Home Blog Page 138

पोलिसांनी इंगा दाखवताच प्रशांत कोरटकर बोलू लागला, सगळा डेटा मीच उडवल्याची कबुली कोठडीतच…

0

इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकी देताना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत अवमानकारक वक्तव्ये काढल्या प्रकरणी प्रशांक कोरटकर हा सध्या पोलीस कोठडीत आहे. पोलीस कोठडीमध्ये कोरटकरची चौकशी करण्यात आली. मध्यरात्री आणि पहाटेच्या वेळी चौकशी करण्यात आली. पोलिसांनी आपला खाक्या दाखवताच फोनवर माज दाखवणारा कोरटकर पोपटासारखा बोलू लागला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

इंद्रजीत सावंत यांनी तक्रार दाखल झाल्यानंतर प्रशांत कोरटकर पसार झाला होता. त्याला अटक करण्यासाठी कोल्हापूर पोलीस हे नागपूर येथील त्याच्या घरी दाखल झाल्यानंतर कोरटकर घरी नसल्याचे आढळले. जवळपास महिनाभर प्रशांत कोरटकरचा शोध सुरू होता. अखेर कोल्हापूर पोलिसांनी तेलंगणामधून त्याला अटक केली. कोल्हापूर जिल्हा कोर्टाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. त्यानंतर पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली.

चौकशीत काय म्हणाला कोरटकर?

प्रशांत कोरटकर याने पोलीस चौकशीत आपला कबुलीजबाब दिला आहे. इंद्रजित सावंत यांना मीच फोन केला होता अशी कबुली त्याने दिली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्याशिवाय, आपल्या मोबाईलमधील सगळा डेटा मीच उडवल्याची कबुली देखील कोरटकरने दिली असल्याची माहिती समोर आली आहे. तेलंगणामध्ये कोल्हापूर पोलिसांनी त्याला अटक केली होती. कोरटकर हा हैद्राबाद मार्गे चेन्नईमध्ये पळून जाण्याचा तयारीत असल्याचीही माहिती चौकशीत समोर आली.

इंद्रजीत सावंत यांच्यासोबतची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर प्रशांत कोरटकरने आपल्या विरोधात हा कट असल्याचा दावा केला होता. आपला आवाज एआयच्या माध्यमातून तयार करण्यात आला. त्यातून फोन कॉल करण्यात आल्याचा अजब दावा कोरटकरने केला होता. मात्र, पोलीस चौकशीत कोरटकरने आपणच इंद्रजीत सावंत यांना फोन कॉल केल्याची कबुली दिली.

फॉरेन्सिक विभागाने घेतले आवाजाचे नमुने….

फॉरेन्सिक विभागाने प्रशांत कोरटकरच्या आवाजाचे नमुने घेतले. यावेळी इंद्रजित सावंत यांच्या सोबत झालेला संवाद लिहून काढत कोरटकरकडून वाचून घेण्यात आला.

पुण्यात IT इंजिनिअर तरुणीचा BF कडून घात आळीपाळीने सामूहिक अत्याचार, धमकी देत आरोपीनं ३० लाख उकळले

0

पुण्यातील काळेपडळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आलं आहे. इथं एका आयटी कंपनीत काम करणाऱ्या इंजिनिअर तरुणीवर सामूहिक अत्याचार करण्यात आला आहे. पीडित तरुणीच्या प्रियकराने आधी कारमध्ये तरुणीवर लैंगिक अत्याचार केला, यानंतर त्याने आपल्या काही मित्रांना फोन करून बोलावलं, यानंतर चारही जणांनी पीडितेवर आळीपाळीने सामूहिक अत्याचार केला आहे. या प्रकरणी काळेपडळ पोलीस ठाण्यात प्रियकर तमीम हरसल्ला खानसह त्याच्या तीन मित्रांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी ही कर्नाटक राज्यातील असून ती पुण्यातील एका नामांकित कंपनीत आयटी इंजिनिअर म्हणून काम करते. २०२१ मध्ये फेसबुकवर तिची ओळख आरोपी तमीमशी झाली होती. कालांतराने या ओळखीचं रुपांतर प्रेमात झालं. आरोपीनं लग्नाचं आमिष दाखवत पीडितेला जाळ्यात ओढलं. यातून पीडित तरुणी आरोपीला भेटण्यासाठी मुंबईतील कांदिवली परिसरात आली.

दोघंही इथं एका हॉटेलमध्ये राहिले. यावेळी आरोपीनं पीडितेच्या शीतपेयात गुंगीच्या गोळ्या टाकल्या. तरुणीला गुंगी चढल्यानंतर आरोपीनं तिच्याशी जबदस्ती करत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. यानंतर तो कारने पीडितेला पुण्याला घेऊन गेला. इथंही त्यांनी पीडितेवर अत्याचार केला. तमीमने कारमध्ये पीडितेवर अत्याचार केल्यानंतर त्याने फोन करून त्याच्या इतर तीन मित्रांना देखील बोलावून घेतलं.

यानंतर चारही जणांनी आळीपाळीने तरुणीवर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केला. नराधम आरोपी एवढ्यावरच थांबले नाही, तर त्यांनी पीडित तरुणीचे अश्लील फोटो काढले. हेच फोटो व्हायरल करण्याची धमकी देत आरोपीनं पीडितेकडून तब्बल ३० लाख रुपये उकळले. तसेच त्यांनी पीडितेकडून दोन आयफोन देखील घेतले. मागील अनेक महिन्यांपासून हे ब्लॅकमेलिंक सुरू होतं. आरोपींच्या त्रासाला कंटाळून अखेर पीडितेनं पुण्यातील काळेपडळ पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी विविध कलमांतर्गत मुख्य आरोपी प्रियकर तमीम खान याच्यासह त्याच्या तीन मित्रांवर गुन्हा दाखल केला आहे. हे प्रकरण मुंबईच्या कांदिवली परिसरात घडल्याने हे प्रकरण कांदिवली पोलिसांकडे वर्ग करण्यात येणार आहे.

“मध्यरात्री एक्सप्रेस वेवर घडलं AB फॉर्मचं नाट्य…” अजितदादांनी रंगवून सांगितला अण्णा बनसोडेंच्या आमदारकीचा किस्सा

0

पिंपरीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांची विधानसभेच्या उपाध्यक्षपदी निवड झाली. या निवडीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षातील आमदारांनी त्यांचे अभिनंदन केले.याच अभिनंदनाच्या भाषणात बोलताना अजित पवार यांनी अण्णा बनसोडे यांचा 2019 मधील निवडणुकीचा किस्सा सांगितला.

मध्यरात्री अडीचला ए. बी. फॉर्म दिला : अजित पवार

अजित पवार म्हणाले, आपला कामाचा माणूस ही टॅगलाईन घेऊन अण्णांनी कामाला सुरुवात केली. प्रत्येक घरापर्यंत ते पोहचले. पण 2014 मध्ये अण्णांचा 2 हजार मतांनी पराभव झाला. गौतम चाबुकस्वार या आमच्याच एका सहकाऱ्याने त्यांचा पराभव केला. 2019 मध्ये मात्र 17 हजार मतांनी ते विजयी झाले. पण या विजयाचा एक किस्सा मला आठवतो.

2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या सुरुवातीला पक्षाने अण्णाला तिकीट नाकारले. सुलक्षणा शिलवंत यांना उमेदवारी दिली. मी त्यावेळी गप्प बसलो. प्रांताध्यक्ष जयंत पाटील होते. मी त्यांना म्हंटलं अण्णांचं तिकीट कशाला कापलं, त्यांना द्या राव. ते म्हणाले, दादा सगळंच काही माझ्या संमतीनं होतं नाही. बर म्हंटलं, हरकत नाही.

माझा जिल्हा मोठा असल्याने जयंतरावांनी मला दोन एबी फॉर्म जास्त दिले. रात्री 12 वाजता मुंबईतून निघालो. अण्णाला एक्सप्रेस हायवे जिथे संपतो तिथे दोनला बोलावले. त्याला म्हंटलं हा एबी फॉर्म घे आणि उद्या अकराला पहिला जाऊन राष्ट्रवा

दीचे तिकीट म्हणून अर्ज भरून टाक. अण्णा म्हंटला आहो ते जाहीर तर शिलवंतला झालं आहे. त्याला म्हंटलं तुला काय करायचं आहे, तु जाऊन फॉर्म भर.

मी गुपचूप त्याच्याकडे फॉर्म दिला आणि तो भरायला लावला. जयंतरावांना म्हंटलं, जरा वेगळं केलंय, तुमची संमती असू द्या. जयंतराव म्हणाले काय केलं असेल ते असू द्या, संमती आहे, पण माझं नाव कुठे सांगू नका. ती सुलक्षणा गेली सव्वा अकराला. ते म्हंटले राष्ट्रवादीचा अर्ज आला आहे, तुझा कसा राष्ट्रवादीचा फॉर्म? अशा पद्धतीने अण्णाला तिकीट दिले. त्या निवडणुकीत ते 17 हजार मतांनी निवडून आले, असा किस्सा अजितदादांनी सांगितला.

“आजही माझ्या डोळ्यात पाणी अन् अंगावर काटे उभे राहतात..”; देवेंद्र फडणवीस असं का म्हणाले?

0

काँग्रेस शासनाच्या काळात १९७१ साली मिसा कायदा आणण्यात आला. काँग्रेस शासनाच्या काळात आणलेल्या मिसा कायद्याने सर्वसामान्यांचे मुलभूत अधिकार हिसकावून घेतले. मला वाटलं, जितेंद्र आव्हाडांना आत्ताच्या आता जेलमध्ये टाकायचं तर तेव्हा टाकू शकत होतो, आता नाही. संविधान बचाव तुम्ही आज म्हणता, परंतु आणीबाणी आली तेव्हा मुलभूत अधिकार कायद्याने निलंबित केले. अभिव्यक्ती स्वातंत्र्य काढून घेतले. राज्य कायद्याने नाही हुकूमाने चालेल अशी व्यवस्था तयार झाली होती. किशोर कुमार यांच्या गाण्यावर बंदी टाकली होती. आणीबाणी योग्य नाही असं किशोर कुमारांनी म्हटलं म्हणून आकाशवाणीवर त्यांची गाणी वाजवणे बंद केले असं सांगत संविधान गौरव चर्चेवर प्रत्युत्तर देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत काँग्रेसवर हल्लाबोल केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, खरेतर आज ही बोलण्याची जागा नाही परंतु जॉर्ज फर्नांडिस यांच्या कुटुंबासोबत जे काही झाले हे आठवलं तर आजही माझ्या डोळ्यात पाणी आणि अंगावर काटे उभे राहतात अशी त्यावेळची अवस्था होती. १ लाखाहून अधिक विरोधी पक्षातील नेते जेलमध्ये टाकले होते. माझे वडील २ वर्ष जेलमध्ये होते. काकी शोभाताई जेलमध्ये होते. २ वर्ष मिसा कायदा लावला. तुम्ही केले काय, तुमचा गुन्हा काय हे सांगायला तयार नव्हते. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान गोठवून तुम्ही अख्खा विरोधी पक्ष जेलमध्ये टाकायचा ठरवला होता असं त्यांनी सांगितले.

तसेच एवढे करूनही थांबले नाही, घटनेची ४२ वी दुरुस्ती केली. भारतीय संविधानात ९९ बदल केलेत. त्यात सगळ्यात महत्त्वाचा बदल म्हणजे देशाचे पंतप्रधान, लोकसभेचे अध्यक्ष हे न्यायालयाच्या कक्षेत येणार नाहीत असं केले. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने इंदिरा गांधींविरोधात दिलेला निकाल निरस्त करण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा संविधान लिहिले तेव्हा भारत सार्वभौम लोकतांत्रिक गणराज्य होते. परंतु आणीबाणीच्या काळात त्यात समाजवादी, धर्मनिरपेक्ष हे शब्द इंदिरा गांधींनी टाकले. हे शब्द मूळ संविधानात नाहीत. या देशाचा मूळ आत्माच धर्मनिरपेक्ष आहे हे बाबासाहेब आंबेडकरांना माहिती होते असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.

दरम्यान, बाबासाहेबांनी राज्यांना दिलेले अधिकार केंद्राकडे देण्याचं काम ४२ व्या घटना दुरूस्तीने केले. केंद्र सरकारी पोलीस, तपास यंत्रणा कुठल्याही राज्यात हस्तक्षेप करू शकतात असं कायद्यात दुरुस्ती केली. परंतु आज ते असं करू शकत नाही. राज्याने परवानगी दिल्याशिवाय केंद्राच्या पोलीस दलाला राज्यात येता येऊ शकत नाही. राष्ट्रपती, राज्यपालांना अधिकार दिलेत. एखादा निर्णय ते रद्दबातल करू शकतात. परंतु ४२ व्या घटना दुरुस्तीनंतर राष्ट्रपती केवळ बाहुले होते, त्यांच्याकडे निर्णय पाठवला तर सही करूनच त्यांनी पाठवले पाहिजे अशी व्यवस्था घटना दुरुस्तीने केले होते असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर केला.

“सत्तेचा माज, मस्ती डोक्यात गेलीय… संसदीय कार्यप्रणाली, घटनेवर विश्वास नाही; विरोधी पक्षनेता निवड न झाल्यानं भास्कर जाधव कडाडले

0

“ज्यांच्याकडे पाशवी बहुमत आहे. ज्यांना सत्तेची मस्ती, मुजोरी आहे त्यांच्याकडून लोकशाहीची इभ्रत राखणे, त्याची शान राखणे, लोकशाहीची सभ्यता राखणे, लोकशाहीचं संवर्धन करणे ही अपेक्षा नाही असं सांगत उद्धव ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव कडाडले आहे. विधानसभेत विरोधी पक्षनेतेपदाची निवड न झाल्याने जाधव यांनी सरकारवर हल्लाबोल केला.

भास्कर जाधव माध्यमांशी बोलत होते. त्यावेळी ते म्हणाले की, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर माझा खूप मोठा विश्वास होता. ते संसदीय कार्यप्रणालीवर काम करणारे, प्रेम करणारे आहेत. आमची संख्या कमी जास्त विचार करणार नाही असं ते सातत्याने बोलत होते. विरोधी पक्षनेतेपदाबाबत ते सूतोवाच असतील असं मला वाटत होते. परंतु या लोकांचा संसदीय कार्यप्रणाली, घटनेवर विश्वास नाही. केवळ सत्तेचा माज आणि मस्ती यांच्याकडे आहे असं त्यांनी सांगितले.

तसेच विधानसभा अधिनियमाला जसे सदस्य बांधील आहेत तसे अध्यक्षही बांधील आहेत. अध्यक्षांनी वाट्टेल तो निर्णय घ्यायचा असं नाही. सभागृहातील प्रथा, परंपरा, नियमांप्रमाणे अध्यक्षांनी वागावे. घटनात्मक अधिकार प्रत्येकाला दिले आहेत. त्यामुळे मी कुठलीही गोष्ट चुकीची केली नाही. यांना घटनाच मान्य नाही, लोकशाही मान्य नाही. विधिमंडळ मान्य नाही असा आरोप भास्कर जाधव यांनी केला.

दरम्यान, विरोधी पक्षनेते खुर्ची रिकामी ठेवली काय किंवा पलीकडचे सगळे सदस्य विकत घेऊन बाकीच्या खुर्च्या रिकाम्या केल्या काय..सध्या तेच सुरू आहे. संविधानावर चर्चा करताना मी सांगितले, पूर्वी गोरगरिबांना दारू, मटण देऊन मते घेतली जात होती. आता ईव्हीएममधून मते घेतली जातात. जी नावे यादीत नाही ती मते वाढवली जातात. लोकशाही मातीत घालायचं ठरवलं आहे त्यांच्याकडून फार अपेक्षा नाही. उपाध्यक्षांची निवड तुम्ही करता तुमच्या मनात असते तर विरोधी पक्षनेते निवडही केली असती. माझ्या नावाची तुम्हाला अडचण असेल, मी कायद्यावर बोट ठेवून बोलतो, प्रथा परंपरेवर बोलतो. चुकीचे काय सुरू असेल तर रोखण्याचा प्रयत्न करतो. प्रथा परंपरेचे रक्षण करा, नियमांप्रमाणे बोला आणि वागा हे सांगणे चुकीचे असेल तर मी हजारवेळा ती चूक करेन असंही भास्कर जाधव यांनी म्हटलं.

लक्षवेधीसाठी पैसे घेतले जातात…

विधानसभेत अधिवेशन काळात लक्षवेधी लावण्यासाठी पैसे घेतले जातात. सभागृहात मी जे बोललो ते खरे आहे. विधान मंडळाचे अधिकारी मला भेटले, त्यांच्याशीही बोललो. नियमानुसार एका दिवसात ३ पेक्षा अधिक लक्षवेधी लावता येत नाहीत. फार तर विशेष बाब म्हणून एखाद दुसरी लक्षवेधी वाढवता येते परंतु सातत्याने २१, २४, २० लक्षवेधी लावल्या जातात. याबाबत का बोलायचे नाही. अध्यक्षांनी निर्णय घेतला म्हणून बोलायचे नाही, परंतु हे का? अध्यक्ष हेसुद्धा एक माणूस आहे. अध्यक्षांनी एखादा निर्णय घेतला तर त्यावर चर्चा करायची नाही असं सांगितले जाते पण हे बिल्कुल चुकीचे आहे असा गंभीर आरोप भास्कर जाधव यांनी केला.

हरामखोर आहेत ते, उद्धव ठाकरे विधीमंडळ परिसरात असं कुणाला म्हणाले? नेमकं काय घडलं?

0

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधीमंडळाच्या परिसरात आले असताना त्यांनी केलेल्या विधानाची सध्या चर्चा होत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते वरुण सरदेसाई यांच्यासोबत बोलत असताना त्यांनी कुणालातरी उद्देशून हरामखोर आहेत ते असं म्हटलं. त्यांचा हा संवाद कॅमेऱ्यात कैद झाला आहे. मात्र ठाकरे नेमंक कुणाला असं म्हणाले हे स्पष्ट झालं नाहीय. दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या या विधानाही सध्या चर्चा होतेय.

विधीमंडळ परिसरात वरुण सरदेसाईंशी बोलताना उद्धव ठाकरेंनी हरामखोर आहेत ते असं विधान सत्ताधारी आमदारासाठी केल्याचं म्हटलं जातंय. मात्र ते नेमकं कोणाबद्दल बोलले माहिती नाही असं त्यांच्या सहकाऱ्यांनी सांगितलं. व्हिडीओ पाहिले असता दिसतं की सभागृहात काय घडलं आणि दिशा सालियान प्रकरणाबद्दल उद्धव ठाकरे वरुण सरदेसाईंशी चर्चा करत विधीमंडळात येत होते. त्यावेळी पायऱ्यांवरून चढण्याआधी हरामखोर आहेत ते असं उद्धव ठाकरे बोलताना दिसतात.

भाजप आमदार राम कदम यांनी उद्धव ठाकरेंच्या विधानावर प्रतिक्रिया देताना म्हटलं की, विधानसभेत मी सुशांत सिंग राजपूतचा मुद्दा उपस्थित केला. ठाकरेंच्या कार्यकाळात पुरावे कशा प्रकारे नष्ट केले. रातोरात फर्निचर घाई गडबडीत काढले, रातोरात रंगरंगोटी केली. दारं, कुलपं बदलली गेली. बिहारचे पोलीस आले त्यांना अडवलं गेलं. जर ह्यांनी काही केलं नसेल तर चौकशी का करू दिली नाही.

बिहारवरून चौकशीसाठी आलेल्या पोलिसांशी गैरवर्तन केलं. ६८ दिवस हे सगळ्या गोष्टी करत होते. ६८ दिवसांनी पुरावे नष्ट करून सीबीआयकडे प्रकरण सोपवलं. आज हे सभागृहात मांडल्यानंतर दिशा सालियान प्रकरणी एसआयटी चौकशी सुरू असल्याचं सरकारने सांगितलं. जर त्यांनी कोणाला वाचवलं नसेल, काही केलं नसेल तर हा त्रागा, अपशब्द कुणासाठी आणि कशासाठी? पण महाराष्ट्राची जनता याचा अर्थ एवढाच काढेल की कोरोना काळात लोकं तडफडून मरत असताना हे सरकार सुशांतच्या घरातलं फर्निचर काढत होतं. रिया चक्रवर्तीच्या बाजूने उभा राहत होतं असे आरोप राम कदम यांनी केले.

धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडच्या पैसे आणणाऱ्या गाड्या पकडल्या; विधानसभेवेळी परळीत काय घडलं? Video व्हायरल

0

विधानसभा निवडणुकीत परळी मतदारसंघात यावेळी गोंधळ झाला होता. अनेक केंद्रांवरील वादग्रस्त व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या प्रकरणात अडीच महिन्यानंतर मुंडेंचे निकटवर्तीयांवर गुन्हा देखील झाला. परंतु आता एका पोलिस अधिकाऱ्याने विधानसभावेळी कशा पैश्यांच्या पेट्य येत होत्या, कशी दहशत होती? याविषयी चक्क एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. बीड सायबरचे पोलिस उपनिरीक्षक रणजीत कासले निलंबित होताच त्यांनी प्रकरणी तोंड उघडले असून धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडवर गंभीर आरोप केले आहेत.

रणजीत कासले यांच्या निलंबनाचे आदेश निघताच कासले यांनी वेगवेगळे करत पोलीस अधिकारी तसेच विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांवर देखील आरोप करत या सगळ्यांची चौकशी करावी अशी मागणी केली. तसेच निलंबन का केले यासह अनेक धक्कादायक गोप्यस्फोट या व्हिडिओमधून केले आहेत. कासले यांच्या निलंबनाच्या आदेश नवनीत कावत यांनी काढले आहेत.

धनंजय मुंडे, वाल्मिक कराडच्या अनेकदा पैसे आणणाऱ्या गाड्या पकडल्या

रणजीत कासले यांनी निलंबीत केल्याचे कारण सांगताना आपल्या एका व्हिडीओमध्ये म्हणाले, मी धनंजय मुंडे, वाल्मिक कराडच्या अनेकदा पैसे आणणाऱ्या गाड्या पकडल्या होत्या. त्यामुळे विधानसभा निवडणुकीवेळी आधी परळीत बंदोबस्त लावला. पण, पेट्या येणार त्यावेळीच माझ्याकडून बंदोबस्त काढला आणि आरक्षित ठेवलं. एवढच नाही तर त्याच दिवशी संत बाळूमामा कन्स्ट्रक्शन खात्यातून माझ्या पगाराच्या खात्यात 10 लाख रु. आले ते का आले?, याचा मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी तपास करावा.

तडजोड करत पैसे घेत असल्याचा व्हिडीओ समोर

बीड पोलीस दलात आता एका पीएसआयचे निलंबन करण्यात आले आहे. रणजीत कासले असे या पीएसआयचे नाव असून परराज्यात तपासाकरता गेले असता तडजोड करत पैसे घेत असल्याचा व्हिडिओ समोर आला होता. यानंतर हा विषय राज्यस्तरापर्यंत पोहोचला होता. या प्रकरणाची चौकशी करत आता कासले यांच्या निलंबनाच्या आदेश नवनीत कावत यांनी काढले आहेत.

कोण आहेत रणजीत कासले?

गेल्या 19 ते 20 वर्षा पासून पोलिस दलात नोकरी

कॉन्स्टेबल पासून खात्यांतर्गत पदोन्नती त्यामुळे पोलीस उप निरीक्षक पदावर सद्या कार्यरत

संभाजीनगर ग्रामीण येथेही कार्यरत असताना अँटीकरप्शन मध्ये एक वेळ कारवाई.

बीड जिल्ह्यामध्ये सहा वेळावेगवेगळ्या ठिकाणी बदली झाली.

या अगोदरही वरिष्ठावर गंभीर आरोप केल्याने वादग्रस्त..

ज्या ज्या ठिकाणी कार्यरत त्या त्या ठिकाणी वरिष्ठावर आरोप करत वादग्रस्त.

बीड सायबर क्राईम ब्रांच मध्ये तीन महिनापूर्वी रुजू

वरिष्ठांची परवानगी न घेता पर राज्यात गुजरात मध्ये तपास कामी गेले.

आरोपीकडून पैशाची मागणी करत तडजोड करतानाचे पुरावे,

व्हिडिओ वरिष्ठांकडे राज्य स्तरावर चौकशी अहवाल मिळाल्यानंतर निलंबनाची कारवाई.

पश्चिम महाराष्ट्र भाजपचा बडा नेता अडचणीत; भाजपच्या कार्यालयामध्ये  आणून धमकी देऊन खंडणी इचलकरंजीतून पोलिसांनी केली अटक

0

भाजपचे माजी नगरसेवक मनोज साळुंखे यांच्यासह दोघांवर खंडणी मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. इचलकरंजी शहरातील एका सोनाराला बँकेच्या व्यवहार पूर्ण कर, नाही तर संपूर्ण परिवाराला मारण्याची धमकी देऊन खंडणी मागितली होती. शहरातील भोनेमाळ परिसरातील असणाऱ्या भाजपच्या कार्यालयामध्ये सोनाराला आणून धमकी दिली होती. या प्रकरणावर पोलीसाकडून पडदा टाकण्याचा प्रयत्न केला जात होता. पण सबंधित सोनाराने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

माजी नगरसेवक मनोज साळुंखे, माजी नगरसेवक बाजीराव कुंभार, शहानवाज मुजावर या तिघांवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी इचलकरंजी पोलिसांनी भाजपचे माजी नगरसेवक मनोज साळुंखेना अटक केली आहे.

जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील दत्तवाड येथील एका सराफ व्यावसायिकाला बोगस सोने विक्रीचे खोटे गुन्हे दाखल करण्याचे धमकी देत पाच लाखाची खंडणी मागण्याचा प्रकार इचलकरंजीत घडला. त्यामध्ये भाजपचे माजी नगरसेवक मनोज साळुंखे यांच्यासह आम्ही दोघांनी हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे.

14 ते 18 मार्च दरम्यान सराफ व्यावसायिक पंकज दानवाडे याला माजी नगरसेवक मनोज साळुंखे, बाजीराव कुंभार, शहानवाज मुजावर यांनी राजर्षी शाहू महाराज पुतळा रिंग रोडवरील एका ऑफिसमध्ये बोलवून घेतले होते. यावेळी शहानवाज यांनी दानवाडे यांच्याकडे पैशाची मागणी करत मारहाण केली. पाच लाख रुपये दिल्याशिवाय सोडणार नाही, अशी धमकी देत मारहाण केली होती.

त्यामुळे घाबरलेल्या दानवाडे यांनी भीतीपोटी 50 हजार रुपये देऊन सुटका केली. अन्यथा कुटुंबाला ठार मारेल, अशी धमकी दिली असल्याची तक्रार दानवडे यांनी केली.या तक्रारीनंतर तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे.

साळुंखे यांच्यावर आतापर्यंत जिल्ह्यातील अनेक पोलीस ठाण्यात सतरा गुन्हे नोंद आहेत. तर बाजीराव कुंभार आणि मुजावर यांच्यावर देखील गुन्हे असून ते सराईत गुन्हेगार आहेत. या प्रकरणी इचलकरंजी पोलिसांनी भाजपचे माजी नगरसेवक मनोज साळुंखेना अटक केली आहे.

सिंहगड विकास आराखड्याची 15 दिवसात बैठक 6 कोटीची वर्क ऑर्डर निघाली; आमदार तापकीरांच्या पाठपुराव्याला यश

0

सिंहगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी आणि पर्यटकांच्या सोयी सुविधांसाठी सिंहगड किल्ल्याच्या विकास आराखड्याची बैठक येत्या पंधरा दिवसात घेण्यात येईल. अशी माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी विधीमंडळात दिली.सिंहगड किल्ल्याची सध्या दूरवस्था आहे, तेथे हजारो पर्यटक दररोज येतात. मात्र त्यांच्यासाठी गडावर चालण्यासाठी पायऱ्यांची दुरावस्था झाली आहे. त्यामुळे, या किल्ल्याच्या संवर्धनासाठी आणि पर्यटकांच्या सोयीसाठी विकास आराखडा कधी होणार आहे. किल्ल्यावर एकत्रित पुरातत्व विभाग, वनविभाग, सार्वजनिक बांधकाम खाते आणि जिल्हाधिकारी यांची मालकी असलेल्या यांची एकत्रित बैठक कधी होईल. असा प्रश्न खडकवासल्याचे आमदार भीमराव तापकीर यांनी लक्षवेधीमध्ये मांडला.

आमदार तापकीर यांच्या लक्षवेधीला उत्तर देताना सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार म्हणाले की, तापकीर यांनी मांडलेला प्रश्न अतिशय महत्वाचा आहे. सिंहगड किल्ल्याच्या विकास आराखडा यासंदर्भात पुरातत्व, वन, सा‌र्वजनिक बांधकाम आणि जिल्हाधिकारी या चार विभागाची एकत्रती मालकी आहे. त्यांच्यी त्या चारही विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक पालकमंत्री यांच्या नेतृत्वाखाली होणे गरजेचे आहे. त्याबाबत येत्या पंधरा दिवसांमध्ये ही बैठीक होईल असे नियोजन केले जाईल.

आमदार भीमराव तापकीर यांच्या सिंहगड विकासासंदर्भातच्या लक्षवेधीला उत्तर देताना मंत्री शेलार यांनी सहा कोटी रुपयांच्या कामे‌ सुरू करण्याची सूचना(वर्क ऑर्डर) निघाली असल्याची माहिती दिली. या सहा कोटींमधून छत्रपती राजाराम महाराज समाधी परिसरात वाड्याचे संवर्धन, कंत्राटीपध्दतीवर स्वच्छतागृह बांधकाम व देखरेख, कल्याण दरवाजाची दुरुस्ती या सर्व कामांचा समावेश आहे. यातील काही कामे सुरु झाली आहे. तर काही लवकरच सुरु होतील. अशी ही माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी दिली.

श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखाना निवडणूक संस्थापक नानांची शरणागती; अजितदादा गटाची बाजी अन् खासदार सुप्रिया सुळे यांनाही वाटाण्याच्या अक्षदा

0

मुळशी तालुक्यातील श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखाना निवडणूक जाहीर झाल्यापासून यंदा निवडणुकीमध्ये अजितदादा यांच्या दबावाला बळी पडत संस्थापक अध्यक्ष विदुरा उर्फ नानासाहेब नवले यांच्याकडून कायम मवाळ भूमिका घेत सर्वपक्षीय लोकांना एकत्र करण्याची भूमिका घेतली परंतु या सर्व प्रयत्नांमध्ये संस्थापक अध्यक्षांनाच अखेरच्या क्षणी शरणागतीच पत्करावी लागली आहे की काय अशी चर्चा सध्या परिसरात सुरू झाली आहे. कारणही तसेच आहे 21 संचालकांच्या मंडळामध्ये फक्त ४च सदस्यांची वर्णी लावण्यामध्ये त्यांना यश आल. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री मा. नामदार अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व श्री संत तुकाराम सह. साखर कारखाना संस्थापक चेअरमन विदुराजी उर्फ नानासाहेब नवले यांच्या नेतृत्वामध्ये सन २०२५-२०३० करिता संचालक मंडळ बनवताना बरीच तारेवरची कसरत करावी लागली परंतु यामध्ये विशेष बाब म्हणजे विद्यमान खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या वाट्याला मात्र वाटाण्याच्याच अक्षदा आल्या असल्याची चर्चाही सुरू झाली आहे. विशेष म्हणजे एवढा सगळा अट्टाहास करूनही संबंधित निवडणूक बिनविरोध करण्याबाबत मध्यरात्रीपर्यंत (अर्ज माघारी घेण्यास दुपारी तीन वाजेपर्यंतची मुदत) खलबते सुरू होती. आज सकाळी 11 वाजता अधिकृत यादी जाहीर झाल्यानंतरच या सगळ्या प्रयत्नांना किती यश आले आहे याची जाणीव होणार आहे.

श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखाना पाच तालुक्यांमध्ये कार्यक्षेत्र असल्याने या निवडणूकिचे बिगुल वाजल्यापासून मावळचे विद्यमान आमदार सुनील आण्णा शेळके आणि संस्थापक अध्यक्ष नानासाहेब नवले या दोघांच्या भूमिका अत्यंत महत्त्वाच्या असतानाच आमदार सुनील शेळके यांनी आपल्या राजकीय वजनाचा वापर करून अत्यंत हुशारीने संस्थापकांच्या ताब्यातून अलगद साखर कारखाना मिळवला अशी ही नवी चर्चा आता सुरू झाली आहे. श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखाना कार्यक्षेत्रातील केंद्रीय मंत्री 5 आमदार आणि माजी आमदार विद्यमान खासदार अशी गडगंज मांदीआळी असतानाही सर्वाधिक सदस्य संचालक करण्यामध्ये सुनील शेळके यांनी बाजी मारली आहे. त्यातच विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांच्या वतीने सुचवण्यात आलेल्या दिलीप दगडे, महादेव कोंढरे, अंकुश उभे, लक्ष्मण भरेकर या नावांना वाटाण्याच्या अक्षता दिल्या आहेत. विशेष म्हणजे ज्या दोन गोष्टींमुळे (माऊली दाभाडे आणि बापू भेगडे) श्री संत तुकाराम साखर कारखान्याची निवडणूक चुरशीची अन् प्रतिष्ठेची झाली त्या नावांना मात्र नव्या संचालक मंडळामध्ये स्थान मिळाले आहे.

संत तुकाराम शेतकरी विकास पॅनेलचे उमेदवार-

गट क्र. १ हिंजवडी- ताथवडे

१ नवले विदुराजी विठोबा (संस्थापक)

२ भुजबळ चेतन हुशार (नानासाहेब नवले)

३ जाधव दत्तात्रय गोपाळ (आमदार शंकर मांडेकर)

गट क्र. २ पौड – पिरंगुट

१ ढमाले धैर्यशील रमेशचंद्र (आमदार शंकर मांडेकर )

२ गायकवाड यशवंत सत्तू  (आमदार शंकर मांडेकर )

३ उभे दत्तात्रय शंकरराव (केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ )

गट क्र. ३ तळेगाव वडगाव

१ भेगडे बापुसाहेब जयवंतराव (नानासाहेब नवले)

२ दाभाडे ज्ञानेश्वर सावळेराम (आमदार सुनील शेळके)

३ काशिद संदीप ज्ञानेश्वर (माजी मंत्री बाळा भेगडे)

गट क्र. ४ सोमाटणे – पवनानगर

१ कडू छबुराव रामचंद्र (आमदार सुनील शेळके)

२ लिम्हण भरत मच्छिंद्र (आमदार सुनील शेळके)

३ बोडके उमेश बाळू (आमदार सुनील शेळके)

गट क्र. ५ खेड- शिरूर- हवेली

१ लोखंडे अनिल किसन (नानासाहेब नवले)

२ कातोरे विलास रामचंद्र (माजी आमदार दिलीप मोहिते)

३ काळजे अतुल अरूण (आमदार महेश लांडगे)

४ भोंडवे धोंडीबा तुकाराम (आमदार शंकर जगताप)

महिला राखीव

१ अरगडे ज्योती केशव (आमदार बाबाजी काळे)

२ वाघोले शोभा गोरक्षनाथ (आमदार सुनील शेळके)

अनुसूचित जाती / जमाती

भालेराव लक्ष्मण शंकर (आमदार सुनील शेळके)

इतर मागासवर्ग 

कुदळे राजेंद्र महादेव (आमदार शंकर मांडेकर )

विमुक्त जाती/भटक्या जमाती

कोळेकर शिवाजी हरिभाऊ ( माजी आमदार दिलीप मोहिते)