Home Blog Page 118

सई ताम्हणकरची फक्कड लावणी; नेटकरी म्हणाले ‘आता मार्केट गाजवणार’

0

लावणी हा महाराष्ट्रातील लोकनृत्याचा एक अत्यंत लोकप्रिय प्रकार आहे. मराठी प्रेक्षकांवर लावणीची प्रचंड जादू आहे. आजवर अनेक चित्रपटांमधील अनेक कलाकारांच्या लावण्या गाजल्या. आता अभिनेत्री सई ताम्हणकर पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर लावणी सादर करताना दिसणार आहे. ‘देवमाणूस’ या बहुप्रतिक्षित चित्रपटातील ‘आलेच मी’ या गाण्यावर पहिल्यांदाच सईने फक्कड लावणी सादर केली आहे. हा चित्रपट 25 एप्रिल 2025 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. लव फिल्म्सच्या लव रंजन आणि अंकुर गर्ग यांची निर्मिती असलेला आणि तेजस देऊस्कर दिग्दर्शित या चित्रपटात महेश मांजरेकर, रेणुका शहाणे, सुबोध भावे आणि सिद्धार्थ बोडके यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

विविधांगी भूमिका साकारून आपली छाप पाडणारी सई, ‘आलेच मी’ या गाण्यातून एका वेगळ्याच अविष्कारात प्रेक्षकांसमोर येत आहे. पारंपरिक मराठी संगीतसृष्टीत आपली खास ओळख असणाऱ्या बेला शेंडे यांच्या दमदार आवाजात हे गीत साकारण्यात आलं असून रोहन प्रधान यांनी त्यांना साथ दिली आहे. रोहन-रोहन यांचं संगीत लाभलेलं हे गाणं तेजस देऊस्कर यांनी लिहिलं असून रोहन गोखले यांनीही अतिरिक्त गीतलेखन केलं आहे. सुप्रसिद्ध लावणी तज्ज्ञ आशिष पाटील यांनी या गाण्याची नृत्यरचना केली आहे, जी अत्यंत जोशपूर्ण आणि सुरेख आहे.

सईची ही लावणी प्रदर्शित होताच त्यावर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. ‘खूप दिवसांनी काहीतरी वेगळा प्रयत्न केल्याचं पाहून खूप छान वाटलं. खरंच जसं गाणं आहे, तसं आलेच मी म्हणत मार्केट गाजवणार आहेस’, असं एकाने लिहिलं. तर ‘जमलं जमलं सईला’, असं दुसऱ्याने म्हटलंय. ‘फक्त ही एक इच्छा होती. सई आणि तिची लावणी’, असंही नेटकऱ्यांनी लिहिलं आहे.

या भूमिकेसाठी सईने तब्बल 33 तासांपेक्षा अधिक वेळ सरावाला दिला. लावणीच्या प्रत्येक नजाकतीत ती पूर्णपणे रमली आणि एक धमाकेदार परफॉर्मन्स तिने सादर केला आहे. आपल्या अनुभवाबद्दल सई म्हणाली, “‘देवमाणूस’मध्ये लावणी करणं हा एक विलक्षण अनुभव होता. हा माझा एक नवीन प्रयत्न होता आणि मला खूप मजा आली. गाणं ऐकताच माझ्या पायाखालची जमीन हलली. लव फिल्म्स आणि तेजस यांनी मला या भूमिकेसाठी निवडलं, याबद्दल मी खूप आभारी आहे. आशिषच्या मार्गदर्शनाशिवाय इतकी प्रभावी लावणी साकारता आलीच नसती. प्रेक्षकांना माझे हे नवं रूप आवडेल, अशी आशा आहे.”

अमरावतीचं माझ्यावर कर्ज, जगाच्या नकाशावर शहराला मिळेल ओळख, विमानतळाच्या उद्घाटनानंतर मुख्यमंत्र्यांची ग्वाही

0

असं म्हणतात की श्रीकृष्णाने रुक्मिणीचं हरण वायूवेगाने केलं होतं, तो वायुवेग तर आपल्याला पाहता आला नाही. पण अमरावतीत वायू वेगाने येता येईल आणि वायू वेगाने जाता येईल. ही व्यवस्था मोदींच्या सरकारने केली आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौतुक केलं. डबल इंजिनचं सरकार असलं म्हणजे काय होतं, हे मंत्री महोदयांनी आत्ता सांगितलं. पण आमचं केवळ डबल इंजिनचं सरकार नाही तर डबल बुस्टर सरकार आहे. म्हणून आमचं सरकार वेगाने चालतंय. आम्ही तिघेही महाराष्ट्राचा विकास करत आहोत. महाराष्ट्राला विकसित महाराष्ट्र करायचं आहे,असे मुख्यमंत्री म्हणाले.

अमरावती विमानतळ आता सर्वसामान्य नागरिकांसाठी खुलं झालं असून मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते आज या विमानतळाचं उद्घाटन झालं. यावेळी राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार तसंच अख्खं मंत्रीमंडळच उपस्थित होतं. आधी या विमानाची सेवा फक्त व्हीआयपींसाठी होती, पण आजपासून सामान्य नागरिकांनाही या सेवेचा लाभ घेता आहे. रेल्वेने अमरावतीवरून मुंबईला यायला 12 तास लागतात. विमान सेवेमुळे हा अंतर अवघ्या पावणे दोन तासाचे होणार आहे. त्यामुळे आता अमरावतीकरांचे 10 तास वाचणार आहेत.

अमरावतीचं माझ्यावर कर्ज

या उद्घाटन सोहळ्याच्या वेळी केलेल्या भाषणादरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपलं अमरावतीशी अनोखं नातं असल्याचं सांगितलं. अमरावतीचं माझ्यावर कर्ज आहे. माझी आई अमरावतीची आहे, त्यामुळे अमरावतीशी माझं वेगळं नातं आहे. अमरावतीत काही चांगलं झालं तर सर्वाधिक आनंद माझ्या आईला होतो. त्यामुळे आईला आनंद देणं माझ्या आनंदाचं एक कारण असतं,असं मुख्यमंत्री म्हणाले.

आज या एअरपोर्टचं काम आपण पूर्ण केलं. 2019 साली काम सुरू केलं होतं. मोदींच्या सरकारमध्ये प्रयत्न करून महाराष्ट्र आणि केंद्र सरकारने काम हाती घेतलं. धावपट्टीचं विस्तारीकरण केलं, नवनीत राणा सोबत होत्या. त्यानंतर काही कारणाने बंद पडलं होतं. केंद्र सरकारशी संबंधित काम सुरू होतं. राज्य सरकारशी संबंधित काम संथगतीने होतं. पण शिंदे सरकार आल्यानंतर वेगाने काम सुरू केल्याचं फडणवीस म्हणाले.

अमरावती जगाच्या नकाशावर येणार

केंद्र सरकारने एअरपोर्टला पहिलं विमान दिलं. या विमानात बसून आम्ही आलो. या ठिकाणी पायलट ट्रेनिंग स्कूल सुरू होणार आहे. एका पायलट ट्रेनिंग स्कूलमुळे अमरावती जगाच्या नकाशावर येणार आहे, असं मुख्यंमत्र्यांनी सांगितलं. साऊथ ईस्ट एशियामधील सर्वात मोठं स्कूल असणार आहे. दरवर्षी 180 पायलट अमरावतीतून तयार होतील, जवळपास 34 विमाने पार्क असतील. ही विमाने ट्रेनिंग देतील. पायलट ट्रेनिंग स्कूल आल्याने अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. जॉब वाढेल. मोदी सरकारच्या कार्यकाळात मिळालेली मोठी भेट आहे. अमरावती एक शहर म्हणून ओळखलं जाणार नाही. तर जगाच्या पाठीवर साऊथ इस्ट एशियातील सर्वात मोठी पायलट ट्रेनिंग स्कूल कुठे आहे, तर आपल्या अमरावतीत आहे, अशा प्रकारची अमरावतीला ओळख मिळणार आहे,असंही देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केलं.

दोन लाख लोकांना मिळणार रोजगार

मोदींना सात टेक्स्टाईल पार्क तयार करायचा ठरवलं होतं. त्यातील एक पार्क अमरावतीला देण्याचं मोदींनी मान्य केलं. आता तो सुरू होतोय, 2 लाख लोकांना रोजगार मिळणार आहे. आपला कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे, असं फडणवीसांनी सांगितलं.

समृद्धी महामार्गामुळे मुंबईशी जोडलो गेलो आहोत. राज्यात नवीन पोर्ट झाला. वाढवण बंदरलाही आपण जोड देत आहोत. त्यामुळे विदर्भ जेएनपीटीशी आणि वाढवण बंदरशीही जोडला जाणार आहे. त्यामुळे पोर्ट लेअर इंडस्ट्री मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. सात लाख कोटीचे करार विदर्भातील आहे. दावोसमधील हे करार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं.

उद्योग हवे असतील तर…

नदी जोड प्रकल्पाने सात जिल्ह्यांचा चेहरामोहरा बदलेल. विदर्भात दुष्काळच राहणार नाही. दुष्काळमुक्त होईल. कोरडवाहू शेतीही राहणार नाही. अमरावती विभाग हा महाराष्ट्र सरकारच्या अजेंड्यावर असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणालेय. अकोल्याच्या विमानतळाचं विस्तारीकरण होणार आहे. यवतमाळच्या विमानतळाचं विस्तारीकरण करण्यात येणार आहे. ज्या ठिकाणी विमानतळ असेल तिथे उद्योग जातो, उद्योग हवे असतील तर विमानतळाची कनेक्टिव्हिटी पाहिजे, हा महत्वाचा मुद्दा फडणवीसांनी नमूदल केला.

अमरावतीत मेडिकल कॉलेज सुरू केलं. येत्या काळात अमरावतीत आयटी पार्क सुरू करण्याचा आपला प्रयत्न असेल. आज सुरुवात झाली आहे. आज एक फ्लाईट सुरू झाली आहे. या विमानतळाला विस्तारीत करायचं आहे. आपल्याला 3 हजार मीटरची धावपट्टी करायची आहे. पुढे काही अॅक्विझेशन तयार करायचं आहे. ते झालं तर आपली धावपट्टी वाढू शकते. अमरावतीत कोणतंही विमान उतरू शकेल अशी धावपट्टी करायची आहे,असं फडणवीस म्हणाले.

राष्ट्रीय जलमार्गामुळे कमाईच कमाई; मालवाहतूक 146 दशलक्ष टनांवर, असा झाला फायदा

0

राष्ट्रीय जलमार्ग मालवाहतुकीने केंद्र सरकारला मालामाल केले. केंद्र सरकारच्या तिजोरीत मोठी रक्कम आली. बंदरगाह, नौवहन आणि जलमार्ग मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली भारतीय अंतर्देशीय जलमार्ग प्राधिकरणाने (IWAI) जलमार्ग मालवाहतुकीतून कमाईचा नवीन टप्पा ओलांडला. आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये IWAI ने रिकॉर्डब्रेक 145.5 दशलक्ष टन मालवाहतूकीचा टप्पा ओलांडला. अंतर्देशीय जलवाहतूक क्षेत्रात ही आतापर्यंतची सर्वात महत्त्वाची कामगिरी ठरली आहे.

माल वाहतुकीत मैलाचा दगड

बंदरगाह, नौवहन आणि जलमार्ग मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, आर्थिक वर्ष 2014 ते 2025 या कालावधीत राष्ट्रीय जलमार्गांवरील मालवाहतूक 18.10 दशलक्ष टनांवरून वाढून 145.5 दशलक्ष टनांपर्यंत पोहोचली. या दरम्यान 20.86% ची चक्रवाढ वार्षिक वाढ दर (CAGR) नोंदवली गेली आहे. तर या काळात जलमार्गांची एकूण संख्या 24 वरून वाढून 29 वर पोहचली. तर चालू आर्थिक वर्षातही मालवाहतुकीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

चालू आर्थिक वर्षातही धमाका

वित्तीय वर्ष 2025 मध्ये मालवाहतुकीत 2024 च्या वार्षिक आधाराच्या तुलनेत 9.34% वाढ झाली. यामध्ये कोळसा, लोहखनिज, लोहखनिज चुर्ण, वाळूचा, फ्लाय अॅश वाटा अधिक आहे. या पाच वस्तूंचा एकत्रितपणे राष्ट्रीय जलमार्गांवरील एकूण मालवाहतुकीत 68% पेक्षा अधिक वाटा होता.

तर राष्ट्रीय जलमार्गांवरील मालवाहतुकीत झालेली वाढ सध्याच्या घडीला अत्यंत लक्षणीय मानली जात आहे. गेल्या काही वर्षांमध्ये नीतिगत उपाय आणि पायाभूत सुविधांवर विशेष भर दिल्याने ही वाढ शक्य झाली आहे.

या योजनेमुळे मालवाहतुकीला चालना

“जलवाहक कार्गो प्रोत्साहन योजना” (Waterborne Cargo Promotion Scheme) या प्रवासाचा कायापालट करणारी ठरली. ही योजना गेल्या डिसेंबरमध्ये सुरू करण्यात आली होती. योजनेत जलमार्ग वाहतुकीत एकूण ऑपरेशनल खर्चाच्या 35% पर्यंत प्रोत्साहन देण्यात येते. त्यामुळे कार्गो मालक व वाहतूकदारांना अंतर्देशीय जलवाहतुकीकडे (IWT) वळाले आणि रस्ते आणि रेल्वे मार्गावरील ताण कमी झाला. मोठा खर्च वाचला.

भारत-बांगलादेशचा रणनीती आली कामी

जलमार्ग योजनेला चालना देण्यासाठी भारत-बांगलादेश प्रोटोकॉल अंतर्गत राष्ट्रीय जलमार्गांवर नियोजित कार्गो सेवा सुरू करण्यात आली. त्यातंर्गत राष्ट्रीय जलमार्ग 1 (NW-1), राष्ट्रीय जलमार्ग 2 (NW-2), आणि राष्ट्रीय जलमार्ग 16 (NW-16) वर नियोजित मालवाहतूक सेवा (Scheduled Cargo Services) सुरू करण्यात आली आहे. या उपक्रमामुळे 800 दशलक्ष टन-किलोमीटर कार्गो जलमार्गाकडे वळण्याची अपेक्षा आहे. हा कार्गो मार्ग सध्याच्या राष्ट्रीय जलमार्गांवर असलेल्या 4,700 दशलक्ष टन-किलोमीटर मालवाहतुकीच्या सुमारे 17% इतका आहे.

राष्ट्रीय जलमार्ग (जेट्टी/टर्मिनल्सचे बांधकाम) विनिमय नियम, 2025 अंतर्गत हे नवीन नियम देशातील अंतर्देशीय टर्मिनल्सच्या (Inland Terminals) विकासात खासगी क्षेत्राच्या गुंतवणुकीला प्रोत्साहन देतात. यामुळे भारताच्या विस्तृत जलमार्ग नेटवर्कचा अधिक परिणामकारक वापर शक्य होतो. खासगी, सार्वजनिक आणि संयुक्त उद्यम संस्थांना आता IWAI कडून नाहरकत प्रमाणपत्र (NOC) मिळवण्यासाठी डिजिटल पोर्टल उपलब्ध करून देण्यात आला आहे. यामुळे, देशभरात जेट्टी किंवा टर्मिनल्स विकसित करणे अधिक सुलभ झाले आहे, ज्यामुळे स्थानिक आणि राष्ट्रीय पातळीवर लॉजिस्टिक्स अधिक गतिमान होण्याची शक्यता आहे.

या राष्ट्रीय जलमार्गाची क्षमता वाढवणार

आता प्राधिकरण देशभरातील काही राष्ट्रीय जलमार्गाची क्षमता वाढवणार आहे. त्यातंर्गत राष्ट्रीय जलमार्ग-1, राष्ट्रीय जलमार्ग-2, राष्ट्रीय जलमार्ग-3 आणि राष्ट्रीय जलमार्ग-16 यांच्यासह इतर जलमार्गांची क्षमता वाढवण्यासाठी काम करत आहे. तर भारतीय अंतर्देशीय जलमार्ग प्राधिकरण (IWAI) सध्या देशभरातील जलवाहतुकीच्या पायाभूत सुविधांचा विस्तार करण्यावर भर देत आहे. यामध्ये विशेषतः राष्ट्रीय जलमार्ग-1 (NW-1), राष्ट्रीय जलमार्ग-2 (NW-2), राष्ट्रीय जलमार्ग-3 (NW-3) आणि राष्ट्रीय जलमार्ग-16 (NW-16) यांचं आधुनिकीकरण आणि क्षमता वाढ यावर काम सुरू आहे.

काय होईल फायदा

वाहतूक क्षमता वाढेल

सामान्य मालवाहतूक आणि विशेष मालवाहतुकीसाठी सुविधा निर्माण होतील

जेट्टी, टर्मिनल्स, आणि मल्टीमोडल लॉजिस्टिक हब्स तयार होतील

कार्यक्षम आणि पर्यावरणपूरक जलवाहतुकीला चालना मिळेल

शिवडी विभागाच्या वतीने भीममहोत्सव-२०२५ मोठ्या जल्लोषात संपन्न

0

मुंबई दि. १७ (अधिराज्य) बौद्धजन पंचायत समिती, शिवडी गटक्रमांक १३ आणि संलग्न सर्व शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने विश्वरत्न, बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १३४ वा जयंती महोत्सव अर्थात भीममहोत्सव – २०२५ शिवडी गटक्रमांक १३ चे गटप्रमुख राजाभाऊ तथा आदरणीय रामदास धो. गमरे यांच्या अधिपत्याखाली आणि विभाग कमिटीच्या माध्यमातून मोठ्या जल्लोषात संपन्न झाला.

सदर कार्यक्रमात प्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह येथे बाबासाहेबांच्या आणि महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आल्या, पुढे प्रविण तांबे गुरुजींनी अत्यंत लाघवी, मधाळ व रसाळवाणीने धार्मिक पूजाविधी संपन्न केला तद्नंतर बाबासाहेबांना व महापुरुषांना अभिवादन मानवंदना करून भव्यदिव्य अश्या मिरवणुकीला सूरवात होण्याआधी स्थानिक कार्यसम्राट आमदार कालिदास कोळंबकर व रफी अहमद किडवाई मार्ग पोलीस स्टेशनच्या चौधरी मॅडम, जाधव मॅडम यांच्या शुभहस्ते रथावरील बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून ज्योत प्रज्वलित करून भव्यदिव्य मिरवणुकीला सुरवात झाली. फटाक्यांची आतिषबाजी, रोषणाई झगमगाट वाजत-गाजत-नाचत ही भव्यदिव्य मिरवणूक मातोश्री टॉवर जवळ पोहोचली तेथे स्थानिक शाखा क्र. ४७६ ने मिरवणुकीचे प्रशंसनीय असे भव्य स्वागत केले त्या स्वागताचा स्वीकार करून मिरवणूक पुढे सरकत सरकत भीमनगर येथे दाखल झाली तेथेही स्थानिक शाखा २८२, ३३५ व अजित धोत्रे यांनी जेसीबीने बाबासाहेबांच्या पुतळ्यावर फुलांचा वर्षाव करीत बाबासाहेब आंबेडकरांचे व मिरवणुकीचे प्रशंसनीय असे भव्य स्वागत केले व मिरवणुकीत सामील सर्वांना पाणी व अल्पोपहार देऊन त्यांच्यामध्ये नवीन ऊर्जा निर्माण केली, पुढे मिरवणूक आगेकूच करीत विश्वभारती पटांगणात पोहोचली त्याठिकाणी शिवसेना नगरी शाखा क्र. ३१८ व वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते राजा पवार व जाधव यांनी मिरवणुकीचे प्रशंसनीय असे भव्य स्वागत करीत त्यांनीही मिरवणुकीत सामील सर्वांना पाणी व अल्पोपहार दिला पुढे मिरवणूक विठ्ठल मंदिर येथे पोहोचताच तेथील स्थानिक शाखेने ही मिरवणुकीचे प्रशंसनीय असे भव्य स्वागत केले त्या स्वागताचा स्वीकार करून मिरवणूक पुढे सरकत सरकत ममता सोसायटी येथे दाखल झाली तेथेही स्थानिक शाखा क्र. २३८, ३१० यांच्या वतीने मिरवणुकीचे भव्य स्वागत करण्यात आले तेथून पुढे जात मिरवणूक भारत नगर येथे दाखल झाली तेथे साई सेवा मंडळ व आंबेडकर नगरच्या शाखा क्र. ५०८ यांच्या वतीने मिरवणुकीचे भव्य असे स्वागत करण्यात आले तेथून पुढे मिरवणूक वाजत-गाजत-नाचत अण्णाभाऊ साठे नगर येथे दाखल होताच स्थानिक शाखा क्र. ५७८, माता रमाई महिला मंडळ व पंचशील मंडळाच्या वतीने मिरवणुकीचे फटाक्यांची आतिषबाजी करत भव्य स्वागत करण्यात आले तेथे लाडू, पाणी व नाश्त्याची सोय केली, पुढे आर के ग्रुप येथे ही मिरवणुकीचे भव्य स्वागत करण्यात आले तेथून पुढे नाक्याजवळ मनसे पक्षाच्या वतीने ही मिरवणुकीचे भव्य असे स्वागत करण्यात आले, पुढे रिपब्लिकन सेनेचे स्वागत स्वीकारत मिरवणूक भोईवाडा नाका येथे दाखल झाली सदर मिरवणुकीत माजी खासदार शेवाळे, माजी कार्यसम्राट नगरसेवक अनिल मोरे, कार्यसम्राट आमदार कालिदास कोळंबकर, आमदार चौधरी, माजी महापौर श्रद्धा जाधव, शिवसेनेचे सुरेश काळे, मुंबई काँग्रेसचे महेंद्र मुंगणेकर, शिंदे गटाचे राजू वाघमारे, आरपीआय नेते दीपक भाई गमरे, गौतम गायकवाड, समाजसेवक दीपक बनसोडे अश्या अनेक राजकीय पक्षांचे आमदार, खासदार, नगरसेवक, कार्यकर्ते या मिरवणुकीत सहभागी होऊन त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांना पुष्पसुमन अर्पण करून बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना दिली. सदर मिरवणुकीत जाती-पातीच्या, धर्माच्या बंधनांच्या, उच्च नीचतेच्या भिंती पाडून हिंदू, मुस्लिम, बौद्ध, कामाठी समाजातील विविध धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक संघटनांनी व व्यक्तींनी मिरवणुकीत सहभागी होऊन बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना देत बाबासाहेबांप्रति कृतज्ञता व्यक्त केली त्यामुळे गेल्या चाळीस वर्षांचा रेकॉर्डब्रेक अशी भव्यदिव्य मिरवणूक सरकारी नियमांचे पालन करीत कोणतेही गालबोट लागू न देता शांततेत सदर भव्यदिव्य मिरवणूक पार पडली. तसेच रफी अहमद किडवाई पोलीस स्थानकाचे वरिष्ठ निरीक्षक रणदिवे साहेब व त्यांच्या सहकाऱ्यांनी शिस्तबद्ध पद्धतीने ही मिरवणूक निघावी म्हणून त्यावर लक्ष ठेवून त्यावर नियंत्रण ठेवण्याचे मोठे काम केले, सोबतच यंग बॉईज मंडळाने ही सदर कामास आपले योगदान दिले.

सदर भीममहोत्सव-२०२५ यशस्वी होण्यासाठी शिवडी गटक्रमांक १३ चे गटप्रमुख राजाभाऊ तथा रामदास धो. गमरे, कार्याध्यक्ष संतोष जाधव, सरचिटणीस संदीप मोहिते, उपाध्यक्ष राजू धोत्रे, प्रमोद लोखंडे, हरीश मोरे, चिटणीस अजय पवार, नरेश सकपाळ, खजिनदार प्रवीण तांबे (गुरुजी) या सर्वांनी अथक परिश्रम घेऊन सदर भीममहोत्सव-२०२५ यशस्वीपणे पार पाडला. सरतेशेवटी सदर भीमशक्तीचे शक्तिप्रदर्शन व एकोपा दाखवण्यासाठी आयोजित भीममहोत्सव-२०२५ यशस्वीपणे पार पाडण्यासाठी अथक परिश्रम घेणाऱ्या विभागीय सर्व शाखा, समित्या, विविध संघटना, राजकीय पक्ष, त्यांचे पदाधिकारी, सभासद, कार्यकर्ते, महिला मंडळ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणदिवे साहेब व पोलीस डिपार्टमेंटचे आभार मानून राजाभाऊ तथा रामदास धो. गमरे यांनी कार्यक्रमाची सांगता केली.

थंडावा राहण्यासाठी कॉलेजच्या प्राचार्यांनी वर्गाच्या भिंती शेणाने सारवल्या, जशास तसे म्हणत विद्यार्थी संघटनेने…

0

दिल्ली विश्व विद्यालयाच्या लक्ष्मीबाई महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी वर्गातील भिती शेणाने सारवल्याचे प्रकरण अधिकच चिघळत चाललं आहे. मंगळवारी दिल्ली विश्वविद्यालय विद्यार्थी संघटनेचा (DUSU) अध्यक्ष रौनक खत्री याने महाविद्यालयाच्या प्राचार्यांच्ये ऑफिसमधील भिंतीवर शेण थापल्याचे समोर आले आहे. याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. काय आहे नेमकं प्रकरण? जाणून घेऊया.

काय आहे प्रकरण?

काही दिवसांपूर्वी लक्ष्मीबाई कॉलेजच्या प्राचार्य प्रत्यूष वत्सला यांनी वर्गातील भितीं शेणाने सावरल्या होत्या. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यावर स्पष्टीकरण देताना त्यांनी म्हटलं होतं की हा एक प्रकारचा संशोधनाचा विषय आहे. महाविद्यालयातील शिक्षकांच्या देखरेखीखाली याचे संशोधन सुरू आहे. पारंपारिक पद्धतीने घर किंवा खोल्या थंड ठेवण्याच्याय शक्यताचा विचार केला जात आहे. ज्या लोकांकडून अफवा पसरवल्या जात आहेत. त्यांना या प्रकल्पाबद्दल काहीच माहिती नाहीये. म्हणून त्यांना हा व्हिडिओ शेअर केला आहे.

हा संशोधनाचा विषय असून एक महिन्यानंतर या विषयावर सविस्तर माहिती देईन. तसंच, शेण नैसर्गिक असून त्याला हात लावल्यास कोणतेही नुकसान होणार नाही, असंही त्यांनी म्हटलं होतं.

दिल्ली विश्वविद्यालय विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष रौनक खत्री यांनी लक्ष्मीबाई कॉलेजच्या प्राचार्याच्या कार्यालयात पोहोचून भिंतीवर शेण थापले. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. रौनक खत्री यांनी म्हटलं आहे की, कॉलेजच्या प्राचार्यांनी वर्गात शेण थापले. त्यामुळं आम्ही त्यांच्या कार्यालयातील ऑफिसमध्ये शेण थापले. मॅडमने वर्गातील भिंती शेणाने सारवल्या आहेत तर त्यांच्या ऑफिसच्या भिंतींनाही शेण थापायला पाहिजे. जर क्लासरूम शेणामुळं थंड होऊ शकतात तर त्यांचे ऑफिसदेखील थंड होऊ शकतात, असं त्यांनी म्हटलं आहे.

रौनक खत्री यांनी पुढे म्हटलंय की, आम्हाला आशा आहे की मॅडम त्यांच्या ऑफिसमधील एसी हटवतील. जेव्हा रौनक खत्री प्राचार्यांच्या ऑफिसमध्ये गेले तेव्हा तिथे प्राचार्य उपस्थित नव्हते. तिथे उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांनी त्याना थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांच्याही वाद झाला.

झहीर खान आणि सागरिकाच्या घरी झाले छोट्या पाहुण्याचे आगमन, नाव आहे एकदम युनिक

0

क्रिकेटपटू झहीर खान आणि सागरिका घाटगे यांनी त्यांच्या पहिल्या बाळाचे स्वागत केले आहे. त्या दोघांना मुलगा झाला आहे. याची माहिती त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती दिली आहे. या जोडप्याने बुधवारी संयुक्त पोस्ट शेअर केली आणि मुलाच्या आगमनाची घोषणा केली. फ्रेममध्ये, झहीर खान त्याच्या मुलाला मांडीवर धरलेले दिसत आहे तर सागरिका झहीरच्या खांद्याभोवती हात ठेवून आहे. त्यांनी त्यांच्या मुलाचे नाव फतेहसिंह खान असे ठेवल्याची माहिती कॅप्शनमधून दिली आहे. या जोडप्याने एक गोंडस कुटुंबाचा फोटो शेअर केला आहे.

सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट

१६ एप्रिल रोजी सकाळी झहीर खान वडील झाल्याची बातमी त्याची पत्नी सागरिका घाटगे यांच्या इन्स्टाग्राम पोस्टवरून त्यांच्या चाहत्यांना तिने सांगितली. सागरिकाने तिच्या इंस्टाग्रामवर लिहिले की तिच्या घरी एका बाळाचा जन्म झाला आहे, ज्याचे नाव फतेह सिंग खान आहे. ग्रे शेडयामध्ये फोटो शेअर करताना या जोडप्याने लिहिले, “प्रेम, कृतज्ञता आणि दैवी आशीर्वादाने आम्ही आमच्या मौल्यवान लहान मुलाचे, फतेहसिंह खानचे स्वागत करतो.”

IPL 2025 मध्ये मॅच फिक्सिंगसाठी प्रयत्न, खेळाडूंना दिली जात आहेत आमिषं, कोण आहे मास्टरमाइंड?

0

जगप्रसिद्ध टी 20 लीग पैकी एक असणारी इंडियन प्रीमियर लीगचा 18 वा सीजन अगदी धमाकेदार पद्धतीने सुरु आहे. आतापर्यंत स्पर्धेचे एकूण 31 सामने झाले असून प्रत्येक सामन्यानुसार खेळाचा रोमांच वाढू लागलाय. असं असताना या स्पर्धेला गालबोट लावण्याचा प्रयत्न होत असल्याची माहिती मिळतेय. मीडिया रिपोर्ट्सनुसार आयपीएल 2025 मध्ये (IPL 2025) फिक्सिंग करण्याचा प्रयत्न होत आहे. बीसीसीआयचे अँटी करप्शन आणि सिक्युरिटी युनिट लीगने स्पर्धेत सहभागी झालेल्या 10 संघांना याआधीच सावधगिरी बाळगण्यास सांगितले आहे. त्यांना इशारा देण्यात आला आहे की कोणीही त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत असल्यास लगेचच रिपोर्ट करा. ACSU च्या माहितीनुसार सध्या स्पर्धेवर भ्रष्टाचाराचे संकट घोंगावत आहे. फॅन्स असल्याचे भासवून खेळाडूंना प्रशिक्षकांना, सपोर्ट स्टाफ, संघ मालक तसेच समालोचकांच्या कुटुंबाला महागड्या गोष्टी भेट देऊन आकर्षित करण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत.

कोण आहे मास्टरमाइंड?

क्रिकबजने याबाबत एक रिपोर्ट दिला असून त्यात सांगितल्यानुसार, ‘ACSU चं म्हणणं आहे की हैदराबादचा एक बिसनेसमॅन स्पर्धेत भाग घेतलेल्या लोकांशी मैत्री करण्याचा प्रयत्न करतोय. हा बिझनेसमॅन नक्की कोण आहे याबाबत अजून कोणताच खुलासा करण्यात आलेला नाही. पण हे नक्कीच कळालं आहे की या बिझनेसमॅनचा सट्टेबाजांशी थेट लागेबांधे आहेत.

हा बिझनेसमॅन यापूर्वी देखील काही काही भ्रष्ट कारवायांमध्ये सहभागी झालेला होता. म्हणूनच ACSU ने आयपीएलमध्ये सहभागी झालेल्या व्यक्तींना याबाबत स्वागत केले आहे. जर या बिझनेसमॅनने कोणत्याही प्रकारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तर ताबडतोब तक्रार करा, असेही सांगण्यात आले आहे. तसेच त्याच्याशी असलेले कोणतेही संभाव्य नाते किंवा संलग्नता असल्यास त्याचा खुलासा करावा.

दागिने, महागड्या हॉटेलची प्रलोभन :

क्रिकबझने दिलेल्या माहितीनुसार या व्यक्ती फॅन बनून खेळाडू, कोच, सपोर्ट स्टाफ, टीम मालक इत्यादींच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतोय. असं म्हटलं जातंय की या व्यक्तीला टीमच्या हॉटेल आणि सामन्यादरम्यान सुद्धा पाहण्यात आलंय. तो त्याच्या टार्गेटला प्रायव्हेट पार्टींमध्ये आमंत्रित करतोय. तो केवळ टीममधील सदस्यांनाच नव्हे तर त्यांच्या कुटुंबियांनाही भेटवस्तू देत असल्याची माहिती आहे.

सादर बिझनेसमॅन फॅन बनून खेळाडू, कोच तसेच कॉमेंटेटर्सना दागिन्यांच्या दुकानांमध्ये, महागड्या हॉटेलमध्ये घेऊन जाण्याची ऑफर देतोय. एवढंच नाही तर तो सोशल मीडिया द्वारे विदेशी राहणाऱ्या खेळाडूंच्या कुटुंबाला सुद्धा संपर्क करण्याचा त्याने प्रयत्न केलाय.

दिल्लीकर चाखणार कोकणातील हापूसची चव, आंबा महोत्सवाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

0

उन्हाळा म्हटलं की अनेकांच्या कपाळावर आठ्या उमटतात, पण आंब्याचं नाव काढलं की तोच उन्हाळा सुसह्य होण्याची शक्यता वाढते. आंबा आवडत नाही असा माणूस विराळाच. कोकणातील हापूसची चव ही प्रत्येक आंबाप्रेमीच्या जीभेवर रेंगाळते, अगदी परदेशातही हा आंबा जातो. आता याच हापूसची चव देशाच्या राजधानीतल्या लोकांना अर्थात दिल्लीकरांनाही चाखता येणार आहे. कशी आणि कुठे ? अहो खुद्द दिल्लीत, कारण राजधानी दिल्लीमध्ये आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार असून या दिमाखदार महोत्सवाचे उद्घाटन खुद्द देशाच्या पंतप्रधानांच्या, नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार आहे.

दिल्ली महाराष्ट्र सदन येथे आयोजित आंबा महोत्सवाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार असून 30 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वाजता उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. 27 मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्राचे खासदार रविंद्र वायकर यांच्या अभिनव संकल्पनेच्या मध्यमातून दिल्ली येथे या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. 30 एप्रिल व 1 मे असे दोन दिवस आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असन दिल्लीकरांना अस्सल देवगड, रत्नागिरी हापूस आंब्याची तसेच अन्य कोकणी उत्पादनांची चव चाखायला मिळणार आहे. तसेच या दोन दिवसांत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं आहे.

महाराष्ट्र दिनी चाखता येणार खास हापूसची चव

राज्यांमध्ये थेट बाजारपेठ उपलब्ध व्हावी, त्यांना जास्तीत जास्त नफा मिळावा, आंब्याच्या निर्यातीला अधिक चालना मिळावी, या उदात्त हेतूने खासदार वायकर यांनी दिल्ली येथील महाराष्ट्र सदनमध्ये 30 एप्रिल ते 1 मे (महाराष्ट्र दिन) पर्यंत आंबा महोत्सवाचे आयोजन केले आहे. या महोत्सवामुळे ग्रामीण भागातील उद्योजकांना मोठ्या प्रमाणात बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. या महोत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे ही आयोजन करण्यात येणार आहे. महोत्सवाला केंद्रीय मंत्री, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री यांच्या बरोबरच देशाच्या विविध राज्यातील खासदार व आमदारही उपस्थित राहणार आहेत.

मुंबईतील खासदार रविंद्र वायकर यांनी आंबा महोत्सवाचे नियोजन करून या महोत्सवाचे उद्घाटन देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभ हस्ते व्हावे यासाठी त्यांची भेट घेतली होती. त्यानुसार त्यांनी आंबा महोत्सवाच्या उद्घाटनास वेळ दिली आहे. प्रत्येक राज्यातील जिल्ह्यात उत्पादित होणाऱ्या फळांना जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी राज्यांनी प्राधान्य देण्याची आवश्यकता आहे, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेटी दरम्यान व्यक्त केले होते. दिल्लीतील जास्तीत जास्त आंबा प्रेमीनी या महोत्सवाला भेट देऊन कोकणातील आंबा, अन्य उत्पादकांना तसेच शेतकऱ्यांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन खासदार रविंद्र वायकर यांनी केले.

प्रत्येक राज्याचं फळ प्रसिद्ध व्हायला पाहिजे

या महोत्सवाबाबत रविंद्र वायकर यांनी प्रतिक्रिया दिली. हा उत्सव चांगल्या प्रकारे व्हावा आणि कोकणातील शेतकऱ्यांना दिल्लीत बाजार पेठ निर्माण व्हावी हा उद्देश असल्याचं त्यांनी सांगितलं. दिल्लीत हापूस आंबा मिळत नसल्याचं दिसलं. त्यामुळे ज्याप्रमाणे मुंबईत मालवणी महोत्सव, कोकणी महोत्सव करतो, तसंच दिल्लीत आंबा महोत्सव करण्याचं ठरवलं. मी पंतप्रधान मोदींची भेट घेतली, त्यांनी वेळ दिली. त्यांना या आंबा महोत्सवामागची योजना सांगितली. प्रत्येक राज्याचं फळ प्रसिद्ध व्हायला पाहिजे, असं पंतप्रधानांनी सांगितलं. या महोत्सवासाठी पंतप्रधान कार्यालयाशी संपर्क सुरू होता. अखेर 30 एप्रिल रोजी पंतप्रधान हे या आंबा महोत्सवाला येणार आहेत, असं वायकरांनी नमूद केलं. तेथे सांस्कृतिक कार्यक्रमसुद्धा केला जाणार आहे, असं त्यांनी सांगितलं.

जिवंत शिवसैनिकाला अखेर स्मशानात जाऊन तिरडीवर झोपावं लागलं, कारण….

0

महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी शेतकऱ्यांना कर्जमाफीच आश्वासन दिलं होतं. असं म्हसळेकरांनी आरोप केला. पण निवडणूक जिंकल्यानंतर सरकारला आश्वासनाचा विसर पडला. आजही महाराष्ट्रातील हजारो शेतकरी बँक आणि सावकारांच्या कर्जाच्या ओझ्याखाली दबलेले आहेत. पण सरकारची प्राथमिकता दुसरीच आहे असं म्हसळेकरने आरोप केला.

झाडावर चढून प्रदर्शन

कारभारी म्हसळेकरने अशा प्रकारच प्रतिकात्मक, अनोख आंदोलन करण्याची ही पहिली वेळ नाहीय. याआधी 7 फेब्रुवारी 2025 रोजी झाडावर चढून प्रदर्शन केलं होतं. शेतकऱ्यांची स्थिती, सरकार आणि समाजाच लक्ष वेधणं हा या आंदोलनांमागे उद्देश होता. सरकार जो पर्यंत कर्जमुक्तीचा निर्णय जाहीर करत नाही, तो पर्यंत वेगवेगळ्या स्वरुपात हे आंदोलन सुरु राहिलं असं कारभारी म्हसळेकरने सांगितलं.

‘फुले’ चित्रपटाच्या वादावर राज ठाकरेंची भूमिका काय? ट्रेलर पाहून म्हणाले..

0

याबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेच्या कार्याध्यक्षा शालिनी ठाकरे म्हणाल्या, “फुले चित्रपटाच्या टीमने राज ठाकरेंची भेट घेतली. चित्रपटात खरा इतिहास दाखवला असेल तर काहीच बदल करायची गरज नाही. बिनधास्त चित्रपट प्रदर्शित करा. फुलेंच्या जयंतीदिनीच हा चित्रपट प्रदर्शित व्हायला हवा होता, असंदेखील राज ठाकरेंनी म्हटलंय. यात कोणत्याही जातीचं राजकारण नाही. महापुरुषांना जातीच्या राजकारणात का आणत आहात असा राज ठाकरे यांचा प्रश्न आहे. महाराष्ट्रात अनेक मोठे विषय आहेत. असे इतर विषय घेऊन त्या मुख्य विषयांना बगल देण्याचं काम केलं जात आहे.”

राष्ट्रीय पुरस्कार विजेते अनंत महादेवन यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. ज्योतिबा फुले यांच्या भूमिकेत ‘स्कॅम 1992’ फेम प्रतीक गांधी आणि सावित्रीबाई फुले यांच्या भूमिकेत अभिनेत्री पत्रलेखा झळकणार आहेत.