Home Blog Page 128

पुण्यात परदेशी तरुणीवर अत्याचार; राजकीय कनेक्शनने खळबळ, राष्ट्रवादीकडून तातडीचा खुलासा, नेमकं प्रकरण काय?

0

पुण्यात 27 वर्षीय परदेशी महिलेवर 7 जणांकडून लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पुणे पोलिसांनी 7 जणांना अटक केली असून यात राष्ट्रवादी काँग्रेसचा माजी पदाधिकारी शंतनू कुकडे यासह इतरांचा समावेश आहे. भूतानवरून पुण्यात शिक्षण आणि कामासाठी आलेल्या महिलेशी आधी ओळख करून तिच्याशी जवळीक साधत कुकडे याच्या मित्रांनी विविध ठिकाणी तिच्यावर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. काही दिवसांपूर्वी कुकडे याला 2 मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी अटक केली.

राष्ट्रवादी काँग्रेसचा माजी पदाधिकारी शंतनु कुकडे याला काही दिवसांपूर्वी पुणे पोलिसांनी 2 मुलींवरती लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी अटक केली होती. मागील वर्षी या पदाधिकाऱ्याने पक्षातून राजीनामा दिला होता असं असलं तरी सुद्धा कुकडे विरोधात दोन्ही शिवसेनेकडून जोरदार टीका करण्यात आली होती. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलेल्या माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी कुकडे हा अनेकांचे धर्मांतर करत असल्याचा आरोप केला होता, तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून कुकडे याच्या पुण्यातील नाना पेठेतील घराबाहेर आंदोलन करण्यात आले होते. यावेळी सुद्धा कुकडे याच्या बँकेत किंबहुना त्याच्या संस्थेत विदेशातून पैसे येत असल्याचा आरोप करण्यात आला होता.

असं असताना आता कुकडे याच्याविरोधात 27 वर्षीय भूतानची रहिवासी असलेल्या एका महिलेने लैंगिक अत्याचार केल्याचे आरोप केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणात कुकडे याच्या 6 मित्रांना सुद्धा अटक करण्यात आली आहे, यात एक डीजे तर एक जण वकील आहे. 2020 मध्ये शिक्षणासाठी आणि त्यानंतर नोकरी करण्यासाठी भारतात आलेल्या भूतान मधील या महिलेची ओळख या प्रकरणातील एका आरोपीशी झाली आणि त्याने तिची भेट कुकडे याच्यासोबत करून दिली. कुकडे याने त्या महिलेला पुण्यात वास्तव्यास जागा दिली आणि इतर मित्रांशी सुद्धा ओळख करून दिली. या ओळखीचा फायदा घेत कुकडे आणि त्याच्या इतर मित्रांनी वेळोवेळी विविध ठिकाणी जाऊन पार्टीच्या निमित्ताने तिच्याशी जवळीक साधली आणि याचा गैरफायदा घेत वेळोवेळी लैंगिक अत्याचार केले.

याप्रकरणी आता विरोधकांनी जोरदार टीका करायला सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी पक्षाचा माजी पदाधिकारी असला तरी सुद्धा त्याच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे अशी मागणी शिवसेना वेगळाच बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. तसेच कुकडे हा नाना पेठेत राहत असलेल्या ठिकाणी जी संस्था चालवत होता त्याची सुद्धा चौकशी करून त्या संस्थेच्या बँक खात्यात किती पैसे आहेत ते कुठून आलेत आणि त्या पैशाचा कुठे वापर झाला आहे याची चौकशींकरावी अशी मागणी करण्यात येतेय.

नेमकं काय प्रकरण?

शंतनू कुकडे याच्यावर काही दिवसांपूर्वी लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या गुन्ह्याचा तपास करताना काही गोष्टी समोर आल्या. त्यामध्ये आणखी एक फिर्यादी समोर आली आहे. त्या फिर्यादीने दिलेल्या तक्रारीच्या आधारे आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये नमूद केल्यानुसार, शंतनू कुकडे हा मुख्य आरोपी आहे. पीडित महिला ही गेल्या चार-पाच वर्षांपासून शंतनू कुकडे याला ओळखत होती. शंतनू कुकडे हा पुण्यात एक संस्था चालवत होता. या संस्थेत शंतनू कुकडे याने पीडित तरुणीला राहण्यासाठी जागा दिली होती. यादरम्यान दोघांमध्ये शारीरिक संबंध निर्माण झाले. एक-दोन वर्षांनी शंतनूचे मित्रही तिकडे येऊ लागले. हे सगळेजण अनेकदा बाहेरही जायचे. या मित्रांनी वेगवेगळ्या ठिकाणी आणि वेगवेगळ्या वेळी पीडित तरुणीवर लैंगिक अत्याचार केले. यामध्ये शंतनू कुकडे याच्यासह 9 जण आरोपी आहे. पीडित तरुणी मूळची भूतानची आहे. काही वर्षांपूर्वी ती पुण्यात नोकरी आणि शिक्षणाच्या उद्देशाने आली होती. पुण्यात ती ऋषिकेशला भेटली. त्याच्यासोबतही तरुणीचे संबंध होते. ऋषिकेशने या तरुणीची ओळख शंतनूशी करुन दिली, अशी माहिती पोलिसांनी दिली.

तुळजापुरात ड्रग्जचा बाजार, पेडलर पुजाऱ्यांचे सर्वपक्षीय राजकीय कनेक्शन समोर, ओमराजे निंबाळकर म्हणाले….

0

तुळजापूर ड्रग प्रकरणात 13 पुजाऱ्यांचा संबंध असल्याचे उघड झाल्यानंतर आता या पुजाऱ्यांचे राजकीय कनेक्शन समोर आले आहे. या प्रकरणात सर्वच पक्षांचे मिलीभगत असल्याचं दिसून येत आहे . या प्रकरणातील राहुल परमेश्वर आणि सुमित शिंदे हे दोघे ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते असल्याचा समोर आलं आहे . ड्रग प्रकरणातील या आरोपींचे खासदार ओमराजे निंबाळकरांसोबत फोटो व्हायरल झाल्याने काही दिवसांपूर्वी मोठी खळबळ उडाली होती .तर विश्वनाथ उर्फ पिंटू मुळे चंद्रकांत उर्फ बाबू कने,विनोद गंगणे, तुळजापूरचे माजी नगराध्यक्ष हे भाजपशी संबंधित आहेत .तुळजापूर प्रकरणात आत्तापर्यंत एकूण 35 आरोपी आहेत त्यातले 13 आरोपी पुजारी असल्याचं सूत्रांचे म्हणणे आहे .पण या पुजाऱ्यांचा रोजच्या पुजाऱ्यांशी संबंध नाही असे पुजारीची भूमिका आहे.

काही दिवसांपूर्वीच तुळजापूर ड्रग प्रकरणात आरोपींसोबत फोटो व्हायरल झाल्या प्रकरणे खासदार ओमराजे निंबाळकर आणि भाजप आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांच्यात आरोपींवरून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू झाले होते .काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धीरज पाटील यांनी भाजप आमदार राणा जगजीत सिंह पाटील यांच्यावर तुळजापूर प्रकरणातील आरोपींचे फोटो दाखवत हे आरोपी राणा पाटील यांचे कार्यकर्ते असल्याचा दावा केला होता .तर खासदार ओमराजे निंबाळकर यांचे आरोपींसोबत फोटो ही व्हायरल झाले होते .या प्रकरणात सर्वच पक्षांचे आरोपी असल्याचे उघड होत आहे .त्यामुळे तुळजापूर ट्रक प्रकरणाशी जोडला गेलेला राजकीय वरदहस्त हाही गंभीर प्रश्न समोर आला आहे .

ओमराजे निंबाळकर म्हणाले…

तुळजापूर ड्रग प्रकरणात आरोपी चंद्रकांत कने याने विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा प्रचार केला होता .तर ट्रक प्रकरणातील आरोपी विनोद गंगणे हे भाजपशी संबंधित आहेत .यावर खासदार ओमराजे निंबाळकर म्हणाले,’या प्रकरणाचा सगळ्यात पहिल्यापासून मी पाठपुरावा करत आहे .केवळ लोकप्रतिनिधी म्हणून हा पाठपुरावा करत नाही इथला जबाबदार नागरिक म्हणून करत आहे .आपल्या जिल्ह्याच्या तरुणांवर या ड्रगचा किती खोलवर परिणाम होतो त्याची मला जाणीव आहे .तरुण पिढी ड्रग्सच्या आहारी जाऊ नये ही माझी मानसिकता आहे .यासंदर्भात मी गृहमंत्री अमित शाह यांनाही पत्र लिहिलं आहे .यात सेंट्रल नार्कोटिक्सला ही मी पत्रव्यवहार केले आहेत .संसदेत मी हा विषय उचलला आहे .स्थानिक एसपींची मी संपर्कात आहे .

या प्रकरणात आमचा सख्खा भाऊ जरी असला किंवा कोणी जरी असेल तर त्याच्यावरही कारवाई होणारच असे ओमराजे निंबाळकर म्हणाले .व्हायरल फोटोविषयी बोलताना ते म्हणाले, मी कायम लोकांच्या संपर्कात असतो. जर कोणी माझ्यासोबत फोटो काढायला आला तर मला तुम्ही कोण आहात हे विचारणं शक्य नसतं असंही ते म्हणाले .यात भाजपशीही संबंधित कोणी असेल तरी मी त्याला पक्षाशी जोडत नाही .संबंधित आरोपीला आरोपीसारखं वागवून त्याच्यावर कारवाई करा अशी मागणी असल्याचं निंबाळकर म्हणाले . दरम्यान, सरसकट पुजाऱ्यांना बदनाम करू नका, याचा रोजच्या पुजाऱ्यांशी संबंध नसल्याचं पुजारी मंडळाचे विनित शिंदे यांचं म्हणणं आहे.

तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात कोणते आरोपी समाेर?

तुळजापुरात गेल्या अनेक महिन्यांपासून सुरु असलेल्या ड्रग्ज प्रकरणात मुंबईतील महिला संगीता गोळेकडून ड्रग्ज पुरवठा होत असल्याचे समोर आल्यानंतर तुळजापुरातील काही आरोपी या रॅकेटमध्ये सामिल असल्याचे समोर आले. मुंबईतून सोलापूर मार्गे तुळजापुरात ड्रग्ज सप्लाय झाल्याचे समोर आल्यानंतर तामलवाडी टोल नाक्यावर पहिल्यांदा ड्रग्ज कारवाई करण्यात आली. तुळजापुरात गेल्या तीन वर्षांपासून ड्रग्ज तस्करी होत असल्याचा पुजाऱ्यांचा आरोप होता. यात आतापर्यंत 35 जण आरोपी असून तुळजापूर येथील अमित उर्फ चिमू अशोकराव आरगडे व युवराज देविदास दळवी आणि नळदुर्ग येथील संदीप संजय राठोड या 3 आरोपीना 45 ग्रॅम ड्रग्ज असलेल्या 59 पुड्या ड्रग्जसह 14 फेब्रुवारीला तामलवाडी येथे रंगेहात अटक करण्यात आली.

त्यानंतर या 3 आरोपीना ड्रग्ज पुरवठा करणारी मुंबई महिला तस्कर संगीता गोळेला 22 फेब्रुवारी,संतोष खोतला 27 फेब्रुवारी,तुळजापूर तालुक्यातील सराटी येथील विश्वनाथ उर्फ पिंटू मुळे याला 28 फेब्रुवारीला अटक करण्यात आली. सोलापूरहुन ड्रग्ज खरेदी करणारे सयाजी चव्हाण, ऋतूराज गाडे व संकेत शिंदे या 3 जणांना 16 ग्रॅम ड्रग्ज असलेल्या 30 पुड्या ड्रग्जसह 4 मार्च रोजी अटक करण्यात आली. पुणे येथील सुल्तान उर्फ टिपू शेख व सोलापूर येथील जीवन साळुंके या दोघांना 23 मार्चला, राहुल कदम-परमेश्वर याला 24 मार्चला अटक केली त्या दिवशी 4 गोपनीय व नवीन 6 अशी 10 जणांची नावे उघड केली. गजानन हंगरकर याला 25 मार्चला अटक केली त्यानंतर पोलिसांनी कोर्टात 26 मार्चला नवीन 10 आरोपींची नावे जाहीर केली.

रिझर्व्ह बँकेने रेपो रेट घटवला, बँकाही कर्जाचे व्याजदर कमी करणार? तुमचा होम लोनचा हप्ता किती रुपयांनी कमी होणार? जाणून घ्या सविस्तर

0

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची द्वैमासिक बैठक बुधवारी पार पडली. या बैठकीनंतर गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्याकडून यांच्याकडून रेपो रेटमध्ये कपात करण्याची घोषणा केली. त्यानुसार रेपो रेटमध्ये 0.25 बेसिस पॉईंटची कपात करण्यात आली आहे. त्यामुळे रेपो रेट 6.25 टक्क्यांवरुन 6 टक्क्यांवर आला आहे. रिझर्व्ह बँकेकडून सलग दुसऱ्यांदा रेपो रेटमध्ये कपात करण्यात आली आहे. त्यामुळे देशातील प्रमुख बँकांवर कर्जावरील व्याजदरात कपात करण्यासाठी दबाव निर्माण होऊ शकतो. ही शक्यता गृहीत धरुन बँकांनी कर्जावरील व्याजदर 0.25 टक्क्यांनी घटवल्यास गृहकर्ज आणि वाहन कर्जाचे हप्ते फेडणाऱ्या सर्वसामान्य ग्राहकांना मोठा दिलासा मिळू शकतो.

रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार 1 ऑक्टोबर 2019 नंतर ज्यांनी फ्लोटिंग व्याजदरावर कर्ज घेतलं आहे त्यांना बाहेरच्या बेंचमार्कशी जोडणं गरजेचे आहे. त्यामुळे आरबीआयनं रेपो रेट घटवल्यास बँकांनी देखील गृह कर्जावरील व्याजदर कमी करणे अपेक्षित आहे. त्यामुळे रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये कपात केली तर गृहकर्ज स्वस्त होण्याची शक्यता असते. याचा फायदा नव्याने गृहकर्ज घेणाऱ्यांना आणि फ्लोटिंग इंटरेस्ट रेट असणाऱ्यांना होऊ शकतो. त्यामुळे समजा तुमच्या गृहकर्जाचा व्याजदर 8.50 टक्के असेल तर त्यामध्ये 0.25 टक्क्यांची कपात होऊन तो 8.25 टक्क्यांवर येईल.

होम लोनचा EMI किती रुपयांनी कमी होणार?

होम लोन – 40 लाख रुपये

कर्जाचा कालावधी – 30 वर्ष

व्याजदर – 8.5 टक्के

ईएमआय – 30 हजार 757 रुपये

होम लोन – 40 लाख रुपये

कर्जाचा कालावधी – 30वर्ष

नवे व्याजदर – 8.25 टक्के

ईएमआय – 30 हजार 51 रुपये

किती पैसे वाचणार ?

706 रुपये प्रति महिना

8 हजार 472 रुपये प्रति वर्ष

रेपो रेट म्हणजे काय?

जेव्हा बँकांना पैशाची गरज भासते, तेव्हा त्या RBI कडून कर्ज घेतात. या कर्जावर बँकांना जो व्याजदर द्यावा लागतो, तो म्हणजे रेपो रेट. त्यामुळे रेपो रेट कमी झाल्यास बँकांना रिझर्व्ह बँकेकडून कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध होऊ शकते. बँकांना कमी दराने कर्ज मिळाल्यास त्या ग्राहकांनाही कमी व्याजदराने कर्जपुरवठा करु शकतात. RBI रेपो रेटचा वापर अर्थव्यवस्थेतील तरलता आणि चलनवाढ नियंत्रित करण्यासाठी करते.

नवकार महामंत्र दिन : मोदी अनवाणी आले, लोकांमध्ये बसले; म्हणाले, जैन धर्म भारताच्या बौद्धिकतेचा कणा

0

भगवान महावीर यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला नवकार महामंत्र दिनाचं आयोजन करण्यात आलं आहे. नवी दिल्लीच्या विज्ञान भवनात या नवकार महामंत्राचा जप करण्यता आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. त्यांनीही नवकार मंत्राचा जप केला. महावीर जयंतीला जैन धर्माचे 24 वे तीर्थंकर भगवान महावीर यांच्या जन्माचा उत्सव साजरा केला जातो. या निमित्ताने 108 देशाचे लोक या उत्सवात सामील होतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी या कार्यक्रमात अत्यंत श्रद्धा भावनेने पोहोचले. कार्यक्रमात ते अनवाणीच आले. डायसवर न बसता लोकांमध्ये बसले. त्यानंतर त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. मी नवकार महामंत्राच्या अध्यात्मिक शक्तीची मला अजूनही माझ्यात जाणीव होत आहे, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

काही वर्षापूर्वी बंगळुरू येथे अशाच एका सामुहिक मंत्रोच्चाराचा मी साक्षी बनलो होतो. आज मला तीच अनुभूती येत आहे. तेच गहिरेपण जाणवत आहे. नवकार मंत्र केवळ मंत्र नाहीये. हे आपल्या आस्थेचं केंद्र आहे. आपल्या जीवनाचा मूळ स्वर आणि त्याचं महत्त्व केवळ अध्यात्मिक नाहीये. स्वत:पासून समाजापर्यंत सर्वांना मार्ग दाखवणारा हा महामंत्र आहे. जनापासून जगाचा हा प्रवास आहे. या मंत्राचं प्रत्येक कडव नव्हे तर प्रत्येक अक्षर हे एक मंत्रच आहे, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

अन् मोदी अनवाणी आले
नवकार महामंत्रात मोदी आले. पण त्यांच्या फोटोतून एक गोष्ट स्पष्टपणे जाणवत आहे. ती म्हणजे मोदी भारतीय संस्कृतीचा प्रचंड आदर करत असल्याचं दिसून येत आहे. मोदी नवकार महामंत्रात सामील झाले. पण श्रद्धेचं प्रतिक म्हणून ते कार्यक्रमात अनवाणीच आले होते. मोदी जेव्हा तिथे पोहोचले तेव्हा त्यांच्या पायात बुट नव्हते. केवळ सफेद रंगाचे मोजे पायात होते. तर कार्यक्रमाच्या ठिकाणी डायस असतानाही मोदी डायसवर बसले नाहीत. ते लोकांमध्ये जमिनीवर भारतीय बैठक मारून बसले.

स्वत:वर विश्वास ठेवा
स्वत:वर विश्वास ठेवा असं नवकार महामंत्र सांगतो. स्वयंचा प्रवास सुरू करा. शत्रू बाहेर नाहीत. आपल्याच आत असतात. नवकार महामंत्र नकारात्मक विचाराला दूर करतो. अविश्वासाला दूर करतो. तसेच स्वार्थच खरा दुश्मन आहे हे सांगतो. त्यावर मात करणं हाच खरा विजय आहे. त्यामुळेच जैन धर्म बाहेरचं जग नव्हे तर आपल्या आतलं जग जिंकण्याची प्रेरणा देतो, असंही मोदी म्हणाले.

नवकार महामंत्र एक मार्ग
नवकार महामंत्र एक मार्ग आहे. हा मार्ग मानवाला शुद्ध करतो. मानवाला सौहार्दाचा मार्ग दाखवतो. नवकार मंत्र खऱ्या अर्थाने मानव, ध्यान, साधना आणि आत्मशुद्धीचा मंत्र आहे. जीवनाचे नऊ तत्त्वे आहेत हे आपल्याला माहीत आहे. हे नऊ तत्त्व आयुष्याला यशाकडे घेऊन जातात. त्यामुळेच आपल्या संस्कृतीत नऊला विशेष महत्त्व आहे. नवकार महामंत्राचं हे दर्शन विकसित भारताच्या व्हिजनशी जोडलं जातंय. मी लालकिल्यावरून म्हणालो होतो की, भारत म्हणजे विकास आणि वारसा आहे. एक असा भारत, जो थांबणार नाही. तो ऊंच शिखरं गाठेल, पण आपलं मूळ विसरणार नाही. विकसित भारत आपली संस्कृती जपेल. त्यामुळेच आपण तीर्थंकराच्या शिकवणी अंमलात आणत असतो, असंही त्यांनी सांगितलं.

मोदींनी दिले नऊ संकल्प
आज एवढ्या मोठ्या संख्येने जगभरात नवकार महामंत्राचा जप केला जात आहे. आपण जिथेही असू तिथे नऊ संकल्प केले पाहिजे. या नऊ संकल्पाने आपल्याला नवीन ऊर्जा मिळेल, ही माझी गॅरंटी आहे, असंही त्यांनी सांगतिलं.

पहिला संकल्प – पाणी वाचवा

दुसरा संकल्प – एक झाड आईच्या नावे लावा

तिसरा संकल्प – स्वच्छतेचं मिशन

चौथा संकल्प – व्होकल फॉर लोकल

पाचवा संकल्प – देश दर्शन

सहावा संकल्प – नैसर्गिक शेतीचा स्वीकार करा

सातवा संकल्प – हेल्दी लाइफस्टाइल सुरू करा

आठवा संकल्प – योग आणि खेळाला जीवनात स्थान द्या

नववा संकल्प – गरीबांना मदत करा

ज्ञान भारत मिशन काय आहे?
जेव्हा भगवान महावीर यांच्या 2550व्या निर्वाण महोत्सवाची वेळ आली तेव्हा आम्ही देशभरात हा उत्सव साजरा केला. जेव्हा प्राचीन मूर्त्या विदेशातून भारतात येतात तेव्हा आपल्या तीर्थंकराच्या मूर्त्याही येतात. जैन धर्माचं साहित्य भारताच्या बौद्धिकतेचा कणा आहे. हे ज्ञान जतन करणं आपलं कर्तव्य आहे, असं त्यांनी सांगितलं.

त्यामुळे आपण प्राकृत आणि पालीला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे, असं त्यांनी सांगितलं. तसेच ज्ञान भारतम मिशन सुरू करण्याची माहितीही त्यांनी दिली. दुर्देवाने अनेक महत्त्वाचे ग्रंथ हळूहळू लोप पावले. त्यामुळेच आपण ज्ञान भारत मिशन सुरू केलं आहे. यंदा बजेटमध्ये त्याची घोषणा केली आहे. देशातील कोट्यवधी पांडुलिपींचा सर्व्हे करण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. प्राचीन वारश्याला डिजीटल करून आम्ही त्याला आधुनिकतेशी जोडू. हे मिशन एक अमृत संकल्प आहे. नवीन भारत AI द्वारे शक्यता शोधेल आणि अध्यात्माने जगाला मार्ग दाखवेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

भर उन्हात सुप्रिया सुळेंचं आंदोलन, नेमकी मागणी काय?

0

पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील श्री क्षेत्र बनेश्वर येथील रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे. यामुळे खासदार सुप्रिया सुळे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसून उपोषण सुरू केले आहे. बनेश्वर फाटा ते वनविभाग कमान या देवस्थानाकडे जाणाऱ्या रस्त्याचे क्राँक्रिटीकरण करण्याची मागणी केली आहे. वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून केवळ आश्वासने मिळत असल्याने सुप्रिया सुळे यांनी हे पाऊल उचलले आहे.

पुण्याच्या भोर तालुक्यातील श्री क्षेत्र बनेश्वर येथील बनेश्वर फाटा ते वनविभाग कमान या देवस्थानाकडे जाणाऱ्या रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली आहे. सध्या त्याचे क्राँक्रिटीकरण करावे, दुरुस्ती करावी यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. मात्र शासन आणि प्रशासनाकडून केवळ ‘तारीख पे तारीख’ मिळत आहे. यामुळे या विरोधात सुप्रिया सुळे यांचे उपोषण सुरू आहे. याआधीही प्रशासनाच्या सातत्यपूर्ण अनास्थेला कंटाळून अखेर ४ मार्च रोजी उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला होता.

मात्र त्यापूर्वी ३ मार्च रोजी पीएमआरडीएच्या आयुक्तांनी दूरध्वनीवरून संपर्क साधून पुढील एक आठवड्यात हा रस्ता दुरुस्त केला जाईल, असा शब्द दिला होता. त्यामुळे काही कालावधीसाठी मी हे उपोषण स्थगित केल होतं. पण महिना उलटूनही कोणतीही कार्यवाही न झाल्याने सुप्रिया सुळे यांनी आजपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

…तोपर्यंत मी अन्नत्याग करेन
जोपर्यंत कामाचे वर्क ऑर्डर निघत नाही, तोपर्यंत मी उपोषणावर ठाम राहणार आहे. सध्या ऊन वाढत चाललं आहे. मी अन्न खाणार नाही, असे म्हणत सुप्रिया सुळे भर उन्हात आंदोलन करण्यासाठी बसल्या आहेत. त्यांनी डोक्यावर पदर घेऊन उन्हात उपोषण सुरु केले आहे. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत मी अन्नत्याग करेन, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. या आंदोलनादरम्यान जितेंद्र दुडी यांच्यावर सरकारचा दबाव असल्याचा आरोप प्रशांत जगताप यांनी केला आहे.

सुप्रिया सुळे यांच्या आंदोलनाला यश मिळावे आणि प्रशासनाला जाग यावी यासाठी बनेश्वरमधील ग्रामस्थांनी मंदिरात जलाभिषेक आणि विधिवत पूजा केली. शिवलिंगावर अभिषेक करून गावकऱ्यांनी देवाला साकडे घातले. प्रशासनाच्या अनास्थेबद्दल ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

प्रशासनाची भूमिका काय?
श्री क्षेत्र बनेश्वर येथील बनेश्वर फाटा ते वनविभाग कमान या देवस्थानाकडे जाणाऱ्या रस्त्याची प्रचंड दुरावस्था आहे. सध्या या रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट आहे. खासदार सुप्रिया सुळे यांच्या आक्रमक भूमिकेनंतर प्रशासन काय भूमिका घेते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

पुण्यात मध्यरात्री भीषण आग, वारजे माळवाडी घरांमध्ये सिलेंडर स्फोटात दोघांचा होरपळून मृत्यू, नक्की काय घडलं?

0

पुणे शहराच्या वारजे माळवाडी परिसरातील गोकुळनगर येथे मध्यरात्री एका हृदयद्रावक घटनेत दोन जणांचा होरपळून मृत्यू झाला. ही घटना पत्र्याच्या बांधकाम असलेल्या घरांमध्ये सिलिंडरचा स्फोट झाल्यामुळे घडली. त्यामुळे पुण्यात खळबळ उडाल्याचं पहायला मिळत आहे.

सिलिंडरचा मोठा स्फोट

मिळालेल्या माहितीनुसार, वारजे माळवाडी भागातील गोकुळ नगरमध्ये असलेल्या काही पत्र्याच्या घरांना मध्यरात्री सुमारे 3 वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. आगीचे कारण तात्काळ स्पष्ट झाले नसले तरी, प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, एका घरात सिलिंडरचा मोठा स्फोट झाला आणि त्यानंतर आगीने रौद्र रूप धारण केले.

अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने दाखल

आगीच्या ज्वाला आणि धुरामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. मध्यरात्रीची वेळ असल्याने अनेकजण गाढ झोपेत होते. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या आणि आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले. मात्र, आगीच्या भीषणतेमुळे आणि पत्र्याचे बांधकाम असल्यामुळे आग वेगाने पसरली. या दुर्घटनेत दोन व्यक्ती आगीत होरपळून जागीच ठार झाल्याचे वृत्त आहे. त्यांची ओळख अद्याप पटलेली नाही.

परिसरात शोककळा

दरम्यान, या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी असून, आगीच्या कारणांचा आणि मृतांची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत. प्रशासनाकडून या घटनेची गंभीर दखल घेण्यात आली असून, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी उपाययोजना करण्यावर भर दिला जाईल, असे आश्वासन देण्यात आले आहे.

नाना पेठेत लाकडी घराला आग

दरम्यान, काल शहराच्या मधोमध एका मोठ्या घरात आग लागली. ही आग नाना पेठेत राम मंदिराच्या बाजूला असलेल्या एका जुन्या घरात लागली. घर लाकडी असल्यामुळे आग खूप वेगाने पसरली आणि मोठी झाली. काल रामनवमी असल्यामुळे मंदिरात खूप लोक आले होते. अग्निशामक विभागाने लगेच आग विझवण्यासाठी खूप प्रयत्न केले.

उष्णतेच्या लाटेचा इशारा पुन्हा चक्रीवादळाचं संकट, 10 जिल्ह्यांत गारपीट अवकाळीचा हवामान विभागाचा इशारा

0

नागपूर विदर्भात उन्हाळ्याची तीव्रता वाढत असून, रविवारी नागपूरसह अनेक शहरांमध्ये तापमानाने ४४ अंशांचा टप्पा ओलांडला. दिवसेंदिवस वाढणाऱ्या तापमानामुळे जनजीवन विस्कळीत होत असून, हवामान विभागाने उष्णतेच्या लाटेचा इशारा कायम ठेवला आहे.भारतीय हवामान विभागाने आगामी पाच दिवसांसाठी देशभरात टोकाच्या हवामान परिस्थितीचा इशारा दिला आहे. एका बाजूला राजस्थान, गुजरातसह पश्चिम भारतात उष्णतेची लाट तीव्र होत असून, दुसऱ्या बाजूला केरळ, तामिळनाडू आणि ईशान्य भारतात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यासाठी विविध राज्यांमध्ये यलो, ऑरेंज आणि रेड अलर्ट जारी करण्यात आले आहेत.

रविवारीची स्थिती :

7 एप्रिल रोजी नागपूरचे कमाल तापमान 44.0 अंश सेल्सिअस नोंदवले गेले, जे सरासरीपेक्षा 3.8 अंशांनी अधिक होते. अकोल्यात सर्वाधिक ४४.३ अंश तापमानाची नोंद झाली. चंद्रपूरमध्ये 43.8, ब्रह्मपुरीत 43.7, वर्धा 43.5, अंबरवाडा 43.2 अंश इतके तापमान मोजले गेले. यवतमाळ व गोंदियामध्येही पारा ४३ अंशांच्या घरात पोहोचल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले.

पश्चिम राजस्थान आणि गुजरातमधील सौराष्ट्र-कच्छ भागात उष्णतेची लाट 7 ते 9 एप्रिलदरम्यान अधिक तीव्र होणार आहे. या भागांत काही ठिकाणी 45 अंश सेल्सिअसहून जास्त तापमान नोंदवले गेले असून, बारमेर आणि कांडला ही देशातील सर्वाधिक तापमानाची ठिकाणं ठरत आहेत. यामुळे 7 व 8 एप्रिलसाठी रेड अलर्ट, तर 9 एप्रिलसाठी ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.

हिटवेव्हचा इशारा :

भारतीय हवामान विभागाने विदर्भातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट पुढील काही दिवस कायम राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे नागरिकांनी दुपारी 12 ते 4 या वेळेत घराबाहेर जाणे टाळावे, आवश्यक असल्यास अंगावर पाणी शिंपडून बाहेर पडावे, डोके व चेहरा झाकून ठेवावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

दिल्ली, हरियाणा, पंजाब, चंदीगड, पूर्व राजस्थान आणि मध्यप्रदेशातही तापमान झपाट्याने वाढत असून, १० एप्रिलपर्यंत या भागांत उष्णतेची लाट कायम राहील. यासाठी यलो आणि ऑरेंज अलर्ट दिले गेले आहेत. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, उष्ण हवामानामुळे या भागांतील नागरिकांनी दुपारच्या वेळेत घराबाहेर जाणे टाळावे.

पालघर, रायगड, ठाणे, मुंबई, रत्नागिरी, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, अकोला अमरावती, नागपूरमध्ये आज उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. तर महाराष्ट्रावर पुन्हा अवकाळी पावसाचं संकट आहे. 11 आणि 12 एप्रिल रोजी पुन्हा एकदा अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ, जिल्ह्यात गारपीट आणि मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

पदाधिकाऱ्यांच्या झुंडशाहीचा प्रताप! पोलीस स्टेशनमध्येच ‘लव्ह जिहाद’चा आरोप करत तरूणांना मारलं, घटना काय?

0

गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात घडलेल्या काही घटनांमुळे कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्न निर्माण होतोय. त्यातच आता पुण्यात भाजप पदाधिकाऱ्यांनी आणखी एक प्रताप केला आहे. दोन दिवसांपूर्वीच दीनानाथ रुग्णालयातील घटनेवरुन काहीही संबंध नसलेल्या डॉ. घैसास यांच्या वडिलांचं रुग्णालय फोडलं होतं. त्यानंतर आता भाजप महिला मोर्चाच्या पदाधिकारी उज्ज्वला गौड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी थेट पोलीस स्टेशनच्या कंपाऊंडमध्येच एका सलून चालकाला मारहाण केली.

सलूनमध्ये घुसून केला राडा

पुण्यातील या गोंधळाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये पुण्यातील भाजप महिला मोर्चाच्या उज्ज्वला गौड आणि त्यांचे कार्यकर्ते एका सलूनमध्ये जातात.  “चला बंद करुयात म्हणतायत” म्हणत तिथे राडा करतायत. पुणे शहरातील कोथरुडमध्ये अर्श नावाच्या युनिसेक्स सलूनमध्ये हा प्रकार घडला. या सलून चालकाला भाजप महिला मोर्चाच्या उज्ज्वला गौड यांच्या कार्यकर्त्यांनी बेदम चोप दिला. हा सर्व प्रकार कोथरुड पोलीस स्थानकाच्या हद्दीत घडलाय.

सलून चालकावर धर्मांतराचा आरोप

“सलून चालकाने सलूनमध्ये काम करत असलेल्या युवतीला धर्मांतरण करण्यासाठी जबरदस्तीने कलमा पढायला लावला. तसंच कुठेही वाच्यता करु नये म्हणून एक लाख रुपये देण्याचे आमिष दाखविण्यात आलं” असा आरोप भाजप पदाधिकारी उज्जवला गौड यांनी केला आहे.

भाजप पदाधिकाऱ्यांनी या दुकानातील फ्लेक्सला काळं फासलं. त्यानंतर दुकानातील सर्व ग्राहकांना बाहेर काढलं. एवढ्यावरच न थांबता सलूनचे मालक आणि काम करणाऱ्या मुलाला कोथरुड पोलीस स्थानकाच्या संरक्षण भिंतीच्या आत घेऊन पोलिसांसमोर मारहाण केली.

पोलीस स्थानकाच्या कंपाऊंडच्या आतही मारहाण

लव्ह जिहाद आणि हिंदू तरुणीचं धर्मांतर केल्याच्या आरोपावरून भाजप कार्यकर्त्यांनी मुस्लिम तरुणांना थेट पोलिस स्टेशनमध्येच मारहाण केली. ज्या तरूणांना मारहाण केली त्यांच्यावर कोथरूड पोलिस ठाण्यात बीएनएस कलम 351(2), 79 आणि 352 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस म्हणाले, असे कुठलेच पुरावे नाही

पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, ” कथित लव्ह जिहाद किंवा जबरदस्तीने धर्मांतर केल्याच्या दाव्यांचे समर्थन करणारे कोणतेही पुरावे नाहीत. लेखी आणि व्हिडिओ स्वरूपात रेकॉर्ड केलेल्या मुलीच्या जबाबात स्पष्टपणे म्हटलं आहे की, जबरदस्तीने लग्न किंवा धर्मांतर असं काहीही झालेलं नाही. तसंच आपल्याला कुणी कलमाही म्हणायला सांगितला नाही.”

ज्येष्ठ चित्रपट निर्माते सलीम अख्तर यांचे निधन, सिनेविश्वावर शोककळा

0

ज्येष्ठ चित्रपट निर्माते सलीम अख्तर यांचे निधन झाले आहे. कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून व्हेंटिलेटरवर होते. सलीम अख्तर हे ८० आणि ९० च्या दशकातील लोकप्रिय निर्मात्यांपैकी एक होते. त्यांच्या निधनामुळे सिनेसृष्टीत एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सलीम अख्तर हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात उपचार सुरु होते. ते अनेक दिवसांपासून व्हेंटिलेटरवर मृत्यूशी झुंज देत होते. अखेर त्यांची ही झुंज अपयशी ठरली. आज मंगळवारी ८ एप्रिल रोजी त्यांनी कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.

अनेक लोकप्रिय हिंदी चित्रपटांची निर्मिती
सलीम अख्तर यांनी अनेक लोकप्रिय हिंदी चित्रपटांची निर्मिती केली होती. यात ‘चोरों की बारात’, ‘कयामत’, ‘लोहा’, ‘बटवारा’, ‘फूल और अंगारे’, ‘बाजी’, ‘इज्जत’ आणि ‘बादल’ यांचा समावेश होता. सलीम अख्तर यांना साध्या आणि सरळ स्वभावासाठी ओळखले जायचे. ते एक यशस्वी निर्माते होते. त्यांनी १९८० आणि १९९० च्या दशकात ‘आफताब पिक्चर्स’ या त्यांच्या प्रॉडक्शन हाऊसच्या बॅनरखाली अनेक चित्रपटांची निर्मिती केली.

राणी मुखर्जी, तमन्ना भाटिया सिनेसृष्टीत ब्रेक
१९९७ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘राजा की आयेगी बारात’ या चित्रपटातून त्यांनी अभिनेत्री राणी मुखर्जीला ब्रेक दिला होता. ज्यामुळे तिने बॉलिवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली. यासोबत अभिनेत्री तमन्ना भाटियाला ‘चांद सा रोशन चेहरा’ या चित्रपटातून लाँच केले होते. त्यानंतरच ती सिनेसृष्टीत प्रसिद्धीझोतात आली.

हिंदी चित्रपटसृष्टीवर मोठी शोककळा
सलीम अख्तर हे चित्रपट निर्माते म्हणून सक्रीय होते. सलीम अख्तर यांनी आफताब पिक्चर्स या बॅनरखाली ‘बटवारा’, ‘लोहा’, ‘कयामत’, ‘बाजी’, ‘इज्जत’, ‘फूल और अंगार’, ‘आदमी’, ‘बादल’ आणि ‘दूध का कर्ज’ यांसारख्या अनेक यशस्वी चित्रपटांची निर्मिती केली. त्यांनी शमा अख्तर यांच्याशी विवाह केला होता. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार उद्या, बुधवार ०९ एप्रिल रोजी दुपारी १.३० वाजता अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यांच्या निधनाने हिंदी चित्रपटसृष्टीवर मोठी शोककळा पसरली आहे.

अमेरिकेचा चीन विरोधात सर्वात मोठा निर्णय… आधी अल्टीमेटम मग थेट Action

0

चीन आणि अमेरिकेमधील व्यापारी तणावाने पुन्हा एकदा टोक गाठलं आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आधी धमकी दिली. नंतर थेट व्हाइट हाऊसने चीनवर 104 टक्के आयात शुल्क (टॅरिफ) लावण्याची घोषणा केली आहे. हे आयात शुल्क 9 एप्रिलपासून लागू होणार आहे. अमेरिकेच्या या निर्णयाकडे दोन्ही देशातील नव्या आर्थिक युद्धाची सुरुवात म्हणून पाहिलं जात आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती. त्यात त्यांनी म्हटलेलं की, चीनने अमेरिकेवर लावलेला 34 टक्के टॅरिफ मागे घेतला नाही, तर अमेरिका सुद्धा त्यांच्यावर 50 टक्के अतिरिक्त टॅरिफ लावेल. आता व्हाइट हाऊसने आपली धमकी प्रत्यक्षात आणली आहे. अमेरिकेने चिनी सामानाच्या आयातीवर थेट 104 टक्के टॅरिफची घोषणा केली आहे. हा निर्णय 9 एप्रिलपासून लागू होईल, असं व्हाइट हाऊसकडून सांगण्यात आलं आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टपणे सांगितलय की, “जो कुठला देश अमेरिकेविरुद्ध प्रत्युत्तराची कारवाई करेल, त्यांच्याविरुद्ध तात्काळ प्रभावाने नवीन आणि आधीपेक्षा जास्त कठोर टॅरिफ लावला जाईल” “आम्ही आधीच स्पष्ट केलेलं की, व्यापारात भेदभाव सहन करणार नाही. आता वेळ आलीय, चीनने आपल्या धोरणांचा पुनर्विचार करावा आणि अमेरिकेसोबत चांगला व्यवहार करावा” असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.

विश्लेषकांच म्हणणं काय?

अमेरिका आणि चीनमधील प्रस्तावित बैठका स्थगित केल्याचही ट्रम्प यांनी सांगितलं. ज्या देशांनी व्यापारी चर्चेची मागणी केली आहे, त्यांच्यासोबत अमेरिका चर्चा सुरु करेल असही ते म्हणाले. डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणामुळे जागतिक व्यापारावर परिणाम होईल तसच चीनसोबत अमेरिकेच्या संबंधात आणखी तणाव निर्माण होईल असं विश्लेषकांनी सांगितलं.

चीनच पुढचं पाऊल काय असेल?

चीनकडून अमेरिकेच्या या निर्णयावर अजूनपर्यंत कुठलीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. बीजिंग लवकरच यावर प्रतिक्रिया देईल असं बोललं जातय. चीन सुद्धा अमेरिकेच्या या टॅरिफ निर्णयाविरोधात कठोर पावलं उचलू शकतो, असं एक्टपर्ट्सनी सांगितलं. त्यामुळे जगातील दोन मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये व्यापार युद्ध आणखी तीव्र होणार आहे. सहाजिकच याचा जागतिक व्यापारावर, गुंतवणूकीवर परिणाम होईल. चीनच पुढचं पाऊल काय असेल? याकडे आता सगळ्यांच लक्ष लागलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचं हे टॅरिफ धोरण जगाला मंदीकडे घेऊन जाणारं पाऊल आहे, अस सुद्धा काही विश्लेषकांच मत आहे.