Home Blog Page 136

मंत्रालयात प्रवेशास अत्याधुनिक प्रणाली लागू; आता मंत्रालयात जाताना अवलंबन करावी लागणार ही पद्धत

0

राज्यातील मंत्रालयात प्रवेश आता हायटेक झाला आहे. मंत्रालयात प्रवेश केल्यानंतर यापूर्वी काही गैरप्रकार झाले होते. मंत्रालयातून उड्या मारण्याचे प्रकारही घडले होते. मंत्रालयातील हे प्रकाकर रोखण्यासाठी नवीन सुरक्षा प्रणाली तयारी केली गेली आहे. त्या प्रकल्पाचा पहिल्या टप्प्यात चेहरा ओळख आधारित प्रवेश प्रक्रिया कार्यान्वीत करण्यात आली. तसेच टप्पा २ अंतर्गत प्रवेशासाठी ‘व्हीजीटर मॅनेजमेंट सिस्टीम’ प्रणाली विकसित करण्यात आली आहे. मंत्रालयात क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी, अभ्यागत यांना यापुढे कोणत्याही कामाकरिता प्रवेश हवा असल्यास त्यांना ‘डिजीप्रवेश’ या ऑनलाईन ॲप आधारित प्रणालीद्वारे मंत्रालयात प्रवेश मिळणार आहे.

फक्त त्या मजल्यावरच प्रवेश मिळणार

अभ्यांगतांना मंत्रालयाच्या ज्या विभागात कामानिमित्त प्रवेश आवश्यक आहे. केवळ त्यांना दिलेल्या वेळेत आणि अनुज्ञेय असलेल्या मजल्यावरच प्रवेश करता येणार आहे. अनधिकृत मजल्यावर प्रवेश केल्यास त्या व्यक्तीवर कारवाई होणार आहे. मंत्रालयात आलेल्या व्यक्तीचे त्या विभागातील आपले काम पूर्ण झाल्यावर दिलेल्या वेळेत मंत्रालयातून बाहेर पडावे लागणार आहे.

ज्येष्ठ नागरीक व दिव्यांग अभ्यागतांना रांगेत उभे राहण्यामुळे होणारा त्रास विचारात घेता त्यांना दुपारी १२ वाजता प्रवेश देण्यात येईल. तर दुपारी १२ नंतर ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग अभ्यांगत यांचेसाठी स्वतंत्र रांगेची व्यवस्था राहील. तसेच ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग अभ्यांगत यांनी तत्संबंधीचे वैध प्रमाणपत्र सोबत ठेवणे आवश्यक आहे.

दुपारी दोननंतरच मिळणार प्रवेश

मंत्रालयात येणाऱ्या सर्व अभ्यागतांना दुपारी २ वाजेनंतर प्रवेश देण्यात येणार आहे. डिजीप्रवेश या ऑनलाईन ॲपवरुन प्रवेशपास घेऊन मंत्रालयात कोणालाही प्रवेश मिळणार आहे. अभ्यागतांनी मंत्रालयात प्रवेश मिळविण्यासाठी आधार कार्ड, वाहन परवाना, पॅन कार्ड आदी शासन मान्य ओळखपत्र सादर करणे आवश्यक आहे. अशिक्षीत तसेच स्मार्टफोन नसलेल्या व्यक्तींना गार्डन गेट येथे ऑनलाईन ॲप आधारीत प्रणालीद्वारे मंत्रालय प्रवेश नोंदणीकरीता तसेच मदतीकरीता एक खिडकी उपलब्ध असणार आहे.

आरएफआयडी कार्ड मिळणार

‘डिजीप्रवेश’ ॲपद्वारे आपली नोंदणी केल्यानंतर मिळणाऱ्या क्यू आर कोड आधारे मंत्रालयाबाहेर असलेल्या खिडकीवर मंत्रालय प्रवेशाकरिता आरएफआयडी कार्ड वितरीत करण्यात येईल. हे आरएफआयडी कार्ड आधारे सुरक्षाविषयक तपासणी करून मंत्रालयात प्रवेश देण्यात येईल. अभ्यागतांना आरएफआयडी प्रवेश ओळखपत्र घालून मंत्रालयात प्रवेश करावा त्यानंतर काम झाल्यावर सुरक्षा कर्मचाऱ्यांकडे जमा करणे बंधनकारक राहील.

लोकसभेत इमिग्रेशन विधेयक मंजूर, भारत धर्मशाळा नाही; नव्या कायद्यात काय आहे? अमित शाह यांच्या भाषणाचे 7 मोठे मुद्दे

0

इमिग्रेशन अँड फॉरेनर्स बिल 2025 गुरुवारी लोकसभेत मंजूर करण्यात आले. या विधेयकावरील चर्चेला उत्तर देताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले, पश्चिम बंगालमधून बांगलादेशी आणि रोहिंग्यांची घुसखोरी होत आहे. अशा परिस्थितीत, भारताच्या व्यवस्थेत, व्यवसाय आणि शिक्षणासाठी योगदान देण्यासाठी येणाऱ्या सर्वांचे स्वागत आहे. पण मग ते रोहिंग्या असोत की बांगलादेशी, ते इथे अशांतता पसरवण्यासाठी आले तर अशा लोकांना अत्यंत कठोरपणे वागवले जाईल. भारताचे नुकसान करण्याच्या मानसिकतेने कोणी आले तर त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल. ते म्हणाले की, ‘मोदी सरकार फक्त अशा लोकांना भारतात येण्यापासून रोखेल ज्यांचे हेतू चुकीचे आहेत. हा देश धर्मशाळा नाही. भारतात येणाऱ्या सर्व परदेशी नागरिकांची माहिती ठेवली जाईल. ते कोणत्या मार्गाने येत आहेत? तू कुठे राहतात? काय करत आहात. 11 मार्च रोजी लोकसभेत इमिग्रेशन आणि फॉरेनर्स विधेयक सादर करण्यात आले. यावर सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या 30 खासदारांनी आपली मते मांडली.

शहांच्या भाषणातील 7 मुद्दे-

नियम बनवून बेकायदेशीर घुसखोरांना रोखणे

आपल्या सीमेवर काही संवेदनशील ठिकाणे आहेत, लष्कराचे तळ आहेत, ती जगासाठी खुली सोडली जाऊ शकत नाहीत. याआधीही घुसखोरांना आळा बसला होता, पण तेव्हा यासाठी कोणताही नियम नव्हता. नियम करून ते थांबवण्याची हिंमत आपल्यात आहे. शास्त्रोक्त पद्धतीने संपूर्ण व्यवस्था एका कायद्यात बांधण्याचे काम केले आहे.

भारत ही धर्मशाळा नाही

‘जे लोक पर्यटन, शिक्षण, आरोग्य सेवा किंवा व्यवसायासाठी भारतात येऊ इच्छितात त्यांच्या स्वागतासाठी सरकार तयार आहे. ज्यांचा हेतू चुकीचा आहे अशा लोकांना भारतात येण्यापासून मोदी सरकार रोखेल. आमच्यासाठी धोका निर्माण करणाऱ्यांवर गांभीर्याने कारवाई केली जाईल. हा देश धर्मशाळा नाही.

भारतात येणाऱ्या परदेशी लोकांची माहिती ठोस असेल

सुरक्षेच्या दृष्टीकोनातून, आम्ही या विधेयकात ड्रग्ज कार्टेल, घुसखोर आणि हवाला व्यापाऱ्यांची कार्टेल्स संपवण्याची व्यवस्था करत आहोत. पासपोर्ट कायद्यानुसार पासपोर्ट-व्हिसा अनिवार्य असेल. परदेशी नागरिकांची नोंदणी आणखी मजबूत केली जाईल.

पूर्वी हे कायदे ब्रिटनमध्ये बनले होते, आता नवीन संसदेत

स्थलांतरितांशी संबंधित कायदे ब्रिटिश संसदेत 1920, 1930 आणि 1946 मध्ये करण्यात आले होते. भारताचे कायदे आता भारताच्या नवीन संसदेत बनवले जात आहेत.

परदेशी प्रवाशांच्या सोयीसाठी चौक्या वाढवल्या

परदेशी प्रवाशांच्या सोयीसाठी, आम्ही इमिग्रेशन पोस्टमध्ये 73 टक्क्यांनी वाढ केली आहे. 2024 मध्ये 8 कोटी 12 लाख हालचाली होतील. आम्ही आठ विमानतळांवर फास्टॅग इमिग्रेशन पॅसेंजर प्रोग्राम लागू केला आहे, ज्यामध्ये प्रवाशांना तपासण्यासाठी 30 सेकंद लागतील.

ममताजी कुंपण घालण्यासाठी जमीन देत नाहीत

पश्चिम बंगालमधून बांगलादेशी आणि रोहिंग्यांची घुसखोरी होत आहे. 450 किमी ही तुमच्या कृपेने खुली सीमा आहे, तिथून घुसखोरी होते, तिथले लोक नागरिक होतात, आधार कार्ड बनते आणि ते देशभर पसरते. पकडण्यात आलेल्या सर्व घुसखोरांकडे 24 परगण्यांचे आधार कार्ड असल्याचे आढळून आले आहे. ‘आम्ही जिथे कुंपण घालायला जातो तिथे सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते गोंधळ घालतात आणि धार्मिक घोषणा देतात. हे कुंपण थांबले असेल तर ते केवळ बंगाल सरकारमुळेच थांबले आहे. ममताजींनी आम्हाला जमीन दिली तर आम्ही 450 किलोमीटर कुंपण करू.

कायद्यानुसार परदेशी लोकांना काळ्या यादीत टाकले जाईल

आतापर्यंत एजन्सी परदेशी लोकांना काळ्या यादीत टाकत असत. याचे कोणतेही औचित्य नव्हते. इमिग्रेशन अँड फॉरेनर्स बिल 2025 कायद्यात 36 कलमे आहेत. यामध्ये संपूर्ण प्रक्रियेला कायदेशीर स्वरूप देण्यात आले आहे. त्यानुसार सर्व कार्यवाही केली जाईल. विमानतळ किंवा बंदर सोडून इतर ठिकाणाहून परदेशी व्यक्ती आल्यास ते बेकायदेशीर मानले जाईल.

‘छावा’ दमदार 42 व्या दिवशीही बॉक्स ऑफिसवर खळबळ, एवढ्या कोटींचा टप्पा गाठेल? सिकंदर ‘छावा’चा खेळ बिघडवेल?

0

विक्की कौशल स्टारर ‘छावा’नं अद्भुत कामगिरी केली आहे. हा चित्रपट थिएटरमध्ये सुरू होऊन जवळजवळ दीड महिना उलटला आणि अजूनही ‘छावा’ थकण्याची चिन्ह दिसत नाहीत.चित्रपटाचे बॉक्स ऑफिसवरील आकडे जबरदस्त आहेत आणि त्यामुळे या चित्रपटानं निर्मात्यांच्या तिजोरीत बक्कळ भर घातली आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आश्चर्याची बाब म्हणजे, रिलीजच्या सहाव्या आठवड्यातही ‘छावा’नं दररोज कोट्यवधींची कमाई केली आहे. ‘छावा’नं रिलीजच्या 42 व्या दिवशी म्हणजेच, सहाव्या गुरुवारी किती कोटींची कमाई केली? हे सविस्तर जाणून घेऊयात…

‘छावा’नं 42 व्या दिवशी किती कोटींची कमाई केली?

छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्याच्या गाथेवर आधारित ‘छावा’ चित्रपटानं प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे. अशा परिस्थिती गेल्या दीड महिन्यांपासून चित्रपटगृहांमध्ये चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांची मोठी गर्दी होत आहे. ‘छावा’च्या धमाकेदार कलेक्शनचा विचार केला, तर तो अद्याप मोठ्या पडद्यावरून बाहेर पडण्यास तयार आहे, असं वाटत नाही. गंमतीशीर बाब म्हणजे, विक्की कौशल स्टारर हा चित्रपट 2025 सालचा सर्वात मोठा ओपनर चित्रपट ठरला आहेच, पण या चित्रपटानं अनेक मोठ्या स्टार्सच्या चित्रपटांचे रेकॉर्डही मोडले आहेत.

‘छावा’च्या कलेक्शनबद्दल बोलायचं झालं तर, चित्रपटानं पहिल्या आठवड्यात 219.25 कोटी, दुसऱ्या आठवड्यात 180.25 कोटी, तिसऱ्या आठवड्यात 84.05 कोटी, चौथ्या आठवड्यात 55.95 कोटी आणि पाचव्या आठवड्यात 33.35 कोटी रुपये कमावले. चित्रपटाने 36 व्या दिवशी 2.1 कोटी रुपये, 37 व्या दिवशी 3.65 कोटी रुपये, 38 व्या दिवशी 4.65 कोटी रुपये, 39 व्या दिवशी 1.6 कोटी रुपये, 40 व्या दिवशी 1.5 कोटी रुपये आणि 41 व्या दिवशी 1.4 कोटी रुपये कमावले. आता चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या 42 व्या दिवशीच्या कमाईचे सुरुवातीचे आकडे समोर आले आहेत.

सॅक्निल्कच्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, ‘छवा’नं रिलीजच्या 42 व्या दिवशी म्हणजेच, सहाव्या गुरुवारी 1.4 कोटींचा गल्ला जमवला आहे. यासह, 42 दिवसांत ‘छवा’चं एकूण कलेक्शन आता 589.15 कोटी रुपये झालं आहे.

L2 Mpuran च्या रिलीजचा ‘छावा’वर कोणताच परिणाम नाही

‘छावा’ चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर 42 दिवसांनीही बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. मोहनलाल आणि पृथ्वीराज सुकुमारन यांच्या एल2 एम्पुरानच्या रिलीजचाही या चित्रपटाच्या कमाईवर परिणाम झालेला नाही. ‘छावा’नं 42 व्या दिवशीही कोटींचा गल्ला जमवला आहे.

सिकंदर बिघडवणार ‘छावा’चा खेळ

‘छावा’ सध्या 600 कोटींचा टप्पा ओलांडण्याच्या दिशेनं वेगानं वाटचाल करत आहे. पण सलमान खानचा सिकंदर 30 मार्च रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे. सिकंदरची लोकप्रियता पाहता, त्याला बंपर ओपनिंग मिळण्याची अपेक्षा आहे. अशा परिस्थितीत, सिकंदरच्या आगमनामुळे ‘छावा’च्या कमाईवर ब्रेक लागू शकतो, असं म्हटलं जात आहे. अशातच आता ‘छावा’ सिकंदरसमोर 600 कोटींचा टप्पा गाठणार की, नाही? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

बहुजनांना हाताशी धरुन इतिहास मोडतोडतोय; आंब्याचा सिझन आल्यामुळे भिडे बेताल बरळतोय: अमोल मिटकरी

0

शिवरायांनी आणि छत्रपती संभाजी महाराजांनी शहाजी राजे यांचा हिंदवी स्वराज्याचा विचार राबवला. आपल्याकडील प्राध्यापक, शिक्षक मात्र चुकीचा इतिहास मांडत आहेत, असं मत संभाजी भिडे यांनी व्यक्त केलं. त्यांच्या वक्तव्यनंतर आता अनेक प्रतिक्रिया समोर येत आहेत. अशातच, या वक्तव्यावर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी संभाजी भिडे यांना चांगलंच सुनावलंय. आता आंब्याचा सिझन आल्यामूळे भिडे बेताल बरळतायेत, असा टोला मिटकरींनी लगावलाय. भिडेंनी बहूजन समाजातील पोरं हाताशी धरून इतिहासाची मोडतोड सुरू केल्याचं ही अमोल मिटकरी म्हणालेय. ते अकोला येथे बोलत होते.

शिवाजी महाराजांवर आक्षेपार्ह्य विधान केलेल्या कोरटकर, सोलापूर आणि विकृत इतिहास लिहाणाऱ्या राम गणेश गडकरींवर भिडे का बोलले नाहीत?, असा सवाल देखील आमदार अमोल मिटकरी यांनी केलाय. आता संभाजी भिडेंची व्हॅलीडीटी संपल्याचा टोला यावेळी मिटकरींनी लगावलाय.

….हे जगानं मान्य केलं आहे- अजित पवार

दरम्यान, याच मुद्यांवर भाष्य करताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, त्यांना जे वाटतं ते बोलू शकतात, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्यामध्ये सर्व जाती धर्माची लोक होती. छत्रपती शिवाजी महाराज हे एक आदर्श राजा होते आणि रयतेचे राजा होते. राजा कसा असावा हे जगानं मान्य केलं आहे,असे अजित पवारांनी म्हटलं आहे. ते कोल्हापुरात माध्यमांशी बोलत होते.

संभाजी भिडे नेमकं काय म्हणाले?

छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वधर्मीय नव्हते. शिवरायांनी आणि छत्रपती संभाजी महाराजांनी शहाजी राजे यांचा हिंदवी स्वराज्याचा विचार राबवला. आपल्याकडील प्राध्यापक, शिक्षक मात्र चुकीचा इतिहास मांडत आहेत, असं मत शिवप्रतिष्ठान संस्थापक संभाजी भिडे यांनी म्हटलं आहे. छत्रपती शहाजी राजे हिंदवी स्वराज्य स्थापन व्हावे, या मताचे होते. मात्र त्यांना यश आले नाही. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांनी तो विचार पुढे आणला. राजकीय पक्ष, गट, संघटना मात्र स्वार्थासाठी शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर करून घेत आहेत, असं संभाजी भिडे यांनी केलं आहे. ते बुधवारी सांगलीत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

कायद्याच्या विरोधी भुमिका घेण्याऱ्यांचे लांगूलचालन अयोग्य संभाजीराजे छत्रपतींना तुरुंगात टाका: प्रकाश आंबेडकर

0

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी धक्कादायक वक्तव्य केले आहे. संभाजीराजे छत्रपती यांच्यावर मोक्का लावावा अशी मागणी त्यांनी केली. ‘वाघ्या’ कुत्र्याच्या समाधीचा मुद्यावरून सुरू असलेल्या राजकारणावर प्रकाश आंबेडकर यांनी धक्कादायक वक्तव्य केले. संभाजीराजे छत्रपती यांनी रायगड किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधी समोरील वाघ्या कुत्र्याचे शिल्प आहे. हे शिल्प हटवण्याची मागणी केली आहे. या मागणीच्याविरोधात धनगर समाजातील काही नेत्यांनी भूमिका घेतली आहे. त्यामुळे वाघ्या शिल्पाचा वाद चिघळणार का, याची चर्चा सुरू झाली आहे. या सगळ्या घडामोडींवर प्रकाश आंबेडकरांनी हे वक्तव्य केले.

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले की, संभाजी महाराजांना सरळ उचलून मोक्का लावावा. देशाच्या कायद्याच्या विरोधात भुमिका घेण्याऱ्यांचे लांगूलचालन करणे योग्य नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही हिंमत दाखवावी असे आवाहन त्यांनी केले. राज्याने राज्य केले पाहिजे. धर्माचे राजकारण करताना जे सोईचे ते वापरतात. संभाजीराजे छत्रपती हे राजर्षी शाहूंचे पणतू आहेत म्हणून त्यांच्या विरोधात भूमिका घ्यायची नाही असे नाही. उद्या मी सुद्धा कायदा विरोधी कृत्य केले तर मला ही तुरुंगात टाकले पाहिजे, असे सांगताना आता ही हिंमत देवेंद्र फडणवीस यांनी दाखवावी, अशी मागणी त्यांनी केली.

भाजपचे हात रक्ताने माखले, त्यांच्याकडून सौगात घेणार का?

ज्या भाजपचे हात मुसलमानांच्या रक्ताने माखले आहेत. त्यांच्याकडून सौगात ए मोदी स्विकारावा का हा विचार मौलवींनी करायला हवा, असे प्रकाश आंबेडकरांनी म्हटले. हेच मौलवी निवडणुकीच्या वेळी फतवे काढतात ना? मग तुमच्या 18 टक्के समाजाला नाकारणाऱ्यांकडून भेट स्विकारावा का? असा सवालही त्यांनी केला.

देशातले अडीच लाख हिंदू हे परदेशी नागरिकत्व घेऊन बाहेर गेले आहेत. त्यात आताच्या आकडेवारीनुसार 22 टक्के हिंदूना देश सोडून परदेशात जावे वाटत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे भाजपला आता मुसलमानांची मते हवी आहेत. त्यासाठी हे आता मुसलमानांना जवळ करू पाहत असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकरांनी केला आहे.

‘त्यांची अधिवेशनात 5-10 मिनिटे हजेरी…’; आम्ही दररोज 9 तास काम करतो अजितदादांनी ठाकरेंच सगळंच काढलं

0

राज्य विधिमंडळाचे अधिवेशन संपल्यानंतर ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारच्या कारभारावर सडकून टीका केली होती. अधिवेशन काळात या सरकारने कुठलीच नवी घोषणा केलेली नाही. राज्य सरकारला सत्तेचा माज आला असल्याची टीका पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरेंनी टीका केली. या टीकेला प्रत्युत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.

विधिमंडळाचे काम केले तर उद्धव ठाकरे यांना त्या विषयाचा अर्थ समजेल. पाच दहा मिनिटे हजेरी लावून काही समजणार नाही, असे वक्तव्य करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी टोला लगावला. आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे किती वेळ उपस्थित होते? कुठलाही प्रश्न त्यांनी मांडला नाही, असेही अजित पवार म्हणाले. विधीमंडळाचे अधिवेशन हे चार आठवडे झाले. या काळात दररोज आम्ही 9 तास काम करत होतो. विरोधकांना कोणताच मुद्दा राहिलेला नाही. त्यामुळं ते मुद्दे काढत आहेत, केवळ विरोधकाकडून टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जात असलयाचे त्यांनी सांगितले.

कोल्हापूरमध्ये विविध विषयांच्या संदर्भातील आढावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला. पुढच्या वर्षभरात कोणत्या कामासाठी किती निधी द्यावा लागणार आहे, याबाबतही चर्चा झाल्याची माहिती अजित पवार यांनी यावेळी प्रसार माध्यमाशी बोलताना दिली.

महानगरपालिकेला देखील चांगल्या इमारतीची गरज आहे. उत्तम प्रकारच्या शाळा कशा होतील यावर देखील चर्चा झाली आहे. चर्चा समाधानकारक झाली आहे. काही गोष्टींमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा करावी लागेल. कोल्हापूरच्या विमानतळाच्या संदर्भात देखील चर्चा झाली आहे, असे अजित पवार म्हणाले.

कुठलाच प्रश्न मांडला नाही

इचलकरंजी महापालिका जीएसटी मुद्दा अजून आहे तो सोडवला जाईल. प्रवेश केलेले आपलेच कार्यकर्ते होते, मध्यंतरी कोण इकडे कोण तिकडे असं झालं असेही अजित पवार म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी विधानमंडळामध्ये काम केलं तर त्यांना त्या विषयाचा अर्थ समजेल. पाच दहा मिनिटे हजेरी लावून काही समजणार नाही. आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे किती वेळ उपस्थित होते? कुठलाही प्रश्न त्यांनी मांडला नाही, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.

2100 रुपये देण्याचा निर्णय लवकरच :उपमुख्यमंत्री

नवीन आलेल्यांना मान सन्मान देऊ, पण जुन्या नेत्यांवर अन्याय होणार नाही याची काळजी घेऊ असे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. आपला पक्ष सर्व जाती धर्माचा आहे. लाडकी बहिणी आणि वीज माफीची योजना आम्ही बंद केली नाही. पुढची पाच वर्षे लाडकी बहीण योजना बंद करणार नाही, असेही अजित पवार म्हणाले. माझी थोडी तारांबळ होतेय, पण मी मार्ग काढतोय. 2100 रुपये कधी द्यायचं याचा निर्णय मी योग्य वेळी घेईन असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.

मंत्री महोदयांच्या डोक्याला ट्रकचा रॉड लागला; रक्तस्राव होत असतानाही वीर जवानाला पुष्पचक्र अर्पण;सर्वांची धावपळ

0

देशसेवा बजावत असताना वीरमरण आलेल्या वरणगाव येथील अर्जुन बाविस्कर यांच्या पार्थिवाचे दर्शन घेताना मंत्री गिरीश महाजन यांच्या डोक्याला लोखंडी रॉड लागल्याने दुखापत झाली आहे.या दुखापतीनंतर जखमी अवस्थेतच मंत्री महोदयांना वरणगाव येथील निमजाय हॉस्पिटल येथे नेण्यात आले, तेथे त्यांनी प्राथमिक उपचार घेतल्यानंतर ते वीर जवान अर्जुन बाविस्कर यांच्या अंत्ययात्रेत सहभागी झाले होते. त्यानंतर, महत्त्वाची बैठक असल्याने ते पुढे नाशिककडे रवाना झाले आहेत. दरम्यान, मंत्री महोदयांच्या डोक्याला इजा झाल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांची काहीवेळ धांदल उडाली होती.

वरणगाव येथील वीरगती प्राप्त झालेले जवान अर्जुन लक्ष्मण बाविस्कर यांना मानवंदना देण्यासाठी जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन आज वरणगाव शहरात आले होते. वीर जवान अर्जुन बाविस्कर यांच्या पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी मिल्ट्रीच्या ट्रॅकमध्ये चढले असताना ट्रॅकचा वरचा लोखंडी रॉड त्यांच्या डोक्याला लागला. त्यानंतर, डोक्यातून रक्तस्राव होत असतानाही गिरीश महाजन यांनी वीर जवान अर्जुन बाविस्कर यांच्या पार्थिव देहाला पुष्पचक्र अर्पण करत अभिवादन केले.

मात्र, डोक्याचे रक्त थांबत नसल्याने उपस्थित माजी नगराध्यक्ष सुनील काळे, कामगार नेते मिलिंद मेढे, भाजपा शहराध्यक्ष सुनील माळी, शेख आखलाक यांनी आग्रह करुन प्राथमिक उपचारासाठी त्यांना तातडीने जवळील हॉस्पिटलमध्ये नेले. रुग्णालयात डॉ. निलेश पाटील यांनी त्यांच्यावर उपचार केले. त्यानंतर, गिरीश महाजन यांनी वीर जवान अर्जुन बाविस्कर यांच्या परिवाराला भेट देत सांत्वन केले. तसेच, काळजी करू नका देशसेवा करीत असतांना अर्जुनला वीरमरण आले याचे दुःख आमच्या मनात आहे. मात्र, मी व राज्य सरकार बाविस्कर परिवाराच्या दुःखात सहभागी आहे, असे अभिवचन महाजन यांनी दिले.

दरम्यान, गिरीश महाजन यांच्या डोक्याला मार लागला असतांना सुद्धा पुढे अंत्ययात्रेत तिरंगा सर्कल पर्यंत ते चालत गेले, तिथे हजारो वरणगावकरांच्या उपस्थित मानवंदना दिली, त्यानंतर नाशिक येथे महत्वाची बैठक असल्याने मला जावे लागणार आहे, असे सांगून त्याच स्थितीत मंत्री गिरीश महाजन तातडीने वाहनाने नाशिककडे रवाना झाले.

“१२ बजे.”, कुणाल कामराविरोधात राहुल कनाल यांची पोस्ट चर्चेत, टेरर फंडिंगबाबत केला मोठा दावा!

0

प्रसिद्ध कॉमेडियन कुणाल कामराने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव न घेता त्यांच्यावर अप्रत्यक्ष विडंबन गीत सादर केलं. हे गीत सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेने धुमाकूळ घातला.

याप्रकरणी आता पोलिसांची चौकशी सुरू आहे. यादरम्यान, शिवसेनेच्या युवासेना सरचिटणीस राहुल कनाल यांची पोस्ट चर्चेत आली आहे. सरकारविरोधात कंटेटचा प्रचार करण्याकरता कुणाल कामराला दहशतवाद्यांकडून निधी मिळत असल्याचा मोठा दावाही त्यांनी केला आहे.

“आपल्या माननीय पंतप्रधान, माननीय गृहमंत्री, माननीय अर्थमंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांविरुद्ध बोला, जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असणे हे सर्वांनाच पचत नाही.. म्हणून कुणाल कोमरासारख्या कठपुतळ्यांना घेऊन दहशतवाद्यांकडून निधी घेऊन त्यांना पाठिंबा देऊन आपल्या देशाची आणि राज्याची अखंडता व कायदा सुव्यवस्थेला हानी पोहोचवली जात आहे’, असं राहुल कनाल म्हणाले.

राहुल कनाल म्हणाले की ते कुणाल कामराचे यूट्यूब चॅनल बंद करण्याची आणि डिमॉनिटाइज करण्याची विनंती युट्यूबला करणार आहेत. त्यांनी असेही नमूद केले की ते खार पोलीस स्टेशनमध्ये पुरावे शेअर करतील आणि यूट्यूब कार्यालयाला भेट देतील. राहुल कनाल उद्या सकाळी खार पोलीस ठाण्यात ११ वाजता पुरावे सादर करण्याकरता जाणार आहेत. तसंच, युट्यूब ऑफिसलाही भेट देणार आहेत. तिथे ते कुणाल कामराचं चॅनेल बंद करण्याची विनंती करणार आहेत. तसंच, त्याच्या बँक खात्याचीही चौकशी करण्याची मागणी राहुल कनाल यांनी केली आहे.

महाराष्ट्र विधिमंडळ समित्यांचे प्रमुख सरकारकडून जाहीर : कोणाच्या नावाची वर्णी?

0

महाराष्ट्र शासनाच्या विद्यमान विधिमंडळामध्ये सदस्यांना मानाची पदे देण्यास येत असलेल्या मर्यादा लक्षात घेऊन महाराष्ट्र विधानसभा 2024-25 या वर्षासाठी विधान मंडळाच्या विविध समित्या जाहीर करण्यात आल्या आहेत.

महायुतीतील सर्वच आमदारांना संधी देणे शक्य नसल्यामुळे भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना या तीन माहितीच्या सदस्यांना विभिन्न समित्यांवर नियुक्त करून सर्वांना खुश करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. विधान मंडळाचे एक वर्षाच्या मुदतीवरती संबंधित नियुक्त करण्यात आले असल्या तरी सुद्धा शहरी आणि ग्रामीण भागात प्राबल्य राखण्यासाठी या समित्यांमध्येही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विशेष लक्ष देण्यात आले असल्याचे जाणवत आहे. त्याबरोबर भारतीय जनता पक्षाच्या वतीने सुद्धा विशेष लक्ष देऊन ज्येष्ठत्वानुसार समिती सदस्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. अधिवेशन संपताच सरकारकडून या महत्त्वाच्या समित्यांचे प्रमुख जाहीर करण्यात आले आहेत.

याबाबतची माहिती पुढीलप्रमाणे…

महाराष्ट्र विधिमंडळाच्या विविध समित्या आणि प्रमुख

1. अंदाज समिती -अर्जुन खोतकर

2.लोकलेखा समिती -विजय वडेट्टीवार

3.सार्वजनिक उपक्रम समिती -राहुल कूल

4.पंचायत राज समिती- संतोष दानवे

5.रोजगार हमी योजना समिती -सुनील शेळके

6.उपविधान समिती-प्रतापराव पाटील चिखलीकर

7.अनुसूचित जाती कल्याण समिती -नारायण कुचे

8.अनुसूचित जमाती कल्याण समिती -दौलत दरोडा

9. विमुक्त जाती व भटक्या जमाती कल्याण समिती – सुहास कांदे

10.महिला व बालकांचे हक्क आणि कल्याण समिती -मोनिका राजळे

11.इतर मागासवर्ग कल्याण समिती -किसन कथोरे

12.अल्पसंख्यांक कल्याण समिती -मुरजी पटेल

13.मराठी भाषा समिती-आशुतोष काळे

14.विधानसभेच्या समित्या विशेषधिकार समिती -नरेंद्र भोंडेकर

15.विनंती अर्ज समिती -अण्णा बनसोडे

16.आश्वासन समिती -रवी राणा

17.नियम समिती -राहुल नार्वेकर

18.सदस्य अनुपस्थिती समिती -किरण लहामटे

19.अशासकीय विधेयके व ठराव समिती -चंद्रदीप नरके

20.सदस्यांचे वेतन व भत्ते संयुक्त समिती -अजित पवार

21.विधान मंडळ माजी सदस्यांच्या निवृत्तीवेतन संयुक्त समिती -अजित पवार

22.ग्रंथालय समिती -प्राध्यापक राम शिंदे

23.आमदार निवास व्यवस्था समिती -शिवेंद्रसिंहराजे भोसले

24.आहार व्यवस्था समिती -डॉक्टर बालाजी किनीकर

25.धर्मादाय खाजगी रुग्णालय समिती -डॉ. आशिष जयस्वाल

26.वातावरणीय बदल संदर्भातील संयुक्त समिती -राम शिंदे

पुण्यातील रस्ते मोकळा श्वास घेतायंत; ATMS मुळे वाहतुक वेगाची 10.44 टक्क्यांनी वाढ तर कोंडी 53 टक्क्यांनी कमी

0

मुंबईनंतर आता पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील वाहतूक कोंडी हा प्रशासनासमोरील व प्रवाशांसमोरील मोठा प्रश्न आहे. त्यासाठी, वाहतूक पोलिसांकडून सातत्याने नवनवीन उपाययोजना केल्या जातात. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी विधानसभेतही शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पायाभूत सुविधांवर भर देण्यात येत असल्याचं म्हटलं होतं.तसेच, मेट्रोचं जाळं विस्तारत असल्याचेही त्यांनी सांगितलं होतं. पुणेकरांसाठी आता आनंदाची बातमी आहे, कारण पुणे शहरातील वाहतूक कोंडी तब्बल 53 टक्क्यांनी कमी झाली आहे तर वाहतुकीचा वेग 10.44 टक्क्यांनी वाढली आहे.

पुणे पोलिसांनी महत्वाची पत्रकार परिषद घेऊन या विषयी माहिती दिली. पुणे शहरात सर्वात पहिल्यांदा एटीएमएस (अडपटीव्ह ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टिम), गुगल मॅप्स, नागरिकांच्या तक्रारी व सोशल मिडिया यांच्या माध्यमातून वाहतूक कोंडीचा विश्लेषणात्मक अभ्यास करून वाहतुकीत सुधारणा करण्यात आली आहे.

वाहतूक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिलेले प्रशिक्षण, सिग्नल यंत्रणेमध्ये केलेले बदल, ऑफ स्ट्रीट पार्किंग व्यवस्था याची अंमलबजावणी यामुळे पुणेकरांचा वाहतूक कोंडीचा मनस्ताप कमी होणार आहे.

याशिवाय नियमभंग करणाऱ्या वाहन चालकांवर विशेष मोहिमेअंतर्गत मागील वर्षीच्या 3 महिन्याच्या तुलनेत पाच पट वाढ झाली असून कारवाईत सुद्धा दुप्पट वाढ झाली आहे. पुण्याचे अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी आज पुण्यातील वाहतूक कोंडीसंदर्भात पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. त्यानुसार, शहरातील वाहतूक कोंडी 53 टक्क्यांनी कमी झाल्याने रस्ते मोकळा श्वास घेत आहेत.