंडिता रोहिणी भाटे नृत्य महोत्सवातील नृत्याविष्कार पाहून थक्क झालो. वास्तविक अशाप्रकारचा शास्त्रीय नृत्यासाठी समर्पित महोत्सव हा पुण्यातच होऊ शकतो, हे आजच्या महोत्सवाने दाखवून दिले आहे. रोहिणी ताईंच्या नावाने होणारा हा महोत्सव म्हणजे एकप्रकारे महादेव शंकरांची उपासना आहे. शास्त्रीय नृत्य संवर्धन संस्था नृत्य संकुल उभारण्यासाठी प्रयत्सांनशील आहे. स्कृतिक विभाग त्यासाठी सर्वतोपरी मदत करेल.

ते पुढे म्हणाले की, रोहिणी भाटे नृत्य महोत्सव हा खरंच अविस्मरणीय आहे. त्यामुळे शास्त्रीय नृत्य महोत्सवाचा प्रतिसाद पाहून; पुढील वर्षीचा तिसरा महोत्सव अधिकाधिक भव्यदिव्य करण्यासाठी महाराष्ट्राचा सांस्कृतिक विभाग देखील सहभागी होईल. त्यासोबतच  सांस्कृतिक विभागाच्या वतीने आगामी ३६५ दिवस १२०० कार्यक्रम राज्यभर राबविणार असल्याची माहिती देखील मंत्री शेलार यांनी यावेळी दिली.

समारोप प्रसंगी पंडिता रोहिणी भाटे यांना पुणेकरांनी दिव्याच्या प्रकाशात अनोखी आदरांजली वाहिली. यावेळी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, अंजली पाटील, नृत्य गुरु शमाताई भाटे, मनिषा साठे, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे, शास्त्रीय नृत्य संवर्धन संस्थेच्या सर्व पदाधिकारी, आयोजक अजय धोंगडे, संयोजक तथा भाजपा पुणे शहर सरचिटणीस पुनीत जोशी यांच्या सह इतर मान्यवर उपस्थित होते.

पुण्यात तडीपारी फक्त नावालाच? २८९ पैकी केली २६७ जणांकडून तडीपारी आदेशाचा भंग धक्कादायक आकडेवारी समोर, जाणून घ्या

0

एखाद्या भागातील गुंडांची दहशत संपविण्यासाठी पोलिसांकडून संबंधितांवर तडीपारीची कारवाई केली जाते. मात्र, ही कारवाई नावालाच होते का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. पोलिसांनी गेल्या वर्षी (२०२४मध्ये) २८९ गुंडावर तडीपारीची कारवाई केली. तरीही त्यातील बहुसंख्य गुंडांचा पुन्हा शहरात वावर असल्याचे दिसून आले आहे. तडीपारी आदेशाचा भंग करून शहरात आलेल्या २६७ जणांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.

वाहनांची तोडफोड, दोन गटांमध्ये हाणामारी, धारदार हत्यारे हवेत फिरवत रस्त्याने जाणे, अशा प्रकारे दहशतीचे वातावरण निर्माण केले जात आहे. ही दहशत मोडीत काढण्यासाठी पोलिसांकडून विविध प्रकारे प्रतिबंधात्मक कारवाई केली जाते. त्यानंतरही गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा बसलेला नाही. शहरात तडीपार गुंडांकडून जबरी चोरी, घरफोडी, खून, खुनाचा प्रयत्न असे गुन्हे केल्याचे शहरात घडलेल्या काही घटनांत आढळून आले आहे. तडीपारीची कारवाई झालेले गुंड पुन्हा शहरात येऊन दहशत माजवित आहेत.

तडीपार केल्यानंतर संबंधित गुंडावर नंतर नजर ठेवली जाते का, तो पुन्हा शहरात येऊन गुन्हा करतो, तोपर्यंत पोलिसांना याची खबर का लागल नाही, असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत. पुणे शहरातल अलीकडील काळात कोयते नाचवणे, किरकोळ कारणावरून मारहाण करणे अशा घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसते. सराईत गुंडांवरील कारवाईनंतरही या घटना घडत असल्याचे चित्र आहे.

  • बिबवेवाडीतील तडीपार गुंड आणि एका सराईत गुन्हेगाराची कोंढव्यात बैठक झाली. या वेळी चुकून पिस्तुलातून गोळी झाडली गेली. सराईत गुंड यात जखमी झाला.
  • ताडीवाला रस्ता पोलिस चौकीच्या परिसरात एका तडीपार गुन्हेगाराचा मुक्त वावर होता. त्याने तरुणांवर कोयत्याने वार केले होते.
  • शहर आणि जिल्ह्यातून तडीपार असताना पुन्हा शहरात आलेल्या दोन गुंडांना येरवडा व वारजे येथे पकडले गेले.
  • हडपसर व मुंढव्यातील दोन तडीपारांना पकडून त्यांच्याकडून पिस्तुले जप्त केली गेली.
  • एका तडीपार गुंडाने वारजे येथे किराणा दुकानदाराला धमकावून खंडणी मागितली.
  • प्रवाशांना लुटल्याप्रकरणी लष्कर पोलिसांनी तडीपार गुंडासह साथीदारांना पकडले.
  • कोम्बिंग ऑपरेशनमध्ये एका वेळी सहा तडीपार गुन्हेगारांना पकडले.

‘शिवसेना फुटीवेळी शिवसैनिक शांत राहण्याचे खरं कारण आलं समोर’, अनिल परबांनी स्पष्टच सांगत ‘त्या वादा’त तेल ओतलं

0

शिवसेनेतील बंड अद्याप राज्यातील जनता विसरलेली नाही. याबंडामुळे शिवसेना पक्षप्रमख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून पाय उतार व्हावं लागलं होतं. तर राज्याची धूरा पक्ष पोडणाऱ्या एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून भाजपशी युती करत घेतली होती. यावेळी राज्यात मोठा राडा किंवा आंदोलन होईल अशी स्थिती निर्माण झाली होती. पण तसे काही झाले नाही. यावरूनच आता दोन्ही शिवसेनेत कलगितूरा रंगला असून भाजपचे नेते खासदार नारायण राणे यांनी यावरून ठाकरे गटाला डिवचे आहे. तर या मुद्द्यावरून ठाकरे गटाचे नेते आमदार अनिल परब यांनी स्पष्टीकरण देताना नवा दावा केला आहे. ज्यामुळे आता या वादात तेल पडले असून दोन्ही शिवसेना आमने-सामने येण्याची शक्यता आहे.

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना महाविकास आघाडीचे सरकार होते. त्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे मंत्री होते. तर शिवसेनेचे महत्वाचे नेते यांच्याकडे पाहिले जात होते. तर मुख्यमंत्री म्हणून ते रेसमध्ये होते. पण त्यांना शरद पवार आणि काँग्रेसच्या काही नेत्यांनी विरोध केला होता. त्यामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. हाच मुद्द्या शिवसेनेत कळीचा मुद्द्या ठरला आणि बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेत उभी फूट पडली. एकनाथ शिंदे यांनी आपली राजकीय चूल वेगळी मांडली. त्यांनी शिवसेनेतील आमदार खासदार आपल्या सोबत घेत पक्ष आणि चिन्ह ही घेतलं. यामुळे राज्यात शिवसेना मोठं आंदोलन उभारेलं किंवा राडा करेल अशी शक्यता निर्माण झाली होती. पण तसे काहीच झाले नाही. यावरून आता प्रश्न चिन्ह उपस्थित केले जातायत.

याच मुद्द्यावरून आता एका खासगी वृत्तवाहिणीला दिलेल्या मुलाखतीत ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी मोठा खुलासा करताना दावा केला आहे. शिंदेंच्या बंडावेळी उद्धव ठाकरेंच्या आदेशानं आम्ही शांत होतो. अन्यथा भुजबळ, राणेंवेळी जसे राडे झाले ते झाले असते, असं म्हटलं आहे. पण आता त्यांच्या या दाव्यामुळे नवा वाद सुरू झाला असून नारायण राणेंनी तो खोडून काढत टीका केली आहे.

परब यांनी, बाळासाहेब ठाकरेंच्या हयातीतच छगन भुजबळ आणि नारायण राणेंनी बंड केलं होतं. त्यावेळी शिवसैनिक आणि बंडावेळी बंडखोर नेत्यांमध्ये संघर्ष झाला होता. पण तो एकनाथ शिंदेंच्या बंडावेळी झाला नाही. त्याला कारणही उद्धव ठाकरे होते. त्यांच्या आदेशामुळेच संतापलेल्या शिवसैनिक शांत होता. मनानं साथ सोडलेले शिवसैनिक आणि काही नेते आता उद्धव ठाकरेंनाच नको होते. त्यामुळेच त्यांनीच शांत राहण्याच्या सूचना दिल्या होत्या. आमच्यासाठी हा आदेश होता म्हणून आम्ही शांत होतो, असं परबांनी सांगितलं.

परबांच्या या दाव्यावर नारायण राणे यांनी पटलवार करताना, शिवसैनिकाचा आक्रमक स्वभावच राहिला नाही. अनिल परबांचा तर तो कधी स्वभाव होता. त्याने आतापर्यंत कुणाच्या कानशिलात तरी लगावलीये का? असा सवाल करत परबांचा दावा खोडून काढला आहे. तर अनिल परब हा राडे करणारा नाही, तो करूच शकत नाहीत. पण अनिल परब आता खोटं बोलत असल्याचा आरोप देखील नारायण राणेंनी केला आहे.

दरम्यान एकनाथ शिंदे खमके आहेत. त्यामुळेच उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांनी आंदोलनाचा मार्ग अवलंबला नाही, असा दावा शिंदे समर्थकांकडून वेळोवेळी केला जातोय. पण आता परबांच्या या खुलाशानंतर दोन्ही शिवसेनेतील वादाला नव्याने तोंड फुटले आहे.

‘ठाणे की रिक्षा, चेहरे पे दाढी…’, एकनाथ शिंदेंवर वादग्रस्त गाणं, शिवसैनिक आक्रमक; स्टुडिओ फोडलं, कुणाल कामरावर गुन्हा

0

स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा हा त्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर केलेल्या व्यंगात्मक गाण्यामुळे चांगलाच अडचणीत सापडला आहे. त्याने आपल्या शोमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीवर भाष्य करताना एकनाथ शिंदेंवर व्यंगात्मक गाणं साजर केले.या गाण्याच्या सुरुवातच ठाणे की रिक्षा, चेहरे पे दाढी…, अशी होती. हे गाणं सोशल मीडियाव्हर व्हायरल झाले असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी हे गाणं शेअर केलं आहे. कुणालच्या या गाण्यावर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे शिवसैनिक आक्रमक झाले असून आमदार मुरजी पटेल यांनी अंधेरी एमआयडीसी पोलिस ठाण्यात कुणालच्या विरोधात एफआयआर दिली आहे. संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी ज्या स्टुडिओमध्ये हे गाणं शूट झालं त्या स्टुडिओची तोडफोड केली.

कुणाल याने आपल्या स्टँडअप काॅमेडीमध्ये एकनाथ शिंदेंची खिल्ली उठवली. तो म्हणाला की, आधी भाजपमधून शिवसेना फूटली आणि त्यानंतर शिवसेनेतून शिवसेना फूटली. नंतर राष्ट्रवादीमधून राष्ट्रवादी फूटली. एका मतदाराला नऊ बटणं दिली. चालू ज्यांनी केले होते ते ठाणे जिल्ह्यातून येतात, असे म्हणत कुणालने आपले व्यंगात्मक गाणं साजरं केलं

‘ठाणे की रिक्षा, चेहरे पे दाढी असे बोल असणाऱ्या या व्यंगात्मक गिताने ते गुवाहाटीला हाॅटेलमध्ये लपले, माझ्या नजरेतून तुम्ही बघाल तर ते गद्दार दिसतील. मंत्री नाही दलबदली, फडणवीसांच्या गोदीमध्ये दिसून येतील, अशा शब्दांचा वापर केला होता. तसेच परिवारवाद संपवायचा होता म्हणून थेट कुणाचा तरी बापच चोरला, अशी खिल्ली देखील कुणालने उडवली.

सुषमा अंधारेंनी ट्विट करत कुणाला कामरावर झालेल्या एफआयआरबाबत म्हटले आहे की, लेखक साहित्यिक चित्रकार विडंबनकार हे इथल्या समाज व्यवस्थेचा आरसा असतात. त्यांच्या साहित्यकृतीतून काही उतरतं तेव्हा चिडखोरपणा न करता त्यावर आत्मचिंतन करायला हवं.. आधीच्या काळात ते खेळकरपणे होत होतं.. आता मात्र गुणी लोकांवर खोट्या एफआयआर होतात.

”प्रत्येक गावात शेतकऱ्यांना मोफत ड्रोन देणार, मात्र..” ; कृषीमंत्र्यांची मुख्यमंत्र्यांसमोर शेतकऱ्यांना अट!

0

पानी फाउंडेशनच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या पुण्यातील कार्यक्रमाला रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी उपस्थिती लावली या कार्यक्रमादरम्यान माणिकराव कोकाटे यांनी प्रत्येक शेतकरी गटाला आणि प्रत्येक गावातील शेतकऱ्यांसाठी एक ड्रोन राज्य सरकारच्या माध्यमातून मोफत देणार असल्याची घोषणा केली. मात्र ही घोषणा करताना माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांसमोर एक अट ठेवली आहे.

पानी फाउंडेशनच्या कार्यक्रमादरम्यान बोलताना कृषीमंत्री कोकाटे म्हणाले, ”पानी फाउंडेशनच्या माध्यमातून जे काम अभिनेते आमिर खान करत आहेत. ते त्यांना जमतं कारण त्यांना कोणतीही निवडणूक लढवायची गरज नसते ते राजकारणी नाहीत म्हणून हे सगळ त्यांना जमतं कारण त्यांनी काम सुरू केल्यानंतर गावांत गटतट निर्माण होत नाहीत. सर्वजण एकत्र येऊन काम करतात.”

तसेच ”पानी फाउंडेशने गटशेतीची जी संकल्पना समोर आणली आहे ती अतिशय चांगली आहे. या गटशेतीमुळे अनेक शेतकरी एकत्र येऊन त्यांचा विकास साधणार आहेत. याचा उपयोग निश्चितच शेती उत्पन्न वाढवण्यासाठी होणार आहे. त्यामुळे पुढील काळामध्ये या उपक्रमामुळे एक मोठी क्रांती घडेल अशी अपेक्षा आहे.” असंही कोकाटे म्हणाले.

याचबरोबर ”शेती गटांना आणि प्रत्येक गावातील शेतकऱ्यांना महाराष्ट्र राज्याच्या कृषी खात्याच्या वतीने मी एक ड्रोन फ्री दिला जाईल असा शब्द देतो. 100 टक्के ड्रोन दिला जाईल मात्र त्यासाठी एक अट ठेवली जाईल. की कुणीही रसायनिक फवारणी पिकांवर करायची नाही. जास्तीत जास्त नैसर्गिक शेतीकडे शेतकऱ्यांचा कल असला पाहिजे. असं राज्य सरकारचे धोरण आहे.” असं कोकाटे यांनी सांगितलं.

याशिवाय ”कृषी विभागाला दरवर्षी 5000 कोटी रुपयांची तरतूद केली गेली तर आपण शेती क्षेत्रात अनेक उपक्रम राबवू शकतो आणि क्रांती घडवू शकतो, अस सांगितल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याला तत्वतः मान्यता देखील दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कृषी खात्याच्या कुठल्याच योजनांना नाही म्हणत नाहीत. सगळ्या योजनांना ते होकार देत असतात.” असं माणिकराव कोकाटे यांनी सांगितलं.

तर, ”उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मी आभार मानतो की कृषी खाते माझ्याकडे दिले, कारण शेती मला आधीपासून माहिती आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील हा शब्द देतो. शेतकऱ्यांना माझं आवाहन आहे की कोणीही खचून जाऊ नका, चिंता करू नका प्रामाणिकपणे कर्तृत्व दाखवा म्हणजे यश निश्चित आहे. ” असं कोकाटे म्हणाले.

मुख्यमंत्री फडणवीसांनी केले ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’चे अभिनंदन, म्हणाले ‘जोपर्यंत..’

0

”फार्मर्स कपच्या मंचावर उपस्थितीत असल्याचा मला आनंद आहे. पानी फाउंडेशनची वाटचाल मी बघतोय. आमिर यांना परफेक्शनिस्ट म्हणतात, त्यांना प्रत्येक क्षेत्रात परफेक्शन येत नाही तोपर्यंत ते थांबत नाहीत.आज आमिर खान तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जात आहात यासाठी तुमचे अभिनंदन.” असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी पुण्यात पानी फाउंडेशनच्या कार्यक्रमात बोलताना सांगतिले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ”मी सुरुवातील सांगितलं होतं की ५२ टक्के महाराष्ट्र असा आहे, जिथे पाऊस कमी पडतो, तिथे जल संवाधारणातून आपण परिवर्तन करू शकतो. महाराष्ट्रात २० हजार गावांना जल परिपूर्ण केलं. गट शेतीचे आंदोलन महाराष्ट्रात सुरू झाले आहे याची एक नवी निती आणू. सुरुवातीला कृषी समृद्धी योजनेत जी गावं नव्हती ते आता मागे लागले आहेत की आम्हाला घ्या.”

तसेच ”१० ते १५ हजार कोटी रुपये आम्ही शेतीत घालतो, पीक कमी आलं, पाऊस कमी झाला तिथे देतो पण गुंतवणूक केली जात नाही. शेतीतील गुंतवणूक वाढली पाहिजे, तर शेतकरी अधिक सक्षम होऊ शकेल. गटशेतीच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या आयुष्यात परिवर्तन करू शकतो.” असंही फडणवीसांनी सांगितलं.

तर ”जे शेतकरी मागणार त्यांना सौरकृषी पंप देणार आहोत. शेतकऱ्यांना मिळणारी वीज २०२६ पर्यंत कृषी फिडर सोलारवर होणार. सरकारने खूप योजना सुरू केल्या आहेत. आता अँग्री स्टॅक मध्ये शेतकऱ्यांच्या शेतीचे डिजिटलाइशन केलं जाणार आहे. तसेच पाण्याचा वापर सुद्धा आवश्यक तेवढाच केला जाईल यावर आम्ही विचार करतोय. अजित दादांनी ५०० कोटी रुपये शेती मध्ये AI वापरण्यासाठी तरतूद केली आहे. कुठलेही घोटाळे यात होणार नाही, माती खाण्याचे काम कोणी करणार नाही. शेतीमधील शाश्वतता आपण आणत आहोत.” अशीही माहिती यावेळी फडणवीसांनी बोलून दाखवलं.

देशात साखर उत्पादन १७ टक्क्यांनी घट; अनियमित हवामान, उसावर फुलोरा रोगाचा प्रादुर्भाव महाराष्ट्राची स्थिती? दरांत वाढीची शक्यता

0

मागील आर्थिक वर्षांतील देशातील २९० लाख टनाच्या तुलनेत यंदा २४१ लाख टन उत्पादन झाले आहे. या हंगामात ५३३ साखर कारखान्यांपैकी ३८० कारखान्यांचा गाळप हंगाम आटोपला आहे. गेल्या वर्षी याच दिवशी ५३४ कारखान्यांपैकी केवळ २४० कारखाने बंद झाले होते. साखरेचे उत्पादन घटल्याने दरांत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.

‘उसाच्या गळितावर आणि साखरेच्या उताऱ्यावर परिणाम झाल्याने साखर कारखाने लवकर बंद होत आहेत. महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश या साखर उत्पादनात अग्रेसर राज्यांतील साखर उद्योगाला फटका बसला आहे. राज्यात ८३८ लाख टन गाळप झाले असून, मागील हंगामात झालेल्या १,०३० लाख टनापेक्षा ते १८.६५ टक्क्यांनी कमी आहे. ७९.२० लाख टन साखर उत्पादन झाले असून, ते मागील वर्षीच्या १०५ लाख टनापेक्षा २४ टक्क्यांनी कमी आहे. राज्यातील २००पैकी १८० कारखाने बंद झाले आहेत. मागील वर्षी ही संख्या केवळ १०३ होती,’ अशी माहिती राष्ट्रीय साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे उपस्थित होते.

‘उत्तर प्रदेशातील उसाचे गाळप ८७५ लाख टन झाले असून, ते मागील वर्षी ८७६ लाख टन होते. मागील वर्षी ९२ लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते आणि यंदा ८४ लाख टन उत्पादन झाले आहे. केंद्र सरकारच्या अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने चालू आर्थिक वर्षासाठी देशांतर्गत घरगुती वापरासाठी साखरेचा विक्री कोटा १३७.५० लाख टन निर्धारित केला होता. उत्पादन घटल्याने एस ग्रेड साखरेची किंमत ३,७८० ते ३,८३० रुपये प्रतिक्विंटल आणि एम-ग्रेड साखरेची किंमत ३,९६५ ते ४,१०० रुपये प्रतिक्विंटल आहे. इथेनॉल उत्पादनात प्रगती झाली असून, ३०३ कोटी लिटर इथेनॉल पेट्रोल मिश्रणासाठी वापरले आहे. आगामी आर्थिक वर्षांत साखर उत्पादनात वाढ अपेक्षित आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकात अंदाजे ११० ते १२० आणि देशात ३५० लाख टन उत्पादन होण्याचा अंदाज आहे,’ असे पाटील यांनी सांगितले.

‘एआय’मुळे उस उत्पादनात वाढ शक्य’

‘देशात उसाचे क्षेत्र ६० लाख हेक्टर असून, उत्पन्न ८० टन प्रतिहेक्टरवर थांबले आहे. उसाचे दर्जेदार उत्पादन, आर्थिक विकास आणि साखर उद्योगाला स्थैर्य मिळण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर अनिवार्य झाला आहे. ‘एआय’च्या मदतीने उसाचे उत्पादन ४० टक्क्यांनी वाढवता येते आणि ३० टक्के उत्पादन खर्च वाचविता येतो, हे मायक्रोसॉफ्ट कंपनी आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाने प्रात्यक्षिकांसह दाखविले आहे. बारामती येथील कृषी विज्ञान केंद्रात याचे नुकतेच सादरीकरण करण्यात आले,’ असे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.

रास्त व किफायतशीर दर (एफआरपी) एकरकमी १४ दिवसांत देण्याचा कायदा आहे. मात्र, एफआरपी टप्प्याने सामंज्यस्याने दिली जात होती; परंतु न्यायालयाच्या निकालामुळे साखर कारखान्यांना आता ‘एफआरपी’ एकरकमी द्यावीच लागेल.

 – हर्षवर्धन पाटील, अध्यक्ष, राष्ट्रीय साखर कारखाना महासंघ